सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मी २२ वर्षांची आहे. माझी समस्या अशी आहे की, जेव्हा मी आर्टिफिशियल दागिने घालते तेव्हा माझ्या त्वचेवर पुरळ उठते. यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे?

आर्टिफिशियल दागिने घालण्यापूर्वी स्कीन क्रीमचा वापर करा. दागिने काढल्यानंतर दागिन्यांचा स्पर्श झालेली जागा डेटॉलने धुवा.

  • मी २५ वर्षांची आहे. काही दिवसांपासून भुवयांवरील केस गळत आहेत. कृपया असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे हे केस गळणे थांबेल?

तुमच्या भुवयांचे केस गळण्याचे कारण तणाव हे असू शकते. जास्त तणावामुळे केस गळू लागतात. म्हणून तणावात राहणे बंद करा. जेवणातील झिंक, आयर्न, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळेही भुवयांचे केस गळू लागतात. यावर उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल बोटांवर घेऊन भुवयांची गोलाकार दिशेने मालीश करा. ३० मिनिटांपर्यंत तेल तसेच लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

  • मी १८ वर्षांची आहे. माझे केस खूपच तेलकट आहेत. शाम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेलकट होतात. शाम्पू करण्यापूर्वी मी केसांना खोबरेल तेल लावते. खोबरेल तेल लावणे योग्य आहे का?

तुमच्या समस्येचे कारण हेदेखील असू शकते की, केसांना शाम्पू केल्यानंतरही तुमच्या केसांमधील तेल चांगल्या प्रकारे निघून जात नसेल. केसांना पोषण मिळावे यासाठी तेलाऐवजी हेअर टॉनिक लावा. यामुळे केस निरोगी होतील आणि तेलकटही होणार नाहीत. केस तेलकट दिसू नयेत यासाठी शाम्पूत लिंबाच्या रसाचे काही थेंब घातल्यानंतरच केसांना शाम्पू करा. केस धुतल्यानंतर केसांची २ ते ३ इंच त्वचा सोडून कंडीशनर लावा.

  • मी १९ वर्षांची आहे. माझा रंग सावळा आणि केस काळे आहेत. एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार मी केसांना बरगंडी कलर लावला. पण यामुळे माझा रंग अधिकच सावळा दिसू लागला. मला वाटते की, बरगंडी कलर मला शोभत नाही. कृपया सांगा की, केसांचा हा रंग कसा आणि किती लवकर काढता येईल? शिवाय माझा चेहरा आणि केसांवर कोणता रंग शोभून दिसेल, हेदेखील सांगा?

केसांना लावलेल्या रंगामुळे तुम्ही घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांना नैसर्गिक रंगाची डाय लावा आणि केसांना चांगले कंडिशनिंग करा. नेहमी चांगल्या क्लॉलिटीचाच शाम्पू वापरा, जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही. तुमच्या सावळया रंगावर वाईन आणि वॉलनट कलर चांगला दिसेल. सर्व केसच कलर करणे मुळीच गरजेचे नाही. वाटल्यास तुम्ही हेअर कलरने केसांच्या काही बटा रंगवू शकता.

  • मी १८ वर्षांची आहे. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी मी मसुर डाळीचा लेप लावते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर पुळया येतात. पुळया आणि चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी काही उपाय सांगा?

तुमच्या समस्येवरुन हे लक्षात येते की, तुमची त्वचा खूपच संवेदनशील आहे. यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा पुळया येतात. तुम्ही त्वचेवर लेप लावू नका. कारण लेप सुकल्यावर तो घासून काढताना त्वचेच्या ज्या भागाला तेलाची गरज असते तेथून ते निघून जाते. त्यामुळे अशा भागावर कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा लेप लावा. तुम्ही ताजी पाने कुटून त्याचाही फेसपॅक बनवू शकता. अॅलोवेरायुक्त क्रीमचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. यामुळे पुळया कमी होतील आणि हळूहळू तेथील डागही निघून जातील.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा कधी चेहऱ्यावर क्रीम लावते तेव्हा चेहऱ्यावर व्हाईटहेड्स येतात. कृपया ते काढून टाकण्याचा उपाय सांगा?

व्हाईटहेड्सची समस्या चेहऱ्याची रंध्रे, तेलकटपणा तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवते. व्हाईटहेड्स त्वचेच्या आतील रंध्रांमध्ये तयार होतात, ज्याला पुरेसा प्रकाश मिळत नाही आणि त्याचा रंग सफेद असतो. आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या तेलकटपणा असतो, जो त्वचेचा मुलायमपणा आणि त्वचेचे मॉईश्चर कायम ठेवतो. त्वचेवर जास्त तेलकटपणा असेल तर त्यामुळे त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम्स अशा असतात ज्या त्वचेला आणखी तेलकट करतात. ज्यामुळे त्वचेवर पुळया येऊ लागतात. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीमचाच वापर करा. व्हाईटहेड्स घालवण्यासाठी मेथीच्या पानांत पाणी घालून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर चोळा. विशेष करुन जिथे व्हाईटहेड्स असतील तिथे ही पेस्ट लावा. यामुळे व्हाईटहेड्स दूर होतील. पेस्ट सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

  • पेन्सिल आयलायनर आणि लिक्विड आयलायनर यापैकी जास्त परिणामकारक काय आहे?

लिक्विड आयलायनरमुळे डोळे जितके मोठे आणि आकर्षक दिसतात तितके पेन्सिल आयलायनरने दिसत नाहीत. लिक्विड आयलायनर खूप काळ टिकूनही राहतो. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी लिक्विड आयलायनर जॅकपॉटसारखा आहे. ते बराच काळ त्याच शेपमध्ये राहते, सोबतच त्यामुळे काळपटपणा दिसत नाही. याउलट पेन्सिल किंवा पावडर लायनरमुळे डोळयांच्या आजूबाजूला तेलकटपणा निर्माण झाल्याने दिवसभरात दिलेला शेप खराब होऊ शकतो किंवा निघूनही जाऊ शकतो. लिक्विड आयलायनरचा हादेखील मोठा फायदा आहे की, तुम्ही याच्या मदतीने काहीही क्रिएटिव्ह करु शकता.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवा

प्रश्न : माझ्या पतीचे वय ५२ वर्षं आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या वडिलांचे व बहिणीचे दोघांचेही मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे झाले होते. वडिलांचे वय ६६ वर्षं व बहिणीचे वय ६२ वर्षं असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या कारणांमुळेच त्यांच्या प्रकृतीबाबत मला अधिक काळजी वाटते. ब्रेन स्ट्रोक हा आनुवंशिक आजार आहे का? यापासून बचाव करायचा झाल्यास काय उपाय करता येतील?

उत्तर : सद्यस्थितितील वैज्ञानिक माहितीनुसार ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूची विकार त्याच हानिकारक बाबींमुळे उद्भवू शकतो, ज्यामुळे हृदय विकाराचा धोका संभवतो. या बाबींमध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, अस्थिर लिपिड प्रोफाईल व कौटुंबिक रोगाची जनुके येतात.

यात उपाय म्हणून नियमित रक्तदाब तपासून घेणे व तो १३०/८० पर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करणे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे व फास्टींग ब्लड शुगर ११० मिलिग्रॅम व लाकोसिलेटेड हेमोग्लोबिन ६.५च्या आत ठेवणे. धुम्रपान करत असाल तर सोडून द्या, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण असू द्या, संतुलित आहार घ्या, स्थूल होणार नाही याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा व अतिताण घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित बेबी अॅस्प्रीनचा डोस घेणे ही लाभदायक ठरेल. बेबी अॅस्प्रिनच्या डोसमुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी न होण्यासही मदत होते.

