कथा * अर्चना पाटील

क्षितिज आज खूप आनंदात होता. विदिशाला भेटण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. दोघेही मुलींच्या होस्टेलपासून जवळच असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात भेटले.

‘‘मला उशीर झाला का?’’

‘‘नाही, मीच लवकर आलो होतो.’’

‘‘मी तुम्हाला एक विचारू का?’’

‘‘जे काही विचारायचे आहे, सगळेच विचारून टाक. लग्नानंतर गोंधळ नको.’’

‘‘तुम्ही एमएससी केमिस्ट्री, मग गावाकडे का राहता? पुण्यात येऊन नोकरी का करत नाही? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करत नाही?’’

‘‘शंभर एकर शेती आहे आपली? शिवाय आता मी देशमुखांचा एकटाच वारसदार. माझ्याशिवाय ती शेती कोणी पाहणार नाही. नोकरीतून जो पगार मिळेल त्यापेक्षा जास्तच उत्पन्न घेतो की मी शेतीतून. मग काय गरज नोकरीची?’’

क्षितिजच्या उत्तरातून विदिशाच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीही त्याचे गाव सोडून शहरात येणार नाही.

‘‘तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे?’’

क्षितिज खदखदून हसायलाच लागला.

‘‘एकदम सासूवरच आली की तू. माझ्या आईनेच पसंत केली आहे तुला. पण खरं सांगू का तूझा फोटो पाहिला आणि मी प्रेमातच पडलो तुझ्या. ग्रामीण भागातील असूनही पुण्यात बीएससी कॉम्प्युटर शिकते तू, इतकं भारी इंग्रजी बोलते तू. तुझं बोलणं, हसणं सगळंच आवडतं मला. कधी एकदा तू लग्न करून माझ्या आयुष्यात येशील असं झालं आहे मला.’’

विदिशाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिने लाजून मान खाली घातली. लग्नाचा दिवस येईपर्यंत क्षितिज आणि विदिशाने एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा, हनीमुन स्पॉट सर्व गोष्टींवर गप्पा मारल्या होत्या. एक मार्च लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची वरात पारावरून येऊन मंडपात उभी राहिली. पण नवरदेवाला ओवाळण्यासाठी वधुपक्षाकडून कोणीही पुढे येईना. कारण नवरी एक चिठ्ठी लिहून पळून गेली होती.

‘‘तात्या, मी खूप मोठी चूक करते आहे. पण लग्न करून आयुष्यभर अॅडजस्ट करायला माझं मन तयार होत नाहीए. आईसारखं केवळ चुल आणि मुल करायला नाही जमणार हो मला. तुम्ही शोधलेल्या स्थळात काहीच कमतरता नाही. त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी माझ्या या विवाहबंधनातून सुटका नाही. म्हणूनच तुम्हाला न सांगता मी हे घर कायमचे सोडून जाते आहे.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...