* किरण आहुजा

खाद्याला मिठी मारणे किंवा एखाद्याकडून आलिंगन मिळणे ही सर्वात आनंददायक भावना आहे. ही अशी भावना आहे, जी कोणत्याही मनुष्याच्या हृदयाच्या खोलीला स्पर्श करते. कितीही त्रासलेले असलात तरी कुणा आपल्या जवळच्या माणसाला मिठी मारून खूप छान वाटते. यालाच जादूची मिठी म्हणतात.

भले ही आपण आपल्या जोडीदाराच्या बाहूमध्ये असलात किंवा आपल्या मुलाला मिठी मारली असेल किंवा आपण आपल्या मित्रालाच जादूची मिठी दिली असेल, एखाद्याला मिठी मारणे किंवा कुणाकडून आलिंगन मिळणे आपल्याला नेहमी चांगुलपणाची आणि आनंदाची जाणीव करून देते. आपल्याला सुरक्षितता आणि प्रेमाचा अनुभव होतो.

जादुई मिठी

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य होते, जेव्हा संजय दत्त आणि सुनील दत्त पहिल्यांदाच एकमेकांना मीठी मारतात. या चित्रपटात सुनील दत्तचा संवाद होता, ‘‘आपल्या आईला नेहमीच जादूई मिठी देत आलास, आज वडिलांनाही दे.’’ त्यावेळी दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात.

या चित्रपटात ज्या प्रकारे मुन्नाला पारंपारिक पद्धती ऐवजी प्रेम, आपुलकी आणि जादूई मिठीने रूग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहे, ते खरोखर दर्शविते की एखाद्याला मिठी मारल्याने किती प्रभाव पडतो.

आपण म्हणू शकतो की मिठी मारणे, केवळ भावना व्यक्त करण्यासाठीच नाही तर हेल्थ बूस्टरदेखील आहे आणि ही गोष्ट वैद्यकीय शास्त्रानेदेखील सिद्ध झाली आहे. हृदयापासून मारलेली एक मिठी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपल्याकडे सामाजिक संवाद आणि स्पर्श करण्याच्या फारच कमी संधी आहेत कारण आपण एकटे आणि व्यस्त आयुष्य जगतो, तर थेरपिस्ट म्हणतात की जगण्यासाठी आपण १ दिवसातून ४ वेळा मिठी मारली पाहिजे.

जर आपल्याला स्वत:बद्दल चांगले वाटून घ्यायचे असल्यास, आपला तणाव कमी करू इच्छित असल्यास, आपले संभाषण प्रभावी बनवू इच्छित असाल, आनंदी राहू इच्छित असाल आणि याशिवाय निरोगी आयुष्य जगू इच्छित असाल तर मग मिठी मारणे आणि हृदयाशी घेणे दोन्ही करण्याची हीच योग्य वेळ आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...