* रितू वर्मा

सोमीच्या ऑफिसमध्ये आज सगळयांचे चेहरे फुलले होते. आणि फुलणार ही का नाहीत, आज सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ मिळाली होती पण सोमी निराश दिसत होती.

जेव्हा कायराने याबद्दल विचारले तेव्हा सोमीच्या हृदयातील ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ‘‘माझ्या पगारावर माझा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा हक्क आहे.’’

पगारवाढ म्हणजे जास्त काम, पण मला काय मिळणार तर काही नाही. दर महिन्याला माझे पती लहान मुलाप्रमाणे काही हजार माझ्या हाती देतात. विचारले असता सांगतात की सर्व काही तर मिळत आहे, तू या पैशांचे काय करणार, उधळपट्टी करण्याशिवाय?’’

सोमी ही केवळ एकटीच महिला नाही. सोमीसारख्या स्त्रिया प्रत्येक घरात आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी गुलाम आहेत. पती आणि कुटुंबासाठी त्या फक्त कमाईचे यंत्र आहेत. त्यांचा पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे गुंतवायचा हा पतीचा मूलभूत अधिकार असतो.

रितिकाची कथाही सोमीपेक्षा वेगळी नाही. तिचा पगार होताच संपूर्ण पैसे विभागले जातात. मुलांच्या शाळेची फी, गृहकर्जाचा हप्ता आणि घरखर्च हे सर्व रितिकाच्या पगारातून होत असते. पण रितिकाचा पती प्रदीपचा पगार कुठे खर्च होतो हे प्रदीपशिवाय कुणालाच माहीत नाही.

प्रत्येक वेळी सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजन करणे, दूर-जवळच्या नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करणे, पत्नी, मुलांसाठी कपडे खरेदी करणे इत्यादी कामे प्रदीप आपल्या पगारातून करतो आणि सर्वांचाच लाडका बनून आहे. त्याचवेळी प्रदीप रितिकाबद्दल म्हणतो की अहो स्त्रियांचा लाली-लिपस्टिकवरील खर्च रोखण्याचा हा एक नवीन मार्ग आहे की त्यांच्या पगारावर कर्ज वगैरे घेणे.

मासिक ८० हजार कमावणारी रितिका ना तिच्या आवडीचे कपडे घालू शकते ना कोणाला तिच्या आवडीचे गिफ्ट देऊ शकते. एवढी कमाई करूनही ती पूर्णपणे तिच्या पतिवर अवलंबून आहे.

वरील दोन्ही घटना पाहिल्या तर एक गोष्ट दोघींमध्ये समान दिसून येते की सोमी आणि रितिका अजूनही मानसिकरित्या गुलामगिरीच्या बेडयांमध्ये कैद आहेत. दोन्ही महिलांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे दोघीही मानसिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...