* जोगेश्वरी सुधीर
नीताचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तिचा दिर रवी बारावीत शिकत होता. नीता सुंदर आणि आकर्षक होती, लाजाळू रवीला वहिनीचीसोबत आवडू लागली. नातं मस्तीचं होतं त्यामुळे चेष्टा मस्करी चालायची. दोघे लवकरच मोकळेपणाने मोबाईलवर मेसेज एक्सचेंज व फॉरवर्ड करू लागले.
वहिनी सुखात होती, रवीचे भाऊ मोठया पदावर नोकरीमध्ये होते आणि उदार स्वभाव होता. रविदेखील वहिनीकडे आकर्षित होत चालला होता. यादरम्यान रवीच्या आईचे निधन झालं, तेव्हा रवी पूर्णपणे त्याच्या वहिनीवरतीच अवलंबून राहू लागला.
आता तो त्याचं शहर सोडून वहिनीजवळच राहू लागला आणि आई राहिली नाही, भाऊ उदास राहू लागला, वहिनी स्वच्छंद होत गेली. दिर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, त्यामुळे वहिनीशी प्रत्येक प्रकारच्या गोष्टी होत होत्या. रवीच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ सेक्स आणि पॉर्नचे होते तेदेखील वहिनी गुपचूप पाहत असे.
सीमा विसरणं
ही जवळीक मर्यादा तोडू लागली. खरं तर काहीच रोखठोक नव्हती, त्यामुळे वहिनी दिराने एकमेकांशी बोलणं केलं. रवीने चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएशन केलं. तो मेहनती होता, त्यामुळे त्याला नोकरीदेखील मिळाली. परंतु वहिनीच्या शहरात येणं जाणं चालूच होतं. जेव्हादेखील ते भेटायचे तेव्हा भरपूर गप्पा मारायचे. तिथपर्यंत ठीक होतं कारण दिरवहिनीच्या जवळकिच्या नात्यांना रोखणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे ते आपले सीमा विसरून गेलेत.
खरंतर त्यांच्यामध्ये कोणीच आलं नाही तेव्हा त्यांना हे वाटू लागलं की ते जे काही करत आहेत ते चांगलं करत आहेत. बोल्ड झालेल्या मोकळया नात्यांवरती जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा रवीचं लग्न झालं. २-३ वर्ष तर रवी त्याच्या पत्नीसोबत आनंदी होता, परंतु चंचल स्वभावाचा रवी कुठपर्यंत पत्नीसोबत आनंदीत राहणार.
वहिनीशी सेक्ससंबंध तरीदेखील चालूच होते. तो वहिनीला प्रत्येक गोष्ट विचारायचा आणि तीदेखील त्याला सांगायची की कसं काम करायचं आहे. हे सर्व रवीच्या पत्नीला अजिबात आवडत नव्हतं. परंतु याची पर्वा ना रवीला होती ना नीताला.