आरोग्य परामर्श

* प्रतिनिधी

प्रश्न : मी 38 वर्षांचा आयटी व्यावसायिक आहे. मी ऑफिसमध्ये बसलो असताना मला माझ्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना आणि जडपणा आहे. मला क्वचितच जिममध्ये जाण्याची आणि वर्कआउट करण्याची वेळ मिळते. जेव्हा मी गुडघेदुखीची लक्षणे शोधली तेव्हा मला आढळले की गुडघा संधिवात 30 आणि 40 च्या दशकाच्या सुरुवातीला एक सामान्य समस्या आहे. गुडघ्यांचा संधिवात दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदलांच्या गरजेवर तुम्ही अधिक प्रकाश टाकू शकता का? कोणत्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याद्वारे मी माझे गुडघे फिट ठेवू शकतो आणि वेदनांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो?

उत्तर : तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या गुडघ्यांवर योग्य उपचार करा. इंटरनेटवर पाहून स्वतःचे उपचार केल्याने तुम्हाला चुकीची माहिती मिळू शकते आणि तुमची स्थिती आणखी वाईट होऊ शकते. आपले गुडघे निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाऊन बराच वेळ बसून वेळोवेळी ब्रेक घेऊन हलका व्यायाम करावा लागत नाही. कोणत्याही प्रकारचा हलका व्यायाम जसे 30 मिनिटे चालणे आणि एस्केलेटरऐवजी पायऱ्या चढणे तुम्हाला गुडघेदुखीपासून खूप आराम देऊ शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे वजन जास्त असेल तर ते तुमचे गुडघे मजबूत ठेवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे.

 

हेही वाचा – मला ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान झाले आहे, त्याचा माझ्या गुडघ्यांवर परिणाम होईल का?

संधिवात आता आपल्या देशाचा एक सामान्य रोग बनला आहे आणि त्यातून ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. केवळ प्रौढच नव्हे तर आजचे तरुण देखील आर्थरायटिसने ग्रस्त आहेत. ज्याची कारणे आजची आधुनिक जीवनशैली, अन्न, जीवनशैली इ. आज प्रत्येक व्यक्तीला सांत्वन हवे आहे, जीवनात मेहनत संपली आहे. परिणामी, एंडस्टेज आर्थरायटिसने ग्रस्त अनेक रुग्णांना संयुक्त बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४१ वर्षीय महिला आहे. मला २ मुलगे आहेत. दीर्घ काळापासून माझ्या गर्भाशयात २ छोटे-छोटे फायब्रॉइडच्या गाठी आहेत. पण नुकतेच माझे अल्ट्रासाउंड झाले, तेव्हा कळले की, या फायब्रॉइड्सची साइज वाढून २.५ सेंटीमीटर झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, माझी इच्छा असेल गर्भपिशवी काढताही येईल. परंतु त्यांच्या असण्याने मला कोणताही त्रास नाहीए. तरीही भीती वाटते की काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर : फायब्रॉइड महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या सामान्य गाठी आहेत. अल्ट्रासाउंड केल्यानंतर जवळपास ४० टक्के महिलांच्या गर्भाशयात या गाठी आढळून येतात. काही महिला जसं की आपल्या केसमध्ये या गाठी छोट्या-छोट्या आहेत आणि  काहींमध्ये तर या फूटबॉलएवढ्या मोठ्याही असतात.

जोपर्यंत फायब्रॉइडमुळे मासिकपाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होत नसेल, एखाद्या महिलेला मूल हवंय आणि फायब्रॉइडमुळे ही इच्छा पूर्ण होण्यात अडचण येत नसेल किंवा फायब्रॉइड्समुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नसतील उदा. गाठ आपल्या स्थानी चक्रासारखी फिरणे आणि रक्तपुरवठा भंग होण्यासारख्या इमर्जेन्सी उत्पन्न होत नसतील किंवा या गाठी खूप मोठ्या झाल्याने ब्लॅडर दबणे अथवा मलाशय दबल्यामुळे कोणती समस्या निर्माण होत नसेल, तर तिला तिच्या स्थितीवर सोडून देण्यातच शहाणपण आहे.

सध्या तुमचे जे वय आहे, ते पाहता या गाठींना सहजपणे कोणतीही छेडछाड न करता सोडता येऊ शकते. विशेषत: अशा स्थितीत जेव्हा आपले कुटुंब पूर्ण झाले असेल आणि या गाठी असण्याने आपल्याला कोणताही त्रास नसेल.

जसजसे आपले वय वाढेल आणि आपली रजोनिवृत्ती होईल तसेच आपल्या शरीरात लैंगिक हार्मोन्सचे प्रमाण घटत जाईल, तसतशा या गाठी आपोआपच आकुंचन पावत जातील.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे आणि मला गर्भावस्थेचा तिसरा महिना चालू आहे. मला सकाळी उठताच उलट्या होण्याचा त्रास चालू आहे. चक्कर येते आणि अशक्तपणाही जाणवतो. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी ग्लुकोजच्या बॉटलची ड्रीपही लावली, परंतु त्यामुळेही काही फायदा झाला नाही. काहीतरी असा उपाय सांगा, ज्यामुळे त्रास दूर होऊ शकेल.

उत्तर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या शरीरात एकाच वेळी खूप सारे बदल होतात. त्यात हार्मोनल फेरबदलही सामील आहेत. त्यामुळे उलटीचा त्रास होतो. हे लक्षण साधारणपणे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात सुरुवातीच्या काळात दिसते. याची तीव्रता एखाद्या महिलेमध्ये कमी तर एखादीमध्ये जास्त असते. एखादीला थोडाशीच मळमळ होते, कोणाला जास्त उलट्यांचा त्रास होतो. परंतु बहुतेक महिलांमध्ये हा त्रास चौथा-पाचवा महिना उलटल्यानंतर आपोआपच दूर होतो.

तोपर्यंत आराम मिळवण्यासाठी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता. जर उलट्या सकाळीच जास्त होत असतील, तर सकाळी अंथरुणावरून उठण्यापूर्वी एक सुका टोस्ट किंवा बिस्कीट खा. आपण आपल्या खाण्यापिण्यात बदल केल्यास उत्तम होईल.

खाण्याच्या काही पदार्थ किंवा वासामुळे मळमळत असेल, तर त्या पदार्थांपासून लांब राहा. गर्भावस्थेत गंधाबाबत संवेदनशीलता वाढते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरमागरम पदार्थ खाण्याऐवजी थंड पदार्थ खाणे योग्य ठरते. कारण थंड पदार्थांमध्ये सुगंध कमी जाणवतो.

जिथे चक्कर येणे आणि अशक्तपणा वाटण्याची गोष्ट आहे, तिथे डॉक्टरांकडूनच तपासणी करून घेणे उत्तम असते. याचा संबंध रक्ताची कमतरता आणि ब्लड प्रेशर कमी होणे याच्याशीही असू शकतो. गर्भातला भ्रुणाच्या वाढीसाठी कॅलरीज, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी गर्भवतीने आपल्या खुराकाकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर एखाद्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेबाबत कळले तर ती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर गोळी, कॅप्सूलही देऊ शकतात.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला दर १५ दिवसांनी पाळी येते. डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी औषध दिले. ते घेतले की आराम मिळतो, पण ते सोडले तर पुन्हा मासिक चक्र १५ दिवसांचे होते. हे एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण तर नाही ना?

उत्तर : किशोरावस्थेत सुरुवातीच्या काळात हार्मोनल असंतुलनामुळे मासिकपाळीची वेळ अनियमित होणे सामान्य गोष्ट आहे. कमी दिवसांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा रक्तस्त्राव झाल्यास नक्कीच त्रास होत होतो. त्यामुळे मनही शंकाकुल होते.

अशा वेळी हेच योग्य ठरेल की हा शरीर परिपक्व होण्याच्या शारीरिक क्रियेचा सामान्य भाग मानून स्वत:हून ही गोष्ट सामान्य होण्यास वेळ द्या. यामुळे विचलित होऊ नका किंवा आपल्यात अशी धारणा निर्माण होऊ देऊ नका की आपल्याला एखादा रोग झाला आहे. रजस्वला झाल्यानंतर काही वर्षांत बहुतेक किशोरींचे देह आपोआपच मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.

तरीही एखाद्या तरुणीला धीर नसेल किंवा तिच्या शरीरात रक्ताची खूप कमी आली असेल, तर डॉक्टरांना भेटा. ते लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या देऊन चक्राचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या डॉक्टरांनीही असेच केले, पण हा प्रयत्न अनेक महिन्यांपर्यंत पुन्हा-पुन्हा करण्याची आवश्यकता असते.

जोपर्यंत मासिक पाळी नियमित होत नाही, तोपर्यंत लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते. दुसरा पर्याय हा आहे की आपण आपल्या शरीराला स्वत:हून त्याची नियमितता स्थापित करू द्यावं.

आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. सातत्याने रक्तस्त्राव झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता येणे स्वाभाविक आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे आयर्न आणि फोलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या आणि आहारात लोहयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाहीए. माझं आणि माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे. माझ्या बहिणीच्या सासरचे लोक तिला खूपच त्रास देतात. आईबाबांच्या घरी जाणं तर दूर, ते तिला त्यांना फोनही करू देत नाहीत. पोलिसांत तक्रार केली पण ते तिथे माझ्या बहिणीवर आणि माझ्या पतीच्या चारित्र्यावर दोष लावून साफ बचावले. तुम्हीच सांगा, मी माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासापासून कसं वाचवू?

तुम्ही हे स्पष्ट सांगितलं नाहीए की तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला बंधन का घातलं आहे? पण कारण काही असो, अशाप्रकारे कोणाला बंधक बनवून ठेवणं अयोग्य आहे. कोणत्याही प्रकारचा अत्याचार आणि घरगुती अत्याचाराच्या विरुद्ध सरकारही सक्त आहे. तुमच्या बहिणीची जर पोलिसांनी मदत केली नसेल तर तुम्ही वुमन सेल, महिला कल्याण समिती किंवा अशाच एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घेऊ शकता. ते लोक तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांशी भेटून चर्चा करतील आणि तुमच्या बहिणीला न्याय मिळवू देतील.

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. मला आईवडील नाहीत. धाकटा भाऊ आहे आणि एक विवाहित बहीण आहे. माझ्या भावोजींनी माझ्या भावाजवळ माझ्यासाठी एक स्थळ आणलं. मुलगा सरकारी नोकरी करतो. कुटुंबही समृद्ध आहे. बाहेरून तर सगळं काही व्यवस्थित वाटलं. भाऊ आणि भावोजींनी जाऊन लग्नासाठी होकारही दिला आणि दोन महिन्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवली. तत्पूर्वी भावाने मुलाच्या कुटुंबियांबद्दल माहिती काढली तेव्हा कळलं की मुलाच्या मोठ्या भावाचा अपराधिक भूतकाळ होता. त्याने तुरुंगवासही भोगला आहे. माझ्या भावाने भावोजींना सांगितलं की त्यांनी या लग्नाला नकार द्यावा. तेव्हा ते माझ्या भावाला खूप बडबडले. आम्हाला भीती वाटत आहे की या गोष्टीवरून माझ्या भावोजींनी बहिणीला त्रास देऊ नये. हा विचार करून करून मी खूपच चिंतित आहे. तुम्हीच सांगा. मी काय करू?

लग्नसंबंधामुळे फक्त दोन माणसांचं नव्हे, तर २ कुटुंबांचं नातं जुळतं. म्हणूनच नातं ठरवताना कुटुंबाकडेही पाहिलं जातं. तुमच्या भावाने जर अशा कुटुंबात तुमचं लग्न करून द्यायला नकार दिला आहे, जिथला एक सदस्य गुन्हेगारी जगताशी जोडलेला आहे, तर यात तुमच्या भावोजींनी नाराज व्हायला नकोए. त्यांनी या गोष्टीला विनाकारण आपल्या अहंकाराशी जोडलं आहे. तुमची बहीण त्यांना प्रेमाने समजावू शकते की तिच्या बहिणीला आईवडिलांचा आधार नाहीए. भविष्यात काही अघटित घडू नये म्हणून जास्त काळजीची गरज आहे. म्हणून त्यांनी विनाकारण नाराज होऊ नये.

  • मी २२ वर्षांची तरुणी आहे. एका मुलावर मी प्रेम करायचे. त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणून आम्ही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आमच्यामध्ये शारीरिकसंबंधही होते, पण वर्षभरापूर्वी तो माझी फसवणूक करून निघून गेला. आता माझे कुटुंबीय माझ्या लग्नासाठी स्थळ शोधत आहेत. मी फारच द्विधावस्थेत आहे. कसलाच निर्णय घेऊ शकत नाहीए. कृपया मला सांगा की, लग्न ठरवण्यापूर्वी मी मुलाला हे सांगू का, की माझे एका मुलाबरोबर शारीरिकसंबंध होते. कारण मी त्याला हे सांगितलं नाही, तरी ही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला कळेलच. जर लग्नानंतर त्याला ही गोष्ट कळली आणि त्याने मला अपमानित करून सोडलं तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल. यापेक्षा चांगलं तर हे आहे की मी आधीच ही गोष्ट सांगून टाकू. त्यानंतर त्याला नातं ठेवायचं आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून राहील. विनाकारण मला घाबरून तर राहावं लागणार नाही?

कोणत्याही मुलाला हे कळलं की लग्नाआधी मुलीचे कोणाबरोबर तरी शारीरिकसंबंध होते तर तो तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. लोक कितीही आधुनिक आणि मॉडर्न व स्वतंत्र विचारांचे असल्याचा दावा करत असले तरी पत्नी म्हणून त्यांना सतीसावित्रीच हवी असते. म्हणून तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. लग्नाच्या आधीही नाही आणि लग्नानंतरही. जोपर्यंत तुम्ही स्वत: सांगणार नाही तोपर्यंत हे कोणीच जाणू शकणार नाही की तुमचे लग्नापूर्वी कोणाशी शारीरिकसंबंध होते.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री आहे. मी माझ्या एका वैयक्तिक समस्येने खूप त्रस्त आहे. कोणालाही ती समस्या सांगू शकत नाही. खरंतर माझी गुप्तांग खूपच सैल झालं आहे, ज्यामुळे माझ्या पतींना सहवास करताना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. यामुळे ते चिडतात आणि मग अनेक दिवस माझ्यापासून तुटक वागतात. सहवासही करत नाहीत. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्याने माझ्या गुप्तांगाला पूर्वीसारखा घट्टपणा येईल आणि पतींनाही सहवास करताना आनंद वाटेल?

तुमची समस्या काही वेगळी नाहीए. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या गुप्तांगाला लग्नाच्या काही वर्षांनी सैलपणा येतो त्यामुळे पूर्वीसारखा घट्टपणा कायम राहाणं शक्य नाही. असं असूनदेखील दाम्पत्य सहवासाचा पूर्ण आनंद घेतात. तुमच्या पतीनेही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळता परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. पण तरीदेखील जर ते संतुष्ट होत नसतील तर तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट घेऊन आपल्या गुप्तांगाला २-३ टाके घालून ते आकुंचित करण्याची छोटीशी शस्त्रक्रिया करवून घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?

वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.

स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.

जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.

असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.

तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.

  • मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?

आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.

आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?

आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.

तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतिश अग्रवाल

प्रश्न : माझं वय ३५ वर्षं आहे आणि मी अविवाहित आहे. माझी मासिक पाळी १५ वर्षांपूर्वी सुरु झाली. सुरूवातीचे ६-७ महिने नियमित स्वरूपात येत राहिली. त्यानंतर अनियमित होऊ लागली, पण मी लक्ष दिलं नाही. आता माझं वजन वाढून ८० किलोग्रॅम झालं आहे. उलट माझी उंची ५ फूट १ इंच आहे. आता खुप वर्षांपासून मासिक पाळीसुद्धा येणं बंद झाली आहे. लग्नानंतर मला गर्भधारणेसाठी काही त्रास तर होणार नाही?

उत्तर : तुमच्या माहितीप्रमाणे स्पष्ट होतं की तुमच्या शरीरात लैंगिक हार्मोनल प्रणाली नीट काम करत नाहीए. प्रत्येक स्त्रीच्या देहात १ जैविक हार्मोनल घडयाळ टिकटिक करत असतं. ज्यामुळे दर २८-३० दिवसांनी तिचं शरीर एका लयबद्ध परिवर्तनातून जातं.

हे हार्मोनल घडयाळ तारुण्यात सुरु होतं. याची किल्ली मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते. किशोरावस्थेत येताच त्यात काही विशिष्ट प्रकारचे यौन प्रेरक हारमोन्स तयार होणं सुरु होतं आणि त्यापासून प्रेरणा देणारे सिग्नल घेऊन डिम्ब ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करू लागतात. याच हार्मोन्सच्या प्रभावामुळे दर महिन्यात डिम्ब ग्रंथींमध्ये एक नवा डिम्ब मॅच्युर होतो आणि डिम्ब ग्रंथीतून सुटून बाहेर येतो. याच हार्मोनल हालचालीमुळे महिन्या अखेर स्त्रीला मासिक स्त्राव होतो.

तुमच्या शरीरात हे जैविक चक्र सुरूवातीपासूनच एखाद्या कारणामुळे लय पकडू शकलं नाही. तुमच्या आईवडिलांनी आणि तुम्ही याची खूप पूर्वीच तपासणी केली असती आणि योग्य वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. आता यात सुधार होणं कठीण वाटतं आहे. परंतु तरीही तुम्ही एखाद्या गायनोकॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तुमची रीतसर तपासणी करू शकता.

आता लग्न आणि त्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करता, तर स्वाभाविक आहे की या सगळया गडबडीत ही इच्छा पूर्ण होणं सोपं नाही. स्त्रीच्या शरीरात वेळेत मासिक स्त्राव होणं ही गोष्ट दर्शवते की तिची प्रजनन व्यवस्था नीट काम करत आहे. जर या  नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला तर अपत्य सुखाची इच्छा पूर्ण होणं कठीण जातं. तरीही प्रजननाच्या नव्या टेक्निकच्या मदतीने प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला २ मूलं आहेत ५ वर्षांपूर्वी मी गर्भनिरोधासाठी कॉपर टी बसवली होती. याची वेळ संपल्यावर मी त्या जागेवर नवी कॉपर टी बसवली. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी मूत्रविसर्जनासाठी जाते तर मला प्रत्येक वेळी योनिमार्गावर जळजळ होते. या जळजळीचा सबंध कॉपर टी लावण्याशी आहे का? मी काय करायला हवं?

उत्तर : तुमच्या लक्षणांवरून हे स्पष्ट दिसून येतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे. अशा वेळेस तुमच्या युरीन कल्चरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर अँटिबायोटिक औषधं सुरु करायला हवी. औषधाचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी १०-१४ दिवस ते नियमित घेणं आवश्यक आहे. औषध सुरु होताच २-३ दिवसात आराम वाटेल.

यादरम्यान पाणी आणि इतर द्रव पदार्थ जेवढे जास्त पिता येतील तेवढे प्या. यामुळे मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. जास्त मूत्र तयार झाल्याने मूत्र व्यवस्थेची वेगाने सफाई होते आणि इन्फेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर जात राहतात.

औषधांचा डोज पूर्ण झाल्यावर परत युरीन कल्चर तपासून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होईल आणि युरिनरी ट्रॅकमध्ये काही अपायकारक बॅक्टेरिया तर राहिले नाही ना हे कळेल. काही केसेसमध्ये अँटिबायोटिक औषधं जास्त दिवस घ्यायची गरज भासू शकते.  औषध घेण्यात चालढकल करणं बरोबर नाही. त्यामुळे किडनीजवर  परिणाम होऊ शकतो.

आता कॉपर टी बाबत म्हणाल, तर हा मात्र योगायोगच आहे की ज्या काळात तुम्ही कॉपर टी लावली त्याच काळात तुम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनशी सामना करत आहात, परंतु हे पण शक्य आहे की कॉपर टी लावताना योग्य प्रकारे अँटिसेप्टिक खबरदाऱ्या न पाळल्या गेल्याने इन्फेक्शन झाले असेल.

प्रश्न : मी ४५ वर्षाची महिला आहे. २६ वर्षांची असताना माझं लग्न झालं. वैवाहिक जीवन ठीकठाक चाललं होतं की अचानक मला गर्भाशयाचा टीबी झाला. नंतर १८ महिने मला टीबीची औषधं चालू होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी बरी झाली आहे हे सांगून माझी औषधं बंद केली. परंतु अजूनही मला मासिक  पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात आणि योनिमार्गातून पांढरा स्त्राव होतो. दरम्यान जेव्हा मी कधी अँटिबायोटिक्स औषध घेते तेव्हा काही दिवस आराम पडतो, पण काही दिवासांनी पुन्हा तिच समस्या सुरु होते, डॉक्टरकडे मी गर्भाशय काढण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी सरळ नकार दिला. तुमचं काय मत आहे?

उत्तर : एखाद्या अनुभवी आणि योग्य अशा गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं योग्य राहील. आपली तपासणी करा आणि डॉक्टरला आवश्यक वाटलं तर पेल्वीस म्हणजे पोटाच्या खालच्या भागाची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून घ्या.

योनीतुन पांढरा स्त्राव जाणे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना होणे आणि अँटिबायोटिक्स घेतल्यावर आराम पडणे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे.

जर योनीत इन्फेक्शन असल्याचे समजले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या पतीचेसुद्धा योग्य उपचार करा. ही सावधगिरीन बाळगल्यास तुम्हाला हे इन्फेक्शन सतत होऊ शकतं.

आता गर्भाशयाच्या टिबीबद्दल बोलायचं झालं तर १८ महिन्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्याच्या पुनरावृत्तीचा धोका जवळपास नाहीच आहे.

आरोग्य परामर्श

– डॉ. अमनजीप कौर, मेडिकल निदेशक, अमनदीप हॉस्पिटल

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे. मासिक पाळीच्या दिवसात माझे पाय खूप दुखतात. हे काळजी करण्याचे कारण आहे का?

उत्तर : नाही. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीए. मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील खालील भागात दुखणे नैसर्गिक आहे. ओटीपोटीत होणाऱ्या वेदना शरीराच्या अन्य भागांपर्यंत पोहोचतात. अनेक स्त्रियांना ही समस्या जाणवते. गर्भाशय आकुंचन पावल्यानेही पाय दुखू लागतात.

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे आणि मॉडेलिंग करते. रोज उंच टाचेची सॅन्डल घालावी लागते. माझे घोटे दुखतात. यामुळे माझ्या चालण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल का?

उत्तर : घोट्यांमध्ये थोड्याफार वेदना असोत किंवा जास्त, पण असे असेल तेव्हा जास्त काळजी घ्यावी, सावध राहावे. घोट्यांमध्ये वेदना होण्याचे कारण दुखापत किंवा ताण असू शकतो पण आर्थ्रायटिस हेही कारण असू शकते. यामुळे तुमच्या चालण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर हळूहळू दुखणे कमी होऊ शकते. तुम्ही कमीत कमी २० मिनिटे घोट्यावर बर्फाने शेकवल्यास वेदनेला आराम मिळेल. असे तीन दिवस तीनवेळा करा.

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे. मला हे सांगा की ल्यूकोरिया म्हणजे काय? मी  असे ऐकले आहे की ९८ टक्के महिला यामुळे त्रस्त आहेत आणि यामुळे पुढे हाडांशी संबंधीत समस्या उद्भवतात. हे खरे आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.

उत्तर : तुम्ही घाबरण्याची गरज नाही. ल्युकोरिया म्हणजे योनिमार्गातून स्त्रवणारा घट्ट, पांढरा किंवा पिवळसर स्त्राव असतो. ही कधी ना कधी कितीही वर्षांच्या महिलेला उद्भवणारी सामान्य समस्या आहे. जसे की, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, संसर्ग, हारमोन्सचे असंतुलन इ. ल्यूकोरियामुळे हाडांची शक्ती कमी होते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांना भेटा.

प्रश्न : मी ४१ वर्षांची आहे. मी लष्करात काम करत होते. मी आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सतर्क असते. तरीही माझी पाठ दुखते. ही मोठी समस्या आहे का?

उत्तर : ही मोठी समस्या नाही पण भविष्यात ही अवघड समस्या बनू शकते. तुम्ही लष्करात होतात, त्यामुळे व्यायामाचे महत्त्व तुम्हाला माहिती असेलच. वाढत्या वयात येणारी ही सामान्य समस्या आहे. पण पाठदुखीवर इलाज म्हणून व्यायामाचा मोठा भाग आहे. दुखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. हीट किंवा कोल्ड थेरेपी (आइस पॅक)ही सूज कमी करून पाठीच्या वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरेल.

प्रश्न : मी ३६ वर्षांची आहे. मला मधुमेह आहे. यामुळे मला भविष्यात हाडांशी संबंधित त्रास होऊ शकतो का? जर हो, तर त्यावरील उपाय काय?

उत्तर : तुम्हाला मधुमेह आहे, तर डॉक्टरांना भेटून योग्य अशा आहाराचे नियोजन केले पाहिजे. तुम्हाला हाडांचे व सांध्यासंदर्भात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. माहितीनुसार अशा लोकांना आर्थ्रायटिस आणि सांधेदुखीसारखे त्रास होण्याची दुप्पट शक्यता असते. जर तुम्हाला सांधेदुखीची जाणीव झाली तर ‘हॉट अॅन्ड कोल्ड अप्रोच’ वापरून बघा. व्यायामानेही दुखऱ्या स्नायूंना मजबूती मिळेल व वेदनेबरोबरच सूजही कमी होईल.

प्रश्न : मी ४८ वर्षांची आहे. रोज व्यायाम करते आणि चौरस आहारही घेते. पण तरीही माझे सांधे नेहमी दुखतात. या दुखण्यापासून कशी मुक्ती मिळवू?

उत्तर : तुम्ही चौरस आहार घेता ही चांगली गोष्ट आहे व व्यायामही करता पण कुठल्याही दुखण्यापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे असते. तसेही हल्ली सांधेदुखी ही सामान्य बाब आहे. जर तुमचे दुखणे सहन करण्यापलिकडे असेल तर तुमच्या बसण्याची पद्धत बदला आणि हाडांच्या डॉक्टरांना दाखवा. काही नैसर्गिक उपचार आहेत, ज्यामुळे दुखणे कमी केले जाऊ शकते. तुम्ही हळद व आल्याचा चहा पिण्यास सुरूवात करा. मॅग्निशियम जास्त प्रमाणात घ्या व थोडा व्यायामही करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची गृहिणी व दोन मुलांची आई आहे. मी कुठलेही जड सामान उचलू शकत नाही व वाकताही येत नाही. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला पाठीचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही काही जड सामान उचलण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा स्नायूंना अतिताण आल्यामुळे तुम्हाला अतिशय वेदना होत असतील. एखादी जुनी जखम किंवा फ्रक्चरही ताणामुळे त्रासदायक ठरते व वेदना वाढवते. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें