जीवनाची परीक्षा जिंकवणारे १५ धडे

* गरिमा पंकज

कोरोनाने आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. मौजमस्ती, वायफळ खर्च, दर दोन दिवसांनी उपहारगृहात जेवायला जाणे, तिथली पार्टी, उगाचच फिरायला जाणे, कधी भरपूर खरेदी, कधी सिनेमा पाहायला जाणे, तर कधी नातेवाईकांचे घरी येणे या सर्वांवर कोरोनाने निर्बंध घातले. बहुसंख्य लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. निरर्थक फिरण्याला लगाम लागला आहे. मास्क आणि सॅनिटायजर जीवनातील महत्त्वाचे घटक झाले आहेत.

अशा वेळी जर तुम्हीही या अशा जीवनापासून धडा घेऊन येणारे आयुष्य आणि भविष्य आनंदी करू इच्छित असाल तर स्वत:ची जीवनशैली, विचारसरणी आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत काही असे बदल करा, जेणेकरून एका सुंदर जीवनाची सुरुवात करू शकाल.

नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला शिका

नाती आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. संकट काळात माणूस आपल्या घराकडेच धाव घेतो. लोक घाबरून शहर सोडून आपापल्या गावी कसे पळत होते, हे आपण कोरोना काळात पाहिले. प्रत्यक्षात प्रत्येक माणसाला माहीत असते की, संकट काळात अनोळखी शहरात तो एकटाच असतो. त्यामुळे संकट जास्त मोठे वाटू लागते.

जेव्हा तुम्ही आपल्या माणसांमध्ये असता तेव्हा मिळूनमिसळून सर्व संकटांवर मात करू शकता. भलेही संकट कायम असते, पण दु:ख वाटल्यामुळे संकटाचा सामना करणे सोपे होते. आईवडील, भाऊ-बहीण ज्यांना तुम्ही कितीही बरेवाईट सुनावले असेल तरी जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा एखादे संकट येते तेव्हा तेच तुमचा खरा आधार बनतात.

म्हणूनच नेहमी आपल्या नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला हवे. त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की, तुमचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. ज्या प्रकारे बँक आणि तत्सम ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवता त्याचप्रकारे नात्यांमध्येही प्रेमाची गुंतवणूक करा. प्रेमाची शिंपडण करून नात्यांची बाग कोमेजू देऊ नका. मग पाहा, एक वेळ अशी येईल जेव्हा हीच बाग तुमचे जीवन आनंदाने फुलवेल.

मंदिरा, अनिलचा प्रेमविवाह होता. अनिल नेहमीच मंदिराची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. लग्नानंतर अनिल आणि मंदिरा ३-४ महिने कसेबसे कुटुंबासोबत राहिले. त्यानंतर मंदिराच्या सल्ल्यानुसार त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आईवडील दु:खी झाले, पण मंदिराला सासरी राहायला आवडत नव्हते.

सासूने सुनेचा हात प्रेमाने हातात घेत विचारले, ‘‘बाळा एकत्र राहण्यात काय अडचण आहे? इतके मोठे घर आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.’’

मंदिराने स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, घर कितीही मोठे असले तरी घरातील माणसांची गर्दी तर पाहा ना? नणंद, दीर, वहिनी, तुम्ही, बाबा आणि नंदू… इतक्या माणसांमध्ये माझा जीव गुदमरतो. त्यात सतत नातेवाईकांची ये-जा असतेच. मला लहानपणापासून कमी माणसांमध्ये राहायची सवय आहे. त्यामुळे वेगळे घर घेऊन अनिलसोबत राहीन. अनिलला मी याबद्दल लग्नापूर्वीच सांगितले होते.’’

आईने मुलाकडे अपेक्षेने पाहिले आणि त्यानंतर निमूटपणे मान खाली घातली. अनिल आणि मंदिराने दुसरीकडे घर घेतले. दोघे तिथे राहू लागले. नव्या घरात मोकळया वेळेत ती टीव्ही पाहायची किंवा मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारायची.

दरम्यान कोरोना संसर्गाची लाट आली. अनिलची नोकरी गेली. त्यावेळी मंदिरा गरोदर होती. आर्थिक चणचण जाणवू लागली. त्यातच अनिलला कोरोना झाला. अनिलची काळजी घ्यायची की स्वत:ची आणि गर्भात वाढणाऱ्या बाळाची? मंदिराला काही सुचेनासे झाले. तिने तिच्या आईला फोन लावला, पण ती स्वत:च आजारी होती.

नाईलाजाने तिने सासूला फोन करून सर्व सांगितले. सासूबाईंनी लगेच त्यांचे सामान भरले आणि त्या मंदिराकडे राहायला आल्या.

अनिलची सोय त्यांनी वेगळया खोलीत केली. मंदिराला आठवा महिना लागला होता, त्यामुळे तिलाही वेगळया खोलीत आराम करायला सांगितले आणि स्वत: काम करू लागल्या. स्वयंपाक, वेळेवर औषध देणे, सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतल्या. सासरे शक्य तेवढी आर्थिक मदत करत होते. दोघांनी मंदिराचा संसार सावरला.

तिने अनिलला विनंती करत सांगितले की, ‘‘माझ्या मुलीने रुग्णालयातून थेट तिच्या घरी म्हणजे तिच्या आजीच्या घरी जावे असे मला वाटते.’’

मंदिराचे बोलणे ऐकून सासूचे डोळे पाणावले. तिने मंदिराला प्रेमाने मिठी मारली.

सर्वात मोठी संपत्ती

खरेतर नाती म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती. आपण कितीही पैसा कमावला तरी जोपर्यंत नात्याची संपत्ती कमावत नाही तोपर्यंत जीवनातील खरा आनंद, मन:शांती मिळत नाही. जीवनात जे कोणी तुमचे आपले आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. कुठलेही नाते गृहित धरू नका. प्रत्येक नाते निभवायला शिका. तरच गरज पडताच तीही माणसे तुमच्या मदतीला धावून येतील.

आजकाल आपण त्रिकोणी कुटुंब पद्धतीच्या आहारी जात आहोत. त्यामुळेच बऱ्याचशा जवळच्या नात्यांपासून दुरावत चाललो आहोत. वेळ आली की आपल्याला त्या नात्यांचे महत्त्व समजते. कोरोनाने बऱ्याच अंशी लोकांचे डोळे उघडले आहेत. त्यांना आपल्या माणसांच्या सोबतीचे महत्त्व पटवून दिले आहे.

गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्या

संकट काळात गरजेला दोनच गोष्टी धावून येतात. आपल्या माणसांची सोबत आणि जमवलेले पैसे. नाती जोडून ठेवण्यासोबतच आपल्याला या नव्या वर्षात गुंतवणुकीचे महत्त्वही समजून घ्यायला हवे. तुम्ही खूप मोठया रकमेची गुंतवणूक करायला हवी, असे मुळीच नाही. तुमचे उत्पन्न कमी असले तरी हरकत नाही. तुम्ही छोटी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमवू शकता.

तसेही एकाच ठिकाणी जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळया ठिकाणी थोडी थोडी गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. यामुळे पैसे बुडण्याची भीती कमी होते आणि जास्त नफा मिळण्याची शक्यता वाढते.

सिप

जेव्हा गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडात सिपमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामुळे शेअरचा लाभ मिळतो, शिवाय हे सुरक्षित असते. व्याजाची रक्कम ठरलेली असते. ती फार बदलत नाही. यात मोठया कालावधीपर्यंत छोटी-छोटी रक्कम गुंतवता येते. जे धोका पत्करायला तयार असतात ते इक्विटी लिंक्ड सेविंग या योजनेत पैसे गुंतवू शकतात. ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे ते हायब्रिड किंवा डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. यात तुम्हाला बऱ्याच अंशी ठरलेला परतावा मिळतो.

लाईफ इन्शुरन्स अर्थात जीवन विमा

लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमाअंतर्गत १५ वर्षांत बऱ्याच कंपन्या दुप्पट परतावा देतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दरमहा, तीन महिन्यांतून एकदा, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

मुलीच्या जन्मानंतर,१० वर्षांच्या आत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही एक सरकारी योजना आहे, जिथे तुम्हाला वर्षाला २५० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात परतावा खूप चांगला मिळतो. ७.५ टक्यांपर्यंत व्याज मिळते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर रक्कम परत मिळते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

तुम्ही पीपीएफमध्ये थोडे थोडे पैसे भरून चांगला परतावा मिकवू शकता. हीदेखील एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

शेअर

सुरुवातीला फिक्स डिपॉझिट म्हणजे सुरक्षित ठेवींवर चांगला परतावा मिळायचा. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे. आता मात्र बँका खूप कमी व्याज देतात. त्यामुळेच लोक इतर पर्यायांकडे वळत आहेत.

वायफळ खर्च टाळा

आतापर्यंत आपण जीवनाकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. गरज नसतानाही केवळ मनाला वाटले म्हणून कपडे, खूप सारी खरेदी करतो. एखादे गॅझेट आवडले तर ऑनलाइन मागवतो. मनाला वाटेल तेव्हा बाहेर जेवायला जातो. मित्रांसोबत पार्टी करतो. छोटीशी गोष्टही भरपूर खर्च करून साजरी करतो. एकंदरच वायफळ खर्च करण्यात आपण सर्वात पुढे असतो. आता मात्र या महामारीनंतर आपण हा धडा गिरवायला हवा की, उगाचच खर्च करणे योग्य नाही. कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली. बऱ्याच जणांचा पगार कमी करण्यात आला. पुढील काही काळ परिस्थिती अशीच असेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्य आहे तर सर्वकाही आहे

या कोरोना काळात आपल्याला एक गोष्ट चांगलीच समजली आहे की, जीवनात निरोगी आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य बिघडले असेल तर तुमच्याकडे जगभरातील सुखसुविधा आणि संपत्ती असूनही तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही आणि प्रत्येक श्वासासाठी लाचार होता. म्हणूनच स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली आणि आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. दररोज पहाटेच्या मोकळया हवेत फेरफटका मारणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचारसरणी आणि नात्यातील गोडव्यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. आरोग्य निरोगी राहील याकडे लक्ष द्या. पौष्टिक आहार घ्या, चांगला विचार करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल आणि शरीरही आतून मजबूत होईल.

निरर्थक वाद घालू नका

वाद आणि तणाव यामुळे बऱ्याचदा आपण मन:शांती गमावतो, शिवाय यातून हाती काहीच लागत नाही. उलट नात्यांसोबत आरोग्यही बिघडते. जीवनात कधीही काहीही होऊ शकते, याचा अनुभव मागच्या वर्षात आपण घेतला आहे. उद्याचा भरवसा नसतो. म्हणूनच आज चांगल्या पद्धतीने जगा. आज सुंदर करण्यासाठी डोकं आणि मन शांत असणे खूपच गरजेचे असते. त्यासाठी निरर्थक वाद किंवा भांडणांपासून दूर राहायला हवे.

अशा ठिकाणी फिरायला जा, जिथे कधीच गेला नसाल

निसर्गाचा पदर सर्व लेकरांना सामावून घेणारा आहे. आपण निसर्गाच्या जितके जवळ राहू तितके आपले आरोग्य निरोगी राहील. नवनवीन ठिकाणांवर फिरल्यामुळे मन प्रसन्न होते. कोरोनाने आपल्याला घरात बंद केल्यानंतरच आपल्याला बाहेर फिरण्यात किती आनंद असतो, याची जाणीव झाली आहे. परिस्थिती हळूहळू आणखी सुधारेल आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी पुन्हा मिळेल. तिथे जाता येईल जिथे निरोगी आरोग्यासह निखळ आनंद मिळेल. शक्यतो आपल्या घराच्या आजूबाजूलाही हिरवळ राहील, असा प्रयत्न करा.

राखून ठेवलेली कामे पूर्ण करा

बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे, आपले ध्येय बाजूला ठेवून आलेला दिवस घालवत असतो. वेळच मिळत नाही, असे कारण सतत पुढे करतो. कधी कामावरच्या कामांची धावपळ तर घर, मुलांचा अभ्यास, या सर्वांमध्ये दिवसच काय, पण कामासाठी रात्रही अपुरी पडते. त्यामुळे अधिकचे काम करणार कधी? हा बहाणा ऐकायला बरा वाटतो, पण या बहाण्याआडून तुम्ही खूप काही गमावत असता.

वेळेचा सदुपयोग

धावपळ कमी करूनही आपण जीवनातील सर्व जबाबदाऱ्या कशा पार पाडू शकतो, हे कोरोना काळाने आपल्याला शिकवले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तुमच्या डोक्यात हा विचार नक्की आला असेल की, तुम्ही दैनंदिन कामात काही वेळ उगाचच वाया घालवत होता.

एकीकडे कार्यालयात जाण्यासाठी बराच वेळ घालवायचा तर दुसरीकडे मित्रांसोबत कधी खरेदी तर कधी बाहेरचे जेवण. महागडया उपहारगृहात जेवणासाठी नंबर लागेपर्यंत रांगेत उभे राहणे तर कधी चित्रपट पाहण्यासाठी वेळ वाया घालवणे. त्याऐवजी तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली असती तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठणे किंवा पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले असते.

एखादे काम नंतर करू, असा विचार करून तुम्ही ते बाजूला ठेवता, पण ते पूर्ण करण्याइतका वेळ जीवन आपल्याला देईल का? म्हणूनच हातातले काम लगेच पूर्ण करा. आज तुमचा आहे. उद्याचा भरवसा नाही. तर मग सर्व महत्त्वाची कामे आजच पूर्ण करायला नकोत का?

कारण नसतानाही आनंदी रहा

जीवनात खुश होण्यासाठी तुम्ही संधीची वाट पाहात बसाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. माणूस आनंदी राहिला तरच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो निरोगी राहतो. मनातल्या आनंदाचा आरोग्याशी थेट संबंध येतो. म्हणूनच स्वत:ला नेहमी आनंदी ठेवा. यामुळे चेहऱ्यावरही चमक येते. कारण नसतानाही काही चांगल्या गोष्टी आठवून हसा. चांगले कपडे परिधान करा. मस्त दिसा. मेकअप करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही सुंदर दिसाल आणि निरोगीही राहाल.

लग्नातील वारेमाप खर्च निरर्थक

* शाहनवाज

तुम्ही कधी विचार केला आहे की २ व्यक्तींना नात्यात बांधण्यासाठी बाजारात किती किंमत मोजावी लागते? साहजिकच जेव्हा गोष्ट खर्चाची येते तेव्हा त्याकडे डोळेझाक करून चालत नाही.

मला २ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने त्याच्या काकाच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्न उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी मी तिथे पोहोचलो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे घर पाहून माझ्या लक्षात आले. त्याचे काका छोटयाशा जमिनीवर शेती करायचे आणि शेतीचा हंगाम संपला की शहरात जाऊन मजुरी करायचे.

माझ्या मित्राने मला सांगितले की, मुलाकडून कोणत्याही प्रकारची हुंडयाची मागणी करण्यात आलेली नाही. फक्त त्यांनी लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे सांगितले आहे.

जेव्हा वधू आणि वराला ७ फेऱ्या मारण्यासाठी उभे केले जात होते, तेव्हा मला मंडपाच्या बाहेर एक ट्रक दिसला, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पलंग, कपाट इत्यादी घरगुती वस्तू ठेवण्यात येत होत्या. अचानक मला माझ्या मित्राने हुंडा न घेण्याबाबत जे सांगितले होते ते आठवले, पण त्यावेळी त्याच्याशी या विषयावर काही बोलणे मला योग्य वाटले नाही.

लग्न आटोपून आम्ही दिल्लीला निघालो. बसमधून प्रवास करत असताना मी त्याला विचारले की, नवऱ्या मुलाकडून हुंडा मागण्यात आला नाही, असे तूच मला सांगितले होतेस ना? मग ते  सामान का भरले जात होते?

त्याने उत्तर दिले की, काकांनी ते सर्व सामान स्वत:च्या वतीने भेट म्हणून दिले होते, जेणेकरून उद्या काहीही घडले तरी कोणीही त्यांच्या मुलीला नावे ठेवू नयेत. मुलीला रिकाम्या हाती पाठवले असे टोमणे नवऱ्याकडच्या मंडळींसह काकांच्या स्वत:च्या नातेवाईकांनीही मारू नयेत, हे त्यामागचे कारण होते.

त्याने सांगितले की, कुटुंबातील इतर लग्नांमध्येही काकांना अशाच पद्धतीने मुलींना घरासाठीच्या सर्व वस्तू  द्याव्या लागल्या होत्या. कारण या वस्तू न दिल्यामुळे आपल्याच नातेवाईकांमध्ये रंगणाऱ्या गप्पा, कुजबूज, टोमणे त्यांना ऐकायचे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या गोतावळयात असलेली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी ते हा सर्व खर्च झेपत नसतानाही करत होते.

काही अशा प्रकारचे असते सामाजिक दडपण

तुम्हीही तुमच्या आयुष्यात कधीतरी असे घडताना पाहिले असेलच. हे फक्त एक प्रकारचे दडपण असते, जे वडिलांवर येते. या यादीत इतर अनेक प्रकारची सामाजिक दडपणे येतात आणि ती आपण नेहमीच पाहत असतो, पण पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो.

मी जिथे राहतो तिथे माझ्या शेजारीच रामदासजी राहतात. नुकतेच त्यांनी त्यांचा मुलगा रवीचे लग्न लावून दिले. एकतर आधीच कोरोनामुळे सर्वांचे खिसे रिकामे झाले आहेत, अशातच लग्नावर होणारा खर्चही तुटपुंजा नसून भरमसाठ असतो.

तसे तर रामदासजींचे दिल्लीत स्वत:चे घर आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात त्यांना एखाद्या भाडेकरूप्रमाणे खोलीचे भाडे भरण्याची गरज नाही. पण कोरोना सुरू झाल्यापासून आणि लॉकडाऊन लागल्यानंतर इतर अनेक लोकांप्रमाणेच त्यांनाही नोकरी गमवावी लागली.

समाजातील प्रतिमा तर मलीन होणार नाही ना?

याच काळात रवी आमच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्याने हट्ट धरला. रामदासजींनी त्याला बरेच समजावले की, घरची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही, सर्व पूर्वपदावर आल्यानंतर लग्न लावून देतो, पण रवी काही केल्या ऐकायला तयार नव्हता. अखेर रामदासजी मुलाच्या लग्नासाठी तयार झाले. त्यांनी असा विचार केला की, कोरोना काळ असल्यामुळे जास्त लोकांना आमंत्रण द्यायचे नाही आणि मुलीच्या घरच्यांकडेही कुठलीच मागणी करायची नाही.

रवीचे मित्र, नातेवाईक आणि काही ओळखीचे मिळून पन्नासच्या आसपास लोकांना आमंत्रण द्यायचे ठरले. लग्न झाल्यानंतर रवीला त्याच्या सासरच्या मंडळींकडून एक बाईक आणि काही संसारोपयोगी वस्तू मिळाल्या.

लग्नाच्या ३ दिवसांनंतर मुलीच्या घरच्यांना आणि काही मित्रांना बोलवून घरीच छोटेखानी रिसेप्शन देण्याचा हट्ट रवीने वडिलांकडे धरला. असे केले नाही तर नातेवाईक आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये आपली काय इज्जत राहणार, असे तो म्हणाला. त्यामुळे अखेर नाईलाजाने रामदासजींना त्याचे ऐकावेच लागले.

रामदासजी आणि रवीच्या अशा वागण्यावरून हेच स्पष्ट होते की, केवळ सामाजिक दडपणच नाही तर आपल्या मुलाचा किंवा अनेक ठिकाणी आपल्या मुलीचाही दबाव वडिलांवर असतो. आता या छोटयाशा लग्नातील खर्चाचा विचार तुम्हीच करू शकता. खिशात पैसे नसतानाही सामाजिक दबावामुळे लोकांना अशा लग्न सोहळयासाठी खर्च करावाच लागतो, जेणेकरून त्यांची समाजातील प्रतिमा खराब होऊ नये, त्यांची लाज जाऊ नये.

लोक काय म्हणतील?

आता कोणी असेही म्हणेल की, हे सर्व ऐकून लग्नच करायचे नाही का? किंवा लग्नात आपल्या नातेवाईकांना बोलवायचेच नाही का? इथे लोकांनी एकत्र येऊन आनंद सोहळा साजरा करण्यावर चर्चा सुरू नाही किंवा कोणाला लग्न न करण्याचा सल्लाही द्यायचा नाही, पण या विषयाचे तात्पर्य अगदी सहज सोपे असेच आहे. ते म्हणजे लोक लग्नावर खर्च करण्यापूर्वी इतर लोक किंवा समाज काय म्हणेल, याचा विचार करून खर्च करतात, अर्थात समाजाचा विचार करतात एवढेच.

सध्याच्या काळात समाजाची अर्थव्यवस्था खेळती राहण्यासाठी लग्नांमध्ये होणारा खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याशी अनेक प्रकारचे व्यवसाय जोडले गेले आहेत, उदाहरणार्थ, कॅटरर्सकडून जेवण घेणे, बँक्वेट हॉल बुक करणे किंवा कम्युनिटी हॉल बुक करणे, वेटरचे काम, लग्न लावण्यासाठी ब्राह्मण, मौलवी किंवा पाद्री इत्यादी. म्हणूनच या लोकांसाठी लग्न होत राहणे खूप गरजेचे आहे.

प्रवीणच्या वडिलांनी प्रवीणचे लग्न मोठा बँक्वेट हॉल किंवा मोठया पार्कमध्ये नव्हे तर परिसरातील एसडीएम कार्यालयात जाऊन कायदेशीररित्या विवाह नोंदणी करून लावून दिले. नोंदणीच्या २ किंवा ३ दिवसांनंतर, त्यांनी स्वागत समारंभासाठी एक सरकारी कम्युनिटी हॉल बुक केला. त्यांनी १५० लोकांना आमंत्रण दिले होते. मुलाचे लग्न पारंपारिक पद्धतीने केले असते तर त्यांना कदाचित सध्याच्या खर्चाच्या ३ पट जास्त खर्च आला असता. त्यांनी त्या उर्वरित पैशांची एफडी प्रवीणच्या नावे करून घेतली, जी त्याच्या वाईट काळात त्याला उपयोगी पडेल. मुलीकडच्या लोकांनीही बँकेत वधूच्या नावे एफडी करून घेतली, जेणेकरून ती गरजेच्या वेळी मोडता येईल.

प्रवीणच्या वडिलांनी त्याचे लग्न किती समजूतदारपणे लावून दिले, याचा अंदाज तुम्ही स्वत: लावू शकता. सध्याच्या काळात समाजाची गरज आहे की, त्याने वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करू नये. समाजाच्या या ओझे बनत चाललेल्या मानसिकतेला मोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकून विवाह पारंपरिक पद्धतीने वारेमाप खर्च करून न करता फक्त कायदेशीर नोंदणी करून करणे गरजेचे आहे.

खास असते लग्नाचे पहिले वर्ष

* पारूल भटनागर

असे म्हणतात की, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणजेच कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही संबंधांत कुठल्याही वळणावर जो पहिला अनुभव, सुरुवातीचे वागणे असते तेच आपला प्रभाव पाडते, भविष्याला योग्य आकार देते. अशाच प्रकारे व्यावहारिक जीवनातही पहिले वर्ष आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या वर्तणुकीचा पहिला प्रभाव, पहिला ठसा उमटवणारे ठरते.

आपण जर या वर्षात आपला चांगला प्रभाव पाडू शकलो तर आपल्या वैवाहिक जीवनातील आपला प्रभाव कायमच संस्मरणीय ठरेल. लग्नाचे पहिले वर्ष कशा प्रकारे जीवनाला सुखी किंवा दु:खी बनवू शकते, हे आम्ही तुम्हाला सांगतो.

सर्वात आधी नव्याने लग्न झालेले जोडपे आपल्या लग्नाला ३ भागांत विभागून  हे जाणून घेऊ शकतो की, त्यांचे वैवाहिक जीवन कशा प्रकारचे आहे. ज्यामुळे त्याला हे समजून घेणे सोपे होईल की, त्याचे भविष्यातले वैवाहिक जीवन कसे असेल.

चांगले लग्न (सुखी वैवाहिक जीवन)

या लग्नाचा संबंध त्या लग्नाशी आहे जिथे पतीपत्नी आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगतात. प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी एकमेकांना समजून घेवून संसार करण्यासोबतच दोन्ही कुटुंबांमध्येही चांगला ताळमेळ ठेवतात. एखाद्या गोष्टीवरून दोघांमध्ये बिनसले तरी त्याकडे अशा प्रकारे डोळे झाक करतात जसे काही घडलेच नाही.

अशा वागण्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासह पतीपत्नी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात इतक्या चांगल्या प्रकारे करतात की, एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेतल्यामुळे पुढे अडचणी येण्याची शक्यता फारच कमी असते, कारण नात्यामध्ये प्रेम, आदर, आपलेपणा, समजूतदारपणा हा सुरुवातीपासूनच असतो. जर तुमच्या नात्यातही हे सर्व असेल तर समजून जा की, तुम्ही सुखी वैवाहिक जीवन जगण्यासोबतच तुमच्या आयुष्यालाही योग्य वाटेवरून घेऊन जात आहात.

