नोकरदार महिलांचा वाढता रूबाब

* गरिमा पंकज

देशात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने वाढत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर प्रथमच नोकऱ्यांमध्ये शहरातील महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त झाला आहे. जनगणना मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार शहरांमध्ये ५२.१ टक्के महिला आणि ४५.७ टक्के पुरुष नोकरदार आहेत. हो, ग्रामीण क्षेत्रात महिला नोकऱ्यांमध्ये अजूनदेखील पुरुषांच्या पाठीमागे आहेत. कुठे ना कुठे महिलांचे वाढते प्रोफेशनल आणि टेक्निकल शिक्षण तसेच लोकांचे बदलणारे विचार यांनी बदलाचे हे वारे वाहिले आहे. आता पुरुषदेखील महिलांना सहकार्य करीत आहेत. त्यांची मानसिकता महिलांना सपोर्टिव बनत चाललेली आहे.

घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये खुश

स्त्रिया आज फक्त गरजेसाठीच नव्हे तर आपल्या मनाच्या आनंदासाठीदेखील नोकरदार होणे पसंत करतात. ऑफिसच्या निमित्ताने त्या घरातील तणावापासून बाहेर निघू शकतात. आपली ओळख निर्माण करु शकतात. याचे एक कारण हेदेखील आहे की जेव्हा स्त्रियांना त्यांच्या जॉबमुळे समाधान मिळत नाही तेव्हा त्या आपल्या जॉब बदलतात. जिथे त्यांना चांगले वाटते तिथेच त्या जॉब करतात, परंतु पुरुष असे करत नाहीत. आपल्या जॉबवर समाधानी नसण्यावरदेखील ते त्याच कंपनीत काम करीत राहतात, ज्यामुळे ते ऑफिसमध्ये आनंदी राहू शकत नाहीत. याशिवाय पुरुषांमध्ये जास्त अधिकार प्राप्त करण्यासाठी स्पर्धादेखील चालत राहते. त्यांचा इगोदेखील खूप लवकर होतो.

वर्किंग वाइफ पसंत करतात पुरुष

इंटरेस्टिंग गोष्ट हि आहे कि जिथे लोक आधी लग्नासाठी कर्तव्यदक्ष, संस्कारी आणि घरगुती मुलगी पसंत करायचे तिथे आता या ट्रेण्डमध्ये बदल दिसून येतो आहे. आता पुरुष लग्नासाठी घरात बसलेली मुलगी नाही, तर वर्किंग वूमन पसंत करू लागले आहेत. आपल्या वर्किंग वाईफचा इतरांशी परिचय करून देताना त्यांना अभिमान वाटतो.

चला जाणून घेऊया की पुरुषांच्या या बदलत्या विचाराचे कारण :

पतीची परिस्थिती समजून घेते : जर पत्नी स्वत: नोकरदार आहे तर ती पतीच्या कामाशी निगडित प्रत्येक अडचण व्यवस्थित समजून घेते. ती वेळोवेळी ना पतीला घरी लवकर येण्यासाठी फोन करीत राहते आणि ना घरी परतल्यानंतर हजारो प्रश्न करते. अशाप्रकारे पती-पत्नीचे संबंध सुरळीत चालू राहतात. दोघेही शक्यतोवर एकमेकांची मदत करण्यासाठीदेखील तयार राहतात. हेच कारण आहे की पुरुष नोकरदार मुली शोधू लागले आहेत.

आपला खर्च स्वत: उचलू शकतात : ज्या महिला जॉब करीत नाहीत, त्या आपल्या खर्चासाठी पूर्णपणे पतीवर अवलंबून असतात. छोटयातल्या छोटया गोष्टीसाठीदेखील त्यांना त्यांचे पती आणि घरातील यांच्यासमोर हात पसरावे लागतात. दुसरीकडे वर्किंग वुमन तर वेळप्रसंगी कुटुंबाचीदेखील मदत करतात.

पॉझिटिव्ह असतात : नोकरदार महिलांवर झालेल्या एका रिसर्च नुसार बहुतेक वर्किंग वुमन या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतात. त्यांच्यात आत्मविश्वास आणि गोष्टी हँडल करण्याचा व्यवस्थित अनुभव असतो. त्यांना ठाऊक असते की कोणत्या अडचणीशी कशाप्रकारे दोन हात करायला हवेत. त्यामुळे त्या छोटया छोटया गोष्टींवर हायपर होत नाहीत आणि घाबरतदेखील नाहीत. त्यांना ठाऊक असते कि प्रयत्न केल्यानंतर त्या पुष्कळ पुढे जाऊ शकतात.

खर्च कमी बचत जास्त : आजच्या महागाईच्या काळात जर पती पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर जीवन सोपे होते. तुम्हाला कोणताही प्लॅन बनवतेवेळी जास्त विचार करावा लागत नाही. भविष्यासाठी बचतदेखील सहजतेने करू शकता. घर, वाहन किंवा अन्य कोणत्याही आणि गरजेसाठी लोन घ्यायचे असेल तरीदेखील दोघेही आरामात घेऊ शकतात आणि हप्तेदेखील मिळून भरू शकतात. परिस्थिती तर अशी आहे की आज महिला लोन घेण्यात आणि ते फेडण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत. त्या फक्त कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीने नाही तर आर्थिक दृष्टीनेदेखील घराची धुरा वाहतात.

लोन घेण्यात पुढे

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये कर्ज घेण्याच्या बाबतीत महिला अर्जदारांची संख्या वाढत आहे. म्हणू शकता, की स्त्रियांनी पुरुषांना पाठीमागे टाकले आहे.

रिपोर्टनुसार २०१५ ते २०१८ च्या दरम्यान कर्ज घेण्यासाठी यशस्वी महिला अर्जदारांच्या संख्येत ४८ टक्के वाढ झालेली आहे. याच्या तुलनेत यशस्वी पुरुष अर्जदारांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झालेली आहे. वास्तविक एकूण कस्टमर बेसच्या हिशोबाने अजूनदेखील कर्ज घेणाऱ्या पुरुषांची संख्या खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार जवळपास ५.६४ करोड एकूण लोन अकाऊंटमध्ये अजूनदेखील जास्त भाग गोल्ड लोनचा आहे. वास्तविक २०१८ मध्ये यात १३ टक्के कपात झाली आहे. यानंतर बिजनेस लोनचे स्थान आहे. कंजूमर लोन, पर्सनल लोन आणि टू व्हीलर लोनसाठी महिलांकडून मागणी प्रतिवर्षी वाढत चालली आहे. आज प्रत्येक चार कर्जदारांमध्ये एक महिला आहे. हे प्रमाण आणखीदेखील बदलेल. कारण कर्ज घेण्यायोग्य महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत चालली आहे. चांगले शिक्षण आणि श्रम बाजारात चांगल्या सहभागामुळे आता जास्तीत जास्त महिला आपले आर्थिक निर्णय स्वत: घेत आहेत.

का जिंवत आहे चेटकीण प्रथा

– गरिमा पंकज

१६ ऑक्टोबर २०१४. गुवाहाटी पासून १८० किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटेसे गाव कारबी एंगलाँग, जिथे मागील अनेक महिन्यांपासून होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे गूढ शोधण्याचा प्रयत्न सुरु होता. गावातील वृद्धांनी यामागे कोण्या चेटकिणीचा हात असल्याची संभावना व्यक्त केली आणि संभाव्य चेटकिणीचा तपास करण्यासाठी सर्व गावकऱ्यांची सभा घेण्यात आली.

