- मधु शर्मा कटिहा

कोरोना काळ असा काळ आहे ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती. कोरोनाव्हायरसचा कहर अशाप्रकारे झाला आहे, की मनुष्य ज्याला सामाजिक प्राणी म्हटले जाते, त्यालाच समाजापासून अंतर बनवून राहणे भाग पडत आहे. हा असा काळ आहे जेव्हा अडचणीदेखील नव्या नव्या आहेत आणि त्यांचे निराकरणदेखील. कोरोना आता इतक्या लवकर जाणार नाहीए. त्यामुळे कोरोना काळात घेतले जाणारे काही निर्णयदेखील आता पुष्कळ काळापर्यंत सोबत राहतील. एक नजर टाकूया विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या त्यांच्या बदलांवर, जे येणाऱ्या भविष्यात जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहेत.

डिजिटल क्रांती

लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रांत इंटरनेटवर अवलंबित्व वाढले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन जीवनाची महत्त्वाची अंगे बनून समोर आली आहेत. एका रिपोर्टनुसार भारतात लॉकडाऊनदरम्यान इंटरनेटच्या वापरात १३ टक्के वाढ झालेली आहे.

नव्या मालिकांची शूटिंग न झाल्यामुळे टीव्हीवर जुने कार्यक्रम पुन्हा दाखवले जात आहेत. यामुळे मनोरंजनासाठी लोक इंटरनेटचा आधार घेत आहेत. जवळपास १.५ करोड लोकांचे नेटफ्लिक्स जोडले जाणे इंटरनेटवर लोकांचे अवलंबित्व दाखवते.

शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात झाली आहे. शिक्षण तज्ज्ञांचे मानणे आहे, की उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती आता दूरची गोष्ट नाही. भविष्यात या गोष्टीवर विचारविनिमय करून शिक्षणाचा काही भाग वर्गात, तर काही ऑनलाईन करवला जाऊ शकतो.

या दिवसांत विविध कार्यालयांमधील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये बैठका गुगल, हँग आउट आणि झुमसारख्या अॅप्सवर होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्र्यांच्या आपसातील मिटींग्स आणि विविध क्षेत्रांवर नजर ठेवण्याचे कार्यदेखील ऑनलाईन केले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे हे रूप एका मर्यादेपर्यंत भविष्यातदेखील आपलेसे केले जाईल. कार्यालयांत दररोजच्या मिटिंगमध्ये खाणे-पिणे आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेत पुष्कळ खर्च होत होता.

सरकारी अधिकारी दीपक खुराना यांचे म्हणणे आहे, की येणाऱ्या काळात मिटींग्स ऑनलाइनदेखील होऊ लागतील. यामुळे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...