* गृहशोभिका टीम

आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर वाट कितीही अवघड असली तरी तुम्ही त्यावरून सहज मार्गक्रमण करू शकता. एखादी तरुणी तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तिला तिच्या क्षमतेबद्दल पूर्ण माहिती असते आणि ती तिच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करते.

उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबत काम करणे नेहमीच आव्हानात्मक असते. आता अधिकाधिक तरुणी स्वत:चा व्यवसाय सुरू करत आहेत. महिला-पुरुष दोघांचा प्रवास सुरुवातीला समान असतो, त्यासाठी दोघांनाही कुटुंबाची साथ आवश्यक असते. वडील किंवा पत्नी अथवा बहीण-भावंडांचा विरोध असल्यामुळे इच्छा असूनही घरातली मुलगी मात्र ते काम करू शकत नाही.

अशा परिस्थितीत तरुणींनी त्यांना काय करायचे आहे, ते समजून घ्यावे. अशा अनेक महिला आहेत ज्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांना दीर्घकाळ काम करावे लागले तर त्यांचे पती किंवा मुले सहकार्य करत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना विचार करावा लागतो की, त्यांच्या आयुष्यात कुटुंब किंवा करिअर यांपैकी नेमके काय महत्त्वाचे आहे.

दुप्पट उत्पन्न

हेच कारण आहे की, आजच्या अनेक तरुणी ज्या चांगले कमावतात त्यांना लग्न करायचे नसते, जबाबदारी घ्यायची नसते. त्या त्यांच्या करिअरसाठी या सुखांचा त्याग करतात, कारण आजच्या जगात त्यांच्यासाठी कुटुंबापेक्षा आर्थिक ताकद जास्त महत्त्वाची असते. यासंदर्भातील निर्णय प्रत्येक तरुणीला स्वत:च घ्यावा लागतो. दुप्पट उत्पन्न त्यांना आयुष्यात भरपूर सुख देऊ शकते, हे त्यांना त्यांच्या पती आणि कुटुंबाला समजावून सांगावे लागते. अनेकदा त्या यात यशस्वी होतात तर अनेकदा त्यांना नोकरी सोडावी लागते.

व्यावसायिक कुटुंबातून जन्मलेल्या आणि व्यावसायिक कुटुंबातच लग्न झालेल्या मुलींना या समस्येला कमी सामोरे जावे लागते, कारण यशासाठी किती कष्ट करावे लागतात हे सासरच्या मंडळींना माहीत असते. त्यामुळेच आई, सासू, बहीण किंवा वहिनी त्यांना पाठिंबा देतात.

असे मिळेल यश

जे स्वत:चा व्यवसाय करत आहेत त्यांनी आताच निवृत्ती स्वीकारू नये. पुढे काम करत राहण्याचे ध्येय नेहमी डोळयासमोर ठेवावे. नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यात समतोल राखणे आवश्यक असते. नवीन पिढी प्रत्येक काम वेगळया पद्धतीने हाती घेते. जुन्या पिढीतील महिलांची नावे माहिती हवीत.

स्वत:ची विचारधारा बदलली पाहिजे, जेणेकरुन बदलांना सामोरे जाता येईल, कारण नवीन पिढीसाठी अनेक गोष्टी बरोबर असतात तर काही गोष्टी जुन्या होऊन जातात. दोन्हींच्या मिश्रणातून मिळणारा परिणाम नेहमीच चांगला असतो.

लक्षात ठेवा की, यश हेच माणसाला आनंदी बनवते. कोणतेही काम करताना ते कसे करायचे आणि त्यातून किती आनंद मिळेल याचा विचार केला तर यश नक्कीच मिळेल. यश एका दिवसात कधीच मिळत नाही.

बदलला दृष्टिकोन

आज तरुणांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या देशात महिला अधिकारी पदावर असेल तर तिला खूप सन्मान मिळतो. म्हणूनच तर भारतीय राजकारणात ममता बॅनर्जी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासारख्या महिला मोठया संख्येने आहेत. आज उद्योगक्षेत्रातही मोठया घराण्यातील महिला आहेत आणि नव्या पिढीतील मुलीही मोठया प्रमाणावर या क्षेत्राकडे वळत आहेत.

सामान्य महिलेप्रमाणे फॅशन, दागिने, खाद्यपदार्थ या सर्वांची आवड ठेवा. तुमचा स्त्रीवाद सोडू नका. संगीत ऐका, पुस्तके वाचा. पती आणि मुलांसोबत वेळ घालवा. सासरची आणि स्वत:च्या आई-वडिलांचीही तितकीच काळजी घ्या. २४ तास काम करत राहाणे, ही यशाची पहिली अट आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...