* मिनी सिंह

आपण २१ व्या शतकात जगत आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात मुली मुलांच्या समानतेने वाटचाल करत आहेत. उलट अनेक क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. तरीही अजूनही काही लोक असे आहेत जे मुलींचे पावित्र्य त्यांच्या कौमार्यावरून ठरवतात. पुरुषांसाठी आजही मुलीचे कौमार्य महत्वाचे मानले जाते. आजही त्यांच्या पावित्र्याची पडताळणी केली जाते.

जरी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करतो, त्यांच्यासारखे खाणेपिणे, त्यांच्यासारखे उठणेबसणे, शिकणे, बोलणे, राहू इच्छितो, पण तरीही मानसिकता अजूनही १४-१५व्या शतकातील आहे. सुशिक्षित असूनही कुठेतरी मुलांची मानसिकता अजूनही अशीच आहे की त्यांची नववधू व्हर्जिन असायला हवी.

आजही भारतीय समाजात लग्नात मुलगी व्हर्जिन असणे अनिवार्य मानले जाते. मुली व्हर्जिन असणे घराची प्रतिष्ठा व चारित्र्य यांच्याशी तोलले जाते. जर लग्नाआधी मुलगी आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर तिला चारित्र्यहीन म्हटले जाते. पण जर मुलाने असे केले तर म्हटले जाते की हे वयच असे असते.

व्हर्जिनिटीचा अर्थ

व्हर्जिनिटीचा अर्थ कौमार्य म्हणजे मुलगी कुमारिका आहे व तिने याआधी कोणाशीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती व्हर्जिन आहे. हे तपासण्यासाठी आपल्या समाजात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यात सर्वात विचित्र मार्ग म्हणजे पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून पाहणे की संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग पडले आहेत की नाही. कौमार्याबाबत आजही इतके गैरसमज आहेत की शिकलेसवरलेले लोकसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही.

कौमार्याबाबत गैरसमज

पहिल्यावेळी शरीरसंबंध ठेवले की रक्तस्त्राव होतोच हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण ९० टक्के घटनांमध्ये पहिल्यावेळी सेक्स केल्यास रक्तस्त्राव होत नाही. एका संशोधनात असे आढळले की सेक्स दरम्यान रक्तस्त्राव होत नाही. घोडेस्वारी व टेम्पोन अशा खेळांमुळे पडदा फाटतो किंवा तो अत्यंत पातळ होतो किंवा राहातच नाही.

पहिल्या वेळी सेक्स करताना वेदना होतात, हा एक दुसरा गैरसमज आहे. जर सेक्सच्या वेळी मुलगा व मुलगी मानसिकदृष्टया तयार असतील तर शक्यता आहे की वेदना होणार नाहीत. पण जर मुलगी तणावाखाली असून सेक्ससाठी मानसिकदृष्टया तयार नसेल तर योनी कोरडी व आकुंचन पावली तर पहिल्या वेळी वेदना होण्याची शक्यता असते. जर सेक्सआधी योग्य प्रकारे फोरप्ले केला गेला तरी वेदनेची शक्यता कमी असते किंवा नसतेच.

व्हर्जिन मुलीच्या योनीचा आकार लहान असतो, हे खोटे आहे, कारण प्रत्येक मुलीच्या योनीचा आकार तिच्या शरीरयष्टीप्रमाणे असतो. व्हजायनाचा आकार लहानमोठा असणे किंवा शिथिल अथवा आकुंचन पावलेला असणे याचा तिच्या व्हर्जिन असण्याशी काहीही संबंध नाही.

टू फिंगर टेस्ट

अनेक लोकांचे म्हणणे आहे की मुलीच्या कौमार्याच्या टेस्टसाठी सर्वात भरवशाची टेस्ट टू फिंगर टेस्ट आहे. पण अशी कोणतीही टेस्ट नाहीए, ज्यावरून हे समजेल की मुलीचे कुणाशी संबंध होते किंवा नाही.

हे अतिशय क्लेशकारक आहे की बलात्कारपीडित स्त्रीच्या कौमार्याचे परीक्षण टू फिंगर टेस्टने केले जाते. याने कळते की त्या मुलीचा बलात्कार झाला आहे की नाही. पण अशा प्रकारची टेस्ट करणे म्हणजे एका बलात्कारानंतर दुसरा बलात्कार करण्यासारखे आहे. २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की टू फिंगर टेस्ट पीडितेला तेवढयाच वेदना देतात, जेवढया दुष्कर्म करताना होतात. कोर्टाने असेसुद्धा म्हटले आहे की अशी टेस्ट करणे बलात्कार पीडितेचा अपमान आहे. हे तिचे अधिकार नाकारणे आहे. सरकारने ही टेस्ट बंद करून दुसरा एखादा उपाय शोधावा.

एका तज्ज्ञाचा दावा आहे की आज समाज तंत्रज्ञान जगात आहे. एका पीडितेसोबत अशी टू फिंगर टेस्ट करणे अमानवीय आहे. ही टेस्ट पीडितेसोबत परत बलात्कार करण्यासारखे आहे. म्हणून या टेस्टवर पूर्णत: बंदी आणायला हवी.

सायकल चालवणे, घोडेस्वारी, डान्स, व्यायाम किंवा इतर कोणत्या कामामुळे पडदा आधीच नाहीसा झालेला असतो. अशात एखाद्या मुलीच्या चारित्र्याचा अंदाज लावणे स्वत:लाच धोका देण्यासारखे आहे. महिलेच्या कौमार्याचे परीक्षण करणे मागास समाजाचे लक्षण आहे.

कौमार्याचे परीक्षण

तुम्ही हे ऐकून अवाक् व्हाल की आजही एक समुदाय असा आहे ज्यात नवविवाहित वधूचे कौमार्य परीक्षण केले जाते. महाराष्ट्रातील कांजरभाट समाजात पहिल्या रात्री वधूच्या कौमार्याची तपासणी त्या समाजातील महिला करतात. पहिल्या रात्री वरवधूच्या बेडवर पांढरी चादर टाकली जाते. खोलीत जाण्याआधी दागिने व टोकदार वस्तू ज्या तिने घातल्या असतात, त्या काढल्या जातात, जेणेकरून तिच्या अंगावर कोणतीही जखम होऊन रक्त येऊ नये.

जर संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग दिसले तर वधू परीक्षेत पास झाली, जर असे घडले नाही तर ती नापास झाली. या कुप्रथेत केवळ वधूचेच परीक्षण होते, वराचे नाही. मुलाने लग्नाआधी कोणाशी संबंध ठेवले आहे अथवा नाही हे कोणीच विचारात घेत नाही आणि कोणाला विचारायचेसुद्धा नसते.

कांजरभाट समाजातील अनेक तरुण व महिला या प्रथेविरुद्ध आवाज उठवतात, पण अशांना समाजातून बहिष्कृत केले जाते. या समुदायातील तरुण ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ या शीर्षकाखाली ही मोहीम चालवत आहेत. यात व्हीचा अर्थ व्हर्जिनिटी आहे. या मोहिमेचे समर्थन करणाऱ्या एका युवकाला या समुदायाने चांगलीच मारहाण केली होती.

थोड्याफार प्रमाणात ही मानसिकता इतर वर्गातही आहे. पण ती अशाप्रकारे दिसून येत नाही. पती सतत हेच जाणून घेण्यात गुंतलेला असतो की आपली पत्नी लग्नाआधी इतर कोणावर प्रेम तर करत नव्हती ना?

हायमन सर्जरीची का आवश्यकता आहे

आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की डॉक्टरांनी यावरसुद्धा उपाय शोधला आहे. हो, गमावलेली व्हर्जिनिटी मुलगी परत मिळवू शकते.

एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार हे ऑपरेशन केवळ हायक्लास मुलीच नाही तर उच्चवर्गीय, मध्यम वर्गीय मुलीसुद्धा करू शकतात. एका चिकित्सक संस्थानांद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात मुली हे सगळे विवश होऊन करतात, जेणेकरून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या उद्भवणार नाही.

नागपुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. घिसड यांचे म्हणणे आहे की मुली त्यांच्या योनीच्या आच्छादनाला पूर्ववत करण्याबाबत विचारतात कारण त्यांना वाटत असते की जर त्यांचे लग्न एखाद्या रूढीवादी कुटुंबात झाले तर ते लोक तिचे जगणे कठीण करून टाकतील.

डॉक्टर पुढे सांगतात की पालक स्वत:च मुलीला ऑपरेशन करण्यासाठी घेऊन येतात. व्हर्जिनिटी नष्ट होण्याचे कोणतेही कारण असो, जर आईबापांसोबत मुलगी आली तर तिचे मनोबल कायम राहते.

काय आहे ही हायमन सर्जरी

जर एखाद्या मुलीने कोणत्याही कारणास्तव आपली व्हर्जिनिटी गमावली असेल तर ती ही सर्जरी करू शकते. या सर्जरीत घाबरायचे कोणतेच कारण नाही ना याचे कोणते साईडइफेक्ट्स आहेत. ही सर्जरी करून कोणतीही महिला कुमारिका होऊ शकते.

मुलं कितीही उच्च विचारी असण्याचा दावा करत असतील तरी आजही त्यांचे लक्ष मुलीच्या कौमार्यावरच असते. पण आता त्यांना ही मानसिकता  बदलावी लागेल. आज जर मुलींना ही सर्जरी करावी लागत असेल तर ते केवळ त्या पुरुषी मानसिकतेमुळेच, ज्यांना लग्नानंतर आपल्या बायकोकडून हे सिद्ध करून घायचे असते की तिचे कौमार्य सुरक्षित आहे वा नाही, भले त्यांचे स्वत:चे अनेक मुलीशी संबंध का असेना.

 

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...