तरीही कधी त्यांना कुठल्याही प्रकारच्या पक्षाघाताची लक्षणे दिसलीच तर वेळ न दवडता त्यांना इस्तिळात दाखल करा. बऱ्याचदा मेंदूच्या विकारांमध्ये योग्य प्रकारे प्रथमोपचार मिळाल्यास परिस्थिती आटोक्यात राखता येते, अन्यथा पक्षाघात किंवा इतरही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

प्रश्न : मी १८ वर्षांचा असून बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपासून जवळपास दर आठवड्याला १-२ वेळेस तरी रात्री स्वप्नंदोष होत आहे. माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे की मला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायला हवं नाहीतर त्याचे माझ्या तब्येतीवर दुष्परिणाम होतील. ही समस्या खरंच एवढी गंभीर आहे का? की मला खरंच एखाद्या डॉक्टरकडे जायला पाहिजे? मी काही वैद्य-हकीम यांच्या जाहिरातीदेखील पाहिल्या आहेत. ज्यात स्वप्नदोषावर खात्रीशीर उपचारांचा दावा केला जातो. माझी मानसिक स्थिती खूप विचलित झाली आहे. मी काय करावे? उपाय सुचवा.

उत्तर : तुम्ही गोंधळून जाऊ नका. किशोरावस्थेतून युवावस्थेत प्रवेश करताना आपले शरीर अधिक संवेदनशील झालेले असते. लैंगिक हारमोन्स वाढीस लागलेले असतात. अंड ग्रंथी शुक्राणू तयार करू लागलेल्या असतात. प्रजनन  प्रक्रियेत वीर्य बनू लागते आणि पौरूषत्त्वाची इतर शारीरिक लक्षणंही दिसू लागतात. या अवस्थेत काही किशोरावस्थेतील मुलांना व युवकांनाही रात्री झोपताना उत्तेजना जागृत झाल्यामुळे वीर्यपतन होणे सामान्य लक्षण आहे. बोली भाषेत याला आपण स्वप्न दोष असे म्हणतो.

खरं तर हा कुठलाही आजार नसून एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत ही शारीरिक घटना कुठल्याही वयोगटातील पुरुषांमध्ये आढळते. या क्रियेला स्वप्नमैथुन म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण याचा संबंध कामुक स्वप्नांशी आहे, जी झोपेतून उठल्यानंतर आठवतही नाहीत. ही क्रिया म्हणजे कामेच्छांचा निचरा होण्याचा नैसर्गिक मार्ग आहे असे मानसोपचार सांगतात.

पण लक्षात ठेवा चुकूनही वैद्य हकिम यांच्या नादी लागू नका. कित्येक वैदू बाबा काहीही भ्रमाक गोष्टी सांगून अनेक युवकांचे युवा जीवन उध्वस्त करतात.

प्रश्न : मी एक ५४ वर्षीय महिला आहे. माझ्या उजव्या कानावर एक भुरकट काळ्या रंगाचा तीळ आहे. मागील काही दिवसांपासून मला असं वाटतंय की तीळाचा आकार वाढलेला आहे हे काही आजाराचे लक्षण तर नाही ना? माझ्या एका मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की कधीकधी तीळामध्येसुद्धा कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो. हेखरं आहे का? मला काय करावे लागेल

उत्तर : हे खरे आहे की तीळ एक सेंटिमीटर ने वाढला, रंगात काही फरक दिसू लागला, खाज सुटू लागली किंवा त्यातून रक्त येऊ लागले तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घेतली पाहिजे. अनेक वर्षांच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला गेला आहे की त्यातील ३,००० पुरुषांमधील एक व १०,८००मधील एका स्त्रिच्या तीळामध्ये मेलोनोमा नामक कॅन्सर उद्भवू शकतो.

सुरुवातीलाच जर शस्त्रक्रिया करून मुळापासून तीळ काढून टाकला तर यापासून अडचणीतून मार्ग काढता येऊ शकतो. जर दुर्लक्ष केले गेले तर मेलोनोमा शरीरात पसरल्यामुळे हा रोग जीवघेणा ठरू शकतो.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २९ वर्षांची असून एका मुलीची आई आहे. आम्हाला आणखी २-३ वर्षं दुसरे मूल नको आहे. मी कॉपर टीबद्दल ऐकले आहे. माझ्या वहिनीने सांगितले की, ती लावल्यानंतर वां होण्याची भीती असते आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होतो. हे खरे आहे का? कॉपर टी किती सुरक्षित आहे?

कॉपर टी इंग्रजी अक्षर टी या आकाराचे डिव्हाइस आहे. यात पुढच्या बाजूने धागा निघालेला असतो, जो अगदी सहजपणे व्हर्जायनामध्ये इंसर्ट केला जातो. कॉपर टी ६-७ वर्षांपर्यंत काम करू शकते. गर्भधारणा टाळण्यासाठी हा सोपा व उत्तम पर्याय आहे.

यामुळे वांझपण येत नाही आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होत नाही. हे एक चांगले गर्भनिरोधक आहे पण, बहुसंख्य महिलांना याबाबत जास्त माहिती नसते आणि त्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात.

आशियात केवळ २७ टक्केच महिलाच आययूडी गर्भनिरोधक वापरतात. यावरून हे स्पष्ट होते की, जनजागृतीचा अभाव हे यामागचे कारण आहे. प्रत्यक्षात हे लावणे अतिशय सोपे आहे आणि जेव्हा गर्भधारणेची इच्छा होईल तेव्हा महिला ती सहजपणे काढूनही टाकू शकतात.

कॉपर टी लावणे व काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडेच जावे. बाजारात सहजपणे उपलब्ध असलेल्या कॉपर टीमुळे मासिक च्रकावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.

  • मी २५ वर्षांची आहे. २-३ महिन्यांनंतर माझे लग्न होणार आहे. नवरा मनमोकळेपणाने वागणारा आणि रोमँटिक आहे. पण त्याने सांगितले की त्याला इंटरकोर्सआधी ओरल सेक्स अधिक आवडते. मला हे माहिती करून घ्यायचे आहे की, ओरल सेक्समुळे काही नुकसान तर होत नाही ना?

शारीरिक स्वच्छता म्हणजे हायजीनकडे लक्ष दिल्यास ओरल सेक्समुळे कुठलेच नुकसान होत नाही. उलट हे सेक्स आणखी मजेदार करते.

‘कामसूत्र’मध्येही ओरल सेक्स ही एक स्वाभाविक क्रिया असल्याचे म्हटले आहे आणि याच्या विविध आसनांबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे.

अजिंठा, एलोरा लेण्यांमध्ये आजही अशा मूर्ती पहायला मिळतील ज्या नरनारीमधील या प्रक्रियेला नजाकतीने दाखवत याचे समर्थन करतात की, शेकडो वर्षांपूर्वीही ओरल सेक्स म्हणजे मुख मैथुनाचे वेड होते.

ओरल सेक्समध्ये सेक्स पार्टनरला आपल्या तोंडाच्या मदतीने सेक्सचे समाधान मिळवून द्यायचे असते. त्यासाठी पार्टनरचे सेक्स आर्गन तोंडात घ्यावे लागते. या क्रियेत तोंडाचा वापर करून एकमेकांच्या डोळयात पाहून ओरल सेक्स करणे फारच रोमांचक अनुभव असतो.

पण ओरल सेक्ससाठी एकमेकांची परवानगी असणे खूपच गरजेचे आहे.

  • मी २७ वर्षांची विवाहिता असून प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे. माझे पती सरळ स्वभावाचे असून माझ्यावर खूप प्रेमही करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत. गुपचूप माझा मोबाइलही तपासून पाहतात. मला नवऱ्याला गमवायचे नाही. सांगा, मी काय करू?

