कथा * माधव गवाणकर

मुंबईचा माणूस गावी, कोकणात येतो तो आंबे-फणस खायला. ताजी फडफडीत मच्छीहीसुद्धा कोकणपट्टीवरची शान आहे. त्यामुळे बागबागायतीत रमणारी आणि मांसमच्छीचं जेवण उत्तम रीतीने करणारी सुगरण बायको सागरला हवी होती. घर, शेतीवाडी सांभाळून तिने आईवडिलांबरोबर गावी आरामात राहावं आणि सागर जेव्हा कधी मुंबईच्या नोकरीतून रजा काढून घरी येईल, तेव्हा त्याचीही सेवा करावी अशी त्याची साधी अपेक्षा होती. सागरला तशीच मुलगी-बायको म्हणून मिळाली. थोडी फटकळ होती, पण दिसायला खूप सुंदर होती.

मधुचंद्राच्यावेळी तिने बरेच नखरे, नाटकं केली. ‘तुमचा स्टॅमिना वाढवा की! मला नीट सुख मिळाले नाही’ अशीही तक्रार केली. खरंतर नॉर्मल पुरूष प्रणयात जसा, जितका रमतो, तेवढा सागर रमला होता. पण तो फार लवकर दमला असं भासवून बायकोने त्याला खिजवण्याचा, खचवण्याचाच प्रयत्न केला. तरीही सागरने काही मनाला लावून घेतलं नाही. बायकोचा गैरसमज दूर करता येईल  अशी त्याला आशा होती. नोकरीमुळे त्याला मुंबईला परतावं लागलं. त्याची ती नाटकी बायको म्हणाली, ‘‘ मला या वाळवंटात टाकून तुम्ही कशाला दूर जाता?’’ पण तिला खरं तर नवरा गावात नकोच होता. कारण तिचे इतर मित्र तिच्या गळाला गावले नसते.  नवऱ्याची नजर व धाक याचा तिला तिटकारा होता. माहेरी तिचं वर्तन स्वैरच होतं. नाव नयना असलं तरी गावातली पोरं तिला मैना  म्हणू लागली होती.

सागर तिला प्रेमाने फोन करायचा. तेव्हा ही सतत कुणाबरोबर तरी बोलण्यात दंग असायची. सागरने विचारणा केली तर उगीच सबबी देत सांगायची की माहेरच्यांचे, कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणींचे सारखे फोन येतात. पण आता सागरला संशय येऊ लागला की फोनवर तिचे मित्र तर नसतील? नयना घरकाम टाकून गावभर भटकते असेही सागरला त्याच्या आईने सांगितले होते.

एकदा अचानक मुद्दामच न सांगता सागर गावाकडे आला. एसटी स्टॅन्डवर उतरताच त्याच्या लक्षात आलं की नयना स्टॅन्डसमोरच्या मैदानात एका तरूणाशी बोलत उभी आहे आणि नंतर बाइकवर डबलसीट बसून ती त्याच्याबरोबर निघूनही गेली. तो तरूण तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान व कॉलेजमध्ये शिकणारा बड्या बापाचा बेटा वाटत होता. नयना जणू त्याची प्रेयसी असावी तशी त्याला चिकटून बसली होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...