* सुमन वाजपेयी

अनुराधाच्या पतींचा मृत्यू होऊन दीड वर्ष झालीत. मृत्यूदेखील अचानक झाला होता. कोणताही आजार नव्हता. हार्ट अटॅक आला आणि इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. आता ते गेल्यानंतर त्यांच्या वस्तू म्हणजेच चष्मा, मोबाईल, परफ्युम, घड्याळ, शेविंगचं सामान, चपला जशाच्या तशा ठेवल्या आहेत.

अनुराधाला त्या वस्तू तिथून काढण्याची व कोणाला देण्याची हिम्मतच होत नाही. प्रत्येक गोष्टीसोबत तिची एक आठवण जोडली आहे आणि ती वेगळी करण्याच्या विचाराने ती अधिकच घाबरून जाते. आपल्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी एका परिचितांच्या लग्नात जो सूट घालून ते गेले होते त्याला हात लावून पहाते.

अगदी तिच्या मुलाचंदेखील म्हणणं आहे की बाबांच्या वस्तू जशा आहेत तशाच राहू दे. त्या काढायच्या नाही. जिथे बसून ते काम करत होते ती त्यांची खोलीदेखील अजूनपर्यंत तशीच आहे. अगदी टेबलावर ठेवलेला लॅपटॉपदेखील काढला गेला नाहीए. तिला वाटतं की तिचे पती अजूनही काम करायला बसतील.

एका दु:खद वेदनेनंतर

जर अचानक कोणाचा मृत्यू झाला तर अगोदरपासूनच कोणतीही तयारी करणं शक्य होत नाही. कोणी दीर्घकाळ आजारी असेल वा वृद्ध असेल तर अगोदरपासूनच सर्व गोष्टींबद्दल विचार करता येऊ शकतो. परंतु अचानक निघून जाण्याने शोकाकुल कुटुंबीयांना अगोदर विचार करण्याची संधीच मिळत नाही. मृतकाशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये तो असल्याची जाणीव होते, तसंच त्याच्या नसण्याचे दु:खदेखील देत रहातं. हे दु:ख केवळ तेच समजू शकतात ज्यांनी हे सहन केलं आहे. महिने, अनेकदा वर्ष लागतात या वास्तविकतेला स्वीकारण्यात आणि तेव्हाच निर्णय घेऊ शकतात की या वस्तूंचं काय करायला हवं.

जाणाऱ्याच्या वस्तूंचं काय करायचं आहे, हे ठरवणं अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं, ज्यामध्ये मृतकासोबतचं नातं काय होतं, याचादेखील समावेश असतो. जसं नातं असतं त्याच हिशोबाने दु:खदेखील होतं. एका नातवाला आपल्या आजोबांच्या वस्तू हटविताना  तेवढा त्रास होत नाही, जेवढा त्यांच्या मुला वा पत्नीला तो होऊ शकतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...