- शैलेंद्र सिंह

२० वर्षीय प्रभात फार खुश होता. दिवाळी हा त्याचा सर्वात प्रिय सण होता. प्रभातच्या कॉलेजमध्ये सांगितले जात होते की दिवाळीत फटाके फोडू नयेत, पण प्रभातला काही या गोष्टी पटत नव्हत्या. आपल्या घरातल्या लोकांशी भांडून त्याने हट्टाने फटाके आणि फुलबाजा खरेदी केलेच. त्याने दिवाळीला आपल्या नातेवाईकांनाही बोलावले होते.

सर्वांनी ठरवले होते की आज आपल्या मोहल्ल्यात खूप धमाल करायची. त्याचे काही मित्र तर कानठळया बसवणाऱ्या आवाजाचे बॉम्ब फटाकेही आणणार होते.

संध्याकाळ होताच सर्व मुले परिसरात एके ठिकाणी जमा झाली. प्रभातच्या घराचे छत खूप मोठे होते, त्यामुळे सर्वजण तिथेच आले. प्रभात आणि त्याच्या मित्रांची धमाल सुरू झाली. फटाक्यांचा धूर सर्वत्र पसरू लागला होता.

अचानक प्रभातला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला खोकलाही येऊ लागला. तो घाबरून खाली आला. घरातल्या लोकांनी ही गोष्ट काही फार मनावर घेतली नाही. पण प्रभातला अधिकच त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

कुटुंबीयांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला तपासल्यावर डॉक्टरांनी सांगितले की प्रभातला दम्याचा आजार आहे आणि दिवाळीच्या फटाक्यांच्या धुरामुळे तो अधिकच बळावला. ज्यामुळे प्रभातची तब्येत अशी खालावली. डॉक्टरांनी बरेच उपचार केल्यानंतर कुठे तो ठीक झाला.  डॉक्टरांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना स्पष्ट ताकीद दिली की याला पुन्हा कधीही धूर असलेल्या ठिकाणी पाठवू नका. यामुळे त्याचा दमा पुन्हा चाळवू शकतो. आता प्रभात कधीही फटाके फोडत नाही आणि इतरांनाही फोडण्यापासून परावृत्त करतो.

आनंद कमी आणि धूरच अधिक

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. पण या सणाबाबत कुठली वाईट गोष्ट असेल तर ती आहे आनंद साजरा करायला लोक फटाके आणि फुलबाज्यांचा वापर करतात ही. ज्यामुळे विषारी धूर सर्वत्र पसरतो आणि तो वातावरणाला विषारी करतो. हा धूर अस्थमाच्या रुग्णांना खूप त्रासदायक असतो. यांत लहान मुले, तरुण लोक, मोठी माणसे सर्व शामिल आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...