* पूनम पांडे

जेव्हापासून फोनचे स्वरूप बदलले आणि इतके लहान झाले की तो आपल्या सर्वांच्याच मुठीत सामावू लागला, तेव्हापासून तो बहुगुणीही झाला, संभाषण आणि संपूर्ण जगाचे काम हाताळल्यामुळे हा छोटया रूपाचा मोबाईल सगळयांसोबत नेहमी सोबत्यासारखा राहू लागला.

मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण जगाची माहिती तुमच्या खिशात ठेवू शकता हे १०० टक्के खरे आहे. त्यामुळेच मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लोक याशिवाय जगू शकत नाहीत. अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवस-रात्र प्रत्येक क्षणी मोबाईल स्वत:जवळ ठेवायला विसरत नाहीत. कुणाला काळजी असते की कुठला महत्त्वाचा फोन तर येणार नाही ना किंवा कुणाला लवकर उठण्यासाठी त्यात अलार्म लावण्याची गरज असते.

सहसा लोकांना अशी सवय असते की रात्री झोपताना मोबाईल ते उशीखाली ठेवून झोपतात. पण हे जे कोणी करत असेल त्याची ही सवय पूर्णपणे चुकीची आहे. असे केल्याने तुम्हाला भविष्यात डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या होऊ शकते. मोबाईलमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अत्यंत हानिकारक असते.

व्यसन चुकीचे आहे

मोबाईल फोन आणि टॅब्लेटचा आकार जसजसा वाढत आहे, तसतशी ही गॅजेट्स दिवसेंदिवस हानीकारक होत आहेत. रात्री अंधार पडू लागल्यावर आपले शरीर मेलाटोनिन नावाचा घटक शरीरात सोडू लागते. हा घटक शरीराला झोपेसाठी तयार करतो.

परंतु मोबाईल फोन आणि टॅब्लेटच्या डिस्प्ले स्क्रीनमधून निघणारा निळा-हिरवा प्रकाश हा घटक तयार होऊ देत नाही. यामुळे शरीरात फार कमी प्रमाणात मेलाटोनिन तयार होते, ज्यामुळे आपल्याला सहज झोपही लागत नाही. त्यांच्या डिस्प्ले स्क्रीनमधून निघणाऱ्या निळया-हिरव्या प्रकाशाऐवजी पिवळा-लाल प्रकाश निघेल असा प्रयत्न केला पाहिजे.

नुकसान वाढले

मोबाईल रात्रभर उशीजवळ ठेवण्याबाबत झालेल्या अनेक अभ्यासातही असे म्हटले गेले आहे की यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यात मुख्य म्हणजे वारंवार होणारी डोकेदुखी, अधूनमधून डोक्यात कंपन होणे आणि त्यामुळे होणारी निराशा, कमी काम करूनही सतत थकवा जाणवणे, हालचाल करताना विनाकारण चक्कर येणे, हताशपणा आणि नकारात्मक विचारांचा अतिरेक, तासनतास प्रयत्न करूनही गाढ झोप न लागणे, डोळयांत कोरडेपणा येणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, शारीरिक श्रमापासून काम चुकवेगिरी करणे, कानात आवाज वाजल्यासारखे वाटणे, बोलतांना अगदी जवळ बसूनही एखादे वाक्य नीट ऐकू न येणे, स्मरणशक्ती कमी होणे, पचनसंस्थेमध्ये अडथळे येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, सांधेदुखी, एवढेच नाही तर रात्रभर मोबाईल जवळ ठेवल्यास तो तुमच्या त्वचेच्या सामान्य वृद्धत्वाला गती देऊ शकतो. अकाली सुरकुत्या, त्वचेची जळजळ, अगदी खाज सुटण्याच्या समस्यांमध्ये ही योगदान देतो.

तज्ज्ञ काय म्हणतात

आज जगभरातील सर्व डॉक्टर्स सांगतात की जर झोपण्यापूर्वी मोबाईल फोन किंवा टॅबलेटचा वापर केला नाही तर जवळ-जवळ एक तास अधिक झोप घेता येते. ते म्हणतात की आपले जैविक घडयाळ पृथ्वीच्या चोवीस तासाच्या घडयाळाशी ताळमेळ बसवून कार्य करते.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मेंदूमध्ये एक मास्टर घडयाळ आहे, ज्यावर पर्यावरणाच्या अनेक घटकांचादेखील परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याची खूप हानी होते, चांगली झोप येण्यासाठी मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप यासारख्या गोष्टींचा वापर झोपण्याच्या किमान १ तास आधी बंद करणे आवश्यक आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...