प्रेमात संशय हा असा एक काटा आहे जो दु:ख तर देतोच सोबतच नात्यामध्ये तिरस्कार निर्माण करतो. संशयामुळे सुखी वैवाहिक जीवन उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

तुमचे पती गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यावर संशय घेऊ लागले असतील तर हे स्पष्ट आहे की, पूर्वी सर्व व्यवस्थित होते पण आता कदाचित असे काही घडत असेल ज्यामुळे ते संशय घेऊ लागले असतील.

अशावेळी तुम्ही एकांतात पतीकडून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण, एखादी गोष्ट मनातल्या मनात ठेवून कुढत बसण्याने समस्या सुटणार नाही, उलट दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहील.

तुमचे पती सतत आणि गुपचूप तुमचा मोबाइल तपासून पाहत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तुम्ही गरजेपेक्षा जास्तवेळ मोबाइल पाहत असाल. पती असेल तर गरजेपुरताच मोबाइलचा वापर करा.

पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सुख-दु:ख शेअर करा. तरीही पतीचे वागणे बदलत नसेल तर एखाद्या समुपदेशकाची मदत घेता येईल.

  • मी २३ वर्षांची तरुणी असून एका विवाहित पुरुषावर माझे प्रेम आहे. आमच्यामध्ये फिजिकल रिलेशनही आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि सांगतो की, आपण लग्न करूया. मी काय करू?

तुम्ही ज्या आगीशी खेळत आहात ती एकाच वेळी अनेक कुटुंबाना जाळू शकते. तुमचा तथाकथित प्रेमी तुम्हाला मुर्ख बनवत आहे. या नात्याला येथेच पूर्णविराम देऊन चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच योग्य ठरेल.

आता राहिली गोष्ट एका विवाहित पुरुषाशी लग्न करायची तर, कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर ठरेल.

गर्भधारणा आणि IVFशी संबंधित समस्यांचे उपाय सांगा?

* डॉक्टर सागरिका अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल,   नवी दिल्ली

प्रश्न मी 25 वर्षांची विवाहित महिला आहे. माझी काही स्वप्ने आहेत, म्हणून मला आत्ता आई व्हायचे नाही. जर मला 35-36 वयाच्या आई व्हायचे असेल तर यात काही अडचण येऊ शकते का? काही लोक म्हणतात की या वयात आई होणे शक्य नाही. हे खरे आहे का?

उत्तर वाढत्या वयाबरोबर, अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, ज्यामुळे या वयात गर्भधारणा करणे कठीण होते. जर तुम्ही ठरवले असेल की तुम्हाला वयाच्या 35 व्या वर्षी आई व्हायचे आहे, तर त्यात काहीच हरकत नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या वयातही गर्भधारणा होऊ शकते. यासाठी तुम्ही IVF ची मदत घेऊ शकता.

तुम्ही अजून तरुण आहात, त्यामुळे तुमच्या अंड्यांची गुणवत्ता चांगली राहील. तुम्ही तुमची निरोगी अंडी गोठवू शकता जी भविष्यात आई होण्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि IVF उपचारदेखील सहज पूर्ण होतील. गोठवलेले अंडे तुमच्या पतीच्या शुक्राणूमध्ये मिसळून आधी भ्रूण तयार केले जाईल आणि नंतर ते गर्भ तुमच्या गर्भाशयात रोवले जाईल. काही दिवसात तुम्हाला गर्भधारणेची चांगली बातमी मिळेल.

प्रश्न- मी 35 वर्षांचा आहे. माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत, पण तरीही गर्भधारणा करता येत नाही. मलाही धूम्रपान करण्याची सवय आहे. मी आई होण्याचा कोणताही मार्ग आहे का?

उत्तर- या वयात गर्भधारणेच्या समस्या येणे सामान्य आहे, परंतु याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. जर तुमचा नवरादेखील धूम्रपान करत असेल तर त्याला ही सवय सोडण्यास सांगा. तुमचे वय मोठे आहे, त्यामुळे लवकर गर्भधारणा करणे महत्वाचे आहे, अन्यथा समस्या कालांतराने वाढू शकते. यासाठी प्रथम तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर उपचार मदत करत नसेल, तर तुम्ही IVF उपचारांची मदत घेऊ शकता.

प्रश्न- मी 40 वर्षांचा आहे. मी एकदा IVF उपचार केले आहे, परंतु ते अयशस्वी झाले. मला पुन्हा IVF चा प्रयत्न करायचा आहे. यात काही धोका आहे का?

उत्तर- आपण IVF उपचार अयशस्वी होण्याचे कारण स्पष्ट केले नाही. बरं, आयव्हीएफ उपचाराला कोणतीही मर्यादा नाही, म्हणून तुम्ही कोणत्याही संकोचशिवाय ते पुन्हा करू शकता. होय, हे वारंवार केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. यशस्वी IVF साठी तणावापासून दूर राहा आणि वजन संतुलित ठेवा.

आजकाल आयव्हीएफच्या क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. डॉक्टरांच्या गरजेनुसार तंत्र निवडल्यास गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते.

प्रश्न- मी 35 वर्षांची विवाहित महिला आहे. मला आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने आई व्हायचे आहे आणि तंत्रज्ञान यशस्वी होईल अशी आशा आहे. म्हणून मला जाणून घ्यायचे आहे की गर्भांची संख्या गर्भवती होण्याच्या शक्यतांवर परिणाम करते का?

उत्तर- एक भ्रूण गर्भवती होण्यास यशस्वी होण्याची 28% शक्यता आहे, तर 2 भ्रूणांसह यश मिळण्याची शक्यता 48% आहे. पण यासोबत जुळी मुले होण्याची शक्यताही वाढते. जर तुम्हाला जुळ्या मुलांची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एकच गर्भाचे रोपण करू शकता. यासाठी, तुमच्या निरोगी अंड्याचा गर्भ तयार केला जाईल आणि नंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात रोवला जाईल. यामुळे तुमच्या गर्भधारणेची शक्यतादेखील वाढेल आणि तुम्हाला जास्त समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

प्रश्न मी 31 वर्षांची काम करणारी महिला आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की आयव्हीएफमध्ये जुळे किंवा अनेक बाळ होण्याची शक्यता आहे का?

उत्तर पूर्वी तज्ञ चांगल्या गर्भधारणेसाठी एकाच वेळी अनेक भ्रूण हस्तांतरित करण्याची शिफारस करत असत, कारण नंतर हस्तांतरित केलेला भ्रूण कमकुवत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण होते. यामुळे कधीकधी जुळे किंवा अनेक मुले एकत्र जन्माला आली, पण आता काळ बदलला आहे आणि तंत्रज्ञानही बदलले आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे, भ्रूण कमकुवत आहे की नाही हे माहित आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 1 किंवा जुळ्या मुलांची आई बनू शकता.

प्रश्न मी 34 वर्षांच आहे. मी 2 वर्षांपासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहे पण आता मी आशा गमावत आहे. माझ्या मित्राने मला आयव्हीएफ तंत्राबद्दल सांगितले. मला जाणून घ्यायचे आहे की आयव्हीएफ तंत्रात काही धोका आहे का? हे तंत्र माझ्या आरोग्याला हानी पोहचवत नाही का?

उत्तर होय, आईव्हीएफ तंत्र आई बनण्यामध्ये वरदानासारखे असू शकते, परंतु त्याचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण हे आवश्यक नाही की आयव्हीएफ घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या दुष्परिणामांमधून जावे लागते.

आयव्हीएफ उपचारांमध्ये अकाली बाळ जन्माला येऊ शकते, म्हणून तुम्हाला तुमच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. वारंवार तपासणी केली जाते जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याची प्रत्येक बातमी ठेवता येईल.

