कथा * पूनम अहमद

एके दिवशी विनय मुंबईतल्या त्याच्या कार्यालयातून परतला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पत्नी रिनाने त्याला यामागचे कारण विचारले असता तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘मला सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे, मला तुमच्यासोबत फ्रान्समधील मुख्य कार्यालयात जाण्याची संधी मिळाली आहे. फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे राहुलला आपण आपल्यासोबत नेऊ शकत नाही.’’

रिनाला अत्यानंद झाला, पण अडचण ऐकून तिचा उत्साह मावळला, ‘‘आता काय करायचे, काहीही झाले तरी ही संधी मला सोडायची नाही.’’

‘‘राहुलला तुझ्या आईवडिलांकडे ठेवूया. तेही इथे मुंबईतच तर आहेत.’’

‘‘नाही विनय, आई आजारी आहे. ती राहुलला सांभाळू शकत नाही. भाऊ, वहिनी दोघेही कामाला आहेत. त्यामुळे त्याला तिथे सोडू शकत नाही, पण आणखी एक मार्ग आहे. दिवाळीसाठी लखनऊहून तुझ्या आईवडिलांना बोलावून घे, ते इथेच राहिले तर राहुलचा वेळ आजूबाजूच्या मुलांसोबत खेळण्यात चांगला जाईल. कंपनी मोफत पाठवत आहे, तर ही संधी सोडणे मूर्खपणाचे ठरेल. यावेळची दिवाळी फ्रान्समध्ये. मी तर कल्पनाच करू शकत नाही. किती छान ना? आताच आईवडिलांशी बोल. त्यांना यायला सांग.’’

विनयने फोनवर सर्व काही वडील गौतम यांना सांगितले. ‘‘बघू,’’ एवढेच ते म्हणाले.

विनय रागाने म्हणाला, ‘‘यात बघण्यासारखे काय आहे? राहुलला फक्त तुमच्यासोबत सोडून आम्ही जाऊ शकतो.’’

गौतम यांनी फोन ठेवला आणि सर्व पत्नी सुधाला सांगितले. दोघेही एकमेकांकडे बघून हसले.

विनयची सर्व तयारी जवळपास वाया गेली. आईवडील न सांगता कुठेतरी गेले होते, याची चिंता होतीच, पण त्याहून अधिक दु:ख म्हणजे परदेशात जाण्याची संधी हातची गेली होती. आईवडील आहेत तरी कुठे? हे समजू शकत नसल्याने मुंबईत राहणारी बहीणही काळजीत होती. विनय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या विचारात होता.

खरंतर विनयला दिवाळीच्या ३ दिवस आधी निघायचे होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच तयारीत मग्न होता. वडिलांना यायला सांगूनही त्यांनी पुन्हा फोन केला नव्हता. रिना म्हणाली, ‘‘ते कधी येणार, हे फोन करून विचारा, आपल्याला जायला फक्त २ दिवस बाकी आहेत.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...