कथा * सुमन बेहरे

‘‘अहो, चला ना, आपण कुठंतरी बाहेर आठदहा दिवस फिरून येऊयात. राघवही त्याच्या मित्रांसोबत सिंगापूरला ट्रिपवर गेलाय. आपण किती दिवसात कुठंच गेलो नाही.’’ सुनयनानं नवऱ्याला, जयला खूपच गळ घातली.

‘‘मला कुठंही जायचं नाहीए. माझा अगदी संताप होतो कुठंही जायचं नाव काढलं म्हणजे, काय मिळतं बाहेर जाऊन? यायचं तर पुन्हा घरीच ना? मग जायचं कशाला? ट्रेनचा प्रवास करा, थका, हॉटेलात राहा अन मूर्खासारखे इथे तिथे फिरा. विनाकारण इतकाले पैसे खर्च करायचे अन् प्रवास करून आल्यावर दमलो म्हणून पुन्हा घरी आल्यावर दोन दिवस विश्रांती घ्यायची. सगळी दिनचर्या विस्कळीत होते. मला कळतच नाही, तुला सतत ‘फिरायला जायचं’ एवढंच का सुचतं? मला नाही आवडत कुठं जायला हे ठाऊक असूनही आपलं, फिरायला जाऊचं तुणतुणं’’ जय संतापून ओरडला.

‘‘तुम्हाला नाही आवडत हे मला ठाऊक आहे, पण कधीतरी दुसऱ्याला आवडतं म्हणूनही काही करावं ना? बावीस वर्षं झाली लग्नाला, तुम्ही कधीतरी कुठं घेऊन गेलात का? राघवही बिचारा किती वाट बघायचा. बरं झालं तो तुमच्यासारखा संतापी अन् खडूस नाहीए ते! त्याला आवडतं प्रवास करायला. प्रत्येक मुलीला इच्छा असते लग्नानंतर नवऱ्याबरोबर प्रवासाला जावं. रोजच्या रूटीन आयुष्यातून वेळ काढून थोडं वेगळं आयुष्य जगावं. त्यामुळे पुन्हा कामं करायला, आपलं आयुष्य जगायला नवा उत्साह मिळतो. नव्या जागी, नवे लोक भेटतात, नवं काही खायला, बघायला, ऐकायला मिळतं. लोक काय वेडे आहेत का? उगीच ते   प्रवासाला जातात? तुम्हीच आहात जगावेगळे आणि अत्यंत चिक्कू, कंजूष. पैसा खर्च करायचा म्हटला की पोटात गोळा येतो तुमच्या. कधी तरी बायकोच्या, मुलाच्या भावनांना किंमत द्या, समजून घ्या. छोट्या छोट्या आनंदालाही का मुकायला लावता आम्हाला?’’ सुनयनाच्या मनातला सगळा संताप, सगळी खदखद आता बाहेर पडली.

‘‘उगीच मूर्खासारखी बडबडू नकोस अन् राघवचं काय सांगतेस? अजून लग्न नाही झालंय त्याचं. संसारासाठी पैसा खर्चावा लागेल, तेव्हा हे प्रवासाचं भूत पार उतरेल. सध्या तरी बापाच्या जिवावर चंगळ चाललीये त्याची.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...