* गरीमा पंकज

३७ वर्षीय विद्या ही शाळेत प्राचार्य आहे. तिची मुलगी आठवीच्या वर्गात असून नवरा एका खासगी कंपनीत मॅनेजर आहे. म्हणायला त्यांचे जीवन बऱ्यापैकी स्थिर आहे. तिला काही अडचणही नाही, ज्यासाठी ती आपले डोके लढवेन. पण प्रत्यक्षात ती मनाने खूप अस्वस्थ आहे. कधी शाळेची कामगिरी तर कधी नात्यांशी निगडित अपेक्षा, कधी मुलीची चिंता, तर कधी पतीवर संशय म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोंधळामध्ये निमग्न असते.

तिच्या मनात विचारांचे वादळ सुरूच असतात, याचा परिणाम म्हणजे ती तणावात असते. चिडचिडेपणा तिच्या स्वभावाचा एक भाग बनला आहे. यामुळे तिने बऱ्याचवेळा अनेक संकटांचा सामनाही केला. तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक हास्य अदृश्य असते. नात्यातही कडवेपणा वाढू लागला आहे. परिणामी, आनंदी आयुष्य असूनही ती आनंदी नाही, निरोगी दिसत असली तरीही निरोगी नाही.

आज आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचे झेंडे गाढलेले आहेत. आरोग्य आणि विज्ञान या क्षेत्रातील प्रगतीमुळे आपण विकासाचा कळसदेखील गाठला आहे. आपण प्रत्येक प्रकारे आधुनिक झालो आहोत. आमच्याकडे सर्व सुविधांची सोय आहे, ज्यांद्वारे आपण पाहिजे तेव्हा संपर्क साधू शकतो, आपण इच्छित ठिकाणी जाऊ शकतो. आपल्या मनाची कामे करू शकतो. तरीही आपण कुठे न कुठेतरी दुखी आहोत. कुठली न कुठली गोष्ट आपल्या मनात सतत चालू राहते आणि आपण टेन्शनमध्ये पडतो.

काय आहे अत्याधिक विचार करणे

सर्व प्रथम आपण अति विचार करण्यास एक रोग म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. जरी आपल्याला असे वाटते की यातून कोणतेही नुकसान होत नाही, परंतु सत्य हे आहे की गरजेपेक्षा अति-विचार करणे आपल्या क्षमतेत अडथळा आणू शकते.

या संदर्भात कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या डॉ. श्वेता शर्मा सांगतात :

ओव्हरथिंकिंगची काही लक्षणे

* संभाषणादरम्यान समन्वय राखण्यात अडचण.

* मनातल्या मनात सतत तुलना करत राहणे.

* प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक पैलूबद्दल विचार करणे.

* मागील अपयश आणि उणीवांबद्दल सतत विचार करणे.

* भविष्यातील कामे आणि उद्दीष्टांबद्दल अत्यंत निराश राहणे.

* एखाद्या दु:खी अनुभवाबद्दल सर्वकाळ बोलणे.

* आपली भीती कमी करण्यात अक्षम वाटत राहणे.

या रोगाचे परिणाम

जे लोक जास्त विचार करण्याच्या समस्येशी संघर्ष करतात त्यांना गंभीर मानसिक समस्या उद्भवतात आणि ते नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असतात. वारंवार येणाऱ्या वाईट विचारांमुळे आणि भीतीमुळे असे लोक सामाजिक मेळावे आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यासारख्या छोटया-छोटया कामांमध्येदेखील मागे राहतात. यामधून बरीच उर्जादेखील गमावली जाते, कारण अशा लोकांची मने अनावश्यक कल्पनेचा विचार करून-करून कंटाळत राहतात. या समस्येने ग्रस्त लोक नकारात्मकतेला इतके बळी पडतात.

अशा लोकांच्या सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. हे लोक आपले मित्र, प्रेमी एवढेच नव्हे तर नोकरीही गमावतात कारण ही समस्या हळूहळू मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये रूपांतरित होते. याचा परिणाम म्हणून ही समस्या व्यक्तीच्या मनावर अजून अधिराज्य गाजवते. या परिस्थितीपासून दूर जाण्याचा ट्रेंडही धोकादायक आहे. लोक सहसा अत्याधिक जेवण आणि मद्यपान यासारख्या गोष्टींचा अवलंब करून ते समस्या टाळण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईटच परिणाम होतो.

अति-विचार टाळण्याचे मार्ग

या समस्येपासून मुक्त होणे शक्य आहे. आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्याची आणि सकारात्मक मार्गाने या आजारास आपल्या जीवनातून काढून टाकण्याची आवश्यकता आहे :

* ज्या विचारांमध्ये आपण बऱ्याचदा हरवतो अशी वाक्ये आणि विषयांबद्दल एक नोट बनवा. त्यांच्याकडे पहा आणि विचार वाचण्यास प्रारंभ करा.

* आपण ज्या गोष्टींबद्दल विचार करत राहता त्या संबंधित कृतीभिमुख उत्तरे मिळवा. जरी आपल्याला प्रश्नांमध्ये मग्न होणे अधिक स्वारस्यपूर्ण वाटत असेल, परंतु आपले ध्येय असे कोणतेही निराकरण शोधणे असले पाहिजे, ज्यातून काही परिणाम निघेल.

* चुकांमधून आपण काय शिकू शकता हे स्वत:ला विचारा जेणेकरून आपल्याला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू नये.

* स्वत:साठी थोडा वेळ घ्या. एकांतात बसून आपल्या समस्यांचे चांगले निराकरण काय असू शकते याचा विचार करा.

* जेव्हा आपल्याला आवश्यक वाटेल तेव्हा कोणाचीही मदत घेण्यास संकोच करू नका.

जर आपले मन आपल्या पूर्ण नियंत्रणात असेल तर यापेक्षा सुंदर मालमत्ता दुसरी कोणतीही नाही. कल्पनांना व्यवस्थितपणे मार्ग दाखविल्यास आपल्या प्रत्येक इच्छेचे वास्तवात रूपांतर होऊ शकते. योग्य उपाययोजनांनी, आपण अति विचार करण्यापासून आपले संरक्षण करू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...