स्त्री नाहीए मुलं जन्माला घालण्याची मशीन

* गरिमा पंकज

अलीकडेच मुंबईच्या दादरसारख्या उच्चभ्रू भागात एका ४० वर्षीय स्त्रीने पोलिसात तक्रार दाखल केली की तिच्या पतीने तिच्या तिला मुलगा जन्माला घालण्याच्या दबावाखाली ८ वेळा गर्भपात करण्यास विवश केलं. यासोबतच तिला १,५०० पेक्षा अधिक हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देण्यात आले. भारतात गर्भपात बेकायदेशीर आहे, म्हणून तिचा गर्भपात आणि उपचार तिच्या सहमतीशिवाय परदेशात करण्यात आले. मुलगा होण्याच्या इच्छेने केल्या जाणाऱ्या या मनमानी विरुद्ध आवाज उठवल्यावर तिला मारझोड करण्यात आली.

पीडितेने तिचा हा वेदनादायी प्रवास सांगितला की लग्नानंतर काही काळातच पतीने वारसाच्या रूपात एक  मुलगा व्हावा म्हणून जोर दिला आणि जेव्हा असं झालं नाही तेव्हा तिला मारझोड करायला सुरुवात केली. त्यामुळे परदेशात तिचा ८ वेळा गर्भपात करण्यात आला. महिलेचे वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात केलं होतं. पीडितेचे पती आणि सासू दोघेही पेशाने वकील आहेत आणि ननंद डॉक्टर आहे.

२००९ साली पीडितेने एका मुलीला जन्म दिला. दोन वर्षानंतर २०११ मध्ये जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहीली तेव्हा तिचे पती तिला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि गर्भात पुन्हा मुलगी असल्याचं कळताच त्यांनी तिला गर्भपात करण्यासाठी विवश केलं.

आरोपी पती आपल्या पत्नीला भ्रुण प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन गेला आणि यापूर्वी आनुवंशिक रोग निदानासाठी बँकॉकमध्येदेखील घेऊन गेला. गर्भधान पूर्वी भ्रुणाची लिंग तपासणी करून त्यावर उपचार आणि सर्जरी केली जात होती. त्यानंतर पीडितेला १,५०० पेक्षा अधिक हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देण्यात आले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पतीच्या विरोधात छळ, मारझोड, धमकी आणि जेंडर सिलेक्शनची केस दाखल करण्यात आली.

हे सर्व पाहता, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर श्रीमंत आणि उच्चशिक्षित लोक असं करत असतील तर हुंडा देण्यात असमर्थ व अशिक्षित लोकांबद्दल काही बोलूच नका. अलीकडच्या काळात जेव्हा मुली उच्च हुद्दयावर पोहोचून सहजपणे स्वत:ची भूमिका निभावत आहेत, तेव्हा अशा प्रकारची विचारसरणी ठेवणाऱ्या श्रीमंत कुटुंबीयांच्या अशा संकुचित मानसिकतेवर खेद व्यक्त करण्या व्यतिरिक्त अजून काय बोलू शकणार?

स्त्रियांसोबत अमानुषता

परंतु इथे गोष्ट केवळ संकुचित विचारसरणी व वंशाच्या दिव्यासाठी हव्यास याची नाहीए. अशा प्रकारच्या केसेस खरंतर अमानुषतेची सीमा पार करतात. एका स्त्रीसाठी आई होण्याचा प्रवास सहज सोपा नसतो. गर्भधारणेनंतर पूर्ण नऊ महिने तिला कितीतरी शारीरिक त्रासातून जावं लागतं. हे केवळ एक स्त्री समजू शकते, परंतु अनेकदा पुरुष स्त्रियांना माणूस नाही तर मुलं जन्माला घालणारी मशीन समजतात.

त्यांना हेदेखील समजत नाही की एका आईची नाळ आपल्या बाळाशी जेव्हा ते तिच्या पोटात असतं तेव्हापासून जोडलेली असते. बाळ तिच्या शरीराचा एक भाग असतो. अशावेळी फक्त मुलगी झाल्यामुळे तिचा गर्भपात करणं, त्या जन्मास न आलेल्या मुलीसोबतचं आईच्या ममतेचादेखील खून केला जातो. असुरक्षित गर्भपात हे गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचं तिसरं सर्वात मोठं कारण आहे.

एवढंच नाही तर गर्भपात आणि उपचाराच्या नावाखाली तिच्या शरीरात हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देणं वा सर्जरी करणं कोणत्याही प्रकारे मान्य नाहीए. पती होण्याचा अर्थ असा नाही की पुरुष स्त्रीच्या शरीराचा मालक आहे आणि तिच्यासोबत काहीही करण्याचा हक्क त्याला मिळाला आहे. अशा प्रकारची लोक रेपिस्टपेक्षादेखील अधिक अमानुष असतात. रेपिस्ट एखाद्या अनोळखी महिलेसोबत जबरदस्ती करतो, परंतु पती ७ वचनं निभावून वचन देऊनदेखील स्त्रीसोबत अतिशय वाईट वागतो.

स्त्री केवळ मूल जन्माला घालण्यासाठी नाहीए

अलीकडेच अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या सरकारमध्ये स्त्रियांचा समावेश करणार असल्याच्या सर्व शक्यता धुडकावून लावत समूहाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की स्त्रियांनी फक्त मुलं जन्माला घालावीत. स्त्रीने कॅबिनेटमध्ये असणे गरजेचे नाही. त्यानंतर अफगाणिस्तानच्या शेकडो स्त्रियां स्वत:चा जीव धोक्यात घालून या विरोधात रस्त्यावर उतरल्या. तालिबानद्वारे विरोध केल्यावर कारवाईत महिला मोर्चेकऱ्यांच्या विरोधात लाठीकाठयांचा वापर करण्यात आला. एवढेच नाही तर तालिबानने अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या खेळांवरदेखील बंदी आणली.

अशा प्रकारचे विचार पुरुषांच्या छोटया विचारसरणीचा परिणाम आहे. आज स्त्रिया जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली हुशारी सिद्ध करत आहेत. तरीदेखील स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. गोष्ट तालिबानची असो वा भारताची, स्त्रियांसोबत अमानुषता कुठेही केली जाते आणि याचं कारण स्त्रियांबद्दलची समाजाची संकुचित विचारसरणी आहे. समाजाची ही वागणूक कुठे ना कुठे धार्मिक अंधश्रद्धा आणि धर्मगुरूंची देण आहे.

मी मूल जन्माला घालणारी मशीन नाहीए

स्त्री अभिनेत्री असो वा साधारण घरातील मुलगी अनेकदा भारतीय समाजात लग्नानंतर अनेक मुलींना हा प्रश्न आवर्जून विचारला जातो की ती आनंदाची पेढे केव्हा देणार आहे म्हणजेच आई केव्हा होणार आहे. असं वाटतं की जणू स्त्रीचं सर्वप्रथम आणि गरजेचं काम म्हणजे मुलं जन्माला घालणं आहे.

खरंतर गृह प्रवेश झाल्यानंतर स्त्रियांना एक उत्तम पत्नी आणि सुनेवर घराला वारस देण्याची जबाबदारीदेखील टाकली जाते. तिला मुलाची आई होण्याचा आशीर्वाद दिला जातो. आई होण्यास उशीर झाल्यावर टोमणे मारले जातात. केवळ कुटुंबियच नाही तर नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांचा दृष्टिकोणदेखील हाच असतो. अनेकदा घरातील मोठया मुलींना समजावलं जातं की लग्नानंतर करियर विसरून अगोदर घर आणि घराची जबाबदारी सांभाळायला हवी. मुलींना कधीही स्वत:च्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क मिळत नाही. अनेकदा सासू-सासरे मुलीकडे मागणी करतात की त्यांना नातू हवाय.

अशाप्रकारे कधी नातवाची इच्छा सासू-सासरे सुने वरती लादतात, तर कधी लग्नानंतर त्वरित बाळ होण्यासाठी ते उतावीळ होतात. असं वाटतं की जणू सून मूल जन्माला घालण्याची मशीन आहे. जेव्हा हवं तेव्हा नातवाला जन्म द्यावा आणि जर गर्भात मुलगी असेल तर तिची हत्या करा. जणू काही मुलीला स्वत:ची कोणतीही संवेदनाच नाहीए. तिचं कोणतही अस्तित्व नाहीए. रूढीवादी परंपरेनुसार मुलीशी असंच वागलं जातं.

बदलतं मुलीचं आयुष्य

लग्न तसही दोन लोकांमध्ये होतं. परंतु अपेक्षा फक्त सुनेकडूनच ठेवल्या जातात. तसंही नव्या वातावरणात अॅडजेस्ट होणं आणि घर सांभाळणं तिच्या आयुष्याचं एक आव्हान असतं. तिच्या आयुष्यात असे अनेक बदल येतात, याचा सामना फक्त आणि फक्त मुलीलाच करावा लागतो. एवढंच नाही तर नव्या रुढी-परंपरांपासून सर्व त्यांच्या मनासारखं वागण्याचं ओझंदेखील घरातील नवीन सुनेवर टाकलं  जातं.

ज्या मुलींसाठी आयुष्यात करिअर महत्त्वाचं असतं त्यांनादेखील आपल्या प्राथमिकता बदलाव्या लागतात. एक उत्तम सून, पत्नी बनण्याच्या नादात करीयर खूपच मागे फेकलं जातं. उरलेली कसर ती आई बनल्यानंतर घरच्या घरात राहून बाळ सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण करतात.

सोसायटीमध्ये दिखावा

समाजात दिखावा करण्याची प्रथा खूपच जुनी आहे. सून घरी आल्यानंतर लग्नात मिळालेल्या सामानापासून तिचं सौंदर्य आणि कुकिंग स्किल्सपासून सासरची लोकं नातेवाईकांसमोर स्तुती करून थकत नाहीत. असं करून ते समाजात स्वत:चा मान वाढवत असतात. सोसायटीत चांगल्या आणि वाईट सुनेचे काही मानदंड ठरलेले असतात. ज्यांच्या आधारे एका स्त्रीला जज केलं जातं. सून घरात किती काम करते, किती लवकर नातवाचं तोंड दाखवणार आहे वा किती मोठया घरातून आली आहे अशा गोष्टी तिचं चांगलं आणि वाईट बनण्याचा निर्णय करतो.

समाजाला नको असते आत्मनिर्भर मुलगी

समाजात एका आत्मनिर्भर सुनेला पचवणं आजदेखील कठीण आहे. जर सून स्वत:च्या कपडयांबाबत, करियर आणि मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या गोष्टी स्वत: ठरवत असेल तर सासरी तिचं टिकणं कठीण होतं. तिचे पती आणि सासु-सासऱ्यांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. जर एखादी सून कामावरून घरी उशीरा परतत असेल तर तिला जज केलं जातं. तिची पुरुष मित्राशी मैत्री असेल तर तिच्या  चारित्र्यावर प्रश्न केले जातात आणि लग्नानंतर आई न होण्याचा निर्णय तिने घेतला असेल तर तिच्यातील अनेक उणीवा शोधल्या जातात.

यासाठी गरजेचं आहे की स्त्रियांनी स्वत: स्वत:चं महत्त्व समजायला हवं आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली स्वत:चं आयुष्य वाया घालवू नये. पुरुषांनीदेखील अशा प्रकारची विचारसरणी स्विकारता कामा नये, मुलगा असो वा मुलगी कोणताही भेदभाव न करता बाळाला स्वत:चं प्रेम देण्याची गरज आहे.

 

अहंकारामुळे तुटणारी कुटुंबं

* रिता कुमारी

जुन्या समजुतीनुसार मुलीचे लग्न झाल्यावर आई-वडील तिच्याबाबतच्या जबाबदारीतून अंग झटकत असत. त्यावेळी मुलीची आई इच्छा असूनही मुलीसाठी काही करू शकत नव्हती. पती-पत्नीमधील तणावाचे कारण मुलाची आई मानली जायची, पण आधुनिक युगात आईवडिलांचा मुलीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. बहुतेक घरांमध्ये पतीवर पत्नीचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे मुलीच्या सासरच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक छोटया-छोटया गोष्टीत तिच्या आईचा हस्तक्षेप वाढू लागला आहे.

