६ फूड करतात दुर्गंधी दूर

* पारुल भटनागर

समजा तुम्ही एका पार्टीत गेला आहात आणि तिथे तुमच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे सर्वजण तुमच्यापासून दूर पळत आहेत तर विचार करा तुम्हाला किती लाजिरवाणे वाटेल. तुमच्या शरीराला येणारा दुर्गंधी हा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम तर करतोच पण तुमचा कॉन्फिडन्सही लूज करतो. त्यामुळे तुम्ही काही अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, ज्या तुमच्या शरीराची दुर्गंधी दूर करतील.

याविषयी रचना डाएटचे डॉ. पवन शेट्टी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की जेव्हा आपला फ्ल्युइड इंटेक चांगला नसतो, तेव्हा आपल्या युरिनचा कलर चेंज होण्याबरोबरच त्यातून दुर्गंधीही येऊ लागते आणि ती जागा प्रत्येक वेळी स्वच्छ न केल्याने आपल्या कपडयातून वास येऊ लागतो आणि त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे दररोज दर २२ ते ३० मिनिटांनी पाणी पीत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण ट्रान्सफॅटसारखे जंकफूड जास्त प्रमाणात खातो, तेव्हा त्यातून घामाच्या रूपातून जे विषारी पदार्थ निघतात, त्यांना फार दुर्गंधी येते. इतकेच नाही तर ट्रान्सफॅट युक्त पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हरही फॅटी होते. त्यामुळे हेल्दी खाणे घेतले पाहिजे. जेव्हा आपण योग्य आहार घेत नाही, तेव्हा आपल्या इन्टेस्टाइनमध्ये बॅड बॅक्टेरिया तयार होतात, जेणेकरून दुर्गंधी येते.

आहारात हे समाविष्ट करा

लक्षात ठेवा की फ्ल्युइड मेंटेन केल्याने ब्लड क्लॉट्स होत नाहीत आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. त्याचबरोबर युरीन ट्रॅक क्लिअर राहिल्याने इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवत नाही. त्यामुळे प्रॉपर डाएट करण्यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थ घेण्यास विसरू नका :

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराला दुर्गंधीपासून वाचवण्याचे हे सर्वात सशक्त टूल आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा.

लिंबू : लिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हा शरीराची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते, त्याचबरोबर यात अॅसिडिक गुण असल्याने हा स्किनच्या पीएच लेव्हलला कमी करण्याचे कामही करतो. ज्यामुळे बॅड बॅक्टेरिया निर्माण होण्यात अडथळे येतात. याशिवाय लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या सिस्टमला इंपुव करण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याने करा. अंडरआर्म्स आणि पायांच्या खालच्या भागात लिंबू चोळल्याने थोडयाच वेळात दुर्गंधी नाहीशी होते.

टोमॅटो : टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने हे शरीरात दुर्गंधी पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. यात असलेल्या नॅचरल अॅस्ट्रिजेंटमुळे चेहऱ्यावर घामही येत नाही. त्यामुळे दररोज १/२ कप टोमॅटो ज्यूस अवश्य प्या किंवा भोजनात सॅलड म्हणून टोमॅटोचा समावेश करा. ज्या जागी जास्त घाम येतो, तिथे १०-१५ मिनिटे टोमॅटो लावून ठेवा.

दही : यात उपयुक्त असे जीवाणू असल्याने हे जेवण पचण्यास साहाय्य करते. त्याचबरोबर हे सहजपणे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

वेलची : वेलचीसुद्धा फार उपयुक्त असते. जर तुम्हाला वाटते की तुमच्या शरीरातून छान सुगंध यावा तर खाण्यात १-२ वेलची दाणे अवश्य घाला, कारण यात बॅड बॅक्टेरिया शरीरातून बाहेर काढण्याची शक्ती असते.

आले : आले एकीकडे शरीराची दुर्गंधी दूर करून तुम्हाला फ्रेश फिलिंग देते, त्याचबरोबर हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कामही करते.

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी डेली अँटीबॅक्टेरियल साबणाने अंघोळ करा आणि स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. जेव्हाही तुम्ही बाहेरून याल तेव्हा हातपाय, तोंड  स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर घाम येऊन दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

मान्सून स्पेशल : घर सुगंधित बनवा असे

* सोमा

पावसाच्या हलक्या सरी वातावरण आनंददायी बनवतात. कडक उन्हानंतर पावसामुळे सर्वांना दिलासा मिळतो. परंतू आपण तेव्हाच या आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेऊ शकतो, जेव्हा घर ताजेतवाने आणि सुगंधित असेल.

यासंदर्भात इलिसियम एबोडेसच्या संस्थापक आणि इंटिरियर डिझाइनर हेमिल पारिख सांगतात की खरंतर सततच्या पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. हा ओलावा घरातही शिरतो. उष्णता आणि ओलावा वाढल्यामुळे घराच्या भिंतींवर ओलसरपणा, बुरशी येणे इत्यादी होते, ज्यामुळे कुबट वास सर्वत्र पसरतो. स्वच्छ हवेची कमतरता होऊ लागते. म्हणूनच आपण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि चांगले वातावरण मिळेल. यासाठी येथे काही महत्त्वपूर्ण टीप्स देत आहोत :

* बहुतेक लोक एखाद्या विशिष्ट प्रसंगीच कापूर जाळतात. पावसाळयात कापूर जाळल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि शिळा वास टाळता येतो. ते जाळल्यानंतर खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि १५ मिनिटांनंतर उघडा. खोलीत फ्रेशनेस येईल.

* जर तुमच्या खोलीत फर्निचर असेल तर ते ओले होण्यापासून वाचवा. ओल्या फर्निचरमुळे कधीकधी दुर्गंधी येते.

* पायपुसणी ओली होऊ देऊ नका. दर २-३ दिवसांनी ती पंख्याखाली कोरडी करा.

* काही लोक कीटकांच्या भीतिने पावसाळयात दारे आणि खिडक्या बंद ठेवतात. यामुळे खोलीत जास्त कुजका वास येतो. खिडक्या आणि दारे थोडया वेळासाठी का होईना उघडी ठेवा, जेणेकरून बाहेरची ताजी हवा आत येईल. क्रॉस व्हेंटिलेशन होण्यासह खोलीतील दुर्गंधीदेखील जाईल.

* कुबट वास दूर करण्यासाठी व्हिनेगर खूप चांगले कार्य करते. रुंद तोंडाच्या भांडयात १ कप व्हिनेगर घाला आणि खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. थोडया वेळातच तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

* आजकाल बाजारामध्ये रूम फ्रेशनर सहज उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार खोलीत फवारणी करता येते. त्यात लव्हेंडर, चमेली, गुलाब इत्यादी ताजेपणा निर्माण करतात.

* कडुलिंबाची पाने बुरशी दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. त्याची सुकलेली पाने कपडयांमध्ये आणि कपाटाच्या कोपऱ्यात ठेवता येतात.

* स्वयंपाकघरात बुरशीचा स्मेल कमी करण्यासाठी बेकिंगची कल्पना चांगली आहे. बेकिंगमुळे त्याचा सुवास संपूर्ण पसरतो.

* या हंगामात विविध प्रकारची फुले उमलतात आणि या फुलांचा सुगंध कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ही फुले केवळ सुगंधच देत नाहीत तर ताजेपणाही कायम राखतात. गुलाब, चंपा, चमेली इत्यादी सर्व फुले घराला आपल्या सुगंधाने सुगंधित करतात, म्हणून त्यांना फुलदाणीत अवश्य सजवा.

* तेल आणि मेणबत्त्या तेवत ठेवल्यानेही घराचे वातावरण फ्रेश होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें