* पारुल भटनागर

लहान वयातच प्रत्येक मुलगी स्वत:च्या लग्नाची स्वप्नं पाहते आणि जेव्हा मोठी झाल्यावर हे स्वप्नं सत्यात उतरतं तेव्हा मात्र तिच्या मनात सतत ही चिंता असते की चोली लहेंगा वा साडीमध्ये मी बारीक दिसेन ना, कोणी मला लठ्ठ तर म्हणणार नाही ना. यासाठी कितीतरी दिवस अगोदर आहारात एकवेळचं खाणं बंद करायला सुरूवात केली जाते, खरंतर हा काळ उपाशी राहण्याचा नसून स्वत:ला आतून मजबूत बनविण्याचा असतो. कारण चेहरा आकर्षक दिसण्याण्याबरोबरच शरीर सुदृढ रहाणं गरजेचं असतं.

परंतु अनेकदा चांगलं फिजिक मिळविण्यासाठी महत्त्वाचा आहार बंद केला जातो, जो फिटनेससाठी खासकरून गरजेचा असतो. तर चला जाणून घेऊया या सर्व गोष्टींबद्दल ज्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकाल :

पाण्याने करा दिवसाची सुरुवात

असं म्हणतात की स्वत:ला आजारांपासून वाचवायचं असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात पाण्याने करण्याबरोबरच पूर्ण दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी नक्की प्या आणि नववधूने यागोष्टी अमलात आणायला हव्यात. कारण पाणी शरीर हायड्रेट करण्याचं काम करण्याबरोबरच त्वचेलादेखील नैसर्गिक पद्धतीने उजळविण्यासाठीचं काम करतं.

हे शरीरातून टॉक्सीन्स बाहेर काढून पचन व्यवस्थित करतं, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळयाची समस्या उद्भवत नाही आणि नववधूचा चेहरा उजळतो. सोबतच रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे त्वचा कायमच निरोगी राहते. तेव्हा तुम्हाला जेव्हाही तहान लागेल तेव्हा कोल्ड्रिंक्सच्या जागी पाणी व लिंबू पाण्याने स्वत:ला ताजंतवानं ठेवा.

तेजस्वी त्वचेसाठी नारळाचं पाणी

नारळाचे पाणी अनेक वर्षापासून खूपच प्रसिद्ध पेय आहे. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये अनेक न्यूट्रीएंट्स असतात. यामध्ये कार्बस, फायबर प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम असतं. हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येकजण याचा आपल्या आहारात समावेश करतात. खासकरून नववधूने स्वत:च्या आहारात याचा दररोज समावेश करायला हवा. कारण हे शरीराला हायड्रेट ठेवून शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकून त्वचेला क्लियर बनविण्याबरोबरच त्यावर नैसर्गिक तेज आणण्याचं काम करतात.

हे तुमचे वर नैसर्गिक मोहिस चर्चादेखील काम करतं. मुरुमांनादेखील दूर ठेवण्याचं काम करतं. हे त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरचं काम करून मुरुमांना दूर ठेवतात. म्हणून जर तुम्ही नववधू असाल तर नारळ पाण्याचा तुमच्या आहारात आवर्जून समावेश करा.

थोडया थोडया वेळाने खा

तुम्हाला दीर्घ काळ उपाशी राहून नंतर एकदम जेवण घ्यायची सवय असेल तर आजपासूनच ही सवय सोडून द्या. कारण असं केल्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता. जे लठ्ठपणा वाढविण्याचं काम करतात. अशावेळी जर तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही तुमचं खाणं बंद करू नका. उलट थोडया थोडया वेळाने काहीतरी हेल्दी खात रहा. यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्याबरोबरच, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यामुळे वजन वेगाने तुम्ही कमी करू शकाल.

जेव्हा देखील छोटे-छोटे मिल्स घ्याल तेव्हा त्यामध्ये स्प्राऊट्स, चणे, सूप, ज्यूस, ब्राऊन ब्रेड सँडविच, सलाड, पोहे इत्यादींचा समावेश करा. विश्वास ठेवा छोटया-छोटया मिल्समुळे तुमचं पोट भरलेलं राहण्याबरोबरच तुम्हाला फिट ठेवण्याचेदेखील काम करेल.

हाय कॅलरी फूडला करा बाय-बाय

एकदा लग्न ठरल्यानंतर घरात लग्नाचं वातावरण निर्माण होऊ लागतं. होणाऱ्या नववधूसोबतच घरातील इतर लोकदेखील खरेदीमध्ये व्यस्त होतात. अशावेळी या धावपळीत जे खायला मिळेल ते खाणे योग्य नसतं, कारण प्रोसेस्ड व स्ट्रीट फूडमध्ये स्टार्च, तेल कार्बस अधिक प्रमाणात असल्यामुळे ते शरीराला तेवढयापुरतं एनर्जी देण्याचं काम करतात, परंतु नंतर शरीरात फुगून आतल्या आत पोखळ बनवतात.

अशावेळी गरजेचं आहे की तुम्ही खरेदीबरोबरच तुमच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी. यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे रस्त्यावरचं न खाता फक्त घरचं अन्न खावं .

तेजस्वी त्वचेसाठी

तुम्हाला फक्त तुमच्या लग्नाच्या दिवशीच तुमची त्वचा मेकअपने तेजस्वी दिसलेली हवी आहे का आणि जसा तुमचा मेकअप उतरेल तेव्हा तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल तेव्हा काय? हे सर्व नको आहे ना, तर मग तेजस्वी त्वचा व केसांसाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, प्रोटीन रिच फूड यांचा समावेश करा, कारण हे सर्व न्यूट्रिएंट्सने पुरेपूर असण्याबरोबरच तुमच्या त्वचेला आतून उजळविण्याचं काम करतात आणि तुम्हालादेखील हेच हवं असतं की तुमच्या त्वचेवर कायम तेज दिसून यावं, जे पाहून सर्वांनी तुमची स्तुती करावी की किती तेजस्वी चेहरा आहे, याचं काय रहस्य आहे.

यासाठी तुम्ही हिरव्या भाज्या, मोसमी फळं, विटामिन सी युक्त फळं, डाळी, अंडी, पनीर इत्यादींचा तुमच्या आहारात समावेश करा. परंतु या गोष्टीकडेदेखील लक्ष द्या की त्याचं प्रमाण थोडंचं असावं. जसं एकावेळी एक बाऊल डाळ आणि ५० ग्रॅम पनीरचं कॉम्बिनेशन योग्य आहे, कारण दोन्हीही रिच प्रोटीन असल्यामुळे तुम्हाला याची कॉन्टिटी पाहूनच घेणं गरजेचं आहे. अशावेळी कोरडया हिरव्या भाज्यासोबतच एक बाऊल डाळ तुम्हाला आतून व बाहेरून दोन्हीकडून मजबूत व तेजस्वी बनविण्याचं काम करेल.

हेल्दी नाश्ता

अनेकदा आपण नाश्ता करत नाही. असं केल्यामुळे आपण फिट राहू असा समज असतो. परंतु तुम्हाला सांगावसं वाटत की तुमची ही सवय तुम्हाला फिट नाहीतर आजारी करू शकते. कारण रात्रीच्या दीर्घकाळानंतर तुम्ही जर तुमचा नाश्ता केला नाही तर तुमचं मेटाबॉलिज्म कमकुवत होऊन तुम्ही अधिक लठ्ठ होऊ शकता.

व्यायामाचं वेळापत्रक पाळा

लग्न ठरल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं व्यायामाचं वेळापत्रक सोडून द्यावं. जर तुम्हाला तुमच्या लग्नात सुंदर दिसायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण  यामुळे शरीर फिट राहण्याबरोबरच तुम्हालादेखील प्रत्येकवेळी ऊर्जावान असल्याची जाणीव होईल. यासाठी घरच्या घरी स्किपिंग, जॉगिंग व रनींगदेखील करू शकता आणि जर घरी करण्यात आळस येत असेल तर जिम, योगा क्लासेसला जाऊन वेगाने वजन कमी कराल आणि तुमचा स्टॅमिनादेखील वाढेल.

आपल्या शरीरासाठी दररोज अर्धा तास काढणं आपलं कर्तव्य आहे. कारण जेव्हादेखील चांगलं खाल, व्यायाम कराल तेव्हा तुम्हाला त्याचा योग्य रिजल्ट मिळण्याबरोबरच तुमची त्वचादेखील ग्लो करेल. म्हणून जर तुमच्या लग्नाला थोडा काळ उरला असेल तर व्यायामाचं रुटीन सोडू नका. उलट थोडं अजून वर्कआउट वाढवून तुमचं शरीर मेंटेन ठेवा.

ड्रायफ्रुट्स खा

अनेकदा तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की जास्त ड्रायफ्रुट्स खाता कामा नये, कारण यामुळे शरीरात फॅट वाढतं, खरंतर तुम्हाला सांगावसं वाटतं की ड्रायफ्रुट्स विटामिन्स व प्रोटिन्सने पुरेपूर असल्यामुळे शरीरातील इतर उणीव दूर करून आतून शरीराला मजबूत बनविण्याचं काम करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की १०० ग्रॅम ड्रायफ्रुट्स मध्ये १०० ग्रॅम ताज्या फळांच्या तीन पट अधिक फायबर, विटामिन्स व मिनरल्स मिळतील. म्हणजेच कमी क्वांटीटीत अधिक न्यूट्रीएंट्स.

म्हणून सर्वप्रथम हा संभ्रम काढा की ड्रायफ्रुट्सने शरीराचे नुकसान होईल. जर तुम्ही दररोज थोडेसे ड्रायफ्रुट खाल्लेत, तर तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने छानपैकी तुमच्या लग्नाचा आनंद घेऊ  शकाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...