मंत्रोच्चारणादरम्यान गर्दीतील एक वृद्ध महिला देबोजानी बोराकडे इशारा करत किंचाळली, ‘‘हीच ती चेटकीण आहे, हिला शिक्षा द्या.’’

त्या महिलेने हे म्हटल्याबरोबर सर्व गर्दी तिच्यावर तुटून पडली आणि तिला मासे पकडण्याच्या जाळीत बांधून बेदम मारण्यात आले. ती पूर्णपणे घायाळ झाली आणि तिला इस्पितळात घेऊन जावे लागले.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की ज्या देबोजानी बोरांनां चेटकीण म्हणून घोषित करण्यात आले, त्या सुवर्ण पदक विजेत्या आहेत. त्यांचा जन्म याच गावी झाला होता. त्या ५१ वर्षांच्या असून त्यांना ३ मुले आहेत. शेतात काम करण्यासह अॅथलिट आहेत. त्यांनी अनेक अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर आसामचे प्रतिनिधित्त्व केले. २०११ साली भारताला भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिले.

खेदाची बाब ही आहे की आज २१ व्या शतकात वावरताना विकासाच्या नव नव्या कसोटया पार केल्या जात आहेत. पण आजही आपल्या समाजामध्ये अनेक अशा प्रथा, परंपरा आहेत ज्या प्रतिगामी मानसिकतेचे आणि भेदभावपूर्ण व्यवहाराचे द्योतक आहेत. उदाहरणार्थ चेटकीण प्रथाच पाहा, ज्याने कित्येक निर्दोष महिलांचे जीवन नष्ट केलेले आहे.

चेटकीण प्रथा काय आहे

देशातील अनेक मागासलेल्या भागांमध्ये जादू-टोणा करणाऱ्या तांत्रिकांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही महिलेला चेटकीण ठरवता येते. अशा गोष्टी साधारणपणे तेव्हा होतात, जेव्हा गावातील मंडळी एखादा गंभीर आजार, कुटुंबावरील संकट, गावावर आलेले मोठे संकट इत्यादी समस्या सोडवण्यासाठी तांत्रिकांकडे पोहोचतात.

तांत्रिक आपल्या तंत्र-मंत्रांच्या शक्तीने संमोहीत करून कोण्या एका महिलेला दोषी ठरवून तिला चेटकीण म्हणून घोषित करतो, त्यावेळी सर्व गावकरी शिक्षा देण्यासाठी धावून जातात.

त्या महिलेला संपूर्ण गर्दीसमोर जबरदस्ती खेचून आणले जाते आणि तिला निर्वस्त्र करून मारण्यात येते, काही वेळा तिचे मंडण करण्यात येते, तिच्या तोंडाला काळे फासून संपूर्ण गावात तिची धिंड काढली जाते. सुरी किंवा एखाद्या धारदार अवजाराने तिच्यावर वार करण्यात येतात, तिला मलमूत्र पिण्यास सक्ती केली जाते. एवढे करूनही जर ती महिला जिवंत राहिली तर, तिला गावाबाहेर हाकलण्यात येते.

कारणे

अशिक्षितता : चेटकीण प्रथा अस्तित्वात असण्याचे प्रमुख कारण लोकांमधील अशिक्षितता आणि अंधश्रद्धेचे चक्रव्यूह होय.. अशाप्रकारच्या घटना मोठया प्रमाणात खेडेगावांमध्ये होत असतात. जेथे शिक्षणाचा आणि स्वच्छतेचा अभाव असतो.

संपत्तीवर अधिकार गाजवण्याची इच्छा : आदिवासी समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत जमिनीवर अधिक हक्क प्राप्त असतात. या संपत्तीवर प्राप्त करण्यासाठी त्या महिलेला चेटकीण म्हणून सिद्ध करण्याचा डाव आखतात. यासाठी विशिष्ट महिलांना लक्ष्य केले जाते. ज्यांचे पुढे-मागे कोणी नाही, एकल आहेत, स्वतंत्र काम करतात, विधवा, वृद्ध स्त्रिया आहेत इत्यादी.

तांत्रिकांचा स्वार्थ : जेव्हा जादू-टोणा करणारे तांत्रिक आजारी रुग्णांना बरे करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा ते स्वत:चा बचाव करण्यासाठी नवे उपाय शोधतात. आपली शक्ती दर्शवण्यासाठी ते गरीब आणि लाचार महिलांचा बळी घेतात.

राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या अहवालानुसार चेटकीण हत्येच्या नावाखाली वर्ष २००० ते २०१२ दरम्यान २०९७ लोकांचा मृत्यू झालेला आहे, ज्यातील ३६३ गुन्हे हे झारखंडमधील होते. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतातच नव्हे तर विदेशांतही असे प्रकार घडताना दिसतात. उदाहरणार्थ तंजानिया, दक्षिण आफ्रिका, नायजेरीया, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये अशा घटना घडताना दिसून येतात.

बिहारमध्ये राहणाऱ्या समाज सेविका संध्या सिन्हा सांगतात, ‘‘गावांमध्ये गरीब महिलांचे शोषण होते. कधी पैशांसाठी तर कधी तिच्या शरीरासाठी. बिहारमधील १-२ जिल्ह्यांना सोडले तर कुठेच महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देत नाहीत. मग त्या रात्रंदिवस शेतात कष्ट घेत असल्या तरीदेखील त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. आता समजा, एका व्यक्तीच्या ३ मुली आहेत, तर त्याची सर्व संपत्ती मुलींच्या नावेच होणार. मग जेव्हा गोष्ट योजनांचा लाभ घेण्याची येते, तेव्हा मात्र ही बाब अभिशाप बनते.

अनेकदा असंही होतं की घरातील एक सदस्य महिलेवर चुकीची नजर ठेवतो. जेव्हा महिला त्याचे म्हणणे स्वीकारत नाही, तेव्हा संधी मिळताच तो सदस्य महिलेला चेटकीण ठरवून आपला राग शांत करतो.

या भागातील प्रमुख व्यक्ती आणि भटजी हे दोन असे व्यक्ती असतात ज्यांचे म्हणणे संपूर्ण गाव ऐकते आणि त्याचे पालन करते. या दोहोंना पैसे देऊन स्वत:च्या बाजूने वळवणे कठीण काम नाही. केवळ यांना पैसे दिले की ते धर्म आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या आयुष्याची दुर्गती करायला ते काही क्षणांचाही विलंब लावत नाहीत.’’

सरकार फक्त या प्रकरणांवर कायद्याद्वारे अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, छत्तीसगडमधील जादूटोणा छळ प्रतिबंधक अधिनियम २००५, बिहारमध्ये प्रत्यक्ष जादूटोण्याचा वापर प्रतिबंधक कायदा १९९९ आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २००१, झारखंड, राजस्थान सरकारने एक कायद्यात्मक अधिनियम पुढे आणलेला आहे. याअंतर्गत एका महिलेला चेटकीण घोषित करून तिचा छळ, अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. अजूनतरी या कायद्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसलेले नाही, जे अपेक्षित आहे.

या अत्याचारी आणि अंधश्रद्धेच्या वातावरणात एक नवे नाव समोर आलेले आहे बीरूबाला राबा, ज्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि इतरांना यातून सुटण्याचा मार्ग दाखवला.

६२ वर्षीय बीरूबालांना खुद्द एक संस्था म्हटले जाऊ शकते. आसामच्या गोलपारा जिल्ह्यातील धाकुर विला गावात राहणाऱ्या महिलेने आपले जीवन या प्रथेच्या विरुद्ध लढण्यासाठी समर्पित केलेले आहे.

या लढ्यादरम्यान त्यांना अनेकदा हत्येच्या धमक्या आलेल्या आहेत. शारीरिक, मानसिक आघात करण्यात आले. पण या दृढनिश्चयी महिलेने आपली लढाई सोडली नाही. १९९९ मध्ये, ‘आसाम महिला समता संघटने’ने त्यांना समर्थन दिले.

चेटकीण प्रथेच्या व्यतिरिक्त बीरूबाला लोकांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मद्याचा वाईट प्रभाव इत्यादी गोष्टींवर जागरूकता करत आहेत.

४ जुलै २०१५ रोजी त्यांना १२ वे ‘उपेंद्र नाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आसाम सरकारचा ‘बेस्ट आंतरप्रेनॉर अवॉर्ड’देखील मिळवलेला आहे.

समाजसेविका संध्या सिन्हा (फाऊंडर मेंबर ऑफ वुमन पॉलिटीकल फोरम) यांचे म्हणणे आहे, ‘‘स्त्रियांचे सर्वात मोठे शत्रू त्यांची शांतता आहे. त्या स्वत: अत्याचाराचा विरोध करत नाहीत. दुसऱ्या कोणासोबत चुकीचे घडत असेल तरीदेखील त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाहीत. अयोग्य असेल त्याला अयोग्य म्हणण्याची हिंमत करत नाहीत. त्यांना सतत भीती वाटत असते की कोणाला साथ दिली तर मारण्यात येईल.

‘‘त्या संस्कारांच्या नावावर गप्प बसतात. त्यांना हे माहिती नाही की संस्कार आणि अंधश्रद्धेमध्ये फरक आहे. ज्या दिवशी स्त्रियांना हे समजेल, त्यावेळी त्यांची स्थिती सुधारेल. आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे बनवण्यात आलेले आहेत. आता फक्त जागृत होण्याची गरज आहे.’’

मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका

* प्रतिनिधी

मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, जर श्वेता तिवारी व्यस्त अभिनेत्री असेल आणि ती आपल्या ५ वर्षांच्या मुलाची काळजी स्वत: घेऊ शकत नसेल तर हे चुकीचे आहे. श्वेता तिवारीचा तिचे पती अभिनव कोहली याच्यासोबत मुलाच्या ताब्यावरून वाद सुरू आहे आणि दोघांमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. मुलगा सध्या श्वेता तिवारीसोबत राहत आहे आणि अभिनव त्याला भेटूही शकत नाही.

अभिनवचे म्हणणे होते की, त्याच्याजवळ मुलाला सांभाळण्याइतका भरपूर वेळ आहे. श्वेता मात्र तिच्या चित्रिकरणामध्ये कायम व्यस्त असते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि एन. जे. जामदार यांनी मुलाला आठवडयातून २ तासांसाठी भेटण्याची आणि ३० मिनिटांसाठी व्हिडीओ कॉल करण्याची मुभा अभिनव यांना दिली, पण त्यापेक्षा जास्त वेळ दिला नाही.

आई अनेकदा आपल्या पतीला त्रास देण्यासाठी मुलावर संपूर्ण अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती विविध प्रकारचे आरोप करून पतीचा पिता असल्याचा अधिकारही हिरावून घेऊ इच्छित असते. हीच अशा विवाहातील सर्वात मोठी शोकांतिका असते.

एकदा मूल झाल्यानंतर पित्याच्या मनात मुलासाठी एक स्वाभाविक आणि नैसर्गिक ओढ निर्माण होते. जगातील सर्व दु:ख विसरून, आपली सर्व संपत्ती देऊन त्याला फक्त मुलाची सोबत हवी असते. आईला मात्र त्या पित्याला त्रास दिल्याचे सुख मिळते. आई या नात्याने जिने ९ महिने मुलाला गर्भात वाढवले, त्याला आपले दूध पाजले, जिने रात्रभर जागून त्याचे लंगोट बदलले तिला मुलाचा संपूर्ण अधिकार स्वत:कडे हवा असतो आणि त्यासाठीच ती मुलाच्या पित्याला त्रास देते.

जिथे गोष्ट पैशांची येते तिथे थोडाफार मान ठेवला जातो, पण जिथे पत्नी चांगली कमावती असते तिथे पतीकडून मिळालेल्या पैशांच्या मोबदल्यात मुलासोबत राहण्याचा हक्क तिला गमवायचा नसतो. जेव्हा की, मूल त्या दोघांचेही असते.

पिता मोजकेच बोलतो, मोजकेच ऐकतो. आई सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही ऐकून घ्यायला तयार असते. आईच्या प्रेमात वात्सल्य दडलेले असते. याउलट पित्याचे प्रेम तार्किक, व्यावहारिक, थोडेसे रुक्ष वाटते. जरी आईने दुसरे लग्न केले असले आणि दुसऱ्या नवऱ्यापासून तिला मुले झाली असली तरीही पित्यासोबत राहणारी मुलेही सतत पळून आईकडेच धाव घेतात. मुलींना तर पित्याबाबत खूपच उशिरा ओढ निर्माण होते, तीही जेव्हा त्यांना एखाद्या संरक्षकाची गरज असते तेव्हाच ही ओढ जाणवते.

मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ल त्यांच्या दृष्टीने योग्य आहे की, नोकरी करणारी व्यस्त आईही आपल्या मुलाची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकते. तिच्याकडे पैसे असतील तर ती मुलाची सुरक्षा आणि त्याची देखभाल करणाऱ्यांची व्यवस्था करू शकते. जर पतीपत्नी सुसंवादाने संसार करत असतील आणि दोघेही नोकरीला जात असतील तर त्यांच्या मुलांना स्वयंपाकी आणि आयाच तर सांभाळतात. आजकाल मुलाची आजीही मग ती आईची आई असो किंवा वडिलांची आई असो, ती नातवंडाचा सांभाळ करायला नकार देते.

Diwali कविता: कसे उजळू मनाचे दीप

* अर्चना गौतम

सोडून मला एकाकी,

तू नेलास दिवाळीचा,

सर्व हर्षोल्हास,

हास्य अन् प्रकाश,

सजलेल्या दारी,

तोरणांचे दीप उजळती,

अंगणी जळे

रांगोळीतील पणती.

तुला करत नाही,

का घायाळ,

माझ्या विरहाचा जाळ.

तुळशीभोवती,

दीप उजळताना,

सतवत नाहीत का,

माझ्या स्मृती,

तुझ्या मना,

अंधकाराने वेढलेले,

माझे हृदय,

प्रकाशाविना आहे शापित,

सांग एकदा तरी,

कसे उजळू मनाचे दीप.

तंत्रज्ञान आणि धर्म

* प्रतिनिधी

सध्या तंत्रज्ञानाच्या चालू असलेल्या शिक्षणात खूप पैसा गुंतवला जात आहे आणि याचाच अर्थ असा आहे की 40-50 वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये सिमेंट-विटांनी बनवलेल्या शिक्षणाचा अर्थ आता हरवत चालला आहे. ज्याप्रमाणे नवीन तंत्रज्ञान कारखान्यांतील कामगारांना वाईट पद्धतीने काढून टाकत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या तरुणांचे भविष्य अधिक अंधकारमय होत आहे.

संगणकावर बसून उच्च शिक्षण घेणारेच आता देश आणि जगावर अधिराज्य गाजवतील, पण हे शिक्षण खूप महागडे आहे आणि सर्वसामान्य घरांना ते शक्य होणार नाही, हे बैजूसारख्या कंपन्यांमध्ये ज्या प्रकारचा पैसा खर्च होत आहे, त्यावरून स्पष्ट होते. परवडते.

यूएसमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की $3000 (सुमारे 18,00,000 लाख रुपये) कमावणाऱ्या 64 कुटुंबांकडे एक स्मार्ट फोन, एकापेक्षा जास्त संगणक वायफाय, ब्रॉडबँड कनेक्शन स्मार्ट टीव्ही आहे. तर $3000 च्या आतील फक्त 16′ कुटुंबांकडे या सुविधा आहेत. याचा अर्थ गरीब पालकांची मुले गरिबीत राहण्यास भाग पडतील कारण ते महागड्या शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत आणि महागड्या वस्तू विकत घेऊ शकणार नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना कमी तंत्रज्ञान माहित आहे त्यांच्या पगारात गेल्या काही वर्षात 2-3′ वाढ झाली आहे, तर उच्च तंत्रज्ञान जाणणार्‍यांच्या पगारात 20-25′ वाढ झाली आहे.

भारतात ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे कारण इथे भेदभाव हा जन्म आणि जात यांच्याशीही जोडला जातो. कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ज्याप्रकारे पूर्ण दिवस जाहिराती घेतल्या जातात, त्यावरून तंत्रज्ञानाचे शिक्षण कुठे जाईल, हे कळत नसून अतांत्रिक शिक्षणालाही महत्त्व आल्याचे स्पष्ट होते.

तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा मोठा परिणाम महिलांच्या शिक्षणावर होत आहे. त्यांना उच्च पदे मिळणे कठीण जात आहे. कारण शिक्षणाचा सगळा खर्च मुलांवर होत आहे, जो अधिक झाला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतातील फक्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये, जिथे तंत्रज्ञानाचा नियम नाही, तिथे फक्त 7′ प्रमुख पदे महिलांकडे आहेत आणि यापैकी जास्त पदे अशा संस्थांमध्ये आहेत जिथे फक्त मुलीच शिकत आहेत.

तंत्रज्ञान केवळ गरीब आणि श्रीमंतांमधील भेदच वाढवत नाही, तर ते श्रीमंतांमधील लैंगिक अंतरदेखील वाढवत आहे. तंत्रज्ञानाने समाज आणि जगाला वाचवायचे आहे, परंतु ते सर्व शक्ती काही वाईट लोकांच्या हातात टाकत आहे. श्रीमंत घरातील मुलं महागडं शिक्षण करून उच्च कमावतील आणि त्यांना हव्या त्या मुलीशी लग्न करतील, पण त्या मुलीवरही ते त्यांच्या मनाप्रमाणे राज्य करतील. घर, कपडे, सुटी, गाडी या लोभापायी बायकांची अवस्था दागिन्यांनी लादलेल्या राजांच्या राण्यांसारखी होईल पण राजाच्या डोळ्यात फक्त सुखाच्या बाहुल्या असतील.

या समस्येचे निराकरण करणे सोपे नाही आणि धर्मामुळे, मुली त्यांच्या नशिबावर अवलंबून असलेल्या या परिस्थितीत भारतात किंवा जगात कोठेही लढू शकणार नाहीत. ती टेक्नो स्लेव्ह राहिल आणि टेक्नो स्लेव्ह्सना काम करायला मिळाल्याबद्दल तिला अभिमान वाटेल.

ऑनलाइन शिक्षणामुळे कॉलेजचा अर्थ बदलेल

* सीमा ठाकूर

नॉव्हेल कोरोना व्हायरसमुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ वर्ग ऑनलाइनच झाले नाहीत तर आता जवळपास ६ महिन्यांचे सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याचाही विचार विद्यापीठे करत आहेत. आयआयएम तिरुचिरापल्लीचे संचालक भीमराया मैत्री म्हणतात की त्यांची संस्था त्यांच्या कार्यरत अधिकाऱ्यांना ऑनलाइन मोडमध्ये कार्यकारी एमबीए प्रोग्राम ऑफर करेल आणि नियमित एमबीए अभ्यासक्रमांसाठीही अशीच योजना तयार केली जात आहे. “आम्ही ऑनलाइन परीक्षाही घेत आहोत, विद्यार्थी घरी बसून परीक्षा देऊ शकतात. आम्ही विद्यार्थ्यांसाठी ईपुस्तकेही तयार करत आहोत,” मैत्री म्हणाली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच घोषणा केली आहे की देशातील 100 हून अधिक विद्यापीठे त्यांच्या वार्षिक परीक्षा आणि नियमित वर्ग ऑनलाइन पद्धतीने आयोजित करतील. दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत मुख्य सर्व्हर काम करत नव्हता, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. अशीच समस्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मॉक टेस्ट देतानाही आली. ऑनलाइन परीक्षेचा हाच अर्थ असेल तर निश्चितच नवीन समस्या निर्माण करण्यासारखे आहे, त्या सोडवण्यासारखे नाही.

जर आपण दिल्ली युनिव्हर्सिटीबद्दल बोललो तर एका वर्गात 70 ते 110 मुले असतात, ज्यांना विषयानुसार विभाग केले तर एका वर्गात सुमारे 60 मुले असतात. या 60 मुलांना वर्गात एकत्र अभ्यास करणे सहसा कठीण असते. मग तुम्ही ते ऑनलाइन कसे वाचता? प्रत्येक तरुण महाविद्यालयात शिकण्यासाठी जात नाही, तर अभ्यासासोबतच आपल्या आवडीच्या गोष्टी शिकून पुढे जातील या आशेने तिथे जातो यात शंका नाही. त्यांची ही इच्छा ऑनलाइन शिक्षण पूर्ण करू शकेल का?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या मते, देशातील पदवीधर तरुणांचा बेरोजगारीचा दर 2017 मध्ये 12.1 वरून 2018 मध्ये 13.2 टक्क्यांवर गेला आहे. यापैकी सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण पदवीधर तरुणांचे आहे कारण निरक्षर किंवा 5 वी आणि 10 वी उत्तीर्ण तरुण बेलदरी, रिक्षाचालक, डिलिव्हरी बॉय किंवा कारखान्यांमध्ये नोकरी करत आहेत. पदवीधर तरुणांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेनुसार नोकऱ्या करायच्या आहेत, म्हणून ते त्यापेक्षा कमी करत नाहीत. नोकरी करणारे बहुतांश पदवीधर तरुण त्यांच्या आवडीची नोकरी करत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भारत आपल्या पदवीधर तरुणांसाठी त्यांच्या साक्षरतेनुसार रोजगार निर्माण करू शकत नाही. अशा स्थितीत या ऑनलाइन शिक्षणामुळे आकडेवारीत सुधारणा होणार की बेरोजगारीचे प्रमाण आणखी वाढणार, ही चिंतेची बाब आहे.

वाढ आणि विकास प्रतिबंध

शिकणे किंवा शिकणे हे संसाधन आणि वातावरणावर अवलंबून असते. आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की मुख्यतः 4 घटक आहेत जे मुलाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतात, ते आहेत – वारसा, पर्यावरण, पोषण आणि भिन्नता. यातील मुख्य स्थान वातावरण आहे. प्रत्येक तरुणाच्या घरी अभ्यासाचे वातावरण नसते हे अशा प्रकारे समजू शकते. प्रत्येकाच्या घरात अभ्यासासाठी योग्य जागाही नाही. ऑनलाइन अभ्यास करताना, त्याला गोंगाटापासून दूर अभ्यास करायला मिळेल पण त्यानंतर काय? ना त्याच्याकडे वाचनालय असेल जिथून त्याला हवे ते पुस्तक वाचता येईल, ना तिथे कोणी एकत्र बसून वाचून समजावून सांगेल, ना कुठल्या प्रकारची चर्चा होईल, ना शिक्षकांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मागवले जाईल.

वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक तरुण शिक्षणाच्या उद्देशाने महाविद्यालयात जात नाही. कुणाला नृत्यात, कुणाला गायनात, कुणाला नाटकात तर कुणाला लेखनात रस आहे. प्रत्येक महाविद्यालयात 9-10 अभ्यासेतर उपक्रम संस्था आहेत आणि प्रत्येक वर्गाचा स्वतःचा विभाग आहे. या समाजात तरुणाई त्यांच्या छंद आणि क्षमतेनुसार पुढे जाते. यामध्ये ते त्यांची खरी प्रतिभा दाखवू शकतात, ते परफॉर्म करतात. अनेक तरुणांसाठी त्यांचे महाविद्यालयीन जीवन म्हणजे समाज. ते त्यांच्या छंदालाच करिअर बनवतात. या सोसायट्यांच्या ऑडिशन्स नवीन सेमिस्टर सुरू झाल्याच्या पहिल्या 2 महिन्यांत घेतल्या जात होत्या, ज्या ऑनलाइन अभ्यासात घेतल्या जाणार नाहीत. आणि जरी ते असले तरी त्यांना विशेषत: नृत्य किंवा नाट्यसंस्थांसाठी काही अर्थ नाही.

मध्यम आणि निम्नवर्गीय कुटुंबातील अनेक मुलं कॉलेजमध्ये स्वतःला पूर्णपणे बदलून टाकतात. नव्याने उघडलेल्या वातावरणात ते स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार करतात. अभ्यासात हुशार असल्यामुळे किंवा त्यांच्या कौशल्यामुळे त्यांचा कौटुंबिक दर्जा त्यांच्या मार्गाचा काटा बनत नाही. ते स्वतःची ओळख बनवतात, त्या जोरावर त्यांना नोकरी मिळते. नोकरी ही एखाद्या व्यक्तीच्या पदवी तसेच महाविद्यालयीन वातावरणातून मिळालेला आत्मविश्वास आणि क्षमता यातून प्राप्त होते हे आपल्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. यामुळेच दूरस्थ शिक्षण आणि नियमित शिकणारे विद्यार्थी एकमेकांपासून वेगळे झाले. पण, ऑनलाइन शिक्षणाने ते शक्य आहे का, ते शक्य नाही.

पुस्तकी शब्द म्हणून मैत्री राहील

जर मी माझ्या जिवलग मित्राबद्दल बोललो, तर तो मला कॉलेजच्या दुसऱ्या दिवशी भेटला होता. माझ्या कॉलेजच्या पहिल्या महिन्यात माझे जवळपास सर्व मित्र मला भेटले. एकत्र बंक क्लास, कॅन्टीनमध्ये गप्पागोष्टी करा, चित्रपटाला जा, वर्गात जे समजले नाही त्याबद्दल चर्चा करण्यासाठी बसा, तुमच्या जिवलग मित्रासोबत लायब्ररीत बोला, फेस्टमध्ये डान्स करा, हिवाळ्यातील सूर्य ग्राउंडमध्ये खा आणि वाटी करा. तू जा, राग दाखव. कॉलेजमध्‍ये किती काही घडते, जे मैत्री घट्ट करते.

कॉलेजचे पहिले दोन महिने कधी वर्गात आलेल्या नवीन विद्यार्थ्यांशी तर कधी इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी मैत्री करण्यात घालवतात. कॉलेजची एक खासियत म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या वरिष्ठांशीही मैत्री करता. ज्येष्ठांचे वैशिष्टय़ म्हणजे ते केवळ त्यांचे अनुभवच सांगत नाहीत तर ते मार्गदर्शनही करतात जे खूप उपयुक्त आणि खूप काही शिकवून जाते.

आता तुम्हाला ऑनलाइन क्लासेसमध्ये कोणाशीही मैत्री करण्याची संधी मिळणार नाही. ग्रुप बनवला तरी सगळ्यांना मेसेज करता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी बोलण्यात स्वारस्य देखील तेव्हा येते जेव्हा आपल्याला माहित असते की ती व्यक्ती खरोखर काय आहे. असो, चेहऱ्यावर कोणाचा चेहरा लिहिला जात नाही. प्रत्येकाला ऑनलाइन बोलण्यात रस नाही. काही विद्यार्थी कॉलेजमध्येही इतके शांत असतात की त्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या बहिर्मुख मित्रांवर अवलंबून असते.

हे सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये होणार नाही. ते त्यांच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर अभ्यास करतील आणि वर्ग संपल्यानंतर ते त्यांचे इतर काम सुरू ठेवतील. एक-दोन वर्गमैत्रिणींशी बोलूनही मग ती मैत्री टिकवायची नाही तर काम भागवायची.

यापुढे अनुभव नाही

एखादी गोष्ट ऐकणे आणि ती घटना जगणे यात खूप फरक आहे. कॉलेजमध्ये असं घडतं, असं तुम्ही म्हणू शकता, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः कॉलेजला जात नाही, तोपर्यंत तुम्हाला खरंच कॉलेज म्हणजे काय हे कळत नाही.

महाविद्यालयात अभ्यासासोबतच अनेक स्पर्धा असतात ज्यात फक्त प्राध्यापक परवानगी देतात आणि विद्यार्थी सर्व कामे स्वतः करतात. स्पर्धा आयोजित करणे, यादी तयार करणे, प्रायोजक शोधणे, वर्गाच्या परवानग्यांसाठी महाविद्यालयाच्या लॉजिस्टिक विभागाशी बोलणे, पोस्टर बनवणे, जाहिराती करणे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना काम सोपवणे, बैठका घेणे, स्पर्धेच्या दिवशी सर्व वर्गात मुलांना सहभागी होण्यास सांगणे. न्यायाधीश होण्यासाठी प्राध्यापकांना भेट देणे, बक्षिसाची रक्कम देण्यासाठी अकाऊंट्स विभागातून फॉर्म आणणे, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्यासमोर त्यांच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करणे इत्यादी सर्व कामे विद्यार्थी स्वतः करतात. ते हे वर्षातून एकदा नाही तर किमान 4 वेळा करतात.

या साऱ्या धावपळीतून मिळालेले अनुभव त्यांना आयुष्यभर शिकवतात. बी.ए.चे विद्यार्थी मार्केटिंग शिकतात, सायन्सचे विद्यार्थी कविता लिहितात, कॉमर्सचे विद्यार्थी आदरातिथ्यासाठी हात आजमावतात. घरी बसून हे सर्व काय असू शकते? कॉलेजच्या पहिल्या वर्षात शांत असणारा तरुण बहिर्मुख होतो आणि बहिर्मुखी माणूस अंतर्मुख होतो. फेअरवेलच्या दिवशी स्टेजवर उभा असलेला विद्यार्थी आढळतो, ज्याला कॉलेजच्या पहिल्या महिन्यात वर्गात उभे राहण्यास संकोच वाटत होता. प्रेमात पडताना तरुण उभे रहायला शिकतात, जे कधीच पडत नाहीत, ते कसे उठायला शिकतील? काहीजण दु:खात लिहायला शिकतात, तर काही गाण्यातून वेदना व्यक्त करतात. प्रत्येकजण नात्यातील पहिल्या 3 महिन्यांचा आनंद आणि शेवटचे 3 महिने दुःख पाहतो. पण, या संपूर्ण प्रक्रियेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाला समजू लागतात, परिपक्व होऊ लागतात. ऑनलाइन रिलेशनशिपची काय अवस्था आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही.

विचार मुक्त होणार नाहीत

आपल्या देशातील गरीब-श्रीमंत यांच्यात जितका फरक आहे, तितकाच शाळा सोडलेल्या किशोरवयीन आणि महाविद्यालयीन तरुणांच्या विचारांमध्ये आहे, सरकार एकाचे ऐकते आणि दुसरे आपल्या शेजाऱ्यांचेही ऐकत नाही. शाळेत मुलांना नैतिक शिक्षण दिले जाते, प्रशासनाकडून पुस्तके वाढवली जातात आणि मेसोपोटेमियाचे महत्त्व इतिहासाने भरलेले आहे. त्या किशोरवयीन मुलाला ना सरकारला प्रश्न कसे विचारायचे हे माहित नाही किंवा देशात प्रचलित असलेल्या धार्मिक विधींच्या चुका ओळखण्याची क्षमता नाही (किमान सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी नाही). याउलट, महाविद्यालयीन तरुणांना आपल्या विचारांना उड्डाण कसे द्यायचे हे माहित असताना, त्याला लाल सलाम देखील कळतो आणि मनुस्मृती कशी नाकारायची हे देखील त्यांना माहित आहे.

कॅन्टीनमध्ये समोसा चटणीसाठी लढणाऱ्या या तरुणांनी देशाचे सरकार हादरते. या तरुणांचा आवाज जितका ठळक आहे, तितकाच कॉलेजचा चेहरा न बघता कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहणाऱ्या तरुणांपर्यंत तो पोहोचेल का?

धर्म, जात, राजकारण, लिंग, मुलींचे स्वातंत्र्य इत्यादी बाबतीत आपल्या देशातील लोकांची विचारसरणी संकुचित आहे. या विषयांवर विचार करण्याची ताकद असलेल्या तरुणांची संख्या आधीच खूप कमी आहे, जी ऑनलाइन शिक्षणामुळे येत्या काळात कमी होईल.

घरी बसलेले हे युवक ना प्रश्नांची उत्तरे देतील, ना प्राध्यापक वारंवार आवाज खंडित झाल्यामुळे किंवा नेटवर्कच्या कमतरतेमुळे मन वळवण्याची शक्ती वाया घालवतील, ना तरुणांना योग्य वातावरण मिळेल, ना ते नवीन लोकांना भेटून स्वत:शी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. नवीन वातावरण, ना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल ना त्यांना हवं ते करता येईल. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या निकालात तरूणांच्या मनाच्या सीमा भिंतीचे दरवाजेही घराच्या सीमा भिंतीत उघडणार नाहीत.

मालदीवचं हॉटेल आहे खास

* अविनाश रॉ

हिंडण्या-फिरण्याचे शौकीन लोक नेहमी काही ना काही नवीन शोधत असतात. त्यांना फिरण्याव्यतिरिक्त अशा गोष्टी बघायचा छंद असतो, ज्यात रोमांच असेल. अनेकदा या गोष्टी लोकांच्या आवाक्याबाहेरील असतात, पण तरीही त्यांना अशी नवीन माहिती घ्यायला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे लोक चक्क समुद्रात विश्रांती घेतात शिवाय मौजमजेने आपल्या सुट्ट्या व्यतित करतात. मालदीवमध्ये तुम्ही या हॉटेलमध्ये राहायची मजा घेऊ शकता. हे हॉटेल कॉनरेड मालदीव्स रंगाली आयर्लेंड नावाने प्रसिद्ध आहे. यात बेडरूम पाण्याच्या खाली असतं. हे पाण्यात १६.४ फूट खोल बनवलं गेलं आहे. याचं स्ट्रक्चर स्टील, कॉक्रीट आणि एक्रिलिकचं आहे. याला दोन मजले असतील. एक पाण्यावर आणि एक पाण्याखाली.

या सूईटमध्ये एकत्र एकूण ९ लोक राहू शकतात. इथे लोकांना एका प्रायेव्हेट सीप्लेनने नेलं जाईल. यानंतर त्यांना स्पीडबोटमधून विला येथे नेलं जाईल. इथे पाहुण्यांना पूर्ण वेळेसाठी ४ बटलर, एक शेफ, एक जेट स्की सेट आणि एक फिटनेस ट्रेनर दिला जाईल.

त्याचबरोबर पाहुण्यांना दररोज ९० मिनिटांसाठी स्पा ट्रीटमेंट दिली जाईल. इथे एक रात्र घालवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजे जवळजवळ ३२ लाख, ८८ हजार रुपये खर्च करावे लागतील.

तुम्हालादेखील मालदीव फिरायची संधी मिळाली तर तुम्ही इथे नक्की फिरून या. हा तुमच्यासाठी नवीन अनुभव असेल.

स्कूबा डायविंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

मालदीवमध्ये चारही बाजूला नजर फिरवल्यावर पाणीच पाणी दिसतं. त्यामुळे इथे तुम्ही वॉटर एडवेंचरचा आनंद घेऊ शकता किंवा आरामात आपल्या कॉटेजमध्ये आराम करू शकता. मालदीवच्या जवळपास प्रत्येक रिसॉर्टमध्ये स्कूबा डायविंगची व्यवस्था आहे. इथे शिकणाऱ्यांसाठी येथे डायविंग स्कूल आणि कोर्सही आहे. प्रत्येक रिसॉर्टजवळ बेटाखाली आपली एक समुद्री भिंत (रीफ) असते, त्यामुळे मोठ्या लाटा किंवा हवेच्या दरम्यान ड्रायव्हिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही.

४ लाख लोकसंख्या असलेल्या देशात १२ लाख टूरिस्ट

मालदीव ३६ मुंगा प्रवाळद्वीप आणि १,१९२ लहान-लहान आयलँडचा मिळून तयार झालेला देश आहे. एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवर जाण्यासाठी मुख्यत्त्वे फेरीचा वापर केला जातो. देशातील इकोनॉमीमध्ये टूरिज्म महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.

अंडरवॉटर फोटोग्राफीची मजा

मालदीव अंडरवॉटर फोटोग्राफीसाठीही जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक आहे. कोरल रीफ आणि माश्यांच्या इतक्या जाती कदाचितच अन्य कुठे असतील. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर इथल्या डायविंग स्कूलमध्ये अंडररवॉटर कॅमेरेही भाड्याने मिळतात.

पाणबुडी (सबमरिन)चा आनंद इथे मिळेल

समुद्राच्या आत खोलवर उतरून समुद्राच्या आतील दुनिया पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. मालदीवच्या आकर्षणात जर्मन पानबुडीमुळे भर पडली आहे, ज्यामुळे प्रत्येकाला पाण्याखालील जग दिसतं.

जगभरातील व्हेल व डॉल्फिनच्या २० प्रजाती

आता ही गोष्ट खूप कमीच लोकांना ठाऊक आहे की मालदीवची गणना जगातील ५ सर्वश्रेष्ठ ठिकाणांपैकी एक म्हणून होते ती तेथील व्हेल व डॉल्फिनच्या अस्तित्त्वामुळे. या दोन्ही माशांच्या वीस प्रजाती मालदीवच्या समुद्रात आढळतात. यात महाकाय ब्लू व्हेलपासून ते अतिशय लहान परंतु कलंदर स्पिनर डॉल्फिनपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

कसं पोहोचाल

मालदीवची राजधानी मालेसाठी केरळातील तिरूवनंतपुरममधून फ्लाईट आहे. दिल्लीहून कोलंबोद्वारे काही फ्लाईट मालेसाठी सुरू झाल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट मुंबईतून माले येथे जातात. भाडंही खूप जास्त नाहीए. तिरूवनंतपुरमहून माले येथे एका व्यक्तीचे इकोनॉमी क्लासचे रिटर्न भाडे जवळजवळ साडे आठ हजार रूपये आहे. या फ्लाईटला केवळ ४० मिनिटांचा अवधी लागतो.

Diwali Special: रांगोळीची विविध रूपं

* प्रतिभा अग्निहोत्री

रांगोळीला विविध राज्यात वेगवेगळया नावाने ओळखलं जातं. बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशात मुग्गुल, तमिळनाडुमध्ये कोलम, राजस्थानमध्ये मांडना, हिमाचलमध्ये अडूपना आणि उत्तरप्रदेशात चौक व बिहारमध्ये एपन या नावानी ओळखले जाते.

रांगोळी ही प्रद्धत जास्त करून गुजरात आणि महाराष्ट्रात आहे. परंतु महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधून येत ही कला आता पुर्ण देशात प्रचलित झाली आहे. महाराष्ट्रात तर दसऱ्यानंतरच दररोज सकाळी गृहिणी उठून मुख्य दारात नविन रांगोळी काढून मगच कामाला सुरूवात करतात. रांगोळीचं तात्पर्यच रंगाच्या माध्यमातुन मनातील भावना अभिव्यक्त करणं आहे.

चला तर मग तुमची ओळख करून देतो याच्या वेगवेगळया रंगरूपांशी :

फ्री हँड रांगोळी : यात तुम्ही कोणतीही फुलं, पानं, यासारख्या कलाकृती करू शकता. ज्यांची स्केचिंग आणि चित्रकला चांगली आहे ते याचा जास्त वापर करतात.

ठिपक्यांची रांगोळी : यामध्ये ठिपके एकमेकांना जोडून डिझाइन तयार होते. यामध्ये भौमितीय, चौकोनी, किंवा आयताकृती डिझाइन अधिक बनविल्या जातात.

रेडिमेड रांगोळी : ही बाजारात विविध डिझाइनमध्ये पेपर किंवा प्लास्टीक शीटवर मिळते. डिझाइननुसार पेपरवर छिद्र असतात. ज्यावर रंग टाकून डिझाइन तयार करता येते.

आर्टीफिशियल रांगोळी : ही प्लास्टीक शीट विविध डिझाइनमध्ये उपलब्ध असते. याच्या मागच्या बाजुला गम लावलेला असतो. गमवर असलेला पातळ कागद हटवून तुम्ही ती डिझाइन शिट तिथे चिकटवू शकता.

हर्बल रांगोळी : ही गुलाब, झेंडुसारख्या विविध रंगांच्या फुलांनी, झाडाच्या पानांनी काढली जाते. ती दिसायला फार सुंदर दिसते.

कशी असावी जागा

रांगोळी बनविण्यासाठी जागेचा समतोल असणं अत्यंत गरजेचं असतं. आजकाल घरात टाइल्स लावलेल्या असतात आणि बऱ्याचदा त्या फुगीर असतात. तर अशावेळी तुम्ही रांगोळी काढायच्या ठिकाणी प्लेन रंगाचं प्लास्टीक घालून किंवा पेपर टेप पट्टीने चिकटवून त्यावर रांगोळी काढा. हे स्थान घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजुला ठेवावे जेणेकरून येण्याजाण्यासाठी त्रास होणार नाही आणि रांगोळीसुद्धा जास्त काळ टिकून राहील.

कशी काढाल रांगोळी

रांगोळी काढायची जागा स्वच्छ ठेवा. जर तुम्ही पेपर शीट किंवा प्लास्टीक पेपर शीट चिकटवली असेल तर तीदेखील साफ करा. स्वच्छ कापडाने पुसून घ्या. सफेद रंगाने, डिझाइन किंवा आउटलाईन काढून घ्या. जर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढत असाल तर आधी ठिपके काढून घ्या नंतर ते जोडा. मग त्यात मनासारखे रंग भरा. लक्ष ठेवा की रंग एका वर एक सांडणार नाही.

लक्षात घेण्यायोग्य बाबी

* जर तुम्ही पहिल्यांदा रांगोळी काढत आहात तर छोट्या आणि सोप्या डिझाइन काढा. त्याचबरोबर बाजारात मिळणाऱ्या रांगोळीच्या पुस्तकाचा आणि ठिपक्यांच्या कागदाचा वापर करा.

* डायरेक्ट सफेद रंगाने रांगोळी काढायला जमत नसेल तर आधी खडूने किंवा पेन्सिलने डिझाइन काढून घ्या मग त्यावर रंग भरा. प्लास्टीक आणि पेपरवर मग तुम्ही पेन्सिलही पण डिझाइन तयार करू शकता.

* रांगोळी काढताना डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व रंगांना वेगवेगळया डबित ठेवा. जेणेकरून वापरणं सोपं जाईल.

* जर काही नविन प्रयोग करू इच्छिता तर तांदुळ पाण्यात एक तास भिजवून आणि मग वाटून पेस्ट बनवून घ्या आणि मग एका प्लास्टीकच्या कोनमध्ये ही पेस्ट भरून जमिनीवर मनासारखी डिझाइन काढा.

मग या दिवाळीत आपल्या घराची सजावट अधिक उठावदार बनवण्यासाठी रांगोळी काढायला विसरू नका.

Diwali Special: आनंद पसरवा, प्रदूषण नव्हे

* शैलेंद्र सिंह

देशाची राजधानी दिल्लीच नव्हे तर इतर सर्व शहरेही प्रदूषणामुळे चिंतेत आहेत. दिल्लीच्या सभोवताली पेंढा जाळल्यानेही प्रदूषण वाढते. दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक प्रदूषण होते. जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील सर्वाधिक शहरे समाविष्ट आहेत, जो एक धोकादायक इशारा आहे.

कोणत्याही उत्सवाचा हेतू तेव्हाच सार्थक होतो जेव्हा तो समाजात आनंद पसरवितो. प्रदूषण हा संपूर्ण जगाचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. येणाऱ्या काळात ही आणखी वाईट परिस्थिती असेल. आपल्या भावी पिढयांना स्वच्छ हवा आणि पाणी देण्यासाठी आपणास प्रदूषण निर्मूलनासाठी काम केले पाहिजे.

फटाके आनंद कमी, प्रदूषण अधिक देतात

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी लोक फटाके आणि फुलबाजीचा अवलंब करतात, ज्यामधून धूर बाहेर पडून वातावरणात पसरतो आणि श्वसन रोगाचे रुग्ण असलेल्या लोकांना अधिक नुकसान पोहोचवतो.

श्वसन रोगाशिवाय फटाके वाजविल्याने होणाऱ्या मोठया आवाजाने कानदेखील खराब होतात, ज्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठीच रुग्णालये आणि शाळांचे क्षेत्र सायलेंस झोन बनविले जातात. येथे मोठया आवाजात हॉर्न वाजवण्यास मनाई आहे.

जेव्हा लोक मोठया आवाजाचे फटाके, बॉम्ब आणि इतर वस्तू फोडतात तेव्हा ते आपल्या कानांवर हात ठेऊन आपले तोंड दुसऱ्या बाजूला करतात. याचा अर्थ असा की त्यांनादेखील हा आवाज आवडत नाही,

जे हे सिद्ध करते की गरजेपेक्षा मोठा आवाज कानांसाठी योग्य नाही. विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कानांना आवडत नाही तेव्हा ती इतरांना कशी आवडेल? म्हणूनच मोठया आवाजाचे फटाके वाजवू नयेत. फटाके केवळ वाजविणाऱ्यांनाच इजा पोहोचवत नाहीत तर त्यांना तयार करणाऱ्यांनाही इजा पोहोचवतात. फटाके तयार करण्यासाठी गनपाऊडरचा वापर केला जातो, यामुळे तयार करणाऱ्यांच्या हाताला नुकसान होते.

दिवाळीत आनंद साजरा करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे विद्युत दिवे वापरणे. यासाठी लोक मोठया संख्येने इलेक्ट्रिक स्कर्टिंग, बल्ब आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरतात. यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांना इतरांचे पाहून आपले घर अधिकाधिक प्रकाशाने झळकावण्याची इच्छा असते. यासाठी विजेचा वापर होत आहे. यामुळे विजेचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम असा होतो की वीजपुरवठयात अडचण तर येतेच शिवाय ज्या ठिकाणी तिची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी वीज पोहोचू शकत नाही. बरीच रुग्णालये, कार्यालये, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांमध्येही वीज मिळत नाही.

रांगोळीमध्ये नैसर्गिक रंग वापरा

रांगोळी तयार करण्यासाठी फक्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. यासाठी, फुले आणि पाने वापरली जाऊ शकतात. तांदूळ रंगविण्यासाठीदेखील हळद वापरा. हिरव्या रंगासाठी पाने वापरा. पाने बारीक चिरून घ्यावी. याचा वापर रांगोळीला आकर्षक रूप देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळया रंगांची फुलेदेखील बारीक कापून रंगाच्या जागी वापरता येतात.

लखनौमधील रांगोळी कलाकार ज्योती रतन म्हणतात की आकर्षक आणि निरुपद्रवी रांगोळी नैसर्गिक रंगांनी बनवता येते. रांगोळीमध्ये तिची रचना आणि रंगांचा वापरच अधिक महत्वाचा असतो. आज, विविध प्रकारचे फुले प्राप्त होत आहेत, ज्यापासून रंगीबेरंगी रांगोळया तयार केल्या जाऊ शकतात.

अशा गोष्टींची काळजी घेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली जाऊ शकते. यासह, खाद्यपदार्थ तयार करताना हे लक्षात ठेवा की त्यांच्यामध्ये आपल्या आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींचा वापर व्हायला नको.

Diwali Special: यासाठी पाहुणचार लक्षात असेल

* नीरा कुमार

हे खरे आहे की भारतीय सण-उत्सवात आणि लग्नांमध्ये धार्मिक विधी मोठया थाटामाटात साजरे केले जातात. पाहुणेसुद्धा यायला आवडतात. जर पाहुण्यांसाठी खाण्या-पिण्याची आणि राहण्याची काही खास व्यवस्था असेल तर ते परत जाऊन तुमचा पाहुणचार खूप चांगला होता असे सांगताना थकणार नाहीत. जबरदस्त आदरातिथ्य होते. अतिथींना हे सांगण्यास भाग पाडण्याच्या काही टीप्स येथे आहेत :

राहण्याची व्यवस्था

आपण प्रथम येणाऱ्या अतिथींची यादी तयार करा. तसेच तिच्यात किती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि किती तरुण आहेत हेदेखील पहा. वृद्ध अतिथींना बसण्या-झोपण्यासाठी बेड, खुर्च्या इत्यादींची व्यवस्था असावी. त्यांच्याकडे सामान ठेवण्यासाठी एक लहान टेबल असावा, जेणेकरून त्यांना वाकावे लागणार नाही, तरुण लोक गादी वगैरे टाकून जमिनीवरदेखील राहू शकतात.

जर उन्हाळयाचा ऋतू असेल तर एअर कंडिशनर किंवा कूलर भाडयाने घ्या जेणेकरुन अतिथींना उष्णतेमुळे त्रास होऊ नये.

खाण्या-पिण्याची व्यवस्था

सुरूवात चहाने होते. म्हणून गोड आणि फिकट चहाची व्यवस्था असावी. बिस्किटेसुद्धा बरोबर असले पाहिजेत. ज्यांची मुले लहान, दूधपिते आहेत त्यांच्यासाठी दूधही हवे. या सर्वांबरोबरच निंबूपाण्याची व कोमट पाण्याचीही व्यवस्था असावी.

त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाचीही वेळ योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्नाला जास्त मसालेदार बनवू नका. आपल्या कुटुंबातील पाहुण्यांबद्दल जाणून घेत हलक्या मीठाच्या १-२ भाज्या अवश्य ठेवा. उकडलेले बटाटे, दही, कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेवा. दही आंबट असू नये. ताक, नारळ-पाणी वगैरे जरूर ठेवा.

जेव्हा-जेव्हा पाहुणे येतात तेव्हा पाण्याबरोबरच मिठाईही द्या. प्रत्येकाशी भेटत रहा आणि त्यांची एकमेकांशी ओळख करून द्या, जेणेकरुन पाहुणे एकमेकांशी मिसळत राहतील.

स्पर्धा आयोजित करा

लग्नात फक्त गप्पा-गोष्टींनी काम चालत नाही. म्हणूनच लग्नाचे वातावरण मनोरंजक आणि संस्मरणीय बनविण्यासाठी, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात अंत्याक्षरीसारखी स्पर्धा आयोजित करा. पुरुषांमध्ये साडी पटकन कोण दुमडतो, तर स्त्रियांमध्ये कोण पटकन साडी बांधते यासारख्या स्पर्धा ठेवा. एखाद्या महिलेच्या पोस्टरवर स्त्री-पुरुष दोघांपैकी कपाळावर योग्य ठिकाणी कोण टिकली लावतो स्पर्धा ठेवा.

या हंगामात फळे भरपूर प्रमाणात येतात. म्हणून मुली आणि स्त्रिया यांच्यात त्वरित फळ कापण्या-सोलण्यासाठी स्पर्धा ठेवावी. याचा आणखी एक फायदा म्हणजे सर्व पाहुण्यांना फळे खायला मिळतील आणि ते कापलेही जातील. स्पर्धा जिंकणाऱ्यासाठी अगोदरच बक्षीसे ठरवा. तंबोराही वाजवू शकतात. नृत्यदेखील आयोजित केले जाऊ शकते.

लग्न आणि सण संस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येक अतिथीबरोबर जास्तीत जास्त गुणवत्तेचा वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकास समान भेट द्या. अशा प्रकारे, अतिथींना हे जाणवते की ते खरोखरच खास आहेत. ते आपली यजमानी कधीही विसरणार नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें