भामट्यांच्या निशाण्यावर तुमचे बँक खाते

* पूनम पांडे

तुम्ही अथक मेहनत करून पगार मिळवता आणि तो बँकेमध्ये जमा करता की बँक सर्वात सुरक्षित जागा आहे आणि तुमची ही घामाची कमाई ऐनवेळी तुमच्या कामी येईल. परंतु जरा इकडे लक्ष द्या तुमच्या अकाउंटवर कोणीतरी आहे जो सतत नजर ठेवून आहे. सावध व्हा कारण रोज अशा घटना घडत आहेत की लोकांच्या बचत खात्यातून मोठी रक्कम गायब होत आहे.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की सध्या फ्रॉड करणारे बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करताहेत. यामध्ये एटीएम क्लोनिंग, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून खोट्या कार्डच्या डाटाची चोरी, यूपीआयच्या माध्यमातून चोरी, लॉटरीच्या नावावर फसवणूक, बँक खात्यांच्या तपासणीच्या नावाखाली तर फसवणूक प्रमुख आहे. आता प्रश्न हा उठतो की शेवटी अशा प्रकारची फसवणूक होते तरी कशी.

मोठी फसवणूक

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या दहा वर्षांमध्ये ५० हजार पेक्षा अधिक लोकं फसवले गेले आहेत. ज्यामध्ये दोन लाख कोटी रुपयांचा चुना सामान्य ग्राहकांला लागलाय. आरबीआयचा ताजा रिपोर्ट सांगतो की डिजिटल व्यवहारामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये ९० हजार कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा झालाय. ग्राहकांना समजलं देखील नाही आणि त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढले गेले.

अशामध्ये जर व्हाट्सअपवर एखाद्या अनोळखी नंबर वरून व्हॉइस कॉल आल्यास तुम्ही सावध व्हा कारण फोन करणारा तुम्हाला फसवू शकतो. ही घटना घडल्यानंतर तुमच्या नंबरला ब्लॉक करू शकतो व्हॉइस कॉल करणारा तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे पैसे हडप करू शकतो.

या व्यतिरिक्त एटीएम कार्डचं क्लोनिंग करून देखील भामटे तुम्हाला लुटू शकतात. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की पूर्वी सामान्य कॉलच्या माध्यमातून फसवणूक होत होती, परंतु आता डाटा चोरी करून पैसे खात्यातून काढले जातात. हे भामटे हायटेक असून कार्ड क्लोनिंग करू लागलेत. एटीएम कार्ड लोकांच्या खिशामध्येच असतं आणि भामटे पैसे काढूनही घेतात. एटीएम क्लोनिंगच्या माध्यमातून तुमच्या कार्डची पूर्ण माहिती चोरली जाते आणि त्याचं डुप्लिकेट कार्ड बनवलं जातं. म्हणून एटीएमचा वापर करतेवेळी पिन दुसऱ्या हाताने लपवून टाका.

काय म्हणतात एक्सपर्ट

अजून एक पद्धत ही आहे की भामटे बँक खात्यांच्या तपासणीच्या नावावर फसवणूक करतात. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की तुमच्या बँकेच्या खात्याची तपासणी वेळोवेळी करायला हवी आणि अस्वीकृत देवाण-घेवाणबद्दल त्वरित तुमच्या बँकेला माहिती द्यायला हवी.

अलीकडे नोकरीच्या नावाखाली देखील खोट्या पद्धतीने पैसा काढला जातो. ऑनलाईन फ्रॉड अनेक जॉब पोर्टल संपूर्ण माहिती लिहिणं, जाहिरात करणं आणि जॉब अलर्ट इत्यादीसाठी फीस घेतात. अशा पोर्टलला पैसे देण्यापूर्वी वेबसाईटची प्रामाणिकता आणि इतर गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे. अगदी लग्नाच्या वेबसाईट वरती देखील लोकांची फसवणूक होऊ लागली आहे.

जर तुम्ही ऑनलाईन मेट्रोमोनियल साईटवर पार्टनरचा शोध घेत असाल तर जरा सावध व्हा कारण याच्या माध्यमातून देखील फसवणूक होतेय. चॅटिंगच्या माध्यमातून फ्रॉड करणारे तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती मागतात आणि मग बँक खात्यातून परस्पर रक्कम उडवली जाते.

गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाच्या मते ऑनलाइन वैवाहिक साइटवर चॅट करतेवेळी वैयक्तिक माहिती देऊ नका आणि साईटसाठी वेगळा ईमेल आयडी बनवा. कोणतीही चौकशी न करता वैयक्तिक माहिती देऊ नका.

डाटा चोरी करून फसवणूक

लॉटरी, बंपर ड्रॉ इत्यादींच्या जाळ्यात कधीच अडकू नका. पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावावर ऑनलाईन फसवणूक होत आहे. सायबर एक्स्पर्ट सांगतात की काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही प्रोग्रामच्या नावावर लाखों रुपयाची लॉटरी काढण्याची लालूच दाखवून अनेक लोकांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षी देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी आयओसीने त्यांच्या वेबसाईटवर पेट्रोलपंप डीलरशिपच्या नावावर फसवणुकीशी संबंधित माहिती दिली होती. ईमेल स्पुफिंगदेखील अजून एक पद्धत आहे. ईमेल स्पुफिंगच्या माध्यमातून भामटे असे ई-मेल आयडी बनवतात, जे नामवंत कंपन्यांशी मिळतेजुळते असतात आणि मग सर्वे फॉर्मच्या माध्यमातून लोकांना स्वत:कडे आकर्षित करून डाटा चोरतात.

सावध रहा

गुगल सर्चच्या माध्यमातून देखील फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत. भामटे सर्च इंजिनमध्ये जाऊन मिळत्याजुळत्या वेबसाईट बनवून स्वत:चा नंबर टाकतात आणि मग, जर कोणी सर्च इंजिनवर एखादी खास गोष्ट तपासली तर ती बनावट वेबसाईटवर देखील येते.

रिवार्ड पॉईंटच्या नावावर फसवणूक होत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने अलीकडेच त्यांच्या ग्राहकांना अलर्ट जारी करताना सांगितलं की रिवॉर्ड पॉईंटच्या नावावर फ्रॉड करणारे मेसेज पाठवतात. त्या मेसेजमध्ये बँक खात्याशी संबंधित माहिती मागितली जाते आणि मग ही माहिती त्यांच्याजवळ पोहोचताच खात्यातील पैसे काढले जातात. म्हणून बँका सतत त्यांच्या ग्राहकांना सावध करत असतात. भामटे या प्रकरणात वृद्ध लोकांना फसवतात. तपासणीच्या नावाखाली देखील फसवणूक करत असतात. म्हणून सर्व ग्राहकांनी आपल्या बँक खात्याची तपासणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे.

आधुनिक फसवणुकीचे प्रकार

याव्यतिरिक्त यूपीआयच्या माध्यमातून देखील फसवणूक केली जात आहे. यूपीआयच्या माध्यमातून भामटे एखाद्या व्यक्तीला डेबिट लिंक पाठवतात आणि त्या लिंकवरती तो व्यक्ती क्लिक करून स्वत:चे पिन टाकतो तेव्हा त्याच्या खात्यातील पैसे कट होतात. अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका.

एटीएम कार्डच्या डाटाची चोरीसाठी हे भामटे कार्ड स्कीमरचा वापर करतात. या माध्यमातून हे भामटे कार्ड रीडर स्लॉटमध्ये डाटा चोरी करण्याचा डिवाइस लावतात आणि डाटा चोरतात. या व्यतिरिक्त बनावट कीबोर्डच्या माध्यमातून देखील डाटा चोरला जातो. कोणतंही दुकान वा पेट्रोल पंपवरती जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड स्वाईप करत असाल तर तिथला कर्मचारी ते कार्ड कुठे दूर घेऊन तर जात नाही ना याची दक्षता घ्या.

संस्कार धर्माचं कठोर बंधन

* पम्मी सिंह ‘तृप्ती’

व्यवस्था असो वा समाज, कुटुंब असो वा संस्था सर्व स्त्रियांना संस्कारांच्या सीमेमध्ये हे जखडून ठेऊ पाहतात. त्यांना तर इतिहास बदलायचा असतो. सरळ भाषेमध्ये सांगायचं झाल्यास पुरुष वर्चस्वा विरोधात आपला आवाज बुलंद करत असल्या तरी अजूनही त्यासाठी वाट पहावी लागतेय.

संस्कार सर्वात कठोर बंधन आहे. रामायण, महाभारत काळापासून आतापर्यंतच्या काळातील ही मुळं आहेत. हे शांत वा बोलण्यात चतुर असण्याबरोबरच मोठ्या गोष्टींचं जाळं पसरवतात. सुंदर शब्दावली, चमत्कारिक अंदाजामध्ये अंधश्रद्धेला सजवलं जातं ज्यांना माणसांकडून माणसांवर बनवलं, सजवलं आणि चालवलं जातं. ज्यामध्ये स्वत: स्त्रियांनी अनेकदा आपले मौलिक अधिकार विसरून टाळ्या वाजवल्या आहेत.

अनोखं संशोधन

विज्ञान जगताने जुनाट गोष्टींचं पितळ उघड पाडलंय की स्त्रिया गर्भामध्येदेखील सुरक्षित नाहीयेत. म्हणूनच कदाचित माणसांच्या दहा इंद्रियांचं दमन करत अलीकडे लग्न न करता आई बनण्याचे निर्णय घेतले जात आहेत. अलीकडेच विवाह संस्थेला वाचविण्याच्या नावाखाली सुप्रीम कोर्टामध्ये एका अविवाहित तरुणीची आयवीएफ/ सरोगसीने मुलाला जन्म देण्याची याचिका फेटाळण्यात आली. ज्याला व्यावहारिकते ऐवजी संस्काराचं नाव देण्यात आलं.

ही तारीख ही गोष्टी दाखवत आहे की आजदेखील स्त्रिया आपली इच्छा आणि परिस्थितीसाठी पुरुषी वर्चस्वामुळे रक्त बंबाळ होत आहेत. मनुस्मृतीच्या सल्ल्यांवर सेवा, दासी बनलेल्या चालतील, परंतु निस्वार्थ आई बनण्यासाठी सरोगसीचं पाऊल उचलताच तिच्यावर चारित्रिक दोषारोप केले जातात. ‘चांगुलपणा’चं हे विष शरीरात असं घुसळवतात की या विचारसरणीचा पक्षी जेव्हादेखील उडण्याच्या प्रयत्न करतो, तेव्हा त्याला जखमांचा आरसा दाखवला जातो. शास्त्राद्वारे रचलेली नैतिकता, कौटुंबिकता, लक्ष्मण रेषा व आचरण, आवरण खास वर्गापर्यंत सीमित आहे. लोकशाही संविधान लागू होण्याऐवजी स्त्रियांना स्वत:च्या हक्काचा दावा करण्याची गरज आहे. स्त्रियांवर नियमावलीदेखील पुरुषांनीच टाकली आहे.

बदलाची गरज

असं म्हणतात की आयुष्य, समाज तेव्हाच सुंदर होतं जेव्हा काळानुसार त्यामध्ये बदल केले जातात. तनमन जीवनासोबतच विचारांचे मालक आपणच आहोत. सीमा बंधनामध्ये बांधून मनुष्य जीवन जगले जाऊ शकत नाही. आत्मविश्वासू स्त्रिया कोमल कमनीय मुग्धाचं रूप त्यागुन पितृसत्तात्मकाला आवाहन देत राहिल्या. हक्काने आवडीची नाती जोडत राहिल्या.

म्हणूनच ‘सरोगसी’सारख्या ज्वलंत मुद्द्यावर सहयोगाची कल्पना कठीण काळातून जात आहे. हजारो सामाजिक, पौराणिक दावे सादर करण्यात आले. परंतु परिस्थिती अशी आहे की सहकार्यापेक्षा वर्चस्व श्रेणीने आहे. हा निर्णय समाजासाठी धोक्याची घंटी सिद्ध होईल.

‘बेल्म द विक्टिम’ या देशाची नीतिगाथा बनली आहे

१५ जुलै, २०१९ सरकारने सरोगेसी रेग्युलेशन बिल लोकसभेमध्ये सादर केलं होतं. जानेवारी २०२२ मध्ये राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा बनवण्यात आला, जो कमर्शियल सरोगेसीवर बंदी घालतो. निर्णयात्मक निर्णय आणि उपायांमध्ये असलेला दीर्घकाळ कमी करण्याची गरज आहे.

कोणाची गुलाम आहे

कृत्रिम प्रजनन प्रक्रियांमध्ये प्रगतीचं कारण सरोगसी एक व्यावहारिक पर्यायाच्या रूपात पुढे आलं आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी अॅक्ट १९७१ च्या ट्वेंटी-ट्वेंटी वन संशोधनानुसार अविवाहित गर्भवती स्त्रियांना कायद्याने गर्भपात करण्याची अनुमती आहे. तर हा अधिनियम एका स्त्रीला स्वत:च्या शरीराच्या अधिकारांची मान्यता देतो. सरोगसी अधिनियम अविवाहित स्त्रियांना सरोगसीच्या सेवांचा लाभ घेण्यापासून रोखतो.

कायदा घटस्फोटीत आणि विधवा स्त्रियांनादेखील सरोगसीने आई-वडील बनण्याची परवानगी देतो, परंतु वयाची अट ३५ ते ४५ च्या दरम्यानच असायला हवी.

अनुच्छेद २१ नुसार, ‘आयुष्याचा अधिकार एक मूलभूत बाजू आहे, ज्याच्या अंतर्गत प्रजननाच्या अधिकाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे सरोगसीला सीमित करणे स्पष्टरित्या अनुच्छेद २१ आणि १४ चं उल्लंघन आहे. वाढत्या वांझपणाच्या समस्येमुळे सरोगेसी भोगविलासतेच्या पर्याय ऐवजी एक गरज बनली आहे.

मूल होत नसल्यामुळे तणावातून जाणारी युवा पिढी

* शशी पुरवार

जेव्हा एखादे तरुण जोडपे एकटे राहाते आणि त्यांना मुलं नसतात, तेव्हा ते दवाखान्याच्या फेऱ्या मारत राहातात आणि तेव्हा सासूचे टोमणे ऐकावे लागत नसतानाही आयुष्यात तणाव निर्माण होतो. आज जीवन जगण्याचा अर्थच बदलला आहे. तरुण जोडप्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे जीवन जगायला आवडते. मौजमजा आणि स्वत:ची वेगळी जीवनशैली, सोबतच कोणतेही कौटुंबिक बंधन नाही, कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत आणि कोणाचाही हस्तक्षेप नाही. नोकरदार जोडपी त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे राहाते, त्यांच्या स्वत:च्या मर्जीनुसार, स्वत:चे जग तयार करते.

आजकाल, लवकर मुलं होण्याचा ट्रेंड संपला आहे. लग्नानंतर, त्यांना काही वर्षे जबाबदाऱ्या स्वीकारायला आवडत नाहीत. ते त्यांच्या करिअर आणि मौजमजेत इतके मग्न होतात की, कधीकधी परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरते, कारण करिअरमुळे वय वाढल्यानंतर लग्न होणे आणि मुलं न होणे, ही आजच्या काळात एक खूप गंभीर समस्या बनली आहे. एकटे राहाणाऱ्या आणि मुलं नसणाऱ्या तरुण जोडप्यांमध्ये तणाव वाढू लागतो. त्यांच्यासाठी या तणावातून जाणे खूप आव्हानात्मक असते. याचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे नवे अनुभव आणि समन्वयाचा अभाव यामुळे पती-पत्नीमधील नात्यात कटुता निर्माण होत आहे. लग्नानंतर संगीता आणि प्रवीण त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगत होते. मौजमजा, खाणे, रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. काही काळानंतर, जेव्हा त्यांच्या मित्रांना मुलं झाली तेव्हा त्यांनी त्यांना भेटणे बंद केले.

जेव्हा मित्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाले, तेव्हा दोघांनीही स्वत:चे कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी होऊ शकले नाहीत. जसे ते सांगतात की, वेळ कोणासाठीही थांबत नाही. दोघांनाही समजले की खूप उशीर झाला असावा, त्यामुळे परस्पर सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि संपूर्ण तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना औषधांसोबत महिन्याभरासाठी सूचना आणि पथ्य दिले, त्यामुळे त्यांच्या आशा जागवल्या. दोघांनीही सकारात्मक उर्जेने प्रयत्न करायला सुरुवात केली, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

दिवस महिन्यांत आणि महिने वर्षांत बदलत राहिले. दवाखान्याच्या फेऱ्या सुरूच होत्या. दरम्यान त्यांना शहरातील सर्वोत्तम डॉक्टर भेटले. त्यांनी दुसऱ्या शहरात आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिला पण यश मिळाले नाही.

दोघांनाही नियमित सेक्सचा कंटाळा येऊ लागला. मूल नसल्याचा मानसिक ताण वाढू लागला, ज्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले आणि एकमेकांना दोष देऊ लागले. ते कितीही थकलेले असले तरी त्यांच्यातील चर्चा अखेर मुलावर येऊन थांबायची.

मूल नसल्यामुळे, तणाव वाढू लागला जो एकमेकांना टोमणे मारणे, तसेच इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येऊ लागला. दोघांचीही चिडचिड होत होती. निरोगी वातावरणाऐवजी घरातील वातावरण तणावाचे झाले. साधे बोलणेही मुलाच्या विषयावर येऊन थांबायचे. लोक काय बोलतील, समाज आपल्याला वांझवटे समजेल. संगीताचे आई न होण्याचे दु:ख इतके वाढले की, ती प्रवीणला दोष देऊ लागली. मनात नकारात्मकता वाढू लागली. तिने युट्यूब आणि गुगलवर मूल कसे होईल, याचे मार्ग शोधायला सुरुवात केली. प्रवीणला कशातच रस नसल्यासारखे वाटू लागले.

शेवटी, प्रवीण थकला आणि संगीताला म्हणाला की, आता बस झाले, मी या रोजच्या त्रासाला कंटाळलो आहे. तू मला किती टोमणे मारतेस? खूप पैसाही खर्च होत आहे. मीही तुझ्यासोबत कितीतरी दु:ख सहन करत आहे. तुला कुटुंबातील सदस्यही दोष देत नाहीत तरीही तू इतका त्रास का करून घेत आहेस?

मित्र आणि नातेवाईकांकडून दबाव

सामाजिक दबाव ही एक मोठी समस्या आहे, कारण प्रत्येक वर्तुळात मुलं असणे हे अजूनही गरजेचे मानले जाते. कुटुंब आणि मित्र देखील या विषयावर तुमचा तणाव वाढवू शकतात. सामाजिक भीती किंवा चुकीच्या बोलण्यातून नात्यात तणाव निर्माण करणे योग्य नाही.

राहुल आणि नेहा त्यांच्या कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात, दिल्लीत राहातात. लग्नाच्या ६ वर्षांनंतरही त्यांना कोणतीही समस्या नव्हती. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि मित्र त्यांना मूल नसल्याबद्दल विचारू लागले आणि कुटुंब वाढवण्यास सांगू लागले. शेजारीही भेटल्यावर हसत तोच सल्ला देऊ लागले. नेहा हसून विषय टाळू लागली. एकदा तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की, ‘‘जसे वय वाढेल तसे मूल होण्यात समस्या वाढू लागेल.’’

तेव्हा तिने सांगितले की, राहुलला मुलं आवडत नाहीत, त्यामुळे मी शेजारच्या मुलांसोबत खेळून वेळ घालवते.

आता तर घरातील सदस्यांनीही बोलणे बंद केले होते, त्यांचा दैनंदिन दिनक्रम नीरस होऊ लागला. मनात मुलाची इच्छा जागृत होऊ लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते बाळासाठी डॉक्टरांकडे गेले, पण काही उपयोग झाला नाही. आयुष्यात तणाव वाढू लागला आणि आरोग्यही बिघडू लागले.

मूल हवं असल्याच्या वाढत्या मानसिक ताणामुळे नेहाच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तिला काही विशिष्ट दिवशी गर्भधारणेचा प्रयत्न करावा लागत होता, पण राहुल थकू लागला. रोज त्याच त्याच गप्पा आणि त्याच कामामुळे नेहाही थकली, तिला कंटाळा येऊ लागला. आरोप-प्रत्यारोप आणि टोमणेबाजी सुरू झाली, दोघांनाही शारीरिक दोष असल्याच्या न्यूनगंडाने ग्रासले. त्यांच्या आयुष्यात ढोंगी पुजारी आणि अंधश्रद्धेचा एक नवीन अध्याय सुरू झाला. खरंतर आई होणे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. हे एक सुंदर नाते आहे.

लोकांच्या बोलण्यापासून वाचण्यासाठी दोघांनीही सामाजिक जीवन जगणे बंद केले. सर्वांपासून दूर जाऊन, ते त्यांच्या ताणतणावाशी आणि निराशेशी लढू लागले. सुखी आयुष्य हातातून निसटू लागले. चांगले कपडे घालणे तर दूरच, त्यांच्या चेहऱ्यावरील खोल चिंतेचे भाव त्यांना समाधानाने जगूही देत नव्हते.

आर्थिक तसेच नातेसंबंधांचा दबाव

मुलांचे संगोपन करताना आर्थिक ताणही येतो. शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी पैशांचा अभाव तणावाचे कारण ठरू शकते.

अनु आणि मयंक दोघेही मुंबईत राहातात. दोघेही एका खासगी कंपनीत काम करतात. दोघांचाही पगार चांगला आहे, पण महानगरांमध्ये खर्चही कमी नाही. अशा परिस्थितीत, मूल झाल्याने त्यांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यही एकत्र राहात नाहीत, पूर्वी ते मूल होण्यासाठी प्रयत्न करत नव्हते आणि जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा खूप उशीर झाला होता.

मूल नसल्यामुळेही नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि ही समस्या पती-पत्नीमध्ये कटुता निर्माण करू शकते. त्यांनी त्याच्या मित्र- मैत्रिणींना भेटणे बंद केले. मनाची शांती नाहीशी झाली आणि नैराश्य येऊ लागले.

आज ५० टक्के तरुण जोडप्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. उशिरा होणारे लग्न आणि असंतुलित जीवनशैली, हे यामागचे कारण आहे. आजची जीवनशैली वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण आहे.

डॉ. हर्षा सांगतात की, हा ताण जीवनातील प्रत्येक समस्येचे मूळ आहे. जर तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल तर आनंदी हार्मोन्स बाहेर पडतील, जे गुणसूत्रांच्या मिलनात उपयुक्त ठरतात. तणावामुळे प्रजनन क्षमता कमी होते. यामुळे महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस होऊ शकतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते.

शरीराच्या इतर अवयवांवरही ताणतणावाचा परिणाम होतो. पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. झोपेचा अभाव शरीरात थकवा निर्माण करतो. त्याचवेळी, पुरुषांमध्ये झोपेचा अभावदेखील शुक्राणूंची संख्या कमी करतो. तीव्र ताणामुळे हार्मोन्समध्ये व्यत्यय येतो. ताणतणावामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल वाढते, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

या ताणाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. तरुण जोडप्यांनी याची विशेष काळजी घ्यायला हवी. मूल न होण्याचे मुख्य कारण तणाव असू शकते.

प्रत्येक जोडप्याला मूल असणे आवश्यक नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे, परंतु तरीही त्यांनी त्यांचे जीवन सकारात्मक पद्धतीने जगले आहे.

कलाकार आणि यशस्वी जोडपी ज्यांना मुलं नाहीत किंवा काही कारणास्तव ती झाली नाहीत, ते सांगतात, हे खरं आहे की, लग्नानंतर मुलं झाली नाहीत तर नात्यात दुरावा निर्माण होतो, परंतु बॉलिवूडमध्ये अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी आहेत ज्यांना मुलं नाहीत किंवा त्यांना ती नकोच होती. मूल नसले तरी त्यांचे आयुष्य प्रेमाने, एकमेकांबद्दलच्या आदराने आणि कायमचे एकत्र राहाण्याच्या इच्छांनी भरलेले आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानू, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात या परिस्थितीचा एकत्रितपणे सामना केला. जावेद अख्तर आणि शबाना आझामी यांनाही स्वत:ची मुलं नाहीत, पण तरीही त्यांच्या आयुष्यात शून्यता नाही. जावेद अख्तर यांना त्यांची पहिली पत्नी हिना इराणीपासून दोन मुलं आहेत, अनुपम खेर आणि किरण खेर हे त्यांच्या पहिल्या अयशस्वी लग्नानंतर जन्माला आले, पण त्यानंतर त्यांना मूल झाले नाही. मीना कुमारी आणि कमल अमरोही, साधना – आरके नय्यर, मधुबाला-किशोर कुमार, आशा भोसले आणि आरडी बर्मन ही काही प्रसिद्ध नावे आहेत ज्यांना एकतर मुलं नको होती किंवा काही कारणास्तव ती होऊ शकली नाहीत. सांगायचे तात्पर्य असे की, मुलांशिवायही त्यांच्या आयुष्यात शून्यता नव्हती, उलट ते त्यांचे जीवन समर्पणाने जगले. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मुलाला दत्तक घेतले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली.

तणावाचा सामना कसा करावा?

समजून घ्या आणि बोला : सर्वप्रथम, पती-पत्नीची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांच्या भावना लक्षात ठेवून मोकळेपणाने बोला. बोलताना, लक्षात ठेवा की, चर्चा फक्त मूल या एकाच विषयावर मर्यादित नसावी. एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा, बाहेर जा, लोकांना भेटा, अशा गोष्टी करा, ज्या तुम्हाला आनंद देतील. हसत राहा आणि हसवत राहा, त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. हसणे आणि हसवणे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते.

आरोग्याकडे लक्ष द्या : जर तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकत नसाल तर मानसिक आरोग्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. आहार आणि वेळेची विशेष काळजी घ्या. पौष्टिक आहार आणि चांगले विचार तुम्हाला तणावातून बाहेर काढतील.

परस्पर पाठिंबा आणि मदत : कुटुंबाकडून आणि मित्रांकडून पाठिंबा मिळवणे देखील उपयुक्त ठरू शकते. कुटुंबातील ज्येष्ठांचा अनुभव तणावातून मुक्त होण्यास मदत करू शकतो. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा तुमच्यात सकारात्मकता आणू शकतो. न्यूनगंडाने ग्रस्त होऊ नका. जर तुम्ही तुमच्या शहरापासून खूप दूर राहात असाल तर तुमच्या कुटुंबातील मुलांशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करा; त्यांचा सहवास तुम्हाला तणावातून मुक्त करेल.

आपापसातील प्रेम वाढवा : मुलांशिवायही तुम्ही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकता. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा, बाहेर फिरायला जा, चांगली पुस्तके वाचा, ज्यामुळे मन सकारात्मक होईल. मूल नसल्यामुळे नाते बिघडू देऊ नका, उलट यामुळे पती-पत्नीला एकमेकांसोबत घालवण्यासाठी जास्त वेळ मिळेल.

आरोग्याची काळजी : आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. ध्यानधारणा केल्याने आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवल्याने, तणावाची भावना कमी होते आणि मनात निरर्थक विचार येणे थांबते. यामुळे रक्तदाबही नीट राहातो. योग आणि ध्यान करा. तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. मद्यपानाचे विष तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तणाव टाळण्यासाठी औषधांचा आधार घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याशी संबंधित सूचनांचे पालन करा. ज्यांना मुलं नाहीत त्यांच्याशी अधिक संवाद साधा. जर तुमच्या आजूबाजूला मुलं असतील किंवा असा कोणताही क्लब असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, कारण मुलांसोबत राहिल्याने ताण कमी होतो. तुमच्या जवळच्या मित्रांशी किंवा शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, सामाजिकता वाढवा.

कौशल्य विकास: कौशल्ये शिका, रील्स नव्हे

* शिखा जैन

जबलपूरच्या बर्गी धरणावर नुकत्याच झालेल्या क्रूझ शिपच्या भीषण अपघाताने हे सिद्ध केले आहे की, हा अपघात भयंकर निष्काळजीपणाचा परिणाम होता, ज्यात १३ जणांचा बळी गेला. प्रत्यक्षदर्शी आणि अहवालानुसार, त्या दिवशी हवामान आधीच खराब होते, तरीही पर्यटकांसह क्रूझ चालवण्यात आली.

तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष करणे ही एक सवयच झाली आहे. क्रूझच्या बिघडलेल्या इंजिनची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना आठवडे आधीच देण्यात आली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रवाशांनी आधीच लाईफ जॅकेट घातले नव्हते आणि अपघाताच्या वेळी झालेल्या घबराटीमुळे त्यांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. क्रूझवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, सुरक्षा नियमांचा अभाव होता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे योग्य प्रशिक्षणाचा अभाव होता. या सर्व घटकांनी या अपघाताला हातभार लावला.

अपघात होऊ दिले जाऊ नयेत

देखभालीच्या संस्कृतीचा अभाव : जेव्हा आपण काहीतरी नवीन बांधतो, तेव्हा आपण त्याच्या अंतर्गत सजावटीवर आणि भव्य इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. पण जेव्हा देखभालीचा विषय येतो, तेव्हा काही हजार रुपयेसुद्धा आपण वाया गेलेले मानतो. झोपाळा तुटेपर्यंत, लिफ्ट अडकेपर्यंत किंवा शॉर्ट सर्किट होईपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही. जर आपल्याला देखभाल कशी करायची हेच माहित नसेल, तर आपल्याला संतुलन समजत नाही. सहा लोक एका बाजूला उभे राहिले तरी दुसऱ्या बाजूचे संतुलन बिघडेल आणि बोट डोलू लागेल. आपल्याला या गोष्टींची जाणीवही नसते.

आपण प्रतिबंधात्मक देखभालीऐवजी बिघाडानंतरच्या देखभालीवर विश्वास ठेवतो

म्हणजे, वस्तू बिघडण्यापूर्वी त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करणे हा आपण एक अनावश्यक खर्च मानतो, पण जेव्हा वस्तू बिघडतात आणि अपघात होतो, तेव्हा आपण आरडाओरडा करायला लागतो.

देखभालीच्या कौशल्यांची प्रचंड कमतरता आहे

आपल्यात देखभालीच्या कौशल्यांची कमतरता आहे. वस्तूंची देखभाल कशी करायची हे आपल्याला माहीत नाही. तुम्ही घरातून बाहेर पडून रस्त्यावरून चालत गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की दहापैकी नऊ मोटरसायकल अस्वच्छ असतात. लोक त्या स्वच्छसुद्धा करत नाहीत. आपल्या घरात काही बिघडल्यास, आपण ते स्वतः दुरुस्त करण्याऐवजी, आठवडाभर मेकॅनिकची वाट पाहतो, त्रास सहन करतो, पण स्वतः ते दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करत नाही.

डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कौशल्यांपेक्षा रील्स/शॉर्ट्ससाठी जास्त केला जातो. आज, यूट्यूब कौशल्ये शिकवणाऱ्या ट्युटोरियल्सने भरलेले आहे. इलेक्ट्रिकल सर्किट दुरुस्त करण्यापासून ते बाईक सर्व्हिसिंग करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीवर ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत, पण आपण त्याचा वापर काहीतरी नवीन शिकण्यासाठी नाही, तर केवळ वेळ वाया घालवण्यासाठी करतो. मात्र, निरुपयोगी रील्स बनवून किंवा पाहून आपण वेळ वाया घालवतोच.

आजकाल लोक इलेक्ट्रिक ग्रिल मशीनसारख्या गोष्टी चालवायलाही शिकत नाहीत. देखभाल हा आपल्या जीवनाचा भाग राहिलेला नाही. यामुळेच हे अपघात घडत आहेत.

सोसायट्यांमध्ये अग्निशामक यंत्रे बसवलेली आहेत, पण ९०% लोकांना ती कशी चालवायची हे माहीत नाही. अनेकदा, ही उपकरणे केवळ ऑडिट पास करण्यासाठी किंवा दंड टाळण्यासाठी बसवलेली असतात. वर्षातून एकदाही सुरक्षा सराव न केल्यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत लोक घाबरतील आणि चुका करतील हे निश्चित आहे.

निष्काळजी वृत्तीमुळे समस्या निर्माण होतात

“ही फक्त एक सैल तार आहे, काही नाही,” किंवा “झोपाळ्याचा थोडा आवाज येतोय, काही होणार नाही,” किंवा “रस्त्याच्या मधोमध खड्डा आहे, तर काय? आपण त्यातून जाऊ.” हे छोटे, दुर्लक्ष करणारे हावभाव एके दिवशी मोठ्या अपघातात बदलू शकतात.

जबाबदारीचा अभाव

जेव्हा फरिदाबादमधील झोपाळ्यासारखे, वृंदावनमध्ये नुकतेच बुडालेले स्टीमर आणि जबलपूर अपघातासारखे अपघात घडतात, तेव्हा ऑपरेटर पळून जातो, मालक जबाबदारी झटकतो आणि प्रशासन चौकशी सुरू करते. जर देखभालीच्या अभावासाठी मोठा दंड आणि तुरुंगवासाची कठोरपणे अंमलबजावणी केली गेली, तर लोक स्वतःहून त्यांच्या उपकरणांची तपासणी करून घेऊ लागतील.

स्वतः काम करण्याच्या संस्कृतीचा अभाव

पाश्चात्य देशांमध्ये, लोक स्वतःच्या घरांना रंग देणे, नळकाम दुरुस्त करणे किंवा छोटे ड्रिलिंग करणे ही अभिमानाची बाब मानतात. येथे, अनेक लोक स्क्रू ड्रायव्हर उचलणे किंवा ड्रिल चालवणे हे एक छोटे काम मानतात आणि मेकॅनिक ते करेल असे गृहीत धरतात. २०० रुपयांच्या कामासाठी आपण मेकॅनिकची दोन दिवस वाट पाहू, पण ५००-१००० रुपयांचे ड्रिल मशीन विकत घेऊन ते स्वतः चालवायला शिकण्याचा त्रास घेणार नाही.

साधनांच्या संचाचा अभाव

हे एक कटू सत्य आहे की बहुतेक भारतीय घरांमध्ये साधे साधनांचे संच (स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, टेप आणि हातोडा) सुद्धा नसतात. आपण आपली सुरक्षितता आणि सोय इतरांवर सोपवतो.

जर आपल्या घरी स्क्रू ड्रायव्हर नसेल, तर याचा अर्थ असा की कोणत्याही लहानसहान तांत्रिक समस्येसमोर आपण पूर्णपणे हतबल आहोत.

आपण फक्त स्वतःची सोय पाहतो

आपण एकमेकांना मदत करत नाही, आपण फक्त स्वतःची सोय पाहतो.

जबलपूरमध्ये एक क्रूझ जहाज गायब झाले आणि पुलावर काम करणाऱ्या कामगारांनी ४-५ लोकांना वाचवले. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला. जीव वाचवण्याची जबाबदारी नावाड्यावर होती, पण तो पळून गेला. संकटाच्या वेळी सर्वात आधी पळून जाणे हे भ्याडपणाचे टोक आहे आणि यातून हे दिसून येते की, आपण कामाला केवळ पैसे कमावण्याचे साधन मानले आहे, जबाबदारी किंवा सेवा नाही. मात्र, त्या मजुरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक लोकांचे प्राण वाचवले. यावरून हे दिसून येते की, उच्च पदव्या किंवा प्रभाव असलेले लोक अपघाताच्या वेळी अनेकदा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात, तर एक सामान्य मजूर विचार न करता पाण्यात उडी मारतो.

ही मानसिकता कशी बदलावी

पाश्चात्य देशांमध्ये, लोक स्वतःच्या घरांना रंग देणे, नळ-पाणीपुरवठा दुरुस्त करणे किंवा स्वतः लहानसहान ड्रिलिंग करणे ही अभिमानाची गोष्ट मानतात. पण आपण याला अपमान समजतो. आपल्याला वाटते की ही कामे करणे आपल्या प्रतिष्ठेच्या खाली आहे. या कामांसाठी आपल्याकडे आधीच कर्मचारी आहेत—फक्त पैसे द्या आणि काम बघा. त्यामुळे, जोपर्यंत देखभाल आपल्या शिक्षण प्रणालीचा आणि दैनंदिन जीवनाचा भाग बनत नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत.

सुरक्षा उपकरणे असणे हे तितके महत्त्वाचे नाही, जितके ती कार्यरत स्थितीत आहेत आणि लोकांना ती चालवता येतात याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

ड्रिल किंवा ग्रिल मशीन चालवणे हे केवळ एक काम नाही, तर ते एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. हे स्वावलंबनाचे पहिले पाऊल आहे. आपली यंत्रे आणि अवजारे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणे हे आपल्या दैनंदिन कामाचा भाग असले पाहिजे, जसे आपण आपली रोजची कामे करतो. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी, आपण त्यांना घरातील छोटी कामे (जसे की सायकल साफ करणे किंवा स्क्रू घट्ट करणे) शिकवली पाहिजेत. यामुळे त्यांच्यामध्ये वस्तूंची देखभाल करण्याची संस्कृती रुजते.

मुलांची भांडणे हाताळणे : मुलांमधील संघर्षात पालकांनी काय करावे?

* शिखा जैन

मुलांची भांडणे हाताळणे : “बघ, त्याने मला मारले,” “बघ, त्याने माझे खेळणे तोडले…” यांसारख्या लहान गोष्टी कधीकधी शारीरिक हिंसाचारात बदलतात आणि भावंडांच्या भांडणात मुलांना दुखापतही होऊ शकते. पण मुलांची भांडणे पालकांसाठी एक समस्या बनू शकतात. जर पालकांनी एका मुलाच्या वागण्याला बरोबर आणि दुसऱ्याच्या वागण्याला चूक ठरवले, तर ते त्यांच्यासाठी कठीण होऊ शकते, कारण त्यामुळे एका मुलाचे मन दुखावू शकते.

मुले शांततेत राहावीत आणि त्यांचे कुटुंब संघर्षमुक्त असावे, हे सुनिश्चित करण्यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे:

पालक स्वतः त्यांच्या भावंडांशी भांडत आहेत का?

एका निरागस ९-१० वर्षांच्या मुलाला माहित असते की त्याची आई त्याच्या भावाशी भांडत आहे. त्याची आत्या त्याच्या वडिलांशी भांडत आहे. तो त्याच्या आत्याच्या घरी खूप जायचा आणि खूप खेळायचा, पण आता त्याच्या वडिलांनी ते बंद केले आहे. तो त्याच्या आई-वडिलांना विचारतो, “माझे काका आणि काकू आता घरी का येत नाहीत?” सुरुवातीला त्याचे काका आणि काकू खूप प्रेमळ होते, पण नंतर अचानक गायब झाले. मुलांना या गोष्टी समजतात. त्यांना माहित असते की त्यांचे आई-वडील त्यांच्या भावंडांशी भांडतात आणि मग बोलत नाहीत. हळूहळू, या गोष्टी त्यांच्या वागणुकीचा भाग बनू लागतात. ते सुद्धा त्यांच्या भावंडांशी भांडू लागतात आणि यासाठी पालक जबाबदार असतात.

पालकांनी त्यांचे वाद आणि सवयी बदलल्या पाहिजेत

जर पालकांना वाटत असेल की त्यांच्या मुलांनी भांडणे टाळावीत, तर त्यांनी त्यांच्या भावंडांच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासमोर त्यांच्याशी भांडू नका किंवा त्यांना तुमच्या वादात सामील करू नका. मुलांना तुमच्या वादांपासून दूर ठेवण्यासारखे नियम ठरवा. त्यांना त्यांच्या मामा आणि आत्यांना भेटण्यापासून रोखू नका.

मुलांमधील हे वाद निव्वळ पालकांच्या चुकीमुळे होतात

“तू माझी लाडकी आहेस…” हे ऐकायला छान वाटतं, पण दुसऱ्या मुलासाठी तो एक नकार असतो. हे शब्द भावंडांमधील पवित्र नात्याला शत्रुत्वात बदलतात. जेव्हा एका मुलाला प्रेम मिळाल्याची भावना दिली जाते आणि दुसऱ्याला कमीपणाची भावना दिली जाते, तेव्हा त्यांच्यातील संघर्ष केवळ क्षणिक नसतो. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढू लागतात. त्यांना वाटते की केवळ दुसऱ्याला कमी लेखूनच ते आपल्या आई-वडिलांचे लक्ष वेधून घेऊ शकतात.

“तू माझी लाडकी आहेस, आणि ती माझी लाडकी नाही…” यांसारखे शब्द तर पालकांच्या शब्दकोशात असायलाच नकोत. हेच ते शब्द आहेत जे दोन भावंडांमध्ये एक रेषा ओढतात.

जेव्हा आपण विचारतो, “आई, ती तुला जास्त प्रिय आहे की बाबांना?”, तेव्हा आपण मुलाला प्रेमाचे मोजमाप करायला शिकवत असतो. प्रेम ही अशी गोष्ट नाही जी विभागली किंवा तुलना केली जाऊ शकते.

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” यांसारखे शब्द आपण वापरावेत की नाही?

युरोपियन संस्कृतीप्रमाणे, प्रत्येकाला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असे म्हणणे देखील चुकीचे मानले जाते. जर तुमचं एखादं मूल बाहेर जात असेल आणि तुम्ही त्याला म्हणालात, “माझं तुझ्यावर प्रेम आहे,” तर दुसरं मूल विचारेल, “का, तुझं माझ्यावर प्रेम नाही का?” मग तुम्ही तिला असं का म्हणालात?

“आई, तुझं माझ्यावर प्रेम नाही,” हे बोलण्यासारखं नाही, तर कृतीत आणण्यासारखं आहे. “माझं तुझ्यावर प्रेम आहे,” “मी तुझी काळजी घेतो,” हे बोलण्यासारखं नाही, तर फक्त काळजी घेण्यासारखं आहे. तुमचे आई-वडील तुमच्यावर प्रेम करतात की नाही, हे मुलाला तुमची काळजी घेतल्यानेच कळेल.

काळजी हीच खरी भाषा आहे

आईने आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवणे, वडिलांनी शांतपणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे, किंवा भांडणाच्या वेळी तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे सत्य समजावून सांगणे, या गोष्टींमुळे मुलाला सुरक्षित वाटते. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता की नाही, हे त्यांना विचारण्याची गरजही भासत नाही, कारण त्यांना तुमच्या उपस्थितीत आणि काळजीमध्ये उत्तर सापडते.

कोणाचीही बाजू घेऊ नका

भांडण फार गंभीर नसतानाही, कोणाचीही बाजू घेऊ नका आणि दुसऱ्या मुलाला एकटे पाडू नका. यामुळे त्यांच्या भावंडांबद्दल आणि तुमच्याबद्दलही नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. एका मुलाला त्याची चूक आहे असे सांगण्याऐवजी, म्हणा, “आपण हे एकत्र मिळून सोडवूया.”

तुलना करू नका

पालक अनेकदा एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करतात, ज्यामुळे मत्सर आणि द्वेष निर्माण होऊ शकतो. मुलांची एकमेकांशी तुलना करणे टाळा, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होईल आणि संघर्षाची शक्यता कमी होईल. अगदी नकळतपणे, “बघ तुझा भाऊ/बहीण किती हुशार आहे,” असे म्हटल्यानेही मत्सराची आग भडकते.

प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक सामर्थ्याची प्रशंसा करा. त्यांना जाणवू द्या की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि ते एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत.

शिस्त महत्त्वाची आहे

वाईट वागणुकीला कधीही पाठिंबा देऊ नका. तुमची स्वतःची ऊर्जा वाचवण्यासाठी आणि मुलांना योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी शिस्तीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरा. उदाहरणार्थ, जेव्हा ते भांडत असतील, तेव्हा त्यांना दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाण्यास सांगा आणि त्यांना शांत होण्याची संधी द्या. त्यांच्या चुका आणि वागणुकीबद्दल त्यांच्याशी एकांतात चर्चा करा, त्यांना योग्य-अयोग्य समजावून सांगा. पुढच्या वेळी अशीच परिस्थिती उद्भवल्यास ते ती कशी हाताळू शकतात याची उदाहरणे द्या.

तडजोड करायला शिकवा

त्यांना स्वतःहून संघर्ष कसा हाताळायचा हे शिकवा. त्यांना समजावून सांगा की एकाची पाळी दुसऱ्याच्या नंतर येईल. जेव्हा त्यांना खूप राग येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला शिकवा, त्यांना १० ते १ पर्यंत उलट मोजायला सांगा आणि भांडण्याऐवजी आपल्या भावना शब्दांत व्यक्त करायला शिकवा.

पालक आपल्या मुलांना ज्येष्ठता समजावून सांगण्यात कमी पडतात

दोन मुलांपैकी एक मोठा असतो आणि दुसरा लहान. लहान मुलाने हे समजून घेतले पाहिजे की तो लहान आहे. त्याने आपल्या मोठ्या भावंडाचा आदर केला पाहिजे हे त्याने समजून घेतले पाहिजे. घरात एक नियम असायला हवा. जर मोठे मूल चांगला सल्ला देत असेल, तर पालकांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून लहान मुलाला समजेल की ज्येष्ठतेला महत्त्व आहे. जेव्हा पालक स्वतःच सर्वांसमोर मोठ्या मुलाला रागावतात किंवा कमी लेखतात, तेव्हा लहान मूलही तेच शिकते.

ज्येष्ठता केवळ वयामुळेच नाही, तर जबाबदारीमुळेही येते. पालक अनेकदा ही चूक करतात की ते मोठ्या मुलावर सर्व जबाबदारी टाकतात (जसे की लहान मुलाची काळजी घेणे), पण त्या जबाबदारीसोबत येणारा अधिकार किंवा आदर त्याला देत नाहीत.

अनेकदा, लहान मुलाकडून चूक होते आणि पालक मोठ्या मुलाला सांगतात, “तू मोठा आहेस, समजून घे आणि त्याला जाऊ दे.”

असे बोलून, तुम्ही लहान मुलाला अभय देता, कारण त्याला वाटते की तो काहीही चुकीचे करून सहज सुटू शकतो. जेव्हा लहान मुलाला हे शिकवले जात नाही की त्यांचा मोठा भाऊ किंवा बहीण त्यांच्या आधी या जगात आले आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे, तेव्हा ते गैरवर्तनाला आपला हक्क मानू लागतात.

मोठ्या व्यक्तीला जास्त अनुभव असतो

लहान मुलाला अनेकदा त्याचा मोठा भाऊ किंवा बहीण एक स्पर्धक वाटतो, ज्याला पालकांचे जास्त लक्ष किंवा स्वातंत्र्य मिळते. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, आपण घरात शिकण्याची संस्कृती विकसित केली पाहिजे.

जेव्हा लहान मुलाला हे दिसते की मोठ्या व्यक्तीचा अनुभव हा त्याला कमी लेखण्यासाठी नसून त्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आहे, तेव्हा मत्सराची जागा आदराने घेतली जाते.

मोठी व्यक्ती, मग तो मुलगा असो वा मुलगी, संरक्षक असते. आपल्या लहान भावंडांचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

धर्म आपल्याला भावंडांमधील स्पर्धेबद्दल शिकवत आहे

इतिहास आणि पौराणिक कथा पाहिल्यास, आपल्याला असे आढळते की भावंडांमधील स्पर्धा, किंवा त्यांच्यातील चढाओढ, ही जवळजवळ प्रत्येक महान गाथेचा एक भाग राहिली आहे.

रामायणातील बळी आणि सुग्रीव यांच्यातील संघर्ष असो, महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यातील भीषण युद्ध असो, किंवा बायबलमधील केन आणि एबेल यांच्या कथा असोत, या सर्वांमध्ये भावंडांमधील संघर्ष हाच मुख्य विषय राहिला आहे.

राम आणि भरत यांची संपूर्ण कथा भावंडांबद्दलच आहे. जर रामासाठी मंदिरे बांधली गेली, तर भरतासाठी का नाही? धर्माने आपल्याला हेच शिकवले नाही का आणि भरत निरुपयोगी आहे असे सांगितले नाही का? असे म्हटले जाते की राम आणि भरत ही एक जोडी आहे. पण आपल्या सरकारने रामासाठी अनेक मंदिरे बांधली आहेत, मात्र भरतासाठी एकही नाही. लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचीही मंदिरे नाहीत.

दुर्योधन आणि युधिष्ठिर का लढत होते? ते सुद्धा भावंडांमधील वैरच होते

ज्या घरांमध्ये धार्मिक चर्चा क्वचितच होतात, तिथे भावंडे दीर्घकाळ एकत्र राहू शकतात. भावंडांमधील संघर्ष प्रत्येक धर्मात असतो, त्यामुळे ज्या घरांमध्ये धार्मिक चर्चा वारंवार होतात, तिथे मुलांमध्ये ही घटना अधिक प्रमाणात दिसून येते. ही घटना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातही प्रचलित आहे. ती हिंदू धर्मातही अस्तित्वात आहे. ती आपल्या मनाच्या खोलवरच्या कोपऱ्यात वसलेली असते.

जर दशरथाने म्हटले असते की राम राजा होत आहे, तर त्याने चपला का घातल्या आहेत हे विचारून विषय तिथेच संपायला हवा होता. जर तुम्ही अशा निरर्थक गोष्टी सांगितल्या, तर त्या लवकरच तुमच्याच घरात पुन्हा सांगितल्या जातील. एक दिवस तुमचे मूलही म्हणेल की भरतही लढला होता. म्हणून, जर तुम्ही धर्माबद्दल बोललात, तर मुले हमखास भांडतील.

आजच्या काळात तर्क आणि तथ्यांच्या आधारावर जगा

तुमच्या मुलाला लहानपणापासून शिकवा की, जर मी कमजोर असेन, तर मी इतरांचे रक्षण केले पाहिजे. मी समानतेचा शोध घेऊ नये. आजच्या काळात, भावनांऐवजी तथ्यांवर लक्ष केंद्रित केल्याने चांगले निर्णय घेण्यास मदत होते.

समानतेपेक्षा सुरक्षितता आणि सहकार्याला प्राधान्य देणे हा एक खूप खोलवर रुजलेला विचार आहे. अनेकदा, पालक मुलांना जो धडा शिकवतात की सर्वजण समान आहेत, तो त्यांना वास्तविक जगात कमजोर बनवतो. त्याऐवजी, जर मुलांना त्यांची बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखायला शिकवले, तर ते एकमेकांना पूरक ठरू शकतात.

तुम्हीदेखील करू शकता पुरूषी कामं

* रेणू गुप्ता

मी काल रात्री माझी मैत्रीण मुस्कानच्या घराच्या ड्रॉइंगरूममध्ये बसून तिच्याशी गप्पा मारत होती. अचानक तिथला लाईट गेला. इतर रूम्सचे लाईट होते. ‘‘ओह, मला वाटतं इथला बल्ब फ्यूज गेलाय. रोनितदेखील घरी नाहीये. आता बल्ब कोण बदलेल?’’ ती काळजी करत म्हणाली.

‘‘अगं एवढी का काळजी करतेस? बल्ब तर फ्युज झालाय. बदल ना. आकाश कोसळून तर नाही पडलंय ना.’’

‘‘मला बल्ब बदलायला नाही येत. हे काम पुरुषांच आहे. आपल्या बायकांच नाही.’’

‘‘एक्सक्युज मी, हे तू काय बोललीस? इतरवेळी तू घराबाहेर मोठी स्त्री-पुरुषांच्या समानतेचे झोंडे सतत गाडत राहतेस आणि घरातल्या कामांमध्ये हा भेदभाव? तू का नाही बदलू शकत फ्यूज्ड बल्ब? हे काही रॉकेट सायन्स तर नाहीये.’’

‘‘अरे बाबा, मी आतापर्यंत कधीच घरांमध्ये फ्युज बदलला नाहीये. नेहमी रोनितच बदलतो.’’

‘‘आणि जर कधी रोनितच्या मागे बल्ब फ्यूज गेला तर काय करशील? तुझ्या मोठ्या मुलीची मुलगी तुझ्याजवळच राहते ना? अजून खूपच छोटी आहे. रोनित कधी कधी ऑफिसच्या टूरवरती जातो. जरा विचार कर, कधी तो नसताना उशिरा रात्री तुझ्या रूमचा बल्ब फ्यूज गेला आणि ती अचानक जोरजोरात रडू लागली, तर काय करशील? रोनितची वाट बघत बसशील, की केव्हा तो दौऱ्यावरून परत येईल आणि बल्ब बदलेल?’’ मी थोडा विचार करून हसतच तिला विचारलं.

‘‘मी… मी…’’ माझ्या या प्रश्नावर ती गप्प बसली.

प्रत्येक काम बरोबरीचं

तेव्हा मी तिला समजावलं, ‘‘घरातील कामांमध्ये बाईपुरुषावर आधारीत असं कोणत्याही कामाचं विभाजन होता कामा नये. आज जर जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा मिळवून चालत आहेत, तर त्यांना घरचं बाहेरचं प्रत्येक कामदेखील करता यायला हवं. मी तर माझा मुलगा आणि मुलीकडून प्रत्येक काम करून घेते म्हणजे त्यांना देखील कोणतही काम करताना पुढे त्रास होता कामा नये.

‘‘माझा १९ वर्षाचा मुलगा बायकांची ठप्पा असलेली सर्व कामे जसं की भाज्याफळं, हिरव्या पालेभाज्या कापणं, धुणं, कुकिंग, डायनिंग टेबल लावणं, स्वत:चे कपडे धुणं, घराची स्वच्छता तेवढ्याच आवडीने करतो, जेवढ्या काळजीने माझी २१ वर्षाची मुलगी पुरुषांचं लेबल लागलेली कामं जसं की फ्युज बदलणं, नवीन बल्ब लावणं, स्वत:ची स्कुटी, घरातील विजेची सर्व उपकरणांची छोटीमोठी दुरुस्ती करणे, वीज, पाण्याची बिलं ऑनलाइन वा ऑफलाईन जमा करणं, बँक, विम्याची कामं, घराची गाडी, स्कुटीचे टायर बदलणं, तिच्या कॉलेजमधील सर्व ऑफिशियल कामं, कपडे, भाजी, रेशन विकत आणणं, गॅस सिलेंडर बदलणंसारख्या कामं करण्यात एक्सपर्ट आहे.

अमेरिकेत राहताना लग्नापूर्वी तिने ही सर्व कामं एकटीच्या बळावर केली. आता सांग जर मीदेखील तिच्याकडून लहानपणापासून फक्त बायकांचीच कामं करून घेतली असती तर ती अमेरिकेसारख्या देशामध्ये व्यवस्थित अॅडजेस्ट झाली असती का? तिथे व्यवस्थित राहू शकली असती का?’’

पॉवर सप्लाय ऑफ करा

बल्ब कोणत्याही प्रकारचा का असेना, सर्वप्रथम बल्बचा पॉवर सप्लाय स्विच ऑफ करा. यामुळे तुम्हाला फ्यूज बल्ब बदलतेवेळी करंट लागण्याचा धोका राहणार नाही.

जर बल्ब पेटलेला असताना तुमच्यासमोर फ्यूज झाला तर त्या स्थितीमध्ये त्याला थंड व्हायला काही वेळ द्या, ज्यामुळे तुमचा हात आणि बोटं सुरक्षित राहतील. उशिरापर्यंत जळणारा बल्ब अचानक बंद झाल्यास त्याला हात लावल्यामुळे तुमचा हात आणि बोटं भाजू शकतात.

कोणत्याही प्रकारच्या अवजड वस्तूंची व्यवस्था करा

बल्ब बदलण्यासाठी एखाद्या सुरक्षित जागी उभं राहण्यासाठी एक खुर्ची, स्टूल, टेबल वा शिडीची व्यवस्था करा म्हणजे तुम्ही उंचा वरती न लडखडता वा डगमगता सुरक्षित उभे राहू शकाल.

आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बल्बला फ्यूज होण्याच्या स्थितीमध्ये कसं बदलू शकता?

फ्यूज बल्ब बदलण्याची कृती

स्टेप-१ : फ्यूज बल्बला जोर न देता हाताच्या पंजामध्ये पकडा. आता त्याला डावीकडे फिरवण्याचा प्रयत्न करा. बल्ब त्याच्या सॉकेटमधून सहजपणे निघेल.

स्टेप-२ : आता नवीन बल्बला सॉकेटमध्ये कलॉकवाईज फिरवून फिट करा. पॉवर सप्लायच्या स्विचला ऑन करा. तुमच्या नवीन बल्बच्या प्रकाशाने तुमची खोली झगमगून निघेल.

कूकवेअरसह स्वयंपाकघराला द्या आधुनिक लूक

– प्रतिभा

पूर्वीच्या तुलनेत आज आपण सर्वजण केवळ घरासाठीच नाही तर स्वयंपाकघरासाठीही चांगलाच पैसा खर्च करतो, जेणेकरून घरासोबतच स्वयंपाकघरही आधुनिक दिसेल. अनेकवेळा आपण स्वयंपाकघराला वरकरणी आधुनिक बनवतो, पण तिथे वापरण्यासाठी कोणती भांडी घ्यावीत, जेणेकरून स्वयंपाकघरदेखील आधुनिक दिसेल, हेच आपल्याला समजत नाही.

आजकाल बाजारात विविध प्रकारचे कूकवेअर उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने स्वयंपाकघराला आधुनिक लूक देता येऊ शकतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कूकवेअरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहेत आणि त्यांना हाताळणे देखील खूप सोपं आहे. काही काळापर्यंत स्वयंपाकघरात स्टील आणि नॉन-स्टिक भांड्यांचा बोलबाला असायचा, पण आता अनेक प्रकारची स्वयंपाकाची भांडी स्वयंपाकघराचे सौंदर्य वाढवत आहेत. चला तर मग, आजच्या काही आधुनिक कुकवेअरबद्दल जाणून घेऊया :

दगडाची भांडी

नावावरून स्पष्ट आहे की, ही भांडी दगडाची आहेत. पिझ्झा बेस, ब्रेड, केक आणि पास्ता बनवण्यासोबतच ती सूप आणि स्टू बनवण्यासाठीही वापरली जातात. या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी खूप चांगले ठरते, कारण ती दगडापासून बनवलेली असतात, अन्न शिजवताना यातून कोणतेही विषारी आणि रासायनिक घटक बाहेर पडत नाहीत.

या भांड्यांना स्वच्छ करणे देखील खूप सोपं आहे. भांड्याच्या भोवती एकसारखी ज्वाळा पसरते, त्यामुळे अन्न एकसारखे शिजते, सोबतच ही भांडी जड असल्याने अन्न जळण्याची भीती नसते.

तांब्याची भांडी

तांब्याच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले ठरते, परंतु यात जास्त वेळ अन्न ठेवल्यास तांब्याचे रासायनिक घटक अन्नात मिसळतात. दुसरे म्हणजे, त्यांना साफ करणे खूप कठीण होते. तरीही आजकाल तांब्याची भांडी त्यांच्या आधुनिक स्वरूपात पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरचे सौंदर्य वाढवत आहेत.

आजकाल तांब्याच्या भांड्यांमध्ये बाहेरील थर तांब्याचा आणि आतील थर स्टीलचा असतो. ही भांडी खूप लोकप्रिय आहेत, पण ती फक्त शोभेसाठी असतात. तांब्याच्या शुद्ध भांड्यात अन्न शिजवल्याने तांब्याचे क्षारीय घटक अन्नात मिसळतात आणि शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात, परंतु ती बरेच महाग असल्याने ती विकत घेणे प्रत्येकालाच परवडत नाही.

मातीची भांडी

आजकाल मातीची भांडी खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये अन्न मंद आचेवर शिजवता येते. यामध्ये फारच कमी तेल वापरले जाते, त्यामुळे अन्नाची चव चांगली पकडली जाते. यामध्ये अन्न शिजवल्यास तुम्हाला अन्नातील सर्व पौष्टिक घटक मिळू शकतात. या भांड्यांमध्ये आम्लयुक्त अन्न जरी शिजवले तरी मातीतील अल्कधर्मी गुणधर्म अन्नातील गुणधर्म संतुलित करतात.

ही भांडी वापरण्यापूर्वी, ती १५-२० मिनिटे पाण्यात भिजवावीत, सोबतच स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी, ती चांगली गरम करणे आवश्यक असते, जेणेकरून संपूर्ण भांड्यात तापमान एकसारखे राहील.

कास्ट आयर्न कुकवेअर

कास्ट आयर्न कूकवेअरचा वापर ब्रेझिंग, तळण्यासाठी, मांस मंद आचेवर शिजवण्यासाठी तसेच ब्रेड, इतर भाजलेले पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये मंद आचेवरील जेवण सहज करता येते.

या भांड्यांमध्ये अन्न कमीत कमी तेलात शिजवता येते. ते एकसारखे शिजले जाते आणि चवदेखील टिकून राहते, सोबतच आयर्न म्हणजे लोह असल्यामुळे अन्न शिजताना, त्यात लोहासारखे पौष्टिक घटक आपोआप मिसळले जातात, जे मानवी शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास खूप उपयुक्त असतात. ही भांडी स्टोव्हपासून मायक्रोवेव्ह ओव्हनपर्यंत वापरून अन्न शिजवता येते.

पोर्सिलिन कुकवेअर

मेल्टिंग चॉकलेट, क्रीमी सूप आणि सॉस हे असे खाद्यपदार्थ आहेत, जे अगदी मंद आचेवर शिजवले जातात. पोर्सिलिनची भांडी यासाठी अतिशय योग्य आहेत. ती वजनाने खूप हलकी असतात आणि वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. ती स्क्रॅच प्रतिरोधक आणि इन्सुलेटेडदेखील आहेत, सोबतच मायक्रोवेव्ह आणि ओव्हनमध्येदेखील सहजपणे वापरली जाऊ शकतात.

पितळेची भांडी

तांब्याच्या भांड्यांप्रमाणेच पितळेची भांडीही आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. आजकाल फक्त जड स्टीलच्या भांड्यांना पितळेचा लूक देण्यासाठी पितळेचा लेप लावला जातो, जो खूप छान दिसतो. या लेपला कोणत्याही अतिरिक्त साफसफाईची आवश्यकता नसते. त्यामुळे ही भांडी अगदी सहजपणे हाताळता येतात. खऱ्या पितळेच्या तुलनेत ती स्वस्त देखील आहेत.

नोकरदार माता, असे ठेवा मुलांवर लक्ष

* प्रियंका यादव

‘मातृत्व ही एक पूर्णवेळ नोकरी आहे,’ ४२ वर्षीय स्वाती मेहता चहाचा कप हातात घेऊन एक घोट घेत दीर्घ श्वास सोडत सांगते. तिच्या आयुष्यातील अनुभव सांगताना स्वाती म्हणते, ‘‘जेव्हा मला पहिले बाळ झाले, तेव्हा मी फक्त २५ वर्षांची होते आणि अमेरिकेतील एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. ‘‘महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं किती महत्त्वाचं आहे, हे मला चांगलंच माहीत होतं, म्हणून मी काम आणि मातृत्व या दोन्हींची जबाबदारी घेतली. माझ्यासाठी हे आव्हानात्मक असलं तरीही मी ते निवडलं.’’

तेवढ्यात स्वातीची मुलगी गुलाबी रंगाचा ड्रेस घालून आली आणि आईला मिठी मारून सोफ्याच्या कडेवर बसली. तिच्याबद्दल बोलताना स्वाती म्हणाली, ‘‘माझी मुलगी सारा १६ वर्षांची आहे. ती ११ वीत शिकत आहे आणि तिला स्केचिंग तसेच चित्रकलेची खूप आवड आहे. तिचे इंस्टाग्रामवर २२ हजार फॉलोअर्स आणि यूट्यूबवर १८ हजार सबस्क्राइबर्स आहेत. तिला भविष्यात जे काही बनायचे आहे ते ती बनू शकते, माझ्या मुलीला माझा पूर्ण पाठिंबा आहे.’’

हे ऐकून तिची मुलगी तिच्या गालाचे चुंबन घेते म्हणते, ‘‘तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आई.’’

आव्हानापेक्षा कमी नाही

मातृत्व ही एक पूर्णवेळ नोकरी आहे, हे स्वातीचे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोन्ही गोष्टी एकत्रितपणे हाताळणे सोपे नाही, पण बदलत्या काळानुसार महिला करिअरकडे अधिक लक्ष देत आहेत आणि हे योग्यही आहे. प्रत्येक महिलेने स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:ची ओळख जपणे खूप गरजेचे आहे. अनेकदा आई आणि नोकरदार महिला या भूमिकांमध्ये समतोल राखण्याची कसरत हे कधीही न संपणारे आव्हान वाटू शकते, पण काळजी करू नका, कारण तुमच्यासारखी नोकरदार महिला, जी एक आईदेखील आहे, ती नोकरी आणि मुले कशी सांभाळू शकते, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया, काही उपाय जे तुमचे जीवन सोपे करू शकतात :

बेबी सिटरला आपलेसे करा

जर तुमचे मूल लहान असेल आणि तुम्ही नोकरदार महिला असाल तर तुम्ही मुलासाठी बेबी सिटर म्हणजे मुलाला सांभाळणारी बाई, नियुक्त करू शकता. तुम्ही कोणत्याही एजन्सी किंवा अॅपद्वारेही बेबी सिटर नियुक्त करू शकता. याचा फायदा म्हणजे या एजन्सी आणि अॅप्समधून येणारे बेबी सिटर्स आधीच नोंदणीकृत असतात. बेबी सिटर मिळाल्यास तुम्ही तुमचे काम सहज करू शकता.

घरात कॅमेरे बसवा

जर तुम्ही कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहात असाल आणि या काळात तुमचे मूल घरी एकटे असेल तर तुम्ही सुरक्षिततेसाठी तुमच्या घरात कॅमेरा बसवा आणि हा कॅमेरा तुम्ही आणि तुमच्या पती दोघांच्याही मोबाईलशी जोडून घ्या. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकाल आणि गरज पडल्यास त्याला मदत करू शकाल.

फोन करून चौकशी करत राहा

तुम्ही तुमच्या कार्यालयात बसूनही मुलांची काळजी घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणाच्या, चहा-कॉफीच्या वेळेत फोन करून मुलांची चौकशी करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारालाही हे करायला सांगा, पालकत्व ही पती-पत्नी दोघांची जबाबदारी आहे. जर तुमच्या मुलांकडे मोबाईल असेल तर त्यांना नेहमी ‘लोकेशन ऑन’ ठेवण्यास सांगा, जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही त्यांना मदत करू शकता.

सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवा

तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तो तुमच्या मुलांसोबत घालवा. याशिवाय जेव्हा कधी तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्ही त्यांच्यासोबत जेवू शकता, खेळू शकता किंवा कुठेतरी बाहेर जाऊ शकता किंवा एकत्र खरेदीलाही जाऊ शकता. याशिवाय जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या मुलांचे विचार नक्कीच जाणून घ्या.

मोलकरीण ठेवा

कामावरून आल्यावर जर तुम्ही घरातील कामात व्यस्त राहिलात तर तुम्हाला तुमच्या मुलासाठी वेळ काढता येणार नाही. अशा परिस्थितीत घरातील कामासाठी मोलकरीण ठेवल्यास बरे होईल. तिच्या मदतीने तुम्ही कामावर जाण्यापूर्वीचा आणि नंतरचा वेळ तुमच्या मुलासोबत चांगला घालवू शकता.

जोडीदाराची मदत घ्या

मुलाची जबाबदारी एकट्याची नाही. मुलाची काळजी घेण्यासाठी जोडीदाराची मदत घ्या. कधी तुमच्या जोडीदाराला मुलांना शिकवायला सांगा तर कधी त्यांचा डबा बनवण्यासाठी मदत घ्या. कधीकधी त्यालाही पालक-शिक्षक बैठकीला पाठवा, जेव्हा तुम्ही बाळाला भरवत असाल किंवा स्वयंपाकघरात व्यस्त असाल आणि कार्यालयातून मेल आला असेल किंवा तुम्हाला कार्यालयीन काम करायचे असेल तर अशावेळी पतीची मदत घ्या. कुटुंबातील इतर सदस्य किंवा शेजारी काय विचार करतील, याबद्दल अजिबात संकोच करू नका.

आईचे दूध साठवा

एक आई म्हणून आपल्या मुलाला योग्यवेळी खायला घालणे ही आपली जबाबदारी आहे. पण, तुम्ही एक नोकरदार महिलाही आहात, त्यामुळे आई झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या मुलासाठी सर्वकाळ उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे दूध साठवून ठेवू शकता. बाळाला भूक लागल्यावर घरातील इतर कोणीही सदस्य बाळाला ते दूध पाजू शकतो.

नोंदणीकृत ‘डे केअर सेंटर’ची मदत घ्या

तुम्हाला कामावरचे खूप काम असेल किंवा काही कामानिमित्त बाहेर जावे लागणार असेल आणि मुलाला सोबत नेणे शक्य नसेल तर तुमच्या परिसरातील नोंदणीकृत ‘डे केअर सेंटर’ची मदत घ्या. तेथील कर्मचाऱ्यांना मुलांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नोंदी जवळच्या पोलीस ठाण्यात उपलब्ध असतात. पण हो, मुलाला नोंदणीकृत ‘डे केअर सेंटर’कडे सोपवण्यापूर्वी, मुलाची काळजी घेत असलेल्या कर्मचाऱ्याची व्यवस्थित माहिती घ्या.

नाही म्हणायला शिका

पालकत्वाची जबाबदारी फक्त आईचीच नाही. यात आईइतकीच जबाबदारी वडिलांचीही असते. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेऊन तुम्ही सर्वोत्कृष्ट आई व्हाल, असा विचार टाळा, कारण यामुळे गोष्टी चांगल्या होण्याऐवजी वाईट होऊ शकतात. म्हणून, आवश्यक तेथे नाही बोलायला शिका.

काय आहे स्तनाग्र कव्हर आणि स्तन टेप?

* प्रियंका यादव

कानपूरची श्रृती सक्सेना बंगळुरूमध्ये काम करणारी तिची मैत्रीण ईशा मौर्यच्या घरी गेली होती. श्रृतीचा २४ वा वाढदिवस होता. ती पार्टीची तयारी करत होती, पण त्याचवेळी तिला एका समस्येचा सामना करावा लागला. ईशाच्या सांगण्यावरून तिने ऑफ-शोल्डर म्हणजे उघड्या खांद्यांचा मोठी, उघडी पाठ असलेला ड्रेस खरेदी केला होता, पण तिच्याकडे ज्या ब्रा होत्या त्या सर्व या ड्रेसमधून बाहेर डोकावणाऱ्या होत्या. ब्रा शिवाय हा ड्रेस कसा घालायचा, हे तिला समजत नव्हते. अस्वस्थ होऊन ती पलंगावर एका कोपऱ्यात जाऊन बसली. जेव्हा ईशाने श्रृतीला जुन्या कपड्यांमध्ये पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिने श्रृतीला यामागचे कारण विचारले, तेव्हा श्रृतीने तिला तिची समस्या सांगितली. ईशाने कपाटातून एक बॉक्स आणला आणि श्रृतीला देत म्हणाली, हे घे तुझ्या समस्येवरचे उत्तर. बॉक्समध्ये त्वचेच्या रंगाचे २ मऊ पॅच होते. हे काय आहे, ते श्रृतीला समजले नाही.

श्रृतीने विचारल्यावर ईशाने सांगितले की, हे सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर आहे. ते ब्रासारखेच काम करते, परंतु त्याला पट्ट्या नसतात आणि यामुळे वेदनाही होत नाहीत. ते ड्रेसखाली स्तनांवर वापरता येते. श्रृती ते घेऊन आतल्या खोलीत गेली आणि ड्रेस घालून बाहेर आली.

श्रृती आनंदाने ईशाला म्हणाली, ‘‘हे खूप आरामदायक आहे. माझ्या स्तनांवर काहीतरी वजनदार आहे, असे मला अजिबात वाटत नाही. हे खूपच हलके आहे.’’ ‘‘सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर्सची हीच तर खरी गंमत आहे. ते घालूनही, काहीच न घातल्यासारखे वाटते,’’ ईशा म्हणाली.

सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर

सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर स्तनांना उभारी देण्याचे काम करते. ते आउटफिटला चांगले फिटिंग देते. आजकाल मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात याचा वापर करत आहेत. एक प्रकारे, ते ब्रा नसले तरी ब्रा म्हणून काम करते. ते उघड्या पाठीचा ड्रेस किंवा टॉप, खोल गळ्याचा ड्रेस किंवा टॉप आणि ब्लाउजच्या आत घालता येते. ते त्वचेच्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. तुम्हालाही लग्नात किंवा पार्टीत हॉट ड्रेस घालायचा असेल आणि तुमच्या ब्रा चा पट्टाही दिसू नये असे वाटत असेल तर तुम्ही सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर वापरू शकता. यामुळे ब्राच्या त्रासापासून, सोबतच उन्हाळ्यात ब्रामुळे होणाऱ्या चिडचिडीपासूनही सुटका होईल.

सध्या हे केवळ ऑनलाइन खरेदी करता येते. ऑफलाइनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे जोडीत मिळते आणि त्याची किंमत रू. २५० ते १,००० रुपयांपर्यंत आहे.

याच प्रकारे, निप्पल कव्हर्स आहेत, जे सिलिकॉनचे असल्यामुळे खूप मऊ आहेत. ते त्वचेच्या रंगात उपलब्ध आहेत. ते पसरलेले स्तनाग्र लपविण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारचे निप्पल कव्हर नॉन-पॅडेड ब्रा सोबत घालता येतात. सुती किंवा साधी ब्रा घालणाऱ्या मुली आणि महिला अनेकदा ड्रेसमधून निपल्स दिसल्याने अस्वस्थ होतात. हे मुख्यत: थंड हवामानात होते. पण, मोठे स्तन असलेल्या महिलांना या समस्येमुळे नेहमीच लाजल्यासारखे होते. अशा परिस्थितीत, त्यांनी सिलिकॉन निप्पल कव्हर्स वापरून पाहावे, जे त्यांना ड्रेसमधून दिसणाऱ्या स्तनाग्रांपासून आराम देतील. हे वापरून त्यांना आत्मविश्वास देखील मिळेल. हे घातल्यामुळे कोणताही पोशाख बिनधास्तपणे घालता येतो. लक्षात ठेवा की, निपल कव्हर्स फक्त स्तनाग्र झाकतात. त्यांना उभारी देत नाहीत.

वेगवेगळ्या आकारात उपलब्ध

उन्हाळ्यात निपल कव्हर किंवा निपल स्टॉकचा वापर ब्रामुळे होणाऱ्या चिडचिडीपासून सुटका करतो. स्तनाग्र कव्हर्सदेखील वेगवेगळ्या आकारात येतात जसे की, स्टार शेप, हार्ट शेप. त्यांची किंमत ९९ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. ही किंमत निप्पल कव्हरच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. स्तनाग्र कव्हर स्वच्छ ठेवल्यास, चांगल्या दर्जाचे स्तनाग्र कव्हर १२ वेळा वापरले जाऊ शकते. अशाच प्रकारे मोठे, बाहेर आलेले स्तन लपवण्यासाठी, निप्पल कव्हर स्टॉकचा वापर करता येतो. निपल स्टॉकला निप्पल पॅच असेही म्हणतात. ते वेगवेगळया आकारात येतात. ते स्तनाग्र कव्हर म्हणून देखील वापरले जातात. ते फक्त एकदाच वापरता येतात.

जर तुम्हाला ब्रा घालायची नसेल आणि खोल पाठ किंवा खोल गळ्याचा पोशाख घालायचा असेल तर तुम्ही ब्रेस्ट टेप वापरू शकता. ते नेकलाइनदेखील वाढवते, ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडते.

त्वचेच्या प्रकारासाठी योग्य

सिलिकॉन निपल लिफ्ट कव्हर्सप्रमाणे, ब्रेस्ट टेप किंवा बूब टेपदेखील आहे. ती कॉटन आणि लेटेक्सची बनलेली असते, जी प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. ती फॅब्रिक आणि त्वचेसाठी डिझाइन केलेली असते. यात एका बाजूला गोंद लावलेला असतो आणि दुसरी बाजू कोरडी असते. आपल्या स्तनाच्या आकारानुसार चिकट टेप कापून घ्या आणि हळूवारपणे स्तनावर चिकटवा. तुमच्या स्तनाच्या आकारानुसार किती टेप वापरायची ते ठरवा.

ती लांब, रुंद, कशाही प्रकारे वापरता येते. जर तुम्हाला ती स्तनांना उभारी देण्यासाठी वापरायची असेल तर लांबट आकारात लावा. ब्रेस्ट टेपच्या वापराने, स्तन एकाच स्थितीत राहातात, ज्यामुळे त्यांचा आकार सुंदर, किंचित उंचावलेला दिसतो. ती स्तन लपविण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.

बऱ्याचदा महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा खरेदी कराव्या लागतात, जसे की, खांदे उघडे असलेल्या ड्रेससाठी पारदर्शक पट्ट्या असलेली ब्रा लागते आणि जर खूप खोल पाठ असलेला ड्रेस घालायचा असेल तर तो कसा घालायचा, असा प्रश्न पडतो. अशा ड्रेसमध्ये साधी ब्रा घातल्यावर ती बाहेर डोकावूं लागते. अशा ड्रेसच्या आत कोणतीही ब्रा घातली तरी ती बाहेरून दिसतेच. वेगवेगळ्या ड्रेससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा खरेदी करणं सोपं नाही. ते फार महागडे ठरेल. अशा परिस्थितीत, ब्रेस्ट टेप वापरणे खूप फायदेशीर ठरेल, कारण ती कोणत्याही ड्रेससाठी वापरली जाऊ शकते. ड्रेस कसाही असला तरी ती दिसत नाही.

जर तुम्हाला खोल पाठ असलेला, खोल गळ्याचा ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही ब्रेस्ट टेप वापरू शकता. ज्या महिलांचे स्तन सपाट किंवा लहान असतात, क्लिवेज नीट दिसत नाही, त्या या टेपचा वापर करून क्लिवेज दाखवू शकतात. त्यासाठी स्तनाची टेप दोन्ही स्तनांवर रुंदीच्या दिशेने लावावी आणि जवळ आणावी.

आत्मविश्वासात वाढ

जर तुम्हाला उभारी आणण्यासाठी बूब टेप वापरायची असेल तर सर्वप्रथम तुमचे स्तन झाकण्यासाठी निप्पल कव्हर्स वापरा. सुरक्षेसाठी तुम्ही त्यावर एक लहान पॅड किंवा कापूस ठेवू शकता. लक्षात ठेवा की, टेप थेट स्तनाग्रांवर ठेवू नये. स्तनाची टेप त्वचेचा रंग, काळा, चंदेरी, अशा अनेक रंगात येते. ती कोणत्याही ड्रेसमधून दिसत नाही. ती कोणत्याही खोलगट पाठीच्या, खांदे उघडे असलेल्या, खोल गळ्याच्या ड्रेस आणि टॉपमध्ये तसेच स्तनांना उभारी देण्यासाठी वापरली जाऊ शकते. तिच्या वापराने स्तनांना उभारी, आधार आणि क्लिवेज मिळते. वाढत्या वयाबरोबर महिलांना स्तन गळण्याची समस्या भेडसावते. स्तन पूर्वीसारखे आकर्षक दिसत नाहीत. अशा वेळी, स्तनाची टेप लांबीच्या दिशेने लावून स्तन उचलता येतात. यामुळे स्तन सुडौल दिसतात. याच्या वापराने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

ब्रेस्ट टेप लावताना ही खबरदारी घ्या

* ब्रेस्ट टेप वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा.

* ब्रेस्ट टेप लावताना हे लक्षात ठेवा की, स्तन अस्वच्छ नसावेत. ब्रेस्ट टेप लावण्यापूर्वी, टॉवेलने स्तन नीट पुसून घ्या. ब्रेस्ट टेप लावताना स्तनांवर कोणतेही लोशन, क्रीम किंवा तेल लावलेले नसेल, याची खात्री करा.

* ब्रेस्ट टेप वापरण्यापूर्वी, स्तनांवर केस नाहीत याची खात्री करा. जर तुमच्या स्तनाच्या भागात खूप घाम येत असेल तर ब्रेस्ट टेप वापरणे टाळा किंवा वेळोवेळी ती काढून घाम पुसल्यानंतर त्याचा वापर करा. जास्त घाम आल्याने ब्रेस्ट टेपचा गोंद खराब होतो.

* स्तनाग्र कव्हर किंवा ब्रेस्ट टेप लावून झोपू नका. फक्त चांगल्या दर्जाचे स्तनाग्र कव्हर्स किंवा ब्रेस्ट टेपच खरेदी करा.

कशी काढायची

टेपवर कोमट पाणी टाकून किंवा कोमट पाण्याने अंघोळ करून टेप सहज काढता येते. टेप काढल्यानंतर त्वचेवर चिकटपणा राहिल्यास, बेबी ऑईलने मालिश करा. त्यामुळे चिकटपणा दूर होईल.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निप्पल कव्हर्स आणि ब्रेस्ट टेपचे अनेक तोटे आहेत. ते कोणते, चला जाणून घेऊया :

श्वास घेताना त्रास : कोणतेही सिलिकॉन आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. बूब टेप आणि स्तनाग्र कव्हर्स स्तनांना चिकटतात, ज्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो. याच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते. ब्रेस्ट टेपचा बराच काळ वापर केल्यास अस्वस्थ वाटू शकते, कारण ती त्वचेला श्वास घेऊ देत नाही. यामुळे स्तनाग्रांमध्येही वेदना होऊ शकतात.

संसर्ग : ब्रेस्ट टेपचा बाहेरील भाग प्लास्टिकचा बनलेला असतो. त्यामुळे त्यावर धूळ सहज चिकटते, त्यामुळे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही ती नियमितपणे वापरत असाल तर त्यातून वासही येऊ शकतो.

त्वचेला खाज येऊ शकते किंवा जळजळ होऊ शकते. कधीकधी कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी हलक्या दर्जाच्या सिलिकॉनपासून सिलिकॉन निपल कव्हर बनवतात. ते वापरल्यास शरीरावर चट्टे किंवा पुरळ उठू शकते. याचा सतत वापर करणाऱ्या महिलांना त्वचेची अॅलर्जीही होऊ शकते.

जर तुम्हाला खोल पाठीचा, खोल गळ्याचा, खांदे उघडे असलेला ड्रेस आणि टॉप घालायला आवडत असेल तर निपल कव्हर्स आणि ब्रेस्ट टेप हे तुमचे सोबती होऊ शकतात. पण, जर तुम्ही दिवस-रात्र स्तनाग्र कव्हर आणि ब्रेस्ट टेप घालण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. ते फक्त कधीतरी वापरायला हरकत नाही. ते स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. जिथे वेगवेगळ्या कपड्यांसाठी वेगवेगळ्या ब्रा घालाव्या लागतात तिथे ब्रेस्ट टेप मात्र वेगवेगळ्या कपड्यांच्या आत सहजपणे घालता येते, शिवाय वेगवेगळ्या ब्राच्या तुलनेत परवडणारीही आहे.

मुलांना हेल्दी टेस्टी रेसिपीज खायला द्या

* प्रियंका यादव

शोभा मुखर्जी ही ३९ वर्षांची आहे. ती दिल्लीतील रोहिणी भागातील आनंदा अपार्टमेंटमध्ये पतीसोबत राहते. तिला १ मुलगा आहे. मुलगा आरव ७ वर्षांचा आहे आणि शोभाने तक्रार केली आहे की जेव्हाही ती त्याला जेवायला देते तेव्हा तो ते खाताना खूप नखरे करतो. कधी-कधी तो अजिबात खात नाही. अनेकदा त्याच्या ताटात बटाटा-मेथीची भाजी तशीच ठेवतो. पण तो जंक फूड खूप आवडीने खातो, विशेषत: पिझ्झा आणि बर्गर. अनेक वेळा तो न जेवल्यामुळे मला त्याला जंक फूड द्यावे लागते. आरवने जास्त जंक फूड खावे असे मला वाटत नसले तरी तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी त्याने शक्य तितके हेल्दी फूड खावे असे मला वाटते.

ही समस्या केवळ शोभाचीच नाही, अनेक माता या समस्येला सामोरे जात आहेत. मुलांना फक्त बर्गर, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राईज, मोमोज, रोल्स इ. आवडतात पण जंक फूडमुळे पोषण मिळत नाही. यामुळे फक्त लठ्ठपणा आणि रोग होतात.

मुलं विशेषत: हिरव्या भाज्या ज्यात दूधी भोपळा, घोसाळं आणि पालक यांचा समावेश आहे, अशा भाज्या खाण्यास लाजतात. फळांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना चिक्कू किंवा केळी आवडत नाहीत. दूध प्यायच्या नावाने मुलं तोंड वेडीवाकडी करू लागतात. अशा परिस्थितीत त्यांना सकस आणि पौष्टिक आहार देणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही.

जर तुम्हाला, मुलांना पौष्टिक आहार खायला द्यायचा असेल, तर तुम्हाला स्वयंपाक करण्याच्या आणि मुलांना खायला घालण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल करून नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल. अशा काही स्मार्ट पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांना पोषणयुक्त आहार देऊ शकता. चला तर मग, त्या स्मार्ट पद्धती जाणून घेऊया :

आपल्या अन्नाचे नाव स्वत: ठेवा

अन्नाला आपले नवीन नाव द्या. अन्नाची तीच-तीच कंटाळवाणी नावं ऐकून मुलं कंटाळतात, म्हणून अन्नाचं नवीन नाव ठेवा. नाव काहीतरी मजेदार आणि मनोरंजक ठेवण्याचा प्रयत्न करा, जसे की सामान्य ब्रेड ऑम्लेटचे नाव बदलून एगी-ब्रेड ठेवू शकता.

त्याचे नाव ऐकून मुलांना वाटेल की ही नवीन डिश आहे आणि ते ही डिश मोठ्या आवडीने खातील. त्याचप्रमाणे ब्रोकोलीपासून बनवलेल्या डिशला तुम्ही बेबी ट्री असे नाव देऊ शकता. ब्रोकोली हा सूक्ष्म पोषक घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन के, बी ६, बी २, बी ९ आढळतात.

अन्नाचा आकार बदला

मुलांना अन्न देण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याचा आकार बदलणे. त्रिकोणी आकारात सँडविच पाहून मुलांना कंटाळा आला असेल. त्यांना नवीन आकारात सँडविच सर्व्ह करा. यासाठी तुम्ही स्टार, हार्ट आणि सर्कल आकारात सँडविच तयार करू शकता. यासाठी बाजारात विविध प्रकारचे शेप कटर उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा की सँडविच फक्त ब्राऊन ब्रेडचे असावे, ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही त्यावर टोमॅटो सॉसने डोळे आणि तोंड यांचा आकार बनवू शकता. यावर पातळ मुळा किंवा गाजर वापरून मिशाही बनवता येतील. असे क्रिएटिव्ह सँडविच पाहून मुले पुन्हा-पुन्हा ते खाण्याची फरमाईश करतील. त्याचप्रमाणे तुम्ही स्मायली फेससारखे विविध प्रकारचे फेस पॅनकेक्स बनवू शकता. मुलांना हे खूप आवडेल. त्याचप्रमाणे, तुम्ही टोस्ट आणि इडली वेगवेगळ्या आकारात तयार करू शकता, जे खाल्ल्यानंतर मुले तुमच्या जेवणाची चाहती बनतील.

रंगांचा खेळ

मुलांना फळे खायला देणे अजिबात सोपे नाही. पण जर त्यांना पोषक आहार द्यायचा असेल तर त्यांना हा सर्व आहार द्यावा लागेल. तुम्ही फळांसोबत रंगांचा खेळ खेळू शकत नाही. जसे की जर मुलांनी फळे खाण्यास नकार दिला तर तुम्ही फळे वेगवेगळ्या आकारात कापू शकता जसे की माकड आणि सशाचा चेहरा. तुम्ही वेगवेगळ्या फळांना घराच्या किंवा झाडाच्या आकारात कापून मुलांना खाण्यासाठी तयार करू शकता.

जंक फूडची साठवण करू नका

जंक फूड घरात ठेवले की मुले ते खाण्याचा आग्रह धरतात. अशा परिस्थितीत जंक फूड घरात शक्य तितके न ठेवणे चांगले. घरात जास्तीत जास्त सकस अन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी यापैकी थोडे जरी काही खाल्ले तरी तुम्ही काळजी करू नका कारण ते निरोगी अन्न असेल.

मुलांच्या मित्रांना आमंत्रित करा

मुलांच्या मित्रांना तुमच्या घरी आमंत्रित करा. त्यांना आवडेल अशा गोष्टी खायला द्या; पण आरोग्यदायी आणि वेगळ्या शैलीत. यासाठी तुम्ही पीनट बटरमध्ये कोटेड ड्राय फ्रुट्स देऊ शकता. याशिवाय मखना भाजून सर्व्ह करून देऊ शकता.

भाज्यांना साथ द्या ड्रेसिंगची

मुलांना काही कच्च्या भाज्या खायला द्या जसे की गाजर, काकडी. चवीसाठी वरून थोडी ब्राऊन शुगर घाला. काही भाज्यांवर ड्रेसिंग म्हणून दहीदेखील वापरले जाऊ शकते. एका संशोधनानुसार, दररोज फळे किंवा भाज्या खाल्ल्याने कार्डिओमेटाबॉलिक रोगाचा धोका फक्त ६ ते ७ टक्के राहतो.

मुलांना मफिन्स खायला आवडतात. अशा परिस्थितीत मफिन हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही केळी किंवा सफरचंद वापरू शकता.

तुम्ही ड्रायफ्रुट्सची बारीक पावडर करून किंवा ड्रायफ्रुट्स चिरूनही घालू शकता. ओट्स, संत्री आणि मनुका यांचा वापर करून मफिन्स तयार करता येतात. ओट्समध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ई आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. अशा प्रकारे मुले चवदार आणि सकस मफिन्स खाऊ शकतील.

फळांचे कबाब

मुलांना फळे खायला देणे सोपे नाही. पण त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना फळे खायला द्यावी लागतील. यासाठी तुम्ही फळांचे कबाब बनवू शकता. कबाब बनवण्यासाठी ३ किंवा ४ प्रकारची फळे एका स्टीकमध्ये ठेवा आणि नंतर त्यावर मीठ आणि चाट मसाला शिंपडा. फळांचे कबाब तयार आहे. तुमची मुलं ते खेळता-खेळता खातील आणि त्यांना फळांचे पोषण मिळेल.

हेल्दी आणि टेस्टी बीटरूट रोल

जर तुमची मुले हेल्दी फूड खाण्यास उत्सुक असतील तर तुम्ही त्यांना कॉर्न आणि चीजपासून बनवलेला बीटरूट रोल देऊ शकता. बीटरूट रोल बनवण्यासाठी पीठात, उकडलेला बीटरूटचा गर घालून मळून घ्या आणि परांठा बनवा. त्याचे फिलिंग तुमच्या आवडत्या मसाल्यांसोबत तयार करू शकता. यानंतर परांठ्याला रोलचा आकार द्या.

सफरचंदाला द्या जॅमचे स्वरूप

सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण मुलं ते सहजासहजी खात नाहीत. जर तुम्हाला सफरचंद मुलांना खायला द्यायचे असतील तर तुम्ही सफरचंदाचे जॅम वापरू शकता.

तुम्ही पोळी किंवा ब्रेडसोबत मुलांना ते देऊ शकता. विश्वास ठेवा, तुमची मुले ते मोठ्या आवडीने खातील.

मुलांना हेल्दी फूडपेक्षा चविष्ट अन्नाची भाषा जास्त कळते, त्यामुळे मुलांना हेल्दी आणि चविष्ट अन्न या दोन्हींचे काँबिनेशन द्या. यामुळे त्यांना चव आणि पोषण दोन्ही मिळेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें