सॅनिटायझर असल्ल आहे की बनावट

* नसीम अन्सारी कोचर

डॉक्टरांच्या मते चांगल्या सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोना विषाणूचा दुष्परिणाम आणि भीती खूपच कमी होण्यास मदत होते. कोरोना विषाणूने दहशत पसरवायला सुरुवात केल्यानंतर बाजारात सॅनिटायझरचा जणू पूर आला आहे. शेकडो कंपन्या सॅनिटायझर विकत आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजतच नाही की, कोणते सॅनिटायझर अस्सल आहे आणि कोणते बनावट.

कंपन्यांकडून फसवणूक

कोरोना महामारीच्या वाढत्या संक्रमणामुळे सॅनिटायझरची मागणीही वाढली. त्यामुळे सरकारने याला ड्रग लायसन्स म्हणजे अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या परवान्याच्या कक्षेतून बाहेर काढले. याचा अर्थ कोणतीही कंपनी सॅनिटायझर तयार करून विकू शकते. याचाच फायदा घेऊन महामारीसारख्या संकटातही नफा मिळविण्यासाठी काहींनी लोकांचे आरोग्य आणि जीवाशी खेळ करत बनावट किंवा भेसळयुक्त सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आणले. मेडिकल दुकानांपासून ते रस्त्याच्या कडेला आणि अगदी किराणा दुकानांतही असे हँड सॅनिटायझर मिळत आहेत, जे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. असे सॅनिटायझर विकण्यासाठी दुकानदारांना ५० टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते, तर नामांकित कंपन्यांच्या सॅनिटायझरसाठी ते १० ते २० टक्क्यांपर्यंतच मिळते.

दिल्लीतील रमेश नगर बाजारातील एक किराणा दुकानदार सांगतात की, ज्या एजंटने त्यांच्या दुकानात नवीन सॅनिटायझर विक्रीसाठी दिले आहे त्याने माल संपल्यानंतर पैसे देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मला कसलीच चिंता नाही. शिवाय याची किंमत नामांकित कंपन्यांच्या सॅनिटायझरपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते मोठया प्रमाणावर विकले जात आहे.

माल विकल्यानंतरच पैसे द्या, असे दुकानदारांना आमिष दाखवण्यात आल्याने ते उघडपणे बनावट माल दुकानासमोर ठेवून त्याची प्रसिद्धी करीत आहेत.

डॉक्टरांच्या मते अशा सॅनिटायझरमुळे मोठे नुकसान होऊ शकते. स्वस्तातील हँड सॅनिटायझरच्या बाटलीवर उत्पादकाचे नाव किंवा पत्ता यापैकी कशाचीच माहिती नसते. प्रत्यक्षात बाटलीवर उत्पादकाच्या नावासह पत्ता, बॅच नंबर आणि एक्सपायरी म्हणजे ते कधीपर्यंत वापरता येईल याची अंतिम तारीख लिहिणे बंधनकारक आहे. खराब सॅनिटायझरचा दीर्घ काळ केलेला वापर त्वचेला रुक्ष बनवतो. त्वचेची जळजळ, सालपटे निघणे असे रोगही होऊ शकतात. अशा सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबण लावून २५ सेकंद हात स्वच्छ धुणे अधिक चांगले ठरते.

सावधानता गरजेची

सॅनिटायझर नेहमी मेडिकल दुकानातूनच विकत घेण्याचा प्रयत्न करा. स्वस्तात मिळते म्हणून छोटे दुकान किंवा रस्त्यावरून खरेदी करू नका. मेडिकल दुकानातून विकत घेतलेल्या सॅनिटायझरचे बिल अवश्य घ्या. सॅनिटायझरच्या बाटलीवर कंपनीचा परवाना, बॅच नंबर इत्यादींची नोंद आहे का, हे नीट पाहून घ्या. बिल असल्यास दुकानदारावर कायदेशीर कारवाई करता येते.

सॅनिटायझरमधील फरक ओळखण्याचे ३ प्रकार आहेत. त्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी कुठल्याही खर्चाशिवाय सॅनिटायझरची पडताळणी करू शकता.

टिश्यू पेपरने तपासणी

तुम्ही टॉयलेटमध्ये वापरला जाणारा टिश्यू पेपर, लिहिलेले घासले तरी जाणार नाही असे बॉलपेन आणि वर्तुळ काढण्यासाठी एक नाणे किंवा बाटलीचे झाकण घ्या. टिश्यू पेपर गुळगुळीत जमिनीवर ठेवा. तुम्ही जेथे टिश्यू पेपर ठेवला आहे ती जमीन खडबडीत नाही ना, हे पाहून घ्या. आता टिश्यू पेपरवर बाटलीचे झाकण किंवा नाणे ठेवा आणि बॉलपेनच्या मदतीने वर्तुळाकार आकार काढा. बॉलपेनने काढलेले वर्तुळ स्पष्ट दिसेल याकडे लक्ष द्या. त्यानंतर या वर्तुळाच्या आत सॅनिटायझरचे काही थेंब टाका. ते थेंब वर्तुळाबाहेर पसरणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर थोडा वेळ तो टिश्यू पेपर तसाच ठेवा. थोडया वेळाने जर बॉलपेनने काढलेल्या वर्तुळाची शाई सॅनिटायझरशी एकरूप झाली किंवा त्याचा रंग इकडे तिकडे पसरला तर समजून जा की, सॅनिटायझर अस्सल आहे.

पिठाद्वारे करा सॅनिटायरची तपासणी

१ चमचा गव्हाचे पीठ एका ताटलीत काढून घ्या. तुम्ही मक्याचे किंवा अन्य कुठलेही पीठ घेऊ शकता. या पिठात थोडे सॅनिटायझर मिसळा. त्यानंतर ते मळून घ्या. सॅनिटायझरमध्ये पाणी जास्त असल्यास म्हणजे ते बनावट असल्यास सर्वसाधारणपणे पीठ मळताना त्यात पाणी जाताच ते जसे चिकट होते तसेच सॅनिटायझर टाकलेले हे पीठही गमासारखे चिकट होईल. याउलट सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्यास पीठ चिकट होणार नाही. ते पावडरसारखेच राहील आणि थोडयाच वेळात त्याच्यावर टाकलेले सॅनिटायझर उडून जाईल.

हेअर ड्रायरने तपासा सॅनिटायरची गुणवत्ता

हा प्रकारही खूपच सोपा आहे. यासाठी एका भांडयात एक चमचा सॅनिटायझर टाका. दुसऱ्या एका भांडयात थोडे पाणी घ्या. त्यानंतर ड्रायरने भांडयातील सॅनिटायझर ३० मिनिटांपर्यंत सुकवा. लक्षात ठेवा, ड्रायर आधी गरम करून त्यानंतरच त्याचा वापर करा. हाच प्रयोग दुसऱ्या भांडयातील पाण्यासोबतही करा. सॅनिटायझरमध्ये पुरेशा प्रमाणात अल्कोहोल असेल तर सॅनिटायझर लवकर उडून जाईल. पाण्यासोबत मात्र असे होणार नाही. अल्कोहोल ७८ डिग्री सेल्सिअसमध्येच उकळू लागते. म्हणूनच ते आधी उडून जाईल. पाणी मात्र १०० डिग्री सेल्सिअसला उकळू लागते. त्यामुळे ते खूप नंतर सुकून जाईल. जर सॅनिटायझरमध्ये पाणी जास्त असेल तर ते उडून जायला वेळ लागेल.

निरोगी लाईफस्टाइल गरजेची

* किरण अहुजा

काव्या आयटी कंपनीत काम करते. वय वर्षे २८. अविवाहित आहे. लॉकडाऊन नंतर कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केलं. सुरुवातीला जी परीस्थिती होती ती पाहता असं वाटलं की २-३ महिन्यात पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू होईल, परंतु करोना वाढतच गेला आणि परिस्थिती सामान्य होण्याऐवजी अधिकच अवघड होत गेली. काव्याच्या कंपनीने सर्वांनाच वर्षाच्या शेवटपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला.

सुरुवातीला घरी रहात असली तरी अॅक्टिव्ह होती. सकाळी ६ वाजता उठायची. वॉकसाठी जायची. वॉकसाठी जाता आलं नाही तर ती घरच्या घरी अर्धा तास व्यायाम करायची. खाण्यापिण्याकडे तिचं व्यवस्थित लक्ष होतं. मात्र जसजसा काळ सरकत गेला तसा घरच्या घरी राहून देखील काव्याने आळशीपणा करायला सुरुवात केली. ऑफिसला जायचं नसल्यामुळे ती उशिरा सकाळी ८-९ वाजेपर्यंतदेखील झोपून राहायची. वॉकला जाणं बंद झालं, कारण दहा वाजेपर्यंत तिला ऑफिस कॉलवर लॅपटॉप समोर बसावं लागायचं. तेलकट आणि अन् हेल्दी खाण्याची तिला जास्तच चटक लागली होती. वेळेचं तसं काही बंधन नसल्यामुळे वेळीअवेळी ती खात राहायची.

पूर्वी ती ९ वाजता रात्रीचे जेवण जेवून अकरा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत झोपी जायची, परंतु आता रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली नसायची. रात्री उशीरापर्यंत ती वेब सिरीज पाहून स्वत:ची झोप खराब करायची आणि मग सकाळी उशिरा उठायची.

आता मात्र अनेकदा तिचं पोट खराब राहू लागलं होतं. काही दिवसापासून तिला वाटू लागलं होतं की एखादं मेहनतीचं काम करताना तिला अधिक थकायला व्हायचं.

एका रात्री जेव्हा ती झोपायला गेली, तेव्हा अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं आणि मग हळूहळू वाढत गेलं. कशीबशी तिने रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरला दाखवलं. तपासणी केल्यानंतर कळलं की तिला अपेन्डिस झालंय. आजार तसा प्राथमिक स्तरावर होता, म्हणून सर्जरीनंतर काव्या लवकरच बरी झाली.

परंतु हे सगळं कशामुळे झालं? काव्याने विचारल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तिला हा आजार झाला होता. काव्या तिचं खाणं-पिणं आणि आरोग्याच्या बाबतीत खूपच निष्काळजी झाली होती. काही आजार होतात, परंतु काही आजारांना आपण

स्वत:हून निमंत्रण देतो. जसं की काव्यासोबत झालं होतं. म्हणून स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल तर हेल्दी लाइफस्टाइलचा स्वीकार करणं खूपच गरजेचं आहे.

जर तुम्हाला मनापासून हेल्दी लाइफस्टाइलचा स्विकार करायचा असेल परंतु तुम्हाला समजत नसेल की कसं, काय आणि कुठून सुरुवात करायची, तर या टीप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा :

व्यायाम आणि चालायला जाणं : उन्हाळयात बाहेर चालायला जाणं वा बाहेर वर्कआऊट करणं हे फिट राहण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे, मात्र थंडीत बाहेर वर्कआउट न करण्याचा सल्ला दिला जातो, तेव्हा घरच्या घरी राहूनदेखील नृत्य इत्यादींच्या मार्गाने तुम्ही फिटनेस कायम राखू शकता. फिजिकल अॅक्टिविटी म्हणजे असा कोणताही व्यायाम ज्यातून तुमच्या शरीरातून घाम निघायला हवा आणि तुम्हाला त्यासाठी अधिकची मेहनत करणे. यामुळे व्यक्तीच्या मासपेशी मजबूत होतात कधी रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. कमीत कमी दररोज ३० मिनिटे तरी व्यायाम करा.

पोषक अन्न सेवन करा : खाण्यापिण्याचा आपल्या शरीरावर सर्वाधिक परिणाम होतो. पोषक अन्नाने शरीराला ऊर्जा मिळते. साध्या कार्बोहाइड्रेटसाठी पोहा, उपमा, स्टीम्ड इडली, ओट्स, मुसळी आणि प्रोटीनसाठी अंड, मलई विरहित दूध घेऊ शकता. फॅटसाठी बदाम, अक्रोड, आळशीच्या बिया खा. संध्याकाळच्यावेळी कोणत्याही भाज्यांनी बनलेलं सूप व ग्रीन टी प्या. रात्रीच्या जेवणात  एक वाटी सलाड वा उकडलेल्या भाज्या व पपया खाऊ शकता. भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण ब्रोकोली टाका.

डाएट ६-७ भागात वाटून घ्या. जर तुम्ही ३ वेळा खात असाल तर मध्ये स्प्राऊट्स, मोसमी फळं, भाज्यांच सलाड खाणं तसंच ज्यूस प्यायची सवय लावा.

गव्हाच्या पोळीऐवजी थंडीमध्ये मका व बाजरीची भाकरी खा. पांढरा भात खाण्याऐवजी ब्राउन राईस खा. यामधील प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम सारखी तत्व वजन नियंत्रित ठेवून पाचनक्रिया आणि ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो.

पुरेशा प्रमाणात पाणी : दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळी उठताच १ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट साफ राहतं. पाणी प्यायल्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. मासपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने भरलेला असल्यामुळे पाण्याने मासपेशीतील ताठरतादेखील दूर होते.

साखर व मिठाचं कमी प्रमाणात सेवन : आहारात मीठ, साखर व तेलाचे प्रमाण कमी असेल तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांपासून दूर राहता येतं. साखरेत कॅलरीजचे प्रमाण अधिक असतं. साखरेत कोणतंही विटामिन, मिनरल व पौष्टिक तत्त्व नसतात. त्यामुळे फक्त शरीराला ऊर्जा मिळते. दिवसभरात २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखर घेऊ नका. तसेच फक्त सहा ग्रॅम मीठ खायला हवं.

नशा व धुम्रपानापासून दूर रहा : जास्त दारू प्यायल्याने आणि धूम्रपान केल्याने व्यक्तीचं आरोग्य खराब तर होतच तसंच वृद्धपणादेखील दिसून येतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी होते.

अलीकडच्या काळात अनेक आजार वाढत आहेत. वेळेतच त्यावर उपचार केले तर अनेक फायदे होतात. जसं की, व्यक्तीचे वजन संतुलित राहतं, हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते, संकल्पनापासून बचाव होतो, दीर्घायुष्य लाभते, स्वत:ला ताजतवानं वाटतं, ज्यामुळे व्यक्ती आनंदी राहते. आज लोकांनी हेल्दी लाइफस्टाइलचा स्वीकार करणं खूपच गरजेचं झालंय. मग काय विचार

गव्हाच्या पोळीऐवजी थंडीमध्ये मका व बाजरीची भाकरी खा. पांढरा भात खाण्याऐवजी ब्राउन राईस खा. यामधील प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम सारखी तत्व वजन नियंत्रित ठेवून पाचनक्रिया आणि ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो.

पुरेशा प्रमाणात पाणी : दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळी उठताच १ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट साफ राहतं. पाणी प्यायल्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. मासपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने भरलेला असल्यामुळे पाण्याने मासपेशीतील ताठरतादेखील दूर होते.

साखर व मिठाचं कमी प्रमाणात सेवन : आहारात मीठ, साखर व तेलाचे प्रमाण कमी असेल तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांपासून दूर राहता येतं. साखरेत कॅलरीजचे प्रमाण अधिक असतं. साखरेत कोणतंही विटामिन, मिनरल व पौष्टिक तत्त्व नसतात. त्यामुळे फक्त शरीराला ऊर्जा मिळते. दिवसभरात २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखर घेऊ नका. तसेच फक्त सहा ग्रॅम मीठ खायला हवं.

नशा व धुम्रपानापासून दूर रहा : जास्त दारू प्यायल्याने आणि धूम्रपान केल्याने व्यक्तीचं आरोग्य खराब तर होतच तसंच वृद्धपणादेखील दिसून येतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी होते.

अलीकडच्या काळात अनेक आजार वाढत आहेत. वेळेतच त्यावर उपचार केले तर अनेक फायदे होतात. जसं की, व्यक्तीचे वजन संतुलित राहतं, हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते, संकल्पनापासून बचाव होतो, दीर्घायुष्य लाभते, स्वत:ला ताजतवानं वाटतं, ज्यामुळे व्यक्ती आनंदी राहते. आज लोकांनी हेल्दी लाइफस्टाइलचा स्वीकार करणं खूपच गरजेचं झालंय. मग काय विचार

गव्हाच्या पोळीऐवजी थंडीमध्ये मका व बाजरीची भाकरी खा. पांढरा भात खाण्याऐवजी ब्राउन राईस खा. यामधील प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम सारखी तत्व वजन नियंत्रित ठेवून पाचनक्रिया आणि ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो.

पुरेशा प्रमाणात पाणी : दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळी उठताच १ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट साफ राहतं. पाणी प्यायल्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. मासपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने भरलेला असल्यामुळे पाण्याने मासपेशीतील ताठरतादेखील दूर होते.

साखर व मिठाचं कमी प्रमाणात सेवन : आहारात मीठ, साखर व तेलाचे प्रमाण कमी असेल तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांपासून दूर राहता येतं. साखरेत कॅलरीजचे प्रमाण अधिक असतं. साखरेत कोणतंही विटामिन, मिनरल व पौष्टिक तत्त्व नसतात. त्यामुळे फक्त शरीराला ऊर्जा मिळते. दिवसभरात २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखर घेऊ नका. तसेच फक्त सहा ग्रॅम मीठ खायला हवं.

नशा व धुम्रपानापासून दूर रहा : जास्त दारू प्यायल्याने आणि धूम्रपान केल्याने व्यक्तीचं आरोग्य खराब तर होतच तसंच वृद्धपणादेखील दिसून येतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी होते.

अलीकडच्या काळात अनेक आजार वाढत आहेत. वेळेतच त्यावर उपचार केले तर अनेक फायदे होतात. जसं की, व्यक्तीचे वजन संतुलित राहतं, हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते, संकल्पनापासून बचाव होतो, दीर्घायुष्य लाभते, स्वत:ला ताजतवानं वाटतं, ज्यामुळे व्यक्ती आनंदी राहते. आज लोकांनी हेल्दी लाइफस्टाइलचा स्वीकार करणं खूपच गरजेचं झालंय. मग काय विचार करूया.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें