* प्रतिनिधी
मी एक विवाहित गृहिणी आहे. पती स्मार्ट व हँडसम आहेत आणि स्वत:च्या वयापेक्षा खूप लहान दिसतात. ते सरकारी विभागात अधिकारी आहेत. २ मुलं आहेत, जी आपापल्या कुटुंबीयांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. माझी समस्या ही आहे की गेल्या १ वर्षांपासून पतीने माझ्यासोबत सेक्स केला नाहीये. खरंतर आमच्यामध्ये कोणतीही भांडण नाही आहेत. १-२ लोकांनी मला सांगितलं की त्यांचे एका बाईशी संबंध आहेत. सांगा मी काय करू?
जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये कोणतीही भांडणं नाहीयेत परंतु पतीं सेक्समध्ये रुची घेत नाहीत, तर तुम्ही याचं कारण जाणण्याचा प्रयत्न करायला हवा.
शक्यता आहे की ते अधिकारी असल्यामुळे कामाच्या ओझ्याने दबलेले असतील आणि तणावात राहत असतील वा त्यांना एखादा त्रास असू शकतो. वेळ आणि मूड पाहून तुम्हीच पतींशी बोलून घ्यावं.
जर तुम्हाला वाटतंय त्यांचे एका बाईशी संबंध आहेत तर एकीव गोष्टींवरती विश्वास ठेवून तुमच्या दाम्पत्य जीवनात विष घोळवत आहात. दुसऱ्यांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका.
तसेही अनैतिक संबंध जास्त दिवस टिकत नाहीत. उशिरा का होईना या नात्यांवरती विराम लागतो.
जर तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा जीव आणायचा असेल तर पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, त्यांना खूप प्रेम द्या, कामकाजाबद्दल विचारा, सोबत फिरायला जा.
हा जर त्यांच्यामध्ये एखादे शारीरिक विकाराची लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मी १९ वर्षांची आहे आणि माझ्यापेक्षा २ वर्षांनी असलेल्या मोठ्या मुलावरती प्रेम करते. आम्ही अनेकदा सेक्सचा आनंददेखील घेतलाय. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायचं आहे. त्याच्या घरातल्यांची देखील कोणतीच आडकाटी नाहीये, परंतु माझ्या घरातले काही तयार होत नाहीत, कारण तो वेगळ्या जातीचा आहे आणि मी वेगळा जातीची आहे. आमच्या नात्यांबद्दल घरातल्यांना समजलं तेव्हा त्यांनी माझं शिक्षण बंद केलं आणि मोबाईलदेखील घेतला. तरी देखील मी त्या मुलाला लपून छापून भेटते. प्रियकर माझ्याशिवाय राहू शकत नाही. यामुळे त्याचा अभ्यासदेखील डिस्टर्ब होत आहे. तो म्हणत आहे की जर घरवाले नाही मानत असतील तर अजून थांबूया, ४ वर्षांनंतर जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा आपण लग्न करूया. परंतु या गोष्टीला मी कसा दिलासा देऊ जे मन रात्रंदिवस त्याच्यासाठी धडकत आहे. सांगा मी काय करू?
तुमचं वय अजून खूप लहान आहे. हे वय अभ्यास करून काही बनण्याचं असतं, परंतु तुम्ही कमी वयातच ही चूक करून बसलात. अगदी शारीरिक संबंध देखील ठेवलेत.
तुमच्या पालकांचं विचार करणं योग्य आहे. त्यांना देखील वाटते की अगोदर तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहावं, करियर बनवावं, तेव्हाच लग्नाबद्दल विचार करावा.
ठीक आहे, जे झालं ते झालं. आता समजूतदारपणा यातच आहे की तुम्ही अगोदर तुमच्या घरातल्यांचा विश्वास सार्थ करून अभ्यास सुरू ठेवा. प्रियकराला त्याचं करियर बनवू द्या.
जर तो ४ वर्षं वाट पाहायला सांगत असेल तर त्याचं विचार करणे योग्य आहे. जर त्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे तर ४ वर्षांनंतर का होईना तो तुमच्याशी नक्कीच लग्न करेल.
एकमेकांची जात वेगळी असली तरी आजच्या काळात ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. समाजामध्ये अशी अनेक लग्नं होत आहेत. उशिरा का होईना तुमचे पालकदेखील मानतील. जर त्यांनी मान्य केलं नाही तर तुम्ही दोघे कोर्ट मॅरेज करू शकता. मात्र तुम्ही सध्या तरी दोघांच्या करिअरवरती लक्ष द्यायला हवं.
मी ३३ वर्षीय विवाहिता आहे. पती आणि दोन मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. लग्नापूर्वी माझ्या आयुष्यात एक तरुण आला होता, ज्याच्यावर माझं प्रेम होतं. परंतु काही कारणामुळे आमचे लग्न होऊ शकलं नव्हतं. आता त्याचं देखील स्वत:चं कुटुंब, पत्नी व मुलं आहेत. इकडे काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आम्ही दोघे भेटलो. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली आणि आता आम्ही तासन्तास गप्पा मारत चॅटिंग करत असतो. त्याला मला भेटायचं आहे, सांगा मी काय करू?
तो तुमचा भविष्य भूतकाळ होता. आता तुमच्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. पती, कुटुंब, मुलं व आनंदी जीवन आहे. जुन्या गोष्टी ताज्या करून तुम्ही दोघे एकत्रित आला आहात. त्यामुळे कुटुंबाच्या आनंदावर ग्रहण लागू शकतं, म्हणून हे नातं पुढे न जाण्यातच शहाणपणा आहे.
जर तो एक मित्राच्या नाते तुम्हाला भेटू इच्छित असेल तर यामध्ये काहीच वाईट नाहीये. तुम्ही घराबाहेर एखाद्या रेस्टॉरंट वा पार्कात त्याला भेटू शकता. मैत्री असेल तर भेटायला काहीच वाईट नाही. मात्र भेट मर्यादित असावी, हद्द पार करू नका.