या व्यतिरिक्त, वर्तन बदलणे, थकवा, झोप येणे, डोकेदुखी, खालच्या ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे इत्यादी समस्यादेखील यात समाविष्ट आहेत. आपल्याला यापैकी कोणतीही समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही या समस्या टाळू शकता.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी ३० वर्षीय अविवाहित तरुणी आहे. लहानपणापासूनच माझ्याबरोबरच घरात ३ मोठे भाऊ आहेत. मी एकुलती एक छोटी बहीण होते. त्यामुळे भावांची लाडकी असायला हवे होते, पण लाड तर दूरच राहिले, कोणी माझ्याशी सरळ तोंडी बोलतही नसे. आई सतत आजारी राहात असे. त्यामुळे अभ्यासाबरोबर मी घरातील कामही करू लागले. एवढे करूनही माझा मधला भाऊ कुणास ठाऊक का, माझा द्वेष करत असे. नेहमी भांडण आणि मारझोड करीत असे. एकदा त्याने गळा दाबून मला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आईने मधे पडून मला कसेतरी वाचवले.

माझा भाऊ बहुतेक त्याच्या बेरोजगारीमुळे तणावात राहात असे. इतर कोणावरही त्याची जोरजबरदस्ती चालत नसे. त्यामुळे तो बघावे तेव्हा मला मारझोड करीत असे. कोणीही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला नाही आणि एके दिवशी त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि मग तिचाही मृत्यू झाला. मोठया भावाने लग्न केले. मला वाटले, वहिनी घरात असल्याने आईच्या मृत्यूनंतर घरात आलेले औदासिन्य दूर होईल. मलाही घरातील कामात थोडी मदत मिळेल. माझ्या जीवनात थोडे सुख येईल, पण स्थिती अजून वाईट झाली. वहिनी घरातील कुठल्याही कामाला हात लावत नसे. माझे काम अजून वाढले. ती येताच तिने माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. माझी शाळा तर आईच्या मृत्यूनंतर सुटली होती. मला शिक्षणाची आवड होती. म्हणून मी प्रायव्हेट परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन केले.

मला लग्न करायचे नाहीए. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे, परंतु दोन्ही भाऊ यासाठी परवानगी देत नाहीत. छोटा भाऊ मारहाण करतो आणि सांगतो की लग्न करायचे नसेल, तर घरातून चालती हो. या घरात राहण्याचा तुला काहीही अधिकार नाही. घरावर त्या दोघांचा हक्क आहे.

अनेक वेळा वाटते की विष घेऊन स्वत:चे आयुष्य संपवून टाकावे. लहानपणापासून आतापर्यंत मी केवळ दु:खच पाहात आले आहे. कधीही कोणाकडूनही प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळाले नाहीत.

मी जन्मल्यानंतर काही दिवसांतच माझे वडील वारले. त्यामुळे आई मला अपशकुनी, काळया तोंडाची आणि न जाणो, काय-काय बोलत राहिली आहे. मग भावांचा मार व शिव्या खात राहिले. उरली-सुरली कसर वहिनीने पूर्ण केली.

मला काही कळत नाहीए की मी काय करू? नोकरी ते मला करू देत नाहीत, मला लग्न करायची इच्छा नाहीए. कारण पुरुषांवरील माझा विश्वास उडाला आहे. मला जर माझ्या घरातच माझ्या भावांकडून प्रेम मिळाले नाही, तिथे बाहेरच्यांकडून मी काय अपेक्षा करणार. कधीतरी वाटते, घरातून पळून जावे, तर कधी जीवन संपविण्याची इच्छा होते. तुम्ही सांगा मी काय करू?

हा योगायोगच म्हणावा लागेल की लहानपणापासून आतापर्यंत आपले जीवन त्रासदायक राहिले आहे. यासाठी घरातील सदस्यांपेक्षा जास्त आपल्या कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती जबाबदार राहिली आहे.

वडिलांच्या अचानक जाण्यामुळे ४-४ मुलांची जबाबदारी आपल्या आईच्या शिरावर येऊन पडली. एकटया स्त्रीसाठी हे सर्व सांभाळणे आणि एकटीने संघर्ष करत जगणे सोपे नाही. याबरोबरच ती आजारीही राहात होती. समस्यांनी त्रस्त होऊन ती सगळा राग आपल्यावर काढत असे. यावरून आपण असे समजू नका की तिचे तुमच्यावर प्रेम नव्हते.

राहिला प्रश्न आपल्या भावांच्या आपल्याप्रती व्यवहाराबाबतचा, तर आईवडील नसल्यामुळे आपल्या विवाहाची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली आहे. म्हणून त्यांची इच्छा आहे की, तुम्ही लग्न करावे. आपल्या भावांचे आपल्यासोबतचे वागणे प्रेमपूर्वक राहिलेले नाही, याचा अर्थ असा काढू नये की, सर्व पुरुष त्यांच्याप्रमाणेच निष्ठूर असतात.

आत्महत्येसारखी भ्याड गोष्ट आपल्याला आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. हे कुठल्या समस्येचे उत्तर नाही. आपला दुसरा पर्याय घरातून पळून जाण्याचा, तर तोही विवेकपूर्ण नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठया संकटात सापडू शकता. त्यामुळे अशी चूक मुळीच करू नका.

आपले विचार सकारात्मक ठेवा आणि घरच्यांचे म्हणणे ऐका आणि लग्न करा. कदाचित, लग्नानंतर आपल्याला ती सर्व सुखे मिळतील, ज्यापासून तुम्ही आतापर्यंत वंचित राहिला आहात. आपले हक्काचे घर असेल, आपले स्वत:चे कुटुंब असेल. तिथे तुम्ही पूर्ण सुरक्षित असाल.

  • मी २७ वर्षीय विवाहिता असून, ७ वर्षीय मुलाची आई आहे. माझे पती व्यावसायिक आहेत. आमचे संपन्न आणि एकत्र कुटुंब आहे. समस्या ही आहे की, संध्याकाळी माझे पती, माझे मोठे दीर आणि सासरे एकत्र बसून दारू पितात. पतीला हरप्रकारे समजावले की, मुलगा मोठा होत आहे. त्याच्यासमोर मोकळेपणाने दारू पिणे योग्य नाही, पण पती समजून घेत नाहीत. मी माझ्या भावाकडे माझी चिंता व्यक्त केली, तेव्हा त्याने सांगितले की, मुलाला बोर्डिंगमध्ये पाठविले पहिजे. कारण घरात अभ्यासाचे वातावरण नाही. पतीला विचारले, तर त्यांचीही काही हरकत नाहीए. पण मला भीती वाटते की, एकटा राहून मुलगा कठोर बनू नये. तुम्हीच सांगा माझी काळजी योग्य आहे की नाही?

जर तुम्हाला वाटते की, घरात मुलासाठी अभ्यासाचे वातावरण नाही, तर तुम्ही त्याला बोर्डिंगमध्ये पाठवू शकता. तिथे शिस्त आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल. अधूनमधून तुम्ही मुलाला भेटत राहाल आणि तोही सुट्टयांमध्ये आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून आपल्यासाठी त्याचे प्रेम कमी होणार नाही. सुरुवातीला तुम्हाला मुलाबाबत काळजी वाटू शकते, पण त्याच्या उत्तम भविष्यासाठी आपल्याला आपले मन घट्ट करावे लागेल.

सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजा

  • केस मुलायम आणि रेशमी ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?

केसांची देखभाल करण्यासाठी तुम्ही क्रिमी शॅम्पूचा वापर केला पाहिजे. तसेच क्रिमी कंडीशनर नक्की लावा. याच्यासाठी केस शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर लेंथवर कंडीशनर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. मग केस पाण्याने धुवा. केस कॅराटीन नावाच्या प्रोटीनने बनतात. यांच्या वाढीसाठी आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करा जसे की दूध, दही, मोड आलेली कडधान्ये, अंड, मासे इत्यादी. यामुळे केसांना पोषण मिळते. आठवडयातून एकदा हेअर पॅक लावा. यासाठी पिकलेले केळे, २ चमचे दूधासह मिक्सरमध्ये स्मॅश करून पेस्टमध्ये आवाकाडो, मध आणि वाटलेली पुदीन्याची पाने एकत्र करा. हे मिश्रण लेपप्रमाणे केसांवर लावा आणि काही तासांनी केस पाण्याने धुवा.

  • माझे डोळे थोडे मोठे आहेत. जेव्हा कधी मी आय मेकअप करते, तेव्हा माझे डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. मला जाणून घ्यायचे आहे की, डोळयांचा मेकअप कसा असावा जेणेकरून माझी समस्या सोडवता येईल?

डोळे मोठे असल्याने चेहरा आकर्षक दिसतो, पण असे वाटते की तुमचे डोळे थोडे जास्त मोठे आहेत. तुम्हाला तुमच्या डोळयांना सुंदर आकार द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पापण्यांवर गडद रंगांच्या आयशॅडोचा वापर केला पाहिजे किंवा ब्राऊन शेडचा आयशॅडो चांगला आणि नैसर्गिक दिसेल. डोळयांच्या अगदी जवळून एक पातळ आयलायनरची रेघ बाहेरपर्यंत ओढा. ही रेघ शेवटी बाहेरच्या बाजूने जाड दिसली पाहिजे. तुम्हाला तुमची समस्या कायमस्वरुपी सोडवायची असेल तर परमनंट आयलायनर लावा. परमनंट आयलायनरमुळे तुमच्या डोळयांना योग्य आकार मिळेल. मग तुमचे डोळे प्रत्येकक्षणी सुंदर आणि आकर्षक दिसतील.

  • जास्त स्टीम घेतल्यामुळे माझी त्वचा सैल झाली आहे आणि तेज कमी झाले आहे. मला काय केले पाहिजे जेणेकरून त्वचा पूर्ववत होईल आणि सतेज दिसेल?

जास्त वेळा सातत्याने स्टीम घेतल्याने असे होणे स्वाभाविक आहे. आता त्वचा पूर्ववत करण्यासाठी ए.एच.ए क्रिमने चेहऱ्यावर मसाज करा. तसेच अंडयाचा पांढरा बलक चेहऱ्यावर ६-७ मिनिटे लावून मग चेहरा पाण्याने धुवून घ्या. यासह अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. उत्तम आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला एका चांगल्या कॉस्मॅटीक क्लिनिकने लेझर आणि यंग स्किन मास्कच्या काही सिटिंग्स केल्या पाहिजेत.

  • मला कानातले घालायला खूप आवडतात. ते माझ्या चेहऱ्यावर खुलुन दिसतात. पण जेव्हा कधी मी कानातले घालते, तेव्हा माझ्या कानाजवळ पुरळ ऊठू लागले. यामुळे सूजही येते. कृपया माझ्या या समस्येवर उपाय सांगा.

अशाप्रकारची समस्या तेव्हा येते जेव्हा स्किन सेंसेटीव्ह किंवा अॅलर्जिक असेल. तुम्ही नेहमी सोने किंवा चांदीचे कानातले घालणे अधिक योग्य ठरेल. कारण इतर धातूंच्या तुलनेत यापासून अॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

  • माझ्या चेहऱ्यावरचा रंग २ प्रकारचा आहे. काही ठिकाणी काळपट झालेला आहे तर काही ठिकाणी उजळलेला. सनस्क्रिनचा काहीच उपयोग झाला नाही. कृपया काही उपाय सांगा ज्यामुळे रंग एकसमान होईल?

तात्पुरता रंग एक समान करण्यासाठी तुम्ही मेकअप म्हणून कंन्सिलरचा वापर करा. याव्यतिरिक्त कच्च्या पपईचे तुकडे काळपट झालेल्या जागेवर लावा. कच्च्या पपईत पॅपिन नामक एंजाइम आढळते, जे रंग उजळवण्यास मदत करते.

  • मी जेव्हा कधी लिपस्टीक लावते, तेव्हा माझ्या ओठांवर पापुद्रे येतात. कृपया मला लिपस्टीक लावण्याची योग्य पद्धत सांगा?

कधी-कधी काही लिपस्टीक सूट करत नसातील तर अशी समस्या उद्भवू शकते. अशावेळी तुम्ही ब्रँड बदलून पाहू शकता. तसेच चांगल्या गुणवत्तेच्या मॉइश्चरायझिंग लिपस्टीकचा वापरून पाहू शकता. ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग गरजेचे आहे. यासाठी बदाम तेलाचे काही थेंब, साखर एकत्र करून टूथब्रशने ओठांवर हळूवारपणे स्क्रब करा. घरगुती उपाय म्हणून ओठांना हायड्रेट आणि नरीश करण्यासाठी बीटाच्या रसात मध मिसळून ओठांवर लावा. असे केल्यास ओठांवर रंग येईल आणि ते सॉफ्ट होतील.

  • मी २२ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. स्लिव्हलेस कपडे घालत असल्यामुळे अंडरआर्मचे केस लवकर लवकर रिमूव्ह करावे लागतात. त्यासाठी फिमेल रेारचा वापर करते. यामुळे अंडरआर्म काळपट होत आहे. यासाठी काय करू?

रेझरच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ कठीण होते म्हणून त्वचा काळी पडते. सर्वप्रथम तुम्ही रेझरचा वापर बंद करा. या केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगचा वापर करू शकता किंवा पल्सड लाइट तंत्राद्वारे कायमस्वरुपी केस कमी करण्याचा उपचार करून घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्र आहे. हा नको असलेले केस काढण्याचा सर्वात वेगवान, वेदनाहिन आणि सुरक्षित पर्याय आहे. लेझर अंडरआर्मवर परिणामकारक ठरते. यामुळे २ ते ३ सिटींग्जमध्ये केस निघून जातील. डार्क अंडरआर्मचा तुम्ही ब्लीचद्वारे लाइट करू शकता, पण ब्लीच नेहमी वॅक्सिंग पूर्वी करावे.

 

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे. मला मासिक पाळीच्या वेळी खूप त्रास होतो. असह्य होऊन मी डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरने अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अल्ट्रासाउंड करून घेतलं, तेव्हा डॉक्टरने एक गाठ असल्याचं सांगितलं. हा रिपोर्ट पाहून डॉक्टरने मला तीन महिने औषध घ्यायला सांगितलं. आता मी बरी आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की लग्नानंतर मला आई बनण्यात अडथळा येईल. याचा अर्थ काय? मी पुन्हा अल्ट्रासाउंड करवून घ्यावं का? डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मी चिंतेत आहे. मी काय करू?

उत्तर : तुमच्या प्रश्नामध्ये हे स्पष्ट केलेलं नाही की पाळीदरम्यान तुम्हाला नक्की काय त्रास होतो. तुमची पाळी उशिराने येते आणि कमी रक्तस्राव होतो की यावेळी तुम्हाला पेल्विकमध्ये वेदना होतात की तुम्हाला आणखी काही त्रास होतो? तुम्ही पेल्विक अल्ट्रासाउंडमध्ये ज्या गाठीचा उल्लेख केला ती विविध प्रकारची असू शकते. तिचा संबंध विविध रोगांशी असू शकतो.

तुम्ही तुमच्या समस्येबाबत सविस्तर लिहिलंत आणि तुमचा पेल्विक अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाठवला तर बरं होईल, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं गांभीर्य समजून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकू.

तिसऱ्यांदा अल्ट्रासाउंड करायचं की नाही याचा निर्णयही आजाराची माहिती मिळाल्यानंतरच घेता येईल. अल्ट्रासाउंडसारखी कोणतीही तपासाणी करण्यामागचा उद्देश एकच असतो की डॉक्टरला आजाराचं योग्य निदान करता येईल आणि उपचार सुरू होतील.

प्रश्न : माझ्या मुलीचं वय ११ वर्षे आहे. काही महिन्यांपासून तिची छाती भरू लागली आहे. मी तिला जेव्हा अंघोळ घालते, तेव्हा ती शरीराच्या त्या भागाला हात लावू देत नाही. तिथे वेदना होतात असं ती सांगते. हे नॉर्मल आहे की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. इतक्या लहान वयात स्तनांचा विकास व्हायला सुरूवात होणं योग्य आहे का?

उत्तर : बऱ्याचदा मुली वयात येण्याचं वय हे ८ ते १३ वर्षे असतं. शरीरात सेक्स हार्मोन्स बनायला सुरूवात झाली की हळूहळू नारीत्त्वाच्या शारीरिक खुणा प्रकट होऊ लागतात. स्तनांचा आकार वाढतो. कामेंद्रियांचा विकास होतो. काखेत आणि नाभीच्या खाली केस उगवू लागतात. अंतर्गत जननांग म्हणजेच गर्भाशयाच्या आकारात वाढ होते, तसेच क्रियात्मक दृष्टीनेही परिवर्तन येऊ लागते. मुलगी रजस्वला होते.

प्रजनन इंद्रियांमध्ये प्रौढत्त्व येण्याचा एक क्रम असतो. बऱ्याचदा मुलींमध्ये या परिवर्तनाचे पहिले लक्षण स्तन विकासाच्या रूपात दिसून येते. ८ ते १३ वयात सुरू झालेली स्तन विकासाची प्रक्रिया ५ टप्प्यांमध्ये पूर्ण होते. सर्वात आधी स्तनाग्र म्हणजे निपल आणि त्याच्या भोवतीचे गुलाबी वर्तुळ एरिओलामध्ये रक्तप्रवाह वाढतो. मग ते वर्तुळ वाढते आणि स्तनकळी दिसू लागते. पुढच्या टप्प्यात दोघांचाही आकार वाढतो. चौथ्या टप्प्यात स्तनाग्र आणि त्याच्या भोवतीचे वर्तुळ विकसित होऊन स्तनापासून वर येते. शेवटच्या टप्प्यात स्तनाचा आकार वाढतो. यामुळे स्तनाग्राच्या भोवतीचे वर्तुळ पुन्हा स्तनावर उठून दिसते आणि फक्त स्तनाग्र पुढच्या बाजूला वर येते.

जेव्हा स्तनकळी विकसित होत असते, तेव्हा शरीराच्या या भागाला स्पर्श केल्यास वेदना होणे साहजिक आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. पण ही अतिरिक्त संवेदनशीलता टाळण्यासाठी तुम्ही मुलीला स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला देऊ शकता.

प्रश्न : माझं वय २० वर्षं आहे. मला कायम अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत असतो. मी काही दिवस डॉक्टरचे उपचारही घेतले. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या सांगण्यावरून घरगुती उपायही करून पाहिले. पण काहीच फरक पडला नाही. काहीतरी उपाय सांगा.

उत्तर : अॅसिडिटी आणि गॅसचा संबंध तुमच्या जीवनशैलीशी आहे. आपण काय खातो, कसं खातो, किती तणावाखाली राहतो, कसे कपडे घालतो, आपला दिनक्रम कसा असतो अशा सगळयाचा आरोग्यावर परिणाम होतो. खाण्याच्या बाबतीत थोडीफार पथ्य पाळा, टेबल मॅनर्सवर लक्ष द्या. दिनक्रमामध्ये छोटे-छोटे बदल घडवून आणा.

तेलकट पदार्थ आणि अधिक चरबीयुक्त पदार्थांमुळे असिडिटी होते. टॉमेटो, कांदा, लाल मिरची, काळी मिरची, संत्रे, मोसंबी, चॉकलेट इत्यादींपासून दूर राहा. याचप्रकारे काही फळभाज्या आणि फळे यांमुळेही गॅस होतो. शेंगा, फ्लॉवर, मुळा, कांदा, कोबी यांसारख्या भाज्या आणि सफरचंद, केळं आणि जर्दाळू यांमुळेही पोटात गॅस होतो. प्रथिने बाधक ठरतात. सिझलर्ससारख्या गरम-गरम सर्व्ह होणाऱ्या पदार्थांमुळेही गॅस होतो. त्यामुळे असे पदार्थ टाळा. जेवताना काही टेबल मॅनर्स पाळणेही महत्त्वाचे आहे. जेवताना छोटे-छोटे घास घ्या. पचपच आवाज करत खाल्यामुळेही बरीचशी हवा आत जाते. पाणी किंवा इतर पेये पिताना घाई करू नका.

पूर्ण दिवस एकाच जागी बसून राहण्यापेक्षा थोडया-थोडया वेळाने फेऱ्या मारणं आतडयांसाठी चांगलं असतं. ताणावर नियंत्रण असणंही आवश्यक आहे. व्यायाम, हास्य इत्यादींमुळे ताणातून मुक्ती मिळते.

ओव्हर द काउंटर औषधांमध्ये एन्टासिड किंवा गोळया उदा. डायजिन, म्युकेन, जेल्यूसिल आणि आम्लरोधी औषधं उदा. रेनिटिडिन, पँटोप्राजोल, लँसोप्राजोल आणि ओमेप्राजोल यामुळे आराम मिळू शकतो. यामुळे बरं वाटलं नाही तर एखाद्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

आरोग्य परामर्श

* पद्मश्री प्रोफेसर डॉ. महेश वर्मा, डायरेक्टर व प्रिंसिपल, मौलाना आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस

प्रश्न : दातांमधील संवेदनशीलतेचे तात्पर्य काय आहे?

उत्तर : जेव्हा थंड किंवा गरम पेय अथवा खाद्यपदार्थांद्वारे दातांमध्ये वेदना किंवा बेचैनी जाणवते, तेव्हा त्याला दंत संवेदनशीलता म्हणतात. दातांच्या वरील थर (इनॅमल) हटल्यामुळे आतील थर ‘डँटीन’ तोंडाच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यातील नसांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.

प्रश्न : दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या सामान्यपणे आढळते का?

उत्तर : हो, ही समस्या खूप सामान्य आहे. सामान्यपणे २०-५० वयोगटांतील लोकांमध्ये ही समस्या असते.

प्रश्न : संवेदनशीलता किती प्रकारची असते?

उत्तर : हिरड्यांच्या समस्येमुळे संवेदनशीलता.

* दात झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दात हिरड्यांच्या ठिकाणी झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दातांना कीड लागल्यामुळे संवेदनशीलता.

* आम्लामुळे होणारी संवेदनशीलता.

* दंतप्रक्रियेनंतर होणारी संवेदनशीलता.

प्रश्न : संवेदनशीलतेमागे काय कारणे आहेत?

उत्तर : जर तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केली नाही, तर प्लाक एकत्र झाल्याने दातांच्या वरील थर (इनॅमल) हटतो व दातांमध्ये संवेदनशीलता सुरू होऊ लागते.

* वयाबरोबर हिरड्या दातांना सोडू लागतात. विशेषत:  जर स्वच्छता ठेवली नाही. यामुळेही संवेदनशीलता निर्माण होते.

* कडक ब्रशच्या वापराने व वेगाने मागे-पुढे ब्रश केल्यानेही दात झिजतात व संवेदनशीलता जाणवते.

* अनेक लोकांना रात्रीचे ब्रश करायची सवय असते. त्यामुळे दातांच्या वरचा थर हटतो व संवेदनशीलता सुरू होते.

* दातांना कीड लागल्याने बॅक्टेरिया इनॅमलला नष्ट करतात, त्यामुळे दात संवेदनशील होतात.

* दातांना जर मार लागला, तर त्याचा परिणाम आतील थरांवर होऊ शकतो व संवेदनशीलता उत्पन्न होऊ शकते.

* माउथवॉश, ज्यात आम्लता असते, त्याचा वापर इनॅमलच्या थराला हटवतो व संवेदनशीलता निर्माण होते.

* आम्लयुक्त खाद्यपदार्थांमुळेही इनॅमलच्या थराला नुकसान पोहोचते व संवेदनशीलता निर्माण होते.

* काही दंत प्रक्रियेनंतरही संवेदनशीलता निर्माण होते. उदा. दातांची सफाई, क्राउन लावल्यानंतर, दात भरून घेतल्यानंतर इ. काही आठवड्यानंतर ही संवेदनशीलता बरी होते.

प्रश्न : दंत संवेदनशील झाल्यावर कोणते उपचार केले पाहिजेत?

उत्तर : जर दातांवर कॅलकुलस किंवा टार्टर जमा असेल, तर मशीनद्वारे ते काढलं जातं. त्याबरोबरच संवेदनशीलतेसाठी टूथपेस्ट, जिला डिसेंसिटायजिंग टूथपेस्ट म्हणतात व माउथवॉशचा उपयोगही लाभदायक ठरतो.

* फ्लोराइड वार्निश इनॅमल व डेंटीनला मजबुती देतो व संवेदनशील दातांच्या वेदना व बेचैनीला कमी करतो.

* ज्या हिरड्या दात सोडत आहेत, त्यांच्यासाठी मुळांवर बाँडिंग एजेंट लावल्याने खूप प्रभाव पडतो. तोंडाच्या दुसऱ्या एखाद्या भागातून हिरडी घेऊन ग्राफ्टिंगही करू शकता.

* दातांना कीड लागल्याने संवेदनशीलता कमी होण्यासाठी त्यात योग्य मसाला भरू शकता. जर कीड आतपर्यंत लागली असेल, तर रूट कॅनलचा उपचार करून क्राउन लावता येईल.

* दातांच्या झिजण्याच्या सवयीसाठी माउथ गार्डद्वारे उपचार केले जातात, जेणेकरून दातांचे अजून पुढे नुकसान होऊ नये.

* दातांना मार लागल्यानंतर क्षतीनुसार उपचार केले जातात. मसाला भरणे किंवा रूट कॅनलचा उपचार व क्राउन लावला जातो.

प्रश्न : दातांच्या संवेदनशीलतेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे?

उत्तर :  तोंडाची स्वच्छता चांगल्याप्रकारे केली पाहिजे. दिवसातून २ वेळा ब्रश करण्यासोबतच माउथवॉशचा वापर करणेही चांगले असते.

* मऊ केसांच्या ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश करण्याची योग्य पध्दत स्विकारली पाहिजे.

* फ्लोराइडयुक्त माउथवॉश, ज्यात आम्ल नसेल, त्याचा वापर केला पाहिजे.

* ज्या खाद्यपदार्थांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असेल, त्यापासून दूर राहिले पाहिजे.

* दंत विशेषज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून दातांना कीड लागलेली असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल किंवा अन्य कोणती समस्या असेल, ज्यामुळे संवेदनशीलता निर्माण होऊ शकते, त्यावर सुरुवातीलाच उपचार होईल, तर ते पुढे वाढणार नाही.

सौंदर्य समस्या

* इशिका तनेजा एअर ब्रश मेकअप एक्सपर्ट

  • मागील कित्येक वर्षांपासून सतत नेलपेण्ट लावल्यामुळे माझ्या नखांवर पिवळेपणा आला आहे. नखं कमकुवत व तुटल्यासारखे दिसतात. कृपया यासाठी काय करावे लागेल ते सांगा?

नखे पिवळी दिसणं हे फक्त आरोग्यासाठी वाईट नाही तर ते दिसायलाही वाईट दिसते. ही समस्या सोडवण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवून नखांवर लावा व टूथब्रशने सॉफ्ट स्क्रब करा. नखांना अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

केसांसाठी योग्य शाम्पू कसा निवडावा?

हल्ली कंपन्या तऱ्हेतऱ्हेचे शाम्पू बनवत आहेत. शाम्पू निवडण्यासाठी तुमचे केस कशाप्रकारचे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच दिवशी व थंडीच्या मोसमात दोन दिवसांनंतर चिकट होऊ लागले आणि धुण्याची गरज वाटत असेल तर तुमचे केस ऑयली आहेत.

जर उन्हाळी दिवसांत २ दिवसांनंतर आणि थंडीच्या दिवसांत ३ दिवसांनंतर धुण्याची गरज वाटली तर तुमचे केस सामान्य आहेत. जर उन्हाळी दिवसांत ३ दिवसांपर्यंत आणि थंडीच्या दिवसांत ४ दिवसांपर्यंत केस धुण्याची गरज पडली नाही तर तुमचे केस कोरडे आहेत.

शुष्क केसांसाठी नेहमी मिल्की म्हणजे कंडीशनर युक्त शॉम्पू वापरा. खूप शुष्क व द्विमुखी केसांना क्रिमी शाम्पूबरोबर एक्स्ट्रा कंडिशनरचा पण वापर करा. ऑयली केसांना जास्त करून डीप क्लीन शाम्पूचा वापर योग्य असतो.

  • मी वॉर्म आणि कूल टोनबद्दल खूप वाचले आहे. कसे समजून घेऊ की माझा टोन वॉर्म आहे की कूल? घरी स्वत:च हे जाणून घेणे शक्य आहे का? त्याची काही पद्धत आहे का?

आपली नॅचुरल स्कीनटोन ४ रंगांमध्ये असते. यलो, पिंक, ऑलिव्ह किंवा पीच कलर. यामध्ये २ टोन वॉर्म व २ टोन कूल असतात. भारतीय त्वचा साधारणत: वॉर्म टोनमध्ये असते.

आपली स्कीनटोन वॉर्म आहे की कूल हे आपण घरीसुद्धा माहीत करून घेऊ शकतो. यासाठी उन्हात जाऊन आपले केस वर बांधावेत. मग स्वत:वर गोल्डन किंवा सिल्व्हर कापड ठेवून पाहा. असे केल्याने जर तुम्हाला गोल्ड कलर शोभून दिसत असेल तर तुमची स्कीन टोन वॉर्म आहे. सिल्व्हर कलर सूट होत असेल तर स्कीनटोन कूल आहे.

हिना डाय बनवण्याची चांगली पद्धत सांगा?

हिना एक नैसर्गिक डाय आहे. जिच्या योग्य आणि सततच्या वापराने केसांना उत्तम रंग मिळतो. रात्री २ चमचे चहा पावडर, २ ग्लास पाण्यात घालून उकळून घ्या.

पाणी अर्धे राहील तेव्हा गाळून घ्या. लोखंडी कढईत २ कप मेंदी, अर्धा कर आवळा पावडर, अर्धा कप शिकेकाई पावडर, २ चमचे कॉफी पावडर व अर्धा चमचा कात घालून चहा पावडरच्या पाण्याने पेस्ट बनवून घ्या. सकाळी यात अंडे व मध घालून व्यवस्थित मिसळून घ्या व केसांना लावा. २-३ तासानंतर केस धुऊन घ्या. मग सुकल्यावर केसांना तेल लावा. दुसऱ्यादिवशी शाम्पू लावा. केसांना सुंदर रंग येईल व केस चमकदार होतील.

  • मी १८ वर्षांची आहे. माझ्या शरीरावर अनेत ठिकाणी पांढरे डाग आहेत. मला कायमस्वरूपी पद्धतींबद्दल माहिती हवी आहे व हे कुठे करता येऊ शकते? खर्च किती येईल याबद्दलही सांगा?

सफेद डाग लपवण्यासाठी परमनंट कलरिंग पद्धती उपलब्ध आहे. ही फायदेशीर आहे. यामध्ये सर्वात आधी एखादा पांढरा डाग निवडून त्यावर टेस्ट केली जाते. जर त्वचेच्या रंगाने तो रंग स्विकारला तर २-३ महिन्यांनी त्वचेशी मिळता जुळता रंग त्वचेच्या डर्मिस लेयरपर्यंत पोहोचवला जातो. ज्यामुळे डाग दिसत नाहीत.

परमनंट कलरिंगचा परिणाम २ चे १५ वर्षांपर्यंत राहू शकतो. ही सुविधा तुम्हाला प्रसिद्ध कॉस्मेटिक क्लीनिकमध्ये मिळू शकते. याचा खर्च ५ हजार रुपयांपासून सुरू होतो. जो प्रत्येकी इंच स्वेअरच्या हिशेबाने असतो.

  • माझी त्वचा खूपच काळवंडली आहे. मुलतानी मातीनेही फायदा होत नाही. काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लीनिकमधून प्रूट बायोपील करवून घेऊ शकता. या फेशिअलमध्ये इतर फळांव्यतिरिक्त पपईच्या एंजाइम्सचा पण वापर केला जातो. जो स्कीन कलर लाईट करतो. या फेशिअलमुळे टॅनिंग तर दूर होतेच. पण त्वचेची खोलवर स्वच्छता होते. बरोबरीनेच उन्हात बाहेर पडताना चेहरा, हात, पाय, पाठ व इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन जरूर लावा.

घरी टॅन रिमूव्ह करण्यासाठी चोकरमध्ये दही, थोडा अननसाचा रस आणि थोडी साखर मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि उजळ राहते.

आरोग्य परामर्श

* डॉ. शोभा गुप्ता, मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर, आयव्हीएफ तज्ज्ञ

प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. माझं वजन ५५ किलो आहे. मी एंडोमिट्रीयममध्ये तापमानांसंबंधित पीसीआर तपासणी केली आहे. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आहे. मी गेल्या ३ महिन्यांपासून रह्यूमेटोइड घेत आहे. गेल्या महिन्यात माझं आयव्हीएफ अयशस्वी झालं होतं. आणखी एक आयव्हीएफ होऊ शकतं का आणि माझ्या पतीने मायकोबॅक्टीरियम तपासणी करावी का?

उत्तर : तुमचं वय वाढत आहे. ३५ व्या वर्षांनंतर महिलांमध्ये अंडाशयाची गुणवत्ता खालावत जाते. शिवाय तुमची पीसीआर तपासणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तुम्ही आयव्हीएफची पुढची तपासणी करून घेऊ शकता. पण हिस्टेरोस्कोपीच्या मदतीने गर्भाशयाचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आयव्हीएफ अयशस्वी होण्याचे कारण एएमएचं मूल्य आणि इंट्रालिपिड इन्फ्यूजनच्या मदतीने प्रत्यारोपणाच्या सुधारणेतील यशाच्या दरात वाढ होत आहे की नाही हे जाणून घेणं आवश्यक आहे. पतीमध्ये तापाची लक्षणं असतील तर त्यांचीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. लग्नाला २ वर्षं झाली आहेत. लग्नानंतर मी गर्भधारण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी लग्नाआधी गर्भपात करून घेतला होता. त्यानंतर माझी पाळी अनियमित झाली आहे आणि पाळीमध्ये रक्तस्त्रावही कमी होतो. मी काय करू सांगा?

उत्तर : पाळीदरम्यान रक्तस्त्राव कमी होण्याची बरीच कारणं असू शकतात. कारण जाणून घेण्यासाठी प्राथमिक परीक्षण म्हणून तुमच्या पॅल्विकचं अल्ट्रासाउंड केलं पाहिजे. यात तुमच्या गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या रूंदीचं माप घेतलं जाईल. हार्मोन्सचीही तपासणी होईल. त्यानंतर अश्रमैंस सिंड्रोमची माहिती करून घेण्यासाठी हिस्टोरोस्कोपी चाचणी महत्त्वाची आहे. याशिवाय जननेंद्रियाच्या तापमानाची तपासणी करण्यासाठी त्याची बायोप्सी करून तपासणीसाठी पाठवण्यात येईल. कारण पाळीच्यावेळी रक्तस्त्राव कमी होण्याचं हे सामान्य कारण आहे.

प्रश्न : माझं वय २९ वर्षं आहे. मला सतत व्हजायनल इन्फेक्शन होत असतं. कृपया यावर उपाय सांगा?

उत्तर : व्हजायनल इन्फेक्शनची बरीच कारणं असू शकतात. इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही तपासणीच्या रिपोर्टचा उल्लेख केलेला नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही समस्या कायम जाणवते. तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामध्ये तुमच्या समस्येमागचं खरं कारण समजू शकेल.

प्रश्न : माझं वय ३२ वर्षं आहे. माझी पाळी अनियमित आहे. गोळ्या घेतल्यावरच पाळी येते. माझी मुलगी ५ वर्षांची आहे. ती ऑपरेशनने झाली होती. मला दुसरं मुल हवं आहे. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर : औषध घेतल्याशिवाय तुम्हाला पाळी येत नसेल तर तुम्ही तपासणी करून घ्या. यासाठी तुम्ही स्त्रीराग तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. त्या तुम्हाला अल्ट्रासाउंडसह इतर तपासण्या करायला सांगतील. यामुळे तुम्हाला खरं कारण समजू शकेल. पाच वर्षांपूर्वी ऑपरेशनने मुलगी झाली होती. म्हणजे दुसरं मूलही ऑपरेशनने होईल असं काही नाही. पण गरोदर राहण्याआधी तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. आणखी २ वर्षं तरी लग्न करण्याची माझी इच्छा नाही. जास्त वयामुळे आई बनताना काही अडथळे येणार नाहीत ना?

उत्तर : उशिरा लग्न झाल्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. तुम्हाला इतक्यात लग्न करायचं नसेल तर तुम्ही थांबू शकता. पण गर्भधारणा करण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असेल. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेतलात तर तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल.

प्रश्न : मी १९ वर्षांची आणि अविवाहित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझी पाळी आलेली नाही. याआधीही असं झालं होतं की मला ४ महिने पाळी आली नव्हती. त्यावेळी मला स्त्रीरोग तज्ज्ञांने प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन घ्यायला सांगितलं. त्यानंतर माझी पाळी नियमित सुरू झाली. नुकतीच मी एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. त्यांनी मला सोनोग्राफी करण्यास सांगितली. त्यात कळलं की माझ्या युटरसचा आकार लहान आहे. अनियमित पाळीचं हेच कारण सांगितलं गेलं. कृपया यावर उपाय सांगा.

उत्तर : तुम्ही काळजी करू नका. सुरूवातीच्या १-२ वर्षांत पाळी अनियमित आणि कमी असू शकते. सामान्यत: त्यावेळी युटरसचा आकार छोटा असतो. तुम्ही सर्व रिपोर्ट्स सांभाळून ठेवा आणि एक थायरॉइड टेस्ट करून घ्या. रिपोर्ट नॉर्मल आले तर काळजी करू नका आणि थ्री डायमेन्शन अल्ट्रासाऊंड करून घ्या. यामुळे युटरसमधील समस्येची माहिती होईल. जर युटरस आणि पाळी सामान्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉन्ट्रासेप्टिव पिल्सचा वापर करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें