* रितू वर्मा

बरखा जेव्हा लग्नानंतर तिच्या सासरी आली तेव्हा खूप आनंदी होती. तिला तिची ननंद श्रेयाच्या रूपात एक खूप चांगली मैत्रीण मिळाली होती. बरखाच्या या नवीन घरात फक्त श्रेया एक अशी होती जी तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होती आणि आपल्या घरातल्यांच्या खाजगी गोष्टीदेखील बरखाला सांगत होती.

जेव्हा श्रेयाने बरखाला एका विवाहित पुरुष्याशी स्वत:चे संबंध असल्याबद्दल सांगितलं तेव्हा बरखाला तिला अडवायचं होतं, परंतु श्रेया म्हणाली, ‘‘वहिनी प्रेम तर प्रेम असतं, तुमचीदेखील लग्नापूर्वी कितीतरी प्रेम प्रकरणं होती याबद्दल मी कोणाला तरी बोलले का?’’

बरखा गप्प बसली. नंतर जेव्हा बरखाच्या कुटुंबीयांना श्रेयाच्या अफेअरबाबत बरखाला अगोदर माहिती होतं हे समजलं तेव्हा तिला सगळयांकडून खूप सुनावण्यात आलं.

अनुची आई सिंगल मदर आहे. ती घर बाहेर सर्वकाही सांभाळते आणि अनुच्या प्रत्येक गरजा पूर्ण करते. परंतु अनु जेव्हा स्वत:च्या मर्जीने काही करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या आईची बडबड सुरू होते, ‘‘मी एकटी कमावती आहे, पूर्ण आयुष्य तुझ्यासाठी स्वाहा केलंय, परंतु तरीदेखील तू मनमानी करू लागली आहेस.’’

‘‘मला आनंदी राहण्याचा वा स्वत:च्या मर्जीने काम करण्याचा कोणताही हक्क नाही आहे,’’ अनु आपल्या आईच्या या सवयीला कंटाळली आहे.

अनुच्या बोलण्यावरून असं वाटतं की आईने तिला सांभाळून तिच्यावर उपकारच केले आहेत.

प्रियाचे पती पंचाल जेव्हा मनात येतं तेव्हा प्रियाकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा इच्छा होते तेव्हा प्रियाशी प्रेमाने बोलतात. प्रिया काही बोलली तर पंचाल एकच म्हणत असतात की, ‘‘प्रिया, माझं वर्कप्रेशर यासाठी जबाबदार आहे.’’

पंचाल स्वत:ला असं सादर करतात की अनेकदा प्रियाला स्वत:ला वाईट वाटतं.

जर सखोलपणे विचार केला तर अशी लोकं आपल्या घरकुटुंबात अगदी सहजपणे मिळतील. अशी लोकं प्रत्येक नातं स्वत:च्या मनाप्रमाणे साकारण्यात विश्वास ठेवतात. त्यांना समोरच्याच्या दु:खाशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांचं घेणं देणं असतं फक्त स्वत:शी. अशी लोकं नात्यांना अशा प्रकारे फोडणी देतात की हळूहळू ती पोकळ होतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...