* प्रतिनिधी

भारतात प्रवाशांना फसवण्याचा एक लांबचलांब इतिहास आहे. पण हो, बदलत्या काळात फसवणुकीचा चेहरादेखील बदलला आहे. याने आता बदमाश, ट्रॅव्हल एजंट, गाईड, दुकानदार, अनोळखी मित्र आणि टॅक्सी ड्रायव्हर यांचे रूप घेतले आहे. काही उदाहरणं लक्षात घेऊया. मार्च २०१६मध्ये जयपूरच्या करधनी पोलिस ठाण्यात एका तरुणाने परदेशयात्रेदरम्यान त्याच्या एटीएममधून पैसे काढल्याची पोलिस तक्रार नोंदवली. हा युवक सौदी अरबला गेला होता, जिथे त्याने सौदी अरबमधील जैता शहरात ट्रान्झ्क्शन केले होते. त्यानंतर थोडयाच वेळात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला की १७७७ डॉलर म्हणजे जवळपास एक लाख २० हजार रुपये काढले आहेत.

अशी घटना आपल्यासोबतही घडू शकते

ऑक्टोबर २०१५ मध्ये अजमेर येथे एका फाउंडेशन सोसायटीच्या बॅनर अंतर्गत अनेक वृद्धांना धार्मिक यात्रा करवून आणण्याचे स्वप्न दाखवून काही लोक हजारो रुपये घेऊन फरार झाले. यासाठी काही लोकांनी दोन दिवसांपूर्वी घरोघरी जाऊन पॅम्प्लेट्स वाटले होते. काही लोक या जाळयात अडकले आणि जेव्हा प्रवासाला जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांच्याकडे पश्चाताप करण्याची पाळी आली.

१० जानेवारी, २०१४ हिमाचल प्रदेशातील सिमल्यात गुजरातमधून आलेल्या २ प्रौढ जोडप्यांना सिमल्यातीलच एका ट्रॅव्हल एजंसीने लुटले. १२ दिवसांच्या पॅकेजमध्ये संपूर्ण शहर दाखवण्यासाठी ३४ हजार रुपये घेतले आणि दुसऱ्याच दिवशी एजंट फरार झाले. प्रकरण मनाली पोलिस ठाण्यात नोंदवले आहे. तसे पाहता, जेव्हा मॉलमध्ये सिल्वीने आपल्या क्रेडिट कार्डने रक्कम चुकवली तेव्हाच तिच्या कार्डचे क्लोनिंग करण्यात आले होते. या पर्यटकाने जोवर आपले खाते तपासले तोवर त्याची सगळी जमा रक्कम काढली गेली होती. पर्यटकांना फसवण्याचे हे तर केवळ एक उदाहरण आहे. रोजच पर्यटकांना फसवण्याची अशी उदाहरणं कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्राचे मथळे बनतात. मग ती घटना दिल्लीतील असो की आग्रा, राजस्थान, बिहारमधील असो. देशातील जवळपास प्रत्येक पर्यटनस्थळाजवळच्या पोलिस ठाण्यात पर्यटकांना फसवण्याच्या शेकडो तक्रारी नोंदवल्या आहेत. म्हणून तुम्हीसुद्धा पर्यटनास जाण्याची योजना आखत असाल तर थोडे सावध राहा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...