सोने फसवणुकीचे रंग हजार

– सुरेशचंद्र रोहरा

अनेकदा लोभामुळे आपण आपला मौल्यवान पैसा गमावतो आणि सर्वात दु:खाची बाब म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना पाहूनही आपण सुधारत नाही आणि पुन्हा एकदा फसवणुकीचे बळी ठरतो. छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या पोलिसांनी मुंबईतील दोन ठगांना अटक केली, जे गुन्हे करण्यासाठी विमानाने रायपूरला येत आणि गुन्हा केल्यानंतर पुन्हा मुंबईला पळत असत. रायपूरच्या वेगवेगळ्या दागिन्यांच्या दुकानात बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यांनी लाखो रुपये उकळले. ही बाब दुकान मालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

महेशकुमार थवैत यांनी याप्रकरणी विधानसभा पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल केली. दोंदेकला येथे त्यांचे दागिन्यांचे दुकान असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. विशालकुमार सोनी नावाच्या व्यक्तीने १९ मार्च रोजी गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे ब्रेसलेट आणले. त्याने त्याचे आधारकार्ड आणि सोन्याच्या ब्रेसलेटचे बिलही दिले होते.

फसवणूकीच्या पद्धती

दुकानदार महेश यांनी सोने गहाण ठेवण्याचे कारण विचारले असता, फसवणूक करणाऱ्याने जमीन खरेदीचे कारण पुढे केले. त्याला तातडीने पैशांची गरज असल्याचेही सांगितले. ब्रेसलेटवर हॉलमार्कही होता. त्यामुळे महेश यांनी ६१ ग्रॅम सोने गहाण ठेवण्याच्या बदल्यात त्याला २ लाख ५० हजार रुपये दिले.

याच धर्तीवर आरोपींनी आरंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी ज्वेलर्समध्ये बनावट सोन्याचे ब्रेसलेट गहाण ठेवून २ लाख १० हजार रुपये घेतले, तर पुराणी बस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दागिन्यांच्या दुकानातून बनावट सोन्याच्या बदल्यात पैसे उकळले.

या तिन्ही दुकानांच्या मालकांनी ब्रेसलेट बारकाईने तपासले असता ते बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विधानसभा पोलीस ठाणे, आरंग आणि पुराणी बस्ती पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दिवशी तक्रारी दाखल झाल्या. फसवणुकीच्या या मालिकेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

कायद्याचे हात लांब आहेत

ही घटना उघडकीस आल्यानंतर रायपूरचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या, त्यानंतर विधानसभा पोलीस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण विभागानेही आरोपींचा शोध सुरू केला.

जरा जपून

या आरोपींना पोलिसांनी रायपूरमधूनच अटक केली. साहेब बॅनर्जी आणि अक्षय सोनी अशी महाराष्ट्रातील या आरोपींची नावे आहेत. पुन्हा एकदा फसवणूक करण्यासाठी आपण रायपूरला पोहोचल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्येही त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले होते. त्यांनी प्रवासासाठी विमानाचा वापर केला. आरोपींकडून पोलिसांना ५० हजारांची रोकडही सापडली.

या संपूर्ण घटनेचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते की, फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबून लोकांची फसवणूक केली जात आहे आणि थोड्याशा लोभामुळे किंवा निष्काळजीपणामुळे लोक फसवणुकीचे बळीही ठरत आहेत

दयनीय नैनितालमुळे पर्यटक निराश

– अमृता पांडे

पर्यटन हा कोणत्याही समाजाचा आर्थिक कणा असतो. समाज जितका समृद्ध असेल तितक्या पर्यटनाच्या शक्यता वाढतात. अनेक वर्षांपूर्वीपासून भारतातील पर्यटन हे तीर्थक्षेत्रांच्या प्रवासापुरते मर्यादित होते. काही भटक्या जातीचे तरुण डोंगरावर जात. हळूहळू पर्यटनाच्या विस्तारासोबतच त्याचा अर्थही बदलत गेला. आज हा व्यवसाय खूप संपन्न आहे. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तीही आपल्या कुटुंबासोबत प्रवास करण्याचा बेत त्याच्या क्षमतेनुसार आखतो. आठवड्यातून ५ दिवस काम केल्यानंतर, २ दिवस आराम करावासा वाटतो आणि त्यासाठी लोक एखाद्या शांत आणि नयनरम्य ठिकाणी जातात.

पर्यटनाचा हा ट्रेंड जोमात आहे, कारण आज तरुण जोडपी चांगली कमाई करत आहेत. पूर्वीसारखी पैशांची कमतरता नाही. माणूस पैसा वाचवण्याच्या प्रवृत्तीतून बाहेर पडला आहे आणि उपभोगावर विश्वास ठेवू लागला आहे. त्याचा असा विश्वास आहे की, पैसा हे साधन आहे ध्येय नाही. पैसा हे सुख मिळवण्याचे साधन आहे हे देखील खरं आहे.

या प्रकरणाला पुढे नेत आपण आपल्या जवळच्या शहराकडे वळूया, जे जगभरातील पर्यटकांचे आवडते आहे, ज्याला तलावांचे शहर म्हटले जाते. त्याचे नाव नैनिताल आहे. नैनिताल वर्षानुवर्षे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

मर्यादित संसाधनांमुळे ध्येयपूर्तीत अडथळा

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा फायदा येथील व्यावसायिकांना घ्यायचा होता. पण, बांधकामाचे काम जोरात सुरू झाले आणि टेकड्यांना तडे जाऊ लागले. रस्ते जाम झाले, शहरे कचरा आणि घाणीने व्यापली गेली आणि जेव्हा हंगामात लाखो पर्यटक येऊ लागले तेव्हा पार्किंग व्यवस्था कोलमडली. सरकारी प्रयत्न झाले, पण जागा मर्यादित राहिल्याने अपयश आले. काही बेकायदेशीर अतिक्रमणेही वेळोवेळी काढली जाऊ लागली, मात्र ती तात्पुरती कारवाई होती. मुसळधार पाऊस बाजूला ठेवल्यास नैनिताल वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यात मैदानी भागातील कडाक्याच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात, मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प करूनही अडचणी वाढत आहेत. मर्यादित संसाधने उद्दिष्ट गाठण्यात अडथळे ठरत आहेत.

पर्यटकांच्या प्रचंड ओघळामुळे व्यावसायिक चिंतेत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील अप्पर मॉल रोड आणि लोअर मॉल रोड या दोन्ही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. इंग्रजांनी बांधलेला बनिया नालाही अडचणीत आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या या शहराला आतूनच तडे जात आहेत.

टिफिन टॉप, इको केव्ह गार्डन, नैनी लेक बोटिंग, स्नो व्ह्यू पॉइंट, नैना पीक, पंडितजी बी पंत जी प्राणीसंग्रहालय, नैना देवी मंदिर अशी येथील अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. नैनितालपासून १२ किलोमीटर अंतरावर खुरपाताल तलाव आहे, जो चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. कधीकधी या तलावाच्या पाण्याचा रंग बदलताना दिसतो. असे म्हणतात की, डझनभर प्रकारचे शैवाळ त्याच्या आत वाढतात आणि जेव्हा त्यांच्या बिया तयार होतात, तेव्हा तलावाचा रंग बदलतो. येथे पर्यटन होत नसल्यामुळे तलावाचे पाणी स्वच्छ आणि उबदार आहे.

कडाक्याच्या थंडीतही तलावाचे पाणी कोमट राहाते. ते कधीकधी लाल, हिरवे किंवा निळे दिसते. मात्र, मानवी अपप्रवृत्तीमुळे तलावात गटाराचे पाणी वाहू लागले आहे.

सुविधांचा अभाव

विस्कळीत व्यवस्थेमध्ये पर्यटन सोपे नाही. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आगाऊ बुकिंग असूनही काही वेळा पार्किंग अवघड होते. प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याच्या इच्छेने एखादी व्यक्ती इतर खर्च कमी करून पैसे वाचवते आणि चांगले पैसे खर्च करूनही अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, तेव्हा त्याला नक्कीच वाईट वाटते.

नैनितालमध्ये भरपूर उपाहारगृहे आहेत, पण पार्किंगची सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही. एक काळ असा होता की, रस्त्यांवरही पार्किंग होत असल्याचे पाहायला मिळायचे, परंतु वाढत्या गर्दीमुळे ‘नो पार्किंग’ धोरणाची अंमलबजावणी काही वर्षापूर्वीपासून लागू करण्यात आली आहे. अनेकदा उपाहारगृह बुकिंगच्या वेळी पार्किंगची सुविधा असल्याचे पर्यटकांना सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात ती उपलब्ध होत नाही. पर्यटकांना फसल्यासारखे वाटते. अशा स्थितीत त्यांचे उपहारगृह मालक किंवा पोलिसांशी वाद होणे, सर्रास घडते.

हंगामात मॉल रोडवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाहने फ्लॅट, टॅक्सी स्टँड पार्किंग किंवा कुमाऊ मंडल विकास महामंडळाच्या पार्किंगमध्ये पार्क केली जातात. पार्किंग आणि बुकिंग नसलेल्या पर्यटकांना नैनितालच्या काही किलोमीटर आधी रशियन बायपासवर तात्पुरत्या पार्किंगमध्ये थांबवले जाते. तेथून शटल सेवेची सोय आहे, पण बहुतांश पर्यटकांना आपली वाहने बेवारस सोडायची नसतात. त्यामुळेच या प्रसिद्ध ठिकाणांबाबत पर्यटकांचा भ्रमनिरास होत असून ते पर्यटनाची नवी क्षेत्रे शोधत आहेत.

वाहतुकीत गैरसोय

रस्त्यावरील विक्रेतेही पर्यटकांसाठी त्रासदायक ठरतात. जवळपास सर्वच शहरांमध्ये ते पदपथांवर बसतात, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. आजकाल इतर शहरातील व्यापारी रात्रीच्या वेळी ट्रकमध्ये माल भरून आणून रस्त्याच्या कडेला कोणतीही परवानगी न घेता आपली दुकाने थाटत असल्याच्याही बातम्या येत आहेत. यामध्ये मुख्यत: चिनीमातीची भांडी आणि कुंड्या असतात.

अनेकवेळा त्यांचे सामान मनपाने जप्त केले तरी ते काही दिवसांनी परत येथे येतात. गैरसोयीच्या आणि अनागोंदीच्या अशा बातम्या ऐकूनही हे शहर कधीच ओसाड दिसत नाही तर नवनवीन पर्यटकांनी गजबजलेले राहाते.

कोणत्याही त्रासाचा नैनितालच्या प्रतिमेवर काहीही परिणाम झालेला नाही, कारण वृत्तपत्र पाहिल्यावर असे दिसून आले की नैनितालच्या उपहारगृहांमध्ये पुढील काही महिन्यांसाठी प्रचंड बुकिंग झाले आहे. १५ एप्रिल ते १५ जुलै हा इथला उन्हाळा मानला जातो. हे शहर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. यापैकी, नैनिताल न पाहिलेल्या नवीन पर्यटकांची संख्या जास्त आहे.

नैनितालच्या आजुबाजूला भीमताल, धनचुली आणि रामनगरसारखी छोटी शहरे आहेत, जी वेगाने पर्यटन स्थळे म्हणून उदयास येत आहेत. रामगडबद्दल बोलायचे झाले तर उन्हाळ्यात पीच, जर्दाळू आणि नाशपाती यांनी बहरलेली झाडे पाहून मन मोहून जाते. महादेवी वर्माजी अनेक वर्षांपूर्वी रामगढ येथे आले होते, त्यामुळे या ठिकाणाला साहित्यिक नकाशावर महत्त्वाचे स्थान आहे. येथे महादेवी पीठाचीही स्थापना करण्यात आली असून, तेथे वेळोवेळी साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आता छोट्या शहरांमध्येही पर्यटन व्यवसाय फोफावत आहे. धनचुली हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक छोटेसे गाव मुक्तेश्वरच्या वाटेवर असले तरी आज देशाच्या नकाशात त्याला महत्तवाचे स्थान आहे. कुमाऊँ लिटरेचर फेस्टिव्हलचे सत्रही येथे आयोजित करण्यात येते. ही सर्व ठिकाणे कॉटेज लाउंज आणि उपहारगृहांनी भरलेली आहेत, जिथे पर्यटक शांत वातावरणात निसर्गाचे जवळून निरीक्षण करू शकतात. मैदानी प्रदेशातून येणाऱ्या बहुतांश पर्यटकांची पसंती ही आयुष्यातील काही दिवस गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात, थंडगार आल्हाददायक वाऱ्यांचा आनंद घेत घालवण्याला असते.

नवीन ठिकाणे शोधणारे पर्यटक

पर्यटनाला चालना देण्यासाठी नैनिताल व्यतिरिक्त भवाली आणि आजूबाजूची छोटी शहरे कुमाऊनी शैलीत सजवली जात आहेत, जेणेकरून ती पर्यटकांना आकर्षित करू शकतील. छोट्या शहरांकडे पर्यटकांना आकर्षित करणे मोठ्या शहरांमधील लोकसंख्येचा दबाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, याशिवाय छोट्या शहरांनाही पर्यटनाचा फायदा होईल.

२८ ते ३० मार्च २०२३ या कालावधीतील जी २० प्रतिनिधींच्या तीन दिवसीय परिषदेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलेले नैनिताल जिल्ह्यातील रामनगर हे छोटे शहर पर्यटकांमध्ये आधीच खूप लोकप्रिय आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील कॉर्बेट टायगर रिझर्व्ह पार्क, जिथे पर्यटक खुल्या जीपमधून फिरण्याचा आनंद घेऊ शकतात, त्यासोबतच हत्तीवरून फिरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. पर्यटकांचा कल लक्षात घेऊन रामनगरच्या ढिकुली परिसरात अनेक उत्कृष्ट उपहारगृहे बांधण्यात आली आहेत.

पर्यटक आता नवनवीन ठिकाणे पाहाण्यासाठी उत्सुक आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकेकाळी आकर्षणाचे केंद्र असलेले हे शहर सुविधांपासून वंचित झाले आहे आणि दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे आज इंटरनेटच्या विस्तारामुळे त्या ठिकाणांची माहिती घेणे सोपे झाले आहे, शिवाय अनेक व्हिडीओ आणि माहितीही उपलब्ध झाली आहे, ज्याच्या मदतीने पर्यटक येथे पोहोचत आहेत. अलीकडे, हरयाणातील काही व्यावसायिक पर्यटक, जे नैनितालमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते, ते गर्दीच्या शहरांपासून दूर शांत ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती शोधत होते. डोंगरावर येऊन इथली जीवनशैली, राहणीमान, खाद्यपदार्थ जाणून घेणे हे त्यांचे प्राधान्य होते.

आज तरुण पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे आणि एक नवीन संज्ञा उदयास आली आहे, ज्याला हेरिटेज वॉक असे नाव देण्यात आले आहे. दुर्गम भाग जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोक तिथे जातात. त्यामुळे तिथे घरातील वास्तव्याचा कल वाढला आहे. दुर्गम खेड्यांमध्ये लोकांनी आपली घरे पर्यटकांसाठी सोयीस्कर निवासस्थानात रूपांतरित करून घरासारखी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्कृतीला ‘घरापासून दूर घर’ असे नाव देण्यात आले आहे. पर्यटकांनाही येथे भरपूर वैविध्य पाहायला मिळते. त्यांना पहाडी जेवण दिले जाते. ज्यामध्ये मडूवे रोटी, झिंगोरे खीर, कुलथ डाळ, लाल तांदळाचा भात, काकडीचे झिलमल आणि मोहरी रायता दिला जातो.

संरक्षण आणि संवर्धनाची गरज

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज पर्यटक शांत आणि गूढ अशी थोडी वेगळी ठिकाणे निवडत आहेत. विशेषत: तरुण पर्यटकांचा या दिशेने कल वाढत आहे. पर्यटनाबरोबरच संशोधन करणारे काही रिसर्च स्कॉलरही आहेत. डोंगराळ ग्रामीण भागात पाताळ म्हणजेच दगडी छतावरील घरांचाही समावेश होतो, ज्यांची संख्या आता फारच कमी आहे आणि त्यांच्या संरक्षण तसेच संवर्धनाची गरज भासू लागली आहे.

दरवर्षी उत्तराखंडच्या सर्व हिल स्टेशन्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, याची येथील रहिवाशांनाही तीव्र जाणीव आहे. यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्याचाही ऱ्हास होत आहे. पर्यटनाचा आराखडा तयार होऊन त्याचे योग्य मूल्यमापन झालेले नाही. इंग्रजांनी हिल स्टेशन्स बांधली खरी, पण आम्ही नरकाचे दरवाजे उघडले.

तीर्थयात्रेच्या नावाखाली पर्वतांचे पावित्र्य आणि स्वच्छता नष्ट केली गेली आहे. आदरातिथ्य आणि पर्यावरण रक्षणाच्या भावनेच्या पलीकडे जेव्हा पर्यटन हा निखळ व्यवसाय बनतो, तेव्हा ते कोणत्याही ठिकाणाचे भाग्य ठरते. पर्यटन सुरळीत चालू ठेवण्यासाठी पर्यटनाची आकडेवारी आणि पर्यटन आराखडा बनवण्याची गरज फार पूर्वीपासून जाणवत होती.

या क्रमाने, नैनितालजवळील टाकुला गावात सुमारे २ कोटी रुपये खर्चून अॅस्ट्रो व्हिलेज बनवण्याची योजना आहे. स्टार गेझिंगच्या सुविधेशिवाय, कुमाऊनी सांस्कृतिक शैलीदेखील त्याच्या बांधकामात भाग आहे. खगोल पर्यटन हे वैज्ञानिक पर्यटनाच्या श्रेणीत येते आणि जर एखाद्याला अवकाशाविषयी प्राथमिक माहिती असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होणार आहे.

येथून पर्यटकांना उघड्या डोळ्यांनी शुक्र, मंगळ यांसारखे ग्रह पाहाता येतील. देशाव्यतिरिक्त विदेशी पर्यटकांसाठीही ते आकर्षणाचे केंद्र बनेल, अशी अपेक्षा आहे, आर्यभट्ट निरीक्षण विज्ञान संशोधन संस्था, एरिजच्या सहकार्याने बनवले जाणारे हे विशेष प्रकारचे मॉडेल असेल, ज्याच्या छतामध्ये आरसा असेल, जेणेकरुन हिवाळ्यात खोलीच्या आतून आकाश पाहाता येईल.

पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या भवनांसमोर हिरवेगार डोंगर आहेत. येथे एक अत्याधुनिक दुर्बीणही बसवण्यात आली आहे, हे ग्रह आणि नक्षत्र पाहाण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. आगामी काळात अशी ठिकाणे पर्यटकांना आवडतील, अशी अपेक्षा आहे.

असं जगा स्वत:चं आयुष्य

* प्रज्ञा पांडेय मनु

है तुझे भी इजाजत कर ले तू भी मुहब्बत….’ हे गाणं सुरू होतं आणि मी विचार करू लागली की प्रेम करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का? प्रेमाबद्दल तर असं म्हटलं जातं की ही ती आग आहे जी न लावता लागते आणि न विझवता विझते. तर जर ही आग कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत लागली असेल तर त्या स्त्री वा पुरुषाने काय करावं.

आता काय फरक पडतो की तो विवाहित आहे का अविवाहित. जर वैवाहिक आयुष्य खूपच कंटाळवाणं आहे. बस आयुष्य असंच चाललं आहे. जबाबदारीचं ओझं मनात नसतानादेखील वाहण्याला आयुष्य म्हटलं जात नाही.

तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेद आहेत वा मन जुळत नाहीये आणि तुम्ही मुलं आणि कुटुंबीयांसाठी समाजात एकत्र आहात. मनात कोणतीही आशा वा तरंग नाहीये, तर अशावेळी तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल, ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन व्यक्त करता वा तो दोन प्रेमाचे शब्द बोलतो आणि मग त्या शब्दांची जादुने तुम्हाला दिवसभर मोहविते, तुम्ही गुणगुणत राहता, आरसा पाहून स्वत:ला सजवता तर यामध्ये काय वाईट आहे? माझ्या मते तर काहीच चुकीचं नाहीये.

स्वत:चं समाधान गरजेचं

तुम्ही तुमच्या तनामनाचे समाधान करू शकता आणि इश्क मोहब्बत तर प्रत्येक काळात झालं होतं, होत आहे आणि पुढेदेखील होणार. हे खरं आहे की वैवाहिक आयुष्यात एखादा परपुरुषाशी प्रेम होता कामा नये परंतु जर वय वैवाहिक आयुष्यात आपापसात प्रेम नसेल आणि जर बाहेर कोणाशी प्रेम जमलं तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये.

हा निसर्गाचा नियम आहे की जी जमीन उजाड असते निसर्ग त्याला त्याच्या हिशोबाने रान, गवताने भरतो म्हणजेच वैवाहिक लोकांचं प्रेमरूपी मन रिकामी कुंडी रहायला नको, परंतु जर रिकामी वा ते उजाडलेलं असेल तर निसर्ग त्यामध्ये त्याच्या हिशोबाने एखादी वनस्पती उगवतं. हा नियम शाश्वत आहे.

कुठे आहे बुद्धिमत्ता

तर नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांनो स्वत:ला मारणं कुठची हुशारी आहे आणि हे तर आपण पौराणिक कथांमध्ये देखील वाचतो. देवतादेखील प्रेम करतात मग आपण तर माणसं आहोत. जर कोणाला खरं प्रेम मिळत असेल तर ते नाकारणं कोणता समजूतदारपणा नाहीये. जर तुम्ही कोणत्या कारणांनी जोडीदारा सोबत आनंदी नसाल, तर कोणालाच तुम्ही आनंद देऊ शकत नाही. जर तुम्ही तुमचं तन्मन एखाद्याकडे व्यक्त करत असाल तर त्यामध्ये काही चुकीचं काम नाहीये. थोडं विचित्र वाटू शकतं लोकांना कारण आपल्या देशामध्ये आजदेखील काही मुद्द्यांवरती लोकं मोकळेपणाने बोलत नाहीत.

आयुष्य पुन्हा मिळणार नाही

असं अजिबात होता कामा नये की उद्या ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करेल आणि तुम्ही समाजाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही आणि विनोदाचं पात्र बनाल, ते वेगळंच. परंतु जर खरं प्रेम तुम्हाला मिळत असेल, जे काही कारणाने तुमच्या दाम्पत्य जीवनात नाहीये, तर तुम्ही ते प्रेमाने स्वीकारायला हवं कारण आयुष्य काही पुन्हा मिळणार नाही.

आयुष्य जगण्यासाठीच बनलेलं आहे आणि जगण्यासाठी जोडीदार हवा आणि हे गरजेच नाहीये की जीवनसाथी तुमचा खरा साथी असावा. आदर्श व्यवस्था तर हीच आहे की जीवनसाथीकडून भरपूर प्रेम, सहकार्य आणि सहयोग मिळालं, परंतु जर हे काही कारणांमुळे मिळत नसेल तर तुम्हाला पूर्ण हक्क आहे ते प्रेम मिळवण्याचा.

लक्षात ठेवा

जीवन जीना सहज न जाने
बहुत बडी फनकारी है
खुद को भी खुश रखना
खुद की ही जिम्मेदारी है

म्हणजेच सर्वांना आनंदी ठेवणं पुरेसं नाहीये स्वत:ला देखील खुश ठेवायला हवं.

सुपर वुमन बनत चाललेल्या गृहिणी

* मोनिका अग्रवाल

आजच्या काळात पत्नीने नोकरी केली पाहिजे तरच घर नीट चालेल, असा समज वाढत आहे. महागाईसोबतच याचे एक कारण हेही आहे की, गृहिणींचे काम नोकरदारांच्या बरोबरीचे मानले जात नाही. अलीकडेच एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, गृहिणीचे काम पगार मिळवणाऱ्या जोडीदारापेक्षा कमी नसते. न्यायालयाने गृहिणीच्या योगदानाचे वर्णन ‘अमूल्य’ असे केले आहे. तुम्ही तुमचे काम पैशात तोलू शकत नाही
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलेला विशेष महत्त्व आहे. कुटुंबासाठी त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन पैशांत करता येत नाही. मोटार अपघात प्रकरणातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिकरणाने ही टिप्पणी केली.

असे आहे प्रकरण

खरं तर २००६ मध्ये उत्तराखंडमधील एका महिलेचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती तिचा विमा उतरवला नव्हता. जेव्हा कुटुंबाने विम्यासाठी दावा केला तेव्हा न्यायाधिकरणाने महिलेच्या पती आणि अल्पवयीन मुलाला अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, न्यायाधिकरणाने महिलेला दिलेल्या विम्याची रक्कम कमी होती.

कुटुंबाने आणखी भरपाई मागितली. न्यायाधिकरणाच्या या निर्णयाला उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. महिला गृहिणी होती, त्यामुळे आयुर्मान आणि किमान अंदाजित उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनावर नाराजी व्यक्त केली, ज्यामध्ये महिलेचे अंदाजे उत्पन्न इतर नोकरदार व्यक्तींच्या तुलनेत कमी मानले गेले. न्यायालयाने असे म्हटले की, गृहिणीचे उत्पन्न हे नोकरदार व्यक्तीपेक्षा कमी कसे मानले जाऊ शकते? आम्ही हा दृष्टिकोन योग्य मानत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ६ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही गृहिणीचे अंदाजे उत्पन्न तिची मेहनत, परिश्रम आणि त्यागाच्या आधारे मोजले गेले पाहिजे. जर गृहिणीच्या कामाची गणना केली तर हे योगदान अमूल्य आहे. सुप्रीम कोर्टाने ६ आठवड्यांच्या आत कुटुंबाला पैसे देण्याचे निर्देश देताना म्हटले की, गृहिणीचे मूल्य कधीही कमी लेखू नये.

करोडो गृहिणींना मिळाला सन्मान

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आणि टिप्पणी म्हणजे भारतातील त्या करोडो महिलांना सन्मान देण्यासारखेच आहे, ज्या आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात रात्रंदिवस निस्वार्थपणे मग्न आहेत, अशा गृहिणी ज्या स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात, ज्यांना वर्षभरात सुट्टी मिळत नाही. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील सुमारे १५९.८५ दशलक्ष महिलांनी सांगितले की घरगुती काम हे त्यांचे प्राधान्य आहे. तर यासाठी पुरुषांची संख्या केवळ ५.७९ दशलक्ष होती.

रोज ७ तास करतात घरातील काम

आयआयएम अहमदाबादच्या अभ्यासानुसार, भारतातील महिला आणि पुरुष यांच्यात कामाच्या वेळेत फार मोठा फरक आहे. देशातील १५ ते ६० वर्षे वयोगटातील महिला दररोज सरासरी ७.२ तास घरातील कामांमध्ये घालवतात. या कामासाठी त्यांना कोणतेही मानधन दिले जात नाही तर पुरुष अशा कामात दिवसाचे २.८ तास घालवतात.

गोवा साहसात मजा

* सोमा घोष

एक काळ असा होता की लोक फक्त समुद्रकिनारे, प्राचीन वारसा, ड्रग्जचा वापर आणि पार्टीसाठी गोव्यात येत असत. तथापि, आजच्या तरुणांनी गोव्याच्या पर्यटनाकडे एक अनोखा दृष्टिकोन विकसित केला आहे. साहसी पर्यटन, जिथे ते कायाकिंग, उडी मारणे, पतंग सर्फिंग, केळी सवारी, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग आणि बरेच काही यासह विविध साहसी खेळांचा आनंद घेतात. गोव्यातील या उपक्रमांमुळे सर्वाधिक पर्यटक आणि साहसी प्रेमी आकर्षित होत आहेत.

आज, गोवा हे साहसी उपक्रमांसाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. २०२३ च्या तुलनेत, डिसेंबर २०२४ मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत २७ टक्के वाढ झाली आहे. अहवालांनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये गोव्याने रू. ७५.५१ दशलक्षपेक्षा जास्त महसूल मिळवला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

जर तुम्हाला तुमचा गोवा प्रवास रोमांचक आणि मजेदार बनवायचा असेल, तर गोव्यात या उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, परंतु या साहसी खेळांसाठी काही नियम आधीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) सुरक्षित आणि रोमांचक अशा अनेक साहसी खेळांचे आयोजन करते. गोव्यात सध्या ट्रेंडिंग असलेल्या काही खेळांबद्दल जाणून घेऊया:

बंजी जंपिंग

उत्तर गोव्यातील मेम लेकमध्ये बंजी जंपिंग खूप लोकप्रिय आहे. येथे, पर्यटकांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडसारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करून या खेळाची ओळख करून दिली जाते. हे माजी लष्करी अधिकाऱ्यांद्वारे पर्यवेक्षित केले जाते जे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित जंप मास्टर आहेत आणि शिस्त, वास्तववाद आणि सुरक्षित वर्तनात तज्ज्ञ आहेत. २०१०पासून, त्यांनी जवळजवळ १,५०,००० उड्या मारल्या आहेत, ज्यांचा पर्यटकांनी आनंद घेतला आहे. १२ ते ४५ वयोगटातील, ४० ते ११० किलोग्रॅम वजनाचे कोणीही सहभागी होऊ शकते. तथापि, उच्च रक्तदाब असलेले, फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रिया झालेले, अंतर्निहित वैद्यकीय आजार असलेले, न्यूरोलॉजिकल विकार असलेले आणि गर्भवती महिलांनी ते टाळावे.

स्कूबा डायव्हिंग

गोव्याच्या खोल निळ्या पाण्यात सागरी जग एक्सप्लोर करणे हा पर्यटकांसाठी खरोखरंच एक अनोखा अनुभव आहे. स्कूबा डायव्हिंग तुम्हाला सुंदर प्रवाळ खडक आणि समद्री शैवाल एक्सप्लोर करण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त, स्फटिकासारखे स्वच्छ पाण्यात रंगीबेरंगी मासे एक संस्मरणीय दृश्य आहे. तुमच्या प्रवासात प्रशिक्षक तुमच्यासोबत असतात. बॉडी गियर आणि श्वासोच्छवासाची उपकरणे देखील दिली जातात. स्कूबा डायव्हिंग शुल्क रू. २,९९९ अधिक जीएसटी आहे.

गोव्यातील ग्रँड आयलंड आणि पिजन आयलंड येथे हा उपक्रम उपलब्ध आहे. नवशिक्या आणि अनुभवी डायव्हर्स दोघेही त्यांचा आनंद घेऊ शकतात. ५ ते १० वर्षे वयोगटातील मुले आणि वैद्यकीय आजार असलेले लोक बोट ट्रिप मोफत घेऊ शकतात. डायव्हिंग करण्यापूर्वी सर्व अभ्यागतांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि प्रमाणित प्रशिक्षकाकडून त्यांना ब्रीफिंग सत्र दिले जाते. डायव्हिंग करण्यापूर्वी डायव्ह गियर आणि वेटसूटसह सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जाते.

कोकण एक्सप्लोरर्स

ही लहान गटांसाठी आयोजित केलेली एक खास खाजगी बोट ट्रिप आहे. या ट्रिपमुळे पर्यटकांना गोव्याच्या जलमार्गांचा शांत आणि रोमांचक पद्धतीने अनुभव घेता येतो, ज्यामुळे त्यांना आरामदायी अनुभव मिळतो. ते गोव्याच्या चित्तथरारक समद्री दृश्यांचा आनंद घेतात, तसेच लपलेल्या बेटे आणि खारफुटींचे अन्वेषण करण्याची संधी देतात. सुरक्षिततेसाठी, या ट्रिपमधील पर्यटकांना प्रशिक्षित डायव्हर, एक जॅकेट आणि एक व्यवस्थित देखभाल केलेली बोट दिली जाते.

पॅरामोटरिंग

हा एक रोमांचक अनुभव आहे जो पर्यटकांना उड्डाणाचा थरार अनुभवण्याची आणि सुंदर हवाई दृश्यांचा आनंद घेण्याची परवानगी देतो.

पॅरामोटरिंग जग पाहण्याचा एक अनोखा मार्ग देते. हा खेळ ऑक्टोबर ते जून दुपारी १ ते सूर्यास्तापर्यंत उपलब्ध आहे. तो गोव्याचे सुंदर लँडस्केप पाहण्याची संधी देतो. ते पाहण्यास भितीदायक आहे, परंतु तो खरोखरंच एक अनोखा अनुभव आहे. त्याची उड्डाण ६ ते १० मिनिटे चालते आणि ५ ते ९० वयोगटातील लोकांसाठी खुली आहे. वजन मर्यादा १०० किलोग्रॅम आहे. या साहसाची किंमत रू. ४,७२० आहे. त्याचे सुरक्षा मानके खूप कडक आहेत आणि ऑपरेटर हे प्रमाणित वैमानिक आहेत जे पर्यटकांना सुरुवात करण्यापूर्वी या खेळाबद्दल सर्व माहिती देतात, ज्यामुळे सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळतो.

वॉटर स्कीइंग

हा खेळ जितका मजेदार आहे तितकाच धोकादायकही आहे. या उपक्रमात, दोरी स्कीला बांधली जाते आणि दुसरे टोक स्पीडबोटीला बांधले जाते. बोट हलत असताना, व्यक्ती दोरीला धरून पाण्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करते. ५ वर्षांखालील मुलांना सहभागी होण्याची परवानगी नाही आणि त्याचे शुल्क रू. ५०० ते रू. १,२००पर्यंत आहे. हा खेळ बागा बीच, मजोर्डा बीच आणि मोबोर बीचवर दिला जातो.

जेट स्कीइंग

तुम्ही हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींना जेट स्कीइंग करताना पाहिले असेल, परंतु तुम्ही गोव्यात या उपक्रमाचा आनंद घेऊ शकता. जेट स्कीइंग हा पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय खेळ आहे, जिथे जेट स्की उच्च वेगाने वर जाते आणि खाली पडते, लाटांना प्रतिसाद देते. जेट स्कीइंगचा उच्च वेग रायडर्स आणि मागे बसलेल्या दोघांनाही ताजेतवाने भिजण्याचा अनुभव देतो. जर तुम्ही या खेळात नवीन असाल, तर तुम्ही प्रशिक्षकासोबत सराव करू शकता. कॅन्डोलिम बीच, बागा बीच आणि व्हेगेटर बीच येथे जेट स्कीइंगची सुविधा आहे. शुल्क रू. ५००पासून सुरू होते.

बनाना राईड

केळीची राईड ही गोव्यात दिली जाणारी एक मजेदार साहसी क्रिया आहे. या राईडमध्ये, तुम्ही बनानाच्या आकाराच्या बोटीत बसून वेगाने पाण्यातून सरकता. ७ वर्षांखालील मुलांना या खेळात भाग घेण्याची परवानगी नाही. गोव्यात कॅन्डोलिम बीच, बागा बीच, अंजुना बीच आणि अगोंडा बीच येथे बनानाची राईड दिली जाते. एका वेळी ६ लोकांपर्यंत ही राईड चालवता येते. ४ जणांच्या गटाची किंमत रू. १,४०० आहे.

व्हाईट वॉटर राफ्टिंग

जून ते सप्टेंबर दरम्यान गोव्यात वालपोईजवळील महादयी नदीवर, ज्याला मांडवी नदी म्हणूनही ओळखले जाते, व्हाईट वॉटर राफ्टिंगची सुविधा दिली जाते. सत्रे दिवसातून दोनदा, सकाळी १० आणि दुपारी ३ वाजता आयोजित केली जातात आणि आगाऊ बुकिंग उपलब्ध आहे. हा खेळ सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत असल्याने नवशिक्यांसाठीदेखील योग्य आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले सहभागी होऊ शकतात आणि प्रति व्यक्ती शुल्क रू. १,८०० आहे. जर तुम्ही आगाऊ बुकिंग केले असेल आणि जाऊ शकत नसाल, तर ट्रिपच्या ४८ तासांच्या आत रद्द केल्यास तुम्हाला ५० टक्के परतावा मिळू शकतो. हा एक मजेदार खेळ आहे जो खरोखरंच अनोखा अनुभव देतो. सुरक्षिततेसाठी, तुम्हाला प्रमाणित मार्गदर्शक, लाईफ जॅकेट आणि हेल्मेटची आवश्यकता असेल.

विंड सर्फिंग

विंड सर्फिंग हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय साहसी खेळांपैकी एक आहे. या खेळासाठी पाण्यात सर्फबोर्डवर संतुलन राखणे आवश्यक आहे. हे सोपे वाटत असले तरी, ते करणे खूप आव्हानात्मक आहे. कॅलंगुट बीच, व्हेगेटर बीच, कोल्वा बीच, मिरामार बीच आणि डोना पॉला बीच येथे विंड सर्फिंग हा एक लोकप्रिय क्रियाकलाप आहे. शुल्क ४०० ते ८०० रुपयांपासून सुरू होते.

गोव्यात कयाकिंग

गोव्यात मित्रांसोबत कयाकिंग करण्याची मजा इतर कोणत्याही क्रियाकलापात क्वचितच अनुभवता येते. कयाकिंगमध्ये विशेषत: डिझाइन केलेली बोट चालवणे समाविष्ट आहे जी तुम्हाला आजूबाजूच्या सुंदर लँडस्केपमधून घेऊन जाते. गोव्यात कयाकिंग हा देशी आणि परदेशी पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय क्रियाकलाप आहे.

स्मार्ट ट्रॅव्हलर टिप्स: स्मार्ट ट्रॅव्हलर कसे व्हावे

* रितू प्रिया शर्मा

स्मार्ट ट्रॅव्हलर टिप्स: प्रवास करणे ही स्वतः एक कला आहे. पर्यटनाची मजा घेणे हा प्रत्येकाचा व्यवसाय नाही. म्हणून, जर आपण प्रवास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तर आपण सहज प्रवास करू शकतो आणि त्याचा पूर्ण आनंद घेऊ शकतो. तथापि, जर आपण थोडीशीही गोष्ट चुकवली तर संपूर्ण ट्रिप वाया जाऊ शकते. सर्वप्रथम, आपला प्रवास आपल्या बजेटमध्ये, आरामदायी आणि आपल्याला आनंददायी बनवण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबता येतील हे समजून घेणे आवश्यक आहे. तर, आपला प्रवास आनंददायी बनवण्यासाठी काही प्रवास टिप्स पाहूया:

धीर धरा

सर्वप्रथम, प्रवासात अडचणी सामान्य आहेत. वेळेतील चढउतार, सहली नियोजनानुसार न होणे आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला अनेकदा त्रास देतात. अशा परिस्थितीत, संयम न गमावता तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या. धीर धरा आणि प्रवास जीवनाचे नवीन पैलू कसे प्रकट करतो ते पहा.

यादी बनवा

हे खरे आहे की आपण सर्व गोष्टींचे नियोजन करू शकत नाही, परंतु आपण काही गोष्टींची यादी नक्कीच बनवली पाहिजे, कारण जर आपण फक्त काहीतरी मनात ठेवले तर आपण ते विसरू शकतो. म्हणून, आपण प्रवासादरम्यान उपयुक्त ठरणाऱ्या आवश्यक वस्तूंची यादी बनवली पाहिजे, जसे की: ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.

रेल्वे/बस/विमान तिकिटे

आपण स्वतः गाडी चालवत असल्यास ड्रायव्हिंग लायसन्स.

हॉटेल बुकिंगची प्रत.

रोड (कारण ते खूप महत्वाचे आहे) आणि एटीएम कार्ड.

हवामानानुसार कपडे घालणे, जसे की हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळी कपडे.

आरामदायक शूज आणि चप्पल.

सनग्लासेस, टोपी आणि रुमाल.

आरामदायक रात्रीचे कपडे.

पावसाळ्यात रेनकोट आणि छत्री आणायला विसरू नका.

नियमित औषधे.

वेदनाशामक आणि तापाचे औषध.

अँटीसेप्टिक क्रीम आणि बँडेज.

मास्क आणि हँड सॅनिटायझर.

मोबाइल फोन, चार्जर आणि पॉवर बँक.

कॅमेरा आणि इअरफोन्स इ.

प्रवास विमा

जर तुम्ही मोठ्या खर्चासह लांबच्या प्रवासाला जात असाल, तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. प्रवास विमा खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान आजारी पडलात किंवा जखमी झालात, तर विमा कंपनी रुग्णालयाचा खर्च भागवते. जर तुमचे सामान किंवा पासपोर्ट हरवले तर विमा हे खर्च देखील भागवू शकतो. जर फ्लाइट रद्द झाली किंवा उशीर झाला, तर विमा कंपनी अनेकदा तिकीट आणि हॉटेलचा खर्च भागवते. जर तुम्ही परदेशात असाल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा परत येण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला तर विमा कंपनी मदत करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विमा खरेदी केल्यानंतर तुम्हाला सुरक्षित वाटते.

प्रवास विमा कसा मिळवायचा

सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे प्रवास विमा खरेदी करणे. अनेक कंपन्या यासाठी विमा देतात, ज्याची माहिती ऑनलाइन मिळू शकते.

तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल: प्रवासाच्या तारखा, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत.

प्रवासाचे कारण, प्रवाशांची नावे आणि वय आणि पासपोर्ट क्रमांक (जर तुम्ही परदेशात प्रवास करत असाल तर). ऑनलाइन पैसे भरता येतात आणि पॉलिसी लगेच ईमेल केली जाते. अनेक ट्रॅव्हल एजन्सी तिकिटे बुक करताना विमा देखील देतात आणि काही बँका आणि क्रेडिट कार्ड देखील मोफत प्रवास विमा देतात. तुम्ही तुमच्या बँकेकडून याबद्दल माहिती मिळवू शकता. प्रवासाच्या ठिकाणानुसार किंमत बदलते. भारतात प्रवास करत असाल किंवा परदेशात, किंमत बदलू शकते.

महत्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती

परदेश प्रवास करताना, आपल्याला पासपोर्टसारखे महत्त्वाचे कागदपत्रे दाखवावी लागतात, म्हणून या कागदपत्रांच्या छायाप्रती ठेवा. परदेश प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे:

ओळखपत्रांच्या छायाप्रती, आमच्या तिकिटांच्या प्रती

तुमच्या हॉटेल बुकिंगची प्रत; तुमच्या प्रवास विम्याची प्रत; परदेश प्रवास करत असाल तर तुमच्या पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांची छायाप्रत.

तुमच्या व्हिसा पृष्ठाची छायाप्रत, परंतु तुमचा मूळ पासपोर्ट नेहमी तुमच्यासोबत ठेवा आणि तुमच्या मूळ पासपोर्टची प्रत वेगळ्या बॅगेत ठेवा.

तुमच्या एटीएम किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकांची प्रत, पूर्ण क्रमांक नाही, फक्त शेवटचा अंक आणि बँकेचे नाव, बँक हेल्पलाइन क्रमांकांची लेखी यादीसह. जर ते चोरीला गेले किंवा हरवले तर ते त्वरित ब्लॉक करण्यास हे तुम्हाला मदत करेल.

आरोग्य सुरक्षेसाठी, आवश्यक औषधांसाठी एक प्रिस्क्रिप्शन ठेवा आणि जर तुम्हाला काही अंतर्निहित वैद्यकीय समस्या असतील तर तुमच्या वैद्यकीय इतिहासाची आणि रक्तगटाची नोंद ठेवा.

एक अतिरिक्त सूचना म्हणजे तुमच्या मोबाइल फोन आणि ईमेलवर तुमच्या पीडीए किंवा फोटो फॉर्ममध्ये सर्व कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवा आणि पाणी आणि फाटण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या फोटोकॉपी पारदर्शक झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.

दिवसासाठी तुमचे कपडे आखा: उदाहरणार्थ, पहिल्या दिवशी हलके आणि आरामदायी कपडे घाला, दुसऱ्या दिवशी सुंदर ड्रेस घाला आणि तिसऱ्या दिवशी जड ड्रेस घाला आणि चौथ्या दिवशी सुंदर फोटो काढण्यासाठी कपडे घाला. बाकीचे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.

इतर आवश्यक कपडे: अंडरवेअर, नाईट सूट, शॉर्ट्स आणि चप्पल.

हॉटेल आणि प्रवासाची तिकिटे प्री-बुकिंग

तुम्ही सहलीला जाण्यापूर्वी तुमचे हॉटेल आणि प्रवासाची तिकिटे बुक करावीत, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कल्पना करा की तुम्ही सहलीला निघाला आहात आणि तुम्हाला ट्रेनची तिकिटे किंवा हॉटेलची खोली सापडत नाही, तर तुमचा संपूर्ण प्रवास वाया जाईल. प्री-बुकिंग अनेक प्रकारे फायदेशीर आहे:

तुम्ही राहण्याची हमी देता

तुम्ही पैसे वाचवता कारण तुम्हाला आगाऊ बुकिंग करून सवलतीच्या ऑफर मिळू शकतात आणि शेवटच्या क्षणी खोल्या महाग असू शकतात.

तुम्ही वेळ वाचवाल. हॉटेल शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवत नाही. ऑनलाइन तिकिटे बुक करताना, आम्हाला प्रवास तिकीट आणि हॉटेल बुकिंग कागदपत्रे दोन्ही मिळतात. हे कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवली जातात.

हॉटेल कसे बुक करावे

तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून हॉटेल सहजपणे बुक करू शकता. यासाठी अनेक लोकप्रिय वेबसाइट्स आहेत. हॉटेलचे स्थान, किंमत आणि फोटो तसेच त्यांच्या पुनरावलोकनांचा आढावा घेतल्यानंतर, तुम्ही त्यांना निवडू शकता आणि ऑनलाइन पेमेंटद्वारे तुमचे हॉटेल बुक करू शकता. ट्रॅव्हल एजन्सी अनेकदा बुकिंग सेवा देतात, म्हणून तुम्ही त्यांचा वापर देखील करू शकता. हॉटेल बुक करताना, तुम्ही रद्द करण्याचे धोरण समजून घेतले पाहिजे. मोफत नाश्ता, वाय-फाय, पार्किंग आणि इतर सुविधा तपासा आणि पुनरावलोकनांचा आढावा घ्या.

तुमचे सर्व कागदपत्रे सोबत ठेवा आणि तुमच्या पेमेंट पावत्या जवळ ठेवा. त्याचप्रमाणे, तुमचे प्रवास तिकीट आगाऊ बुक केल्याने तुम्हाला तुमची पसंतीची सीट, भाडे किंवा वर्ग मिळेल याची खात्री होते, ज्यामुळे वेटिंग लिस्टचा त्रास कमी होतो. फ्लाइट कंपन्या अनेकदा आगाऊ बुकिंग करताना सवलती आणि ऑफर देतात. तीन महिने आगाऊ बुकिंग करणे बरेचदा स्वस्त असते. यामुळे वेळ आणि त्रास वाचतो आणि अधिक सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.

हायड्रेटेड रहा

प्रवास करताना हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्या. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात तुमचे शरीर सक्रिय ठेवणे, एकाग्रता आणि मूड सुधारणे, चांगले तापमान राखणे आणि उत्कृष्ट आरोग्य आणि त्वचा राखणे यांचा समावेश आहे.

हायड्रेटेड राहण्यासाठी, नेहमी सोबत पाण्याची बाटली ठेवा आणि रिफिल करण्यायोग्य बाटली ठेवा. जिथे पाणी मिळेल तिथे पाणी पुन्हा भरा आणि फक्त स्वच्छ, सुरक्षित पाणी प्या. पाणीयुक्त फळे आणि पेये सोबत कमी प्रमाणात पाणी वारंवार प्या. चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्ससारखे डिहायड्रेट करणारे पदार्थ टाळा आणि ते मर्यादित करा. सकाळी प्रवास सुरू करताना पूर्ण ग्लास पाणी प्या, स्टील किंवा बीपीए-मुक्त बाटली सोबत ठेवा, वृद्ध आणि मुलांना हायड्रेट ठेवा आणि उंचावर किंवा सनी भागात पाण्याचे सेवन वाढवा.

हॉटेलचा पत्ता आणि फोन नंबर: तुमच्या हॉटेलचा पत्ता आणि फोन नंबर तुमच्या मोबाईल फोनवर सुरक्षित ठेवण्याचे नेहमी लक्षात ठेवा. हे तपशील तुमच्या फोनवर सुरक्षित ठेवा, तसेच त्यांची एक प्रत ठेवा आणि कुठेतरी डायरीत लिहून ठेवा.

स्थानिकांशी बोला: जेव्हा आपण नवीन ठिकाणी प्रवास करतो तेव्हा आपल्याला अनेकदा चांगले अन्न कुठे मिळेल, कोणते रेस्टॉरंट स्वस्त आहेत आणि कोणते चांगले आहेत आणि भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत हे माहित नसते. स्थानिकांशी बोलल्याने मौल्यवान माहिती मिळू शकते, कारण त्यांना ते ठिकाण आपल्यापेक्षा चांगले माहित आहे. याचे अनेक फायदे आहेत, ज्यात अचूक आणि अचूक माहिती, अन्न आणि संस्कृती दोन्हीचा आनंद घेणे आणि परवडणारे अन्न शोधणे यांचा समावेश आहे. यामुळे पैसे वाचू शकतात आणि नवीन मैत्री आणि नातेसंबंध वाढू शकतात. तथापि, कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा, व्यवहारात सावधगिरी बाळगा, फोटो किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग टाळा, स्थानिक रीतिरिवाजांचा आदर करा आणि लोकांशी सौजन्याने वागवा. धन्यवाद म्हणायला विसरू नका.

मार्गदर्शक निवडणे: जर तुम्हाला एखाद्या पर्यटन स्थळाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही एक चांगला मार्गदर्शक निवडू शकता जो तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल तपशीलवार माहिती देईल. चुकीचा मार्गदर्शक तुमची फसवणूक करू शकतो, म्हणून तुमचा मार्गदर्शक काळजीपूर्वक निवडा.

प्रथमोपचार किट: नेहमी तुमच्यासोबत प्रथमोपचार किट ठेवा. यामध्ये बँडेज, खोकल्याच्या सिरप, सर्दी आणि तापासाठी औषधे, सैल हालचाल आणि पोटदुखी यांचा समावेश असावा. तसेच, थर्मामीटर, ओआरएस, ग्लुकोज पावडर, फेसमास्क, डिस्पोजेबल हातमोजे, एक लहान टॉर्च ठेवा आणि औषधांच्या कालबाह्य तारखांवर लक्ष ठेवा. या वस्तूंसाठी वेगळी बॅग ठेवा.

विमान तिकिटे पूर्व-बुकिंग: विमान तिकिटे परवडणारी आणि बजेटमध्ये असल्याची खात्री करण्यासाठी आगाऊ बुक करावीत. उशिरा बुक केल्यास विमान तिकिटे खूप महाग होऊ शकतात. म्हणून, सवलत मिळविण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे उचित आहे. तिकिटे बुक करण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत.

तुमचा संपूर्ण प्रवासाचा आराखडा घरीच माहिती ठेवा: तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या संपूर्ण प्रवासाच्या आराखड्याची माहिती असली पाहिजे. तुमच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. हे आमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे कारण कधीकधी, जर आम्ही माहिती शेअर केली नाही तर आम्ही सापळ्यात अडकू शकतो आणि फक्त आमचे कुटुंबातील सदस्यच आम्हाला मदत करू शकतात.

पैसे वेगळे ठेवा: तुम्ही सोबत असलेले पैसे एकाऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून हरवल्यास तुम्हाला ते सहज उपलब्ध होतील. तसेच, तुमचे क्रेडिट कार्ड वेगळ्या बॅगेत ठेवा. बॅग हरवल्यास, आम्हाला आमच्या बॅगपैकी एकामध्ये पैसे सापडतील जेणेकरून आम्ही सुरक्षितपणे घरी परतू शकू.

टिकाऊ बॅग बाळगा: प्रवासात समस्या टाळण्यासाठी तुमच्या बॅगा मजबूत असाव्यात. कधीकधी, परिस्थिती इतकी वाईट होते की तुमचे सामान ठेवण्यासाठी बॅगा शिल्लक राहत नाहीत आणि त्या पॅक करणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीत, टिकाऊ बॅगा आवश्यक असतात.

क्यूब्स पॅकिंग: क्यूब्स पॅकिंग प्रवास करताना तुमच्या सुटकेस व्यवस्थित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. क्यूब्स पॅकिंग केल्याने तुमची सुटकेस व्यवस्थित होण्यास मदत होते, म्हणून त्यांचा वापर नक्की करा. क्यूब्स पॅकिंग केल्याने तुमच्या सामानाचे वजन नियंत्रित होते आणि ते सुरक्षित राहतात. यामुळे वस्तू विसरण्याची शक्यता कमी होते, पैसे वाचतात, स्वच्छता राखली जाते, तुमचे सामान सुरक्षित ठेवता येते आणि वेळ वाचतो.

घाणेरड्या कपड्यांसाठी बॅग: प्रवास करताना घाणेरडे होणे सामान्य आहे. आपण अनेकदा ते धुवू शकत नाही, म्हणून घाणेरड्या कपड्यांसाठी बॅग ठेवा. यामुळे घरातील घाणेरडे कपडे काढून टाकण्याची गरज नाहीशी होते आणि प्रवासादरम्यान घाण टाळण्यास मदत होते.

हँड सॅनिटायझर: प्रवासादरम्यान, विशेषतः जिथे हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही तिथे हँड सॅनिटायझरची बाटली अत्यंत उपयुक्त आहे.

हलके स्नॅक्स सोबत ठेवा: भूक लागल्यावर, विशेषतः जेव्हा तुम्ही मुलांसोबत असता तेव्हा हलका, घरगुती नाश्ता खूप मदत करू शकतो. लहान मुलांसाठी घरगुती नाश्ता सोबत ठेवणे विशेषतः सोयीस्कर आणि उपयुक्त आहे जेणेकरून त्यांना कधीही, कुठेही स्वच्छ, पौष्टिक जेवण मिळेल. आपल्याला माहिती आहे की, मुलांना लवकर भूक लागते, विविध प्रकारचे हलके नाश्ते उपयुक्त ठरू शकतात. या नाश्त्यामध्ये पराठे, दही, इडली, नारळाची चटणी, हलके नाश्ता, सँडविच, फळे आणि सुकामेवा यांचा समावेश आहे.

सुरक्षा अॅप्स डाउनलोड करा: आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनवर नेहमीच एक सुरक्षा अॅप डाउनलोड ठेवा. अपरिचित ठिकाणी, विशेषतः महिला प्रवाशांसाठी, आमच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा अॅप्स महत्त्वपूर्ण आहेत. आपत्कालीन मदत अॅप्स आम्हाला पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाकडून मदत मिळविण्यात मदत करू शकतात. हे अॅप्स जवळील मदत त्वरित शोधू शकतात. ते रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या मार्गांची, रहदारीची आणि गर्दीची माहिती देखील देतात, ज्यामुळे ते एकटे प्रवास करणाऱ्या आणि महिलांसाठी खूप उपयुक्त ठरतात. चोरी, छेडछाड किंवा इतर संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यासाठी, सेफ अॅपचा सल्ला घ्या.

तुमचे कपडे पूर्व-नियोजन

आपल्या प्रवासाच्या कपड्यांबाबत आपण अनेकदा थोडे आळशी होतो. काही लोक शेवटच्या क्षणी पॅकिंग करणारे असतात, शेवटच्या क्षणी पॅकिंग करतात. अशा परिस्थितीत, आपण घालणार असलेले कपडे धुणे आणि इस्त्री करणे खूप सोयीचे असेल. तुमच्या सहलीसाठी शक्य तितके कमी कपडे पॅक करणे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला दडपण जाणवणार नाही. तुमचे कपडे पूर्व-नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

तुमच्या सहलीच्या उद्देशासाठी आणि स्थानासाठी कपडे योग्य असले पाहिजेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही थंड ठिकाणी प्रवास करत असाल तर उबदार कपडे योग्य असले पाहिजेत; समुद्रकिनारा किंवा डोंगरासाठी, योग्य कपडे आणि शूज योग्य असले पाहिजेत. धार्मिक स्थळांसाठी, पारंपारिक कपडे घालणे चांगले, तर डोंगराळ ठिकाणी, तुम्हाला चालण्यास आणि पर्वत चढण्यास अनुमती देणारे आरामदायी कपडे पसंत केले पाहिजेत.

सार्वजनिक वाय-फाय

सार्वजनिक वाय-फाय हा फारसा सुरक्षित स्रोत नाही, म्हणून बँक खात्यांसारख्या कारणांसाठी त्याचा वापर टाळा. ते आर्थिकदृष्ट्या हानिकारक असू शकते.

सार्वजनिक वाय-फाय टाळले पाहिजे कारण ते रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, मॉल, कॅफे इत्यादी ठिकाणी मोफत उपलब्ध आहे, परंतु ते अनेकदा एकाच वेळी अनेक लोक वापरतात, ज्यामुळे ते हॅकिंगसाठी असुरक्षित बनते आणि ऑनलाइन बँकिंग पेमेंट धोक्यात येऊ शकते. तुमचा डेटा ट्रॅक केला जाऊ शकतो आणि लोक बनावट नेटवर्क देखील तयार करू शकतात ज्यामुळे डेटा हॅकिंग होऊ शकते.

जर तुम्हाला सार्वजनिक वाय-फाय वापरायचे असेल तर ही खबरदारी घ्या

ते फक्त वाचन किंवा सामान्य ब्राउझिंगसाठी वापरा, जसे की हवामान, नकाशे किंवा बातम्या. बँकिंग, पेमेंट किंवा पासवर्ड लॉगिन टाळा.

प्रवास करताना तुमचा नेटवर्क पासवर्ड कधीही कोणाशीही शेअर करू नका. नेटवर्कचे नाव अधिकृत आहे की नाही हे पाहण्यासाठी हॉटेल किंवा कॅफेशी संपर्क साधा. तुमचे काम पूर्ण झाल्यानंतरच कनेक्ट करा.

तुमचे काम पूर्ण होताच वाय-फाय आणि ऑटो-कनेक्ट दोन्ही बंद करा.

तुमच्या फोनवर अँटीव्हायरस किंवा सुरक्षा अॅप ठेवा.

मोबाइल डेटा स्वयंचलितपणे वापरा. जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर वैयक्तिक हॉट स्पॉट किंवा प्रवासासाठी वाय-फाय डिव्हाइस वापरा.

 

रिल्सचे व्यसनी होत चाललेले वृद्ध

* रोहित सिंह

वडीलधाऱ्या माणसांच्या हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, पण त्यांना रिल्स पाहाण्याची वाईट सवय लागली आहे. फोन वापरण्यास सक्षम झालेली ही वडीलधारी मंडळी थरथरत्या हातांनी सतत रिल्स पाहाण्यात व्यस्त आहेत. पूर्वी तेच आपल्या लहान मुलांना वेळेचे महत्त्व सांगायचे. जेव्हा वेळ नसायचा तेव्हा जुन्या गोष्टी सांगायचे, पण आता ते स्वत:च तासन्तास मोबाईलवर असतात.

या लोकांनाही मोबाईलचा मोह आवरता आलेला नाही. त्यांच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे, तरीही एका डोळ्यावर पांढरी पट्टी लावलेली असतानाही ते दुसऱ्या डोळ्याने रिल्स पाहाण्यात व्यस्त आहेत. जोपर्यंत कोणी त्यांना रोखत नाहीत तोपर्यंत ते आपली नजर स्क्रीनवरून दूर करत नाहीत.

रिल्स पाहाण्याचे वेड इतके आहे की, सून स्वयंपाकघरातून ‘बाबा, दिवाणखान्यात जेवायला या’, अशी हाक मारत असतानाही ते त्यांच्या खोलीत मोबाईल पाहाण्यात व्यस्त आहेत. जेवण थंड होत आले तरी ते काही अंथरुणातून उठत नाहीत.

आश्चर्याची गोष्ट

जे वडील आधी घाई करून वेळेवर जेवणाचे महत्त्व सांगायचे, आता त्यांनाच मोबाईल वाजवून जेवणाला बोलवावे लागत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जेवतानाही रिल्स बघत आहेत. थोडा वेळ फोन बाजूला ठेवायला सांगितले तर ते नाराज होऊन जेवण जेवायचे सोडून देत आहेत.

सासूचीही तीच अवस्था आहे. पूर्वी ज्या सासूबाईंचे काम दिवसभर आपल्या सुनेवर लक्ष ठेवणे, तिला डाळ- मिठाचे भाव सांगणे, तिला सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देणे, तिला सतत टोमणे मारायचे होते, त्या सासूही आता अलार्म वाजल्याशिवाय उठत नाहीत. अलार्मदेखील ४-५ लावावे लागतात. पहिल्या वेळी तो वाजल्यावर केवळ पापण्यांचीच हालचाल होते.

या वृद्धांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिले जात आहे. सासू आणि सून एकाचवेळी झोपून उठतात. घरात अगदी समान वातावरण आहे. नव्या जमान्यातील सून रिल्स बनवताना आपल्याच सासूला त्यात ओढत आहेत. स्वत: नाच करताना चार उड्या मारत आहेत तर एक उडी सासूला मारायला लावत आहे. सासूही आता गाण्यांवर लिप्सिंग करायला शिकली आहे. ‘मेरे पिया गये रंगून…’ ऐवजी आता ती ‘तेरे वास्ते फलक से चाँद…’ हे गाणे गुणगुणत आहे.

विचित्र हौस

रिल्सचा आवाज चांगल्या प्रकारे ऐकण्यासाठी, ज्यांना व्यवस्थित ऐकायला येते असे काही वृद्ध कानात ब्लूटूथ देखील घालत आहेत. त्यांना हेही माहीत आहे की, रिल्समध्ये ‘मोयेमोये,’’ ‘‘आए… बैगन’’च्या आवाजादरम्यान त्यांच्या तोंडून शिवी निघून जाते, त्यामुळे काही जण वायर लीडवरच काम चालवत आहेत.

मुलगा शहरात राहातो. आई-वडिलांना शहरात आणले आहे. त्या भल्यामोठ्या बंदिस्त घरात त्यांना गावाची आठवण येत आहे. गावातून शहरांकडे स्थलांतरित झालेले वृद्ध यूट्यूबवर खेड्यापाड्याच्या भरपूर बातम्या पाहात आहेत. पिझ्झा बर्गर खाताना ते गावातील प्रभावशाली व्यक्तींना शोधत आहेत. शहराला नावे ठेवत आहेत.

अर्धवट ज्ञान

काहीजण यूट्यूबवर राजकीय विश्लेषण ऐकत आहेत. यूट्यूबवर राजकीय संशोधन करणारे वृद्ध रजनी कोठारी ते विद्या धर सारिका हे राजकीय तज्ज्ञ मानत आहेत. हे प्रकरण आता व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवरून यूट्यूब रिसर्च इन्स्टिट्यूटकडे हलवण्यात आले आहे. या यूट्यूबर्सच्या मोबाईलवर इतकी सामग्री आहे की, एकदा ती वृद्धांनी पाहाणे सुरू केली की ते स्वत:ला रोखूच शकत नाहीत.

इथून मिळालेले काही अर्धवट ज्ञान काही लोक वृद्धांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करत आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला आहे, या ग्रुपवर देवाच्या चित्रांसह अर्ध्याहून अधिक संदेश गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे आहेत.

पूर्वी ही वडिलधारी मंडळी त्यांच्या परिसरात बांधलेल्या कट्टयावर भेटत असत, त्यांच्या सर्व गप्पा वटवृक्षाखाली होत असत. कुटुंबातील दु:ख ते एकमेकांसोबत वाटून घेत असत.

अंधश्रद्धेला चालना

त्या कट्टयावर थोड्याफार राजकीय गप्पाही व्हायच्या, पण आता तेथे असलेला ५०० वर्षं जुना वटवृक्ष तोडण्यात आला आहे. वस्तीतील मुला-मुलींच्या दुचाकी, स्कूटर तिथे उभ्या असतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप हा नवा कट्टा बनला आहे.

फेसबुकवर लांबलचक धार्मिक पोस्ट टाकत आहेत. व्हिटॅमिनच्या गोळ्या खात   आहेत आणि त्यानंतर खाली कमेंटमध्ये जय श्री राम लिहित आहेत. अल्गोरिदम    त्यांना त्याच पोस्ट आणि रिल्स पाठवत आहेत, ज्या ऐकून आणि पाहून ते पोटधरून हसत आहेत.

महिलानेच महिलांचा मान राखावा

* भावना ठाकर भावू

प्रत्येक तिसऱ्या पोस्टवरती स्त्री विमर्श आणि स्त्रियांच्या हक्कांबाबत लिहिलं जातं. त्या लेखनाच्या माध्यमातून स्त्री सन्मानाच्या भावनेबद्दल पुरुषांना न जाणो कितीतरी गोष्टी ऐकवल्या जातात. परंतु आपल्या समाजात स्त्रियां यासाठी मागे नाही राहत की तिच्या आवाजाला, तिच्या प्रगतीला पुरुष दाबतात. यासाठी मागे राहतात कारण दुसऱ्या स्त्रिया तिचा आवाज बनत नाही, तिला साथ देत नाहीत, आदर देत नाहीत.

पुरुष स्त्रीचा सन्मान करत नाही हे तर आहेच, परंतु आई, बहीण, मुलगी, सासू, सून आणि मैत्रिणी या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल सन्मानाची भावना असते का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करते का?

राग, द्वेष, इर्षा ग्रस्त मन जेवढं स्त्रीचं आहे तेवढं पुरुषाचं नसतं. अगदी दोन खास असणाऱ्या स्त्रियांच्या मनात कुठे न कुठे एकमेकांसाठी इर्षेचा भाव असतोच. अशावेळी सासूसून, नणंद भावजय, जावाजावा त्यांच्यामध्ये सामंजस्याची आशा करणं तर विचारूच नका.

भले प्रत्येक स्त्री अशी नसते परंतु अनेक स्त्रिया अशाच असतात. आया मुलीला प्रत्येक प्रकारचे संस्कार देतील, प्रत्येक काम शिकवतील परंतु मुलीला हे शिकवलं जात नाही की आपल्या सासूला आई समजणं, जावेला मोठी बहीण आणि नंदेला मैत्रिण. या विपरीत सासरला काळ्या पाण्याची सजा असल्याचं सांगून आपल्या मुलीला हे शिकवलं जातं की सासूला घाबरायचं नाही, सर्व कामे एकट्याने करायची नाही ,जावेचं म्हणणं अजिबात ऐकायचं नाही आणि नंदेचे नखरे तर अजिबात सहन करायचे नाहीत.

हा भेदभाव का

सासू आपल्या सुनेला मुलगी समजण्याची सुरुवात करतच नाही. सून नोकरदार असेल तर किती सासवा ऑफिसमधून थकून परतलेल्या सुनेला चहा देतात वा गरमागरम पोळी बनवून खायला देतात? वा अशी कोणती जाऊ छोट्या जावेला छोटी बहिण समजून प्रत्येक कामात मदत करते? नणंद वहिनीला सन्मान देत नाही आणि खूपच कमी स्त्रियांमध्ये ही समज असते आणि स्त्रियांची हिच कमी कुटुंबाला विभागण्याचं काम करते, कुटुंबात क्लेश निर्माण करतात.

सासू हुंड्यासाठी सुनेला त्रास देते, मुलगी झाल्यावरती टोमणेदेखील सासूच सुनेला मारते, सासू सुनेची बाजू का घेत नाही? असं म्हटलं जातं की स्त्रियांमध्ये क्षमा, दया, ममतासारखे नैसर्गिक गुण असतात. परंतु अनेकदा पाहण्यात आलंय की त्यांच्या सहानुभूतीमध्ये भिजण्याची संधी पुरुषांनाच जास्त मिळते. जेव्हा मुलगी लग्न करून येते तेव्हा सासरे, दीर आणि नंदोबा तिच्यासाठी एखाद्या देवतासारखे असतात. परंतु बिचारी सासू वा नणंद साक्षात विलनच्या स्वरूपात असतात. स्त्री प्रत्येकाला सहजपणे माफ करते परंतु सासूला याचा विचार देखील एखादी मुलगी करणार नाही.

सून मुलगी का नाही

आता आयुष्यच एका छताखाली काढायचं असेल तर सासू सुनेला मुलीची जागा का देऊ शकत नाही आणि सून सासूला आईची जागा का देऊ शकत नाही, खरंतर हे नातं सर्वात अधिक मजबूत असायला हवं.

कधीही पहा स्त्रीच स्त्रीच्या विरुद्ध असते. मग ती शिक्षित असो वा अशिक्षित. वर्षानुवर्षे हेच चालत आलंय आणि हेच चालत राहणार. फक्त एकदा तरी सासूने सूनेमध्ये मुलीचं रूप पहावं आणि सुनेने सासूमध्ये आईचं रूप. खरोखरच ‘स्त्री ही स्त्रीची दुश्मन’ अशा कथा लिहिणाऱ्या साहित्याच्या प्रत्येक पानाचं विसर्जन होईल.

परंतु गॉसिपमध्ये माहीर असणाऱ्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांना कमीपणा दाखवण्याची एकही संधी काही सोडत नाहीत. अनेकदा किटी पार्ट्यांमध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कमीपणा दाखविण्याचं काम करते. स्टेटसपासून पेहराव, आवड निवड आणि राहणीमानावरती टीका करताना स्वत:ला सुंदर सक्षम आणि समजूतदार दाखविण्याची स्त्रियांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते.

पुरुष अशा प्रकारच्या गोष्टी खूपच कमी करत असतील. कुटुंबाचा पाया स्त्री असते. प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की तिने आपल्या मुलीला हे शिकवायला हवं की आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. जेव्हा तुम्ही समोरच्याला मान द्याल, चांगलं वागाल, तेव्हाच तुम्हाला मान मिळेल. प्रत्येक स्त्रियांना एकमेकांना समजण्याची गरज आहे, एकमेकांना मान आणि आधार देण्याची गरज आहे. मग ती मैत्री असो, कुटुंब असो वा समाज. स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करणं शिकेल तेव्हाच विभक्त कुटुंब एकत्र होतील, एकत्र कुटुंबाची सुरुवात होईल. आपोआप आपलेपणा आणि शांतीने भरलेल्या समाजाची निर्मिती होईल.

अपेक्षा स्त्रियांकडूनच असावी

जर कुठेही खुलेआम एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, तेव्हा महिलांनी एकत्रित येऊन त्याचा सामना करायला हवा. जसं अगदी काही काळापूर्वी मणिपूरमध्ये एक घटना घडली होती. एक स्त्रीला निर्वस्त्र करून पूर्ण गावांमध्ये फिरवण्यात आलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्येदेखील एका पतीने आपल्या पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं. जरा विचार करा त्या स्त्रीच्या मानसिक अवस्थेबद्दल. तेव्हा जर एकजूट होऊन दुसऱ्या स्त्रियांनी या गोष्टीचा विरोध केला असता तर बाकीच्या बायका अपमानित होण्यापासून वाचू शकल्या असत्या .

गर्दीला तर सिंहदेखील घाबरतो, म्हणून आता वेळ आली आहे की राग, द्वेष , इर्षा सोडून महिलांनी एकत्रित होण्याची. जिथे कुठे एखाद्या महिलेवर अत्याचार होताना दिसला तर स्त्रियांनीच पुढे येऊन विरोध करायला हवा, तेव्हाच या दुर्घटनांना आळा बसेल.

फक्त पुरुषांकडून ही आशा ठेवू नका की पुरुषानेच प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. स्त्रियांकडूनदेखील ही अपेक्षा ठेवायला हवी. प्रत्येक मुलीला लहानपणापासून हे शिकवलं तरच या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या परंपरा तुटतील, सासु सुनेचे संबंध आई मुलीसारखे बनतील आणि रागाचं शमन होताच समाजदेखील संस्कारवान दिसेल.

चित्रपटांमधील इंटिमेट सीन्सचे रहस्य

* सोमा घोष

आजकालच्या चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये किसिंग सीन म्हणजेच चुंबन दृश्य किंवा इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य असणे, ही काही मोठी गोष्ट नाही. सर्व कलाकार प्रेमाचे चित्रण करण्यासाठी चुंबन दृश्य ही सर्वसामान्य बाब मानतात आणि अशी दृश्यं देताना मागेपुढे पाहात नाहीत, कारण त्यांना वाटते की, त्या दृश्याशिवाय चित्रपटाची कथा अपूर्ण वाटेल.

एका मुलाखतीत अभिनेत्री कल्की कोचलिनने सांगितले होते की, जेव्हा तिला पहिल्यांदा इंटिमेट बेड सीन करण्यास सांगितले गेले तेव्हा तिला खूपच वेगळे वाटले आणि तिने त्यासाठी थोडा वेळ मागितला, त्यानंतर ती तयार झाली, पण त्याआधी तिने दिग्दर्शकाला अट घातली की, ते दृश्य त्याने एकाच टेकमध्ये पूर्ण करावे, ती रिटेक देणार नाही.

अशी दृश्यं म्हणजे पैसा वसूल झाल्यासारखे प्रेक्षकांना वाटते. आजकाल जवळपास प्रत्येक चित्रपटात चुंबन दृश्य पाहायला मिळतात आणि जर चित्रपट इमरान हाश्मीचा असेल तर चुंबन घेतल्याशिवाय तो चित्रपट पूर्णच होत नाही, पण प्रश्न असा पडतो की, चित्रपटात अशी दृश्यं कशा प्रकारे चित्रित केली जातात? दिग्दर्शक आणि इतर सर्वांसमोर अभिनेत्री सहजपणे चुंबन दृश्य किंवा बेड सीन कशा प्रकारे देतात? चला, जाणून घेऊया :

दुसऱ्याच्या शरीराचा वापर

दिग्दर्शक अशा अंतर्गत दृश्यांबद्दल अभिनेत्रीला अगोदरच माहिती देतो, जेणेकरून ती देखील मानसिकदृष्ट्या तयार राहाते. एखाद्या अभिनेत्रीने त्यासाठी नकार दिल्यास डबल बॉडी म्हणजे दुसऱ्याच्या शरीराचा वापर केला जातो, ज्यासाठी दिग्दर्शक आधीपासूनच तयारी करतो, जेणेकरून चित्रिकरणात कोणताही अडथळा येणार नाही, याशिवाय अंतर्गत दृश्यांच्या चित्रिकरणासाठी इंटिमसी तज्ज्ञांची मदत, कार्यशाळांचे आयोजन ते चित्रिकरणावेळी सुरक्षित शब्द वापरण्यास दिग्दर्शक प्राधान्य देतात, जेणेकरून कलाकारांना अवघडल्यासारखे वाटणार नाही.

कलाकारांमध्ये चांगली केमिस्ट्री

चित्रपट निर्मात्या अलंकृता श्रीवास्तव आणि सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांनी ‘मेड इन हैवेन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कलाकारांमध्ये विश्वास निर्माण केला. वारंवार होणारे रिटेक टाळण्यासाठी कलाकारांशी सविस्तर चर्चा केली, त्यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री तयार केली, जेणेकरून अशा दृश्यांच्या चित्रिकरणावेळी त्यांना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ‘मार्गरिटा विद ए स्ट्रॉ’च्या चित्रिकरणापूर्वी दिग्दर्शक शोनाली बोसने ठरवले होते की, तिच्या कलाकारांना सुरक्षित वाटले पाहिजे. म्हणूनच कल्की आणि सयानी गुप्ता यांनी बोससोबत इंटिमसी वर्कशॉप केले. ज्या दिवशी सयानी गुप्ताला तिचा शर्ट काढावा लागला, त्यावेळी सेटवर मोजक्याच महिला होत्या. बोसनेही आपला शर्ट काढला आणि कमरेला टॉवेल गुंडाळले. यामुळे अवघडलेपणा कमी झाला आणि ते दृश्य चित्रित करणं सोपं झालं.

ते सोपं नाही

अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाला अंतर्गत दृश्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, असं दृश्य देणं सोपं नसतं. त्यात तशा भावनाही ओतव्या लागतात, ज्यासाठी इंटिमसी तज्ज्ञ असतात, जे त्या दृश्याची कोरिओग्राफी करतात, ज्यामुळे ते दृश्य चित्रित करणं सोपं होतं. अशी दृश्यं चित्रित करताना कलाकाराला अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून मुख्यत्वे एक छोटी टीम असते. अशा दृश्यावेळी केवळ अभिनेत्रीच नाही तर अनेकदा अभिनेत्यालाही अवघडल्यासारखे वाटते.

अभिनेत्री तापसी पन्नूच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी ही विक्रांत मेसी आणि हर्षवर्धनसोबत अंतर्गत दृश्य करताना दिसली होती, त्यावेळी ते दृश्य कसे करायचे, यावरून दोन्ही कलालार काहीसे अवघडून गेले होते, पण तापसीने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील अवघडलेपण दूर केले आणि त्यानंतर ते दृश्य चित्रित करण्यात आले.

परवानगी गरजेची

हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशोक मेहता सांगतात की, चित्रपटाची कथा सांगताना, अभिनेत्रीला अशा दृश्याबद्दल आधीच सांगितले जाते. तिने नकार दिल्यास डबल बॉडी म्हणजे दुसऱ्याचे शरीर वापरले जाते, ज्यामध्ये अभिनेत्री आणि त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये परवानगीचा करार करून त्यावर दोघांचीही स्वाक्षरी घेतली जाते, जेणेकरून नंतर अभिनेत्रीने आरोप करू नये की, तिला त्या दृश्याबद्दल माहीत नव्हते. एखाद्या अभिनेत्रीला जास्त त्रास झाला तर ते दृश्य काढून टाकले जाते. ही समस्या चित्रपटांपेक्षा जास्त ओटीटीवर जाणवते.

तंत्रज्ञानाचा वापर

हे तंत्र अशा दृश्यांसाठी देखील वापरले जाते ज्यामध्ये दुसऱ्याचे शरीर चित्रित केले जाते आणि त्यावर अभिनेत्रीचा चेहरा सुपरइम्पोज केला जातो.

अशोक मेहता सांगतात की, अनेकदा अभिनेत्री आधी अंतर्गत दृश्य देते, पण नंतर कुटुंबातील सदस्य किंवा मित्राने आक्षेप घेताच, तिने हे दृश्य दिले नसल्याचे सांगत निर्माता आणि दिग्दर्शकावर दोषारोप करते, ज्यामुळे समस्या निर्माण होतात. मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसना याचा काही फरक पडत नाही, पण छोटे निर्माते-दिग्दर्शकांना न्यायालयात उभे राहावे लागते, अंतर्गत तडजोड करण्यासाठी अधिकचा पैसा द्यावा लागतो किंवा ते दृश्य काढून टाकावे लागते.

इंडस्ट्रीत नवीन आलेल्या किंवा २-३ चित्रपट केलेल्या बहुतेक अभिनेत्रींना अशा समस्येला सामोरे जावे लागते. कधीकधी एखाद्या विशिष्ट कथेसाठी काही अंतर्गत दृश्यं आवश्यक असतात. उदाहरणार्थ, ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनी धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करतानाच्या आणि मुलाला दूध पाजत असल्याच्या दृश्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला. तो पाहण्यासाठी लोकांनी सिनेमागृहात धाव घेतली. तेव्हाचा काळ वेगळा होता, आज भारतीय चित्रपट उद्योग अंतर्गत दृश्यांच्या बाबतीत वास्तवाच्या अगदी जवळ आला आहे, हे ‘मेड इन हेवन’, ‘फोर मोर शौट्स प्लीज’ आणि ‘सैक्रेड गेम्स’ इत्यादी वेब सिरीज आणि ‘जिस्म’, ‘मर्डर’सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकजण हे खुल्या मनाने स्वीकारत आहे आणि त्याला लोकप्रियही बनवत आहे.

आभास निर्माण करतात

आज जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री बोल्ड सीन म्हणजेच मादक दृश्य देण्यास नकार देत असेल तर अनेकदा चित्रिकरण करणाऱ्यांना आभास निर्माण करावा लागतो, म्हणजे केवळ ब्युटी शॉट्स चित्रित करावे लागतात. त्यासाठी सिनेमॅटोग्राफीचे काही तंत्र वापरावे लागते, ज्यामुळे प्रेक्षकांना काही न घडताही खूप काही घडत असल्याचा भास होतो. ब्युटी शॉट्स म्हणजे मिठी मारणे, चुंबन घेणे, हात पकडणे किंवा कॅमेरा अशा प्रकारे पकडणे जेणेकरून शरीराचे अवयव अधोरेखित होतील. हे सर्व सिनेमॅटोग्राफीचे तंत्र आहे, जे आभासाला वास्तविक रूप देतात. पलंगावर सॅटिनच्या बेडशीटचा वापर केला जातो आणि त्यावर चादर घालून केवळ एक आभास निर्माण केला जातो.

क्रोमा शॉट्स घेतात

अशी दृश्य देताना अभिनेता किंवा अभिनेत्रीला अवघडल्यासारखे वाटत असेल तर दिग्दर्शक क्रोमा शॉट्सही घेतात. क्रोमा म्हणजे निळ्या किंवा हिरव्या रंगाचे आवरण जे नंतर नाहीसे केले जाते, उदाहरणार्थ, अभिनेता आणि अभिनेत्रीचा चुंबन दृश्यावर आक्षेप असल्यास, त्यांच्यामध्ये कोहळा किंवा भोपळा अशी भाजी ठेवली जाते. त्याच्या हिरव्या रंगामुळे भोपळा क्रोमा म्हणून काम करतो. दोघे भोपळ्याचे चुंबन घेतात आणि पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान भोपळा गायब केला जातो.

शारीरिक अंतर ठेवावे लागते

याशिवाय कोणतेही मादक किंवा अंतर्गत दृश्य चित्रित करताना स्त्री-पुरुषाचे खासगी अवयव एकमेकांना स्पर्श होणार नाहीत किंवा जास्त काही उघड होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते, कारण कोट्यवधी रुपये खर्चून चित्रपट बनवताना कलाकारांची प्रतिष्ठा पणाला लागणार नाही, हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे असते. चित्रीकरणादरम्यान गोंधळ टाळण्यासाठी, क्रिकेटपटूंप्रमाणे, अभिनेत्यासाठी लोगार्ड किंवा कुशन किंवा एअर बॅग वापरली जाते, ज्यामुळे दोघांमध्ये अंतर राहाते. अभिनेत्रीसाठी पुशअप पॅड वापरले जातात, जर तिला मागून टॉपलेस दाखवायचे असेल तर समोर सिलिकॉन पॅड वापरले जातात, कोणतेही अंतर्गत दृश्य चित्रित करण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्रीने एकमेकांशी जुळवून घेणे. शारीरिक अंतर राखण्यासाठी, कधीकधी एखाद्याला प्रॉप्सचीही मदत घ्यावी लागते, जी कलाकाराच्या निवडीवर अवलंबून असते. प्रॉप्समध्ये मऊ उशी, त्वचेच्या रंगाचा ड्रेस, नीटनेटके कपडे इत्यादीसारख्या काही गोष्टींचा समावेश असतो.

मोठे ध्येय, मोठे उत्पन्न, मोठे आयुष्य

* प्रियंका यादव

प्रत्येकाला वयाच्या २४व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे वाटत असते. पण, तुम्ही पलंगावर लोळत पडला असाल तर तुम्हाला चांगला पगार मिळणार नाही. चांगला पगार तर दूरच, तुम्हाला चांगली नोकरीही मिळणार नाही. त्यामुळे अंथरूण सोडून ध्येयाच्या दिशेने धाव घ्या, तरच तुम्ही भरघोस उत्पन्नाचे मोठे, ऐशीआरामी आयुष्य जगू शकाल.

याउलट, आळसामुळे तुम्ही अंथरुणावर पडून राहिलात तर तुम्हाला कधीही ऐशोआराआमाचे जीवन जगता येणार नाही. तुमच्या मित्रांना असे आयुष्य जगताना पाहून तुम्ही तुमचे डोकं खाजवत बसाल आणि स्वत:ला दोष देत बसाल की, आपणही वेळीच अशी मेहनत करायला हवी होती. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला वेळेत कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देतो. जर तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम केले तर तुम्ही तुमची स्वप्नं तर पूर्ण करालच सोबतच प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे खरेदी करण्यास देखील सक्षम असाल.

जर तुम्ही मेहनत करत असाल तर यश नक्कीच तुमच्या पायांवर लोळण घेईल. मधुरिमा चतुर्वेदी ही याचेच ज्वलंत उदाहरण आहे. मधुरिमा ३६ वर्षांची आहे. ती व्यवसायाने डेटा विश्लेषक असून गाझियाबादच्या इंदिरापूरम सोसायटीत राहाते. आज मधुरिमाकडे स्वत:च्या कमाईतून घेतलेली २ घरं आहेत. तिने स्वकमाईतून एक मर्सिडीजही घेतली आहे. पैसे कसे कमवायचे, हे तिला माहीत आहे, म्हणूनच तिने शेअर बाजारातही गुंतवणूक केली आहे.

मेहनत तर करावीच लागेल

मधुरिमा जन्मजात श्रीमंत होती, असे मुळीच नाही. तिने लहानपणी खूप संघर्ष केला. मधुरिमाच्या लहानपणीच तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. आईने कशीबशी छोटी-मोठी नोकरी करून मधुरिमाला वाढवले. सरकारी शाळेत शिकलेली मधुरिमा अभ्यासात खूप हुशार होती. तिला हे चांगलंच माहीत होतं की, स्वत:ला बदलायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल.

मधुरिमाने तिच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवले होते. दहावीपासूनच तिने करिअरच्या नियोजनाला सुरुवात केली. तिला माहीत होते की, भविष्य घडवायचे असेल तर तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

१२वी उत्तीर्ण होताच मधुरिमाने इंटर्नशिप सुरू केली. समाजातील लोक तिच्याबद्दल वेड्यावाकड्या गोष्टी करू लागले. पण, ती थांबली नाही. तिने आपल्या स्वप्नांची भरारी सुरूच ठेवली आणि आज चांगल्या पदावर आहे. त्यामुळेच तर तिचे आयुष्य बदलले.

स्वप्नांची सोबत सोडली नाही

एक काळ असा होता की, मधुरिमादेखील सणासुदीला जुने कपडे घालायची, पण आता ती प्रसिद्ध ब्रँडचे कपडे घालते. त्यासाठी तिने तिच्या सप्नांचा पाठलाग सोडला नाही आणि स्वत:वर विश्वास कायम ठेवला. तेव्हा कुठे हे शक्य झाले. त्यामुळेच तर आज मधुरिमा ऐशोआरामी आयुष्याचा आनंद घेत आहे.

मधुरिमा म्हणते, ‘‘जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल, तर आराम, आळस सोडून मेहनत करावी लागेल. तुमची आवड आणि मेहनतच तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची हिंमत देते. पैशाशिवाय काहीही नाही. पैसे कमवायचे असतील तर लहानपणापासूनच करिअरचे नियोजन करा. लोक काय म्हणतात, याकडे लक्ष देऊ नका, फक्त स्वत:चा आणि तुमच्या भविष्याचा विचार करा. भ्रमात जगू नका. धार्मिक ढोंगी तुम्हाला धर्माच्या जाळ्यात अडकवतील आणि त्यांच्यासोबत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या बोलण्याला फसू नका. विशेषत: मुलींनी हे लक्षात ठेवायला हवे, कारण    धार्मिक ढोंगी मुलींना घरात बंदिस्त ठेवू इच्छितात.’’

मधुरिमा पुढे सांगते, ‘‘तुमचे भविष्य घडवण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की, तुम्हाला तुमच्या वर्तमानाचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे तुमच्या करिअरची चिंता करत असतानाच, आयुष्याचा आनंद घेत राहा.’’

महिलांसाठी प्रेरणास्थान

केवळ मधुरिमाच नाही तर जिवामीची सहसंस्थापक आणि सीईओ ऋचा कर हिनेही तिच्या मेहनतीने रुपये ७०० कोटींची कंपनी स्थापन केली. तिची कंपनी जिवामी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जो महिलांसाठी अंतर्वस्त्र बनवतो. ऋचा करने लोकांची आणि समाजाची पर्वा न करता यशाची नवी शिखरे गाठली. तिची यशोगाथा सर्व तरुणांसाठी, विशेषत: महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

अंडरवेअर म्हणजेच अंतर्वस्त्र खरेदी करताना मुलींना लाजल्यासारखे वाटत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. रिचाने मुलींची ही समस्या समजून घेतली आणि त्यावर काम केले. आज जिवामीने ५ हजारांहून अधिक रेंज, ५० हून अधिक बँड आणि १ हजाराहून अधिक आकारांच्या अंतर्वस्त्रांचा समावेश केला आहे. त्यांच्या वेबसाइटवर दर महिन्याला २.५ दशलक्ष व्हिजीटर्स म्हणजेच अभ्यागत असतात. अनेक बड्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या या कंपनीत निधी गुंतवला आहे.

आज जिवामी लाखो महिलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरवणारी कंपनी बनली आहे. ऋचाने तिच्या हिंमतीने आणि परिश्रमाने ते साध्य केले जे कधीच शक्य झाले नसते.

मेहनतीचे फळ

रिचा आज ज्या स्थानावर आहे ते तिच्या मेहनतीचे फळ आहे. आज ती मर्सिडीजमध्ये प्रवास करत असेल तर त्यामागे तिची अहोरात्र मेहनत आहे. अशाच प्रकारे, शुगर कॉस्मेटिक्सची सहसंस्थापक आणि सीईओ विनीता सिंग देखील आहे, जिने तिची रुपये १ कोटीची कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम म्हणजे आज ती कोट्यवधींच्या कंपनीची मालकीण आहे. विनीताचा सल्ला आहे की, ‘‘जर तुम्हाला जागतिक दर्जाचे काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामात सातत्य ठेवावे लागेल आणि त्याचे फळ मिळवण्यासाठी धीर धरावा लागेल.’’

तिच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, विनीताने २०१५ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स सुरू केले. आज शुगर कॉस्मेटिक्सचे १३० हून अधिक शहरांमध्ये २,५००हून अधिक आउटलेट आहेत. तिच्या कंपनीचे मूल्य रुपये ७५० कोटी आहे. २०१९-२० मध्ये तिच्या कंपनीचे उत्पन्न १०५ कोटी रुपये होते. विनीताची कंपनी दिवसाला २ कोटी रुपये कमावते.

प्रचंड मेहनत आणि कधीही हार न मानण्याची जिद्द यामुळेच आज विनीता आयुष्यात स्थिरस्थावर झाली आहे. तिच्या या वृत्तीमुळेच तर आज यश तिच्या पायावर लोळण घेत आहे. आज शुगर कॉस्मेटिक्स हा प्रत्येक महिलेच्या ओठावर असलेला बँड आहे, हे तिच्याच मेहनतीला मिळालेले फळ आहे.

हार मानली नाही

पण, एक वेळ अशी होती जेव्हा विनीताने महिन्याला १० हजार रुपयांची नोकरी केली. तरीही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहाणे तिने कधीच थांबवले नाही, पराभव स्वीकारला नाही आणि शेवटी यश संपादन केले.

आजकाल सौंदर्य उद्योग आणि शेअर बाजारात एक नवीन नाव लोकप्रिय आहे. हे नाव दुसरे तिसरे कुठलेच नसून नायका आहे. नायकाची संस्थापक एक महिला आहे, जिचा समावेश अब्जाधीश महिलांच्या यादीत आहे. फाल्गुनी नायर असे तिचे नाव आहे. तिला ही कंपनी वारसा हक्काने मिळालेली नाही तर तिने स्वत:ची कंपनी सुरू केली आणि आभाळाएवढे उत्तुंग यश मिळवले. फाल्गुनीला वाटले असते तर ती कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर राहिली असती, पण तिने कोटक सोडण्याचा निर्णय घेतला.

इथूनच फाल्गुनी नायरने तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू केला. फाल्गुनीने २०१२ मध्ये नायका सुरू केले. नायका एक सौंदर्य आणि त्यासंदर्भातील काळजी घेणारी कंपनी आहे. त्यांची ३५ दुकानं आहेत. एवढेच नाही तर नायका फॅशनमध्ये ड्रेस, अॅक्सेसरीज आणि फॅशनशी संबंधित उत्पादने आहेत. याशिवाय यात ४ हजारांहून अधिक ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन ब्रँडचा समावेश आहे.

यशोगाथा

नायकाअंतर्गत फाल्गुनी १६शेहून अधिक लोकांच्या समूहाचे नेतृत्व करते. सध्या फाल्गुनी नायरची संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्सच्यावर गेली आहे. यामुळे फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजिका बनली आहे. तिची कंपनी नायका ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल झालेली भारतातील पहिली महिला नेतृत्व असलेली कंपनी ठरली आहे.

चित्रपट ‘12वी फेल’ची कथा आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. एक मुलगा आपल्या स्वप्नांच्या मागे धावत एक दिवस ध्येयपूर्तीच्या शिखरापर्यंत कसा पोहोचतो, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, त्याचा प्रवास सोपा नव्हता. एखाद्याला ध्येयपूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात जो संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष हीच या चित्रपटाची कथा आहे.

याचा अर्थ असा की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आळस आणि नशिबावर विश्वास ठेवायचे सोडून तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ऐशोआरामी जीवन जगायचे असेल तर आजपासूनच तुमच्या करिअरचे नियोजन सुरू करा. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या सर्व गोष्टी विकत घेऊ शकणार नाही, ज्या कधीतरी आपल्याकडेही असतील, असा विचार तुम्ही चित्रपट कलाकारांकडे पाहून नेहमी करत असता.

स्वावलंबी व्हा

शालेय जीवनात जर तुम्ही तुमच्या करिअरचे नियोजन केले नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आज विधी सिंहलाही अशीच खंत आहे. ती गृहिणी आहे. गृहिणी असणं वाईट नाही, पण अनेकदा घरकाम करणाऱ्या गृहिणींना पैशांवरून पतीचं ऐकावं लागतं. तिचा पती रोज टोमणे मारतो की, ‘‘तू काही कमावत नाहीस, त्यामुळे जास्त बोलू नकोस.’’

विधीच्या शेजारी रहाणारी अनू एक बुटीक चालवते. बुटीकमधून ती महिन्याला ३०-३५ हजार रुपये कमावते. अशा प्रकारे ती घरबसल्या पैसे कमावते. तिचा पती मोहितही तिला पैशांवरून टोमणे मारत नाही. एवढेच नाही तर बुटीकमुळे अनूमध्ये विधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आहे.

तुम्हालाही आत्मविश्वासाने परिपूर्ण ऐशोआरामी जीवन जगायचे असेल तर लहानपणापासूनच तुमच्या करिअरचे नियोजन करा. तुम्हालाही गुचीच्या बॅग, जाराचे टॉप, लिवाइस, पँटलून जीन्स, अॅप्पलचा मोबाईल आणि बीएमडब्ल्यू कार हवी असेल तर तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करा. तुम्ही असे करिअर निवडा, जे ट्रेंडमध्ये असेल आणि करिअरसाठीचा कालावधी जास्त असेल, अतिरिक्त काम आणि अतिरिक्त अभ्यासदेखील करा, हे तुमच्या सीव्हीमध्ये अर्थात स्वपरिचयपत्रात प्लस पॉइंट्स म्हणजेच जमेची बाजू ठरेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें