‘जिवाची होतिया काहिली’

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्यानी मनोरंजन करते आहे. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत.

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण बघण्यासाठी १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका नक्की बघा.

पाहा, ‘जिवाची होतिया काहिली’, 18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

‘कोण होणार करोडपती’ – रंगणार ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील  ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षीदेखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षीदेखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.  ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. ते एक अष्टपैलू कलाकार आहेत.  त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 6 लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणीकरता आले. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा  प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी  नाना पाटेकर, आनंद शिंदे, यजुर्वेंद्र महाजन, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे, मेधा पाटकर, सोनाली कुलकर्णी, कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी  करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्तीदेखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर, पोलीस उपनिरीक्षक, महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन, एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’ आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी. पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’. 6 जूनपासून सोम.-शनि., रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘माझी माणसं’ स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट

* सोमा घोष 

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या.

अशीच एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, ‘माझी माणसं’ या सन मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना येत्या ३० मे पासून दिसणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘गिरीजा’ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती  मालिका गुंफलेली आहे.

सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळतो. महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे.

कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक  साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका  संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३०  ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७ वाजता ‘आभाळाची माया’, ७.३० वाजता ‘जाऊ नको दूर… बाबा!’, ८.३० वाजता ‘कन्यादान’,  रात्री ९ वाजता ‘संत गजानन शेगावीचे’,  ९. ३० वाजता ‘नंदिनी’ तसेच रात्री १० वाजता ‘सुंदरी’ ह्या मालिका दाखविल्या जाणार आहेत.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

संकल्प का करू इच्छित नाही – अक्षया गुरव

* सोमा घोष

अक्षया गुरव ही मराठीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी मुंबईत लहानाची मोठी झाली. ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेत प्रमुख भूमिका साकारून तिने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि त्यामुळेच ती घरघरात पोहोचली. मुंबईत मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि पुढे मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या अक्षयाच्या वडिलांनी पोलीस दलात काम केले आहे, तर आई गृहिणी आहे. कुटुंबातील कोणीही मनोरंजन क्षेत्रात नसल्यामुळे अभिनय क्षेत्रात प्रवेश करणे अक्षयासाठी सोपे नव्हते. अक्षयाला जेवण बनवायला प्रचंड आवडते. मेथीचे पराठे बनवायचे काम अर्धवटच सोडून तिने माझ्याशी गप्पा मारल्या, ज्या खूपच मनोरंजक होत्या. चला, तिचा प्रवास तिच्याच तोंडून जाणून घेऊया.

तुला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नाही, पण माझ्या आजोबांना विविध वाद्ये वाजवायची आवड होती. तबला, वीणा, सतार, हार्मोनियम इत्यादी वाद्ये त्यांच्याकडे होती. गावात कुठलाही उत्सव असला की ते वाद्य वाजवून गायचे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘एकच प्याला’ या मराठी नाटकात काम केले होते, हे मला माझ्या आत्येकडून समजले. हा त्यांचा छंद होता. कदाचित त्यांच्यामुळेच आम्हा भावंडांमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली असेल. माझे वडील सेवानिवृत्त, आई गृहिणी तर भाऊ इंजिनीअर आहे. मी अभिनय क्षेत्रात भवितव्य घडवावे, असे माझी आत्या मला सतत सांगायची. मला मात्र अभिनयाची आवड नव्हती.

२००९-१० मध्ये मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि तेथूनच अभिनय क्षेत्रातील माझा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर मी बरेच ऑडिशन्स दिले आणि अभिनयालाही सुरुवात केली.

तुला अभिनय क्षेत्रात काम करायचेय, असे पहिल्यांदा आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

माझ्यापेक्षा जास्त उत्साही माझे आईवडील होते. त्यांचे म्हणणे होते की, जे कोणते काम करशील ते उत्तम आणि प्रामाणिकपणे कर, जेणेकरून तुझे नाव होईल. संपूर्ण कुटुंब नेहमी तुझ्यासोबत असेल. गेल्या १० वर्षांपासून मी काम करत आहे. मला कधीच तणाव आला नाही, कारण माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. अनेकदा वेळेवर काम न मिळाल्यामुळे मला वाईट वाटायचे, पण त्या प्रत्येक वेळी कुटुंबाचा भक्कम आधार मिळाला. फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या बहीण आणि भावाच्या पाठीशीही ते ठामपणे उभे राहतात. प्रत्येक मुलगा आणि मुलीसाठी त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत असणे गरजेचे असते, जेणेकरून तुम्ही कोणत्याही समस्येचा सहज सामना करू शकता.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

वर्षभर मी ऑडिशन्स देत होते. पहिला ब्रेक २०१३ मध्ये ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेतून मिळाला. यात मी प्रमुख भूमिका साकारली. मी नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मला नकारात्मक भूमिका आवडत नाहीत. मी महिला प्रधान चित्रपट जास्त केले आहेत. सुरुवातीला मी मराठी नाटकांमधूनही काम केले, ज्यामुळे मी मराठी भाषेतील अचूक, स्पष्ट उच्चार, बोलण्याची पद्धत, शब्दफेक, इत्यादी शिकले. माझ्या मते, रंगभूमीच कलाकाराला घडवते. पहिल्या दोन मालिकांदरम्यान मी अभिनयातील बारकावे शिकले.

तुला किती नकारांचा सामना करावा लागला?

पहिल्याच मालिकेत मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, मात्र मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याच मालिकेत मला सकारात्मक भूमिका मिळाली. टीव्हीवरील मालिका केल्यानंतर मी मराठी चित्रपटांसाठी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मोठया पडद्यावर काम करण्याची माझा इच्छा होती,  पण त्यात मला यश मिळाले नाही, कारण मी रोज टीव्हीवर दिसत असल्यामुळे मला चित्रपटात काम द्यायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळे  ७-८ वर्षांपर्यंत मी मालिकांमध्येच काम केले. त्यानंतर ब्रेक घेतला आणि नंतर चित्रपटात काम करू लागले. आजकाल बरेच कलाकार टीव्हीसह चित्रपट आणि वेब सीरिज असे सर्व सोबतच करत आहेत.

कोणत्या मालिकेमुळे तुझे जीवन बदलले?

‘मानसीचा चित्रकार’ या मालिकेतील तेजस्विनीच्या भूमिकेमुळे मी घराघरात पोहोचले. ‘दिया और बाती’ या मालिकेचा हा रिमेक होता. या मालिकेने माझे जीवन बदलले. शूटिंगच्यावेळी मला भेटण्यासाठी आजूबाजूचे लोक तेथे यायचे. मी घरी गेल्यानंतरही लोक मला घरी भेटायला यायचे. सर्व जण माझ्या आईवडिलांना माझ्या नावाने ओळखू लागले होते.

नकारात्मक किंवा खलनायिकेची भूमिका न करण्यामागचे तुझे काही खास कारण आहे का?

मला नेहमीच असे वाटत आले आहे की, सकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांकडे आदरपूर्वक पाहिले जाते. त्यांचे फोटो मोठमोठया होर्डिंग्जवर झळकतात. लोक त्यांचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतात. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्यांना असा मान मिळत नाही. शिवाय माझा चेहराही खलनायिकेसारखा दिसत नाही. बहुसंख्य चित्रपटांचे कथानक हिरोभोवती फिरणारे असते. अभिनेत्री किंवा महिलांवर आधारित फार कमी चित्रपट बनतात. मला मात्र महिलांना केंद्रबिंदू ठेवून तयार केलेले चित्रपट आवडतात.

हिंदी चित्रपटात काम करण्याची तुझी इच्छा आहे का?

मी मागील दोन वर्षांपासून हिंदीत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे, कारण मराठीत मी खूप काम केले आहे. हिंदीत वेब सीरिज, चित्रपट किंवा मालिका यापैकी काहीही करायला आवडेल.

हिंदी वेब सीरिजमध्ये अंतर्गत दृश्य बरीच असतात. ती तू सहजपणे करू शकतेस का?

कथानकाची गरज, सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक हे सर्व पाहून त्यानुसार अंतर्गत दृश्य करायला काहीच हरकत नाही. मी मात्र स्वत:साठी काही मर्यादा आखून घेतल्या आहेत आणि त्यांचे उल्लंघन करायला मला आवडणार नाही.

पती भूषण वाणीशी तुझी कशी ओळख झाली?

एका चित्रपटासंबंधी बोलायला मी माझ्या फ्रेंडसोबत एका निर्मात्याच्या घरी गेले होते. तिघे भूषणने स्वत:हून आमच्या सर्वांसाठी कॉफी बनवली. ते पाहून मी गमतीने म्हटले की, हा मुलगा खूप चांगला आहे आणि मला आवडला. माझे हेच बोलणे नंतर खरे ठरले. भूषणने ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री १२ वाजता लोणावळयातील नवीन वर्षाच्या पार्टीत मला लग्नासाठी मागणी घातली आणि मी होकार दिला. त्यानंतर ६ महिन्यांनी आम्ही लग्न केले.

पतिमधील एखादी खास गोष्ट, ज्यामुळे तो तुला आवडतो?

खूपच शांत, गुणी आणि दयाळू आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर त्याच्याकडे असते. म्हणूनच मी त्याला सांताक्लॉज किंवा पॅडीमॅन म्हणते.

तू किती फॅशनेबल आहेस? खाण्यावर तुझे किती प्रेम आहे?

मला फॅशन करायला जराही आवडत नाही. माझा छोटा भाऊ गणेश गुरव आणि नवरा भूषण दोघांनाही फॅशन आवडते. खाण्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळेच डाएट करणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. मी सर्व प्रकारचे नॉनव्हेज बनवू शकते. आईच्या हातचे वरण भात, तूप आणि भाजी खायला मला खूप आवडते.

काही संकल्प केला आहेस का?

कुठलाच संकल्प नाही, कारण संकल्प मध्येच तुटतात. पण हो, चांगले काम करण्याची माझ्या आपल्या सर्व माणसांसोबत मिळून निरोप देण्याची इच्छा आहे.

आवडीचा रंग – सफेद.

आवडता पेहराव – भारतीय.

आवडते पुस्तक – स्मिता, स्मित आणि मी.

बेस्ट कॉम्प्लिमेंट – मी महान अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासारखी दिसते असे अनेकांनी सांगणे.

वेळ मिळाल्यास – व्यायाम, कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्युम – बलगरी अक्का.

जीवनातील आदर्श – चांगले आणि मेहनतीने काम करणे.

सामाजिक कार्य – एखाद्या गरजवंताची मदत करणे.

संघर्षातूनच ओळख मिळते – तन्वी बर्वे

– सोमा घोष

संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो आणि मलाही तो करावा लागत आहे. संघर्षापासून पळ काढून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. संघर्षातून मिळालेली कुठलीही गोष्ट अनमोलच असते. असेच काहीसे सांगत आहे मुंबईतील २२ वर्षीय मराठी अभिनेत्री तन्वी बर्वे, जिला लहानपणापासूनच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायला आवडायचे. यासाठी तिला नेहमीच आईवडिलांचे सहकार्य मिळाले. किशोरवयात तन्वीला जत्रेला जायला खूप आवडायचे. सुंदर चेहरा, नम्र स्वभाव आणि हसतमुख तन्वी सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. यात ती प्राची कानिटकरची भूमिका साकारत आहे. वेळात वेळ काढून तिने आमच्यासोबत फोनवर संवाद साधला. चला, तिच्या प्रवासाबाबत तिच्याकडूनच जाणून घेऊया.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

मला अभिनयाची आवड नव्हती. माझी मोठी बहीण शाळेत असताना नाटकात काम करायची. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी तिच्या शिक्षिकेला तिची आठवण झाली. त्यांचा नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी माझ्या बहिणीसोबत मलाही त्यांच्या ग्रुपमध्ये घेतले. तिथूनच माझ्यामध्ये अभिनयाची आवड वाढू लागली. मी मोनो अॅक्ट, आंतरराज्य शालेय स्पर्धेत भाग घेऊ लागले. तिथूनच मला अभिनयाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयात असताना मी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आणि पुरस्कारही मिळवले. त्यानंतर काही प्रायोगिक नाटकंही केली. यातून मला खूप काही शिकायला मिळाले.

महाविद्यालयात असतानाच मला पहिली टीव्ही मालिका मिळाली. त्यामुळे सर्वजण मला ओळखू लागले आणि मला आणखी काम मिळत गेले. ही माझी तिसरी मालिका आहे.

अभिनय क्षेत्रात करियर करण्यासंदर्भात पहिल्यांदाच तू घरी सांगितलेस तेव्हा पालकांची प्रतिक्रिया काय होती?

माझे वडील एका मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि आई गृहिणी आहे. आई घरूनच दागिन्यांचा व्यवसायही करते. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे की नाही, हे ठरवायला मला बराच वेळ लागला, कारण त्यावेळी मी महाविद्यालयात शिकत होते. मला कधी मुख्य भूमिका तर कधी छोटया भूमिका मिळायच्या. घरून मला कधीच विरोध होत नव्हता, पण मला कधी घरी यायला उशीर व्हायचा तर कधी मी घरी जाऊच शकायचे नाही, कारण रिहर्सल अर्थात तालमी सुरूच असायच्या. त्यामुळे माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटायची. त्यांना या क्षेत्राबद्दल काहीच माहित नव्हते. हळूहळू त्यांनी माझे काही शो पाहिले, माझा अभिनय बघितला. यामुळे त्यांना माझ्या कामाची माहिती झाली आणि त्यांनी मला परवानगी दिली. आईची मला खूपच मदत मिळते. मी काहीही केले तरी ते तिला आवडते, पण माझे वडील खूप मोठे टीकाकार आहेत. माझे प्रत्येक काम ते अतिशय बारकाईने पाहातात आणि मला सल्ला देतात.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

मी अकरावीत असताना मला मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आमच्या कुटुंबाशी मैत्रीचे नाते आहे आणि मी छोटेमोठे कामे करते, हे त्यांना माहीत होते. त्यांनी मला या चित्रपटातील एका छोटया भूमिकेसाठी काम करण्याची संधी दिली. महाविद्यालयात असताना मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. टीव्ही मालिकांसोबतच मी चित्रपटही करते. मला मराठी चित्रपटातील भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. माझा ‘फनरल’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेत काम करण्यामागील तुझं खास कारण काय आहे?

हे एक पारंपारिक, एकत्र राहणारे कुटुंब आहे, जिथे आधुनिक विचारसरणी असलेल्या माझ्या मैत्रिणीचे माझ्याच भावासोबत लग्न होते आणि ती आमच्या घरची सून होते. या मालिकेत मी कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान बहिणीची भूमिका साकारत आहे. कुटुंबात माझा भाऊ आणि त्याची बायको नेहमी छोटयाशा गोष्टीवरूनही भांडतात. त्यांचा राग घालवण्यासाठी माझे वडील आणि घरातील सर्व तरुण काहीतरी युक्ती शोधून काढतात.

ही भूमिका तुझ्या जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

वास्तविक जीवनातील माझे कुटुंब खूपच छोटे आहे, पण मालिकेतील मोठया कुटुंबासोबत चित्रिकरण आणि त्यांच्यासोबत मजा करायला मला आवडते. वास्तव जीवनात मला एक विवाहित बहीण आहे. तिला भेटायला मला क्वचितच वेळ मिळतो.

अभिनयाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडते?

मी पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर, मी बराच वेळ घरी होते. त्यानंतर मी काही दिवस टीव्ही वाहिनीवरील एका काल्पनिक कथानक असलेल्या मालिकेसाठी सहाय्यक क्रिएटिव्हिटी म्हणून काम केले. हा माझ्यासाठी एक अनुभव होता आणि असे काम करण्याची माझी इच्छाही होती. ज्या क्षेत्रात मी पडद्यावर काम करते त्याच क्षेत्रात पडद्यामागे काम करण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी अभिनय क्षेत्रात शिकता येत नाहीत त्या मला येथे शिकायला मिळाल्या.

तुला काही संघर्ष करावा लागला का?

मला पहिले काम काहीही संघर्ष न करताच मिळाले, मात्र काम टिकवून ठेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पहिले काम मला एका ओळखीतल्या दिग्दर्शकाने दिले होते. त्यामुळे काही लोकांना वाटते की, मला संघर्ष करावा लागत नाही आणि आरामात काम मिळाले आहे. म्हणूनच माझ्या अभिनयाचे ते कौतुक करत नाहीत. हा शिक्का पुसून काढण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

‘मोलकरीण बाई’ ही माझी पहिली मालिका होती. त्याआधी मी इतक्या मोठया स्तरावर काम केले नव्हते. या मालिकेमुळे लोक मला ओळखू लागले. या मालिकेमुळे मी खूप काही शिकले. त्याचा उपयोग मला आता होत आहे.

हिंदी चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मी प्रयत्न करत आहे, जिथे ऑडिशन्स होतात तिथे मी ऑडिशन देत आहे. हाही माझ्यासाठी एक संघर्ष आहे, ज्याद्वारे मी मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत ही संधी मला मिळेल, अशी आशा आहे.

अंतर्गत दृश्य तू सहजतेने करू शकतेस का?

मी ते कधीच केले नाही, पण जर कथेची मागणी असेल तर ते मी करू शकते. माझी सहकलाकार आणि मी त्या दृश्यावर जर चर्चा करू शकलो तर असे दृश्य करायला मला काहीच अडचण नसेल.

कोणत्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांसोबत तुला हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल?

मी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, कारण त्यांनी चित्रपटातील नायिकेला इतक्या उंचीवर नेले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी इंडस्ट्रीत नायक नेहमीच वैभवात जगणारे दाखवले जातात आणि नायिका एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातली असते. असे पूर्वी हिंदी चित्रपटांमध्येही दाखवले जायचे, पण आता हे चित्र बदलत आहे. संजय लीला भन्साळींनी नायक कितीही मोठा केला तरी तो नायिकेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी स्वर्गीय अनुभव असेल. याशिवाय मला अभिनेता विकी कौशलसोबत काम करायचे आहे.

तू खवय्यी, फॅशनेबल आहेस का?

मला सर्व काही खायला आणि बनवायला आवडते. सुट्टीच्या दिवशी मी घरीच काहीतरी बनवते आणि सेटवरही घेऊन जाते. सगळे एकत्र जेवतात. मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे. मला माझ्या आईच्या हातची डाळ-ढोकळी खूप आवडते. गोड पदार्थांमध्ये माझी आई लापशी खूपच छान बनवते.

फॅशनबद्दल मी फारशी जागरूक नाही, पण इंडस्ट्रीत राहायचे तर काहीतरी वेगळे करावेच लागते. मला पारंपरिक कपडे जास्त आवडतात. मी पारंपरिक छापील कापड विकत घेऊन स्वत:साठी ड्रेस शिवते. मला कपडयांच्या डिझाईनबाबत थोडेफार समजते. मला फॅशन आणि शॉपिंग खूप आवडते.

आवडता रंग – निळा.

आवडता ड्रेस – पाश्चिमात्य कपडे.

आवडते पुस्तक – कृष्णकिनार (अरुणा ढेरे).

आवडते परफ्यूम – अत्तर.

जीवनातील आदर्श – परिस्थिती कशीही असो, आईवडिलांचा आदर करणे.

वेळ मिळाल्यास – बाहेर फिरायला जाणे.

स्वप्नातला राजकुमार – माझ्या क्षेत्रातील असावा, सहनशील आणि कर्तव्यदक्ष असावा.

सामाजिक कार्य – गरजूंना मदत करणे.

इंडियन आयडल मराठी’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

* सोमा घोष

‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत.

पहिल्यांदाच मराठी भाषेत! ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. एवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. प्रस्तुत ‘इंडियन आयडल मराठी’ महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेली चुरस, अनुभवण्यासाठी पाहत राहा, ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

‘‘माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे’’ – वैष्णवी शिंदे

* सोमा घोष

२२ वर्षीय वैष्णवी शिंदे औरंगाबादची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिची ही आवड सोशल मीडियावर टाकून सर्वात अधिक लाईक्स मिळवणारी मुलगी बनली. हा तिचा छंद बनला आणि अभ्यासानंतर जेव्हादेखील वेळ मिळायचा तेव्हा ती नृत्य व अभिनय करायची. वैष्णवीला कधीच असं वाटलं नव्हतं की ती चित्रपटात अभिनय करू शकेल. वैष्णवी अभ्यासात खूप हुशार होती. तिने मॅथमॅटिक्समध्ये एमएस्सी केले आणि आता स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहे आणि तिचं स्वप्न आयएएस बनण्याचं आहे. परंतु चित्रपटांच्या चांगल्या ऑफर आल्या तर ती अभिनयदेखील करू शकते.

आयएएस बनल्यावर वैष्णवीला औरंगाबादला उत्तम रस्ते बनवायचे आहेत. जे कधीच कोणी केलं नाही. याबरोबरच क्लीन आणि ग्रीन इंडिया बनविण्याची तिची इच्छा आहे. तिचा मराठी चित्रपट ‘जिंदगानी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कन्सेप्ट वातावरण संरक्षित करण्याबाबत आहे. ज्याचा प्रभाव वास्तविक आयुष्यामध्ये देखील पूर्ण जगात पाहायला मिळत आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मला लहानपणापासूनच नृत्य, नाटक पाहणं आणि फोटोग्राफीची आवड होती. माझी आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे. तिला पाहूनच मी अभिनेत्री व्हायचं ठरवलं. परंतु यासाठी काय करायचं हे काही मला समजत नव्हत. मी लहान वयातच सोशल मीडियाशी जोडली गेले आणि काही नवीन गोष्ट म्हणजे नृत्य असो वा अभिनय मी सोशल मीडियावर टाकत गेले. यामुळे मला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली. मला सर्वांचे रिएक्शन पाहण्याची आवड होती. मला यामध्ये मजादेखील यायची. आता तर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्या कुटुंबातील मी पहिली कलाकार असल्यामुळे माझं या क्षेत्रांमध्ये येणं काही नातेवाईकांना आवडलं तर काहीजणांना अजिबात आवडलं नाही. त्यांना वाटत होतं की हे क्षेत्र माझ्यासाठी उत्तम नाही आहे. मुलींसाठीदेखील सुरक्षित नाही आहे. परंतु माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सर्वांची रिएक्शन पॉझिटिव्ह येऊ लागली. त्यांना माझा अभिनय आवडला आणि तो कायम राखण्यासाठी ते मला आता सल्ले देत असतात.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मराठी अभिनेता विनायक साळवेचं माझ्या घरी येणं-जाणं होतं त्यांना माहीत होतं की मी सोशल मीडियावर छोटयाछोटया रिल्स टाकते आणि सर्व तरुणाईला ते आवडतं. त्यांनी एक संवाद अभिनयासोबत बोलायला सांगितला. माझा अभिनय त्यांना थोडाफार बरा वाटला. त्यांनी त्यामध्ये काही बदल सुचविले. मी त्यांनी सांगितल्यानुसार पुन्हा अभिनय केला आणि त्यांना माझा अभिनय आवडला. त्याचवेळी त्यांनी मला चित्रपटात अभिनय करण्याच्याबद्दल विचारलं, मी होकार दिला आणि मला तो चित्रपट मिळाला.

चित्रपटामध्ये अभिनय करण्याबद्दल तू पालकांना सांगितलं तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? सर्व प्रथम कॅमेरासमोर भीती वाटली का?

माझी आई सुनीता शिंदेला खूप आनंद झाला, कारण पीएचडीचा अभ्यास करूनदेखील त्यांना चित्रपटाची आवड आहे. माझे वडील संपत शिंदे पोलीसमध्ये आहेत. त्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, म्हणून अभिनय क्षेत्रात येणं सहजसोपं झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सर्वांना माझं काम आवडलं आहे. माझे को-स्टार विनायक साळवे आणि शशांक शिंदे आहेत.

चित्रीकरणाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण होता. परंतु शूटिंग सर्वांसोबत होतं. सर्व मोठमोठे कलाकार होते. सर्वांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली होती, त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. सर्वांना ही गोष्ट समजत होती आणि सर्वांनी मला ताण न घेण्याचा सल्ला दिला. माझा पहिला शॉर्ट एवढा छान झाला की सर्वांनी टाळया वाजविल्या.

या चित्रपटामध्ये तुझी भूमिका कोणती आहे?

यामध्ये मी मोनीची भूमिका साकारली आहे. जी दिसते खूप शांत परंतु राग आल्यानंतर डेंजर बनते. खूप छान मुलगी आहे आणि कोणाशीही तिला अधिक बोलायला आवडत नाही.

पहिल्यांदा चेक मिळाल्यानंतर तू काय केलं?

मी सर्वप्रथम माझ्या आईच्या हातात चेक दिला आणि नंतर मी खूप शॉपिंग केलं. आई माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. ती माझी आवड नावड खूप चांगली समजते.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला फॅशन खूप आवडते. मी वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही घालते. मी डिझायनर कपडे घालत नाही. स्वत: मिक्स अँड मॅच करून वापरते. मला वेगवेगळया डिश ट्राय करायला खूप आवडतात, परंतु यामध्ये चाट मला अधिक आवडतं. मिठाईदेखील आवडते. आईच्या हातचा बनलेला गाजराचा हलवा खूप आवडतो. मला पोळी भाजी बनवता येते.

हिंदी आणि मराठी कलाकारांकडून तुला काय शिकायला आवडतं?

मला अभिनेत्री कैटरीना कैफ खूप आवडते. कारण तिने दुसऱ्या देशातून येऊन संघर्ष करून स्वत:ला एस्टॅब्लिश केलं आहे. अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा खूप आवडतो. मराठीमध्ये स्मिता पाटील यांचं काम आवडतं. अनेक लोकांनी मला मी स्मिता पाटीलसारखी दिसते असं सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरदेखील स्त्रिया घरगुती अत्याचार, बलात्कार इत्यादींना बळी पडत आहेत.

महिला दिनाबद्दल तू काय विचार करतेस?

माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत त्या दुसऱ्यांवर अवलंबून राहतील तोपर्यंत त्या मानसिक व शारीरिकरित्या त्रास भोगत राहतील. यासाठी खरंतर समाज आणि कुटुंबदेखील जबाबदार आहे, जे आपल्या मुलांना लहानपणापासून आई, बहीण, मुलगी आणि पत्नीच्या वेगवेगळया रूपात समजावून सांगत नाहीत. ज्यामुळे अशी मुलं मोठी होऊन कोणत्याही स्त्रीचा सन्मान करणं विसरून जातात आणि वाईट वागतात. या व्यतिरिक्त कायदयानेदेखील वाईट विचार ठेवणाऱ्या विरुद्ध लवकरच निष्पक्ष होऊन आपला निर्णय द्यायला हवा.

आवडता रंग : हिरवा.

आवडता पेहराव : भारतीय.

आवडते पुस्तक : द सीक्रेट.

पर्यटन स्थळ : देशात राजस्थान, परदेशात स्वित्झलँड.

वेळ मिळाल्यावर : झोपते आणि चित्रपट पाहते.

आवडता परफ्युम : पोसेस.

जीवनातील आदर्श : पालकांना अभिमान वाटेल असं.

स्वप्न : रोहित शेट्टीसोबत चित्रपट करणं.

सामाजिक कर्तव्य : रक्तदान प्रसार.

स्वप्नातील राजकुमार : लॉयल, हार्ड वर्किंग.

‘‘घराणेशाहीबद्दल काय म्हणणे आहे’’- स्वानंदी टिकेकर

* सोमा घोष

कलेच्या वातावरणात जन्मलेल्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि नाटयक्षेत्रात अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी एका मराठी कार्यक्रमात काम केले, त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी थिएटर आणि तदनंतर सुमारे ५ वर्षांनी त्यांनी टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रतिभावान आणि आनंदी स्वभावाच्या स्वानंदीने पूर्वी कधी अभिनयाचा विचार केला नव्हता, पण लहानपणापासूनच तिने कला क्षेत्राशी संबंधित लोकांना ये-जा करताना पाहिले आहे, त्यामुळे तिच्या मनात असा विचार आला की ती अभिनय क्षेत्रातही काम करू शकेल आणि त्यानंतर तिला पहिली असाइनमेंट ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये मीनल शिवालेची भूमिका मिळाली, ज्यामध्ये तिच्या कामाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली. मराठी व्यतिरिक्त स्वानंदीला हिंदीत काम करण्याची खूप इच्छा असून ती चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे. सध्या स्वानंदी मराठीवर चालणाऱ्या इंडियन आयडॉल मराठी या म्युझिकल शोमध्ये अँकरिंग करत आहेत. व्यस्त वेळापत्रकातही तिने वेळ काढून आमच्याशी चर्चा केली, जी खूपच मनोरंजक होती.

अँकरिंग आणि अभिनय यात काय फरक आहे आणि तुम्ही कधी नॉस्टॅल्जिक होता?

दिवसभर संगीत चालते, जे मला आवडते. या शोचे जज संगीत दिग्दर्शक अतुल अजय जे मुलांना मार्गदर्शन करतात, त्यात मलाही खूप काही शिकायला मिळते, ज्यामध्ये उच्चार, श्वास घेण्याच्या पद्धती, भावना ओतण्याच्या पद्धती वगैरे सगळं सांगतात. अभिनयातही एखादी भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची चर्चा होते. वास्तविक कलेसाठी कोणताही विशिष्ट असा नियम नाही, कारण सार्वत्रिकपणे अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्व कला प्रकारांसाठी लागू होतात.

अभिनय क्षेत्रात येण्याचे कारण काय होते? कोणाकडून प्रेरणा मिळाली?

मी पुणे येथे कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिकत असतानाच मी आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले होते. तिथे मला अभ्यासापेक्षा नाटकात अभिनय करायला जास्त आवडू लागलं होतं. माझे वडील उदय टिकेकर हेदेखील अभिनेते आहेत, माझ्या कुटुंबात सुरुवातीपासूनच कला आणि फॅशनवर खूप भर दिला गेला आहे. त्यामुळे मला कधीच कुठल्याही गोष्टीसाठी त्रास झाला नाही आणि मला जे आवडते ते मी करू शकते.

आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धांमध्ये काम करत असतांना मी स्वत:ला सुधारले. प्रेक्षकांकडून माझ्या अभिनयाचे कौतुक होण्याबरोबरच मला पुरस्कारही मिळू लागले. यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. याशिवाय मास्टर्स केल्यानंतर मला न्यूयॉर्क विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स इन ग्लोबल अफेअर्समध्येही प्रवेश मिळाला आणि त्या वेळी मला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या नाटक आणि टीव्ही शोमध्ये ऑफरदेखील मिळाली. मला कळत नव्हते की मी काय करावे? जेव्हा मी माझ्या पालकांशी बोलले तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे सांगितले की ते सर्व कलेशी संबंधित आहेत आणि कलेला महत्त्व देत आले आहेत, म्हणून त्या दोघांनीही मला अभिनयात जाण्याचा सल्ला दिला, जेणेकरून काही वर्षांनी मला माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ नये.

मराठी चित्रपटसृष्टीत घराणेशाही किती काम करते, याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?

माझ्या मते घराणेशाही तुम्हाला पहिले काम मिळवून देऊ शकते, त्याने करिअर बनू शकत नाही, पण तुमच्यात टॅलेंट असेल तर तुमचे करिअर घडू शकते. मी टॅलेंटला जास्त महत्त्व देते. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, ज्याबद्दल मी ऐकले आहे. मला हे मराठीत ऐकायला मिळाले नाही, कारण इथे टॅलेंटलाच जास्त संधी मिळते.

तुम्हाला तुमचा पहिला ब्रेक कधी मिळाला? कोणत्या शोमुळे तुम्ही घराघरात नावारूपाला आलात?

मला पहिला ब्रेक २०१४ मध्ये ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या शोमधून मिळाला होता, ज्यामध्ये माझ्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली आणि घरोघरी माझी ओळख झाली, कारण मी आहे तशीच यात येऊ शकले, हे काही सामान्य कौटुंबिक नाटक नव्हते. ६ मित्रांची कथा होती आणि हे सर्व मित्र एकत्र राहत होते. त्यांच्या आयुष्यातील पुढचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आजही प्रेक्षक मला मीनल या नावाने ओळखतात. यामुळे मला खूप आनंद होतो.

तुझा काही संघर्ष राहिला आहे का?

संघर्ष नेहमीच असतो, कारण योग्य प्रकल्पच तुम्हाला योग्य यश देतो. आजचे कलाकार नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करतात. मला कोणत्याही ‘उंदीरांच्या शर्यतीत’ सहभागी व्हायला आवडत नाही. तुम्हाला आयुष्यात दररोज चांगले काम मिळू शकत नाही, चढ-उतार येतच राहतात. आज लोक पराभवाला घाबरले आहेत आणि विजयाच्या मागे लागले आहेत. कोविडच्या काळात घरी बसून मला स्वत:लाही बजवावे लागले आहे की जे माझ्यासाठी नाही ते मला मिळणार नाही, त्याबद्दल ताण घेण्याने काही फायदा होत नाही, नुकसानच होते. प्रयत्न करत राहायचे आहे, अशाने तुम्हाला नक्कीच संधी मिळते.

तुम्ही म्युझिकल शोशी जोडले जाणे किती खास आहे?

मला म्युझिकल शो खूप आवडतात, कारण मी गाणे शिकले आहे आणि गातही असते, माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण संगीताशी जोडला गेला आहे. माझे आजी-आजोबा गायचे, आई गाते. यामुळे दिवसभर संगीत ऐकणे आणि त्यात अँकरिंग करणे, सर्वांना आनंद देणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. याआधी मी अभिनय केला आहे, अँकरिंग नाही. हे खूप अवघड काम आहे, स्क्रिप्ट दिल्यानंतरही तुम्हाला काही गोष्टी सेटवर त्वरित बोलाव्या लागतात. अँकरिंग हे अभिनयासारखे नसते, जिथे काही चुकले तर कट बोलून पुन्हा परत करता येईल.

तुमचे काही स्वप्न आहे का?

बेगम अख्तर, फरीदा खान यांसारख्या गझल गायिकांवर जर चित्रपट बनवले गेले तर मला त्यात मुख्य भूमिका करायला आवडेल.

आवडता रंग – पिवळा.

आवडते पोशाख – पाश्चात्य आणि भारतीय.

आवडते पुस्तक – नर्मदे हर हर – जगन्नाथ कुंटे.

आवडते पर्यटन स्थळ – देशातील ईशान्य, परदेशात प्राग.

सवड मिळाल्यास – गाणी ऐकणे, रियाज करणे आणि चित्रपट पाहणे.

आवडता परफ्यूम – वर्सास डायमंड.

स्वप्नांचा राजकुमार – प्रेमळ, संवेदनशील व्यक्ती.

जीवनाचे आदर्श – सत्यता, सर्वांशी स्नेह बाळगणे आणि प्रामाणिकपणे कार्य करणे.

सामाजिक कार्य – मुलांचे शिक्षण आणि मतिमंद मुलांसाठी कार्य.

स्वतःमध्ये कोणता बदल जाणवतोय Vicky Kaushal, वाचा मुलाखत

* सोमा घोष

‘मसान’ चित्रपटात बनारसी मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कारांतर्गत या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. विकीचे वडील श्याम कौशल हे अॅक्शन आणि स्टंट दिग्दर्शक आहेत. क्रिश 2, बजरंगी भाईजान, स्लमडॉग मिलेनियर, 3 इडियट्स इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये त्याने अॅक्शन दिली आहे. विकीला नेहमीच अभिनय करण्याची इच्छा होती. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. याआधी, त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या, ज्यामुळे त्याला अभिनयातील बारकावे शिकण्याची संधी मिळाली. विकी स्पष्टवक्ता आणि आनंदी आहे. त्याचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे, जो सरदार उधम सिंग यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे, ज्यामध्ये विकीच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. झूम कॉलवर विक्कीशी बोललो. चला जाणून घेऊया विकीच्या त्याच्या काही खास गोष्टी.

  • हा चित्रपट तुमच्यासाठी खूप खास आहे, तुम्हाला कधी त्याचे शूटिंग करावेसे वाटले आहे का?

होय, माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे, कारण जालियनवाला बाग पुन्हा तयार करणे खूप कठीण होते. स्क्रिप्ट मला हादरवायची आणि कधीतरी माझे डोळे ओले व्हायचे. कथा माहीत होती, पण जेव्हा खरचं चित्रीकरण करावं लागतं तेव्हा हीच भावना माझ्यात शिरायची. याशिवाय दिग्दर्शक शूजित सरकारचा सेट नेहमीच वास्तविक आणि सीननुसार गंभीर होता. माझे रक्त सुकायचे. रोज रात्री मी विचार करत राहिलो की शंभर वर्षांपूर्वी २० हजारांच्या जमावाने हे दृश्य एका शेतात पाहिले होते, जिथून त्यांना पळून जाण्याचा मार्ग नव्हता. एकच मार्ग होता ज्यातून सैनिक नि:शस्त्र लोकांवर सतत गोळीबार करत होते. त्या गर्दीत लहान मुले, म्हातारे, तरुण सगळेच होते. या दृश्याने मला थक्क करून सोडले.

  • हा चित्रपट इरफान खान करायचा होता, पण त्याच्या आकस्मिक निधनामुळे हा चित्रपट तुम्हाला मिळाला, इरफान तुमच्यापेक्षा चांगला अभिनय करू शकला असता असे वाटते का?

अभिनेता इरफान खान एक प्रतिभावान कलाकार होता आणि तो जगभरात प्रसिद्ध होता. त्याने अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत आणि माझ्यापेक्षा चांगला अभिनय केला असावा. त्यांच्यासारखं एक टक्काही काम मी करू शकलो तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. इथे ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी मी भाग्यवान आहे आणि जबाबदारीही आहे. हा चित्रपट माझ्याकडून त्यांना एक छोटीशी श्रद्धांजली आहे.

  • दिग्दर्शक शूजित सरकारसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

त्याच्यासोबत काम करताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे हा अनुभव खूप चांगला आहे. त्याच्याबरोबर काम करण्यापूर्वी, मला स्वत:ला रिक्त कप म्हणून सादर करावे लागले, जेणेकरून मी त्याची सूचना पूर्णपणे भरू शकेन. या चित्रपटाची संकल्पना शुजित सरकार यांनी 20 वर्षांपूर्वी केली होती आणि त्यामुळे ते दिल्लीहून मुंबईत आले, पण इथेही त्यांना निर्माता मिळाला नाही, कारण तेव्हा ते नवीन होते आणि असे चित्रपट ट्रेंडमध्ये नव्हते. आज हा बायोपिक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असून सर्वांनाच तो आवडला आहे.

  • या चित्रपटात तुम्ही सरदार उधम सिंग या स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली आहे, ती किती आव्हानात्मक होती आणि कोणता भाग करणे खूप कठीण होते?

यामध्ये मी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तयार केले होते, कारण यामध्ये मला एकदा 20 वर्षांचा सरदार उधम आणि 40 वर्षांचा सरदार उधमची भूमिका करायची होती, जी खूप आव्हानात्मक होती. मला दोन दिवसात 14 ते 15 किलो वजन कमी करावे लागले, जे खूप कठीण होते. तो भाग शूट केल्यानंतर पुन्हा 25 दिवसात 14, 15 किलो वाढवावे लागले. यासाठी मला सोशल मीडियावर काही फोटो सापडले, त्यानंतर काही जुन्या पुस्तकांवरून हे कळले की सरदार उधम सिंग हे खूप मजबूत आणि मजबूत व्यक्ती होते. म्हणूनच त्याला स्वतःला थोडे वजन आणावे लागले, चेहऱ्यावरचा जडपणा. याशिवाय तो वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रूप आणि नावे बदलत असे. अशा परिस्थितीत मला दिसायलाही शिकावे लागले. यासाठी, प्रोस्थेटिकचा वापर करण्यात आला, ज्यासाठी रशिया, सर्बिया आणि इथल्या टीमने एकत्र काम केले, कारण टीमने त्या काळातील प्रत्येक गोष्ट खरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून दर्शकांना वास्तविक वाटेल. त्या व्यक्तीच्या वेदना, दु:ख अशा मानसिक भावना चेहऱ्यावर आणण्यासाठी सुजित सरकार यांनी खूप मदत केली आहे.

  • एवढी उत्कट व्यक्तिरेखा साकारल्यानंतर तुझ्यात काही बदल झाला आहे का?

माझ्यात थोडा संयम आणि संयम आला आहे, कारण एका व्यक्तीने जालियनवाला बागेचे दुःख 21 वर्षे स्वतःच्या आत ठेवले आणि 21 वर्षांनी लंडनला जाऊन त्याचा बदला घेतला. यासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि मला थोडा संयम आला असावा.

  • सरदार उधम सिंग यांचे चरित्र तुम्हाला माहीत आहे का, कारण शाळेत सरदार उधम सिंग यांच्याबद्दल फारच कमी लिखाण केले जाते, या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अधिक वाचायला आणि ऐकायला हवे असे तुम्हाला वाटते का?

मला सरदार उधम सिंग बद्दल माहिती आहे, कारण पंजाबमधलं माझं गाव होशियारपूर, जालियनवालाबागपासून फक्त 2 तासांच्या अंतरावर आहे आणि इतिहासाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आल्यावर मी माझ्या आई-वडिलांकडून माहिती घ्यायचो, कारण त्या काळात स्वातंत्र्य आणि समता होती. वेशात जगभर फिरणे हे चित्रपटादरम्यान पुन्हा पुन्हा कळले.

पुस्तक, चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला जी लोकशाही मिळाली आहे ती अशा अनेक लोकांच्या त्याग आणि बलिदानामुळे आहे. ते जतन करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यावेळी 200 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना हटवणे सोपे नव्हते. शुजित सरकारनं 20 वर्षं या चित्रपटाची वाट बघितली आहे.

  • तुम्हाला राग कशामुळे येतो आणि जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही त्याचे व्यवस्थापन कसे करता?

जेव्हा मला खूप थकवा जाणवतो किंवा तीव्र भूक लागते तेव्हा मला राग येतो. मी स्वतःला एकटे ठेवून किंवा अन्न खाऊन शांत करतो. मी कोणाशी बोलत नाही, कारण कोणी काही बोलले की मला अश्रू अनावर होतात.

झोंबिवलीत रंगणार झोंबीजचा कहर

* प्रतिनिधी

Saregama प्रस्तुत, Yoodlee Films निर्मित आणि सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट आज इंस्टा लाईव्ह वरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून ४ फेब्रुवारी २०२२ ला ‘झोंबिवली’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तर ४ फेब्रुवारी ला ‘झोंबिवली’ स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की सज्ज राहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें