* गरिमा पंकज

नवजात बाळाची त्वचा अतिशय पातळ आणि नाजूक असते, कारण त्वचा इतक्या लवकर संरक्षणासाठी आवश्यक असलेले अडथळे पूर्णपणे विकसित करू शकत नाही. त्यासाठी सुमारे वर्षाचा कालावधी लागतो. वातावरण, तापमानातील बदलांचा थेट परिणाम बाळाच्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्याच्या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच बाळासाठी चांगली बेबी केअर उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय योग्य तापमान आणि मॉइश्चरायझरचा पुरेसा वापर या बाबींचाही विचार करावा लागेल. बाळाच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अॅलर्जी किंवा संसर्गाचा धोका कमी करणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते.

त्वचेवर उद्भवणाऱ्या सामान्य समस्या

सुरकुत्या, त्वचेवर लालसरपणा आणि कोरडेपणा यासारख्या समस्या नवजात बाळामध्ये सामान्य असतात. त्याच्या त्वचेत काही समस्या दिसल्यास घाबरू नका. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर तो नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची त्वचा नवीन वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही समस्या नैसर्गिकरित्या उद्भवू शकतात, ज्या काळानुरूप बऱ्या होतात. अनेकदा वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मऊ केस असतात. याउलट उशिरा जन्मलेल्या बाळाची त्वचा अनेकदा कोरडी आणि सालपटे निघाल्यासारखी दिसते. मात्र काही आठवडयांतच त्याच्या त्वचेची ही समस्या दूर होऊ लागते, पण जर काळानुरूप नवजात बाळाच्या त्वचेवर उद्भवलेल्या समस्या बऱ्या होत नसतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जन्मखुणा

रक्त पुरेसे परिपक्व न झाल्यामुळे बाळाच्या त्वचेवर छोटे लाल डाग दिसू शकतात. या खुणा चेहरा आणि मानेच्या मागे येतात. बाळ रडू लागल्यानंतर त्या प्रकर्षांने जाणवतात, पण या सर्व खुणा वर्षभराच्या आत स्वत:हून निघून जातात. जन्माला आल्यानंतर बाळाच्या त्वचेवर खरचटल्यासारखे किंवा रक्ताचे डाग दिसू शकतात, तेही काही आठवडयांत बरे होतात.

काही विशेष खबरदारी घ्या

बाळाची त्वचा निरोगी आणि मुलायम राहावी यासाठी दैनंदिन जीवनात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते :

बाळाला अंघोळ घालणे : नवजात बाळाची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि कोमल असते. त्यामुळे त्याला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. त्याला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते. जन्माला आल्यानंतर पहिले काही आठवडे बाळाचे खराब डायपर बदलणे आणि स्पंज बाथ पुरेसा असतो. वर्षभरानंतर त्याला प्रत्येक २-३ दिवसांनी अंघोळ घालायला हरकत नाही. यामुळे किटाणूंपासून संरक्षण होण्यासह त्याला प्रसन्न वाटेल. अंघोळ घालण्यासाठी टपात ३-४ इंच पाणी भरणे गरजेचे असते. बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी पाणी जास्त गरम नाही ना? हे तपासून पाहा. त्याला कोमट पाण्यात २-३ मिनिटे अंघोळ घालणे पुरेसे ठरते. यादरम्यान शाम्पू किंवा साबण त्याच्या डोळयात जाणार नाही, याची काळजी घ्या.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...