* प्रतिनिधी

आजकाल नात्यामधील संतुलन आणि एकमेकांप्रती धैर्य, भावना संपत चाललेली आहे. यामुळेच विवाहानंतर पती-पत्नी एकमेकांना समजून न घेता छोटया-छोटया गोष्टींवरून वाद घालू लागतात. यावरुन पुढे हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशावेळी नात्यात अंतरंगता आणि अतूटता कायम राखण्यासाठी लग्नापूर्वी समुपदेश करुन घेणे गरजेचे आहे.

विवाह समुपदेशकांकडून नवविवाहित किंवा विवोहच्छूक जोडपी आपल्या समस्यांचे तसेच शंकाचे निराकरण करून घेऊ शकतात. अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून नात्यात वितुष्ट निर्माण होते. याचे कारण लग्नापूर्वी त्यांना नाते निभावण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते.

मानसशास्त्रज्ञ डॉ. सपना नागगौडा यांचे म्हणणे आहे की, ‘‘विवाहपूर्व समुपदेशन हे स्वीकारवृत्ती विकसित करायला शिकवते. नात्यांमधील संबंध, गरजा, विस्तार, मर्यादा, तडजोड इत्यादींसाठी मनाची पूर्वतयारी करणे. समुपदेशनाने भविष्यातील अनेक संकटांना टाळता येते. परंतु आजही आपल्या समाजात पत्रिकेलाच महत्त्व दिले जाते. पण विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे प्रत्यक्षात त्या व्यक्तिसह आयुष्यभर जोडीदार म्हणून आपण राहू शकतो का हे ठरवता येते. तुमच्या जोडीदाराच्या संपूर्ण आयुष्याची ब्ल्यू-प्रिंटच तुमच्यासमोर सादर केली जाते. काहीवेळा गरजेनुसार कौटुंबिक समुपदेशनही केले जाते. लग्न यशस्वी होण्यासाठी संवाद साधणे हेच महत्त्वाचे आहे.’’

विवाह समुपदेशन हे स्वथ्य आणि नाते या दोन गोष्टींशी जोडलेले असतात. समुपदेशनादरम्यान वैवाहिक जीवनात सामान्यपणे येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, अडचणींतून बाहेर येण्याचे उपाय, विवाह यशस्वी बनवण्याची माहिती दिली जाते. नात्यांसंबंधीचे समुपदेशन नवविवाहितांला नव्या वातावरणात जुळून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

समुपदेशनाचे फायदे

लग्नाला संदर्भात मुलगी-मुलगा दोघांच्याही मनात शारीरिक संबंधांव्यतिरिक्त नाते निभावण्याविषयी अनेक प्रश्न असतात. पण या प्रश्नांची उत्तरे मित्र-मंडळींकडे वा कुटुंबाकडे नसतात. अशावेळी विवाह समुपदेशक हीच अशी व्यक्ती असते, जी आपल्या शंकांचे निरसन करू शकते. विवाह समुपदेशनामुळे ज्या गोष्टींवर बोलायला दोघांना संकोच वाटतो, त्या गोष्टींवर ते मोकळेपणाने बोलू लागतात. मग दोघांमध्येही चांगला संवाद प्रस्थापित होतो.

विवाह हे जीवनातील असे एक वळण आहे, ज्यामुळे तुमची जीवनशैली पूर्णत:  बदलून जाते. विवाहापूर्वीच्या समुपदेशनामुळे विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांना येणाऱ्या नव्या जीवनशैलीला समजून त्यानुसार स्वत:ला नव्या वातावरणात समरस होण्यास मदत मिळते.

विवाहानंतर प्रत्यक्षात तुम्ही प्रेमी युगुल न राहाता पति-पत्नी बनता. घरातील नव्या जबाबदाऱ्यांमध्ये होणाऱ्या चुकांचे एकमेकांवर खापर फोडणे आणि आरोप-प्रत्यारोप करणे यांमुळे नातेसंबंधांना तडा जातो. अशावेळी जबाबदाऱ्यां समजून घेणे आणि त्या व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठीच समुपदेशनाची आवश्यकता असते. समुपदेशनातून विवाहसंबंधित बाबी लक्षात घेतल्यामुळे एकमेकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या जास्त चांगल्याप्रकारे समजू लागतात.

विवाह समुपदेशक हे विवाहीत जोडप्यांना मदत करतात कारण वर्तमानाबरोबरच भविष्यातील गोष्टी जसे की कुटुंब नियोजन, सासरच्या मंडळींसोबतच्या नातेबंधातील नियोजन, अर्थ नियोजन इ. बाबत योजना आखून त्यांच्या नात्यात फक्त प्रेमच नाही तर व्यवहारीक विचारही आणतात.

विवाह समुपदेशक जोडप्यांशी फक्त सकारात्मक गोष्टींवरच नव्हे तर ते अशा गोष्टींवर बोलतात, ज्यावर ते बोलू इच्छित नाहीत वा संकोचतात, याउलट लग्न करण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुम्ही खरेच एकमेकांसाठी बनलेले आहात का? तुम्ही भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्टया एकमेकांना साथ देऊ शकता का? तुमच्या नात्यासंबंधी दोघांचेही विचार सारखे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरावरून तुम्ही समजू शकता की तुम्ही खरंच लग्नाला तयार आहात की नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...