* शोभा कटारे

तरुण राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल आणि आहार, झोप आणि झोपण्याच्या वेळातील बदल, व्यायाम जसं की फेरपटका मारणं, धावणं इत्यादी.

जर तुम्ही आपल्या दिनचर्येत बदल करून या सर्व सवयी लावल्या, तर नक्कीच तुम्ही निरोगी आणि ऊर्जेने भरलेले असाल आणि स्वत:ला तरुण झाल्यासारखं वाटेल.

चला तर जाणून घेऊया या सवयी स्वीकारून तुम्ही स्वत:ला दीर्घकाळपर्यंत निरोगी आणि तरुण कसे ठेवू शकता :

रुटीन लाईफ गरजेचं : बदलती लाइफस्टाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुरेशी झोप न घेणं एक समस्या बनत चालली आहे. अलीकडे आपण सर्वजण दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या वेळी फ्री असतो आणि तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो व आपलं खानपिणं सर्व कामे टीव्ही पाहतच करतो आणि अनेकदा अनावश्यक आणि जंक फूड इत्यादी जास्तच खातो. अशावेळी वेळ केव्हा निघून जाते आपल्याला समजत नाही आणि मग आपल्याला झोपायला उशीर होतो आणि मग सकाळी लवकर उठताना त्रास होतो. ज्यामुळे आपण आपल्याला स्वत:लाच फ्रेश वाटत नाही. याचा प्रभाव आपल्या आरोग्यावरदेखील पडतो म्हणून स्वत:ला कायम ताजतवानं ठेवण्यासाठी वेळेत झोप आणि उठण्याची सवय लावा.

जर तुम्ही या दिनचर्येचा स्वीकार केला तर शरीरावर अनुकूल फायदे दिसतात :

* चांगल्या झोपेमुळे इम्युनिटी बूस्ट होते, ज्यामुळे आपलं शरीर आजाराशी लढण्यास सक्षम होतं आणि आपण लवकर आजारी पडत नाही.

* एका संशोधनात असं देखील आढळलं आहे की चांगली झोप शरीराला रिपेअर, रिजनरेट आणि रिकव्हर करण्यात खूप मदत करते.

* ७-८ तासाची झोप आपल्या मनाला ताजतवानं ठेवते, ज्यामुळे आपली स्मरण आणि विचार करण्याची शक्ती वाढते. आपण कामे योग्य प्रकारे करू शकतो.

* यामुळे आपली कार्यक्षमतादेखील वाढते म्हणजेच आपण कामे वेगाने करू शकतो.

* मानसिक आरोग्य चांगलं राहतं. कमीत कमी सात आठ तासाची चांगली झोप आपल्याला अनेक आजार जसं की लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते.

नियमित शारीरिक व्यायाम : नियमित शारीरिक व्यायाम आपल्या वाढत्या वयाच्या गतीला मंद करून  आपल्याला अधिक काळपर्यंत तरुण ठेवण्यात मदत करतो. चांगलं आरोग्य आणि तरुण राहण्यासाठी आपण दररोज सकाळी अर्धा वा एक तास शारीरिक व्यायाम करणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही स्वत:साठी एक एक्सरसाइज वा व्यायामाची निवड करा, जो करण्यात तुम्हाला मजा येईल.

तुम्ही तुमचा नियमित व्यायाम जसं की वेगाने धावणे, वेगाने चालणं इत्यादी करू शकता. जर तुम्हाला हे करायला आवडत नसेल तर तुम्ही झुंबा व एरोबिक्स वा डान्सचादेखील समावेश करू शकता. तुम्ही जिम वा कोणत्याही इतर फिटनेस क्लासचा भागदेखील बनू शकता.

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

* नियमितरित्या व्यायाम केल्यामुळे मेटाबोलिझम वाढतो तसंच आपल्या कॅलरीज वेगाने कमी होतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. नियमित व्यायाम आपल्या मास पेशींना निरोगी ठेवतं आणि शरीरात रक्ताभिसरणदेखील योग्य बनवतं. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता, सोबतच मेंदूला रक्ताचा व्यवस्थित सप्लाय मिळाल्यामुळेदेखील सक्रियरित्या कार्य करतं तसंच नवीन ब्रेन सेल्स बनण्यातदेखील मदत मिळते.

* नियमित व्यायाम तणावाला कमी करतो तसंच ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यात मदत करतं.

* नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. यामुळे हृदय उत्तम राहतं आणि आपण अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेऊ शकतो. यामुळे व्यक्तीला हार्ट अटॅक आणि रुदयाशी संबंधित इतर आजार होण्याच्या धोका कमी खूपच कमी होतो.

समतोल आहार का?

हे जाणून घेणे गरजेचे आहे की जीवित राहण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी समतोल आहाराचे सेवन करणे गरजेचे असण्याबरोबरच, समतोल आहारामध्ये असलेली पौष्टिक तत्व आपल्या शरीरात पोषण स्तर बनवून ठेवतो, यामुळे आपण निरोगी राहतो.

समतोल आहाराकडे ठेवा लक्ष

* सकाळचा नाश्ता करायलाच हवा.

* झोपण्यापूर्वी एक तास अगोदर जेवण करण्याची सवय लावा.

* रात्री कमीत कमी व हलका आहार घ्या.

समतोल आहाराचे फायदे

* रोगप्रतिरोधक क्षमता का वाढवतं.

* पाचनशक्तीला मजबूत बनवतं तसंच आरोग्य चांगलं राखतं.

* आपल्या मासपेशी, दात, हाडे इत्यादींना मजबूत बनवतं.

* व्यक्तीची कार्यक्षमता बनवून ठेवण्यात तसंच त्याचा मूडलादेखील योग्य बनवून ठेवतं.

* मेंदूला निरोगी बनवतं.

* वजन वाढण्यापासून रोखतं.

सीजनल आणि लोकल फूड का खावं

लोकल आणि सीजनल फळ तसंच भाज्या तिथलं तापमान, जल आणि वायुनुसार तसंच यामध्ये कमीत कमी किटकनाशकं व रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने उगवल्या जातात आणि त्यानुसारच आपलं शरीर परिपूर्ण होतं म्हणून हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक असतं. यासोबतच या स्वस्त असतात. म्हणून प्रयत्न करा की नेहमी भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. यासोबतच इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्या आहारात हळद, लसूण, लिंबू, गुळवेल, तुळस, आवळा, विटामिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.

आपलं लक्ष केंद्रित करा

अनेक लोकं शरीराला सुदौल व वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला खूप जोश दाखवतात, परंतु काही दिवसानंतर त्यांना हे करण्यात त्रास होऊ लागतो आणि हळूहळू त्यांचा जोश थंड पडू लागतो आणि ते आपल्या लक्षापासून भटकू लागतात.

यापासून वाचण्यासाठी गरजेचं आहे की थोडासा धीर धरा. जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये वारंवार अयशस्वी होतो आणि जास्त वेळ लागू लागतो तेव्हा आपण ते काम मध्येच सोडून देतो. यासाठी खरं तर आपल्याला धैर्याची गरज असते.

* आपलं धैर्य आपल्या एकाग्रतेला वाढवतं. आपल्या लक्षापासून भटकू देत नाही.

* आपल्यावरती निराशा हावी होऊ देत नाही.

* आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो.

* आपलं धैर्यच आपल्याला योग्य प्रकारे आणि योग्य वेळी करण्यासाठी प्रेरित करतं.

* धैर्य आपल्याला शिकवतं यशस्वी होण्याचा धडा कारण यामुळे प्रत्येक कामात यश मिळणं शक्य आहे. तरुण बनणं आणि कायम चिर तरुण राहणं एका दिवसाचं काम नाहीए. यासाठी आपल्याला निरंतर प्रयत्न करावे लागतात आणि स्वत:ला काही नियमांमध्ये बांधून ठेवावं लागतं. म्हणून जर तुम्हाला चिर तरुण राहायचं असेल तर तुमच्या दिनचर्येत बदल करा आणि त्यांचं नियमितपणे पालन करा. याचे परिणाम तुम्हाला काही महिन्यातच दिसून येतील. कारण धैर्याशिवाय यश मिळणं कठीण आहे.

डिटॉक्सीफिकेशन

आपली त्वचा खूपच नाजूक आणि संवेदनशील असते तसंच पर्यावरणाचा याच्यावर सरळ प्रभाव पडतो. यासाठी याला निरोगी, स्वच्छ आणि चमकदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी अतिरिक्त देखभालीची गरज असते. यासाठी आपण अनेक लोशन, क्रीम इत्यादीचा वापर करतो. परंतु आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल करत नाही. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण रहात नाही आणि आपल्या त्वचेवरती सुरकुत्या येऊ लागतात.

या त्रासापासून वाचण्यासाठी त्वचेला डिटॉक्सिफाय करणं गरजेचं आहे. निरोगी राहणं आणि दिसण्यासाठी शरीराला फक्त बाहेरूनच नाही तर आतील घाणदेखील दूर करणे गरजेचे आहे. शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करणं, पोषण देणं आणि आराम पोहोचवणं याला डिटॉक्सिफिकेशन म्हटलं जातं.

जर तुम्हाला नेहमी सुस्त वाटत असेल व अचानक तुमच्या चेहऱ्यावरती मुरूम पुटकळया येत असतील वा तुमच्या पचनशक्तीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं वाटत असेल तर तुमचं शरीर विषाक्त झालेलं आहे. तुमच्या शरीराला गरज आहे ती डिटॉक्सिफिकेशनची म्हणजेच तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी आणि तरुण ठेवू शकाल आणि शरीर बाहेरूनच नाहीतर आतील घाणींपासूनदेखील दूर करू शकाल. चीरतरुण राहणं आणि दिसण्यासाठी चेहऱ्याची चमक गरजेची असते. फक्त यासाठी तुम्हाला याच्या देखभालीची गरज असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...