* प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. विवाहाला ३ वर्षं झाली आहेत. आम्ही अजूनही शरीरसंबंध साधले नाहीत. विवाहाच्या पहिल्या रात्री शरीरसंबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेदना झाल्यामुळे मी पतीला अडवलं. त्याच भीतीने पुन्हा प्रयत्नच केला नाही. पतीनेही कधी बळजबरी केली नाही, परंतु आता घरची मंडळी मुल हवं म्हणून मागे लागली आहेत. त्यांना अधिक काळ टाळता येणार नाही. तसं बघता अपत्य आम्हालाही हवं आहे. शरीरसंबंधाशिवाय हे शक्य नाही, परंतु यादरम्यान होणाऱ्या वेदना मी सहन करू शकले नाही कर काय होणार?

पहिल्यांदा शरीरसंबंध साधताना स्त्रीला थोडीशी वेदना आणि रक्तस्त्राव होतो, परंतु ही वेदना असहनीय नसते. संभोगादरम्यान मिळणाऱ्या लैंगिक सुखासमोर ही वेदना काहीच नसते. विवाहाला इतका कालावधी लोटला असूनही तुम्ही अजून सेक्सचा आनंद उपभोगू शकला नाहीत. तुमच्या मनातील सेक्सप्रतिची भीती दूर करून शरीरसंबंध साधा आणि आपलं गृहस्थ जीवन आनंदी बनवा.

  • मी एका मुलावर प्रेम करत होते. प्रेमात आम्ही मर्यादा ओलांडून परस्परांशी अनैतिक संबंध ठेवले होते. काही वर्षांपूर्वी आमचा ब्रेकअप झाला. आता घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मी मात्र अजिबात उत्साहित नाही. कारण मला भीती आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री संबंध साधल्यावर मला रक्तस्त्राव झाला नाही, तर पतीला पहिल्या रात्रीच समजेल की माझे विवाहपूर्व शारीरिक संबंध होते. पती मला अपमानित करून घराबाहेर काढेल. यापेक्षा मी लग्न न करणंच योग्य ठरेल. तुमचं काय मत आहे?

तुम्ही भूतकाळात जी चूक केली, त्यासाठी आता पश्चाताप वा लग्न न करण्याचा तुमचा निर्णय योग्य नाही. तुम्ही जोपर्यंत आपल्या मुखाने स्विकारणार नाही की तुम्ही कधी कुणाशी संबंध साधले आहेत तोवर पतीला समजणार नाही. तेव्हा या गोष्टी विसरून लग्नाची तयारी करा.

  • मी २२ वर्षीय तरुण आहे. एका मुलीवर ३-४ वर्षांपासून प्रेम करत होतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मागच्या वर्षी प्रथम मंदिरात आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज केलं. आम्हा दोघांचे कुंटुंबीय विवाहासाठी तयार नव्हते, त्यामुळे पैशांची व्यवस्था करून मी स्वतंत्र खोली घेतली आणि मग तिला सोबत राहायला बोलावलं. महिनाभर आम्ही अतिशय आनंदात राहिलो, परंतु त्यानंतर ती आपल्या घरच्यांना भेटू लागली. कुणास ठाऊक तिच्या घरच्यांनी तिला काय समजावलं? ती आपल्या घरी निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही. फोनसुद्धा बंद केला.

एके दिवशी तिचे भाऊ येऊन मला घरातून उचलून घेऊन गेले आणि चौकीत तक्रार नोंदवली. परंतु माझी काहीच चूक नसल्याने त्यांना मला सोडावं लागलं. आता मुलीकडील लोक दबाव आणत आहेत की मी घटस्फोट द्यावा. मला समजत नाहीए की परस्परसंमतीने विवाह केल्यानंतरही तिने माझी अशी फसवणूक का केली?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...