कंटाळवाणे लग्न (तडजोडीचे वैवाहिक जीवन)

अशा लग्नात प्रेम, समजूतदारपणाऐवजी फक्त तडजोड असते. कदाचित आवडीचा जोडीदार न मिळाल्यामुळे किंवा आपापसात सामंजस्य नसल्यामुळे अशी तडजोड करावी लागू शकते. काहीही कारण असले तरी यामुळे जोडीदारांना त्यांचे वैवाहिक जीवन तडजोड करूनच जगावे लागते. अशा प्रकारच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत फिरायला जाणे तर दूरच त्यांना एकमेकांसोबत बोलायलाही आवडत नसते.

जर एकमेकांना समजून घेणेच जमत नसेल तर कुटुंबाला समजून घेणे ही फार दूरची गोष्ट असते. दोघे वैवाहिक जीवनात पहिले पाऊल टाकतात खरे पण, ते स्वत:च तयार केलेल्या या कंटाळवाण्या वैवाहिक जीवनाला क्षणोक्षणी दोष देतात. आपण लग्न केलेच का? याचा त्यांना पश्चात्ताप होत असतो.

वाईट लग्न (नापास, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर)

असे लग्न म्हणजे पतीपत्नी एकमेकांना समजून घेण्याऐवजी सतत भांडतात, एकमेकांवर, एकमेकांच्या कुटुंबांवर चिखलफेक करतात. एकमेकांवर अश्लील आरोप करतात, प्रसंगी हात उगारायलाही मागेपुढे पाहात नाहीत.

हेही सत्य आहे की, अशा प्रकारची वागणूक वैवाहिक जीवनात काही काळापुरतीच सहन केली जाऊ शकते. पाणी डोक्यावरून जाताच अशी लग्नगाठ हळूहळू कमकुवत होऊन रोजच्या क्लेशांमुळे घटस्फोटापर्यंतची वेळ येते, कारण कमकुवत झालेली लग्नगाठ आयुष्यभर पकडून ठेवणे आईवडिलांना शक्य नसते आणि जोडीदाराला समजावणेही फारच अवघड झालेले असते.

अशा प्रकारचे लग्न एकतर मोडण्याच्या मार्गावर असते किंवा ते मोडते. ते इतरांसाठी लग्नाचे सर्वात वाईट उदाहरण ठरते.

काही अन्य गोष्टीही आहेत ज्यांच्याकडे डोळे झाक करता येणार नाही. जसे की,

नात्यात रोमान्सची कमतरता

लग्नाची पहिली १-२ वर्षे खूपच खास असतात, कारण दोघेही एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या सोबतीने वेळ मजेत घालवण्यासाठी बरेच फिरतात. भरपूर रोमान्ससोबत संभोगही केला जातो. त्यामुळे दोघांमध्ये जवळचे नाते निर्माण होण्यासह भावनात्मक रूपातही एकमेकांप्रती ओढ वाढते, पण अनेकदा संभोग तितकासा रंगत नाही जितकी जोडीदाराला अपेक्षा असते.

जिथे आपल्या जोडीदाराकडून पती किंवा पत्नी रोज संभोगाची अपेक्षा ठेवतात तिथे जबरदस्तीने लग्नाचे ओझे वाहणाऱ्या किंवा जेव्हा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात रोमान्स, संभोगाची कमतरता समाधान मिळवून देत नाही तेव्हा एकमेकांपासून दूर राहाणे, एकमेकांना समजून घेण्यात कमी पडणे असे प्रकार घडू लागतात.

प्रगल्भतेचा अभाव हेही कारण

अनेकदा आईवडिलांच्या दबावापुढे माघार घेऊन मुलांना नाईलाजाने लग्न करावे लागते. असेही होऊ शकते की त्यावेळी त्यांचे वय कमी असेल, ते लग्नासाठी तयार नसतील, नात्यांना सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसेल. अशावेळी जबरदस्तीने एखादे नाते लादले गेल्यास पतीपत्नीमध्ये प्रगल्भतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे त्यांची लग्नगाठ तर बांधली जाते, पण ते एकमेकांचा आणि कुटुंबाचाही आदर करू शकत नाहीत. त्यामुळे नाते फुलू शकत नाही आणि कमकुवत नाते मोडण्याच्या मार्गावर उभे राहाते.

विभक्त कुटुंब

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांबाबत बोलायचे झाल्यास ते आईवडिलांपासून दूर स्वत:चा वेगळा संसार थाटू इच्छितात. त्यांना वाटते की, एकत्र राहिल्यास काम वाढेल शिवाय वादही जास्त होतील. अशावेळी वेगळे राहण्याला भलेही ते समजूतदारपणाचा निर्णय समजत असतील, पण जेव्हा पतीपत्नीमध्ये मतभेद होतात तेव्हा त्यांच्यातील वाद मिटवणारे कोणीही नसते. त्यामुळे आधी नात्यात दुरावा त्यानंतर घटस्फोटापर्यंतची वेळ येते.

नात्यात मान नसणे

कोणत्याही नात्यात जोपर्यंत मान नसतो तोपर्यंत ते नाते मजबूत होऊच शकत नाही. कदाचित तुमच्या दोघांपैकी एकाचे व्यक्तिमत्त्व फारसे बरे नसेल किंवा पत्नी पतीपेक्षा जास्त कमावत असेल तर त्यावेळी विचार न करताच किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा पाहून लग्न केले जाते, पण नंतर प्रत्येकवेळी टोमणे मारणे, आपल्या मित्रमैत्रिणींना ओळख करून न देणे किंवा जास्तच खोचक शब्दांत बोलले जाते.

हे सर्व काही काळच सुरू राहू शकते, पण जेव्हा नात्यात याची सवय होऊन जाते तेव्हा आदर किंवा मान राखला जात नाही आणि नाते संपण्याच्या मार्गावर येऊन उभे ठाकते.

आईवडिलांवर अवलंबून असणे

लग्न दोन हृदयांचे मिलन असते. प्रत्येक जोडीदाराला असेच वाटते की त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, पण दोघांपैकी एक जेव्हा आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या आईवडिलांना जास्त महत्त्व देतो, प्रत्येक वेळी हेच ऐकायला मिळते की, माझ्या आईवडिलांनी असे सांगितले, ते असे सांगतात, तुम्हीही त्यांच्याकडून शिकायला हवे तेव्हा सतत असे बोलणे ऐकून चीडचिड होते आणि नंतर मनात दबून राहिलेला राग हळूहळू भांडण आणि एकमेकांपासून दुराव्याच्या रूपात समोर येतो.

नातेवाईकांसोबत ताळमेळ ठेवा

हे खरे आहे की, नवीन कुटुंब बनते तेव्हा नातीही वाढतात. कुटुंबात वेगवेगळया स्वभावाचे लोक असतात. त्या सर्वांसोबत ताळमेळ ठेवणे थोडे अवघड असले तरी अशक्य नसते. अशावेळी गरजेचे आहे की, तुम्ही फक्त तुमच्यापुरतेच मर्यादित राहू नका तर सर्वांशी ताळमेळ ठेवून पुढे जा. नवीन नाती, नवीन लोकांना समजून घेण्यासाठी स्वत:ला आणि इतरांनाही थोडा वेळ द्या.

विश्वास ठेवा

लग्नाचे पहिले वर्ष खूप खास असते. जर या वर्षात एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतले, एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकले तर मग पुढील वैवाहिक जीवन खूप चांगले जाईल अशी खात्री होते. असेही होऊ शकते की, सुरुवातीला तुमचा जोडीदार तुमच्यापासून खूप काही गोष्टी लपवत असेल, पण त्याचा अर्थ असा नाही की, तो चुकीचाच असेल.

सुरुवातीपासूनच कामे वाटून घ्या

बऱ्याचदा पतीपत्नीमध्ये भांडणाचे एक कारण घरातील कामकाजही असते, खासकरून तेव्हा जेव्हा दोघेही नोकरीला जाणारे असतील. अशावेळी सुरुवातीपासूनच कामे वाटून घ्या. असे केल्यास कोणावरही भार येणार नाही, शिवाय कामांची वाटणी होण्यासह एकमेकांसोबत बोलायला आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. अन्यथा दोघांपैकी एकावर पडलेला कामाचा जास्त ताण चिडचिडेपणाच्या रूपात समोर येऊन वाद आणि दुराव्याचे कारण ठरेल.

आरोप करणे सोडा

तू असे केलेस, तू मला असे बोललास, गमतीतही माझ्याशी असे बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली, अशा प्रकारे केलेले आरोप तुम्ही मनाला लावून घेतले आणि छोटयाशा गोष्टींवरही वाद घालू लागलात तर तुमच्या दोघांमध्ये अढी निर्माण होईल आणि भांडण होईल या भीतीने दोघेही एकमेकांना टाळू लागतील.

अशा परिस्थितीत हे गरजेचे असते की, जिथे मन किंवा मत पटत नसेल तिथे गप्प बसावे किंवा प्रेमाने समजावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.

जेव्हा मैत्रीण करेल महागड्या मागण्या

* पारुल भटनागर 

कोणत्या वयात मैत्री करावी हे सांगता येत नाही आणि मग त्या क्षणापासून आयुष्य इतके सुंदर होऊन जाते की, आपल्या या मित्रासाठी आपण चंद्र-तारे तोडण्याच्या गप्पा मारू लागतो, कारण विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाढते.

या नात्यात तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांसोबत चांगले क्षण घालवता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता, एकमेकांना मदत करता.

पण जेव्हा तुमचा जोडीदार या नात्याच्या आडून हळूहळू तुमच्याकडून महागडया भेटवस्तूंची मागणी करू लागतो तेव्हा तुम्ही थोडे सावध राहणे गरजेचे असते, जेणेकरून ही मैत्री तुमच्या खिशाला जड होणार नाही आणि तुमच्या जोडीदाराचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल.

चला तर मग, जाणून घेऊया प्रेयसीने मागणी केल्यावर काय करावे आणि काय लक्षात ठेवावे…?

फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिनी

अंगठीची मागणी

भेटवस्तू मोठी असो किंवा छोटी, तीच चांगली असते जी मागून घेतलेली नसते तर मनापासून दिली जाते. नुकतेच तुम्ही त्याला ब्रँडेड शॉपिंग करून दिले असेल, पण आता जर तो पुन्हा येत्या फ्रेंडशिप डेला तुमच्याकडे अंगठीची मागणी करत असेल तर त्याला सांगा की, यावेळी मी अंगठी तेव्हाच देईन जेव्हा तूसुद्धा या खास दिवशी मला अंगठी देशील आणि ती स्वत:च्या हातांनी माझ्या बोटात घालशील.

त्याने होकार दिला तरच त्याला अंगठी भेट द्या, कारण यात कोणतेही नुकसान नाही, पण जर त्याने स्पष्टपणे नकार दिला तर तुम्हीही लाज न बाळगता नकार द्या, कारण मैत्री एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी असावी लागते.

आयफोनचा हट्ट

तुम्ही दोघांनी खरेदीला जायचे ठरवले असेल आणि ही योजना आखण्याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मैत्रिणीला जात असेल, कारण तिनेच तुम्हाला खरेदीला जाण्यासाठी भाग पाडले असेल तर थोडे सावध व्हा, कारण खरेदी म्हणजे तुमच्या खिशावर भार पडणे.

मी पैसे आणि कार्ड आणायला विसरले, त्यामुळे आता तू तुझ्या कार्डने पैसे दे, मी नंतर पैसे देईन, असे सांगून तिने तुमच्याकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला तर वेळीच हुशारीने वागा. मीही कार्ड आणले नाही, त्यामुळे स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही, असे तिला स्पष्टपणे सांगा. तुम्ही पैसे भरलेत तर समजून जा की, तुमच्या खिशाला अळा बसायला सुरुवात झाली आहे. भलेही तुमचा नकार ऐकल्यावर ती तुमच्यावर थोडीशी नाराज होईल, पण तरीही तिच्या नाराजीकडे फारसे लक्ष देऊ नका, कारण पैशांच्या जोरावर कोणतेही नाते फार काळ टिकू शकत नाही.

सर्व गरजांसाठी तुमच्यावरच अवलंबून

मैत्री  झाल्यापासून प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ती जर तुमच्यावर अवलंबून असेल तर समजून जा की, तुमच्यासोबत तिने केवळ पैशांसाठी नाते जोडले आहे. जसे की, कधी फोन रिचार्ज, कधी कॅबचे बिल, कधी महागड्या उपहारगृहात जाण्याची हौस, अगदी प्रेमाच्या जोरावर दरमहा तुमच्याकडून खर्चासाठी मोठी रक्कम वसूल करणे.

जर तुमच्या मैत्रिणीची ही सवय झाली असेल तर आधी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तरीही तिला समजत नसेल तर हे नाते तोडणेच योग्य ठरेल, अन्यथा तुमच्या पैशांची लूट होईल, कारण हा तिचा स्वार्थ असेल प्रेम नसेल.

लक्ष द्या

शोऑफ टाळा : बरीच मुले मैत्रिणीवर रुबाब झाडण्यासाठी कधी तिला स्वत:कडील पैसे दाखवतात तर कधी महागड्या उपहारगृहात घेऊन जातात. त्यामुळे ती प्रियकराला श्रीमंत समजून लुटायला लागते, पण हेच पुढे त्याच्या त्रासाचे कारण ठरते, कारण तिच्या रोजच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नात्यात शोऑफला थारा देऊ नका, जेणेकरून भविष्यात हे नाते ओझे बनणार नाही.

तिलाही संधी द्या : प्रेम खरे आहे की, हा सगळा पैशांचा खेळ आहे, याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही खर्च करण्याची संधी द्या. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती पैसे देत असेल तर तिला रोखू नका, कारण यामुळे तिचे खरे रूप तुमच्या समोर येणार नाही. त्यासाठी तुम्ही उपहारगृहात जाऊ शकता. बिल आल्यावर घाईत पर्स आणायला विसरलो, असे सांगून तिच्याकडून बिलाचे पैसे काढू शकता.

मी पैसे दिले तर बिघडते कुठे? असे विचारत तिने आनंदाने पैसे दिले तर समजून जा, तुमचे नाते थोडे तरी खरे आहे. याउलट बिल भरल्यावर ती काहीशी नाराजीने तुमच्याशी बोलली तर समजून जा की, तिला फक्त तुमच्या पैशांवर मजा मारायची आहे.

तुमची कमाई फक्त तुमची आहे : कदाचित तुमचे कुटुंब सधन असेल आणि तुम्हीही चांगली नोकरी करत असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मैत्रिणीने विचार न करता फक्त तुमची कमाई वाया घालवावी. कधी, कुठे आणि किती खर्च करायचा, हे तुम्हीच ठरवायला हवे. चांगला कमावतोस तरीही इतका कंजूषपणा कशाला? असे तुमची मैत्रीण विचारत असेल तर तिला सांगा की, हा कष्टाचा पैसा आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हाच मी तो खर्च करतो. मी जे कमावले आहे ते उडवून दिले तर माझ्या भविष्याचे काय? असा थेट प्रश्न विचारून स्वत:ची भूमिका मांडा. यामुळे तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्यावर पैसे खर्च करायला लावणे तितकेसे सोपे नाही.

गरज समजून घ्या : मैत्रीण म्हटले म्हणजे ती पैसे उकळणारच किंवा प्रत्येकवेळी तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच ती एखादी मागणी करत असेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कधी-कधी गरजेपोटी तिला तुमच्याकडून काहीतरी मागावे लागू शकते. अशावेळी तुम्ही त्याबद्दल तिला लगेच बोलू नका, तर तिचे म्हणणे ऐकून घ्या आणि गरज समजून घ्या. हीदेखील तुमची जबाबदारी आहे.

तुम्हाला वाटत असेल की, तिची मागणी न्याय्य आहे आणि ती तुमच्या खिशाला परवडणारी असेल तर तिला मदत करा, कारण गरजेच्यावेळी तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवलीत तर मजबूत नात्यासाठी ते योग्य ठरणार नाही.

आजन्म टिकावं नातं

* ओ. डी. सिंह

पतीपत्नी एकमेकांसोबत गोड क्षणांचं सुख तर अनुभवतातच, पण कडवटपणादेखील एखाद्या आव्हानासारखा त्यांना एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात राहण्याची प्रेरणा देतो. विवाहपद्धतीविना हे जग एक तमाशा बनून राहिलं असतं. मात्र विवाहाने स्त्री पुरुषाच्या संबंधांना समाजात एक स्थायी स्थान दिलं आहे. पाश्चिमात्य देशात आधी ओळख मग प्रेम आणि मग लग्न होत असे, पण आपल्याकडे आधी लग्न आणि मग प्रेम व्हायचं. उत्तर भारतात अजूनही दोन अनोळखी कुटुंबांमध्ये मुलामुलींचं लग्न जुळतं. मात्र अलीकडे होणाऱ्या बुहतांश लग्नांमध्ये मुलंमुली एकमेकांना आधीपासूनच ओळखू लागतात. आपापसांत प्रेम होतं की नाही हे जरूरी नाही, प्रेमविवाहांना प्राधान्यही दिलं जाऊ लागलं आहे.

नातं टिकावं आनंदाने

लग्न कोणाचंही असो, कुठेही असो, एक गोष्ट तर नक्की आहे की मुलामुलीने एकमेकांना ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य प्रेमाने एकत्र आणि दिर्घ काळ टिकवायचं असतं. आयुष्यात आनंद काही बाहेरून येत नाही. दोघांनी मिळून मिसळून एकमेकांच्या भावनेची कदर करीत सर्व कामं पूर्ण करायची असतात शिवाय हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही दोघांची इच्छा असेल. घरातील कोणत्याही कामाची जबाबदारी कोणा एकाची नसते. ही गोष्ट वेगळी आहे की सवलतीसाठी आपण काही कामं वाटून घ्यावीत. काळानुरूप बदल घडू लागला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पती ही गोष्ट समजू लागले आहेत.

भांडणाचं कारण

मतभेदाच्या कारणांवर जर नजर टाकली तर असं दिसून येईल की अनेक प्रकरणांमध्ये एक तर एकमेकांच्या कुटुंबांवरून भांडणं होतात किंवा पती पत्नीच्या आयुष्यात कोणी दुसरी वा दुसरा येतं. लग्नानंतर पत्नीला आडनाव तर पतीचंच लावावं लागतं. मात्र आता काही पत्नी माहरेचं आडनावही रिटेन करतात. अनेक कुटुंबांमध्ये असं पाहायला मिळतं की मुलगा आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने आपल्या पत्नीच्या आवडी नावडी विषयी सांगू शकत नाही. उलट प्रत्येकवेळी तो पत्नीलाच गप्प करतो. अशावेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच पुढे काही होऊ शकेल. कोणत्याही परिस्थित आधी पती पत्नीचं नातं विश्वसनीय असायला हवं, तेव्हाच वातावरण चांगलं बनतं आणि मुलावर चांगले संस्कार होतात.

असंही पाहण्यात येतं की आईवडिल जुन्या युगातील लग्नाशी मुलांच्या लग्नाची तुलना करतात, जे की चांगलं नाही. आधी भांडणं होण्याचे प्रसंगच येत नव्हते. पतीला देव समजलं जायचं, त्याने जो निर्णय घेतला तोच पत्नीला मान्य असायचा. पण आता युग बदललं आहे. मुली शिकून सवरून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि भरपूर पैसा कमवत आहेत. पती पत्नीचं नातं रक्ताचं नातं नसूनही आयुष्यात फार महत्त्वाचं ठरतं. मात्र जे लोक या नात्याचं महत्त्व न समजून घेता, याला खेळ समजतात, एकमेकांच्या भावनेला ठेच पोहोचवतात, त्यांच्याइतका महामूर्ख कोणीच नसेल आणि तिथे कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ येणं तर स्वाभाविकच आहे.

ना सासर तुरूंग ना तुम्ही कैदी

* अनुराधा गुप्ता

प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न, प्रत्येक मुलीच्या मनात सासर विषयी थोडी भीती असतेच. अनेकदा तर ही भीती काळजीचे रूप धारण करते. पण समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा मुलीच्या मनात सासरच्यांविषयी नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ लागतो. अशा स्थितीत कुठलाही आधार नसतानाही मुलगी भावी सासरच्यांमंडळींमध्ये उणिवा शोधू लागते.

मॅरेज काऊंसेलर डॉ. वीरजी शर्मा सांगतात, ‘‘मुलींमध्ये सासरबद्दल भीती असणे स्वाभाविक आहे. पण अनेकदा ही भीती इतकी वाढते की मुलगी स्वत:च काही कल्पना रचून असा विचार करून ठरवून टाकते की सासरचे त्या स्थितीत तिच्यासोबत कसे वागू शकतील. जास्तीत जास्त मुली नकारात्मक विचारच करतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले की मुलीला सासरच्या सर्व सदस्यांचे स्वभाव माहीत असावेत व दुसरे हे की होणाऱ्या सासरच्यांबद्दल तिला काहीही माहीत नसावे.’’ दोन्हीही परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता तिला घेरून टाकतात. अशा काही चिंतांमधून कसा मार्ग काढावा यासाठी काही उपाय…

स्वत:ला व्यक्त न करू शकण्याची भीती

हे तर स्पष्टच आहे की सासरची जागा आणि माणसे दोन्ही मुलीसाठी अनोळखीच असतात. अशावेळी प्रत्येक मुलीला सासरच्या कुठल्याही सदस्याकडे आपल्या इच्छा, समस्या आणि भावना व्यक्त करण्यासाठी संकोच वाटतो. उदाहरण म्हणून एका नववधूचा चेहरा पाहण्याच्या विधीबद्दल बोलायचे झाले तर या विधिमध्ये काही कमतरता आहेत तर काही लाभसुद्धा आहेत. त्यातील लाभ हा आहे की घरातील नवी सदस्य झालेल्या नववधूला भेटण्याची, ओळख करून घेण्याची संधी सर्व नातेवाईकांना मिळते, तर उणीव अशी की दमलेली वधू लोकांच्या त्या गर्दीत स्वत:ला असुरक्षित समजू लागते.

या विधीव्यतिरिक्त असेही काही प्रसंग येतात, जेव्हा मुलगी तिच्या मनातील भावना सासरच्यांसमोर व्यक्तही करू शकत नाही आणि निराशेसह त्यांच्या म्हणण्यानुसार मान डोलावत राहते. डॉ. वीरजी याबाबत सांगतात, ‘‘लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसात ही समस्या प्रत्येक मुलीला असते. पण ही काही कायमस्वरूपी नसते. पहिली बाब म्हणजे आपल्या मनातील बोलणे हा काही गुन्हा नाही. जर योग्य पद्धतीने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले तर सर्वजण त्याला पाठिंबा देतात. सासरच्यांसमोर हळूहळू खुलण्याचा प्रयत्न मुलीला स्वत:लाच करावा लागतो. यात तिला कोणी मदत करू शकत नाही.’’

स्वातंत्र्य हिरावले जाण्याची भीती

लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हा प्रश्न नेहमी येतोच की लग्नानंतरही सासरी माहेरच्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळेल का? डॉ. वीरजी सांगतात, ‘‘लग्न नव्या नात्यांचे मिलन आहे. बंधन नाही. नव्या नात्यांच्या काही अपेक्षाही असतात आणि त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण नात्यांचे बंध एकमेकांना समजून आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच घट्ट होतात. ही जबाबदारी फक्त मुलीचीच नसते. सासरचेही मुलीच्या आवडी निवडीचा विचार करतात म्हणून स्वत:ला सासरी कैदी समजू नये.’’

अनेकदा मुलींना याबाबत सतत भीती वाटत असते की सासरी आवडीचे जेवण, कपडे, फिरणे या सर्वांवर बंधने आणली जातील. इतकंच नव्हे तर काही करण्याआधी सासू सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि मोठ्यांची परवानगी घ्यायला हरकत काय आहे? माहेरीसुद्धा मुली काही करण्याआधी आईवडिलांना विचारतातच आणि हे फक्त मुलींबद्दलच नाही तर प्रश्न अधिक अनुभव आणि कमी अनुभव असण्याचा आहे. सासू सासऱ्यांना मुलीपेक्षा अधिक अनुभव असतो. एखाद्या अनुभवावरूनच ते एखादे काम काम कर अथवा नको करू असे म्हणत असतील तरी यात तुमचे भलेच आहे. ही बाबही लक्षात ठेवा, जर सुनेने तिच्या निर्णयांमध्ये सासरच्यांना सहभागी करून घेतले तरच तेसुद्धा प्रत्येक कामात तिच्या मताला महत्त्व देतील.

घरातील काही नियम असतात त्यांना अनाठायी म्हणणे चुकीचे ठरेल. नियमांचे पालन केल्याने जीवनशैली शिस्तप्रिय बनते. हे नियम घरातील प्रत्येक सदस्यासाठी सारखेच असतात. म्हणून हे वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. अशाच प्रकारे सासर म्हणजे तुरूंग आहे व प्रत्येक वेळी तिथल्या कैदेतून बाहेर पडण्याचा विचार करू नये. कारण हा विचार जर केलात तर तुम्हाला सून म्हणून सासरी कधीच स्वत:ची जागा निर्माण करता येणार नाही.

कुटुंबातील व्यक्तींच्या हस्तक्षेपाची काळजी

‘भांड्याला भांडे लागणारच’ ही म्हण गृहस्थ जीवनाला अगदी साजेशी आहे. कुटुंब एका व्यक्तीने बनत नाही तर अनेक व्यक्ती एकत्र आल्याने कुटुंब बनते. ज्या घरात ४-५ लोक असतात, तिथे परस्परांमध्ये सल्लामसल्लत करूनच प्रत्येक काम केले जाते. याला हस्तक्षेप समजण्याची चूक करू नये. कधी असेही होऊ शकते की तुमच्या सल्ल्याविरोधात काही निर्णय घेतले जातील, पण त्यात इतर कुटुंबीयांची सहमति असू शकेल. याला कुटुंबीयांचा हस्तक्षेप म्हणू शकत नाही. जेव्हा मुली माहेरी असतात, तेव्हा आईवडिलांनी घेतलेल्या हरकती त्यांना हस्तक्षेप वाटत नाहीत. कारण तिथे त्यांचे नाते भावनात्मक असते. सासरच्यांशी भावनात्मक रितीने जोडण्यात थोडा वेळ लागतो. म्हणून त्यांची प्रत्येक बाब हस्तक्षेप वाटतो.

पण अनेकदा सासरी काही लोक नव्या सुनेवर वचक ठेवण्यासाठी तिच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवावे. जर सासूसासऱ्यांची गोष्ट असेल तर त्यांच्यात आणि तुमच्यात एक सीमा रेषा आखावी. त्यांचे जे बोलणे सहज सोपे वाटेल ते ऐकले जाऊ शकते, ते जरूर ऐकावे. पण जे स्विकारार्ह नसेल तर आदराने त्यांना स्पष्ट नकार द्यावा.

अनैच्छिक जबाबदाऱ्या पेलण्याचे ओझे

नव्या नात्यांसोबत नव्या जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात हे स्विकारा. पण काही नाती मनापासून सांभाळण्यास थोडा त्रास होतो. अशा नात्यांमध्ये संबंधित जबाबदाऱ्या जोपासणे ओझे वाटू लागते. विशेषत: नणंद आणि जाऊ यांच्यातील कडू गोड नात्यांच्या गोष्टींनी कल्पनांनी मुली आधीच भांबावलेल्या असतात. उरलीसुरली कसर टीव्हीवरील सासूसुनांच्या भाडणांच्या आणि घरगुती वादाच्या मालिकांनी भरून काढलेली असते. मग मुलींच्या मनात नणंद, जाऊ व सासूच्या त्याप्रमाणे प्रतिमा निर्माण झालेल्या असतात.

पण वास्तविक ही नाती निभावणे इतकेही कठिण नसते. हे स्पष्टच आहे की पतिशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा उत्साह मुलींमध्ये असतो. पण सासरच्या सदस्यांबद्दल मात्र तो नसतो आणि नकारात्मक विचार चांगल्यालाही वाईट बनवू शकतात. नणंद, जाऊ आणि सासू सासरी नव्या सुनेसाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. ही नाती रूसव्या-फुगव्यांची आहेत खरी, पण ही नसतील तर गृहस्थ जीवन फिके आहे.

जीवनशैली बदलण्याची भीती

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका नव्या बदलाचा सामना करावा लागतो. लग्नानंतर स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल घडून येतात. पण मुलींना लग्नाआधीच याबद्दल खूप भीती असते. याचे मुख्य कारण आहे वडिलांचे घर साडून पतिच्या घरी जाणे. सर्व घरातील नियम कायदे वेगळे असतात, राहणीमान वेगळं असतं. यामध्ये स्वत:ला सामावून घेणे प्रत्येक मुलीसाठी अवघड असतं.

घरात एका वेगळ्या वातावरणातून आलेल्या नव्या सूनेसोबत ताळमेळ बसवणं सासरच्यांसाठीही सोपं नसतं. आपल्या घरातील वातावरणामध्ये सुनेला सामावून घेणं हे सासरच्यांसाठीही एक आव्हान असतं. पण उभय पक्षांनी जर सोबत मिळून पुढे पाऊल टाकलं तर हे बदल चांगले वाटू लागतात.

अशाचप्रकारे सासर आणि सासरच्यांशी संबंधित अनेक बाबी असतात, ज्या लग्नाच्या आधीच मुलींना नकारात्मक विचार करायला भाग पाडतात. पण अशा नकारात्मक विचारांनी नव्या नात्यांची सुरूवात केली तर वाईट परिणामच दिसतात. म्हणून सकारात्मक विचार करावा. मग तुम्हाला अशक्य परिस्थितीमध्येही प्रकरणे सोडवण्याचा मार्ग मिळेल आणि सासरच्या प्रत्येक सदस्यांसोबत ताळमेळ बसवणे सोपे होऊन जाईल.

मुलगा पाहताना या 17 गोष्टी लक्षात ठेवा

* पारुल भटनागर

आता ती वेळ राहिली नाही जेव्हा तरुण मुलीला भेटायला जायचा आणि तिच्या आवडीनिवडी सांगायचा. बदलत्या काळात आता फक्त तरुणच नाही तर मुलगीही त्या मुलाला बघायला जाते आणि तो कसा दिसतोय अशा दहा गोष्टी लक्षात आणून देतो. त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे? शरीरयष्टी ठळक आहे की मामाचा मुलगा नाही? इत्यादी

आज मुलींना समान वाटा मिळाल्यामुळे कोणत्याही बाबतीत तडजोड करणे आवडत नाही. तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत राहायचे आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शक्य तितके माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आणखी शंका नाही.

अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मुलाला भेटायला जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतः असे काहीही करू नका ज्यामुळे तुमचे नकारात्मक व्यक्तिमत्व दिसून येईल.

  1. जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाला पहिल्यांदा भेटता तेव्हा त्याच्या देहबोलीकडे विशेष लक्ष द्या. याच्या मदतीने तुम्हाला त्याच्या अर्ध्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येईल. बोलत असताना, बोलण्यापेक्षा तो हात पाय तर हलवत नाही ना ते पहा. बोलत असताना चेहऱ्यावर विचित्र प्रतिक्रिया येत नाहीत. यामुळे तुम्हाला त्याचा न्याय करणे खूप सोपे होईल.
  2. बोलत असताना या गोष्टीकडे लक्ष द्या की जर तो तुझ्याशी बोलू लागला नाही तर यार, मला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे, तू आज खूप गोंडस दिसत आहेस. जर तुम्ही असे म्हणत असाल, तर समजून घ्या की तो तुमच्यासाठी लायक तरुण नाही, कारण पहिल्याच संभाषणात तुम्ही भविष्यात त्याच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करू शकत नाही.
  3. जरी त्या तरुणाचे सॅलरी पॅकेज खूप चांगले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याच्या प्रत्येक गोष्टीत पगाराचा उल्लेख आहे. जसे आम्हा दोघांचे लग्न झाले तर तुम्ही ऐश कराल, तुम्हाला ब्रँडेड वस्तू वापरण्याची संधी मिळेल, कारण मी ऑफिसच्या कामासाठी परदेशात जात राहते. यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्याला त्याच्या पगाराचा अभिमान आहे.
  4. तरुणाला जाणून घेण्यासोबतच त्याच्या कुटुंबालाही एका नजरेत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ते ज्या पद्धतीने संवाद साधतात त्यावरून तुम्हाला समजेल की ते विचारांचे लोक आहेत. तुम्ही मुलीला नोकरी मिळवून देण्याच्या बाजूने आहात की नाही? ते घरातल्या मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्त्व देत नाहीत. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यास तुम्हाला निर्णय घेणे खूप सोपे जाईल.
  5. चर्चेत कुठेही हुंड्याचा संकेत नाही. आमच्या मोठ्या सुनेने लग्नात सर्व काही आणले होते, आमचा मुलगा वर्षाला 15 लाख रुपये कमावतो, आमच्याकडे लग्नात नातेवाईकांची विशेष काळजी घेण्याची प्रथा आहे. तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते तुमच्या मुलीलाच द्यायचे आहे, आम्हाला काही नको आहे अशा गोष्टी जर बैठकीत होत असतील तर समजा त्यांना मुलीपेक्षा हुंड्यात जास्त रस आहे.
  6. तुमचे कुटुंबीय मुलीला तुमच्याशी बोलण्यास सांगत आहेत आणि जर तिने आईची परवानगी घेऊन स्वतःला मामाचा मुलगा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तर समजून घ्या की त्या मुलाचे स्वतःचे कोणतेही व्यक्तिमत्व नाही आणि प्रत्येक गोष्ट आईवर अवलंबून आहे.
  7. जर थोडे गंभीर बोलले तर तो सरळ कपड्यांवर येतो जसे की मला सूट वगैरे आवडत नाही. माझ्या आयुष्याच्या जोडीदाराने नेहमी गरम कपडे घालावेत, हे तुम्हाला समजण्यास मदत करेल की त्याला तुमच्यापेक्षा लहान कपड्यांमध्ये जास्त रस आहे, जे सुखी वैवाहिक जीवनासाठी योग्य नाही.
  8. असे आहे का की पहिल्या भेटीतच तो तरुण तुमच्याशी भविष्यातील प्लॅनिंगबद्दल बोलू लागतो की लग्नानंतर आपण एकटे राहू, अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी मॅनेज करू, मला मुलगे खूप आवडतात.त्याची मॅच्युरिटी कळते.
  9. हे आवश्यक नाही की जेव्हा आपण अशा मीटिंगसाठी कुठेतरी बाहेर जातो तेव्हा नेहमी मुलीच्या व्यक्तीने बिल भरले पाहिजे. तुमचे आई-वडील बिल भरू देत नसले तरीही हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ बिल भरू नका. जर त्याने एकदाही बिल भरण्याचा उल्लेख केला नाही, तर समजा तो फक्त फुकट खाण्यापिण्याच्या तत्त्वाचे पालन करणार आहे.
  10. तुम्ही खूप हुशार असलात तरीही, पण याचा अर्थ असा नाही की मुलाचे गुण बघण्याऐवजी त्याच्या स्मार्टनेसच्या आधारे त्याला गुण दिले पाहिजेत. आपण एक गोष्ट गृहीत धरू की स्मार्टनेस काही दिवसांसाठीच चांगला दिसतो, त्यानंतर आयुष्य माणसाच्या गुणांच्या जोरावरच चालते. त्यामुळे बाह्याबरोबरच आतील व्यक्तिमत्त्वही लक्षात ठेवा.
  11. हे आमच्या घरात घडते, आम्ही असे राहतो, आम्ही ते खात नाही, आम्ही तीळ सोडून इतर कोठूनही खरेदी करत नाही. तुमचं राहणीमान खूप उंच असलं तरीही तुम्ही एखाद्या माणसाशी अशा गोष्टी केल्या तर तुम्ही कितीही देखणा असलात तरी तो तुमच्याशी लग्न करणार नाही.
  12. समजा मुलींना शॉपिंगची आवड आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 20 मिनिटांत 15 मिनिटे खरेदी केल्यानंतरच तरुणाशी बोला. जसे की मी आठवड्यातून एकदा खरेदीला जाईपर्यंत मला आराम वाटत नाही, तुम्हाला खरेदी करायला आवडते का? आमचं लग्न झालं, तर दर वीकेंडला तू माझ्यासोबत शॉपिंगला जाशील का? अशा गोष्टींमुळे तुम्हाला लग्नापेक्षा शॉपिंगमध्ये जास्त रस असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे तुमचे नकारात्मक व्यक्तिमत्व दिसून येईल.
  13. आज सोशल मीडियाचे युग आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचे सर्वत्र वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मुलाशी बोलत असता तेव्हा तुम्ही सोशल साइट्सवर सक्रिय आहात की नाही हे विचारू नका. जर होय तर तुमचा आयडी द्या म्हणजे मी तुम्हाला माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये समाविष्ट करू शकेन. यातून हाच मेसेज पोरांना जाईल की तू सोशल मीडियाचा किती वेडा आहेस, तेव्हाच तू सोशल मीडियाला अशा गंभीर चर्चेत आणले आहे.
  14. जेव्हा तुम्ही त्या मुलाला भेटायला जाल तेव्हा त्याचा बायोडाटा नीट वाचा की तो कुठे काम करतो, कोणत्या कंपनीत काम करतो, त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि कोण काय करते. त्याच्या कंपनीची आणि पदाचीही माहिती ठेवा. यासह, जेव्हा तो त्याच्या कंपनीबद्दल सांगत असेल, तेव्हा त्याला तुमच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
  15. पहिल्या भेटीतच तुमचा नंबर त्याच्याशी शेअर करू नका, कारण तुम्हाला काय माहिती आहे की मॅटर होईल की नाही. तेव्हा ही गोष्ट तुमच्या पालकांवर सोडा, कारण तुमचे नाते असेल तर पालक स्वतःच तुमचा नंबर घेतील जेणेकरून तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळेल.
  16. जर वडिलधाऱ्यांनी कोणत्याही विषयावर बोलत असेल की आपण आपल्या गावीच लग्न करणार आहोत, अशा स्थितीत, मध्येच पाय लावू नका, काकू, असे होणार नाही. तुमच्या या वागण्याने तुमचा उद्धटपणाच दिसून येईल, त्यामुळे गरज असल्याशिवाय मध्येच बोलू नका.
  17. जर तुम्हाला त्या मुलाची एखादी गोष्ट आवडत नसेल तर लगेच रागावू नका पण शांतपणे तुमचा मुद्दा ठेवा, यामुळे त्याच्यावर चांगला प्रभाव पडेल आणि त्याला असे वाटेल की तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे समायोजित करायच्या आहेत.

अशा रीतीने तुमचा जीवनसाथी निवडण्यात तुम्हाला सोपे जाईल.

अशा प्रकारे विवाहित जीवन साजरे करा

*डॉ रेखा व्यास

गेल्या एका जागतिक पुस्तक मेळ्यात पोलंड हा सन्माननीय देश होता. पोलंड पॅव्हेलियनमध्ये हिंदी बोलणारे लोक खूप आकर्षित होत होते. त्याला काही शब्दच आठवले होते असे नाही, तर तो मनापासून अस्खलितपणे हिंदी बोलत होता. त्याचवेळी एस कुमारी याहन्ना यांनी सांगितले की पोलंडमध्ये भारताच्या परंपरा आणि कुटुंबाचा खूप आदर केला जातो. दुसऱ्या महायुद्धात भारताने पोलंडलाही याची ओळख करून दिली. भारताने या महायुद्धात अनाथ झालेल्या 500 मुलांचे संगोपन केले. याबद्दल खूप आदर आहे. पोलिश लोक जेव्हा जेव्हा बलात्कार, भ्रूणहत्या, मोडलेले लग्न किंवा तत्सम कौटुंबिक मूल्यांच्या विघटनाच्या भारतीय बातम्या वाचतात किंवा पाहतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

दीर्घ विवाह उत्सव

पोलंडमध्ये 60 च्या दशकापासून विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या जोडप्यांना राष्ट्रपती पदक दिले जाते. हा कार्यक्रम पोलंडच्या राजधानीत आयोजित केला जातो, परंतु पोलंडच्या इतर अनेक शहरांमध्ये या प्रकारच्या कार्यक्रमाची परंपरा आहे.

या निमित्ताने पोलंडच्या राजधानीत खळबळ उडाली आहे. चांदीच्या रंगाच्या मेडलियनवर प्रेमाचे प्रतीक गुंफलेले गुलाब आणि गुलाबी फितीने बांधलेली फुले जोडप्याच्या प्रेमाचे प्रतीक आहेत. रेड कार्पेटवर चालताना या जोडप्याला हा सन्मान मिळाल्याचा अभिमान वाटतो.

इतके दिवस सोपे नाही

अर्धशतक कमी होत नाही. त्यासाठी आपुलकी, आदर, आरोग्य, समर्पण इत्यादी सर्व गुणांची गरज आहे.

जेव्हा आम्ही रिलेशनशिप कौन्सेलर निशा खन्ना यांना विचारले की, प्रत्येक जोडप्याला असे यशस्वी वैवाहिक जीवन जगता यावे यासाठी जोडप्यांमध्ये कसे जुळते? तर यावर ते म्हणाले की मुलांचे संगोपन चांगले पालकत्वाने झाले पाहिजे. ते मुलांना हुशार बनवतात तसेच त्यांना प्रौढ बनवतात. आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठी नाती बांधतो. पूर्वी ही गोष्ट बाहेरच्या लोकांसाठी होती, पण आता ती वैयक्तिक, परस्पर आणि घरगुती संबंधांमध्येही खूप काही करत आहे. त्यामुळे नात्यातील लहानसहान गोष्टींमुळे तणाव, राग, चीड, ब्रेकअप, घटस्फोट आदी प्रकार सर्रास होत आहेत. पूर्वी स्त्रिया दडपल्या जायच्या. ती पतीला देव मानत असे, पण आता बदलत्या मूल्यांमध्ये तिला दाबणे सोपे नाही.

आपल्याकडेही ही परंपरा आहे

लग्नाचा रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागला आहे. गुजरातमधील नडियाद येथील एका जोडप्याने सांगितले की, ५२ वर्षांपूर्वी आमचे गावात लग्न झाले. जुन्या चालीरीती पाळायच्या होत्या. पण लग्नाच्या सुवर्णमहोत्सवात आम्ही आमची नवी स्वप्ने पूर्ण केली. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आम्ही नवीन जोडप्यांप्रमाणे बसलो आणि भरपूर फोटोज दिले. त्यांनी एकमेकांना पुष्पहारही घातला. दूरचे नातेवाईक आणि मित्र आले. आम्ही उत्साहाने भरून गेलो. नव्या आणि जुन्या पिढीतील भेद पुसला गेला. मात्र येथे अशा घटनांमध्ये वाढती ढोंग सुरू आहे, त्याला आळा घालणे गरजेचे आहे.

कॉर्पोरेट हाऊसमधील एका जोडप्याने सांगितले की, आम्ही आपापसात पुन्हा लग्न केले. भूतकाळात घटस्फोट घेण्याच्या आमच्या चुकीची आम्हाला लाज वाटते. आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला, पण दोघेही बराच काळ लग्नाशिवाय राहिले. एक वेळ अशी आली की ते एकमेकांना मिस करू लागले. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, घरातील लोकांचा हस्तक्षेप नव्हता, वैयक्तिक नात्यातली दुरवस्था नव्हती, तरीही लहानसहान भांडण, राग, सूड अशा भावना प्रबळ होत्या. मग दोघांनाही वाटायचं की कमावणं हे कोणावर अवलंबून नसतं, मग नतमस्तक होऊन दु:ख का? यामध्ये आपण हे विसरलो आहोत की केवळ कागदी पैसा किंवा सुखाचे साधन सुख देत नाही. मग आम्ही औपचारिकपणे भेटलो, समुपदेशन घेतले आणि पुन्हा लग्न केले. घरच्यांनी खूप काही सांगितलं. आम्ही लग्नाच्या २६व्या वर्षी एक कार्यक्रम केला आणि त्यात आमचे अनुभव सुचवले. इतकंच नाही तर आम्ही आमच्या चुका मान्य केल्या आणि एकमेकांची योग्यताही मनातून सांगितली. जोडप्यांचे अनुभव ऐका.

एक कर्नल सांगतात की आपण आयुष्यात अनेक धोके आणि धोके पाहिले आहेत. 2 युद्धात सीमेवर गेले. त्यामुळे कौटुंबिक आणि जीवनातील आनंदाचे मूल्य अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेता आले. माझ्या पत्नीने सुरुवातीच्या काळात माझ्या मुलांना एकट्याने वाढवले. सामाजिक समारंभात मी नेहमीच त्यांचे आभार मानायचे.

त्याची बायको म्हणते की तो उत्सवी आहे. आई वडिलांच्या 50 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 50 जोडप्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मी 40 वर्षांची झाल्यावर ‘लाइफ बिगिन्स आफ्टर पार्टी’ नावाची पार्टी टाकली. नुकताच त्यांनी आपल्या गावात आणि शेतात ‘साठा सोपा मार्ग’ या शिर्षकाने आपला 60 वा वाढदिवस ग्राम्य शैलीत साजरा केला.

परिपक्वता कालावधी

लग्नाचे सुरुवातीचे दिवस व्यस्तता, अपरिपक्वता आणि वेगवेगळ्या स्वभावांनी भरलेले असतात. पण नंतरचे दिवस बऱ्यापैकी स्थिरावले. सिंघल दाम्पत्य सांगतात की, एके काळी आम्ही आईला रेसिपी विचारून मुंबईत चुलीवर अन्न शिजवायचो. 50 व्या वर्धापनदिनापर्यंत, आमची सर्व मुले स्थायिक झाली होती, म्हणून आम्ही संपूर्ण युरोपमध्ये फिरलो. कूलरसाठीही पैसे कुठे नव्हते?

उन्हाळ्याच्या रात्री चादर ओल्या करून काढायचो. त्यामुळे गरजेच्या वस्तू दान करून जुने दिवस साजरे केले. लग्नाचा 50 वा वर्धापनदिन साजरा केल्याने खरे जीवन काय आहे याची जाणीव झाली. आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं. चांगली मेहनत, प्रेमळ साथ, दु:ख, संघर्ष, अंतर इत्यादी आयुष्याला खूप काही देतात. खरे सांगायचे तर, आम्ही या कार्याद्वारे आमच्या जीवनातील आनंदाचे अभिनंदन केले आहे.

तनमनधन समन्वय आवश्यक आहे

वैवाहिक जीवनात वयाबरोबर गरजा आणि भावनाही वेगळा दृष्टिकोन घेतात. एका जोडप्याने सांगितले की, सुरुवातीला खूप भांडण झाले. क्वचितच असे काही असेल ज्यावर आपण भांडण न करता सहमत होऊ शकलो आहोत. एकदा बायको मुलाला रागाने ५ दिवस माझ्याकडे सोडून निघून गेली. मग जेव्हा मी मुलाला वाढवले, तेव्हा माझा अहंकार लपून बसला. अहंकार विसरून मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला दिसले की मी त्यांना सर्व विसरलो आहे. तेव्हापासून आम्हाला वाटले की आम्ही लढणार नाही. तो दिवस आणि आजचा दिवस आहे, मनाच्या प्रेमाशिवाय शरीराच्या प्रेमाचा आनंद मिळत नाही आणि पैशाशिवाय दोन्ही परिस्थिती अपूर्ण आहेत. त्यामुळे मीही घरच्या शांततेत व्यवसाय केला. सुखासाठी पैसाही आवश्यक असतो, पण आनंद पणाला लावून मिळवलेला पैसा निरर्थक वाटतो. हे आम्ही प्रत्येक जोडप्याला समजावून सांगतो. लहान आनंद शोधायला शिकले पाहिजे. मोठ्या आनंदाचा मार्ग मोकळा करण्यात छोट्या गोष्टी प्रभावी भूमिका बजावतात.

इतर देशांमध्येही अशी परंपरा आहे

विवाह संस्था ही सुसंस्कृत समाजाची सर्वात जुनी संस्था आहे, जी सृष्टी आणि जग योग्य प्रकारे चालवते. सामान्यतः आपण चांगले वैवाहिक संबंध हे आपल्या किंवा आशियाई देशांचा वारसा मानतो, परंतु संपूर्ण जग चांगल्या गोष्टींचे, परंपरांचे आणि संस्कारांचे खुल्या मनाने स्वागत करते.

पाश्चात्य देशांतील कौटुंबिक मुळे येथे कमकुवत मानली जातात. मुक्त लैंगिकतेमुळे समाज हा मुक्त आणि उच्छृंखल समाज मानला जातो. पण कौटुंबिक मूल्यांवर त्यांचा विश्वास नाही असे नाही. होय, विवाह पार पाडण्यासाठी कोणताही आग्रह, द्वेष किंवा लादणे आवश्यक नाही किंवा इतर नातेवाईकांकडून इतका हस्तक्षेप नसावा की त्यांच्या इच्छा आणि इच्छांचा विवाहाच्या प्रगतीवर परिणाम व्हावा. 7 पिढ्यांसाठी पैसे जोडून पोट कापून मुलाला मौजमजा करू द्यायची प्रथा नाही, पण तिथेही चांगला विवाह होणे हे कौतुकास्पद मानले जाते. निवडणूक उमेदवाराच्या कौटुंबिक आचरणामुळे त्याची प्रतिमा निर्माण होते. ज्यांना घर चालवता आले नाही, ते देश काय चालवतील, याचा प्रत्यय पावलापावलावर दिसतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा पत्नी आणि मुलांसोबत सुट्टी घालवताना दिसत आहेत.

अमेरिकेत लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना, व्हाईट हाऊस (राष्ट्रपती भवन) मधून जोडप्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवले जातात. इंग्लंडमध्येही राणीकडून लग्नाला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन पाठवले जाते.

गरज असल्यास

अर्थात, परदेशातील देशातील प्रथम नागरिक आणि मान्यवरांनी या जोडप्याचे केलेले अभिनंदन पाहावे अशी आमची इच्छा आहे. ते आपल्या देशातही व्हायला हवे. पण राष्ट्रपती हवे असले तरी हे सर्व इतके सोपे नाही, कारण लग्नाची नोंदणी पूर्ण झालेली नाही. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना त्यांच्या लग्नाची आणि जन्माची नेमकी तारीख माहित नाही.

रीतसर नोंदणी केल्यास संबंधित विभाग अशा जोडप्यांना आपापल्या शहरात शुभेच्छा देऊ शकतो. त्याचप्रमाणे मृत्यू नोंदणीदेखील मजबूत असावी जेणेकरून योग्य माहिती नसल्यामुळे परिस्थिती गोंधळात पडू नये. त्याचप्रमाणे, निरोगी आणि मोबाइल जीवनदेखील अशा प्रसंगांना अधिक ऊर्जा आणि उत्साहाने भरते, ज्यामध्ये जीवन ओझे आणि वेदनादायक नसते. अन्यथा, बळजबरी किंवा नुसते दिवस त्याला तितका आणि तितका आनंद घेऊ देत नाहीत ज्यासाठी मन तळमळते किंवा उत्साही राहते.

जेव्हा पती-पत्नीमध्ये तिसरा येतो

* भारतभूषण श्रीवास्तव

अमृता प्रीतम ही पहिली साहित्यिक आहे जिच्या साहित्यापेक्षा त्यांच्याशी निगडित प्रेमप्रकरणे जास्त वाचली जातात. आजच्या तरुणांना हे जाणून आश्चर्य वाटेल की एकत्र राहण्याची प्रथा प्रत्यक्षात अमृता प्रीतमने सुरू केली होती जी तिच्या एका प्रियकर इमरोजसोबत 40 वर्षे एकाच छताखाली राहत होती.

पण ती तिच्याच काळातील प्रसिद्ध गझलकार साहिर लुधियानवी यांच्यावरही प्रेम करत होती आणि याआधीही ती तिचा विवाहित उद्योगपती पती प्रीतम सिंग यांच्यावर प्रेम करत होती, म्हणूनच तिने तिचं तखल्लूस म्हणजेच प्रीतम हे आडनाव कधीच काढलं नाही, अन्यथा लग्नाआधी. पूर्वी नाव अमृता कौर होते. प्रीतमसोबत त्यांना 2 मुलंही होती, पण घटस्फोटानंतर लोकांनी पेशाने चित्रकार असलेल्या इमरोजला तिचा नवरा मानलं. घटस्फोटाने प्रीतमची भूमिका संपली.

आपल्या कलाकृतींसाठी देश-विदेशातून अनेक छोटे-मोठे पुरस्कार आणि सन्मान मिळालेल्या अमृता प्रीतम नावाच्या साहित्यिकाने प्रेम आणि व्यभिचार यातील फरकच संपवला होता, असे म्हणता येणार नाही, पण खरा अर्थ त्यांना कळला हेच खरे. त्या काळातील प्रेमाचे. असे काही वेळा होते जेव्हा घटस्फोटित किंवा विवाहित आणि विवाहित स्त्रीवर प्रेम करणे पाप होते आणि अविवाहित स्त्रीला प्रेमात वाचणे हा चारित्र्य, अप्रामाणिकपणा, भ्रम किंवा चुकीचा गुन्हा मानला जात असे.

आजची तरुणाई साधारणपणे अमृता इमरोज आणि साहिरसारखी प्रेमळ आहे, ज्यामध्ये घर आणि समाजाच्या हस्तक्षेपाला जागा नाही आणि प्रेमात कायमचे बांधून ठेवण्यासाठी कोणतेही निषिद्ध नाहीत. 2019 मध्ये, अमृता प्रीतमच्या जन्मशताब्दीनिमित्त, तिच्या प्रेमप्रकरणांना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. यामध्येही तरुणांची संख्या मोठी होती, ती पाहता असे म्हणता येईल की, यातील बहुतेकजण या त्रिकोणात आपल्या समस्यांवर उपाय शोधत होते.

मोठे आव्हान

आता ना अमृता, ना साहिर, ना प्रीतम आणि इमरोज, पण त्यांच्या प्रेमाच्या कहाण्या नव्या पिढीसाठी उदाहरणे आणि धडा बनत आहेत, त्यामुळे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजवर कोणी कोणासाठी सकारात्मक किंवा सकारात्मक राहिले नाही. कुणी त्याग केला. जास्त चार पात्रांनी जे काही असेल ते सहजतेने स्वीकारले, जे खरे प्रेमाची पहिली अट आहे असे दिसते की मोठे हृदय आणि उदारता असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीचा माजी प्रियकर किंवा पती सहजपणे स्वीकारू शकता.

ही परिस्थिती भारतीय पतीसाठी एक मोठे आव्हान आहे, जेव्हा तो आपल्या पत्नीचा माजी पती किंवा प्रियकर समोर येतो तेव्हा तो कसा प्रतिक्रिया देतो. प्रत्येकजण इमरोज किंवा साहिर लुधियानवी असू शकत नाही ज्याने कबीर दासच्या जोडीतील बालाची मिथक मोडली – प्रेम गली अति सांक्री जा. प्रत्येकजण प्रीतमदेखील असू शकत नाही, ज्याला माहित आहे की त्याची पत्नी दुसर्‍यावर प्रेम करू लागली आहे, म्हणून सहजतेने घटस्फोट द्या.

मनोरंजक गोष्ट

मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशभरातून एक अतिशय रंजक बाब समोर आली आहे की, गरिबांची पर्वा न करता काही पतींनी आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून नवा आदर्श ठेवला आहे, अन्यथा अशा बातम्याही सर्रास असतात. ज्यात पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली कारण तो तिचे प्रेम इतरत्र सहन करू शकत नाही किंवा पत्नीने प्रियकरासह पतीला ठार मारले.

 

त्यांच्यापैकी कोण शहाणा आहे? या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट आहे की ज्या पतींनी आपल्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केला आहे त्यांनी स्वतःच्या शांत झोपेची आणि शांत आयुष्याची व्यवस्था केली आहे. तो संशयाच्या आणि सूडाच्या आगीत जळला नाही, त्याने आपल्या पत्नीला शुद्धीवर बोलावले नाही किंवा नशेत किंवा मारहाण केली नाही, म्हणजे तिच्यावर हिंसा केली नाही ज्यामुळे अनेक त्रास आणि मतभेद होतात आणि त्यातून कोणालाही काहीही मिळत नाही.

त्याच्या कार्यात नाश

पत्नीला तिच्या माजी पती किंवा प्रियकराचा सामना करावा लागतो तेव्हा काय करावे हा प्रश्न कोणत्याही पतीला अस्वस्थ करणारा आहे. हे एक सुसंस्कृत आणि आधुनिक समाजाचे युग आहे, ज्यामध्ये दिवसेंदिवस घरे उद्ध्वस्त होत आहेत, हसत-खेळत आहेत. आजवर प्रेम करणे हा पुरुषाचा हक्क मानला जात होता, पण आता गंगा उलट्या दिशेने वाहू लागली आहे, जी विनाशाचे वादळ घेऊन येते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा फटका अनेकदा पतीला सहन करावा लागतो. असे अपघात रोजचेच झाले असून त्यात पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या केली.

गेल्या २५ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील महाजन नावाच्या गावातील कालव्याजवळ 22 वर्षीय आमिरचा मृतदेह सापडला. ही हत्या आमिरची पत्नी सुलताना आणि तिचा प्रियकर समीर यांनी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 19 वर्षीय सुलतानाला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांना सुलतानाच्या प्रेमप्रकरणाची माहिती लग्नाच्या वेळेपासूनच होती, मात्र आदरामुळे ते गप्प राहिले. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. हताश झालेल्या समीरने सुलतानाला सांगितले की, जोपर्यंत तुझा नवरा जिवंत आहे तोपर्यंत आपण एकत्र होणार नाही, त्यानंतर दोघांनी मिळून आमिरला लपून बसवले, पण आता ते तुरुंगात आहेत म्हणजेच ते एकत्र होऊ शकत नाहीत.

धोकादायक परिणाम

21 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील बेगमपूर भागातील 35 वर्षीय करोडपती डेअरी व्यावसायिक प्रदीप यांचा मृतदेह सापडला होता. हा कट पत्नी सीमा आणि तिचा प्रियकर गौरव या दोघांनी रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून सीमा आणि प्रदीप यांच्या लग्नाआधीच एकमेकांवर प्रेम होते आणि ते इतके करायचे की गौरव उत्तर प्रदेशातून दिल्लीत येऊन प्रदीपच्या घरात घुसला. त्याची खोली स्वतःच होती. भाड्याने घेतले. एकजूट व्हावी, यासाठी त्यांनी प्रदीपला मार्गावरून हटवण्याचा कट रचून भाडोत्री मारेकऱ्यांना 20 लाख रुपये दिले होते.

वाद आहेत

म्हणजे बायकोच्या ‘ती’वरून होणारी दंगल आता उच्च समाजातही सर्रास होऊ लागली आहे. भोपाळच्या पॉश भागातील कटारा हिल्सचे एक मनोरंजक प्रकरण आहे. पत्नी संगीता आणि तिचा सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रियकर आशिष पांडे यांनी पती धनराज मीनाला त्यांच्या फ्लॅटमध्ये काठीने बेदम मारहाण करून ठार केले आणि दुसऱ्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात फिरले? मात्र कोणतीही संधी किंवा निर्जन जागा न मिळाल्याने दोघांनीही कटारा हिल्स पोलीस ठाणे गाठून गाडीची ट्रंक उघडली आणि धनराजचा मृतदेह पोलिसांनी स्वत:हून बाहेर काढला.

येथे संगीताने मोठ्या निर्दोषतेने कबूल केले की तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. धनराज आणि संगीता यांच्यात आशिषबाबत वाद होत होता.

 

अशा ९० टक्के प्रकरणांमध्ये नवऱ्याची हत्या झाली तर साहजिकच याचे कारण पत्नीला ते सहजासहजी स्वीकारता येत नाही, ज्याची फारशी अपेक्षाही करू नये. खुद्द महिलांनाही माहित आहे की पती आपल्या माजी पतीला किंवा प्रियकराला फार उदारपणे घेऊ शकणार नाही, कारण लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांचा पहिला प्रश्न असतो की, तुमचे यापूर्वी कधी अफेअर झाले असेल तर आता सांगा.

पण आता पूर्णपणे तसे राहिलेले नाही. भोपाळस्थित आर्यमन, जो बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आहे, म्हणतो की बहुतेक तरुणांना हे माहित आहे की लग्नाआधी सर्वच मुली प्रेमात पडतात कारण त्यांना आजकाल स्वातंत्र्य आणि प्रेमाच्या समान संधी मिळत आहेत.

बदलणारा दृष्टीकोन

आजकाल मुली त्यांचे अफेअर लपवत नाहीत ही भविष्यात चांगली गोष्ट आहे. आर्यमनने आपल्या दोन मित्रांचा हवाला देऊन सांगितले की त्याला त्याच्या पत्नीच्या अफेअरबद्दल माहिती होती. त्यापैकी एकाने तर पत्नीच्या पहिल्या प्रियकराला भेटून घरी जेवायला बोलावले होते. मग नव्या युगातील नवऱ्यांनी या विषयावर रडणे, कल्पनारम्य, चिडचिड करणे बंद केले आहे आणि ते आता पत्नीच्या बेवफाईसाठी दोषी नाहीत? भारतीय समाज इंग्रजीकडे वळला आहे का?

या प्रश्नांवर मुंबईतील एका मोठ्या बहुराष्ट्रीय बँकेत काम करणारा आर्यमन सरांश (बदला नाम) म्हणतो की नाही, बायकोचे अफेअर जगात कुठेही सहजासहजी स्वीकारले जात नाही.

मी माझ्या बायकोच्या बॉयफ्रेंडला जेवायला बोलावले होते जेणेकरून दोघांनाही समजेल की आता त्यांच्यात फक्त किरकोळ मैत्री आहे आणि पत्नी नेहा (नाव बदलले आहे) सुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकते कारण तिने मला लग्न करण्यास सांगितले आहे. आधीच सर्व काही सांगितले आहे. होय, हे सर्व अचानक घडले असते तर माझ्यावर ताण आला असता.

जेव्हा गुप्ततेतून पडदा काढला जातो

पण सहसा सगळेच तरुण इतके हुशार नसतात. भोपाळ येथील 28 वर्षीय वर्तिका (नाव बदलले आहे) हिला 3 वर्षांपूर्वी लग्नाच्या 4 महिन्यांनंतर तिच्या पतीने सोडून दिले कारण एके दिवशी तिच्या प्रियकराने घरी येण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोघेही पुण्यात नोकरी करत असताना भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.

पती सुरुवातीला आश्चर्यचकित झाला आणि सामान्य होण्याचा प्रयत्न करत होता किंवा त्याऐवजी, प्रियकराने त्याच्या आणि वर्तिकाच्या नैनितालच्या प्रवासाबद्दल सांगितलेल्या सत्याला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार केले. या सहलीतील काही जिव्हाळ्याच्या क्षणांबद्दल त्याने असे काही सांगितले होते की, पतीने त्याला शिवीगाळ करताना त्याचा संयम गमावून घराबाहेर हाकलून दिले. रागाच्या भरात प्रियकरही म्हणाला की, मी चांगल्या मैत्रीच्या आणि नात्याच्या आशेने आलो होतो, पण तू खूप गरीब झालास, जो योगायोगाने वर्तिकासारख्या सुंदर आणि हुशार मुलीचा नवरा झाला.

तिच्या जाण्यानंतर पतीने वर्तिकाची तुलना वेश्यांसोबत केली. हे दृश्य मानसिकता आणि वागणुकीच्या दृष्टीने गोंधळासारखे होते. फरक एवढाच होता की पात्र स्वच्छ कपडे घातलेले होते, इंग्रजी शाळेत, महाविद्यालयात होते, चांगली नोकरी करत होते आणि त्यांना सुसंस्कृत आणि आधुनिक समाजाचा भाग मानले जात होते. तो गेल्यानंतर, मी स्थायिक होण्याआधीच माझे घर उद्ध्वस्त झाले.

वर्तिका सांगते की पतीने मला पुन्हा एकदा चारित्र्यहीन म्हणत घरातून हाकलून दिले. मी ती रात्र एका हॉटेलमध्ये घालवली आणि दुसऱ्या दिवशीच्या फ्लाइटने भोपाळला आलो आणि आई-वडिलांना सर्व काही सांगितले. दोघांनीही मला दोष दिल्याने वेदना वाढल्या, पण कधी कधी असे घडते आणि नवऱ्याशी बोलल्यावर समजेल याची काळजी करू नका, अशी सूचनाही केली.

उपाय नसताना काय करावे

मात्र आजपर्यंत तोडगा निघाला नाही. दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. पतीने वडिलांना स्पष्ट सांगितले की, आता काहीही होऊ शकत नाही. दुसऱ्याची जीभ चाटून मी स्वाभिमानाने जगू शकत नाही. तू आणि तुझ्या मुलीने माझी फसवणूक केली आहे.

लग्नाआधी तिने नैनितालच्या हॉटेलमध्ये 2 रात्री इतर कोणासोबत घालवल्याचं आधी सांगितलं असतं तर कदाचित मी जुळवून घेतलं असतं, पण तिच्या एक्सने माझा अपमान केला आहे, माझ्या पुरुषत्वाला आव्हान दिलं आहे. मी आत्महत्या करत नाही एवढं पुरे. आता घटस्फोटानंतर तिचे लग्न तिच्या प्रियकराशी करा तरच सर्वजण सुखी आणि सुखी होतील.

आश्चर्य

या प्रकरणात सर्वात मोठी चूक वर्तिकाची आहे. त्याच्या हेतूवर आणि हेतूवरही शंका घेतली जाऊ शकते. यानंतर वर्तिकेचाच दोष आहे, जिने आपल्या पतीला अल्ट्रा मॉडर्न मानले आणि प्रियकराला घरी येऊ दिले, तेही लग्नानंतर लगेचच, जेव्हा दोघेही एकमेकांना नीट समजू शकत नव्हते.

कोणताही नवरा करेल तशी प्रतिक्रिया वर्तिकाच्या नवर्‍याने केली पण मोठ्या मनाने कृती केली नाही. जर आपण बारकाईने पाहिले तर त्याच्या रागाचे कारण पत्नीच्या माजीबद्दल अधिक होते, जे यावेळी करणे अनावश्यक होते. हे सामान्य संभाषण असते कोणताही नवरा करेल तशी प्रतिक्रिया वर्तिकाच्या नवर्‍याने केली पण मोठ्या मनाने कृती केली नाही. जर आपण बारकाईने पाहिले तर त्याच्या रागाचे कारण पत्नीच्या माजीबद्दल अधिक होते, जे यावेळी करणे अनावश्यक होते. हे सामान्य संभाषण असते तर हे घडले नसते.

वर्तिका स्वतःच आता मानू लागली आहे की त्या संध्याकाळी जे काही घडले ते अनपेक्षित होते आणि काहीही विचार करण्यासारखे नसल्यामुळे ती तिच्या प्रियकराला हादरवू शकली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने लग्नाआधी सर्व काही तिच्या पतीला सांगायला हवे होते. पण त्याला वेश्या ठरवून घराबाहेर हाकलण्याच्या निर्णयाचाही विचार करायला हवा होता. पत्नीप्रमाणे कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कुठलीही मुलगी अशा भ्याडपणे आयुष्य जगू शकत नाही. मी इतर मुलींसारखे प्रेम केले होते आणि कोणताही गुन्हा केला नव्हता.

सत्य सांगणे महाग आहे

अवघ्या दीड वर्षापूर्वी कानपूरच्या एका तरुण पिंटूचा विनयभंग झाला होता, तेव्हा लग्नानंतर काही दिवसांनी, ताप येण्याआधीच त्याला वाटले की, त्याची पत्नी कोमल एक बोलायची. मोबाइल फोनवरील कोणापेक्षा थोडे अधिक. याबाबत त्याने तिला विचारले असता, सुरुवातीच्या नानुकुरानंतर कोमलने सत्य सांगितले की, घरच्यांच्या दबावाखाली तिने हे लग्न केले, अन्यथा तिचे शालेय दिवसांपासून पंकज नावाच्या मुलावर प्रेम होते आणि त्याला कधीच विसरले जाणार नाही.

हे ऐकून पिंटूला धक्काच बसला, पण त्याने स्वत:ला सांभाळलं आणि स्वतःचं ‘सौट’ भेटलं.

पिंटू जलाभून नव्हता, ना त्याने बायकोवर आणि सासरच्या लोकांवर फसवणुकीचा आरोप केला होता, ना त्याने वर्तिकाच्या नवऱ्यासारख्या बायकोच्या चारित्र्यावर बोट दाखवले होते, पण कोमल आणि पंकजच्या खऱ्या प्रेमाची त्याला खात्री होती. याआधी नवऱ्याचे कर्तव्य पार पाडताना कोमलला समजले, पण मन मोकळे केल्यावर तो अस्वस्थ झाला आणि त्याने पत्नीचे प्रियकराशी लग्न लावून दिले.

यासाठी त्याने आधी कोमलला घटस्फोट दिला आणि स्वत:च्या उपस्थितीत प्रियकराने पत्नीचे 7 फेरे घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी पोलिसांचीही मदत घेतली. या त्यागाची आणि समजुतीची चर्चा देशभर झाली, त्याचाही परिणाम झाला. यानंतर अशा बातम्याही येऊ लागल्या ज्यात पतीने पत्नीच्या प्रियकराला तत्परतेने स्वीकारले.

पौराणिक मानसिकता

अमृता, इमरोज आणि साहिरसारखे अभिजात कलाकार आपला वेगळा समाज बनवतात, ज्यात स्वातंत्र्य आणि अव्यवस्था यात फरक नसतो, पण सरासरी समाज स्वतःच्याच कायद्याच्या जाळ्यात अडकत राहतो, हेही खरे आहे. बायकोच्या ‘तो’मुळे पती गुदमरतो आणि सहसा तिला सहज दिसण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर पुरुषी हिंसाचार आणि बायकोचा शारीरिक आणि मानसिक छळ या स्वरूपात होतो, पण उतरतो ही पौराणिक मानसिकता आहे.

येथून अनेकदा क्राईम स्टोरीची स्क्रिप्टही जन्माला येते. पतीने पत्नीला आपली गुलाम आणि संपत्ती समजून जितका त्रास आणि छळ केला, तितकीच पत्नी प्रियकराशी जवळीक साधते आणि मग एके दिवशी वृत्तपत्राच्या बातम्या अशा मथळ्यांनी बनतात की पत्नीने प्रियकराशी समेट घडवून आणला. पतीची हत्या केली.

कानपूरच्या पिंटूनेही असेच केले असते तर त्याचे नशीब भोपाळच्या धनराज किंवा दिल्लीच्या प्रदीपसारखे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या पत्नीच्या प्रियकराशी व्यवहार करण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची कल्पना करणे किंवा पत्नीला हप्त्यात शिक्षा करणे आणि स्वतःचा गुदमरणे हा या समस्येवरचा उपाय नाही.तर हे घडले नसते.

 

एकमेकांना समान आदर द्या

* प्रतिनिधी

जेव्हा सामान्य लोकांमध्ये लग्ने तुटतात तेव्हा प्रकरण लोकलपर्यंत राहते, पण जेव्हा सिमरचे नाते तुटते तेव्हा कळते की पती-पत्नीचे नाते कसे नाजूक आणि वालुकामय जमिनीवर आहे की थोडासा गैरसमज त्यांना वेगळे करू शकतो.

धरम चोप्रा आणि राजीव सेन यांच्या लग्नानंतर. मुलीच्या जन्मानंतर होणारी फाटाफूट ही दोषी ठरत आहे की, लग्नानंतर आयुष्य रुळावर ठेवायचे असेल तर रेल्वेप्रमाणेच इंजिनाचीही काळजी घ्यावी लागते. ट्रॅक वेगळा झाला, सुंदर डिझायनर कपड्यांमध्ये 200-300 लोक एकमेकांभोवती फिरणे पुरेसे नाही.

‘क्यों दिल छोड़ आये’ या मालिकेतील नायिका म्हणते की तिला राजीवच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल शंका आहे आणि ती ‘एक मौका दो, दो एक धोस दो और मग कुठेतरी चेहरा मारते’ म्हणत राहते. राजीव सांगतात की चारूचे आधी बिकानेरमध्ये लग्न झाले होते पण त्याने ती गोष्ट राजीवला सांगितली नाही. पहिल्या लग्नाची गोष्ट नवऱ्यापासून लपवणे पतीला मान्य नाही. लग्नानंतर पती-पत्नीचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो आणि हे प्रेमच दोन यशस्वी लोकांना एकाच छताखाली राहण्यास तयार ठेवते.

जेव्हापासून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, तेव्हापासून वकील आणले गेले आहेत, दोघांनीही एकमेकांविरुद्ध खोटे बोलणे पूर्णपणे बंद करावे लागेल, समेटाचे सर्व मार्ग बंद करावे लागतील. अशा परिस्थितीत घटस्फोट होतो, मुलीला आई किंवा वडील दोन्ही गमावावे लागतात. आता राजीव सेन यांना मुलगी पाहण्यासाठी भीक मागावी लागली आहे.

एखाद्या यशस्वी अभिनेत्रीला काम करण्यापासून रोखणे किंवा तिच्या मुलीला सोशल मीडियावर मित्र आणि चाहत्यांसह फोटो शेअर करण्यापासून रोखणे यासारख्या छोट्या गोष्टी कधी कधी अॅसिडमध्ये बदलतात ज्यामुळे लग्नाआधीच्या प्रेमाचा गोंद धुऊन जातो.

प्रत्येक वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांना समान आदर द्यावा, जागा द्यावी, त्यांना ठरवू द्या, काय करणे आवश्यक आहे. कामाची विभागणी तराजूने न करता प्रेमाने करावी. पती-पत्नी एकमेकांना दिलासा देण्याचा खूप प्रयत्न करतात. किचनपासून ते टॅक्सपर्यंत दोघांनीही एकमेकांसोबत राहावे आणि एकमेकांच्या चुकीच्या निर्णयाचा आदरही करू नये, हा निर्णय आपलाच आहे असे समजून सहन करण्याची सवय लावावी.

दुसऱ्यासोबत झोपणे ही शो व्यवसायातील आपत्ती असू नये. तो उद्योग संस्कृतीचा भाग आहे. ज्याप्रमाणे पंजाबचा शासक रणजित सिंगला 5 बायका होत्या आणि रणजित सिंग तेव्हाही यशस्वी ठरला, त्याचप्रमाणे विवाहित जोडीदाराचे दुसरे नाते आरामात घेणे शो बिझनेस योग्य आहे. यावर आक्षेप घेणाऱ्यांनी एकत्र राहू नये.

चारू असोपा आणि रोहित सेन यांचे लग्न तुटले किंवा तुटले नाही, पण अशा घटनांमधून सर्वसामान्यांना अनेक धडे मिळतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें