– मधु शर्मा कटिहा

कोरोना काळ असा काळ आहे ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती. कोरोनाव्हायरसचा कहर अशाप्रकारे झाला आहे, की मनुष्य ज्याला सामाजिक प्राणी म्हटले जाते, त्यालाच समाजापासून अंतर बनवून राहणे भाग पडत आहे. हा असा काळ आहे जेव्हा अडचणीदेखील नव्या नव्या आहेत आणि त्यांचे निराकरणदेखील. कोरोना आता इतक्या लवकर जाणार नाहीए. त्यामुळे कोरोना काळात घेतले जाणारे काही निर्णयदेखील आता पुष्कळ काळापर्यंत सोबत राहतील. एक नजर टाकूया विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या त्यांच्या बदलांवर, जे येणाऱ्या भविष्यात जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहेत.

डिजिटल क्रांती

लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रांत इंटरनेटवर अवलंबित्व वाढले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन जीवनाची महत्त्वाची अंगे बनून समोर आली आहेत. एका रिपोर्टनुसार भारतात लॉकडाऊनदरम्यान इंटरनेटच्या वापरात १३ टक्के वाढ झालेली आहे.

नव्या मालिकांची शूटिंग न झाल्यामुळे टीव्हीवर जुने कार्यक्रम पुन्हा दाखवले जात आहेत. यामुळे मनोरंजनासाठी लोक इंटरनेटचा आधार घेत आहेत. जवळपास १.५ करोड लोकांचे नेटफ्लिक्स जोडले जाणे इंटरनेटवर लोकांचे अवलंबित्व दाखवते.

शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात झाली आहे. शिक्षण तज्ज्ञांचे मानणे आहे, की उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती आता दूरची गोष्ट नाही. भविष्यात या गोष्टीवर विचारविनिमय करून शिक्षणाचा काही भाग वर्गात, तर काही ऑनलाईन करवला जाऊ शकतो.

या दिवसांत विविध कार्यालयांमधील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये बैठका गुगल, हँग आउट आणि झुमसारख्या अॅप्सवर होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्र्यांच्या आपसातील मिटींग्स आणि विविध क्षेत्रांवर नजर ठेवण्याचे कार्यदेखील ऑनलाईन केले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे हे रूप एका मर्यादेपर्यंत भविष्यातदेखील आपलेसे केले जाईल. कार्यालयांत दररोजच्या मिटिंगमध्ये खाणे-पिणे आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेत पुष्कळ खर्च होत होता.

सरकारी अधिकारी दीपक खुराना यांचे म्हणणे आहे, की येणाऱ्या काळात मिटींग्स ऑनलाइनदेखील होऊ लागतील. यामुळे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होईल.

टेक्निक्सच्या नव्या वापरापासून फिल्मी जगतदेखील वेगळे राहिलेले नाही. विशेषज्ञांच्या अनुसार लॉकडाऊननंतर जेव्हा फिल्म आणि टीव्ही सिरियल्सचे शूटिंग होईल तेव्हा सोशल डिस्टंसिंग लक्षात घेत अंतरंग दृश्य प्रत्येक कलाकाराकडून वेगवेगळे करवून घेऊन शूट केले जातील आणि त्या तुकडयांना टेक्निकच्या सहाय्याने जोडले जाईल.

मास्कची सोबत

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क घालणे अशात अनिवार्य झाले आहे. मास्क आता दीर्घकाळापर्यंतचा साथीदार असणार आहे. याचा भविष्यात वापर फक्त व्हायरसपासून बचाव असणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधी देणारादेखील ठरेल.

वाईट काळाचा संधीसारखा वापर करीत बाजारात आतापासूनच विविध प्रकारचे मास्क येऊ लागले आहेत. भारतात मधुबनी आणि मंजुषा पेंटिंगवाले मास्क, डिझायनर्सनी तयार केलेले, प्रिंटेड आणि मेसेज लिहिलेले, तसेच सुती कापडांचे तीन थर असणारे आणि कप मास्क आलेले आहेत.

मूकबधिर ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्यांचे हावभावावरून बोलणे समजतात आणि समजावतात. मास्कमध्ये चेहरा लपला जाण्याने त्यांना समस्या होऊ नये यासाठी पारदर्शक मास्क बनवण्याचादेखील निर्णय घेतला गेलेला आहे.

मास्क लावण्याने व्यक्तिचा अर्धा चेहराच दिसतो. परिणामस्वरूपी कित्येक वेळा ओळखणे कठीण होते. ही गोष्ट लक्षात घेत केरळच्या कोट्टायम आणि कोचीमधील काही डिजिटल स्टुडिओमध्ये मास्कवर चेहऱ्याचा तो भाग प्रिंट करण्याचे कार्य सुरू केले आहे, जो मास्कच्या पाठीमागे लपला जात होता. हा मास्क लावल्यावरदेखील व्यक्ती ओळखण्यात अडचण येणार नाही. हे टेक्निक लवकरच भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये येणार आहे.

हे तर आता निश्चित आहे, की मास्क भविष्यात जीवनाचे महत्त्वाचे अंग बनेल. हे घालणे आता किती आवश्यक होणार आहे, हे दर्शवण्यासाठी बीच वेअर बनवणाऱ्या इटलीच्या एका डिझायनरने बिकिनीसोबत मॅचिंग मास्क बनवून एका मॉडेलला फोटोमध्ये घातलेले दाखवले आणि त्याला ट्रायकिनी नाव दिले.

स्वच्छतेशी संबंध

कोरोना काळात सगळे स्वच्छतेविषयी सावध झाले आहेत. वारंवार साबणाने हात धुणे, फळे, भाज्या मीठ किंवा कोमट पाण्याने धुणे आणि घराच्या आजूबाजूच्या भागाला सॅनिटाईझ करणे शिकले आहेत. स्वच्छतेची ही सवय येणाऱ्या काळात दररोजच्या सवयींमध्ये सामील होईल. लोकांच्या जागोजागी थुंकून घाण पसरवण्याच्या सवयीवरदेखील आता लगाम लागेल. कोरोनाव्हायरसचे भय लोकांच्या मनात राहील आणि ते स्वत: थुंकण्याची सवय सोडण्यासोबतच ते करणाऱ्या लोकांनादेखील अवश्य टोकतील.

बिना बँड बाजा आणि वरातीचे विवाह

लॉकडाऊनमध्ये बहुतेक लग्ने स्थगित होत आहेत, परंतु काही जोडयांनी कोर्टात विवाह केला आहे आणि काहींनी फक्त कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करवून घेतला आहे. मागच्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात सोनू आणि ज्योतीचा विवाह १० लोकांच्या उपस्थितीत झाला. जिथे सोनू फक्त ३ लोकांच्या वऱ्हाडासोबत सासरी पोहोचला, तिथे ज्योतीच्या घरून पाच सदस्य या विवाहात सामील झाले.

लॉकडाऊन ३.० मध्ये गृह मंत्रालयाद्वारे प्रस्तुत केलेल्या सूचनांच्या अनुसार विवाह समारंभात ५० लोकच सामील होऊ शकतात, तरी काही राज्यांनी ही संख्या आणखी कमी ठेवलेली आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी हे योग्यदेखील आहे. कोरोना काळानंतरदेखील दीर्घकाळापर्यंत समारंभांमध्ये गर्दी न जमवून मर्यादित संख्येत लोकांची उपस्थिती राहील अशी आशा आहे. याचे एक कारण कोरोनाच्या भयामुळे आपसात अंतर ठेवणे आहे, तर दुसरे कारण व्यर्थ खर्च रोखणे असेल.

कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे खर्च चहूकडून कमी करण्याची सवय आता लावावी लागेलच. अर्थ तज्ञांचे मानणे आहे की शंभर वर्षात असे आर्थिक संकट आलेले आहे.

तुम्ही आहात तर आम्ही आहोत

कोरोना विरुद्ध लढल्या जाणार या युद्धात डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. समाज त्यांचे महत्त्व जाणत आहे आणि त्यांना सन्मानितदेखील केले जात आहे. आत्तापर्यंत समाज, जो सफाई कर्मचाऱ्यांपासून अंतर ठेवून राहायचा, शक्यता आहे की आता समजेल की यांची एका दिवसाची अनुपस्थितीदेखील किती जाणवते. आता यांना यथोचित सन्मान दिला जाईल.

जीवनात कुटुंबाची भूमिकादेखील या लॉकडाऊनदरम्यान सगळे समजून चुकले आहेत. दिल्लीच्या पटेल नगरमध्ये राहणाऱ्या मनीषचे म्हणणे आहे की रोजच्या धावपळीच्या जीवनात त्यांना ना मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळायची आणि ना आपल्या सासू-सासऱ्यांसोबत. लॉकडाऊनदरम्यान सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची जी संधी मिळाली आहे त्यामुळे आपसातील बंध विकसित झालेला आहे. भविष्यातदेखील अशाच प्रकारे वडीलधारे नव्या पिढीच्या समस्यांना समजून घेतील तसेच नवीन पिढी त्यांच्या अनुभवांनी स्वत:ला उजळवत राहील. कौटुंबिक सदस्यांचे बॉण्डिंग आता दिवसेंदिवस मजबूत व्हावे हीच वेळेची मागणी आहे.

प्रत्येक स्थितीत आनंदी

लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत जीवन सुखकर बनवण्याचे कार्य कोणत्या न कोणत्या रूपात होत राहिले आहे. पहिला लॉकडाऊन होताच स्वत:ला चिंतामुक्त ठेवून मन रमण्याचे विविध उपाय शोधण्याची कसरत सुरू झाली. काही घरांमध्ये विविध रेसिपीज बनल्या, तर कुठे शिवणकाम, पेंटिंग, पुष्परचना इत्यादींच्या मदतीने स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न झाले. काही लोकांनी जुने छंद पुन्हा आजमावले, तर काहींनी नवी कला शिकण्यात रुची दर्शवली.

नोएडाचे रहिवासी सुमित किचनमध्ये पाय ठेवत नव्हते, परंतु लॉकडाऊनदरम्यान आपली पत्नी वंदिताकडून त्यांनी जेवण बनवायला शिकले.

गुरुग्रामच्या राहणाऱ्या दिव्याने लग्नाआधी ब्युटीशियनचा कोर्स केला होता. आपल्या या कलेला उपयोगात न आणू शकण्याने त्या नेहमी निराश होत असत, परंतु जेव्हा सलुन न उघडू शकल्यामुळे त्यांनी पतीचे केस कापले तेव्हा लक्षात आले की गुण कधीच वाया जात नाहीत.

तरुण वर्ग लॉकडाऊनदरम्यान जंक फुडपासून दूर राहून संगीत ऐकणे आणि वेब सिरीज आधी पाहण्यात मन रमवणयासोबतच सोशल डिस्टंसिंगचेदेखील पालन करीत आहे.

हे तर सगळेच समजून चुकले आहेत की कोव्हिड-१९ आपला पिच्छा लवकर सोडणार नाहीए. सिनेमा, पार्टी, रेस्टॉरंट आणि सुट्टीच्या दिवशी गर्दीच्या जागी फिरणे आता दूरचे स्वप्न आहे. त्यामुळे घरात राहून आता प्रत्येक स्थितीत आनंदी मनस्थिती बनवून कोरोनाव्हायरससोबत, दूर राहण्याच्या मार्गावर चालावे लागेल.

कोरोना काळाने सर्वांनाच जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग दिला आहे. रस्ता नवीन आहे तर याची आव्हानेदेखील वेगळी आहेत. व्यक्तिगत, सामाजिक आणि आर्थिक जीवनात समस्यांशी लढताना भविष्याच्या उत्तममतेसाठी प्रयत्न होत आहेत, तसेच तांत्रिक क्षेत्रात नव्या शक्यता शोधल्या जात आहेत. गरज आहे, की आता या काळातील अनुभवांमुळे विषम परिस्थितींचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करणे शिकायला हवे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...