* डॉ. आरएसके सिन्हा, इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

स्वच्छ पाणी प्रत्येक व्यक्तिची मुलभूत गरज आहे. प्रदूषित पाणी खूप घातक ठरू शकते. स्वच्छ पाण्याला युनायटेड नेशन्सद्वारे मनुष्याची मुलभूत गरज मानले गेले आहे. तरीही जगभरात जवळपास १.८ मिलियन लोक प्रदूषित पाण्यामुळे मरतात.

पाण्याबाबत चार महत्त्वपूर्ण गोष्टी

प्रमाण : प्रत्येक व्यक्तिला रोज पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, सॅनिटेशन आणि हायजिनसाठी २० ते ५० लीटर पाण्याची आवश्यकता असते.

विश्वसनीयता : पाण्याची उपलब्धता विश्वासार्ह असली पाहिजे. मोसम मग कुठलाही असो, व्यक्तिला प्रत्येक स्थितीत पाणी मिळाले पाहिजे. जर पाण्याचा स्त्रोत विश्वासार्ह नसेल किंवा मोसमी असेल, तर याचा परिणाम व्यक्तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर पडतो.

गुणवत्ता : पाण्याच्या वितरणासाठी उचित आणि विश्वासार्ह प्रणाली असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल मिळेल.

खर्च : स्वच्छ पाण्याचा विश्वसनीय स्त्रोतही महत्त्वाचा ठरला नसता, जर व्यक्तिला ते मिळाले नसते. यात पैसे आणि वेळ दोहोंचा प्रश्न आहे.

स्वच्छ पाणी यासाठीच आवश्यक

स्वच्छ पाणी पोषण देते : मनुष्याचे शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले असते. त्याने पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून त्याचे शरीर सर्व काम सुरळीत करत राहील. त्याबरोबरच पाणी तोंडाची स्वच्छता करण्यासाठीही आवश्यक आहे. ते रक्ताची तरलता सुरळीत ठेवण्यास मदत करते. रक्ताच्या माध्यमातून पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत पोहोचवते.

विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते : स्वच्छ व ताजे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. मग ते विषारी पदार्थ शरीरात बनलेले असो किंवा बाहेरून शरीरात प्रवेश केलेले असो अथवा प्रदूषित पाण्यासोबत शरीरात प्रवेश केलेले असो.

शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राखते : स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यायल्याने शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राहते. ते अन्न पचवण्यास ते शरीरात शोषून घेण्यास मदत करते. शरीराचे तापमान सामान्य ठेवून त्याला आरोग्यदायी बनवते.

पेशींना ऊर्जा देते : जेव्हा पेशींना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, तेव्हा त्यांच्यात वेदना आणि जखडलेपणा सुरू होतो. त्यामुळे पेशींना निरोगी बनवण्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे.

पाणी मूत्रपिंडांसाठी खूप आवश्यक : जर व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पित नसेल, तर त्याच्या किडनीमध्ये मूतखडा आणि संक्रमणाची शक्यता वाढते. विशेषत: गरम वातावरणात. याबरोबरच पाणी केस, त्वचा आणि नखांना निरोगी राखण्यास मदत करते. पाण्याने पसरणारे बहुतेक आजार प्रदूषित किंवा घाणेरड्या पाण्याने होतात.

अस्वच्छ पाण्याने होणारे १० आजार

डिसेंट्री : या आजाराची अनेक लक्षणे आहेत- उलटी येणे, पोटात मुरड आणि गंभीर डायरिया. अक्यूट डिसेंट्रीप्रकरणी व्यक्तिला ताप येऊ शकतो आणि मलाबरोबर रक्तही पडू शकते.

डायरिया : डायरिया घाणेरड्या पाण्याने होणारा सर्वात सामान्य आजार आहे. हा बहुतेकदा पाण्याने पसरणाऱ्या वायरसने होतो. याचे मुख्य लक्षण आहे, पातळ आणि पाण्यासारखी मलप्रवृत्ती. त्यामुळे व्यक्तिला डिहायड्रेशन होऊ शकते. नवजात आणि लहान मुलांना तर मृत्यूही येऊ शकतो.

कॉलरा : हा बॅक्टेरियाने होणारा आजार आहे. त्यामुळे व्यक्ती गंभीर डिहायड्रेशन आणि डायरियाने पीडित होतो. जे लोक आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवत नाहीत, त्यांच्यात याची शक्यता जास्त असते. पाण्यासारखे शौचास झाल्यास शरीरातून तरल पदार्थ आणि इलेक्ट्रोलाईट निघून जातात आणि रुग्ण गंभीर डिहायड्रेशनचा शिकार होतो. काही वेळा गंभीर डायरियाच याचे मुख्य लक्षण असते.

टाइफाइड : भोजन आणि पाण्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे टाइफाइड होतो. ज्या ठिकाणी सॅनिटेशन सुविधा नसतात, त्या ठिकाणांवर हा सहजपणे पसरतो. अति ताप, पोटदुखी, डोकेदुखी, रॅशेस, पेशींमध्ये कमकुवतपणा याची मुख्य लक्षणे आहेत. काही गंभीर प्रकरणात इंटरनल ब्लीडिंगही होऊ शकते.

हॅपिटाइटिस ए : शौचालयांतून येणाऱ्या पाण्यामुळे हॅपिटाइटिस ए सहजपणे पसरतो. सॅनिटेशन म्हणजेच साफसफाई न ठेवल्यास हा आजार सहजपणे पसरतो. या आजाराची लक्षणे आहेत – ताप, थकवा, डायरिया, उलटी, भूक न लागणे, कावीळ इ. गंभीर प्रकरणी लिव्हर फेल्योरही होऊ शकते.

हुकवर्म (जंत) : हुकवर्म असे परजीवी आहेत, जे मलाच्या माध्यमातून पसरतात. अर्थात, हे पाण्याच्या माध्यमातून आपला नवीन होस्ट शोधतात. जर व्यक्तिने हुकवर्मचा लार्वा गिळला, तरी हा आजार होऊ शकतो. पोटदुखी, जखडलेपणा, ताप, भूक न लागणे, रॅशेस, मलातून रक्त जाणे इ. याची लक्षणे आहेत.

स्टमकफ्लू : हा असा आजार आहे, ज्यामुळे पोट आणि आतड्यांत जळजळ आणि सूज येते. हा बॅक्टेरिया किंवा वायरसने पसरतो. याची मुख्य लक्षणं आहेत – डायरिया आणि उलटी. हा आजार सर्व वयाच्या लोकांना होतो. लहान मुलांमध्ये तर खूप सामान्य आहे.

पोलिओ : पोलियोमाइलिटिसला सामान्यपणे पोलिओ म्हटले जाते. हे अक्यूट व्हायरल संक्रमण आहे, जे प्रदूषित पाण्याने पसरते. हा शरीराच्या केंद्रीय तंत्रिकातंत्रावर परिणाम करतो. याची मुख्य लक्षणे आहेत – ताप, डोकेदुखी, चक्कर येणे इ. शेवटी रुग्ण पॅरालाइसिसचा शिकार होतो.

लॅड पॉइजनिंग : लॅड पॉइजनिंग लॅडयुक्त पाणी प्यायल्याने होते. असे पाणी नेहमी जुन्या पाइपातील दूषित पाण्यामार्फत मिसळते. हा आजार मुलांसाठी खूप घातक आहे. हा अनेक समस्यांचे कारण बनू शकतो. उदा. अवयव क्षतिग्रस्त होणे, तंत्रिकातंत्रावर वाईट परिणाम, रक्ताची कमी, हाय ब्लडप्रेशर, किडनी रोग इ.

ई कोलाई : लहान मुले आणि वयस्करांमध्ये याच्या संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. जर मांस चांगल्याप्रकारे शिजले नसेल, तर हा विना पाश्चयुरिकृत उत्पादनाच्या सेवनाने याची शक्यता वाढते. पाण्यासारखे मल, मलातून रक्त येणे, पोटदुखी आणि जखडलेपणा याची मुख्य लक्षणे आहेत. मलातून रक्त येणे असे लक्षण आहे, ज्यात व्यक्तिने लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...