कशी हवी प्रेगनन्सीमध्ये सेक्स पोझिशन

– मिनी सिंह

प्रेगनन्सीवेळी महिला खूपच जागरूक होतात. गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या पतिसोबतचे शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेतही संभोग करता येतो. हो, पण जर गर्भवती महिलेची प्रकृती नाजूक असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये, पण पत्नीपासून खूप काळ दूर राहणे पतिसाठी अशक्य असते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशावेळी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जाणून घेऊया की गर्भावस्थेत सेक्स संबंध कसे साधावेत :

गर्भावस्थेदरम्यान सेक्सवेळी या पोझिशनद्वारे सुरक्षित सेक्सचा आनंद घेता येऊ शकेल आणि यामुळे होणारे बाळ आणि आईलाही त्रास होणार नाही.

पहिली पोझिशन : पती आणि पत्नीने एकमेकांसमोर झोपावे. पत्नीने आपला डावा पाय पतिच्या शरीरावर ठेवावा. अशा पोझिशनमध्ये सेक्स केल्याने गर्भाला झटके बसत नाहीत.

दुसरी पोझिशन : पत्नीने पाठीवर टेकून आपली पावले दुमडून पाय पतिच्या खांद्यावर ठेवावे. त्यानंतर सेक्स करावा. यामुळे पोटावर दाब येणार नाही.

तिसरी पोझिशन : पतिने खुर्चीवर बसावे आणि पत्नीने त्याच्यावर बसावे. सुरक्षित सेक्समध्ये हेदेखील येते.

काही व्यायामांद्वारेही सेक्स करता येतो. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

खबरदारी

* गर्भावस्थेत सेक्सदरम्यान पतिने पत्नीची विशेष काळजी घ्यायला हवी. पतिने जास्त उत्तेजित होऊ नये आणि पत्नीवर दबाव आणू नये.

* गर्भावस्थेत सेक्स करावा, पण कोणताही नवा प्रयोग करू नये.

* सेक्स करताना पत्नीवर जास्त दबाव पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

* गर्भावस्थेत प्रसूतीच्या कळांपूर्वीपर्यंत सेक्स करता येतो, पण गर्भवतीस याचा त्रास होऊ देऊ नये.

गर्भावस्थेत सेक्सचे फायदे

प्रेगनन्सीत सेक्स आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कसे ते माहीत करून घेऊया :

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे तुमच्या पेल्विक मांसपेशी आखडतात आणि प्रसूतीसाठी जास्त मजबूत होतात.

* प्रेगनन्सीदरम्यान लवकर लघवी होणे, हसल्यावर किंवा शिंकल्यास पाणी निघणे इत्यादी समस्या मूल मोठे होऊ लागल्यामुळे मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे निर्माण होतात. हे थोडे असुविधाजनक होऊ शकते, पण यामुळे तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे प्रसूतीवेळी फायदा होतो.

* सेक्स केल्यामुळे महिला जास्त फिट राहतात. यादरम्यान त्या फक्त ३० मिनिटांत ५० कॅलरीज कमी करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे महिलांची सहनशक्ती ७८ टक्के वाढते. याचा फायदा तिला प्रसूतीवेळी होतो.

* सेक्सनंतर रक्तदाब कमी होतो. अधिक रक्तदाब आई आणि बाळ दोघांसाठीही नुकसानकारक असतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच चांगले असते.

* ऑक्सिटोसीन हार्मोन संभोगावेळी शरीरातून बाहेर पडते, जे तणाव कमी करण्यासाठी उपयोगी असते. यामुळे चांगली झोप येते.

जेव्हा डॉक्टरांना काही जटिल समस्या जाणवतात, तेव्हा ते सेक्स न करण्याचा सल्ला देतात. समस्या अनेक प्रकारच्या असतात जसे की :

* पूर्वी कधी गर्भपात झाला असेल तर.

* पूर्वी कधी वेळेआधी बाळाचा जन्म झाला असेल तर.

* जर गर्भपाताची भीती असेल तर.

* योनीतून जास्त रक्तस्त्राव होणे किंवा तरल पदार्थ वाहत असेल तर.

* एकापेक्षा अधिक मुले झाल्यास.

प्रेगनन्सी सुलभ आणि सुरक्षित व्हावी असे वाटत असेल तर गर्भरक्षा कवच, गर्भाच्या सुरक्षेसाठी चमत्कारी जादूटोणा, पुत्रप्राप्तीसाठी तंत्रमंत्र इत्यादींपासून दूर राहा. कारण अशा वेळी जादूटोणा नाही तर पती-पत्नीमध्ये प्रेम आणि चांगले संबंध असणे जास्त गरजेचे आहे. या काळात स्वत:कडे आणि होणाऱ्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा आणि पौष्टीक आहार घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळतील, जी तुमच्या होणाऱ्या बाळाच्या विकासासाठी गरजेची आहेत.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला एक वर्ष झालं आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही आम्हा पतिपत्नीमध्ये सतत भांडणं होतात. थोडीफार भांडणं तर प्रत्येक पतिपत्नीमध्ये होतात, पण जेवढे आम्ही भांडतो, तेवढे कदाचित कोणीच भांडत नसेल. आश्चर्य या गोष्टीचे आहे की लग्नापूर्वी सर्वकाही ठीक होते, पण लग्न झाले आणि परिस्थिती बदलली व माझे पतिही. मला विश्वास बसत नाही की ही तीच व्यक्ती आहे का, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं व जो माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा मान राखत होता. आम्ही तासन्तास एकमेकांशी गप्पा मारायचो आणि आता तर बोलण्यासाठी काही विषय नसतो किंवा तोंड उघडलंही तरी एकमेकांवर गरळ ओकली जाते. कधी-कधी वाटते की खरंच मी माझ्या भावा-बहिणीप्रमाणे अॅरेंज मॅरेज केले असते तर किती बरं झालं असतं. ते सर्व आपल्या घरकुटुंबासोबत अनेक वर्षांपासून किती सुखी जीवन जगत आहेत आणि मी एका वर्षातच त्रस्त झाले आहे.

दोनवेळा तर पती आणि त्याच्या घरच्यांना कंटाळून मी माहेरीही निघून गेले होते. माझी समजूत काढण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही. दोन्ही वेळा मी स्वत:च परत गेले.

खरं तर सर्व भांडणाचे मूळ माझ्या २ नणंदा आहेत. दोघीही विवाहित आहेत, तरीही त्या आपल्या सासरी जात नाहीत आणि आमच्या घरात बस्तान मांडून बसल्या आहेत. मोठ्या नणंदेच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत आणि छोटीच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. लग्नापूर्वी माझे पती सांगायचे की दोघीही माझ्या लग्नानंतर लवकर आपल्या घरी जातील. आता त्या आईला मदत करायला राहात आहेत. जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा आईसाठी त्या निश्चिंत होतील. कारण घर सांभाळणारी त्यांची सून येईल ना, पण लग्नाला १ वर्ष झाले आहे आणि त्या त्यांच्या घरी जाण्याचे नाव घेत नाहीत.

दोन्ही नणंदा सासूसोबत मिळून मला त्रास देतात. एवढेच नाही, संध्याकाळी माझे पती घरी आल्यावर माझी चुगली करतात आणि आधीच त्रस्त झालेली मी जेव्हा पतिकडूनही बोलणी खाते, तेव्हा मात्र माझा धीर सुटतो. मी दिवसभराचा रागही त्यांच्यावर काढते. मानसिक त्रास झेलण्याबरोबरच मी शारीरिक रूपानेही त्रस्त आहे. मला थायरॉईड आहे, त्यामुळे मी खूप जाडी झाले आहे. परिणामी, मला गर्भधारणाही होत नाहीए. कुणास ठाऊक, मी आई बनेन की नाही.

जीवन खूप कठीण झाले आहे. लग्न करून मी काय मिळवले, हा विचार करून मी त्रस्त होते. डोके दुखू लागते. काहीही मार्ग दिसत नाही. छान राहावेसे, कुठे जावे-यावेसे वाटत नाही. घरात ३-३ महिलांनी माझं जगणं मुश्किल केले आहे. आयुष्यभर असंच कुढत जगावं लागणार का, कृपया सांगा काय करू?

आपले वैवाहिक जीवन सुखद नाहीए, याचा दोष आपल्या लव्ह मॅरेजला देऊ नका. अॅरेंज मॅरेजमध्येही समस्या येत नाहीत असे होत नाही. अडचणी बहुतेक सर्वच वैवाहिक जीवनात येतात. त्यामुळे आपल्या विवाहाचे तुलनात्मक मूल्यांकन करू नका की अॅरेंज मॅरेज केले असते, तर सुखी राहिले असते.

आपल्या प्रकरणात मुख्य मुद्दा आपल्या दोन्ही विवाहित नणंदा आहेत. एकट्या सासूबरोबरच जुळवून घेणे सुनेसाठी सोपे नसते. इथे तर ३-३ महिलांनी आपलं जगणं कठीण केले आहे. यामुळेच आपल्या पतिशी आपले संबंध खराब होत आहेत.

स्थिती कोणतीही असो, सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर करावा लागेल. कुठेतरी थोडंसं गोड बोलून, तर कुठेतरी निडरता दाखवत, जेणेकरून पतीच्या आई व बहिणींमुळे तुमचं नातं बिघडू नये. अर्थात, असे करणे सोपे नाहीए, पण याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीए. पतिसमोर आपली बाजू मांडा, पण त्यांना टोमणे मारून दोष देऊ नका. जी गोष्ट तुम्ही सामान्य राहून प्रेमाने समजावू शकता, ती भांडण करून समजावू शकत नाही. त्यांचा मूड पाहून त्यांना समजावा की त्यांच्या बहिणींनी आपापल्या घरी जाऊन राहिले पाहिजे. कारण जवळ राहिल्याने संबंध खराब होतात. उलट अंतर ठेवून राहिल्याने प्रेम वाढते.

जिथे भांडून नाराज होऊन माहेरी जाण्याची गोष्ट आहे, तर अशी चूक पुन्हा मुळीच करू नका. त्यामुळे तुमची प्रतिमा बिघडते. समस्यांवर उपाय शोधल्याने त्या दूर होतात, ना की त्यांच्यापासून दूर पळाल्याने.

आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. थायरॉइडवरही उपाय करा. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता.

मातृत्वाबाबत जिथे आपली काळजी आहे, तर आपल्या लग्नाला अजून १ वर्षच झालं आहे. वेळेनुसार आपण मातृत्वसुखही प्राप्त करू शकाल.

जवळच्या एखाद्या कुटुंब कल्याण केंद्रात जाऊन यावर सल्ला घेऊ शकता. पण सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या हुशारीने आपली कौटुंबिक स्थिती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करा.

यासाठी आम्ही आपल्याला केवळ सल्ला देऊ शकतो, प्रयत्न तर आपल्याला स्वत:लाच करावे लागतील. सकारात्मक विचार बाळगा, हिंमत आणि धैर्याने समस्यांचा सामना करा, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्व समस्यांतून मुक्त होऊन आपले वैवाहिक जीवन सुखी बनवलेलं असेल.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

1. माझी नखं खूप लवकर तुटतात. शिवाय त्यांची चमकसुद्धा   नाहीशी झाली आहे. कृपया ते परत सुंदर, मजबूत व चमकदार   बनावे यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

लिंबू हे व्हिटॅमिन सी गुणाने पररिपूर्ण असते. हे तुमच्या नखासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच्या वापराने नखांची लांबी वाढण्यासोबतच चमक आणि मजबूतीही येते. याचा वापर करण्याकरिता एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइलचे थोडे थेंब टाकून चांगले मिसळा. १० मिनिटं आपल्या नखांवर चोळत राहा. यानंतर पाण्याने धुवून टाका. ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक असे घटक असतात जे नखांसाठी उपयोगी असतात.

2.मी माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे खूप त्रस्त आहे. कृपया एखादा घरगुती उपाय सांगा, ज्याचे काही साईड इफेक्ट नसतील.

पुदिन्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा स्वच्छच करत नाही तर त्वचेला नैसर्गिक टोनही देतात. हे त्वचेत असलेले विषारी पदार्थ व अशुद्धता काढण्यात मदत करते, शिवाय मुरुमांपासून सुटका मिळवून देते. पुदिन्याच्या रसात असलेले सॅलिसिलिक अॅसिड मृत त्वचा हटवते. मुरूम नाहीसे करण्याकरीता मूठभर पुदिन्याची पानं कुटून त्याचा रस काढा. त्यानंतर तो संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी रस वाळल्यावर चेहरा धुवा. गुलाबजलात  पुदिन्याचा रस मिसळून लावल्यावरही मुरूम नाहीसे होतात.

3. डोळयांच्या सौंदर्यासाठी काही साध्या टिप्स सांगा, जेणेकरून माझे डोळे सर्वात सुंदर दिसतील?

आपण आय मेकअपमध्ये प्रायमर, हायलायटर व मस्कारा वगैरे वापरतो, जेणेकरून आपले डोळे सुरेख दिसतील व आपल्या व्यक्तिमत्त्वाला स्मार्ट लुक देतील. डोळयांना मेकअप करण्याआधी प्रायमर अवश्य लावा. याने डोळयांवर लावलेले आयशॅडो दीर्घ काळ टिकेल आणि त्याचा रंगही उठून दिसेल. हे पापण्यांच्या त्वचेला कोमल ठेवते. पापण्या आणि भुवया यांच्या मधला भाग म्हणजे ब्रॉबोनवर हायलाईटर लावल्यास डोळयांना एक सुरेख आकार मिळतो. मस्कारा तुमच्या डोळयांना उठावदार बनवण्यात उपयोगी पडतोत. हे डोळयांच्या वरच्या आणि खालच्या तीनही कडांना लावा. जर तुमच्या डोळयांचा आकार बदामी नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलचा वापर करू नये. कारण यामुळे तुमचे डोळे आणखीनच लहान दिसतील.

4. सोडा वॉटर फेस वॉशप्रमाणे वापरता येतो का?

होय, सोडा वॉटरच्या वापरामुळे कांतीवर एक वेगळीच चमक येते. याच कारणामुळे सोडा हे महिलांमध्ये सर्वात आवडते सौंदर्य प्रसाधन बनले आहे. सोडयात कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे निर्माण होणारे बुडबुडे त्वचेला व त्यावरील छिद्रांना खोलवर स्वच्छ करते. याने मृत त्वचा नाहीशी होते, तसेच त्वचेत घट्टपणासुद्धा येतो. एक चमचा सोडा वॉटरमध्ये पाणी मिसळून कापसाच्या बोळयाने चेहऱ्याला लावा. थोडया वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

5. माझ्या ओठांच्या आसपास अनेकदा पांढरी त्वचा दिसू लागते. माझे ओठही रुक्ष व पिवळे आहेत. लिपस्टिक लावल्यावर बाजूची त्वचा पांढरी दिसू लागते. मी काय करू?

ओठांच्या चहूबाजूंचा रुक्षपणा नाहीसा करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांना लोणी किंवा तूप लावा. पिवळेपणा नाहीसा करायला गुलाबाच्या पाकळया वापरा. यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कायम राहतो व ओठांना गुलाबी बनवतो. एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळया घ्या. त्यावर कच्चे दूध ओतून काही तास तसेच ठेवा. यानंतर चांगले कुस्करून त्याची पेस्ट तयार करून ते ओठांवर लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

6. मी ३० वर्षीय काम करणारी महिला आहे. माझी त्वचा खूप ऑयली आहे. समस्या ही आहे की माझ्या नाकावर ब्लॅकहेड्स आहेत आणि गालांच्या     बाजूंवर व्हाईटहेड्स आहेत. यामुळे माझा चेहरा खूप खराब दिसतो. शिवाय मला   पार्टी किंवा लग्नसमारंभात जायलसंकोच वाटतो. मी नेहमी हे हाताने दाबून काढते. पण यामुळे मला खूप वेदना जाणवतात व हे परत दिसू लागतात. सांगा  मी काय करू?

ब्लॅकहेड्स नाहीसे करायला एक बटाटा किसून घ्या व प्रभावित जागेवर थोडा वेळ चोळा. मग सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. व्हाईटहेड्ससाठी ६-७ बदाम बारीक करून घ्या. यात गुलाबजलाचे थोडे थेंब मिसळून पेस्ट तयार करा व व्हाईटहेड्सवर लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.

7. दीर्घ काळापासून मी साबणाने चेहरा धुते पण काही दिवसांपासून माझा चेहरा रुक्ष दिसू लागली आहे. मी काय करायला हवे?

शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्यांची त्वचा नाजूक असते. म्हणून आपल्या त्वचेच्या गरजेनुसार आणि प्रकारानुसार फेस वॉश वापरा. घरगुती उपचार म्हणून तुम्ही हे वापरू शकता – एका मोठया बाऊलमध्ये ४ मोठे चमचे बेसन व १ लहान चमचा ताजी साय एकत्र करा. घट्ट पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.

वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?

आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.

  • मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.

सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?

तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.

तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.

  • मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.

कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?

थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.

हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.

याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.

वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?

आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.

  • मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.

सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?

तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.

तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.

मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.

कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?

थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.

हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.

याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.

सौंदर्य समस्या

*समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या कपाळाच्या दोन्ही बाजूला काळसर डाग आहेत. कृपया उपाय सांगा?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसनाचा वापर उत्तम आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, २ चमचे बेसन यांचं चांगलं मिश्रण करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून सुकू द्या. असं दिवसातून एकदा नियमित करा. काळसर डाग नाहीसे होतील.

  • सकाळी उठल्यावर माझा चेहरा नॉर्मल भासतो. पण दुपारपर्यंत लाल होतो. हे कशामुळे होतं?

ऊन, काळजी, चॉकलेट व मसालेदार खाणं वगैरे यामुळे असे त्वचेचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे रोज चेहरा नीट साफ करा व आहारांकडे विशेष लक्ष द्या. उन्हात जायचं असल्यास १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जे तुमच्या स्कीनचं युव्हीए व युव्हीबीपासून संरक्षण करेल. जास्तवेळ उन्हात राहायचं असेल तर २ तासांनी परत सनस्क्रीन लावा. भरपूर पाणी प्या.

  • माझ्या कपाळावर व ओठांभोवती काळपटपणा आला आहे. यावर उपाय काय?

ओठांच्या काळपटपणासाठी आधी ओठांना माइश्चराइज करण्याची गरज आहे. यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री झोपण्याआधी बेंबीत ई-व्हिटामिन तेलाचे ३ थेंब टाका. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी गुलाबाच्या पानांची पेस्ट लावणे हा अचूक उपाय आहे. नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हलका गुलाबी व चमकदार होतो. हवं असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिसरीन टाकू शकता.

  • मी १९ वर्षांची आहे. एक वर्षापूर्वी मी भुवयांवर पियरसिंग केलं होतं. पण मला आता त्यात काही घालायचं नाही. मी हे कॉस्मेटिक सर्जरी करून बंद करू शकते का? यात किती खर्च येईल?

नक्कीच. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या रिकाम्या जागा भरू शकता. यात कमीतकमी रू. १०-३० हजार रुपये खर्च आहे.

  • मी ४५ वर्षांची आहे. माझे केस खूप तेलकट आहेत. आठवड्यातून मी ३-४ वेळा शाम्पूने केस धुते. पांढऱ्या केसांसाठी डाय करते. परंतु १५-२० दिवसात परत भांगाच्या आसापास पांढरे केस दिसू लागतात. मी माझ्या केसांबद्दल चिंतीत आहे. केस दिर्घकाळ काळे राहावे यासाठी सोपा उपाय सांगा?

तेलकट केसांसाठी पाण्यात १ चमचा व्हिनेगर, २-३ थेंब लव्हेंडर इसेंशियल तेल टाकून केस धुवा. कलर्ड केसांसाठी असा कोणताही स्थायी उपचार नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल सलूनमध्ये जाऊन वर टचअप केला तर फायदा होईल.

केस सौम्य शाम्पूने धुवा. जमल्यास जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या वाटून १ चमचा भिजवलेल्या मेथ्या बारीक करून मिश्रण तयार करा. ते २-३ तास डोक्याच्या त्वचेवर लावा व नंतर शाम्पू करा.

  • मी २५ वर्षांची आहे. माझे केस खूप गळतात. असा काहीतरी घरगुती उपाय सांगा, ज्यामुळे केस गळणं कमी होईल?

केस गळण्यामागे चुकीची जीवनशैली, सुंतलित आणि पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण आणि हार्मोन्समधील बदल अशी बरीच कारणं असतात. सोबतच एखादा आजार वा औषधाच्या सेवनामुळेही केसगळती होऊ शकते. आधी तुम्ही तुमचे केस गळण्याची कारणं जाणून घ्या. मग त्यानुसार उपाय करा.

घरगुती उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज करा आणि दही लावा, केसगळती थांबवण्यासाठी दही हा घरगुती उपाय आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. केस धुण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी दही लावा. दही सुकलं की केस धुवून टाका.

दुसरा उपाय म्हणून कोमट ऑलिव्ह तेलात १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट करा आणि अंघोळीआधी केसांना लावा. एका तासाने केस शॉम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबते.

  • मी २९ वर्षांची आहे. माझी समस्या ही आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं आली आहेत आणि माझी त्वचासुद्धा फिकट पडली आहे. चेहऱ्यावरचं तेज परत मिळवण्यासाठी उपाय सांगा?

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तळांमुळे वय जास्त दिसतंच शिवाय चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. बऱ्याच काळासाठी चुकीचा आहार, संगणकाचा अतिवापर, त्वचेमध्ये पाण्याची कमतरता, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ही वर्तुळं घालवण्यासाठी  बदामाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा. हवं तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता.

तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. वाटलं तर तुम्ही दहीसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. दही त्वचेच्या आत लपलेली घाण दूर करून चेहऱ्यावरचे डाग, मुरमं नष्ट करते.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?

वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.

स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.

जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.

असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.

तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.

  • मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?

आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.

आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?

आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.

तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझ् ?या हाताच्या वरच्या भागावर लाल रंगाचे लहान लहान फोड आले आहेत. वास्तविक पहाता मला यामुळे खाज अथवा वेदना होत नाही. पण यामुळे मी बिनबाह्यांचे ड्रेस घालू शकत नाही. हे नाहीसे करायला एखादा उपाय सांगा?

त्वचेवर लाल रंगाचे लहान फोड म्हणजे बंप्स होण्याची समस्या ज्याला केराटोटिस पाइलेरिस म्हटले जाते. जवळपास ५० टक्के माणसं या व्याधीने पीडित असतात. बंप्स सामान्यत: लाल आणि पांढऱ्या रंगाचे मुरमांप्रमाणे  दिसतात. प्रत्यक्षात हे इतर काही नसून, मृत त्वचा असते. ज्यात त्वचेवरील केस व्यत्यय आणू शकतात. हे केवळ तुमच्या हातावरच नाही तर पार्श्वभागावर आणि जांघांच्या मागेसुद्धा येऊ शकतात. यातून सुटका मिळवायला तुम्ही दिवसातून दोनदा उत्तम मॉइश्चराइजरचा वापर करा. तुम्ही सेलीसिलिक आणि अल्फा हायड्रॉक्सी निवडू शकता. ए जीवनसत्वयुक्त क्रीमने त्वचेच्या पेशींची स्थिती चांगली होते. एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचा पेशीत लक्षणीय घट होते. एक्सफॉलिएटिंग स्क्रबचासुद्धा वापर करू शकता. लक्षात ठेवा की कोणतेही क्रीम लावण्याआधी त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. उत्तम परिणाम दिसावे यासाठी या गोष्टींचा वापर नियमित करा.

  • माझा चेहरा सतत धुवूनही चिपचिपा दिसतो. मी चेहऱ्याला कोणतेही क्रीम लावत नाही, पण बघताना असं वाटते  की मी अनेक क्रीमचे थर चेहऱ्यावर थापते. कृपया एखादा उपाय सांगा?

तुमची त्वचा अतिशय तेलकट आहे आणि अशी त्वचा असणारे लोक आपल्या त्वचेमुळे  वैतागलेले असतात. पण जांभूळ ऑयली त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. हे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यात सहाय्यक असते. म्हणून आपल्या त्वचेवर जांभळाचा फेसपॅक लावू शकता. ऑयली त्वचेसाठी जांभळाचा फेस पॅक बनवण्यासाठी याचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा. आता नंतर यात एक चमचा आवळयाचा रस आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करा आणि घट्ट पेस्ट तयार झाली की हे आपल्या चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • माझे वय २० वर्ष आहे. माझे केस खूपच ऑयली आहेत. यामुळे जवळपास रोजच मला हे धुवावे लागतात. पण आता माझ्या केसात कोंडासुद्धा होऊ लागला आहे. मी काय करू जेणेकरून माझा त्रास दूर होईल?

तुम्ही झेंडूच्या फुलांचे हेअर टॉनिक वापरा. झेंडूच्या फुलात फायटोकॉन्स्टिट्यूंट्स असतात, जे कोंडा नाहीसा करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय हे केसांना चिकट होण्यापासून सुरक्षित ठेवते. ऑयली केस असणाऱ्या व्यक्तींसाठी झेंडूचे फुल हा फारच छान घरगुती उपाय आहे. हे वापरण्याकरिता झेंडूची सुकलेली फुलं कोमट पाण्यात उकळत ठेवा. हे पाणी गाळून घेत चोथ्यापासून वेगळे करा आणि शाम्पू केल्यावर एकदा या पाण्याने आपले केस धुवा. कोंडा निघून जाईल.

  • माझी त्वचा ऑइली आहे. मला असे वाटते की ऑयली त्वचेला मॉइश्चराइजर केल्यास ती अजूनच चिपचीपी बनेल. ऑयली त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे का?

हो, ऑयली त्वचेलासुद्धा मॉइश्चराइज करावे लागते. तुम्ही संत्र्यांचा रस आणि कोरफडीचा गर यापासून बनवलेला हायडे्रटिंग फेस मास्क लावू शकता, जो ऑयली त्वचेतील अतिरिक्त सिबम शोषण्यासाठी सक्षम असतो आणि त्वचेला तजेलदार बनवतो. यासाठी सर्वात आधी १ मोठा चमचा संत्र्याचा रस आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. दोन्ही एका वाटीत एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने ही पेस्ट लावा. डोळयांपाशी लावू नका नाहीतर जळजळ होऊ शकते. साधारण २० मिनिट पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

  • माझं वय ३० वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावरचे त्वचाछिद्र आत्तापासूनच मोठे दिसू लागेल आहेत. मी काय करू की माझ्या चेहऱ्यावरील त्वचाछिद्र बंद होतील. आणि माझी त्वचा पूर्वीसारखी होईल?

कोरफड चेहऱ्याला मॉइश्चराइज करते आणि मोठया त्वचाछिद्रांना संकुचित करते. कोरफडीच्या पानाच्या आत असलेला गर चेहऱ्याला उत्तम पोषण देतो आणि चेहऱ्यावर जमलेले तेल आणि मळ नाहीसे करतो, ज्यामुळे त्वचाछिद्रांवर आकुंचन पावतात. आपल्या चेहऱ्यावरील पोअर्सवर कोरफडीचा थोडा गर लावून थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर १० मिनिट तसेच ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा.

  • माझे वय २५ वर्ष आहे. माझ्या कपाळावर आत्तापासूनच सुरकुत्या आल्या आहेत, ज्या खूपच वाईट दिसतात. या नाहीशा करायला एखादा घरगुती उपाय आहे का?

वयाआगोदर जर तुमच्या कपाळावर सुरकुत्या आल्या असतील तर, जवसाचे तेल हा खूप चांगला आणि तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे. यात तुम्हाला जवसाच्या तेलाने मालिश करायचे नाही, तर १ चमचा जवसाचे तेल दिवसातून ३-४ वेळा प्यायचे आहे. हे त्वचेच्या बाहेरील थरांना वर आणतात, ज्यामुळे कपाळाच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात.

सौंदर्य समस्या

– परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट

  • मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?

अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.

मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.

  • मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.

  • माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?

त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.

  • मी ३० वर्षीय स्त्री आहे. माझे केस खूपच कोरडे व रूक्ष आहेत. ते सिल्की व शाइनी बनविण्याचा एखादा उपाय सांगा?

खाण्यापिण्यात पौष्टिक तत्त्वांचा अभाव आणि धूळप्रदूषणामुळे केस निस्तेज व रुक्ष दिसू लागतात. त्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. घरगुती उपायासाठी तुम्ही २ कप गरम पाण्यात १ चमचा मध मिसळून केसांवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा व हॉट टॉवेल थेरेपी घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि ते सिल्की व शाइनी बनतील.

  • मी ४२ वर्षीय स्त्री आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, ज्या मी मेकअपने लपविते तरीदेखील त्या दिसतात. सुरकुत्या कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?

सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दुधाच्या पावडरमध्ये पाणी आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. असं केल्याने तुमची त्वचा कोमल होईल आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त केळं मॅशकडून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.

  • मी २२ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आहेत, ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. ते घालविण्याचे उपाय सांगा?

व्हाइटहेड्स तेलकट त्वचेवर अधिक येतात. यामुळे अशा स्त्रियांनी धूळमाती व प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर राहायला हवं.

तुम्ही भरपूर पाणी प्या. बाहेरून घरी आल्यावर त्वचेचं क्लीजिंग करा. यामुळे मृतत्वचा व रोगजंतू निघून जातील. क्रीमी व ऑइली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करा. व्हाइटहेड्सवर लिंबाचा रस व काकडीचा रस लावा. स्टीम घेतल्यानेदेखील फायदा होईल.

  • मी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिंनी आहे. माझे हात व चेहऱ्याचा रंग सावळा आहे. त्यामुळे रंग उजळण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहरा व हातांचा रंग उजळण्यासाठी कच्चं दूध चेहरा व हातांवर लावा. हे टोनरचं काम करेल. कच्चं दूध हात व चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि सुकल्यावर धुऊन टाका. यामुळे रंग उजळेल.

याव्यतिरिक्त पपईचा पल्प मॅश करून चेहरा व हातांवर लावा. यामुळेदेखील रंग उजळेल. घरातून निघतेवेळी चेहरा व हातांवर एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावावं.

गृहशोभिकेचा सल्ला

 

  • मी २३ वर्षीय तरुणी आहे. माझ्या लग्नाचं जमत आहे. मात्र, अनेक स्थळांनी या कारणामुळे मला नकार दिला आहे; कारण त्यांना चष्मा असलेली मुलगी नको आहे. मी आता कॉन्टॅक्ट लेन्स घेतल्या आहेत जेणेकरून माझं लग्न ठरेल. सध्या एकदोन ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. मी त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सविषयी सांगावं की नाही? यावरून घरात खूप तणाव असतो. मला काय करायला हवं?

कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे आणि यात काही धोका नाही. पण लग्नाआधी दोन्ही पक्षांनी आपल्याविषयीची सविस्तर माहिती एकमेकांना देणं गरजेचं असतं.

जर तुमच्या कुटुंबियांना असं वाटत असेल की मुलाकडील लोकांना हे सांगू नये तर तुम्ही स्वत:हूनच मुलाला ही गोष्ट सांगू शकता.

मुलगा जर समंजस असेल तर तुमचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित होईल. शिवाय तुम्हालाही लग्नानंतर ही गोष्ट लपविल्याची हुरहुर लागणार नाही.

  •  मी ३० वर्षीय विवाहित महिला आहे. आमचं विभक्त कुटुंब आहे. माझी लहान बहीण आमच्यासोबतच राहाते. माझं माहेर खेडेगावात आहेत म्हणून ती पुण्यात आमच्यासोबत राहून बीए करत आहे. माझे आईबाबा तिला हॉस्टेलमध्येच ठेवणार होते पण मी आणि माझ्या पतीने बळजबरीने तिला आमच्यासोबत ठेवून घेतलं.

माझ्या बहिणीने मला सांगितलं की भावोजींनी रात्री दारू पिऊन तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या आधीही तिने मला सांगितलं होतं की, भावोजी तिची चेष्टामस्करी करतात आणि तिच्यासोबत गैरवर्तनही करु पाहातात. तेव्हा ही गोष्ट मी फारशी गंभीरपणे घेतली नव्हती, पण आता मी खूप चिंतित आहे, पतीला याविषयी कसं विचारायचं याची मला भीती वाटते. हे प्रकरण आणखी पुढे वाढू नये, यासाठी मी काय करू?

तुमच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा तुमच्या पतीच्या गैरवर्तनाविषयी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवं होतं. तुम्ही तेव्हा गप्प बसल्यामुळे त्यांचं धाडस वाढलं आणि त्यांनी पुन्हा ते कृत्य केलं. आता तुम्ही त्यांना मोकळं सोडू नका. चांगलं खडसावून विचारा. याचबरोबर बहिणीला हॉस्टेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा.

जोपर्यंत बहीण तुमच्या घरी असेल तोपर्यंत तुम्ही तिला एकटीला सोडू नका. तसंही तुमच्या पतीला जर कळलं असेल की तुम्हाला ही गोष्ट आता माहीत पडली आहे तर आता ते पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाहीत.

  • मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या विवाहाला २ वर्षं झाली आहेत. पती आणि कुटुंबियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा माझं या घरात मन लागत नाही. कारण मला माझ्या प्रियकराचा विसर पडत नाहीए. खरतर त्याने मला अगोदर लग्नाचं वचन दिलं होतं. पण नंतर त्याच्या कुटुंबियांच्या मर्जीनुसार त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. आता मी काय करू, जेणेकरून त्याचा विसर पडेल आणि मी माझ्या संसारात रममाण होईन?

हे खरंय की, पहिलं प्रेम विसरता येत नाही. पण विसरता न येणं ही गोष्टही तितकी कठीण नाही. आणि तसं पाहिलं तर तुमच्या प्रियकराने तुमची फसवणूकही केली आहे. तुम्हाला लग्नाचं वचन दिलं आणि तुम्हाला संकटात टाकून दुसऱ्याच कुणासोबत लग्नदेखील केलं. म्हणूनच हे एक वाईट स्वप्न समजून ही गोष्ट विसरून जाण्यातच तुमचं हित आहे.

तुमच्या पतीचं आणि कुटुंबियांचं जर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तर त्या बदल्यात तुम्हीदेखील त्यांच्यावर प्रेम करायला हवं. तुम्ही संसारात मन रमवलं तर भूतकाळातील या घटनेचा काही दिवसांनी तुम्हाला विसर पडेल.

  • मी १८ वर्षांची विद्यार्थिनी आहे. शाळेत असताना केवळ मैत्रिणीच होत्या. मात्र, आता कॉलेजात मित्रही सोबत शिकत आहेत. जेव्हादेखील एखादा मुलगा माझ्या शेजारी बसतो, तेव्हा मला असं वाटू लागतं की मी त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. मी जेव्हा एकटीच असते तेव्हादेखील त्या मुलाचाच विचार करत राहाते. हे कुणा एका मुलाला पाहून नाही, तर कुणीही मुलगा जो माझ्या संपर्कात येतो, तेव्हा माझ्या मनात अशीच भावना जागृत होऊ लागते. यामुळे मी अभ्यासात मागे पडू लागली आहे.

ही गोष्ट माझ्या दृष्टीने घातक तर नाही ना? मला काय करायला हवं?

तू याविषयी काळजी करू नको. खरं तर या वयात विरूद्ध सेक्सप्रती आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. हे लैंगिक आकर्षण असतं. जसजशी समज येत जाईल तसतसे सर्व काही सामान्य होत जाईल.

हो, पण यासाठी तू अभ्यासात किंवा घरकामात स्वत:ला गुंतवून ठेव. काही दिवसांनंतर तुझी ही समस्या दूर होईल.

  • मी २० वर्षीय विवाहित महिला आहे. माझं अलीकडेच लग्न झालं आहे. माझी ही समस्या आहे की माझ्या स्तनांची पुरेपूर वाढ झालेली नाहीए. त्यामुळे माझ्या पतींना संबंधाच्या वेळेस माझ्या स्तनांमध्ये अधिक रूची वाटत नाही.

शरीरसंबंधादरम्यानही आम्हाला आनंद मिळत नाही. आम्ही काय करायला हवं, जेणेकरून आम्हाला शरीरसुखाचा उपभोग घेता येईल?

स्तनांची वाढ ही आनुवंशिकतेनुसार होत असते. म्हणजेच स्त्रीची शारीरिक रचना आपल्या आईच्या शरीररचनेनुसार असते. एक मूल झालं की स्तनांच्या आकारात बदल होतो, पण स्तनांच्या आकारामुळे शरीरसंबंधाच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच मनामध्ये कोणतीही हीनभावना न आणता सहवासाचा आनंद घ्या.

सहवासापूर्वी फोरप्ले केल्यानेही उत्तेजना मिळेल आणि शरीरसुखाचा संपूर्ण आनंद घेता येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें