गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी ३४ वर्षीय महिला आहे. पती नेहमीच कामासाठी बाहेरगावी असतात आणि कधी-कधी तर अनेक आठवडे घरी येत नाहीत. या दरम्यान २५ वर्षांच्या एका तरुणाशी माझी मैत्री झाली. ही मैत्री एवढी दाट झाली की आमच्यात शारीरिक संबंधही आले. तो खूप हसरा आणि हजरजबाबी आहे. खूप उत्साही आणि सेक्सच्या कलेत पटाईतही आहे. सेक्सच्या वेळी तो खूप वेळपर्यंत फोरप्ले करतो आणि त्यावेळी मीही त्याला खूप साथ देते.

आमच्यामध्ये कमिटमेंट आहे की आमच्यात मैत्री कायम राहिल आणि जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा सेक्स संबंध बनवण्यात मागे-पुढे हटणार नाही. इकडे काही दिवसांपासून सेक्स संबंध बनवताना त्याची इच्छा आहे की ओरल सेक्सच्या वेळी मी त्याचे वीर्य (सीमन) पिऊन टाकावं. मी नकार देताच तो नाराज होतो. तो नाराज झाला, तर माझं कुठल्याही कामात मन लागत नाही. पण मी घाबरते की असं केल्याने मी कोणत्याही रोगाला बळी पडू नये. कृपया सांगा, मी काय करू?

आपण विवाहित आहात, पण आपल्याला मूल आहे की नाही, हे तुम्ही सांगितलं नाही. सध्यातरी काहीही असो, तुम्ही आगीशी खेळताय आणि कधीही हे आपल्या वैवाहिक जीवनाला उद्ध्वस्त करू शकते.

विवाहबाह्य संबंध नंतर असे चिघळतात, त्याची जखम लवकर भरत नाहीत.

आपण सांगितलं आहे की आपण आपल्यात आणि कथित मित्रामध्ये एक कमिटमेंट आहे, जी केवळ मैत्रीपुरती आहे. पण ती केवळ आपण मैत्रीपर्यंतच मर्यादित ठेवली असती, तर बरं झालं असतं. जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर या नात्याला संपवून वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पतिसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. पतिला विनंती करा की ते जेव्हा टूरवर जातील, तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जावं. या काळात पतिची काळजी घ्या आणि त्यांचा आवडता ड्रेस घाला. सोबत सिनेमा पाहायला जा. मोकळ्या वेळात फिरायला जा. मग पाहा, आपल्याला जेवढं प्रेम मिळेल आपल्या पतिकडून मिळेल तेवढं दुसऱ्या कोणाकडून नाही.

राहिला प्रश्न ओरल सेक्सच्या वेळी वीर्यपान करण्याचा, तर जर सेक्स पार्टनर निरोगी असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे नसेल, तर हे नुकसानदायक नाही. यासाठी विवेकाने वागणं उत्तम ठरेल.

  • मी ३० वर्षांचा आहे आणि नुकतंच माझं लग्न झालं आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. जिथे दोन कुटुंबे सोबत राहतात. पत्नी शिकलेली आहे, पण विचाराने स्वतंत्र नाहीए. तिची पूजा-अर्चना, बुरसटलेल्या रीतिरिवाजांना मानणं मला ओझं वाटतं. ती नेहमीच टीव्ही मालिकाही पाहत असते.

खासगी क्षणांमध्येही ती माझ्यासोबत सहकार्य करत नाही, फोरप्लेमध्येही साथ देत नाही. उलट मला वाटतं की खासगी क्षणांत तिने आधुनिक ड्रेस घालावेत आणि आम्ही भरपूर सेक्स एन्जॉय करावं. याखेरीज ती माझी संपूर्ण काळजी घेते. कृपया योग्य सल्ला द्या.

जसं की, आपण सांगितलं आहे की आपलं नवीन लग्न झालं आहे, मग सरळ आहे की आपली पत्नी आपल्याशी मोकळी होण्यास थोडा वेळ लागेल.

पत्नी शिकलेली आहे, पण विचारांनी मुक्त नाहीए, म्हणजे सरळ आहे की ती ज्या वातावरणातून आली आहे, ते मुक्त नसेल. पत्नीचं पुढचं शिक्षण निश्चित करा आणि तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित करा.

यात काही शंका नाही की बहुतेक टीव्ही चॅनेल्सवर अंधश्रध्देने प्रेरित मालिकांचं प्रसारण होतं. निरर्थक आणि अनेक काळापूर्वीचे रीतिरिवाज मीठमसाला लावून सादर केले जातात. त्यांचा आजच्या वैज्ञानिक युगाशी काही देणं-घेणं नाही.

पत्नीला उत्तम साहित्य वाचायला द्या. मासिके आणून द्या. विचार लादू नका. स्वातंत्र्य द्या. पत्नी घरातून बाहेर पडेल, आपल्या पायावर उभी राहिल, तर विचारांत बदल होईल. स्वत:हून पुढाकार घेईल.

सध्यातरी पत्नीसोबत बाहेर फिरायला जा. हॉटेलमध्ये राहा. तिला मोकळेपणाची जाणीव करून द्या. तिथे ती आधुनिक ड्रेस घालेल, तर हळूहळू तिला हे चांगले वाटू लागेल.

पत्नीचा स्वभाव थोडा मोकळा होईल, तेव्हा ती स्वत:ही सेक्सक्रीडेमध्ये आनंद अनुभवेल आणि फोरप्ले तिला सुखद वाटेल.

  • मी ४९ वर्षीय महिला आहे. १८ वर्षांच्या वयातच लग्न झालं होतं. मला २ मुले आहेत. दोघंही मोठी आणि सेटल आहेत. पतिचं अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांची इच्छा आहे की मी रोज सेक्स संबंध बनवावेत. पाळीच्या दिवसांतही पती सेक्स करण्याची इच्छा बाळगतात. मी काय करू?

आपले पती आपल्यावर एवढं प्रेम करतात, ही तर चांगली गोष्ट आहे. पतिपत्नीमध्ये नियमित सहवास केवळ आपसातील संबंधच मजबूत बनवत नाहीत, तर दाम्पत्य जीवन नेहमी आनंदी राखतं.

दुसरं म्हणजे, सेक्स निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आहे आणि शरीरासाठी छान टॉनिकही.

पतिसोबत सेक्ससंबंधांचा खूप आनंद घ्या. राहिला प्रश्न पाळीच्या काळात सेक्स करण्याचा, तर या काळातही आपण सेक्सचा आनंद घेऊ शकता.

