* पूनम पांडे
तुम्ही अथक मेहनत करून पगार मिळवता आणि तो बँकेमध्ये जमा करता की बँक सर्वात सुरक्षित जागा आहे आणि तुमची ही घामाची कमाई ऐनवेळी तुमच्या कामी येईल. परंतु जरा इकडे लक्ष द्या तुमच्या अकाउंटवर कोणीतरी आहे जो सतत नजर ठेवून आहे. सावध व्हा कारण रोज अशा घटना घडत आहेत की लोकांच्या बचत खात्यातून मोठी रक्कम गायब होत आहे.
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की सध्या फ्रॉड करणारे बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करताहेत. यामध्ये एटीएम क्लोनिंग, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून खोट्या कार्डच्या डाटाची चोरी, यूपीआयच्या माध्यमातून चोरी, लॉटरीच्या नावावर फसवणूक, बँक खात्यांच्या तपासणीच्या नावाखाली तर फसवणूक प्रमुख आहे. आता प्रश्न हा उठतो की शेवटी अशा प्रकारची फसवणूक होते तरी कशी.
मोठी फसवणूक
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या दहा वर्षांमध्ये ५० हजार पेक्षा अधिक लोकं फसवले गेले आहेत. ज्यामध्ये दोन लाख कोटी रुपयांचा चुना सामान्य ग्राहकांला लागलाय. आरबीआयचा ताजा रिपोर्ट सांगतो की डिजिटल व्यवहारामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये ९० हजार कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा झालाय. ग्राहकांना समजलं देखील नाही आणि त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढले गेले.
अशामध्ये जर व्हाट्सअपवर एखाद्या अनोळखी नंबर वरून व्हॉइस कॉल आल्यास तुम्ही सावध व्हा कारण फोन करणारा तुम्हाला फसवू शकतो. ही घटना घडल्यानंतर तुमच्या नंबरला ब्लॉक करू शकतो व्हॉइस कॉल करणारा तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे पैसे हडप करू शकतो.
या व्यतिरिक्त एटीएम कार्डचं क्लोनिंग करून देखील भामटे तुम्हाला लुटू शकतात. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की पूर्वी सामान्य कॉलच्या माध्यमातून फसवणूक होत होती, परंतु आता डाटा चोरी करून पैसे खात्यातून काढले जातात. हे भामटे हायटेक असून कार्ड क्लोनिंग करू लागलेत. एटीएम कार्ड लोकांच्या खिशामध्येच असतं आणि भामटे पैसे काढूनही घेतात. एटीएम क्लोनिंगच्या माध्यमातून तुमच्या कार्डची पूर्ण माहिती चोरली जाते आणि त्याचं डुप्लिकेट कार्ड बनवलं जातं. म्हणून एटीएमचा वापर करतेवेळी पिन दुसऱ्या हाताने लपवून टाका.





