* मोनिका गुप्ता

एक काळ होता जेव्हा मुली घरकामात आपल्या आईला मदत करण्यापुरत्या मर्यादित होत्या. घरातील स्वयंपाक-पाणी, पाहुण्यांचे आदरातिथ्य बस्स एवढेच त्यांचे जग होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना विवाहाच्या बेडीत बांधले जाई. परंतु बदलत्या काळाबरोबर मुलींविषयी ना केवळ आई-वडील तर समाजाचीही विचारसरणी बदलली आहे. आज बदलत्या काळाच्या स्पर्धेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जात आहेत.

सीबीएसई बोर्ड, यूपी बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळयांमध्ये मुलींचा रिजल्ट मुलांपेक्षा चांगला लागतो.

समाजाच्या रूढीवादी विचारसरणीवर मात करत आज मुली आपल्या प्रगतीच्या आकाशात उड्डाण भरत आहेत आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण निष्टेने बजावत आहेत.

असे नाही की मुले आपले कर्तव्य पार पाडण्यात चुकत आहेत पण ज्याप्रकारे घरातील महिला वा मुली कुटुंब सांभाळण्याबरोबरच बाहेर समाजातही आपली एक ओळख बनवत आहेत, त्या तुलनेत मुले असे करत नाहीत. ते फक्त बाहेरच्या कामांपुरतेच मर्यादित राहतात.

विचारसरणी बदलण्याची गरज

जेव्हा एक मुलगी घरातील कामांबरोबरच बाहेरची कामे ही करते, तर मग घरातील मुले का करू शकत नाहीत? घरकामांमध्ये मुलांची आवड कमी दिसून येते. जर घरातील महिला स्वयंपाकाची कामे करते तर पुरुष घरातले पंखे स्वच्छ का करू शकत नाही. हे आवश्यक नाही की घरातील कामे म्हणजे स्वयंपाक घर सांभाळणे आहे. घरात स्वयंपाकाशिवायही बरीच कामे असतात, जी पुरुषांद्वारे सहजपणे केली जाऊ शकतात. जसे प्लंबरला किंवा इलेक्ट्रिशियनला बोलावणे वगैरे.

महिला आठवडयाचे सातही दिवस घर व बाहेर सांभाळते. अशावेळी घरातील पुरुषमंडळी या कामांसाठी आपला वेळ का नाही काढू शकत?

खरेतर आपल्या समाजात आधीपासूनच विभाजन करून ठेवले आहे. हे आधीपासूनच निश्चित असते की कोणते काम मुलगा करेल आणि कोणते काम मुलगी.

याच कारणाने मुलांची विचारसरणी हे मानते की हे काम फक्त महिलांचे आहे. पण आता ही मानसिकता प्रत्येक घराची नाहीए, कारण आपल्या समाजात बदल होत आहेत आणि बदलत्या समाजात काही कुटुंबे अशीही आहेत, जेथे प्रत्येक काम बरोबरीचे असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...