‘गृहशोभिका’ मासिकात आम्ही वेळोवेळी यासंबंधी लेख प्रकाशित करत असतो.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एक ५२ वर्षांची स्त्री आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला ५ वर्षे झाली आहेत. माझे गेल्या काही महिन्यांपासून २७ वर्षांच्या अविवाहित पुरुषाशी शारीरिक संबंध आहेत. तो माझी खूप काळजी घेतो आणि आम्ही दोघे परस्पर संमतीने लैंगिक संबंध बनवतो. मला त्याच्याबरोबर समाधान वाटते आणि तो केवळ सेक्समध्येच नव्हे तर दु:खातदेखील नेहमी सहकार्य करतो. तो खूप जोमदारदेखील आहे पण सेक्स करताना त्याला कंडोम लावायला आवडत नाही. तथापि, मी कुटुंब नियोजन केले आहे. यात काही धोका तर नाही ना? कृपया सल्ला द्या?

आपल्या लैंगिक जोडीदाराचा लैंगिक संबंधादरम्यान कंडोम न वापरल्याने कौटुंबिक नियोजनाशी कोणताही संबंध नाही. लैंगिक संबंधात गर्भधारणेसाठी वाव असेल याची शक्यताही फारच कमी आहे. परंतु कंडोम केवळ गर्भनिरोधकच नव्हे तर लैंगिक संसर्गापासून बचाव करण्याचे एक चांगले साधन देखील मानले जाते.

सेक्स पार्टनरला सेक्स दरम्यान कंडोम वापरण्यास सांगा. याद्वारे आपण दोघेही लैंगिक संसर्गापासून वाचाल आणि तणावमुक्त होऊन लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकाल.

 

  • मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर सासरी आल्यावर २-३ दिवसांतच समजले की नवरा मम्माज बॉयआहे. ते कोणतीही कामे केवळ आईला विचारून करतात आणि ते माझ्या एकाही गोष्टीशी सहमत होत नाहीत. माझ्या सासूच स्वयंपाकापासून ते पडद्याच्या रंगापर्यंतची निवड करतात आणि माझ्या शब्दांना थोडेही महत्त्व देत नाहीत. यामुळे मी खूप तणावात असते. काय करावे हे समजत नाही?

आपण नुकतेच विवाहित झाला आहात. आपले पती समजूतदार आहेत आणि म्हणूनच त्याला अचानक आपल्या आईकडे दुर्लक्ष करून तुमच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे योग्य वाटत नसेल. यामुळे घरात अनावश्यक तणाव निर्माण होईल.

कालांतराने आपण हळूहळू घरात आपले स्थान बनवावे. आपल्या सासूला, सासू नव्हे तर आई समजावे. त्यांच्या मोकळया वेळेत त्यांच्याबरोबर बसा, टीव्ही पहा, खरेदी करायला जा, त्यांचा आवडता ड्रेस त्यांना खरेदी करून द्या. घरातील कामात मदत करा.

जेव्हा आपल्या सासूला खात्री होईल की आपण आता घरगृहस्थी चांगल्या प्रकारे हाताळू शकता तेव्हा हळूहळू ती संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे सोपवेल.

  • मी ४८ वर्षांची महिला आहे. सेक्सची इच्छा होते पण ओलेपणा कमी होतो. असे नाही की मी शिखरावर पोहोचत नाही. मला सांगा मी काय करावे?

रजोनिवृत्तीमुळे ही समस्या उद्भवू शकते, कारण रजोनिवृत्तीनंतर शरीरात फीमेल हार्मोन इस्ट्रोजेनची कमतरता असते आणि यामुळेही ही समस्या उद्भवते.

शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण आहारातील गरजेकडे लक्ष दिले पाहिजे. हंगामी फळे, हिरव्या भाज्या, दूध, पनीर इत्यादी नियमितपणे खा आणि नियमित फिरा, व्यायाम करा.

आपण सध्या सेक्स करताना क्रीम वापरू शकता. हे गुळगुळीतपणा ठेवेल आणि सेक्सचा आनंददेखील येईल. सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले करणे चांगले. यानेदेखील बऱ्याच प्रमाणात कोरडेपणाचा त्रास टाळता येऊ शकतो.

मी २६ वर्षांची आहे आणि माझा प्रियकर माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे. यामुळे लैंगिक संबंधात कोणतीही समस्या उद्भवू शकते का? मला त्याच्याबरोबर सेक्स करण्याची इच्छा आहे परंतु कधीकधी असे वाटते की तो मला पाठिंबा देऊ शकत नाही, कारण एकदा जेव्हा दीर्घकाळापर्यंत फोरप्ले केल्यानंतर तो त्याचे जननेंद्रिय घालायचा प्रयत्न करीत होता, तेव्हा वारंवार प्रत्त्न करूनही तो यशस्वी होऊ शकत नव्हता. त्याला काही अडचण आहे का? कृपया सल्ला द्या?

तुमच्या जोडीदाराचे वय इतकेही झाले नाही की तो सेक्स करण्यात अयोग्य असेल. सत्य हे आहे की जर त्याने योग्य आहारविषयक सूचनांचे पालन केले आणि नियमित व्यायामाची सवय लावली तर लैंगिक संबंधाचा आनंद बऱ्याच काळापर्यंत उपभोगता येऊ शकेल.

हे सहसा लैंगिक संभोगाच्या ज्ञानाअभावी होते. घाई-गडबडीमुळे किंवा कुठल्या भीतीमुळे तो लैंगिक संबंध बनवण्यात अयशस्वी झाला असेल. सेक्स ही एक आरामात हाताळण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोघांचीही मने शांत असावीत आणि वातावरणदेखील शांत असावे.

तुम्ही दोघे सेक्स करण्यापूर्वी फोरप्लेचा आनंद घ्याल तर अधिक चांगले होईल.     जेव्हा पार्टनर सेक्ससाठी पूर्णपणे तयार असेल, तेव्हा त्याला जननेंद्र्रिय घालायला सांगा. नक्कीच, आपणा दोघांनाही त्यात पराकाष्ठेचा आनंद मिळेल. परंतु लक्षात ठेवा, कृपया यावेळी पुरुष जोडीदारास कंडोम वापरण्यास सांगा.

कशी हवी प्रेगनन्सीमध्ये सेक्स पोझिशन

– मिनी सिंह

प्रेगनन्सीवेळी महिला खूपच जागरूक होतात. गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या पतिसोबतचे शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेतही संभोग करता येतो. हो, पण जर गर्भवती महिलेची प्रकृती नाजूक असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये, पण पत्नीपासून खूप काळ दूर राहणे पतिसाठी अशक्य असते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशावेळी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जाणून घेऊया की गर्भावस्थेत सेक्स संबंध कसे साधावेत :

गर्भावस्थेदरम्यान सेक्सवेळी या पोझिशनद्वारे सुरक्षित सेक्सचा आनंद घेता येऊ शकेल आणि यामुळे होणारे बाळ आणि आईलाही त्रास होणार नाही.

पहिली पोझिशन : पती आणि पत्नीने एकमेकांसमोर झोपावे. पत्नीने आपला डावा पाय पतिच्या शरीरावर ठेवावा. अशा पोझिशनमध्ये सेक्स केल्याने गर्भाला झटके बसत नाहीत.

दुसरी पोझिशन : पत्नीने पाठीवर टेकून आपली पावले दुमडून पाय पतिच्या खांद्यावर ठेवावे. त्यानंतर सेक्स करावा. यामुळे पोटावर दाब येणार नाही.

तिसरी पोझिशन : पतिने खुर्चीवर बसावे आणि पत्नीने त्याच्यावर बसावे. सुरक्षित सेक्समध्ये हेदेखील येते.

काही व्यायामांद्वारेही सेक्स करता येतो. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

खबरदारी

* गर्भावस्थेत सेक्सदरम्यान पतिने पत्नीची विशेष काळजी घ्यायला हवी. पतिने जास्त उत्तेजित होऊ नये आणि पत्नीवर दबाव आणू नये.

* गर्भावस्थेत सेक्स करावा, पण कोणताही नवा प्रयोग करू नये.

* सेक्स करताना पत्नीवर जास्त दबाव पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

* गर्भावस्थेत प्रसूतीच्या कळांपूर्वीपर्यंत सेक्स करता येतो, पण गर्भवतीस याचा त्रास होऊ देऊ नये.

गर्भावस्थेत सेक्सचे फायदे

प्रेगनन्सीत सेक्स आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कसे ते माहीत करून घेऊया :

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे तुमच्या पेल्विक मांसपेशी आखडतात आणि प्रसूतीसाठी जास्त मजबूत होतात.

* प्रेगनन्सीदरम्यान लवकर लघवी होणे, हसल्यावर किंवा शिंकल्यास पाणी निघणे इत्यादी समस्या मूल मोठे होऊ लागल्यामुळे मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे निर्माण होतात. हे थोडे असुविधाजनक होऊ शकते, पण यामुळे तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे प्रसूतीवेळी फायदा होतो.

* सेक्स केल्यामुळे महिला जास्त फिट राहतात. यादरम्यान त्या फक्त ३० मिनिटांत ५० कॅलरीज कमी करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे महिलांची सहनशक्ती ७८ टक्के वाढते. याचा फायदा तिला प्रसूतीवेळी होतो.

* सेक्सनंतर रक्तदाब कमी होतो. अधिक रक्तदाब आई आणि बाळ दोघांसाठीही नुकसानकारक असतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच चांगले असते.

* ऑक्सिटोसीन हार्मोन संभोगावेळी शरीरातून बाहेर पडते, जे तणाव कमी करण्यासाठी उपयोगी असते. यामुळे चांगली झोप येते.

जेव्हा डॉक्टरांना काही जटिल समस्या जाणवतात, तेव्हा ते सेक्स न करण्याचा सल्ला देतात. समस्या अनेक प्रकारच्या असतात जसे की :

* पूर्वी कधी गर्भपात झाला असेल तर.

* पूर्वी कधी वेळेआधी बाळाचा जन्म झाला असेल तर.

* जर गर्भपाताची भीती असेल तर.

* योनीतून जास्त रक्तस्त्राव होणे किंवा तरल पदार्थ वाहत असेल तर.

* एकापेक्षा अधिक मुले झाल्यास.

प्रेगनन्सी सुलभ आणि सुरक्षित व्हावी असे वाटत असेल तर गर्भरक्षा कवच, गर्भाच्या सुरक्षेसाठी चमत्कारी जादूटोणा, पुत्रप्राप्तीसाठी तंत्रमंत्र इत्यादींपासून दूर राहा. कारण अशा वेळी जादूटोणा नाही तर पती-पत्नीमध्ये प्रेम आणि चांगले संबंध असणे जास्त गरजेचे आहे. या काळात स्वत:कडे आणि होणाऱ्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा आणि पौष्टीक आहार घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळतील, जी तुमच्या होणाऱ्या बाळाच्या विकासासाठी गरजेची आहेत.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.

कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.

कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.

  • माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?

घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.

  • पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिल्ट देतं?

लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.

माझे वय २० वर्ष आहे. माझी नखं खूप खरखरीत आणि कडक आहेत. ती सॉफ्ट करता येतील का?

नखे केवळ ती नाहीत, जी दिसतात. नखांच्या दिसणाऱ्या भागाला नेल प्लेट म्हणतात. त्याच्याखाली नेल बॅड असतो. तो सामान्य त्वचेसारखा असतो. नेल मॅट्रिक्सला मिळणारे पोषक तत्त्वच नखे हेल्दी किंवा कमजोर होण्यास जबाबदार असतात. कोरडी व निर्जीव नखे व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, हृदयरोग किंवा रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी १०० ग्रॅम बिटाचे सेवन रोज जरूर करा. त्याचबरोबर आयर्न, व्हिटॅमिन डी व कॅल्शियमयुक्त भोजन नियमितपणे घ्या.

  • माझे वय २६ वर्षे आहे. मला नखे वाढविण्याचा खूप शौक आहे. पण माझ्या नखांचा रंग पिवळा आहे, जो दिसायला चांगला दिसत नाही. काही घरगुती उपाय आहेत का, जेणेकरून माझ्या नखांवर चमक येईल व ती पिवळी दिसणार नाहीत?

ऑलिव्ह ऑइल नखांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे नखांना पोषण मिळते आणि त्यात चमक येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलला हलके गरम करून बोटे आणि नखांवर मसाज करा. काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. प्रत्येक ती गोष्ट ज्यात व्हिटॅमिन ई आहे, नखांसाठी खूप चांगली असते. याबरोबरच व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण आहार घेतल्यानेही नखांचे आरोग्य चांगले राहते.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम लावते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर व्हाइट हेड्स येतात. आपण ते दूर करण्यावर उपाय सांगाल का?

व्हाइट हेड्स अॅक्नेचा एक प्रकार आहे, जे त्वचेची रंध्रे तेलाच्या पाझारण्याबरोबरच घाण जमा झाल्यामुळे उत्पन्न होतात. व्हाइट हेड्स त्वचेच्या अंतर्गत पातळीवर तयार होतात. त्यांना प्रकाश वगैरे मिळत नाही आणि त्यांचा रंग सफेद राहतो.

आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या तेल असते. जे आपल्या त्वचेमध्ये ओलावा आणि मॉइश्चरायजर टिकवून ठेवते. जर आपल्या त्वचेवर जास्त तेल तसेच राहील, तर त्यामुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम अशा असतात, ज्या आपल्या त्वचेला अजून चिकट बनवतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरमे येऊ लागतात. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर आपण ऑइल फ्री क्रीमच लावा

व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी मेथीच्या पानात पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा. विशेषत: जिथे व्हाइट हेड्स असतील, तिथे चोळा. या प्रक्रियेमुळे व्हाइट हेड्स निघून जातात. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला एक वर्ष झालं आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही आम्हा पतिपत्नीमध्ये सतत भांडणं होतात. थोडीफार भांडणं तर प्रत्येक पतिपत्नीमध्ये होतात, पण जेवढे आम्ही भांडतो, तेवढे कदाचित कोणीच भांडत नसेल. आश्चर्य या गोष्टीचे आहे की लग्नापूर्वी सर्वकाही ठीक होते, पण लग्न झाले आणि परिस्थिती बदलली व माझे पतिही. मला विश्वास बसत नाही की ही तीच व्यक्ती आहे का, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं व जो माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा मान राखत होता. आम्ही तासन्तास एकमेकांशी गप्पा मारायचो आणि आता तर बोलण्यासाठी काही विषय नसतो किंवा तोंड उघडलंही तरी एकमेकांवर गरळ ओकली जाते. कधी-कधी वाटते की खरंच मी माझ्या भावा-बहिणीप्रमाणे अॅरेंज मॅरेज केले असते तर किती बरं झालं असतं. ते सर्व आपल्या घरकुटुंबासोबत अनेक वर्षांपासून किती सुखी जीवन जगत आहेत आणि मी एका वर्षातच त्रस्त झाले आहे.

दोनवेळा तर पती आणि त्याच्या घरच्यांना कंटाळून मी माहेरीही निघून गेले होते. माझी समजूत काढण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही. दोन्ही वेळा मी स्वत:च परत गेले.

खरं तर सर्व भांडणाचे मूळ माझ्या २ नणंदा आहेत. दोघीही विवाहित आहेत, तरीही त्या आपल्या सासरी जात नाहीत आणि आमच्या घरात बस्तान मांडून बसल्या आहेत. मोठ्या नणंदेच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत आणि छोटीच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. लग्नापूर्वी माझे पती सांगायचे की दोघीही माझ्या लग्नानंतर लवकर आपल्या घरी जातील. आता त्या आईला मदत करायला राहात आहेत. जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा आईसाठी त्या निश्चिंत होतील. कारण घर सांभाळणारी त्यांची सून येईल ना, पण लग्नाला १ वर्ष झाले आहे आणि त्या त्यांच्या घरी जाण्याचे नाव घेत नाहीत.

दोन्ही नणंदा सासूसोबत मिळून मला त्रास देतात. एवढेच नाही, संध्याकाळी माझे पती घरी आल्यावर माझी चुगली करतात आणि आधीच त्रस्त झालेली मी जेव्हा पतिकडूनही बोलणी खाते, तेव्हा मात्र माझा धीर सुटतो. मी दिवसभराचा रागही त्यांच्यावर काढते. मानसिक त्रास झेलण्याबरोबरच मी शारीरिक रूपानेही त्रस्त आहे. मला थायरॉईड आहे, त्यामुळे मी खूप जाडी झाले आहे. परिणामी, मला गर्भधारणाही होत नाहीए. कुणास ठाऊक, मी आई बनेन की नाही.

जीवन खूप कठीण झाले आहे. लग्न करून मी काय मिळवले, हा विचार करून मी त्रस्त होते. डोके दुखू लागते. काहीही मार्ग दिसत नाही. छान राहावेसे, कुठे जावे-यावेसे वाटत नाही. घरात ३-३ महिलांनी माझं जगणं मुश्किल केले आहे. आयुष्यभर असंच कुढत जगावं लागणार का, कृपया सांगा काय करू?

आपले वैवाहिक जीवन सुखद नाहीए, याचा दोष आपल्या लव्ह मॅरेजला देऊ नका. अॅरेंज मॅरेजमध्येही समस्या येत नाहीत असे होत नाही. अडचणी बहुतेक सर्वच वैवाहिक जीवनात येतात. त्यामुळे आपल्या विवाहाचे तुलनात्मक मूल्यांकन करू नका की अॅरेंज मॅरेज केले असते, तर सुखी राहिले असते.

आपल्या प्रकरणात मुख्य मुद्दा आपल्या दोन्ही विवाहित नणंदा आहेत. एकट्या सासूबरोबरच जुळवून घेणे सुनेसाठी सोपे नसते. इथे तर ३-३ महिलांनी आपलं जगणं कठीण केले आहे. यामुळेच आपल्या पतिशी आपले संबंध खराब होत आहेत.

स्थिती कोणतीही असो, सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर करावा लागेल. कुठेतरी थोडंसं गोड बोलून, तर कुठेतरी निडरता दाखवत, जेणेकरून पतीच्या आई व बहिणींमुळे तुमचं नातं बिघडू नये. अर्थात, असे करणे सोपे नाहीए, पण याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीए. पतिसमोर आपली बाजू मांडा, पण त्यांना टोमणे मारून दोष देऊ नका. जी गोष्ट तुम्ही सामान्य राहून प्रेमाने समजावू शकता, ती भांडण करून समजावू शकत नाही. त्यांचा मूड पाहून त्यांना समजावा की त्यांच्या बहिणींनी आपापल्या घरी जाऊन राहिले पाहिजे. कारण जवळ राहिल्याने संबंध खराब होतात. उलट अंतर ठेवून राहिल्याने प्रेम वाढते.

जिथे भांडून नाराज होऊन माहेरी जाण्याची गोष्ट आहे, तर अशी चूक पुन्हा मुळीच करू नका. त्यामुळे तुमची प्रतिमा बिघडते. समस्यांवर उपाय शोधल्याने त्या दूर होतात, ना की त्यांच्यापासून दूर पळाल्याने.

आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. थायरॉइडवरही उपाय करा. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता.

मातृत्वाबाबत जिथे आपली काळजी आहे, तर आपल्या लग्नाला अजून १ वर्षच झालं आहे. वेळेनुसार आपण मातृत्वसुखही प्राप्त करू शकाल.

जवळच्या एखाद्या कुटुंब कल्याण केंद्रात जाऊन यावर सल्ला घेऊ शकता. पण सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या हुशारीने आपली कौटुंबिक स्थिती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करा.

यासाठी आम्ही आपल्याला केवळ सल्ला देऊ शकतो, प्रयत्न तर आपल्याला स्वत:लाच करावे लागतील. सकारात्मक विचार बाळगा, हिंमत आणि धैर्याने समस्यांचा सामना करा, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्व समस्यांतून मुक्त होऊन आपले वैवाहिक जीवन सुखी बनवलेलं असेल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर : आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवासाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते.

सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

प्रश्न : मी २२ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या पतिचे वय ३१ वर्षे आहे. आमच्या विवाहाला १ वर्ष झाले आहे. परंतु इच्छा असूनही मी गरोदर राहू शकले नाही. मी आई होण्याचे सुख मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?

उत्तर : कदाचित आपल्याला हे सत्य माहीतच असेल की महिलेला प्रेग्नंट होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की, पतिपत्नीने त्या दिवसांत शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत, ज्या दिवसांत महिलांमध्ये संतानप्राप्तीची शक्यता असते. हा संयोग महिलेच्या मासिकपाळीच्या चक्राच्या मध्यावर ओव्हरीतून डिंब सुटण्याच्या ४८ ते ७२ तासांपर्यंत आणि डिंब सुटल्यानंतर ४८ तासांपर्यंत जास्त असतो. त्या काळात झालेल्या  समागमात जर पतीच्या शुक्राणू बीजांनी पत्नीच्या डिंबाला फलित केले, तर प्रेग्नंसी येते.

आपण आपल्या पतीसोबत एखाद्या इन्फर्टिलिटी विशेषज्ञाचा सल्ला घेणे उचित ठरेल.

उपलब्ध आकड्यांनुसार, देशातील ७५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही संतानसुख प्राप्त होत नाही. वांझपणाची ही समस्या केवळ महिलांशीच जोडलेली नसते. संतान न होण्याच्या २५-४० टक्के प्रकरणांत ही समस्या पुरुष वंध्यत्वाशी जोडलेली असते. ४० टक्के प्रकरणात महिलांमध्ये प्रजनन क्षमतेची कमतरता असते. १० टक्के प्रकरणात समस्या स्त्रीपुरुष दोघांशीही संबंधित असते आणि जवळपास तेवढ्याच प्रकरणांत सर्व तपासण्या करूनही हे स्पष्ट होत नाही की प्रेग्नंसी कोणत्या कारणामुळे येत नाहीए.

आपण आपल्या पतिसोबत एखादद्या योग्य इन्फर्टिलिटी विशेषज्ञाला भेटा. कदाचित आपली समस्या छोटी असेल, असे होऊ शकते आणि त्यावर लवकर उपचार करता येतील. तसेही आपले वय अनुकूल आहे. १९ ते २५च्या दरम्यानचे वय महिलेला आई बनण्यासाठी सर्वात चांगले वय म्हटले जाते. या काळात तिचे प्रजनन अंग, लैंगिक हार्मोन्स आणि मानसिक लय प्रजननासाठी सर्वात अनुकूल अवस्थेत असते.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

1. माझी नखं खूप लवकर तुटतात. शिवाय त्यांची चमकसुद्धा   नाहीशी झाली आहे. कृपया ते परत सुंदर, मजबूत व चमकदार   बनावे यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

लिंबू हे व्हिटॅमिन सी गुणाने पररिपूर्ण असते. हे तुमच्या नखासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच्या वापराने नखांची लांबी वाढण्यासोबतच चमक आणि मजबूतीही येते. याचा वापर करण्याकरिता एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइलचे थोडे थेंब टाकून चांगले मिसळा. १० मिनिटं आपल्या नखांवर चोळत राहा. यानंतर पाण्याने धुवून टाका. ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक असे घटक असतात जे नखांसाठी उपयोगी असतात.

2.मी माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे खूप त्रस्त आहे. कृपया एखादा घरगुती उपाय सांगा, ज्याचे काही साईड इफेक्ट नसतील.

पुदिन्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा स्वच्छच करत नाही तर त्वचेला नैसर्गिक टोनही देतात. हे त्वचेत असलेले विषारी पदार्थ व अशुद्धता काढण्यात मदत करते, शिवाय मुरुमांपासून सुटका मिळवून देते. पुदिन्याच्या रसात असलेले सॅलिसिलिक अॅसिड मृत त्वचा हटवते. मुरूम नाहीसे करण्याकरीता मूठभर पुदिन्याची पानं कुटून त्याचा रस काढा. त्यानंतर तो संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी रस वाळल्यावर चेहरा धुवा. गुलाबजलात  पुदिन्याचा रस मिसळून लावल्यावरही मुरूम नाहीसे होतात.

3. डोळयांच्या सौंदर्यासाठी काही साध्या टिप्स सांगा, जेणेकरून माझे डोळे सर्वात सुंदर दिसतील?

आपण आय मेकअपमध्ये प्रायमर, हायलायटर व मस्कारा वगैरे वापरतो, जेणेकरून आपले डोळे सुरेख दिसतील व आपल्या व्यक्तिमत्त्वाला स्मार्ट लुक देतील. डोळयांना मेकअप करण्याआधी प्रायमर अवश्य लावा. याने डोळयांवर लावलेले आयशॅडो दीर्घ काळ टिकेल आणि त्याचा रंगही उठून दिसेल. हे पापण्यांच्या त्वचेला कोमल ठेवते. पापण्या आणि भुवया यांच्या मधला भाग म्हणजे ब्रॉबोनवर हायलाईटर लावल्यास डोळयांना एक सुरेख आकार मिळतो. मस्कारा तुमच्या डोळयांना उठावदार बनवण्यात उपयोगी पडतोत. हे डोळयांच्या वरच्या आणि खालच्या तीनही कडांना लावा. जर तुमच्या डोळयांचा आकार बदामी नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलचा वापर करू नये. कारण यामुळे तुमचे डोळे आणखीनच लहान दिसतील.

4. सोडा वॉटर फेस वॉशप्रमाणे वापरता येतो का?

होय, सोडा वॉटरच्या वापरामुळे कांतीवर एक वेगळीच चमक येते. याच कारणामुळे सोडा हे महिलांमध्ये सर्वात आवडते सौंदर्य प्रसाधन बनले आहे. सोडयात कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे निर्माण होणारे बुडबुडे त्वचेला व त्यावरील छिद्रांना खोलवर स्वच्छ करते. याने मृत त्वचा नाहीशी होते, तसेच त्वचेत घट्टपणासुद्धा येतो. एक चमचा सोडा वॉटरमध्ये पाणी मिसळून कापसाच्या बोळयाने चेहऱ्याला लावा. थोडया वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

5. माझ्या ओठांच्या आसपास अनेकदा पांढरी त्वचा दिसू लागते. माझे ओठही रुक्ष व पिवळे आहेत. लिपस्टिक लावल्यावर बाजूची त्वचा पांढरी दिसू लागते. मी काय करू?

ओठांच्या चहूबाजूंचा रुक्षपणा नाहीसा करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांना लोणी किंवा तूप लावा. पिवळेपणा नाहीसा करायला गुलाबाच्या पाकळया वापरा. यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कायम राहतो व ओठांना गुलाबी बनवतो. एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळया घ्या. त्यावर कच्चे दूध ओतून काही तास तसेच ठेवा. यानंतर चांगले कुस्करून त्याची पेस्ट तयार करून ते ओठांवर लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

6. मी ३० वर्षीय काम करणारी महिला आहे. माझी त्वचा खूप ऑयली आहे. समस्या ही आहे की माझ्या नाकावर ब्लॅकहेड्स आहेत आणि गालांच्या     बाजूंवर व्हाईटहेड्स आहेत. यामुळे माझा चेहरा खूप खराब दिसतो. शिवाय मला   पार्टी किंवा लग्नसमारंभात जायलसंकोच वाटतो. मी नेहमी हे हाताने दाबून काढते. पण यामुळे मला खूप वेदना जाणवतात व हे परत दिसू लागतात. सांगा  मी काय करू?

ब्लॅकहेड्स नाहीसे करायला एक बटाटा किसून घ्या व प्रभावित जागेवर थोडा वेळ चोळा. मग सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. व्हाईटहेड्ससाठी ६-७ बदाम बारीक करून घ्या. यात गुलाबजलाचे थोडे थेंब मिसळून पेस्ट तयार करा व व्हाईटहेड्सवर लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.

7. दीर्घ काळापासून मी साबणाने चेहरा धुते पण काही दिवसांपासून माझा चेहरा रुक्ष दिसू लागली आहे. मी काय करायला हवे?

शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्यांची त्वचा नाजूक असते. म्हणून आपल्या त्वचेच्या गरजेनुसार आणि प्रकारानुसार फेस वॉश वापरा. घरगुती उपचार म्हणून तुम्ही हे वापरू शकता – एका मोठया बाऊलमध्ये ४ मोठे चमचे बेसन व १ लहान चमचा ताजी साय एकत्र करा. घट्ट पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एका मुलावर खूप प्रेम करते. आम्ही अनेकदा शरीरसंबंध ठेवले आहेत, परंतु त्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र यावेळेस निष्काळजीपणामुळे संबंध ठेवताना गर्भनिरोधक साधनांचा वापर केला नाही. आता मला भीती वाटते की जर मला गर्भ राहिला तर काय होईल? कृपया सांगा की असं झाल्यास मी या समस्येतून कशी मुक्तता मिळवू?

तुम्ही सविस्तरपणे खुलासा केलेला नाही की तुम्ही संबंध साधून किती कालावधी झाला आहे. सुरूवातीच्या कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्या असतात, ज्यांचं सेवन करून तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. परंतु कालावधी अधिक उलटला असेल तर गर्भनिरोधक उपाय उपयोगाचे ठरणार नाहीत. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ लेडी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर गर्भ राहिला असेल तर गर्भपात करून घेऊ शकता. भविष्यात चुकूनही विवाहापूर्वी संबंध साधू नका.

  • मी १६ वर्षीय तरुणी आहे, सध्या शिकत आहे. एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला नव्हता, परंतु त्याच दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करू लागले. या गोष्टीला ६-७ महिने उलटून गेल्यावर जेव्हा मी त्याच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याने ना धड होकार दिला ना नकार. त्याच्या या तटस्थ वागणूकीचा मी काय अर्थ काढू? त्याची प्रतिक्षा करू की आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू?

आता तुझं वय प्रेमात पडण्याचं वा व्यक्तिला समजून घेण्याचं नाहीए. ज्याला तू प्रेम समजतेस ते प्रेम नाहीए, तर केवळ लैंगिक आकर्षण आहे, जे या वयात विरूद्धलिंगी व्यक्तीप्रति जाणवणं स्वाभाविक आहे. यावेळी तुझ्यासाठी आपल्या करिअरहून अधिक महत्त्वाचं काही असता कामा नये. त्यामुळे सध्या आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं उत्तम.

  • मी ३१ वर्षीय विवाहिता आहे व २ मुलींची माता आहे. माझ्या लग्नाला १६ वर्षं झाली आहेत. मी माझ्या वैवाहिक जीवनात खुश नाही. माझे पती माझ्या मोठ्या बहिणीवर प्रेम करतात. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंधसुद्धा आहेत. ही गोष्ट मला ४ वर्षांपासून माहीत आहे. परंतु इच्छा असूनही मी काही करू शकले नाही, कारण माझे पती हुकूमशाही वृत्तीचे आहेत. लहानसहान गोष्टींवरून त्यांचा राग अनियंत्रित होतो. मी त्यांना विरोध करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व बघून केवळ कुढत राहाते. ते माझ्या मुलींवरही लक्ष देत नाहीत.

माझी मुलगी ज्या शिक्षकांकडे गेल्या ९ वर्षांपासून शिकत आहे, त्यांना जेव्हा मी त्रस्त असल्याचं कळलं तेव्हा माझ्या चिंतेचं कारण समजून घेत त्यांनी माझ्याप्रति सहानुभूति दर्शवली. आता मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. ६ महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी माझ्यासोबत ते आपला आनंद वाटून घेऊ इच्छितात असं सांगितलं तेव्हा मी चकित झाले. अशा संबंधांमध्ये निर्माण होणारी जवळीक वाढणं स्वाभाविक असतं, परंतु मला भीती वाटते. मी काय केलं पाहिजे, तुम्हीच सांगा?

४ वर्षांपूर्वी तुम्हाला तुमच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची गोष्ट ठाऊक झाली होती, तेव्हाच तुम्ही याला विरोध करायला हवा होता. पती कितीही हुकूमशाही करणारे असले तरी या अन्यायविरूद्ध आवाज न उठवून तुम्ही त्यांना स्वैराचार करण्यासाठी मोकळीक दिली. पतीला घाबरत होतात हे खरं. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या बहिणीला रागवायला हवं होतं. अजूनही वेळ आहे. तिच्या पतीकडे तक्रार करा. आपल्या माहेरीसुद्धा तिची करतूत सांगा. हे असं केल्याने ती तुमच्या मार्गातून बाजूला होईल.

उरला प्रश्न मुलीच्या शिक्षकांचा तर त्यांना तुम्ही आपली खाजगी गोष्ट सांगायला नको होती. ते सहानुभूती दाखवून तुमच्या अडचणीचा गैरफायदा उठवू पाहत आहेत. अशा संधीसाधू व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. बाहेर आनंद शोधण्याऐवजी आपल्या कुटुंबात हरवलेला आनंद शोधा. तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्यावर २ मुलींची जबाबदारीसुद्धा आहे. तुम्हीच म्हणता की तुमचे पती मुलींवर लक्ष देत नाहीत. मग अशावेळी तर तुमची जबाबदारी अधिक वाढते, तेव्हा समजूतदारपणे वागा.

  • माझ्या भावाचं लग्न १० वर्षांपूर्वी कोटा येथील मुलीशी झालं होतं. मुलीची मोठी बहिण घटस्फोटित होती. हे लग्न जुळवताना लोक आम्हाला हे स्थळ योग्य नसल्याचं सुचवत होते. मुलीची आई मुलींना भडकवते. त्यामुळे मोठ्या मुलीचं सासरी पटू शकलं नाही. आम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि लग्न जुळवलं. परंतु लग्नानंतर सत्य अनुभवास आलं. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी वहिनी माहेरी निघून गेली. प्रसूतीनंतर परतणार असं सांगून गेली होती. मुलगी झाल्यावर ३-४ वेळा भाऊ तिला आणायला गेला, परंतु ती परतली नाही. याच दु:खात माझा भाऊ रात्रंदिवस दारू पिऊ लागला आणि २ महिन्यांपूर्वी वारला. आता मुलीकडचे म्हणतात की आम्ही भावाच्या मुलीला ताब्यात घ्यावं, जेणेकरून त्यांना वहिनीचं पुन्हा लग्न लावता येईल. असंही धमकावतात की आम्ही मुलीला ताब्यात घेतलं नाही तर तिला अनाथाश्रमात सोडून देणार. सांगा काय करू?

लग्न जुळवताना एकमेकांबद्दलची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. तुम्हाला मुलीच्या घरच्यांबद्दल लोकांनी सावध करूनही तुम्ही त्याकडे डोळेझाक केलीत. आत जे घडलं ते घडलं. ते बदलता येणार नाही. त्यापेक्षा भावाच्या मुलीला ताब्यात घ्या, जेणेकरून त्या लहानग्या जीवावर अन्याय होणार नाही.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, ज्यामुळे मी कुठेही यायला जायला संकोचते. कृपया काही उपाय सांगा, ज्यामुळे हे केस नाहीसे करता येतील?

चेहऱ्यावरील केसांच्या समस्येच्या मागे हार्मोनल चेंज असू शकतो. यासाठी डॉक्टरशी संवाद साधा आणि उपचार करा. केसांना हाताने उपटायचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्ही जितके केसांना उपटाल, तितक्या दुप्पट वेगाने ते उगवतील. तुम्ही वाटले तर ब्युटी पार्लरमधून वॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांचा कायमचा इलाज करायचा असेल तर तज्ञाद्वारे लेझर ट्रीटमेंट करा.

  • क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतो आहे, काय करू?

सर्वात आधी तर केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्यावर गरजेपेक्षा जास्त लावणे बंद करा. यानंतर घरी तयार केलेले फेसपॅक आणि स्क्रबच्या साहाय्याने चेहरा रोज साफ करा. तुमचे हरवलेले सौंदर्य परत येईल.

  • माझ्या ओठांवर पांढरे डाग येत आहेत. कसे ठीक होऊ शकतील?

लिंबू, संत्र यासारख्या आंबट फळांचे रस पाण्यात मिसळून ओठांवर लावल्याने डाग कमी करण्यास फायदेशीर ठरतात. हे रस तुम्ही कापसाच्या मदतीने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायांच्या वापराने काही दिवसातच डाग नाहीसे होऊ लागतात. तुमच्या आहारात लसणीचा वापर वाढवल्याने पांढरे डाग कमी करण्यास मदत होईल.

  • प्रेगनन्सीनंतर केस खूप विरळ होत चालले आहेत. असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन नामक हार्मोनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे केससुद्धा वेगाने गळतात. गर्भावस्थेच्या काळात खाण्यापिण्यावर लक्ष दिले तर काही प्रमाणात हे कमी केले जाऊ शकते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहे आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, ज्यामुळे माझा चेहरा ग्लो करेल आणि डागांपासून सुटका मिळेल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिट ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यास मदत करतो. २ महिन्यांपर्यंत असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

  • सेंसिटिव्ह त्वचेची काळजी घेण्यास काही घरगुती उपाय सांगा?

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह आहे तर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या त्वचेचे चेकअप करून घ्या. तुम्हाला तुमच्या त्वचेबाबत माहिती असायला हवी की कोणत्या कारणांमुळे तुमची त्वचा इतकी सेंसिटिव्ह होत आहे. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर तुमच्याकडे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चांगले उपाय आणि साधन असतील.

तुमची त्वचा सेंसिटिव्ह आहे तर याची विशेष काळजी घ्यायला हवी. उन्हात बाहेर जाण्याआधी त्वचेवर सनस्क्रीन लावा. पाणी भरपूर प्या आणि प्रथिनयुक्त आहार घ्या.

  • माझे केस कुरळे आहेत आणि जेव्हा ओले असतात फक्त तेव्हाच सुंदर दिसतात. वाळले की खूप कडक होतात. मी काहीही करून माझे केस नेहमीकरीता स्मूद आणि सॉफ्ट करू इछिते. काही उपाय सांगा?

केसांना मुलायम करण्याकरिता आणि त्यांना चमकदार करण्याकरिता अंडे उपयुक्त आहे. हे इतके प्रभावी आहे की एकदाच वापरून तुम्हाला फरक दिसून येईल. यात योग्य प्रमाणात प्रथिने, फॅटी अॅसिडस् आणि लॅक्टीन असते, जे केसांचे पोषण करते. यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावले तर फायदा होईल.

  • दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या रोगांपासून आपले रक्षण करते. तुळशीची पाने उन्हात वाळवून पावडर तयार करा. नंतर टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा नाहीसा होईल. मिठात सोडियम आणि क्लोराईड दोघांचे मिश्रण असते, जे दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा अतिवापर दातांच्या इनेमलला इजा पोहचवू शकतो. तसे मीठ आणि मोहरीचे तेल दातांना चमकावण्याचा फार जुना उपाय आहे. बस्स चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

  • माझे वय २८ वर्ष आहे. मी खूप जास्त बारीक आहे. माझी मानसुद्धा खूप बारीक आहे, ज्यामुळे कोणताही नेकपीस मला सूट होत नाही. कृपया सांगा की कोणत्या प्रकारचे नेकपीस आणि एक्सेसरीज वापरू?

जसे की तुम्ही तुमच्या शरीराचे वर्णन केले त्यावरून असे वाटते की तुमची मान लांब असावी. लांब मान असणाऱ्या महिलांना लांब चेन छान दिसते. उंच व सडपातळ महिलांना मध्यम आकाराचे दागिने शोभतात. साधारणत: दागिने कपडयाच्या हिशोबाने घातले जातात. यात लक्ष देण्याची गोष्ट फक्त ही आहे की तुमच्या टॉप कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळयाच्या डिझाईनवरसुद्धा तुमच्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळयाच्या आकाराची माळ गळयात नको. म्हणजे गोल गळयाच्या ड्रेस सोबत गोल आकाराची माळ घालायला नको. मोठा गोल गळा असलेल्या ड्रेससोबत लहान चेन आणि व्ही नेकच्या ड्रेससोबत लहान गोल किंवा अंडाकृती माळ घालायला हवी.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४१ वर्षीय महिला आहे. मला २ मुलगे आहेत. दीर्घ काळापासून माझ्या गर्भाशयात २ छोटे-छोटे फायब्रॉइडच्या गाठी आहेत. पण नुकतेच माझे अल्ट्रासाउंड झाले, तेव्हा कळले की, या फायब्रॉइड्सची साइज वाढून २.५ सेंटीमीटर झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, माझी इच्छा असेल गर्भपिशवी काढताही येईल. परंतु त्यांच्या असण्याने मला कोणताही त्रास नाहीए. तरीही भीती वाटते की काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर : फायब्रॉइड महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या सामान्य गाठी आहेत. अल्ट्रासाउंड केल्यानंतर जवळपास ४० टक्के महिलांच्या गर्भाशयात या गाठी आढळून येतात. काही महिला जसं की आपल्या केसमध्ये या गाठी छोट्या-छोट्या आहेत आणि  काहींमध्ये तर या फूटबॉलएवढ्या मोठ्याही असतात.

जोपर्यंत फायब्रॉइडमुळे मासिकपाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होत नसेल, एखाद्या महिलेला मूल हवंय आणि फायब्रॉइडमुळे ही इच्छा पूर्ण होण्यात अडचण येत नसेल किंवा फायब्रॉइड्समुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नसतील उदा. गाठ आपल्या स्थानी चक्रासारखी फिरणे आणि रक्तपुरवठा भंग होण्यासारख्या इमर्जेन्सी उत्पन्न होत नसतील किंवा या गाठी खूप मोठ्या झाल्याने ब्लॅडर दबणे अथवा मलाशय दबल्यामुळे कोणती समस्या निर्माण होत नसेल, तर तिला तिच्या स्थितीवर सोडून देण्यातच शहाणपण आहे.

सध्या तुमचे जे वय आहे, ते पाहता या गाठींना सहजपणे कोणतीही छेडछाड न करता सोडता येऊ शकते. विशेषत: अशा स्थितीत जेव्हा आपले कुटुंब पूर्ण झाले असेल आणि या गाठी असण्याने आपल्याला कोणताही त्रास नसेल.

जसजसे आपले वय वाढेल आणि आपली रजोनिवृत्ती होईल तसेच आपल्या शरीरात लैंगिक हार्मोन्सचे प्रमाण घटत जाईल, तसतशा या गाठी आपोआपच आकुंचन पावत जातील.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे आणि मला गर्भावस्थेचा तिसरा महिना चालू आहे. मला सकाळी उठताच उलट्या होण्याचा त्रास चालू आहे. चक्कर येते आणि अशक्तपणाही जाणवतो. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी ग्लुकोजच्या बॉटलची ड्रीपही लावली, परंतु त्यामुळेही काही फायदा झाला नाही. काहीतरी असा उपाय सांगा, ज्यामुळे त्रास दूर होऊ शकेल.

उत्तर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या शरीरात एकाच वेळी खूप सारे बदल होतात. त्यात हार्मोनल फेरबदलही सामील आहेत. त्यामुळे उलटीचा त्रास होतो. हे लक्षण साधारणपणे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात सुरुवातीच्या काळात दिसते. याची तीव्रता एखाद्या महिलेमध्ये कमी तर एखादीमध्ये जास्त असते. एखादीला थोडाशीच मळमळ होते, कोणाला जास्त उलट्यांचा त्रास होतो. परंतु बहुतेक महिलांमध्ये हा त्रास चौथा-पाचवा महिना उलटल्यानंतर आपोआपच दूर होतो.

तोपर्यंत आराम मिळवण्यासाठी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता. जर उलट्या सकाळीच जास्त होत असतील, तर सकाळी अंथरुणावरून उठण्यापूर्वी एक सुका टोस्ट किंवा बिस्कीट खा. आपण आपल्या खाण्यापिण्यात बदल केल्यास उत्तम होईल.

खाण्याच्या काही पदार्थ किंवा वासामुळे मळमळत असेल, तर त्या पदार्थांपासून लांब राहा. गर्भावस्थेत गंधाबाबत संवेदनशीलता वाढते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरमागरम पदार्थ खाण्याऐवजी थंड पदार्थ खाणे योग्य ठरते. कारण थंड पदार्थांमध्ये सुगंध कमी जाणवतो.

जिथे चक्कर येणे आणि अशक्तपणा वाटण्याची गोष्ट आहे, तिथे डॉक्टरांकडूनच तपासणी करून घेणे उत्तम असते. याचा संबंध रक्ताची कमतरता आणि ब्लड प्रेशर कमी होणे याच्याशीही असू शकतो. गर्भातला भ्रुणाच्या वाढीसाठी कॅलरीज, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी गर्भवतीने आपल्या खुराकाकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर एखाद्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेबाबत कळले तर ती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर गोळी, कॅप्सूलही देऊ शकतात.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला दर १५ दिवसांनी पाळी येते. डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी औषध दिले. ते घेतले की आराम मिळतो, पण ते सोडले तर पुन्हा मासिक चक्र १५ दिवसांचे होते. हे एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण तर नाही ना?

उत्तर : किशोरावस्थेत सुरुवातीच्या काळात हार्मोनल असंतुलनामुळे मासिकपाळीची वेळ अनियमित होणे सामान्य गोष्ट आहे. कमी दिवसांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा रक्तस्त्राव झाल्यास नक्कीच त्रास होत होतो. त्यामुळे मनही शंकाकुल होते.

अशा वेळी हेच योग्य ठरेल की हा शरीर परिपक्व होण्याच्या शारीरिक क्रियेचा सामान्य भाग मानून स्वत:हून ही गोष्ट सामान्य होण्यास वेळ द्या. यामुळे विचलित होऊ नका किंवा आपल्यात अशी धारणा निर्माण होऊ देऊ नका की आपल्याला एखादा रोग झाला आहे. रजस्वला झाल्यानंतर काही वर्षांत बहुतेक किशोरींचे देह आपोआपच मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.

तरीही एखाद्या तरुणीला धीर नसेल किंवा तिच्या शरीरात रक्ताची खूप कमी आली असेल, तर डॉक्टरांना भेटा. ते लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या देऊन चक्राचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या डॉक्टरांनीही असेच केले, पण हा प्रयत्न अनेक महिन्यांपर्यंत पुन्हा-पुन्हा करण्याची आवश्यकता असते.

जोपर्यंत मासिक पाळी नियमित होत नाही, तोपर्यंत लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते. दुसरा पर्याय हा आहे की आपण आपल्या शरीराला स्वत:हून त्याची नियमितता स्थापित करू द्यावं.

आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. सातत्याने रक्तस्त्राव झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता येणे स्वाभाविक आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे आयर्न आणि फोलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या आणि आहारात लोहयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें