आरोग्य परामर्श

* डॉक्टर ज्योती बाली, इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट बेबीसून फर्टिलिटी अण्ड आईवीएफ सेंटर

प्रश्न : माझं वय ४० वर्षे आहे. मला खूप जास्त वैजायनल डिस्चार्ज होतं. हे कंडिशन खूपच त्रासदायक वाटतं. असं का होतं आणि यावर उपाय शक्य आहे का?

उत्तर : सामान्यपणे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये वैजायनल डिस्चार्ज एक सामान्य समस्या आहे. तुमची स्थिती सामान्य नाही आहे. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. दोन्ही स्त्रावाच्या दरम्यान योनीमध्ये खाज, जळजळ, पांढरा रंगाचं दाट डिस्चार्ज, स्किन रॅशेज, सूज, वारंवार लघवीला होणं आणि लघवी करतेवेळी वेदनेसारख्या समस्या निर्माण होतात. असामान्य योनी स्त्रावाची अनेक कारणे असू शकतात. जसे की, यौनसंबंधाच्या दरम्यान होणारं संक्रमण रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं व ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या योनीमध्ये फंगल इस्ट नावाचा संक्रमण रोग होऊ शकतो. स्त्रिया सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कधीकधी गर्भाशय कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. तसंच सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं तर यावर उपचार केले तर निश्चितपणे ही समस्या बरी होऊ शकते. परंतु दुर्लक्ष वा बराच उशिराने उपाय केल्यानंतर गंभीर वा असाध्य रोगदेखील होऊ शकतो .

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. मला वारंवार एंडोमिट्रीओसीसची समस्या होत असते. मी सर्जरीद्वारे रिमुव्हदेखील केलं आहे. परंतु पुन्हा एंडोमिट्रीओसीस सांगितलं जातंय. मला पिरियड्समध्ये अधिक स्त्राव तसंच वेदना होतात.

उत्तर : गर्भाशयात होणारी समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील थर बनवणारा एंडोमिट्रीयम लाइनिंगमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि तो गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतो. कधी कधी एंडोमिट्रीयमचा थर गर्भाशयाच्या बाहेरच्या थरा व्यक्तीरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजनन अंगांमध्येदेखील पसरला जातो. ज्याला एंडोमिट्रीओसिस म्हटलं जातं. मोठया एंडोमिट्रीयम थरामुळे प्रजनन अंगात जसं फेलोपियन ट्यूब, अंडाशयाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. इंडोमिट्रीओसिस स्त्रियांमध्ये पिरीएडच्या दरम्यान अधिक ब्लीडिंग आणि वेदनेचं कारण देखील बनतं. यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो तर दुसरीकडे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये हे इन्फर्टिलिटीचं कारणदेखील बनतं. ही समस्या एखाद्या बाहेरच्या संक्रमणामुळे नसून शरीराच्या आंतरिक प्रणालीच्या कमतरतेमुळे होते. इंडोमिट्रीओसिसच्या अंडाशयापर्यंत पसरणाऱ्या या भागावरती सिस्टदेखील बनतं.

मेडिकल ट्रीटमेंटने आर्टिफिशियल मेनोपोजच्या माध्यमातून एंडोमिट्रीओसीसला रोखलं जातं. यासाठी हार्मोनल औषधं वा महिन्यातून एक इंजेक्शन पुरेसं असतं. याव्यतिरिक्त इंडोमिट्रीओसिसच्या समस्येने ग्रस्त रुग्णाला जर आई व्हायचं असेल तर यासाठी आययुआय आणि आयव्हीएफसारख्या स्पेशल ट्रीटमेंट आहेत. जर रुग्णाचे वय अधिक असेल आणि अनेक सर्जरी झल्या असतील तर गर्भाशय आणि ओवरीज काढून हिस्टरेक्टोमी याचा सर्वाधिक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : मी ७ महिन्याची गर्भवती आहे. माझं वय २८ वर्षे आहे. जसजशी वेळ जवळ येतेय, प्रसुतीबद्दल विचार करून मी घाबरुन जाते. कारण मी असं ऐकलंय की प्रसुतीच्या वेदना खूपच असहनीय असतात. मला जाणून घ्यायचंय की मी पेनलेस डिलिव्हरी करू शकते का? या पद्धतीने प्रसुती केल्यानंतर माझ्या व माझ्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम तर नाही ना होणार?

उत्तर : अलीकडे एपीड्यूरल एनेस्थेशियाद्वारे पेनलेस प्रसुती करणं खूपच सामान्य प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. तसंच मुलासाठी आणि आईसाठीदेखील या प्रक्रियेद्वारा प्रसुतीच्या असहनीय वेदनेपासून वाचू शकतात. या प्रक्रियेत एका छोटया कॅथेटरच्या मदतीने एपीड्यूरल आणि एनेस्थेशियाला लोअर बॉडीच्या एपीड्यूरल पार्टमध्ये टाकलं जातं. काही काळासाठी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. परंतु डॉक्टर आणि एनेस्थेशिया एक्सपर्टच्या देखरेखीखाली स्थितीला नियंत्रित केलं जातं.

प्रश्न : माझं वय ३८ आहे. मेडिकल तपासणीत माझ्या जननांगाच्या ट्यूबवर क्लोसिस आढळलं आहे. मला दुसरं मूल हवं आहे. परंतु अशा परिस्थितीत मी गर्भवती होणं शक्य आहे का? हा आजार माझ्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरतीदेखील परिणाम करू शकतो का?

उत्तर : गर्भाशय टीबी हा एक असा रोग आहे जो प्रामुख्याने स्त्रियांच्या जननांगांमध्ये जसं की अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनी व श्रोनिच्या आजूबाजूच्या लिंफ नोड्सला प्रभावित करतो. हा रोग प्रामुख्याने स्त्रियांच्या रिप्रोडक्शन वयाच्या दरम्यान प्रभावित करतो. अनेकदा वांझपणाचे कारण बनतं. जेनाईटल टीबीचा उपचार दोन स्तरावर केला जातो. पहिला स्तरांमध्ये दोन महिन्यापर्यंत कमीत कमी तीन अँटीटीबीच्या औषधांसोबत तसंच दुसऱ्या स्तरांमध्ये चार ते दहा महिन्यासाठी कमीत कमी दोन अँटीटीबीच्या औषधांसोबत कायम उपचार चालू राहतो आणि जेनाईटल पार्टमध्ये सर्जरीद्वारा उपचार केले जातात. उपचाराच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन करा. याच्या उपचारानंतर एआरटी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हे करावं लागणार.

आरोग्य परामर्श

* शिवानी कंडवाल, आहार विशेषज्ज्ञ, डायबिटीस एज्युकेटेड,, फाउंडर न्यूट्री वाईब्ज

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. कोविड -१९ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या केसांची चांगली काळजी घेऊन आणि त्यामध्ये तेल लावूनदेखील ते खूपच गळत आहेत. तुम्ही कृपया मला सल्ला द्या की मी माझ्या आहारात आणखी काय घेऊ शकते की ज्यामुळे माझे केस गळणे बंद होईल?

उत्तर : या अवस्थेला टॅलोजेन एफियुविएम म्हणतात. हे या आजारानंतर होऊ शकतं. यासाठी तुम्ही प्रोटीन आणि झिंकयुक्त आहार घ्या. जर तरीदेखील काही फरक पडत नसेल तर फेरीटीन, विटामिन डी ची टेस्ट करून घ्या. कारण याच्या कमतरतेमुळेदेखील केस गळू शकतात.

प्रश्न : माझं वय ३० वर्षे आहे आणि मी पीसीओडीची पेशंट आहे. मला माझ्या आहारात मी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

उत्तर : अलीकडे प्रत्येक ५ पैकी एका स्त्रीला तरी पीसीओडी आहे. याचं कारण आपली व्यस्त जीवनशैली. यासाठी तुमची दिनचर्या व्यवस्थित करा. तुमच्या आहारात साखर, मैदा, तळलेले पदार्थ, पॅकेट्स दूध, रिफाइंड तेल वगैरे काढून टाका. जेवढं होऊ शकेल तेवढया ताज्या (फायबर युक्त) भाज्या, फळं आणि मोड आलेले धान्य घ्या.

प्रश्न : माझा मुलगा अजिबात पोष्टिक खात नाही. त्याला फक्त पिझ्झा आणि पास्ता आवडतं. कृपया अशा आहाराचा सल्ला द्या जे पौष्टिकदेखील असेल आणि माझ्या मुलालादेखील आवडेल?

उत्तर : मुलांचा पौष्टिक आहार देण्यासाठी गरजेचं आहे की आहार दिसायला छान आणि रुचकरदेखील असावा. यासाठी भाजी पूर्ण बनवून पोळी वा पासत्यामध्ये टाका. याव्यतिरिक्त साध्या ब्रेड ऐवजी मल्टी ग्रेन ब्रेडचं सँडविच वा मल्टी ग्रेन पास्त्याचा वापर करा. नट्स आणि सिड्स शेक बनवून प्यायला द्या.

प्रश्न : माझं वय ४२ आहे आणि मला मधुमेह आहे. तुम्ही मला गोड पदार्थांचा पर्याय सांगा त्यामुळे मला जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा मी खाऊ शकेन?

उत्तर : मधुमेह तुमच्या वाईट जीवनशैलीमुळे होतो. सर्वप्रथम तुमची दिनचर्या व्यवस्थित करा आणि दररोज व्यायाम करा. याव्यतिरिक्त जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा तुम्ही एक खजूर, १०० ग्रॅम फळ, फ्रुट स्मुदी, डार्क चॉकलेट इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझी आई मधुमेहाची पेशंट आहे. तिने भात खाणे योग्य आहे का? दिवसातून किती वेळा आणि कोणता भात खायला हवा म्हणजे पांढरा का ब्राउन?

उत्तर : कोणताही नैसर्गिक आहार वाईट नसतो. परंतु आपण त्याचा सेवन कसं करतो आहोत हे पाहायला हवं. तुम्ही भात देऊ शकता, परंतु त्याची पेज काढून. ज्यामध्ये जेवढं भाताचं प्रमाण आहे तेवढीच दाळ वा भाजी मिसळून द्या. पांढरा ऐवजी ब्राऊन भात अधिक हेल्दी असतो.

प्रश्न : मी ३० वर्षांची आहे. माझंजन ४५ किलो आणि उंची ५ फूट ७ इंच आहे. माझं वजन खूपच वेगाने कमी होत आहे. कृपया करून याबाबत सल्ला द्या की मी काय खावं जेणेकरून माझं वजन वाढेल?

उत्तर : पहिल्यांदा हे गरजेच आहे की तुमचं वजन कमी होण्याचं कारण जाणून घेणं. यासाठी तुम्ही तुमची थायरॉईड टेस्ट करून घ्या. या व्यतिरिक्त तुमच्या आहारातील पौष्टिक तत्त्वांकडे खास लक्ष द्या. प्रोटीन, कार्बोहायड्रेट युक्त भोजन घ्या.

प्रश्न : माझी नखं खूपच कमजोर झाली आहेत. आठवडयामध्ये जेवढी वाढतात तेवढीच तुटतात. मी नखं वाढविणाऱ्या तेलाचादेखील वापर केला आहे परंतु यामुळे फारसा काही फायदा झाला नाही. कृपया करून मला सल्ला द्या की मला कोणता आहार घ्यायला हवा ज्यामुळे माझी नखं निरोगी होतील आणि वाढीसदेखील लागतील?

उत्तर : तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीन घ्या. कमीत कमी १ वा १.५ ग्राम प्रति १ किलोग्राम शरीराच्या वजनाच्या हिशोबाने प्रोटीन घ्या. यासाठी डाळी, सोयाबीन, पनीर, चिकन, दूध आणि दुधाने बनविलेल्या वस्तू खाऊ शकता. झिंक युक्त जसं की कडधान्ये, नट्स, दही इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे आणि नुकतीच कोविड -१९ ची रिकवरी केली आहे. मला प्रत्येक वेळी खूप आळस येतो. कृपया करून मी आहारात काय घेऊ शकते ते सांगा

उत्तर : कोविड -१९ नंतर अशा प्रकारची कमजोरी येणे खूपच सामान्य झालं आहे. परंतु डायटमध्ये बदल करून तुम्ही तुमची एनर्जी लेवल वाढवू शकता. तुमच्या आहारात एनर्जी वाढविणारे खाद्यपदार्थ वाढवा जसं की कडधान्य खाद्यपदार्थ, रताळी, डाळी, फळे, अंडी, चिकन मासे, सत्व इत्यादींचा आहारात समावेश करा. कोणत्याही आजाराच्या वेळी शरीरात इन्फ्लंमेशन वाढतं, ते कमी करण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या पदार्थांचा तुमच्या डायटमध्ये समावेश करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड अक्रोड, अळशीच्या बियांमध्ये असतं आणि जर तुम्हाला वाटतं की तरीदेखील तुम्हाला आराम मिळत नाही आहे तर तुम्ही त्याची सप्लीमेंट देखील घेऊ शकता.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर सागरिका अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित महिला आहे. माझी काही स्वप्ने आहेत, त्यामुळे मला सध्या आई व्हायचे नाही. जर मला वयाच्या ३५-३६ व्या वर्षी आई व्हायचे असेल तर यात काही अडचण येऊ शकते का? काही लोक म्हणतात की या वयात आई होणे शक्य नाही. ते खरे आहे का?

उत्तर : वाढत्या वयानुसार अंडयांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, त्यामुळे या वयात गर्भधारणा होणे कठीण होते. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला असेल तर यात काही अडचण नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या वयातही गर्भधारणा करता येते. यासाठी तुम्ही आयव्हीएफची मदत घेऊ शकता.

तुम्ही अजून तरुण आहात, त्यामुळे तुमच्या अंडयांचा दर्जा चांगला असेल. तुम्ही तुमची निरोगी अंडी गोठवू शकता जे तुमच्यासाठी भविष्यात आई होण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आयव्हीएफ उपचारदेखील सहज पूर्ण होतील. गोठवलेले अंडे तुमच्या पतीच्या शुक्राणूमध्ये मिसळले जाईल आणि प्रथम गर्भ तयार केला जाईल आणि नंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात रोपण केला जाईल. काही दिवसात तुम्हाला गर्भधारणेची चांगली बातमी मिळेल.

प्रश्न : मी ३५ वर्षांची आहे, माझ्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत, पण अजूनही गर्भधारणा होऊ शकलेली नाही. मला धूम्रपानाची ही सवय आहे. मी आई होऊ शकेन, असा काही मार्ग आहे का?

उत्तर : या वयात गर्भधारणा होण्यात समस्या येणे सामान्य आहे, परंतु याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. जर तुमचा पतीदेखील धूम्रपान करत असेल तर त्याला ही सवय सोडण्यास सांगा. तुमचे वय मोठे आहे, त्यामुळे लवकर गर्भधारणा होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या वयाबरोबर समस्या अजून वाढू शकते. यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर उपचाराने फायदा होत नसेल तर तुम्ही आयव्हीएफ उपचाराची मदत घेऊ शकता.

प्रश्न : मी ४० वर्षांची आहे. मी एकदा आयव्हीएफ उपचार केले, पण ते अयशस्वी झाले. मला पुन्हा आयव्हीएफचा प्रयत्न करायचा आहे. यात काही धोका आहे का?

उत्तर : आपण आयव्हीएफ उपचार अयशस्वी होण्याचे कारण स्पष्ट केले नाही. बरं, आयव्हीएफ उपचारांना कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच न करता ते पुन्हा करू शकता. होय, हे वारंवार केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. यशस्वी आयव्हीएफसाठी तणावापासून दूर राहा आणि वजन संतुलित ठेवा.

आजकाल आयव्हीएफ क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. डॉक्टरांच्या सल्याने आवश्यकतेनुसार तंत्र निवडल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते.

प्रश्न : मी ३५ वर्षांची विवाहित महिला आहे. मला आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने आई व्हायचे आहे आणि आशा आहे की हे तंत्रज्ञान यशस्वी होईल. म्हणूनच मला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भाची संख्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम करते काय?

उत्तर : गर्भधारणा होण्यासाठी, एका गर्भासह यशस्वी होण्याची शक्यता २८ टक्के असते, तर २ भ्रुणांसह यशस्वी होण्याची शक्यता ४८ टक्के आहे. पण यासोबत जुळी मुले होण्याची शक्यताही वाढते. जर तुम्हाला जुळया मुलांचा धोका पत्करायचा नसेल, तर तुम्ही एकच भ्रुण रोपण करून घेऊ शकता. यासाठी तुमच्या निरोगी अंडयाचा भ्रूण तयार केला जाईल आणि त्यानंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जाईल. यामुळे तुमची गर्भधारणा होण्याची शक्यतादेखील वाढेल आणि तुम्हाला जास्त समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

प्रश्न : मी ३१ वर्षांची वर्किंग वुमन आहे. मला हे जाणून घ्यायचे की आयव्हीएफमध्ये जुळी मुले किंवा अनेक मुले होण्याची शक्यता आहे का?

उत्तर : पूर्वीचे तज्ञ चांगल्या गर्भधारणेसाठी अनेक भ्रुण हस्तांतरणाची शिफारस करत असत, कारण तेव्हा हस्तांतरित केलेला गर्भ कमकुवत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण असे. यामुळे कधी-कधी जुळी किंवा अनेक मुले एकत्र जन्माला येत होती, पण आता काळ बदलला आहे आणि तंत्रज्ञानही बदलले आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे गर्भ कमकुवत आहे की नाही हे कळते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही १ किंवा जुळया मुलांची आई होऊ शकता.

प्रश्न : मी ३४ वर्षांची आहे, मी २ वर्षांपासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता मी आशा गमावत आहे. माझ्या मित्राने मला आयव्हीएफ तंत्राबद्दल सांगितले. मला जाणून घ्यायचे आहे की आयव्हीएफ तंत्रात काही धोका आहे का? या तंत्रामुळे माझ्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही का?

उत्तर : होय, आयव्हीएफ तंत्र हे आई होण्यासाठी वरदान ठरू शकते, परंतु त्याचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण आयव्हीएफ घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या दुष्परिणामातून जावेच लागेल असे नाही.

आयव्हीएफ उपचारात मुदतपूर्व बाळाचा जन्म होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गर्भधारणेदरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याची प्रत्येक गोष्ट कळावी म्हणून वारंवार तपासण्या केल्या जातात.

याशिवाय वागण्यात बदल, थकवा, झोप लागणे, डोकेदुखी, खालच्या ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे इत्यादी समस्यांचाही समावेश आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही या समस्या टाळू शकता.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर, सुदीप सिंग सचदेव, नेफ्रोलॉजिस्ट, नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गुरुग्राम

प्रश्न : मी २२ वर्षांची आहे. काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मला भीती वाटत होती की मला कोरोना तर झाला नसेल, पण तपासणीत माझ्या किडनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात आले. मला योगा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की ही समस्या आहाराद्वारे दूर केली जाऊ शकते का?

उत्तर : तुम्ही ज्या समस्येचा उल्लेख करत आहात त्याला हायपरफॉस्फेटमिया म्हणतात. हे फॉस्फरसच्या अतिसेवनामुळे होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासोबतच आहारात बदल केल्यास फॉस्फेटचे प्रमाणही कमी करता येते.

सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, प्रक्रिया केलेले मांस, प्रक्रिया केलेले चीज, जंक फूड, आईस्क्रीम इत्यादींचे सेवन कमीत कमी करावे. याशिवाय बीन्स, ब्रोकोली, कॉर्न, मशरूम, भोपळा, पालक आणि रताळे इत्यादींचे सेवनदेखील कमी करावे. अगदी मांस, मासे, कॉटेज चीज, मोझरेला चीज इत्यादींचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे. बरेच दिवस माझे पोट खालच्या भागात कधीही दुखू लागते. कधीकधी ही वेदना सौम्य असते तर कधी तीक्ष्ण असते. यासोबतच मला रात्री वारंवार लघवी होऊ लागली आहे, त्यामुळे मला जळजळ होण्याची समस्या होते. मला सांगा हे का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे?

उत्तर : तुम्ही सांगितलेली लक्षणे मूत्रपिंडाचा आजार दर्शवतात. सुरुवातीला या आजाराची काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून असे दिसते की हा त्रास किरकोळ नाही. तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. सर्व प्रथम आपण हे नेफ्रोलॉजिस्टकडून तपासले पाहिजे. जितक्या लवकर समस्येचे निदान होईल तितके चांगले, कारण निदान आणि उपचारात उशीर केल्याने केवळ तुमचा जीवच धोक्यात येऊ शकत नाही, तर तुम्हाला इतर अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो. सर्वात धोकादायक परिणामांपैकी किडनी रोगाची शेवटची पायरी, अशक्तपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या संबंधित रोगांची ओळख आहे.

रोग टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा आणि आवश्यक असल्यास आपल्या आहारातदेखील बदल करा. अधिकाधिक पेये, विशेषत: पाणी प्या, जेणेकरून मूत्रपिंड शरीरातून सोडियम, युरिया आणि विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकू शकतील. सोडियम किंवा मीठाचे सेवन कमीत कमी करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची नोकरदार महिला आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी माझ्या तब्येतीकडे कधीच लक्ष देऊ शकले नाही, त्यामुळे माझी किडनी जवळपास खराब झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे कुठले दुष्परिणाम आहेत का? समस्येपासून मुक्त होण्याचा दुसरा कोणताही मार्ग आहे का?

उत्तर : जेव्हा मूत्रपिंड निकामी होऊन अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हा डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणानेच त्यावर नियंत्रण मिळवता येते. डायलिसिस आठवडयातून एकदा किंवा त्याहूनही अधिक वेळाही केले जाऊ शकते, ते परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्यारोपणामध्ये खराब झालेले मूत्रपिंड निरोगी मूत्रपिंडाने बदलले जाते. ८० टक्के प्रत्यारोपण प्रकरणे यशस्वी होतात. प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये एकच भीती असते की शरीर कदाचित प्रत्यारोपणास नाकारणार तर नाही का? तथापि हा धोका पत्करणे महत्त्वाचे आहे, कारण निरोगी मूत्रपिंड तुम्हाला चांगले जीवन जगण्यास मदत करू शकते.

प्रश्न : मी ३२ वर्षांचा आहे. खरं तर अनेक दिवसांपासून मला माझ्या खालच्या ओटीपोटात असे दुखत आहे जणू कोणी सुई टोचत आहे. ही वेदना माझ्या प्रायव्हेट पार्टमध्येही जाणवत आहे, त्यामुळे माझे जगणे कठीण झाले आहे. कृपया मला सांगा की यापासून मुक्त कसे व्हावे?

उत्तर : हे दुखणे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते. आनुवंशिकता, औषधांचे दुष्परिणाम, लघवीत वारंवार संसर्ग, खनिज घटकांचे जास्त प्रमाण, पाण्याचे कमीत कमी सेवन इत्यादींमुळे खडे तयार होतात. कॅल्शियम किंवा यूरिक अॅसिड हळूहळू मूत्रपिंडात जमा होते आणि खडयाचा आकार घेते. सर्वप्रथम स्वत:ची तपासणी करा म्हणजे खरी समस्या काय आहे हे कळेल.

जर खडा लहान असेल तर काही औषधे आणि जास्त पाणी प्यायल्याने तो लघवीद्वारे बाहेर निघेल. जर तो मोठा असेल तर शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जाईल. त्यामुळे तपासणी करण्यास अजिबात उशीर करू नका.

प्रश्न : माझ्या एका मैत्रिणीचे किडनी प्रत्यारोपण होत आहे. किडनी दानासाठी डॉक्टरांनी माझी निवड केली आहे. तथापि मला यावर काही आक्षेप नसला तरी मला हे जाणून घ्यायचे आहे की याचे काही दुष्परिणाम आहेत का? किडनी दान केल्यानंतर कोणकोणती काळजी घ्यावी लागेल?

उत्तर : तू कोणाला तरी जीवदान देणार आहेस याचा मला आनंद आहे. तुला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण एक किडनी असूनही एक निरोगी आणि चांगले जीवन जगता येते. तुला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जसे की निरोगी जीवनशैली जगणे, वेदनाशामक औषधांचे सेवन कमी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेणे, शारीरिकदृष्टया सक्रिय असणे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे इत्यादी. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कधीही कुठला त्रास होणार नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षीय विवाहित महिला आहे. माझा रंग सावळा आहे. मी आता गरोदर आहे. असा काहीतरी उपाय सांगा की बाळ गोऱ्या रंगाचे होईल. आहाराने त्याच्यावर काही प्रभाव पडतो का? दुसरे काही घरगुती उपाय असतील, तर तेही सांगा? गृहशोभिकेच्या याच स्तंभात काही महिन्यांपूर्वी त्वचेच्या रंगामागे मिलेनोसाइटची माहिती दिली होती. असा काही उपाय आहे का की बाळाची मिलेनोसाइट अपरिणामकारक राहील व बाळ गोरेगोमटे होईल?

उत्तर : आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि इतर शारीरिक गुण उदा. उंचीप्रमाणेच आपल्या त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मिलेनोसाइट्सच्या घनत्वाचे गणितही आपले जीन्स निश्चित करतात. ते आपल्या आईवडील आणि इतर पूर्वजांशी जुळतात. त्यांना कशाही प्रकारे बदलता येत नाही.

तसेही एखाद्या व्यक्तिचे रूप-सौंदर्य केवळ त्याच्या रंगावरच अवलंबून नसते. अनेक सावळ्या रंगाचे लोकही खूप सुंदर दिसतात आणि अनेक गोरेगोमटे सामाजिक दृष्ट्या सुंदर नसतात. त्यामुळे आपण उगाचच स्वत:च्या व होणाऱ्या बाळाच्या रंगाबाबत एवढा विचार करू नका.

गरोदरपणानुसार उचित प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त आहार घ्या. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी पुरेशा प्रमाणात असावीत. जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला सर्व पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील.

प्रश्न : मी २८ वर्षांची तरुणी आहे. मला पाळी येत नाही. गेल्या काही दिवसात मी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपले पेल्विक अल्ट्रासाउंड करून घेतले होते. त्याच्या रिपोर्टनुसार, माझ्या युटेरसची साइज २९ मिलीमीटर १८ मिलीमीटर १३ मिलीमीटर आहे. मला पुढे कधी गर्भधारणा होईल का? मी काय केले पाहिजे, योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही तुमच्या अल्ट्रासाउंडचा पूर्ण रिपोर्ट पाठवला असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे युटेरसबरोबरच ओव्हरीजबाबतही माहिती मिळाली असती. राहिला प्रश्न युटेरसचा, तर युटेरस लहान असून, त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाहीए. याला हाइपोप्लास्टिक युटेरसचा दर्जा दिला जातो. हा विकार अनेक कारणांनी होतो. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

काही महिलांमध्ये युटेरस सुरुवातीपासूनच लहान असतो आणि ही स्थिती एखाद्या मोठ्या सिंड्रोमचा भाग असते. त्यामध्ये केवळ युटेरसच नव्हे, तर व्हेजाइनाचाही व्यवस्थित विकास होत नाही. काही महिलांमध्ये युटेरसचे लहान असणे त्या मोठ्या क्रोमोझमल विकाराचा भाग असतो, ज्याला टर्नर सिंड्रोम असे नाव दिले गेले आहे. त्यामध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता नसते. एखाद्या मुलीमध्ये हा लैंगिक अवयवांचा विकास अर्धवट राहतो, जेव्हा ती आईच्या गर्भात असते आणि आई सिंथेटिक इस्टरोजेन म्हणजेच डाईइथाइलस्टील्बेस्ट्रो घेते.

काही उदाहरणांत ही संपूर्ण समस्या हार्मोनल पातळीवर निर्माण होते. किशोरावस्थेत जेव्हा शरीर प्यूबर्टीसह होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या देखरेखीत स्वत:ला वाढत्या वयासाठी तयार करते आणि इतर सेक्शुअल गुणांसोबतच लैंगिक अवयवही परिपक्व होऊन मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकसित होतात, त्यावेळी अंतर्गत हार्मोनल गडबड झाल्यामुळे युटेरसचा विकास मध्येच अर्धवट राहतो. ही विकारमय स्थिती प्रामुख्याने पिट्युटरी ग्लँडमध्ये बनणाऱ्या प्रोलॅक्टिन हार्मोनच्या अधिकतेमुळे निर्माण होते.

आपला युटेरस का हाइपोप्लास्टिक म्हणजे अल्पविकसित राहिला, याची योग्यप्रकारे डॉक्टरी तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल की आपल्या मदतीसाठी काय केले जाऊ शकते? ही तपासणी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजी विभागामध्ये करू शकता. या तपासणीत बराच काळ लागेल आणि येणाऱ्या खर्चासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल. कारण स्पष्ट झाल्यानंतरही उपचार यशस्वी होण्याची शक्यता मर्यादित राहील.

जिथे आपली पाळी न येण्याचा प्रश्न आहे, तर त्याचे मूळही युटेरसचे हाइपोप्लास्टिक होणे आहे.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला वेळेवर पाळी येत नाही. बहुतेकदा निश्चित वेळे, २-४ दिवस निघून गेल्यानंतर येते. याचे काय कारण आहे? मी या समस्येसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे का? माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की हे योग्य नाहीए. त्यामुळे पुढे मला याचा त्रास  सहन करावा लागू शकतो. कृपया योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही असे काळजी करणे योग्य नाहीए. सत्य हे आहे की ज्या गोष्टीबाबत आपण काळजी करत आहात, ती गोष्ट अगदी सामान्य आहे. हे खरे आहे की बहुतेक महिलांमध्ये मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण हे सत्यही तेवढेच मोठे आहे की, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हे चक्र २६ दिवस, २७ दिवस, २९ दिवस किंवा मग ३० दिवसांचे असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात बनणाऱ्या लैंगिक हार्मोनचे वाढणे-कमी होणे, तिच्या शरीराच्या लयीवर अवलंबून असते, जी तिचे विशेष असते. एवढेच नव्हे, हे मासिक चक्र बऱ्याचशा अंतर्गत आणि बाहेरील तत्त्वांनी प्रभावित होऊ शकते. भौगोलिक स्थान परिवर्तन, जलवायू, व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एवढेच नव्हे, तर घरात किंवा हॉस्टेलमध्ये अन्य महिलांच्या मासिक चक्राचाही यावर प्रभाव पडताना आढळला आहे.

तुमचे मासिक चक्र ३०-३२ दिवसांचे आहे, तर यात काही विशेष गोष्ट नाही. याबाबत ना ही आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि ना ही अशा एखाद्या मैत्रिणीच्या सल्ल्याने काळजीत पडण्याची गरज आहे, जिला मासिकपाळीच्या नियमांबाबत नीट माहिती नाहीए. तपासणीची आवश्यकता तेव्हाच असते, जेव्हा मासिकपाळी उशिरा येण्याबरोबरच अनियमित असेल किंवा त्यात मासिक स्त्राव थोड्याच प्रमाणात होत असेल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४५ वर्षांची गृहिणी आहे. माझा नवरा कपडयांचा एक मोठा व्यापारी आहे आणि तो माझ्यापेक्षा ४ वर्षांहून मोठे आहेत. आमचा २२ वर्षांचा १ मुलगा आणि १९ वर्षांची १ मुलगी आहे. काही काळापूर्वीच फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी आमची युरिन, मल आणि रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, इतर सर्व अहवालांमध्ये तर कुठली काही कमतरता नव्हती, परंतु आम्हां सर्वांमध्ये व्हिटॅमिन-डी फारच कमी प्रमाणात मिळालं. आमचे खाणे-पिणे चांगले आहे, घरात हिरव्या भाज्या आणि फळे रोज येतात, प्रत्येकजण ते आनंदाने खातात, परंतु तरीही आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे. कदाचित असे तर नाही की हा चाचणी अहवालच चुकीचा असावा? निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आवश्यक असते? त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कोण-कोणते साधे उपाय करू शकतो? शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर : गेल्या एका दशकात देशाच्या विविध भागात व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी बरेचसे मोठे अभ्यास झाले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की निरोगी दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये केल्या गेलेल्या या विस्तृत अभ्यासात ५० ते ९४ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी असमाधानकारक आढळून आली आहे. आपल्या कुटुंबातदेखील ही कमतरता मिळणे यासाठी अनैसर्गिक म्हटले जाऊ शकत नाही.

तपासणी केल्यावर भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या या कमतरतेमागील अनेक कारणे आढळली आहेत. बहुतेक भारतीय शाकाहारी आहेत आणि शाकाहारी आहार, ज्यामध्ये भाज्या, कडधान्य (डाळी), अन्न, फळे यांचा समावेश आहे, व्हिटॅमिन डीच्या बाबतीत हे अत्यंत कमकुवत आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे शरीराच्या यंत्रणेद्वारे स्वत:च त्याचे उत्पादन करणे. जेव्हा सूर्याची अतिनील प्रकाश किरणे आपल्या त्वचेला वेधून त्यात असलेल्या ७ डायहायड्रोकोलेस्ट्रॉलवर आपला प्रभाव टाकतात तेव्हा त्याच रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ३ तयार होतो. हे खरं आहे की आपल्या देशावर सूर्य देवाची पूर्ण कृपा आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणे आपल्या त्वचेपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, आमचा गव्हाळी सावळा रंग, जो त्यामध्ये असलेल्या मेलेनिन रंगद्रव्यामुळे आहे, उरलेल्या अतिनील प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. तिसरे, आपल्या जीवनशैलीत आपल्याला उघडया उन्हात उठा-बसायलाही वेळ मिळत नाही.

शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, तूप, लोणी, पनीर आणि खुंबी तर मांसाहारींसाठी अंडयातील पिवळे बलक, मासे आणि डुकराचे मांस हे व्हिटॅमिन डी ३ चे नैसर्गिक स्त्रोत आहेत. परंतु शरीराची व्हिटॅमिन डी ३ ची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ चे पूरक आहार घेणे नेहमी आवश्यक असते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची मुख्य उपयोगिता हाडांमध्ये कॅल्शियम साठा करून ठेवण्यात आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम कमी होतो, ज्यामुळे मुलांमध्ये रिकेट्सची समस्या उद्भवते आणि प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होतात.

प्रश्न : सामाजिक अंतर, मुखवटा घालणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याव्यतिरिक्त कोविड १९पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो? अशा काही युक्त्या आहेत काय ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवू शकतो? काही होमिओपॅथी डॉक्टर म्हणतात की ऑर्सीनिक आणि कॅफर औषधे घेतल्यास आपण स्वत:मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करू शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर असे काही व्हिडिओदेखील चालू आहेत की दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पीत राहिल्याने कोरोना विषाणू जवळ येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे?

उत्तर : लॉकडाऊन असूनही शक्य तितके शरीर आणि मन स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्याच्या सर्व सामान्य उपायांकडे लक्ष द्या. घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा खोलीतच उठता-बसतांना साधे व्यायाम करा. रात्री ७-८ तासांची झोप घ्या. निरोगी संतुलित आहार घ्या..

अशी काही कामे करत राहा की मन प्रसन्न आणि आल्हाददायक राहील. घरामध्ये खेळले जाणारे खेळ, टीव्हीवरील विनोदी चित्रपट आणि मालिका, मुले व कुटुंबियांसह मनातील गोष्ट, घरातील वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या छोटया-छोटया गोष्टींनी मन निरोगी ठेवू शकता. नेहमीच टीव्हीवर कोविड १९शी संबंधित नकारात्मक बातम्या पाहत राहणे अजिबात चांगले नाही.

घरात कोणी धूम्रपान करत असेल तर त्यावर बंदी घाला. जर तुम्हाला अल्कोहोलची आवड असेल तर ते घेऊ नका. हे ते सुपरिचित उपाय आहेत, ज्याद्वारे शरीराची अंतर्गत बायोकेमिस्ट्री निरोगी राहते आणि ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अर्थात इम्युनिटीवरदेखील अनुकूल परिणाम होतो.

जिथपर्यंत होमिओपॅथ डॉक्टरांच्या दाव्यांची बाब आहे, तर आतापर्यंत त्यांचे कोणतेही वैज्ञानिक पुष्टीकरण झालेले नाही. म्हणून त्यांच्यापासून काही फायदा होत असेल हे सांगणे कठीण आहे. जिथपर्यंत दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पिण्याचे उपाय आहेत, त्यांच्या बाजूनेही कोणतेही ठोस पुरावे तर उपलब्ध नाहीत, परंतु जर कोणाची इच्छा असेल तर ते अवलंबण्यात काही नुकसानदेखील नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवा

प्रश्न : माझ्या पतीचे वय ५२ वर्षं आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या वडिलांचे व बहिणीचे दोघांचेही मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे झाले होते. वडिलांचे वय ६६ वर्षं व बहिणीचे वय ६२ वर्षं असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या कारणांमुळेच त्यांच्या प्रकृतीबाबत मला अधिक काळजी वाटते. ब्रेन स्ट्रोक हा आनुवंशिक आजार आहे का? यापासून बचाव करायचा झाल्यास काय उपाय करता येतील?

उत्तर : सद्यस्थितितील वैज्ञानिक माहितीनुसार ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूची विकार त्याच हानिकारक बाबींमुळे उद्भवू शकतो, ज्यामुळे हृदय विकाराचा धोका संभवतो. या बाबींमध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, अस्थिर लिपिड प्रोफाईल व कौटुंबिक रोगाची जनुके येतात.

यात उपाय म्हणून नियमित रक्तदाब तपासून घेणे व तो १३०/८० पर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करणे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे व फास्टींग ब्लड शुगर ११० मिलिग्रॅम व लाकोसिलेटेड हेमोग्लोबिन ६.५च्या आत ठेवणे. धुम्रपान करत असाल तर सोडून द्या, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण असू द्या, संतुलित आहार घ्या, स्थूल होणार नाही याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा व अतिताण घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित बेबी अॅस्प्रीनचा डोस घेणे ही लाभदायक ठरेल. बेबी अॅस्प्रिनच्या डोसमुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी न होण्यासही मदत होते.

तरीही कधी त्यांना कुठल्याही प्रकारच्या पक्षाघाताची लक्षणे दिसलीच तर वेळ न दवडता त्यांना इस्तिळात दाखल करा. बऱ्याचदा मेंदूच्या विकारांमध्ये योग्य प्रकारे प्रथमोपचार मिळाल्यास परिस्थिती आटोक्यात राखता येते, अन्यथा पक्षाघात किंवा इतरही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

प्रश्न : मी १८ वर्षांचा असून बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपासून जवळपास दर आठवड्याला १-२ वेळेस तरी रात्री स्वप्नंदोष होत आहे. माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे की मला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायला हवं नाहीतर त्याचे माझ्या तब्येतीवर दुष्परिणाम होतील. ही समस्या खरंच एवढी गंभीर आहे का? की मला खरंच एखाद्या डॉक्टरकडे जायला पाहिजे? मी काही वैद्य-हकीम यांच्या जाहिरातीदेखील पाहिल्या आहेत. ज्यात स्वप्नदोषावर खात्रीशीर उपचारांचा दावा केला जातो. माझी मानसिक स्थिती खूप विचलित झाली आहे. मी काय करावे? उपाय सुचवा.

उत्तर : तुम्ही गोंधळून जाऊ नका. किशोरावस्थेतून युवावस्थेत प्रवेश करताना आपले शरीर अधिक संवेदनशील झालेले असते. लैंगिक हारमोन्स वाढीस लागलेले असतात. अंड ग्रंथी शुक्राणू तयार करू लागलेल्या असतात. प्रजनन  प्रक्रियेत वीर्य बनू लागते आणि पौरूषत्त्वाची इतर शारीरिक लक्षणंही दिसू लागतात. या अवस्थेत काही किशोरावस्थेतील मुलांना व युवकांनाही रात्री झोपताना उत्तेजना जागृत झाल्यामुळे वीर्यपतन होणे सामान्य लक्षण आहे. बोली भाषेत याला आपण स्वप्न दोष असे म्हणतो.

खरं तर हा कुठलाही आजार नसून एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत ही शारीरिक घटना कुठल्याही वयोगटातील पुरुषांमध्ये आढळते. या क्रियेला स्वप्नमैथुन म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण याचा संबंध कामुक स्वप्नांशी आहे, जी झोपेतून उठल्यानंतर आठवतही नाहीत. ही क्रिया म्हणजे कामेच्छांचा निचरा होण्याचा नैसर्गिक मार्ग आहे असे मानसोपचार सांगतात.

पण लक्षात ठेवा चुकूनही वैद्य हकिम यांच्या नादी लागू नका. कित्येक वैदू बाबा काहीही भ्रमाक गोष्टी सांगून अनेक युवकांचे युवा जीवन उध्वस्त करतात.

प्रश्न : मी एक ५४ वर्षीय महिला आहे. माझ्या उजव्या कानावर एक भुरकट काळ्या रंगाचा तीळ आहे. मागील काही दिवसांपासून मला असं वाटतंय की तीळाचा आकार वाढलेला आहे हे काही आजाराचे लक्षण तर नाही ना? माझ्या एका मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की कधीकधी तीळामध्येसुद्धा कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो. हेखरं आहे का? मला काय करावे लागेल

उत्तर : हे खरे आहे की तीळ एक सेंटिमीटर ने वाढला, रंगात काही फरक दिसू लागला, खाज सुटू लागली किंवा त्यातून रक्त येऊ लागले तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घेतली पाहिजे. अनेक वर्षांच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला गेला आहे की त्यातील ३,००० पुरुषांमधील एक व १०,८००मधील एका स्त्रिच्या तीळामध्ये मेलोनोमा नामक कॅन्सर उद्भवू शकतो.

सुरुवातीलाच जर शस्त्रक्रिया करून मुळापासून तीळ काढून टाकला तर यापासून अडचणीतून मार्ग काढता येऊ शकतो. जर दुर्लक्ष केले गेले तर मेलोनोमा शरीरात पसरल्यामुळे हा रोग जीवघेणा ठरू शकतो.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे. मला मासिक पाळीच्या वेळी खूप त्रास होतो. असह्य होऊन मी डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरने अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अल्ट्रासाउंड करून घेतलं, तेव्हा डॉक्टरने एक गाठ असल्याचं सांगितलं. हा रिपोर्ट पाहून डॉक्टरने मला तीन महिने औषध घ्यायला सांगितलं. आता मी बरी आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की लग्नानंतर मला आई बनण्यात अडथळा येईल. याचा अर्थ काय? मी पुन्हा अल्ट्रासाउंड करवून घ्यावं का? डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मी चिंतेत आहे. मी काय करू?

उत्तर : तुमच्या प्रश्नामध्ये हे स्पष्ट केलेलं नाही की पाळीदरम्यान तुम्हाला नक्की काय त्रास होतो. तुमची पाळी उशिराने येते आणि कमी रक्तस्राव होतो की यावेळी तुम्हाला पेल्विकमध्ये वेदना होतात की तुम्हाला आणखी काही त्रास होतो? तुम्ही पेल्विक अल्ट्रासाउंडमध्ये ज्या गाठीचा उल्लेख केला ती विविध प्रकारची असू शकते. तिचा संबंध विविध रोगांशी असू शकतो.

तुम्ही तुमच्या समस्येबाबत सविस्तर लिहिलंत आणि तुमचा पेल्विक अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाठवला तर बरं होईल, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं गांभीर्य समजून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकू.

तिसऱ्यांदा अल्ट्रासाउंड करायचं की नाही याचा निर्णयही आजाराची माहिती मिळाल्यानंतरच घेता येईल. अल्ट्रासाउंडसारखी कोणतीही तपासाणी करण्यामागचा उद्देश एकच असतो की डॉक्टरला आजाराचं योग्य निदान करता येईल आणि उपचार सुरू होतील.

प्रश्न : माझ्या मुलीचं वय ११ वर्षे आहे. काही महिन्यांपासून तिची छाती भरू लागली आहे. मी तिला जेव्हा अंघोळ घालते, तेव्हा ती शरीराच्या त्या भागाला हात लावू देत नाही. तिथे वेदना होतात असं ती सांगते. हे नॉर्मल आहे की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. इतक्या लहान वयात स्तनांचा विकास व्हायला सुरूवात होणं योग्य आहे का?

उत्तर : बऱ्याचदा मुली वयात येण्याचं वय हे ८ ते १३ वर्षे असतं. शरीरात सेक्स हार्मोन्स बनायला सुरूवात झाली की हळूहळू नारीत्त्वाच्या शारीरिक खुणा प्रकट होऊ लागतात. स्तनांचा आकार वाढतो. कामेंद्रियांचा विकास होतो. काखेत आणि नाभीच्या खाली केस उगवू लागतात. अंतर्गत जननांग म्हणजेच गर्भाशयाच्या आकारात वाढ होते, तसेच क्रियात्मक दृष्टीनेही परिवर्तन येऊ लागते. मुलगी रजस्वला होते.

प्रजनन इंद्रियांमध्ये प्रौढत्त्व येण्याचा एक क्रम असतो. बऱ्याचदा मुलींमध्ये या परिवर्तनाचे पहिले लक्षण स्तन विकासाच्या रूपात दिसून येते. ८ ते १३ वयात सुरू झालेली स्तन विकासाची प्रक्रिया ५ टप्प्यांमध्ये पूर्ण होते. सर्वात आधी स्तनाग्र म्हणजे निपल आणि त्याच्या भोवतीचे गुलाबी वर्तुळ एरिओलामध्ये रक्तप्रवाह वाढतो. मग ते वर्तुळ वाढते आणि स्तनकळी दिसू लागते. पुढच्या टप्प्यात दोघांचाही आकार वाढतो. चौथ्या टप्प्यात स्तनाग्र आणि त्याच्या भोवतीचे वर्तुळ विकसित होऊन स्तनापासून वर येते. शेवटच्या टप्प्यात स्तनाचा आकार वाढतो. यामुळे स्तनाग्राच्या भोवतीचे वर्तुळ पुन्हा स्तनावर उठून दिसते आणि फक्त स्तनाग्र पुढच्या बाजूला वर येते.

जेव्हा स्तनकळी विकसित होत असते, तेव्हा शरीराच्या या भागाला स्पर्श केल्यास वेदना होणे साहजिक आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. पण ही अतिरिक्त संवेदनशीलता टाळण्यासाठी तुम्ही मुलीला स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला देऊ शकता.

प्रश्न : माझं वय २० वर्षं आहे. मला कायम अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत असतो. मी काही दिवस डॉक्टरचे उपचारही घेतले. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या सांगण्यावरून घरगुती उपायही करून पाहिले. पण काहीच फरक पडला नाही. काहीतरी उपाय सांगा.

उत्तर : अॅसिडिटी आणि गॅसचा संबंध तुमच्या जीवनशैलीशी आहे. आपण काय खातो, कसं खातो, किती तणावाखाली राहतो, कसे कपडे घालतो, आपला दिनक्रम कसा असतो अशा सगळयाचा आरोग्यावर परिणाम होतो. खाण्याच्या बाबतीत थोडीफार पथ्य पाळा, टेबल मॅनर्सवर लक्ष द्या. दिनक्रमामध्ये छोटे-छोटे बदल घडवून आणा.

तेलकट पदार्थ आणि अधिक चरबीयुक्त पदार्थांमुळे असिडिटी होते. टॉमेटो, कांदा, लाल मिरची, काळी मिरची, संत्रे, मोसंबी, चॉकलेट इत्यादींपासून दूर राहा. याचप्रकारे काही फळभाज्या आणि फळे यांमुळेही गॅस होतो. शेंगा, फ्लॉवर, मुळा, कांदा, कोबी यांसारख्या भाज्या आणि सफरचंद, केळं आणि जर्दाळू यांमुळेही पोटात गॅस होतो. प्रथिने बाधक ठरतात. सिझलर्ससारख्या गरम-गरम सर्व्ह होणाऱ्या पदार्थांमुळेही गॅस होतो. त्यामुळे असे पदार्थ टाळा. जेवताना काही टेबल मॅनर्स पाळणेही महत्त्वाचे आहे. जेवताना छोटे-छोटे घास घ्या. पचपच आवाज करत खाल्यामुळेही बरीचशी हवा आत जाते. पाणी किंवा इतर पेये पिताना घाई करू नका.

पूर्ण दिवस एकाच जागी बसून राहण्यापेक्षा थोडया-थोडया वेळाने फेऱ्या मारणं आतडयांसाठी चांगलं असतं. ताणावर नियंत्रण असणंही आवश्यक आहे. व्यायाम, हास्य इत्यादींमुळे ताणातून मुक्ती मिळते.

ओव्हर द काउंटर औषधांमध्ये एन्टासिड किंवा गोळया उदा. डायजिन, म्युकेन, जेल्यूसिल आणि आम्लरोधी औषधं उदा. रेनिटिडिन, पँटोप्राजोल, लँसोप्राजोल आणि ओमेप्राजोल यामुळे आराम मिळू शकतो. यामुळे बरं वाटलं नाही तर एखाद्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

आरोग्य परामर्श

* पद्मश्री प्रोफेसर डॉ. महेश वर्मा, डायरेक्टर व प्रिंसिपल, मौलाना आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस

प्रश्न : दातांमधील संवेदनशीलतेचे तात्पर्य काय आहे?

उत्तर : जेव्हा थंड किंवा गरम पेय अथवा खाद्यपदार्थांद्वारे दातांमध्ये वेदना किंवा बेचैनी जाणवते, तेव्हा त्याला दंत संवेदनशीलता म्हणतात. दातांच्या वरील थर (इनॅमल) हटल्यामुळे आतील थर ‘डँटीन’ तोंडाच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यातील नसांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.

प्रश्न : दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या सामान्यपणे आढळते का?

उत्तर : हो, ही समस्या खूप सामान्य आहे. सामान्यपणे २०-५० वयोगटांतील लोकांमध्ये ही समस्या असते.

प्रश्न : संवेदनशीलता किती प्रकारची असते?

उत्तर : हिरड्यांच्या समस्येमुळे संवेदनशीलता.

* दात झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दात हिरड्यांच्या ठिकाणी झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दातांना कीड लागल्यामुळे संवेदनशीलता.

* आम्लामुळे होणारी संवेदनशीलता.

* दंतप्रक्रियेनंतर होणारी संवेदनशीलता.

प्रश्न : संवेदनशीलतेमागे काय कारणे आहेत?

उत्तर : जर तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केली नाही, तर प्लाक एकत्र झाल्याने दातांच्या वरील थर (इनॅमल) हटतो व दातांमध्ये संवेदनशीलता सुरू होऊ लागते.

* वयाबरोबर हिरड्या दातांना सोडू लागतात. विशेषत:  जर स्वच्छता ठेवली नाही. यामुळेही संवेदनशीलता निर्माण होते.

* कडक ब्रशच्या वापराने व वेगाने मागे-पुढे ब्रश केल्यानेही दात झिजतात व संवेदनशीलता जाणवते.

* अनेक लोकांना रात्रीचे ब्रश करायची सवय असते. त्यामुळे दातांच्या वरचा थर हटतो व संवेदनशीलता सुरू होते.

* दातांना कीड लागल्याने बॅक्टेरिया इनॅमलला नष्ट करतात, त्यामुळे दात संवेदनशील होतात.

* दातांना जर मार लागला, तर त्याचा परिणाम आतील थरांवर होऊ शकतो व संवेदनशीलता उत्पन्न होऊ शकते.

* माउथवॉश, ज्यात आम्लता असते, त्याचा वापर इनॅमलच्या थराला हटवतो व संवेदनशीलता निर्माण होते.

* आम्लयुक्त खाद्यपदार्थांमुळेही इनॅमलच्या थराला नुकसान पोहोचते व संवेदनशीलता निर्माण होते.

* काही दंत प्रक्रियेनंतरही संवेदनशीलता निर्माण होते. उदा. दातांची सफाई, क्राउन लावल्यानंतर, दात भरून घेतल्यानंतर इ. काही आठवड्यानंतर ही संवेदनशीलता बरी होते.

प्रश्न : दंत संवेदनशील झाल्यावर कोणते उपचार केले पाहिजेत?

उत्तर : जर दातांवर कॅलकुलस किंवा टार्टर जमा असेल, तर मशीनद्वारे ते काढलं जातं. त्याबरोबरच संवेदनशीलतेसाठी टूथपेस्ट, जिला डिसेंसिटायजिंग टूथपेस्ट म्हणतात व माउथवॉशचा उपयोगही लाभदायक ठरतो.

* फ्लोराइड वार्निश इनॅमल व डेंटीनला मजबुती देतो व संवेदनशील दातांच्या वेदना व बेचैनीला कमी करतो.

* ज्या हिरड्या दात सोडत आहेत, त्यांच्यासाठी मुळांवर बाँडिंग एजेंट लावल्याने खूप प्रभाव पडतो. तोंडाच्या दुसऱ्या एखाद्या भागातून हिरडी घेऊन ग्राफ्टिंगही करू शकता.

* दातांना कीड लागल्याने संवेदनशीलता कमी होण्यासाठी त्यात योग्य मसाला भरू शकता. जर कीड आतपर्यंत लागली असेल, तर रूट कॅनलचा उपचार करून क्राउन लावता येईल.

* दातांच्या झिजण्याच्या सवयीसाठी माउथ गार्डद्वारे उपचार केले जातात, जेणेकरून दातांचे अजून पुढे नुकसान होऊ नये.

* दातांना मार लागल्यानंतर क्षतीनुसार उपचार केले जातात. मसाला भरणे किंवा रूट कॅनलचा उपचार व क्राउन लावला जातो.

प्रश्न : दातांच्या संवेदनशीलतेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे?

उत्तर :  तोंडाची स्वच्छता चांगल्याप्रकारे केली पाहिजे. दिवसातून २ वेळा ब्रश करण्यासोबतच माउथवॉशचा वापर करणेही चांगले असते.

* मऊ केसांच्या ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश करण्याची योग्य पध्दत स्विकारली पाहिजे.

* फ्लोराइडयुक्त माउथवॉश, ज्यात आम्ल नसेल, त्याचा वापर केला पाहिजे.

* ज्या खाद्यपदार्थांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असेल, त्यापासून दूर राहिले पाहिजे.

* दंत विशेषज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून दातांना कीड लागलेली असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल किंवा अन्य कोणती समस्या असेल, ज्यामुळे संवेदनशीलता निर्माण होऊ शकते, त्यावर सुरुवातीलाच उपचार होईल, तर ते पुढे वाढणार नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. शोभा गुप्ता, मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर, आयव्हीएफ तज्ज्ञ

प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. माझं वजन ५५ किलो आहे. मी एंडोमिट्रीयममध्ये तापमानांसंबंधित पीसीआर तपासणी केली आहे. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आहे. मी गेल्या ३ महिन्यांपासून रह्यूमेटोइड घेत आहे. गेल्या महिन्यात माझं आयव्हीएफ अयशस्वी झालं होतं. आणखी एक आयव्हीएफ होऊ शकतं का आणि माझ्या पतीने मायकोबॅक्टीरियम तपासणी करावी का?

उत्तर : तुमचं वय वाढत आहे. ३५ व्या वर्षांनंतर महिलांमध्ये अंडाशयाची गुणवत्ता खालावत जाते. शिवाय तुमची पीसीआर तपासणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तुम्ही आयव्हीएफची पुढची तपासणी करून घेऊ शकता. पण हिस्टेरोस्कोपीच्या मदतीने गर्भाशयाचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आयव्हीएफ अयशस्वी होण्याचे कारण एएमएचं मूल्य आणि इंट्रालिपिड इन्फ्यूजनच्या मदतीने प्रत्यारोपणाच्या सुधारणेतील यशाच्या दरात वाढ होत आहे की नाही हे जाणून घेणं आवश्यक आहे. पतीमध्ये तापाची लक्षणं असतील तर त्यांचीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. लग्नाला २ वर्षं झाली आहेत. लग्नानंतर मी गर्भधारण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी लग्नाआधी गर्भपात करून घेतला होता. त्यानंतर माझी पाळी अनियमित झाली आहे आणि पाळीमध्ये रक्तस्त्रावही कमी होतो. मी काय करू सांगा?

उत्तर : पाळीदरम्यान रक्तस्त्राव कमी होण्याची बरीच कारणं असू शकतात. कारण जाणून घेण्यासाठी प्राथमिक परीक्षण म्हणून तुमच्या पॅल्विकचं अल्ट्रासाउंड केलं पाहिजे. यात तुमच्या गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या रूंदीचं माप घेतलं जाईल. हार्मोन्सचीही तपासणी होईल. त्यानंतर अश्रमैंस सिंड्रोमची माहिती करून घेण्यासाठी हिस्टोरोस्कोपी चाचणी महत्त्वाची आहे. याशिवाय जननेंद्रियाच्या तापमानाची तपासणी करण्यासाठी त्याची बायोप्सी करून तपासणीसाठी पाठवण्यात येईल. कारण पाळीच्यावेळी रक्तस्त्राव कमी होण्याचं हे सामान्य कारण आहे.

प्रश्न : माझं वय २९ वर्षं आहे. मला सतत व्हजायनल इन्फेक्शन होत असतं. कृपया यावर उपाय सांगा?

उत्तर : व्हजायनल इन्फेक्शनची बरीच कारणं असू शकतात. इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही तपासणीच्या रिपोर्टचा उल्लेख केलेला नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही समस्या कायम जाणवते. तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामध्ये तुमच्या समस्येमागचं खरं कारण समजू शकेल.

प्रश्न : माझं वय ३२ वर्षं आहे. माझी पाळी अनियमित आहे. गोळ्या घेतल्यावरच पाळी येते. माझी मुलगी ५ वर्षांची आहे. ती ऑपरेशनने झाली होती. मला दुसरं मुल हवं आहे. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर : औषध घेतल्याशिवाय तुम्हाला पाळी येत नसेल तर तुम्ही तपासणी करून घ्या. यासाठी तुम्ही स्त्रीराग तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. त्या तुम्हाला अल्ट्रासाउंडसह इतर तपासण्या करायला सांगतील. यामुळे तुम्हाला खरं कारण समजू शकेल. पाच वर्षांपूर्वी ऑपरेशनने मुलगी झाली होती. म्हणजे दुसरं मूलही ऑपरेशनने होईल असं काही नाही. पण गरोदर राहण्याआधी तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. आणखी २ वर्षं तरी लग्न करण्याची माझी इच्छा नाही. जास्त वयामुळे आई बनताना काही अडथळे येणार नाहीत ना?

उत्तर : उशिरा लग्न झाल्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. तुम्हाला इतक्यात लग्न करायचं नसेल तर तुम्ही थांबू शकता. पण गर्भधारणा करण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असेल. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेतलात तर तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल.

प्रश्न : मी १९ वर्षांची आणि अविवाहित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझी पाळी आलेली नाही. याआधीही असं झालं होतं की मला ४ महिने पाळी आली नव्हती. त्यावेळी मला स्त्रीरोग तज्ज्ञांने प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन घ्यायला सांगितलं. त्यानंतर माझी पाळी नियमित सुरू झाली. नुकतीच मी एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. त्यांनी मला सोनोग्राफी करण्यास सांगितली. त्यात कळलं की माझ्या युटरसचा आकार लहान आहे. अनियमित पाळीचं हेच कारण सांगितलं गेलं. कृपया यावर उपाय सांगा.

उत्तर : तुम्ही काळजी करू नका. सुरूवातीच्या १-२ वर्षांत पाळी अनियमित आणि कमी असू शकते. सामान्यत: त्यावेळी युटरसचा आकार छोटा असतो. तुम्ही सर्व रिपोर्ट्स सांभाळून ठेवा आणि एक थायरॉइड टेस्ट करून घ्या. रिपोर्ट नॉर्मल आले तर काळजी करू नका आणि थ्री डायमेन्शन अल्ट्रासाऊंड करून घ्या. यामुळे युटरसमधील समस्येची माहिती होईल. जर युटरस आणि पाळी सामान्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉन्ट्रासेप्टिव पिल्सचा वापर करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें