कथा * माधव गवाणकर

मुंबईचा माणूस गावी, कोकणात येतो तो आंबे-फणस खायला. ताजी फडफडीत मच्छीहीसुद्धा कोकणपट्टीवरची शान आहे. त्यामुळे बागबागायतीत रमणारी आणि मांसमच्छीचं जेवण उत्तम रीतीने करणारी सुगरण बायको सागरला हवी होती. घर, शेतीवाडी सांभाळून तिने आईवडिलांबरोबर गावी आरामात राहावं आणि सागर जेव्हा कधी मुंबईच्या नोकरीतून रजा काढून घरी येईल, तेव्हा त्याचीही सेवा करावी अशी त्याची साधी अपेक्षा होती. सागरला तशीच मुलगी-बायको म्हणून मिळाली. थोडी फटकळ होती, पण दिसायला खूप सुंदर होती.

मधुचंद्राच्यावेळी तिने बरेच नखरे, नाटकं केली. ‘तुमचा स्टॅमिना वाढवा की! मला नीट सुख मिळाले नाही’ अशीही तक्रार केली. खरंतर नॉर्मल पुरूष प्रणयात जसा, जितका रमतो, तेवढा सागर रमला होता. पण तो फार लवकर दमला असं भासवून बायकोने त्याला खिजवण्याचा, खचवण्याचाच प्रयत्न केला. तरीही सागरने काही मनाला लावून घेतलं नाही. बायकोचा गैरसमज दूर करता येईल  अशी त्याला आशा होती. नोकरीमुळे त्याला मुंबईला परतावं लागलं. त्याची ती नाटकी बायको म्हणाली, ‘‘ मला या वाळवंटात टाकून तुम्ही कशाला दूर जाता?’’ पण तिला खरं तर नवरा गावात नकोच होता. कारण तिचे इतर मित्र तिच्या गळाला गावले नसते.  नवऱ्याची नजर व धाक याचा तिला तिटकारा होता. माहेरी तिचं वर्तन स्वैरच होतं. नाव नयना असलं तरी गावातली पोरं तिला मैना  म्हणू लागली होती.

सागर तिला प्रेमाने फोन करायचा. तेव्हा ही सतत कुणाबरोबर तरी बोलण्यात दंग असायची. सागरने विचारणा केली तर उगीच सबबी देत सांगायची की माहेरच्यांचे, कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणींचे सारखे फोन येतात. पण आता सागरला संशय येऊ लागला की फोनवर तिचे मित्र तर नसतील? नयना घरकाम टाकून गावभर भटकते असेही सागरला त्याच्या आईने सांगितले होते.

एकदा अचानक मुद्दामच न सांगता सागर गावाकडे आला. एसटी स्टॅन्डवर उतरताच त्याच्या लक्षात आलं की नयना स्टॅन्डसमोरच्या मैदानात एका तरूणाशी बोलत उभी आहे आणि नंतर बाइकवर डबलसीट बसून ती त्याच्याबरोबर निघूनही गेली. तो तरूण तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान व कॉलेजमध्ये शिकणारा बड्या बापाचा बेटा वाटत होता. नयना जणू त्याची प्रेयसी असावी तशी त्याला चिकटून बसली होती.

नंतर घरात त्यावरून सागर व नयनाचं मोठं भांडण झालं. नयनाने स्पष्ट शब्दात सांगितलं, ‘‘मित्र केले तर काय बिघडलं? तुम्ही तिकडे मुंबईत राहता. इथे गावी काय मी अशीच तडफडत राहू? मला इच्छा होणार नाही का? माझी हौस मी पुरवली तर एवढा जळफळाट का होतो तुमचा? स्वत: ‘नॉर्मल’ आहात का?…’’

‘‘मी नॉर्मलच आहे. तू सेक्सच्या बाबतीत हावरट आहेस. परत त्या बाइकवाल्याबरोबर गेलीस तर तुला हाकलून देईन,’’ सागरचा पारा चढला होता.

‘‘तुम्ही काय मुंबईत असेच बाईशिवाय राहता का? तुमचीही असेलच ना कुणी तरी?… जास्त बोललात तर सगळ्यांना सांगेन मी की सागर मला सुख देऊ शकत नाहीत. म्हणून मला दुसरा साथिदार शोधावा लागतो.’’ हे सर्व ऐकून जणू काही सागरवर वीजच कोसळली होती. या नाटकी, ऊनाड, लिपस्टिक लावून सगळीकडे फिरणाऱ्या मैनेला आपण घालवून दिलं तर ही आपली खोटी बदनामी करणार…आणि इथेच आईकडे ठेवलं तर ही आता कुणाबरोबर असेल? काय करत असेल? या टेन्शनं आपलं लक्ष मुंबईत कामामध्ये लागणार नाही अशा पेचात तो सापडला.

सागरला त्या रात्री झोप लागली नाही. त्याने नयनाकडे पाठ फिरवली होती. अशी क्षणात खोटं रडणारी, क्षणात हसणारी, मोठमोठ्याने ओरडून लोक जमवणारी, तमाशा करणारी, धमकी देमारी बायको आपल्या वाट्याला यावी या जाणीवेने सागर भडकला होता. त्याच्या मनात एक वादळ उठलं. नेहमी धमकावणाऱ्या त्या उनाड मैनेला त्यानेही मग धमकी दिली, ‘‘नयना, तुझ्या त्रासाला कंटाळून मी नक्की आत्महत्त्या करणार आहे…आणि लिहून ठेवणार आहे की माझ्या चारित्र्यहिन उनाड बायकोने मला छळून, धमकावून, खोटी बदनामी आणि बदमाषी करून मला आत्महत्त्येला प्रवृत्त केलं आहे. असं प्रवृत्त करणं, छळणं हा गुन्हा आहे. तुझ्यासारख्या उनाड मैनेला जेलचा पिंजराच योग्य आहे. तुझी चौकशी होणार हे नक्की…’’ ही मात्रा मात्र लागू पडली. सागरच्या संभाव्य आत्महत्त्येची मात्रा लागू झाली. कारण ती एक टांगती तलवारच होती. नयना घाबरली. कायद्याचा, पोलिसांचा वचक असतोच. ‘असं काही करू नको, मी बरबाद होईन,’ असं म्हणू लागली. मग सागरने तिला त्याच्याबरोबर मुंबईलाच ठेवण्याचं ठरवलं. तिने घाबरून ते मान्य केलं. मित्रांनी फोन करू नये म्हणून तिने फोन नंबरही बदलला. मुंबईत ते दोघं एकत्र राहतात. तिने आपल्या वर्तणूकीत सुधारणा केली आहे. आता ते दोघं पतिपत्नी म्हणून आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...