हृदयविकाराच्या या 6 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

* दीप्ती गुप्ता

हृदयविकाराचा झटका ही खूप गंभीर समस्या आहे. या अवस्थेत धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होऊ शकत नाही, अशा स्थितीत रक्त गोठण्यास सुरुवात होते. या गुठळ्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचणे कठीण होते आणि त्याला ऑक्सिजन मिळत नाही. बरं, हृदयविकाराच्या झटक्याचं एक लक्षण आपल्याला जवळपास सगळ्यांनाच माहीत असतं. अचानक आणि वेगाने छातीत दुखणे आणि वेदना हातापर्यंत पसरणे. परंतु हृदयविकाराच्या अवस्थेसाठी, केवळ हे एक चिन्ह समजणे पुरेसे नाही, तर इतर अनेक चेतावणी चिन्हे आहेत, जी हृदयविकाराच्या झटक्यासाठी जबाबदार आहेत.

नॅशनल हार्ट, लंग आणि ब्लड इन्स्टिट्यूटच्या मते, यूएसमध्ये अंदाजे 5.7 दशलक्ष लोकांना हृदय अपयश आहे. सध्या, कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु जीवनशैलीतील बदल आणि औषधांसारखे उपचार जीवनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत फरक करू शकतात. बर्याच परिस्थितींसाठी, जितक्या लवकर तुम्हाला त्याची चिन्हे समजतील तितक्या लवकर ते नियंत्रित केले जाऊ शकतात. येथे अशी 6 चिन्हे आहेत, जे सांगतील की तुमचे हृदय आता पूर्वीसारखे काम करत नाही आणि या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. चला तर मग जाणून घेऊया हृदयविकाराच्या 6 मुख्य लक्षणांबद्दल.

  1. श्वास घेण्यास असमर्थता

जेव्हा कार्यक्षमतेचा विचार केला जातो तेव्हा हृदय आणि फुफ्फुसे खूप महत्वाची भूमिका बजावतात. हृदयाची उजवी बाजू ऑक्सिजनची कमतरता असलेले रक्त घेते आणि फुफ्फुसात पंप करते, जेणेकरून त्याला ताजे ऑक्सिजन मिळू शकेल. श्वास लागणे हे हृदयविकाराचे प्रमुख लक्षण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही खोल श्वास घेतला तरी तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे असे वाटत नाही.

  1. पायाला सूज येणे

जेव्हा तुमचे हृदय योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा ते फुफ्फुसांमध्ये कमी रक्त पंप करते. त्याचा प्रभाव प्रथम तुमच्या शरीराच्या खालच्या भागात दिसून येतो, ज्याला सूज असेही म्हणतात. त्याचा तुमच्या पायावर परिणाम होतो. जर तुम्ही सुजलेल्या बोटावर दाबले आणि त्याचा प्रभाव काही सेकंद टिकला तर ते सूजाचे लक्षण आहे.

  1. अचानक वजन वाढणे

जर तुमचे वजन झपाट्याने वाढत असेल तर त्याला चरबी समजण्याची चूक करू नका. हे शक्य आहे की तुमच्या पोटात काही प्रकारचे द्रव तयार होत आहे. तज्ञ म्हणतात की असे अचानक होऊ शकते की काही दिवसात तुमचे वजन पाच किलोपर्यंत वाढू शकते.

४. सतत थकवा जाणवणे

हृदयाच्या विफलतेच्या वेळी शरीर ज्या प्रकारे भरपाई करते, रक्त मेंदू आणि स्नायूंपर्यंत पोहोचणे कठीण आहे. यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

  1. गोंधळल्यासारखे वाटणे

रक्ताभिसरणामुळे हृदयविकाराची समस्या उद्भवते. जेव्हा रक्त तुमच्या मेंदूला योग्य प्रकारे पोहोचत नाही, तेव्हा तुम्हाला हलकेपणा, एकाग्रता कमी होणे आणि गोंधळ होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये, तुम्हाला बेहोश झाल्यासारखे वाटू शकते.

  1. हात आणि पाय नेहमी थंड ठेवा

लोकांचे हात-पाय थंड होणे हे सामान्य आहे. पण अचानक तुमचे हात-पाय थंड झाले असतील आणि मोजे घातल्यानंतरही गरम होत नसेल, तर हे हृदय अपयशाचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे टाळण्यासाठी रात्री डोके वर करून झोपा, अधिकाधिक पाणी प्या आणि धूम्रपान टाळा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे किरकोळ असतील तर तुम्ही लवकरात लवकर हृदय तपासणी करून घ्यावी. याच्या मदतीने तुम्ही हृदयविकाराचा झटका बर्‍याच प्रमाणात टाळू शकता.

Winter 2022 : नवीन वर्षामध्ये तुमच्या आरोग्याची अशी काळजी घ्या

* गृहशोभिका टीम

हिवाळ्यातील थंड हवा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. सतत बदलणाऱ्या ऋतूंमध्ये शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यासही थोडा वेळ लागतो. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला काही महत्त्वाच्या हेल्थ टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकाल.

व्यायाम करा

या ऋतूत व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले शरीर थोडे हलवा जेणेकरून शरीर लवचिक राहील. व्यायामशाळेत जाणे हा देखील एक चांगला पर्याय असेल.

  1. भरपूर पाणी प्या

थंडीमुळे शरीरातून पाणी बाहेर पडत नाही, त्यामुळे जास्त वेळ तहान लागत नाही. शरीराच्या आत स्वच्छतेसाठी, दिवसभरात किमान 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.

  1. दररोज शॉवर

एका संशोधनातून असे समोर आले आहे की, हिवाळ्यात शरीरातील आर्द्रता संपुष्टात येऊ नये म्हणून 10 मिनिटे आंघोळ केली पाहिजे. साबणाने खूप काळजी घ्या. शरीराला ओलावा देणारा साबण वापरा.

  1. हिरव्या भाज्या खा

या ऋतूत हिरव्या भाज्यांचे भरपूर सेवन करा. ते तुमच्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

लाजणे सोडा व मनमोकळे हसा

* गरिमा पंकज

सयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०१९’ मध्ये भारत १४० व्या स्थानावर आहे, तर गेल्या वर्षी भारत १३३ व्या क्रमांकावर होता. पाकिस्तान आणि बांगलादेशसह आमच्या शेजारील अनेक राज्यांतील लोक आपल्यापेक्षा आनंदी आहेत. फिनलँडला सलग दुसऱ्या वर्षी सर्वात आनंदी देशाचा मान मिळाला. त्यानंतर नॉर्वे आणि डेन्मार्कचा क्रमांक लागतो.

प्रश्न पडतो की या देशांच्या या आनंदाचे आणि प्रसन्नतेचे रहस्य काय आहे? या प्रकरणी आपण मागे का आहोत? आपण मनमोकळेपणाने हसण्याचे महत्त्व विसरत आहोत काय? आपणास आनंदी राहण्याची सवय नाही काय किंवा आपण जास्त ताण घेत आहोत? तुम्हाला आठवतंय का तुम्ही शेवटच्या वेळी मनमोकळेपणाने कधी हसले होते, असे हास्य, ज्यामुळे तुमच्या पोटात हसता-हसता वेदना निर्माण झाली असेल किंवा हसणे थांबण्याचे नावच घेत नव्हते?

खरं तर, आजच्या धावत्या आयुष्यात कोणालाही स्वत:साठी दोन मिनिटे काढण्यास पुरेसा वेळ नसतो, हसणे आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचवते आणि आपली सहन करण्याची क्षमतादेखील वाढवते, जगण्याचा खरा आनंद देते.

हास्यात लपलेल्या आरोग्याच्या या रहस्यानेच हसण्याला उपचाराचे एक रूप दिले. जर आपण तणावातून अस्वस्थ असाल तर हे हास्य आपल्या सर्व दु:खावर उपाय आहे.

या संदर्भात, तुळशी हेल्थ केअरचे डॉ. गौरव गुप्ता स्पष्ट करतात की हास्य हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आपल्या शरीरात काही तणाव हार्मोन्स असतात जसे की कोर्टिसोल, एड्रेनालिन इ. जेव्हा कधी आपण तणावात असतो तेव्हा हे हार्मोन्स शरीरात सक्रिय होतात, यांची पातळी वाढल्यामुळे आपण उद्विग्न होतो, जास्त उद्विग्नतेमुळे डोकेदुखी, गर्भाशय ग्रीवा, मायग्रेन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या होऊ शकतात. साखरेची पातळीदेखील वाढू शकते.

हसण्यामुळे कॉर्टिसोल आणि एड्रेनालिनसारखे तणाव हार्मोन्स कमी होतात आणि एंडोर्फिस फिरोटीनिनसारखे भावनाग्रस्त हार्मोन्समध्ये वाढ होते. हे मनाला उल्हासित आणि आनंदाने भरते. वेदना आणि चिंतादेखील कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आपण जितका वेळ मोठ-मोठयाने हसतो, तितक्याच वेळेसाठी आपण एकप्रकारे सतत प्राणायाम करतो, कारण हसताना आपले पोट आतल्या बाजूने जाते, त्याचवेळी आपण सतत श्वास सोडत असतो, म्हणजेच शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत राहतो. यामुळे पोटात ऑक्सिजनसाठी अधिक जागा तयार होते.

मेंदूला योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी २० टक्क्यांहून अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. खोकला, सर्दी-पडसे, त्वचेचा त्रास यासारख्या समस्या ऑक्सिजनच्या अभावामुळे वाढतात. हास्य या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जेव्हा आपण मोठ-मोठयाने हसतो तेव्हा आपण झटक्यात श्वास सोडत असतो. यामुळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली हवा बाहेर येते आणि पुफ्फुस अधिक स्वच्छ होते. आयुष्यात रात्रं-दिवस, सकाळ- संध्याकाळ आनंद आणि दु:ख आहेत. त्यांना टाळता येत नाही. परंतु आपण सतत वाईट आणि नकारात्मक विचार करत राहिल्यास मनाला योग्य निर्णय घेता येत नाही आणि त्रास वाढतात. जेव्हा आपण हसतो, तेव्हा मेंदू आपले कार्य पूर्ण करतो आणि आपण योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो.

हसण्यामुळे शरीराच्या अंतर्गत भागांना मालिश मिळते, ज्यास अंतर्गत जॉगिंगदेखील म्हटले जाऊ शकते. हास्य हृदयाचा व्यायाम आहे. हास्य हा चेहरा, हात, पाय आणि पोटाचे स्नायू व गळयाचा हलका व्यायाम आहे. दहा मिनिटांचे जोराचे हसणे तेवढयाच वेळेच्या हलक्या व्यायामाप्रमाणे परिणाम करते. यामुळे रक्त परिसंचरण वाढते आणि स्नायूंना आराम मिळतो. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्याला कोणतीही अस्वस्थता किंवा आजारपण कमी जाणवते, कारण ज्या प्रकारचे विचार मनात येतात त्याप्रमाणे आपले शरीर प्रतिक्रिया देते. हसण्याने आपण जवळजवळ शून्यावस्थेत पोहोचतो, म्हणजेच आपण सर्वकाही विसरतो.

हसणे आरोग्यासाठी चांगले आहे

* पोट, चेहरा, पाय आणि कमरेच्या स्नायूंसाठी हसणे एक चांगली कसरत आहे. हास्य रक्तदाब कमी करते, तसेच रक्त परिसंचरण सुधारते. हास्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

* हास्य तणाव आणि नैराश्य कमी करते. हास्यामुळे तणाव हार्मोन्सची पातळी कमी होते. हास्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन वाढवते.

* हास्य ट्यूमर आणि इतर रोगांशी झुंज देणाऱ्या पेशी, उदाहरणार्थ, गामा इंटरफेरॉन आणि टीसिलची कार्यक्षमता वाढवते.

* स्मृती तंदुरुस्त ठेवते आणि शिकण्याची क्षमता वाढविते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.

* हास्यामुळे वेदना कमी होते. हास्य स्नायूंना आराम देते. हे एक नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.

* हृदयरोगांपासून संरक्षण करण्याव्यतिरिक्त क्रोध आणि भीतीपासून बचाव करते. मूडदेखील तंदुरुस्त राहतो आणि रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवते.

* शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे काम करण्याची क्षमता वाढते.

* यास नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनदेखील म्हटले जाऊ शकते, कारण यामुळे चेहरा सुंदर  बनतो.

हसा आणि हसवा

बरेच लोक लाजाळू स्वभावाचे असतात. यामुळे ते जमावात जात नाहीत. जर आपल्या बाबतीतही असेच असेल तर निराश होऊ नका, आपण घरातदेखील एकटयानेच हास्याचा अभ्यास करू शकता. दररोज १५ मिनिटे आरशासमोर उभे रहा आणि विनाकारण जोर-जोरात हसा.

* हास्याचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण थोडा वेळ सतत हसत राहाल. याशिवाय, मुले आणि मित्रांसह वेळ घालवणेदेखील हसण्याचे चांगले निमित्त असू शकते. बऱ्याचदा डॉक्टर त्यांच्या रूग्णांना हास्य थेरपीचीदेखील शिफारस करतात. यात सर्वप्रथम स्वत:च्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्यास सांगितले जाते. हसतमुख चेहरे असलेले लोक अधिक स्वस्थही असतात.

जेव्हा आपण हसता तेव्हा शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपल्याला चांगले वाटते. म्हणूनच लोकांना विनोदी कार्यक्रम किंवा चित्रपट पहायला आवडते. यामुळे त्यांना विश्रांती मिळते. याशिवाय, हसण्याने मनाला चांगले वाटते, ज्यामुळे स्थिरता येते. हसण्याने शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्टया मजबूत बनते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल रागावता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण खूप चिढता, तेव्हा आपण हसा, खदखदून हसा आणि चांगले क्षण आठवा.

विशेष सूचना

* हसताना श्वासाचा वेग लक्षात घ्या. जर श्वासोच्छ्वास योग्य नसेल तर शरीराला हास्याचा फायदा होणार नाही.

* विश्रांतीच्या क्षणांचे हलके-फुलके विनोद, अनुभव, मनोरंजक आठवणी आठवून आपण मनमोकळे हसू शकता.

* जर आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर, ह्यूमर थेरपी घेण्यापूर्वी, ह्यूमर थेरपिस्टद्वारे हे सुनिश्चित करा की कोणते हसणे किती काळासाठी आपणास ठीक राहील. ह्यूमर थेरपीबरोबरच औषधे घेणे सुरू ठेवा.

गर्भधारणेपूर्वी या बाबी जरूर लक्षात घ्या

* अनुभा सिंग, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ एक्सपर्ट

आजकाल वाढत्या स्वातंत्र्यामुळे आणि सेक्सबाबतच्या एकपेक्षा जास्त साथीदारामुळे लैंगिक संबंधी अनेक आजार होण्याची भीती असते. लैंगिक समस्या शक्य तितक्या लवकर ओळखणे आणि डॉक्टरकडे जाणे आवश्यक होऊन जाते. असे न केल्यास वंध्यत्वासारखी मोठी समस्यादेखील उद्भवू शकते.

पेल्विक इनफ्लेमेटरी डिसीज

हा मुख्यत: असुरक्षित संबंधांमुळे पसरणारा एक रोग आहे. मेट्रो शहरांमध्ये गुप्तपणे महिलांच्या वंध्यत्वाचे हे एक मोठे कारण बनत आहे. १५ ते २४ वयोगटातील मुलींना या गोष्टीचा धोका जास्त असतो. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात अजून याचे प्रमाण कमी असले तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर यावर नियंत्रण ठेवले नाही तर येणाऱ्या काळात ही मोठी समस्या बनू शकते. याचा परिणाम नवीन पिढीतील आई बनण्यावर होऊ शकतो.

डॉ. अनुभा सिंह म्हणतात की हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. याची सर्वात मोठी ओळख अशी आहे की यामुळे अचानक वजन वाढते. मासिक पाळी अनियमित होते. मुरुमे आणि टक्कल पडण्याची समस्यादेखील उद्भवू शकते. मुले जन्मास घालण्याच्या वयात सुमारे १ ते १० महिलांमध्ये ही समस्या पाहावयास मिळते. फॅलोपियन नलिका आणि प्रजननाशी संबंधित इतर अवयवांमध्येदेखील यामुळे सूज येऊ शकते. वेळेवर उपचार न केल्यास याचा परिणाम वंध्यत्वाच्या रूपात समोर येतो.

हा रोग क्लॅमायडिया ट्रेकोमायटीस नावाच्या जिवाणूमुळे होतो. मोठया शहरांमध्ये सेक्सच्या बाबतीत वाढते स्वातंत्र्य आणि एकाहून अधिक साथीदार याच्या प्रसाराचे सर्वात मोठे कारण आहे. या व्यतिरिक्त स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे, मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत होते आणि त्यामुळेदेखील याचे जीवाणू महिलांना आपले लक्ष्य करू शकतात.

मेट्रो शहरांत याच्या विळख्यात सापडणाऱ्या महिलांची टक्केवारी ३ ते १० दरम्यान आहे. हे स्त्रियांच्या सामाजिक स्थितीवर आणि लैंगिक वर्तनावर खूप अवलंबून आहे, २५ वर्षांखालील मुली याच्या विळख्यात सहजतेने येण्याचे कारण हे आहे की त्यांच्या गर्भाशयाचे तोंड या वयापर्यंत लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारास तोंड देण्यास सक्षम नसते. यामुळे त्या अशा आजारांना बळी पडतात.

लक्षणांवर लक्ष ठेवा

पीआयडीच्या विळख्यात सापडल्यावर योनीमार्गत जळजळ होऊ शकते. पांढऱ्या स्रावाची तक्रार उद्भवी शकते. ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ शकते, ताप येऊ शकतो आणि उलटयादेखील होऊ शकतात. तसेच मासिक पाळीच्या आधी आणि नंतर शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे लघवी करताना जळजळ देखील होऊ शकते.

मुक्तता कशी होईल

डॉ. अनुभा सिंह म्हणतात की पीआयडीची जास्त प्रकरणे मेट्रो शहरांमध्ये होतात. या रोगाचे एक प्रमुख कारण असुरक्षित लैंगिक संबंध आहे. नव्या पिढीला याची जाणीव करून देण्याची गरज आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने आपण आई होण्याच्या आनंदापासून वंचित राऊ शकता.

पीआयडीशी संबंधित लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. औषधाबरोबरच नियमित तपासणी करून त्यावर उपचार करणे शक्य आहे. निष्काळजीपणा केल्यास हा रोग संपूर्ण प्रजनन प्रणालीला व्यापू शकतो.

इतरही काही लैंगिक आजार आहेत, जे तितकेच घातक आहेत जसे :

ट्रायकोमोनिएसिस

जर सतत ६ महिन्यांपासून एखाद्या महिलेच्या योनीतून स्त्राव होण्याबरोबरच खाज सुटत असेल, पतिशी संबंध ठेवताना वेदना होत असेल, लघवी करताना त्रास होतो, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. हा ट्रायकोमोनिएसिस रोग असू शकतो.

अनेक वेळा स्त्रियांमध्ये प्रसूती, मासिक पाळी आणि गर्भपात होण्याच्यावेळीदेखील संसर्गाची भीती असते.

निरक्षरता, दारिद्रय, संकोच यांमुळे अनेकदा स्त्रिया प्रजनन अवयवांच्या रोगांवर उपचार करून घेण्यास संकोच करतात. प्रजनन अवयवांच्या संसर्गामुळे एड्ससारखा धोकादायक आजारदेखील उद्भवू शकतो.

कॉपर टी लावूनदेखील प्रजनन अवयवांमध्ये रोग वाढण्याची शक्यता असते. क्लॅमायडिया रोग ट्रॅकोमायटीस नावाच्या जिवाणूमुळे होतो. तोंडावाटे आणि गुद्द्वारामार्गे समागम केल्याने हा रोग लवकर पसरतो. बऱ्याच वेळा या आजारामुळे संसर्ग गर्भाशयाच्या माध्यमातून फॅलोपियन नलिकांपर्यंत पसरतो.

गोनोरिया

स्त्रियांमध्ये हा रोग सुजाक, निसेरिया नावांच्या जिवाणूपासून होतो. महिलांच्या प्रजनन मार्गाच्या ओल्या क्षेत्रात हा तीव्रपणे अगदी सहज वाढतो. याचे जिवाणू तोंडात, घशात, डोळयांतही पसरतात. या रोगात लैंगिक स्रावामध्ये बदल होतो. पिवळया रंगाचा दुर्गंधीयुक्त स्त्राव निघतो. कधी-कधी योनीतून रक्तदेखील बाहेर पडते.

गर्भवती महिलेसाठी हा अत्यंत जीवघेणा रोग आहे. प्रसूती दरम्यान मूल जन्म नलिकेमधून जाते. अशा परिस्थितीत जर आईला हा आजार झाला असेल तर मूल अंधदेखील होऊ शकते.

हर्पीज

हर्पीज सिम्प्लेक्स ग्रस्त व्यक्तिशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे हा रोग होतो. यामध्ये २ प्रकारचे विषाणू असतात. बऱ्याचवेळा या आजाराने ग्रस्त स्त्री-पुरुषांना हा आजार आपल्याला झाल्याचे माहीत नसते. लैंगिक अवयव आणि गुद्द्वार क्षेत्रात खाज सुटणे, लहान-लहान पाणीदार पुरळ, डोकेदुखी, पाठदुखी, वारंवार फ्लू होणे इ. याची लक्षणे आहेत.

सॉप्सिस

हा रोग ट्रेपोनमा पल्लिडम नावाच्या जिवाणूमुळे होतो. योनीमुख, योनी, गुद्द्वाराजवळ खाज न सुटता ओरखडे येतात. महिलांना तर याविषयी कळतही नाही. पुरुषांमध्ये लघवी करताना जळजळ, खाज सुटणे, जननेंद्रियावर फोड येणे इत्यादी समस्या उद्भवतात.

हनिमून सिस्टायटिस

नवविवाहित जोडप्यांमध्ये यूटीआय खूप सामान्य आहे. त्याला हनिमून सिस्टायटिसदेखील म्हणतात. हे स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग, योनीमुख आणि गुद्द्वाराजवळ असते. येथून जीवाणू मूत्रमार्गापर्यंत सहज पोहोचू शकतात आणि संसर्ग करू शकतात. या व्यतिरिक्त इतर अनेक प्रजातींचे जिवाणूदेखील यूटीआय तयार करू शकतात.

सुमारे ४० टक्के स्त्रियांना याची आयुष्यात कधी न कधी लागण होते. लक्षणांषियी बोलायचं झाल्यास, यूटीआय झाल्यावर वारंवार लघवी होते, परंतु लघवी फक्त काही थेंबच होते. लघवीतून वास येतो, लघवीचा रंग अस्पष्ट असू शकतो. कधीकधी रक्त मिश्रित झाल्यामुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा भुरकट असू शकतो.

पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणालाही संसर्ग झाल्यावर लैंगिक संबंध ठेवल्यास लैंगिक समस्या वाढू शकते. उपचार न केल्यास शरीराच्या अवयवांमध्ये वेदना होऊ शकते, ताप येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये संक्रमण मूत्राशयाच्या वरती पोहोचू शकते आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

प्रजनन अवयव स्वच्छ आणि सुरक्षित राहावेत यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला आपल्या प्रजनन अवयवांबद्दल जागरूक असले पाहिजे. जर त्यांच्यात काहीही समस्या असेल तर कृपया तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी राहण्याच्या ७ टीप्स

* निधी धवन

सणासुदीचा काळ सुरु आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगत आहोत, ज्यामुळे साखरयुक्त पेय आणि अधिक कॅलरी असलेल्या मिठाईचे सेवन कमी करता येऊ शकते :

  1. आपल्या डाएट प्लानचे पालन करा
  • हेवी ब्रेकफास्ट करा. याने तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील. सणांच्या काळात हेवी ब्रेकफास्ट करा, जो फायबर आणि पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असेल. दुपारच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे. हे पोटाला खूप काळ भरलेले ठेवेल ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाल. आपल्या फ्रिज आणि किचनमध्ये पौष्टीक स्नॅक्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे अनेक प्रकार जास्त प्रमाणात ठेवा.
  1. विचार करून खा
  • तुम्ही जे काही खात आहात, त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. यामुळे जर तुम्ही मिठाई किंवा इतर कोणता जास्त कॅलरी असलेला पदार्थ थोडया प्रमाणात खाल्ला तर तुमचा कॅलरी इनटेक वाढणार नाही.
  1. पाणी भरपूर प्या
  • रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास पाणी प्या, याने तुमची पचनसंस्था साफ राहील. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कायम राहील आणि रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल. दिवसातून कमीतकमी ३ लिटर पाणी अवश्य प्या.
  1. व्यायाम करायचा नसेल तर डान्स करा
  • जर व्यायाम करणे तुमच्यासाठी कठीण असेल तर मनापासून नृत्य करा. यामुळे खूप प्रमाणात कॅलरीज जळतात. कित्येक प्रकारच्या मिठाई आणि तुपाचे सेवन करूनही स्वस्थ राहण्याकरिता डान्स हे सगळयात चांगलं वर्कआऊट आहे.
  1. आरोग्यासाठी उत्तम उपाय निवडा
  • नेहमी चांगले आणि पौष्टीक पदार्थ निवडा. अतिखाणे टाळा. मिठाईऐवजी सुका मेवा, फळं, फ्लेवर्ड दही यांना प्राधान्य द्या.
  1. खरेदीसाठी जा
  • सणांच्या काळात कोणालाही खरेदी करायला आवडते आणि येथे आम्ही तुम्हाला आणखी एक कारण सांगत आहोत की खरेदी करणे तुमच्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते. आपली शॉपिंगची योजना अशी बनवा की तुम्हाला अधिकाधिक चालावे लागेल. कारचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन शॉपिंग करण्याऐवजी जर तुम्ही बाजार अथवा मॉल फिरून शॉपिंग केली तर जास्त प्रमाणात कॅलरी बर्न कराल
  1. डीटॉक्सिफिकेशन तंत्र
  • तसे पाहता आपल्या शरीराची रचना अशी असते की ते आपोआपच शरीरातील अपायकारक रसायने बाहेर फेकते, तरीही सणांच्या काळात शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. म्हणून आपल्या शरीरातून यांना काढून टाकायचा प्रयत्न करा. चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी प्या. आपल्या दिवसाची सुरूवात १ ग्लास कोमट पाणी लिंबाचा रस मिसळून घ्या.
  • जर कॅलरी इनटेक जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट किंवा वॉकची वेळ १० मिनिटे वाढवा. सणांमध्येही आपले व्यायामाचे रुटीन चालू ठेवा. बस कार्डिओ थोडे वाढवा.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें