* मोनिका गुप्ता

एक काळ होता जेव्हा मुली घरकामात आपल्या आईला मदत करण्यापुरत्या मर्यादित होत्या. घरातील स्वयंपाक-पाणी, पाहुण्यांचे आदरातिथ्य बस्स एवढेच त्यांचे जग होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना विवाहाच्या बेडीत बांधले जाई. परंतु बदलत्या काळाबरोबर मुलींविषयी ना केवळ आई-वडील तर समाजाचीही विचारसरणी बदलली आहे. आज बदलत्या काळाच्या स्पर्धेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जात आहेत.

सीबीएसई बोर्ड, यूपी बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळयांमध्ये मुलींचा रिजल्ट मुलांपेक्षा चांगला लागतो.

समाजाच्या रूढीवादी विचारसरणीवर मात करत आज मुली आपल्या प्रगतीच्या आकाशात उड्डाण भरत आहेत आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण निष्टेने बजावत आहेत.

असे नाही की मुले आपले कर्तव्य पार पाडण्यात चुकत आहेत पण ज्याप्रकारे घरातील महिला वा मुली कुटुंब सांभाळण्याबरोबरच बाहेर समाजातही आपली एक ओळख बनवत आहेत, त्या तुलनेत मुले असे करत नाहीत. ते फक्त बाहेरच्या कामांपुरतेच मर्यादित राहतात.

विचारसरणी बदलण्याची गरज

जेव्हा एक मुलगी घरातील कामांबरोबरच बाहेरची कामे ही करते, तर मग घरातील मुले का करू शकत नाहीत? घरकामांमध्ये मुलांची आवड कमी दिसून येते. जर घरातील महिला स्वयंपाकाची कामे करते तर पुरुष घरातले पंखे स्वच्छ का करू शकत नाही. हे आवश्यक नाही की घरातील कामे म्हणजे स्वयंपाक घर सांभाळणे आहे. घरात स्वयंपाकाशिवायही बरीच कामे असतात, जी पुरुषांद्वारे सहजपणे केली जाऊ शकतात. जसे प्लंबरला किंवा इलेक्ट्रिशियनला बोलावणे वगैरे.

महिला आठवडयाचे सातही दिवस घर व बाहेर सांभाळते. अशावेळी घरातील पुरुषमंडळी या कामांसाठी आपला वेळ का नाही काढू शकत?

खरेतर आपल्या समाजात आधीपासूनच विभाजन करून ठेवले आहे. हे आधीपासूनच निश्चित असते की कोणते काम मुलगा करेल आणि कोणते काम मुलगी.

याच कारणाने मुलांची विचारसरणी हे मानते की हे काम फक्त महिलांचे आहे. पण आता ही मानसिकता प्रत्येक घराची नाहीए, कारण आपल्या समाजात बदल होत आहेत आणि बदलत्या समाजात काही कुटुंबे अशीही आहेत, जेथे प्रत्येक काम बरोबरीचे असते.

याविषयी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर संगीता कुमारीचे म्हणणे आहे, ‘‘व्यक्तिला लिंग-भेद करण्याआधी एक मनुष्य असण्याचे कर्तव्य निभवायला हवे. जर आपण अजून ही या स्वतंत्र देशात अशा रूढीवादी विचारसरणीला प्रोत्साहन देत राहिलो तर आपली मानसिकता, आपले विचार नेहमीच संकुचित राहणार.’’

ज्यामुळे भेदभाव होणार नाही

देश स्वतंत्र झाला. काळ बदलला. पण काही गोष्टींचे स्वतंत्र होणे अजून बाकी आहे. दिल्ली रहिवासी बिझनेस वुमन प्रीती सांगतात, ‘‘मला २ मुले आहेत आणि ते मला कधी मुलगी नसल्याची उणीव भासू देत नाहीत. घरातील कामांत माझी मदत करतात. माझी पूर्ण काळजी घेतात. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मीच त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही.’’

कोणाही मनुष्याला बाह्य दृष्टीने बदलणं खूप सोपं असतं, परंतु मानसिक रूपाने बदलणे खूप अवघड.

आजही अशी घरे आहेत, जेथे मुली नाही नाहीत आणि लोक तरसतात की किती बरे झाले असते जर त्यांना एक मुलगी असती तर. तसेच अशीही घरे आहेत की जेथे मुली नाहीत आणि ते या गोष्टीचा जणू उत्सव साजरा करतात. हे ते लोक आहेत, जे आपल्या समाजाला रूढीवादी विचारसरणीचा गुलाम बनवू पाहत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मानणे आहे की आपण लहानपणापासून आपल्या मुलांना रुल एंड रेग्यूलेशनचे धडे शिकवू लागतो. काही असे रुल्स, जे आमच्या मुलांना मर्द बनवतात. जर मुलगा रडला तर त्याला शिकवले जाते की रडणे मुलांचे नव्हे तर मुलींचे काम आहे. अशी शिकवण दिल्यामुळेच मुले असे आचरण करू लागतात आणि घरकामांमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, जे काम आपल्यासाठी नाहीच आहे, ते का करायचे. जर आपण अशाप्रकारचे धडे शिकवणे बंद केले तर आपल्या समाजातील हा भेदभाव संपूर्ण जाण्यास वेळ लागणार नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...