आजकालच्या मुलींचे तर काही विचारूच नका. त्या त्यांच्या घरातले सर्व काही त्यांच्या आईला फोनवर सांगतात. लहानसहान भांडणे किंवा दुरावा जो काही वेळाने स्वत:हून सुटतो, त्याबद्दलही त्या आईला सांगतात. त्यांच्या आई-वडिलांना मात्र हे समजताच वाद निर्माण होतो.

सुनेचे कुटुंबीय विशेषत: तिची आई तिला समजून घेण्याऐवजी सासरच्या मंडळींना जाब विचारू लागते, ज्याला मुलाचे घरचे लोक त्यांच्या इज्जतीचा प्रश्न समजतात आणि हे सर्व मुलाच्या कानावर घालून त्याला मध्ये बोलण्यासाठी भाग पाडतात. सासरच्या लोकांकडून संसारात होणारा हस्तक्षेप पतीला आई-वडिलांकडून समजल्यावर तो संतापतो आणि हा आपल्या आई-वडिलांचा अपमान मानून पत्नीशी भांडण करतो. दुसरीकडे, पत्नीही तिच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्या सन्मानासाठी पतीसोबत वाद घालते. आई-वडिलांच्या भांडणाच्या राजकारणात पती-पत्नीमध्ये विनाकारण भांडण, तणाव वाढत जातो.

छोटया-छोटया गोष्टींचा बाऊ करणे

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे लग्न करतात तेव्हा त्यांना त्यांचा सुखी संसार बघायचा असतो, तरीही स्वत:मधील दूरदर्शीपणाच्या अभावामुळे ते स्वत:च्याच मुलांचे आयुष्य उद्धवस्त करतात. आजकाल मुलीच्या आईला वाटते की, माझी मुलगी जावयाइतकेच कमावते आहे, मग कोणाचे कशासाठी ऐकायचे? त्यांचा असा विचार करणे योग्य आहे, चुकीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, अत्याचार सहन करता कामा नये, पण अत्याचार किंवा चुकीची गोष्ट घडली असेल तरच असा विचार करणे योग्य ठरते.

अनेकदा लहानसहान गोष्टींचा बाऊ केला जातो. प्रत्येक गोष्टीच्या विरोधातच बोलले पाहिजे असे नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर मोठयांचा अपमान करण्याऐवजी तुम्ही शांतपणे बोला आणि समजून घ्या. मी कोणापेक्षा कमी नाही, मीही तितकेच कमावते, मी जे बोलते तेच योग्य आहे, असे बोलून उगाचच वाद घालणे चुकीचे ठरते.

मुलींमध्ये अशी वाढती मनमानी म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य नव्हे तर त्यांच्यातील अहंकार ठरतो. शांततेच्या मार्गानेही कोणत्याही गोष्टीला विरोध होऊ शकतो. मुलीनेही समजून घेतले पाहिजे की, सासर हेच आता तिचे घर आहे आणि घराच्याही स्वत:च्या अशा काही मर्यादा असतात.

विनाकारण बोलणे

माझ्या शेजारी निवृत्त बँक कर्मचारी राहतात. त्यांचा मुलगा सरकारी कार्यालयात मोठया पदावर कार्यरत आहे. त्यांची सूनही मुलाच्या कार्यालयातच काम करते. नुकताच त्यांना नातू झाला. कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी फक्त जवळच्या लोकांनाच बारशाला बोलावले.

मुलाची आत्ये मुलगा झाल्याने सुनेचे अभिनंदन करत म्हणाली की, ‘‘बाळ वेळेआधीच जन्माला आल्यामुळे खूपच अशक्त आहे. असे वाटते की, सून कोल्ड्रिंक्स आणि फास्ट फूड जास्त खात असावी, त्यामुळेच बाळ वेळेआधीच जन्माला आले.’’

लगेचच मुलाची आई म्हणाली, ‘‘नाही… असे काहीच नाही ताई… कधी कधी असे घडू शकते.’’

शेजारी बसलेल्या सुनेच्या बहिणीने हे ऐकले. त्यावर लगेच प्रतिक्रिया देत ती म्हणाली, ‘‘ज्याच्या मनात जे येईल ते तो बोलतो ही चांगली गोष्ट आहे. ताई, तू याला विरोध का करत नाहीस, किती दिवस असे कुढत जगत राहाणार?’’

सुदैवाने तोपर्यंत आत्ये शेजारच्या खोलीत निघून गेली होती.

लगेच सुनेची आई म्हणाली, ‘‘कोणाला काही विचारायचेच असेल तर मला विचारा, जावयाला विचारा, पण माझ्या मुलीचा उगाचच असा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ती काही गरीब मुलगी नाही, ती अडाणी नाही. जावयाइतकेच कमावत आहे.’’

हे ऐकून मुलाची आई धावतच तेथे आली, ‘‘काहीही बोलू नका, ती घरात सर्वात मोठी आहे. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते नंतर माझ्याशी बोला.’’

लगेच सून म्हणाली, ‘‘माझी आई काय चुकीचे बोलली जे तुम्ही तिला गप्प करत आहात?’’

लगेचच बहीणही मध्ये बोलली, ‘‘या सर्वात मोठी चूक भाओजींची आहे. ते त्यांच्या आत्येला का विचारत नाहीत की त्या उगाचच निरर्थक का बोलतात?’’

लगेच मुलाची आई म्हणाली, ‘‘माझ्या मुलाच्या वडिलांची त्यांच्या बहिणीला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. मग माझा मुलगा तिला काय विचारणार? आमच्या घरात आम्ही मोठयांशी उद्धटपणे बोलत नाही.’’

चुकीचा सल्ला कधीच नाही

समुपदेशक वंदना श्रीवास्तव यांच्या मते, मुलीच्या सासरच्या छोटया-छोटया गोष्टींमध्ये आई-वडिलांचा हस्तक्षेप आणि मुलाच्या आई-वडिलांचा अवास्तव राग तसेच अतिरेकी हट्टीपणामुळे आज कुटुंबं वेगाने दुभंगत आहेत. वंदना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे बहुतेक अशीच प्रकरणे येतात, ज्यात आईच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मुलींचा संसार तुटण्याच्या मार्गावर असतो.

माझ्या शेजारी सिन्हा साहेब राहातात. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न मोठया थाटामाटात केले. ते सुनेला मुलीप्रमाणे वागवायचे. सूनही खूप आनंदी होती आणि अपेक्षेप्रमाणे सगळयांशी खूप छान वागत होती.

महिनाभरानंतर मुलगा सुनेसोबत दिल्लीला परतला. तो तिथे काम करायचा. सूनही तिथेच नोकरीला होती. ती गरोदर राहिल्यावर मुलाने आईला त्यांच्याकडे राहायला बोलावले, पण सुनेच्या आईला हे पटले नाही. आतापासूनच मुलाकडे राहून काय करणार? वेळ आल्यावर बघून घेऊ, असे सांगून ती मुलाच्या आईला घरी परतण्याचा सल्ला देत राहिली. मुलीच्या सासूने सल्ला न ऐकल्यामुळे अखेर ती मुलीला समजावू लागली की, तुझ्या सासूच्या मनात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे, तिच्या हातचे काही खाऊ नकोस.

मुलाच्या आईला हे समजताच तिने तेथून जाण्याचा निर्णय घेतला, पण मुलाने बरीच विनवणी केल्यामुळे तिला तिथे थांबवेच लागले. मुलगा झाला तेव्हा सुनेची आईही आली. ती आजीला बाळाला हात लावायला देत नसे. आई आल्यानंतर सुनेचे वागणे बदलू लागले. साधीभोळी सासू तिला मूर्ख वाटू लागली. आपल्या आईची साथ देऊन ती सासूशी वाईट वागू लागली. त्यानंतर अचानक आईसोबत माहेरी निघून गेली.

आपल्या मुलीला आनंदी बघायचे असेल तर विशेषत:मुलीच्या आईने तिला चांगला सल्ला दिला पाहिजे, जेणेकरून तिच्या मुलीचे तिच्या सासरच्या लोकांशी नाते घट्ट व्हावे, तिच्या चांगल्या वागण्याने ती सर्वांची मने जिंकू शकेल, सर्वांचे प्रेम आणि आदर मिळवू शकेल. आईचा विजय तेव्हाच होतो जेव्हा मुलीच्या सासरच्यांना तिचा अभिमान वाटतो. असे झाले तरच त्यांची मुलगी स्वत: शांततेने राहील आणि इतरांनाही शांततेत जगू देईल.

मुलाच्या आई-वडिलांनीही मुलीच्या सासरकडील नातेवाईकांच्या बोलण्याला आपल्या आदराचा मुद्दा बनवता कामा नये आणि लहानसहान गोष्टींवरून मुलीचा संसार मोडू नये याची काळजी घ्यायला हवी अन्यथा आई-वडिलांच्या अहंकाराच्या लढाईत विनाकारण मुलांचे घर तुटत राहील.

जीवनाची परीक्षा जिंकवणारे १५ धडे

* गरिमा पंकज

कोरोनाने आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. मौजमस्ती, वायफळ खर्च, दर दोन दिवसांनी उपहारगृहात जेवायला जाणे, तिथली पार्टी, उगाचच फिरायला जाणे, कधी भरपूर खरेदी, कधी सिनेमा पाहायला जाणे, तर कधी नातेवाईकांचे घरी येणे या सर्वांवर कोरोनाने निर्बंध घातले. बहुसंख्य लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. निरर्थक फिरण्याला लगाम लागला आहे. मास्क आणि सॅनिटायजर जीवनातील महत्त्वाचे घटक झाले आहेत.

अशा वेळी जर तुम्हीही या अशा जीवनापासून धडा घेऊन येणारे आयुष्य आणि भविष्य आनंदी करू इच्छित असाल तर स्वत:ची जीवनशैली, विचारसरणी आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत काही असे बदल करा, जेणेकरून एका सुंदर जीवनाची सुरुवात करू शकाल.

नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला शिका

नाती आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. संकट काळात माणूस आपल्या घराकडेच धाव घेतो. लोक घाबरून शहर सोडून आपापल्या गावी कसे पळत होते, हे आपण कोरोना काळात पाहिले. प्रत्यक्षात प्रत्येक माणसाला माहीत असते की, संकट काळात अनोळखी शहरात तो एकटाच असतो. त्यामुळे संकट जास्त मोठे वाटू लागते.

जेव्हा तुम्ही आपल्या माणसांमध्ये असता तेव्हा मिळूनमिसळून सर्व संकटांवर मात करू शकता. भलेही संकट कायम असते, पण दु:ख वाटल्यामुळे संकटाचा सामना करणे सोपे होते. आईवडील, भाऊ-बहीण ज्यांना तुम्ही कितीही बरेवाईट सुनावले असेल तरी जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा एखादे संकट येते तेव्हा तेच तुमचा खरा आधार बनतात.

म्हणूनच नेहमी आपल्या नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला हवे. त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की, तुमचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. ज्या प्रकारे बँक आणि तत्सम ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवता त्याचप्रकारे नात्यांमध्येही प्रेमाची गुंतवणूक करा. प्रेमाची शिंपडण करून नात्यांची बाग कोमेजू देऊ नका. मग पाहा, एक वेळ अशी येईल जेव्हा हीच बाग तुमचे जीवन आनंदाने फुलवेल.

मंदिरा, अनिलचा प्रेमविवाह होता. अनिल नेहमीच मंदिराची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. लग्नानंतर अनिल आणि मंदिरा ३-४ महिने कसेबसे कुटुंबासोबत राहिले. त्यानंतर मंदिराच्या सल्ल्यानुसार त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आईवडील दु:खी झाले, पण मंदिराला सासरी राहायला आवडत नव्हते.

सासूने सुनेचा हात प्रेमाने हातात घेत विचारले, ‘‘बाळा एकत्र राहण्यात काय अडचण आहे? इतके मोठे घर आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.’’

मंदिराने स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, घर कितीही मोठे असले तरी घरातील माणसांची गर्दी तर पाहा ना? नणंद, दीर, वहिनी, तुम्ही, बाबा आणि नंदू… इतक्या माणसांमध्ये माझा जीव गुदमरतो. त्यात सतत नातेवाईकांची ये-जा असतेच. मला लहानपणापासून कमी माणसांमध्ये राहायची सवय आहे. त्यामुळे वेगळे घर घेऊन अनिलसोबत राहीन. अनिलला मी याबद्दल लग्नापूर्वीच सांगितले होते.’’

आईने मुलाकडे अपेक्षेने पाहिले आणि त्यानंतर निमूटपणे मान खाली घातली. अनिल आणि मंदिराने दुसरीकडे घर घेतले. दोघे तिथे राहू लागले. नव्या घरात मोकळया वेळेत ती टीव्ही पाहायची किंवा मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारायची.

दरम्यान कोरोना संसर्गाची लाट आली. अनिलची नोकरी गेली. त्यावेळी मंदिरा गरोदर होती. आर्थिक चणचण जाणवू लागली. त्यातच अनिलला कोरोना झाला. अनिलची काळजी घ्यायची की स्वत:ची आणि गर्भात वाढणाऱ्या बाळाची? मंदिराला काही सुचेनासे झाले. तिने तिच्या आईला फोन लावला, पण ती स्वत:च आजारी होती.

नाईलाजाने तिने सासूला फोन करून सर्व सांगितले. सासूबाईंनी लगेच त्यांचे सामान भरले आणि त्या मंदिराकडे राहायला आल्या.

अनिलची सोय त्यांनी वेगळया खोलीत केली. मंदिराला आठवा महिना लागला होता, त्यामुळे तिलाही वेगळया खोलीत आराम करायला सांगितले आणि स्वत: काम करू लागल्या. स्वयंपाक, वेळेवर औषध देणे, सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतल्या. सासरे शक्य तेवढी आर्थिक मदत करत होते. दोघांनी मंदिराचा संसार सावरला.

तिने अनिलला विनंती करत सांगितले की, ‘‘माझ्या मुलीने रुग्णालयातून थेट तिच्या घरी म्हणजे तिच्या आजीच्या घरी जावे असे मला वाटते.’’

मंदिराचे बोलणे ऐकून सासूचे डोळे पाणावले. तिने मंदिराला प्रेमाने मिठी मारली.

सर्वात मोठी संपत्ती

खरेतर नाती म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती. आपण कितीही पैसा कमावला तरी जोपर्यंत नात्याची संपत्ती कमावत नाही तोपर्यंत जीवनातील खरा आनंद, मन:शांती मिळत नाही. जीवनात जे कोणी तुमचे आपले आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. कुठलेही नाते गृहित धरू नका. प्रत्येक नाते निभवायला शिका. तरच गरज पडताच तीही माणसे तुमच्या मदतीला धावून येतील.

आजकाल आपण त्रिकोणी कुटुंब पद्धतीच्या आहारी जात आहोत. त्यामुळेच बऱ्याचशा जवळच्या नात्यांपासून दुरावत चाललो आहोत. वेळ आली की आपल्याला त्या नात्यांचे महत्त्व समजते. कोरोनाने बऱ्याच अंशी लोकांचे डोळे उघडले आहेत. त्यांना आपल्या माणसांच्या सोबतीचे महत्त्व पटवून दिले आहे.

गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्या

संकट काळात गरजेला दोनच गोष्टी धावून येतात. आपल्या माणसांची सोबत आणि जमवलेले पैसे. नाती जोडून ठेवण्यासोबतच आपल्याला या नव्या वर्षात गुंतवणुकीचे महत्त्वही समजून घ्यायला हवे. तुम्ही खूप मोठया रकमेची गुंतवणूक करायला हवी, असे मुळीच नाही. तुमचे उत्पन्न कमी असले तरी हरकत नाही. तुम्ही छोटी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमवू शकता.

तसेही एकाच ठिकाणी जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळया ठिकाणी थोडी थोडी गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. यामुळे पैसे बुडण्याची भीती कमी होते आणि जास्त नफा मिळण्याची शक्यता वाढते.

सिप

जेव्हा गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडात सिपमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामुळे शेअरचा लाभ मिळतो, शिवाय हे सुरक्षित असते. व्याजाची रक्कम ठरलेली असते. ती फार बदलत नाही. यात मोठया कालावधीपर्यंत छोटी-छोटी रक्कम गुंतवता येते. जे धोका पत्करायला तयार असतात ते इक्विटी लिंक्ड सेविंग या योजनेत पैसे गुंतवू शकतात. ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे ते हायब्रिड किंवा डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. यात तुम्हाला बऱ्याच अंशी ठरलेला परतावा मिळतो.

लाईफ इन्शुरन्स अर्थात जीवन विमा

लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमाअंतर्गत १५ वर्षांत बऱ्याच कंपन्या दुप्पट परतावा देतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दरमहा, तीन महिन्यांतून एकदा, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

मुलीच्या जन्मानंतर,१० वर्षांच्या आत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही एक सरकारी योजना आहे, जिथे तुम्हाला वर्षाला २५० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात परतावा खूप चांगला मिळतो. ७.५ टक्यांपर्यंत व्याज मिळते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर रक्कम परत मिळते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

तुम्ही पीपीएफमध्ये थोडे थोडे पैसे भरून चांगला परतावा मिकवू शकता. हीदेखील एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

शेअर

सुरुवातीला फिक्स डिपॉझिट म्हणजे सुरक्षित ठेवींवर चांगला परतावा मिळायचा. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे. आता मात्र बँका खूप कमी व्याज देतात. त्यामुळेच लोक इतर पर्यायांकडे वळत आहेत.

वायफळ खर्च टाळा

आतापर्यंत आपण जीवनाकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. गरज नसतानाही केवळ मनाला वाटले म्हणून कपडे, खूप सारी खरेदी करतो. एखादे गॅझेट आवडले तर ऑनलाइन मागवतो. मनाला वाटेल तेव्हा बाहेर जेवायला जातो. मित्रांसोबत पार्टी करतो. छोटीशी गोष्टही भरपूर खर्च करून साजरी करतो. एकंदरच वायफळ खर्च करण्यात आपण सर्वात पुढे असतो. आता मात्र या महामारीनंतर आपण हा धडा गिरवायला हवा की, उगाचच खर्च करणे योग्य नाही. कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली. बऱ्याच जणांचा पगार कमी करण्यात आला. पुढील काही काळ परिस्थिती अशीच असेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्य आहे तर सर्वकाही आहे

या कोरोना काळात आपल्याला एक गोष्ट चांगलीच समजली आहे की, जीवनात निरोगी आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य बिघडले असेल तर तुमच्याकडे जगभरातील सुखसुविधा आणि संपत्ती असूनही तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही आणि प्रत्येक श्वासासाठी लाचार होता. म्हणूनच स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली आणि आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. दररोज पहाटेच्या मोकळया हवेत फेरफटका मारणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचारसरणी आणि नात्यातील गोडव्यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. आरोग्य निरोगी राहील याकडे लक्ष द्या. पौष्टिक आहार घ्या, चांगला विचार करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल आणि शरीरही आतून मजबूत होईल.

निरर्थक वाद घालू नका

वाद आणि तणाव यामुळे बऱ्याचदा आपण मन:शांती गमावतो, शिवाय यातून हाती काहीच लागत नाही. उलट नात्यांसोबत आरोग्यही बिघडते. जीवनात कधीही काहीही होऊ शकते, याचा अनुभव मागच्या वर्षात आपण घेतला आहे. उद्याचा भरवसा नसतो. म्हणूनच आज चांगल्या पद्धतीने जगा. आज सुंदर करण्यासाठी डोकं आणि मन शांत असणे खूपच गरजेचे असते. त्यासाठी निरर्थक वाद किंवा भांडणांपासून दूर राहायला हवे.

अशा ठिकाणी फिरायला जा, जिथे कधीच गेला नसाल

निसर्गाचा पदर सर्व लेकरांना सामावून घेणारा आहे. आपण निसर्गाच्या जितके जवळ राहू तितके आपले आरोग्य निरोगी राहील. नवनवीन ठिकाणांवर फिरल्यामुळे मन प्रसन्न होते. कोरोनाने आपल्याला घरात बंद केल्यानंतरच आपल्याला बाहेर फिरण्यात किती आनंद असतो, याची जाणीव झाली आहे. परिस्थिती हळूहळू आणखी सुधारेल आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी पुन्हा मिळेल. तिथे जाता येईल जिथे निरोगी आरोग्यासह निखळ आनंद मिळेल. शक्यतो आपल्या घराच्या आजूबाजूलाही हिरवळ राहील, असा प्रयत्न करा.

राखून ठेवलेली कामे पूर्ण करा

बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे, आपले ध्येय बाजूला ठेवून आलेला दिवस घालवत असतो. वेळच मिळत नाही, असे कारण सतत पुढे करतो. कधी कामावरच्या कामांची धावपळ तर घर, मुलांचा अभ्यास, या सर्वांमध्ये दिवसच काय, पण कामासाठी रात्रही अपुरी पडते. त्यामुळे अधिकचे काम करणार कधी? हा बहाणा ऐकायला बरा वाटतो, पण या बहाण्याआडून तुम्ही खूप काही गमावत असता.

वेळेचा सदुपयोग

धावपळ कमी करूनही आपण जीवनातील सर्व जबाबदाऱ्या कशा पार पाडू शकतो, हे कोरोना काळाने आपल्याला शिकवले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तुमच्या डोक्यात हा विचार नक्की आला असेल की, तुम्ही दैनंदिन कामात काही वेळ उगाचच वाया घालवत होता.

एकीकडे कार्यालयात जाण्यासाठी बराच वेळ घालवायचा तर दुसरीकडे मित्रांसोबत कधी खरेदी तर कधी बाहेरचे जेवण. महागडया उपहारगृहात जेवणासाठी नंबर लागेपर्यंत रांगेत उभे राहणे तर कधी चित्रपट पाहण्यासाठी वेळ वाया घालवणे. त्याऐवजी तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली असती तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठणे किंवा पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले असते.

एखादे काम नंतर करू, असा विचार करून तुम्ही ते बाजूला ठेवता, पण ते पूर्ण करण्याइतका वेळ जीवन आपल्याला देईल का? म्हणूनच हातातले काम लगेच पूर्ण करा. आज तुमचा आहे. उद्याचा भरवसा नाही. तर मग सर्व महत्त्वाची कामे आजच पूर्ण करायला नकोत का?

कारण नसतानाही आनंदी रहा

जीवनात खुश होण्यासाठी तुम्ही संधीची वाट पाहात बसाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. माणूस आनंदी राहिला तरच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो निरोगी राहतो. मनातल्या आनंदाचा आरोग्याशी थेट संबंध येतो. म्हणूनच स्वत:ला नेहमी आनंदी ठेवा. यामुळे चेहऱ्यावरही चमक येते. कारण नसतानाही काही चांगल्या गोष्टी आठवून हसा. चांगले कपडे परिधान करा. मस्त दिसा. मेकअप करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही सुंदर दिसाल आणि निरोगीही राहाल.

लग्नातील वारेमाप खर्च निरर्थक

* शाहनवाज

तुम्ही कधी विचार केला आहे की २ व्यक्तींना नात्यात बांधण्यासाठी बाजारात किती किंमत मोजावी लागते? साहजिकच जेव्हा गोष्ट खर्चाची येते तेव्हा त्याकडे डोळेझाक करून चालत नाही.

मला २ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने त्याच्या काकाच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्न उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी मी तिथे पोहोचलो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे घर पाहून माझ्या लक्षात आले. त्याचे काका छोटयाशा जमिनीवर शेती करायचे आणि शेतीचा हंगाम संपला की शहरात जाऊन मजुरी करायचे.

माझ्या मित्राने मला सांगितले की, मुलाकडून कोणत्याही प्रकारची हुंडयाची मागणी करण्यात आलेली नाही. फक्त त्यांनी लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे सांगितले आहे.

जेव्हा वधू आणि वराला ७ फेऱ्या मारण्यासाठी उभे केले जात होते, तेव्हा मला मंडपाच्या बाहेर एक ट्रक दिसला, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पलंग, कपाट इत्यादी घरगुती वस्तू ठेवण्यात येत होत्या. अचानक मला माझ्या मित्राने हुंडा न घेण्याबाबत जे सांगितले होते ते आठवले, पण त्यावेळी त्याच्याशी या विषयावर काही बोलणे मला योग्य वाटले नाही.

लग्न आटोपून आम्ही दिल्लीला निघालो. बसमधून प्रवास करत असताना मी त्याला विचारले की, नवऱ्या मुलाकडून हुंडा मागण्यात आला नाही, असे तूच मला सांगितले होतेस ना? मग ते  सामान का भरले जात होते?

त्याने उत्तर दिले की, काकांनी ते सर्व सामान स्वत:च्या वतीने भेट म्हणून दिले होते, जेणेकरून उद्या काहीही घडले तरी कोणीही त्यांच्या मुलीला नावे ठेवू नयेत. मुलीला रिकाम्या हाती पाठवले असे टोमणे नवऱ्याकडच्या मंडळींसह काकांच्या स्वत:च्या नातेवाईकांनीही मारू नयेत, हे त्यामागचे कारण होते.

त्याने सांगितले की, कुटुंबातील इतर लग्नांमध्येही काकांना अशाच पद्धतीने मुलींना घरासाठीच्या सर्व वस्तू  द्याव्या लागल्या होत्या. कारण या वस्तू न दिल्यामुळे आपल्याच नातेवाईकांमध्ये रंगणाऱ्या गप्पा, कुजबूज, टोमणे त्यांना ऐकायचे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या गोतावळयात असलेली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी ते हा सर्व खर्च झेपत नसतानाही करत होते.

काही अशा प्रकारचे असते सामाजिक दडपण

तुम्हीही तुमच्या आयुष्यात कधीतरी असे घडताना पाहिले असेलच. हे फक्त एक प्रकारचे दडपण असते, जे वडिलांवर येते. या यादीत इतर अनेक प्रकारची सामाजिक दडपणे येतात आणि ती आपण नेहमीच पाहत असतो, पण पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो.

मी जिथे राहतो तिथे माझ्या शेजारीच रामदासजी राहतात. नुकतेच त्यांनी त्यांचा मुलगा रवीचे लग्न लावून दिले. एकतर आधीच कोरोनामुळे सर्वांचे खिसे रिकामे झाले आहेत, अशातच लग्नावर होणारा खर्चही तुटपुंजा नसून भरमसाठ असतो.

तसे तर रामदासजींचे दिल्लीत स्वत:चे घर आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात त्यांना एखाद्या भाडेकरूप्रमाणे खोलीचे भाडे भरण्याची गरज नाही. पण कोरोना सुरू झाल्यापासून आणि लॉकडाऊन लागल्यानंतर इतर अनेक लोकांप्रमाणेच त्यांनाही नोकरी गमवावी लागली.

समाजातील प्रतिमा तर मलीन होणार नाही ना?

याच काळात रवी आमच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्याने हट्ट धरला. रामदासजींनी त्याला बरेच समजावले की, घरची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही, सर्व पूर्वपदावर आल्यानंतर लग्न लावून देतो, पण रवी काही केल्या ऐकायला तयार नव्हता. अखेर रामदासजी मुलाच्या लग्नासाठी तयार झाले. त्यांनी असा विचार केला की, कोरोना काळ असल्यामुळे जास्त लोकांना आमंत्रण द्यायचे नाही आणि मुलीच्या घरच्यांकडेही कुठलीच मागणी करायची नाही.

रवीचे मित्र, नातेवाईक आणि काही ओळखीचे मिळून पन्नासच्या आसपास लोकांना आमंत्रण द्यायचे ठरले. लग्न झाल्यानंतर रवीला त्याच्या सासरच्या मंडळींकडून एक बाईक आणि काही संसारोपयोगी वस्तू मिळाल्या.

लग्नाच्या ३ दिवसांनंतर मुलीच्या घरच्यांना आणि काही मित्रांना बोलवून घरीच छोटेखानी रिसेप्शन देण्याचा हट्ट रवीने वडिलांकडे धरला. असे केले नाही तर नातेवाईक आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये आपली काय इज्जत राहणार, असे तो म्हणाला. त्यामुळे अखेर नाईलाजाने रामदासजींना त्याचे ऐकावेच लागले.

रामदासजी आणि रवीच्या अशा वागण्यावरून हेच स्पष्ट होते की, केवळ सामाजिक दडपणच नाही तर आपल्या मुलाचा किंवा अनेक ठिकाणी आपल्या मुलीचाही दबाव वडिलांवर असतो. आता या छोटयाशा लग्नातील खर्चाचा विचार तुम्हीच करू शकता. खिशात पैसे नसतानाही सामाजिक दबावामुळे लोकांना अशा लग्न सोहळयासाठी खर्च करावाच लागतो, जेणेकरून त्यांची समाजातील प्रतिमा खराब होऊ नये, त्यांची लाज जाऊ नये.

लोक काय म्हणतील?

आता कोणी असेही म्हणेल की, हे सर्व ऐकून लग्नच करायचे नाही का? किंवा लग्नात आपल्या नातेवाईकांना बोलवायचेच नाही का? इथे लोकांनी एकत्र येऊन आनंद सोहळा साजरा करण्यावर चर्चा सुरू नाही किंवा कोणाला लग्न न करण्याचा सल्लाही द्यायचा नाही, पण या विषयाचे तात्पर्य अगदी सहज सोपे असेच आहे. ते म्हणजे लोक लग्नावर खर्च करण्यापूर्वी इतर लोक किंवा समाज काय म्हणेल, याचा विचार करून खर्च करतात, अर्थात समाजाचा विचार करतात एवढेच.

सध्याच्या काळात समाजाची अर्थव्यवस्था खेळती राहण्यासाठी लग्नांमध्ये होणारा खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याशी अनेक प्रकारचे व्यवसाय जोडले गेले आहेत, उदाहरणार्थ, कॅटरर्सकडून जेवण घेणे, बँक्वेट हॉल बुक करणे किंवा कम्युनिटी हॉल बुक करणे, वेटरचे काम, लग्न लावण्यासाठी ब्राह्मण, मौलवी किंवा पाद्री इत्यादी. म्हणूनच या लोकांसाठी लग्न होत राहणे खूप गरजेचे आहे.

प्रवीणच्या वडिलांनी प्रवीणचे लग्न मोठा बँक्वेट हॉल किंवा मोठया पार्कमध्ये नव्हे तर परिसरातील एसडीएम कार्यालयात जाऊन कायदेशीररित्या विवाह नोंदणी करून लावून दिले. नोंदणीच्या २ किंवा ३ दिवसांनंतर, त्यांनी स्वागत समारंभासाठी एक सरकारी कम्युनिटी हॉल बुक केला. त्यांनी १५० लोकांना आमंत्रण दिले होते. मुलाचे लग्न पारंपारिक पद्धतीने केले असते तर त्यांना कदाचित सध्याच्या खर्चाच्या ३ पट जास्त खर्च आला असता. त्यांनी त्या उर्वरित पैशांची एफडी प्रवीणच्या नावे करून घेतली, जी त्याच्या वाईट काळात त्याला उपयोगी पडेल. मुलीकडच्या लोकांनीही बँकेत वधूच्या नावे एफडी करून घेतली, जेणेकरून ती गरजेच्या वेळी मोडता येईल.

प्रवीणच्या वडिलांनी त्याचे लग्न किती समजूतदारपणे लावून दिले, याचा अंदाज तुम्ही स्वत: लावू शकता. सध्याच्या काळात समाजाची गरज आहे की, त्याने वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करू नये. समाजाच्या या ओझे बनत चाललेल्या मानसिकतेला मोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकून विवाह पारंपरिक पद्धतीने वारेमाप खर्च करून न करता फक्त कायदेशीर नोंदणी करून करणे गरजेचे आहे.

मुलगा पाहताना या 17 गोष्टी लक्षात ठेवा

* पारुल भटनागर

आता ती वेळ राहिली नाही जेव्हा तरुण मुलीला भेटायला जायचा आणि तिच्या आवडीनिवडी सांगायचा. बदलत्या काळात आता फक्त तरुणच नाही तर मुलगीही त्या मुलाला बघायला जाते आणि तो कसा दिसतोय अशा दहा गोष्टी लक्षात आणून देतो. त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे? शरीरयष्टी ठळक आहे की मामाचा मुलगा नाही? इत्यादी

आज मुलींना समान वाटा मिळाल्यामुळे कोणत्याही बाबतीत तडजोड करणे आवडत नाही. तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत राहायचे आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शक्य तितके माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आणखी शंका नाही.

अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मुलाला भेटायला जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतः असे काहीही करू नका ज्यामुळे तुमचे नकारात्मक व्यक्तिमत्व दिसून येईल.

  1. जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाला पहिल्यांदा भेटता तेव्हा त्याच्या देहबोलीकडे विशेष लक्ष द्या. याच्या मदतीने तुम्हाला त्याच्या अर्ध्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येईल. बोलत असताना, बोलण्यापेक्षा तो हात पाय तर हलवत नाही ना ते पहा. बोलत असताना चेहऱ्यावर विचित्र प्रतिक्रिया येत नाहीत. यामुळे तुम्हाला त्याचा न्याय करणे खूप सोपे होईल.
  2. बोलत असताना या गोष्टीकडे लक्ष द्या की जर तो तुझ्याशी बोलू लागला नाही तर यार, मला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे, तू आज खूप गोंडस दिसत आहेस. जर तुम्ही असे म्हणत असाल, तर समजून घ्या की तो तुमच्यासाठी लायक तरुण नाही, कारण पहिल्याच संभाषणात तुम्ही भविष्यात त्याच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करू शकत नाही.
  3. जरी त्या तरुणाचे सॅलरी पॅकेज खूप चांगले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याच्या प्रत्येक गोष्टीत पगाराचा उल्लेख आहे. जसे आम्हा दोघांचे लग्न झाले तर तुम्ही ऐश कराल, तुम्हाला ब्रँडेड वस्तू वापरण्याची संधी मिळेल, कारण मी ऑफिसच्या कामासाठी परदेशात जात राहते. यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्याला त्याच्या पगाराचा अभिमान आहे.
  4. तरुणाला जाणून घेण्यासोबतच त्याच्या कुटुंबालाही एका नजरेत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ते ज्या पद्धतीने संवाद साधतात त्यावरून तुम्हाला समजेल की ते विचारांचे लोक आहेत. तुम्ही मुलीला नोकरी मिळवून देण्याच्या बाजूने आहात की नाही? ते घरातल्या मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्त्व देत नाहीत. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यास तुम्हाला निर्णय घेणे खूप सोपे जाईल.
  5. चर्चेत कुठेही हुंड्याचा संकेत नाही. आमच्या मोठ्या सुनेने लग्नात सर्व काही आणले होते, आमचा मुलगा वर्षाला 15 लाख रुपये कमावतो, आमच्याकडे लग्नात नातेवाईकांची विशेष काळजी घेण्याची प्रथा आहे. तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते तुमच्या मुलीलाच द्यायचे आहे, आम्हाला काही नको आहे अशा गोष्टी जर बैठकीत होत असतील तर समजा त्यांना मुलीपेक्षा हुंड्यात जास्त रस आहे.
  6. तुमचे कुटुंबीय मुलीला तुमच्याशी बोलण्यास सांगत आहेत आणि जर तिने आईची परवानगी घेऊन स्वतःला मामाचा मुलगा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तर समजून घ्या की त्या मुलाचे स्वतःचे कोणतेही व्यक्तिमत्व नाही आणि प्रत्येक गोष्ट आईवर अवलंबून आहे.
  7. जर थोडे गंभीर बोलले तर तो सरळ कपड्यांवर येतो जसे की मला सूट वगैरे आवडत नाही. माझ्या आयुष्याच्या जोडीदाराने नेहमी गरम कपडे घालावेत, हे तुम्हाला समजण्यास मदत करेल की त्याला तुमच्यापेक्षा लहान कपड्यांमध्ये जास्त रस आहे, जे सुखी वैवाहिक जीवनासाठी योग्य नाही.
  8. असे आहे का की पहिल्या भेटीतच तो तरुण तुमच्याशी भविष्यातील प्लॅनिंगबद्दल बोलू लागतो की लग्नानंतर आपण एकटे राहू, अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी मॅनेज करू, मला मुलगे खूप आवडतात.त्याची मॅच्युरिटी कळते.
  9. हे आवश्यक नाही की जेव्हा आपण अशा मीटिंगसाठी कुठेतरी बाहेर जातो तेव्हा नेहमी मुलीच्या व्यक्तीने बिल भरले पाहिजे. तुमचे आई-वडील बिल भरू देत नसले तरीही हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ बिल भरू नका. जर त्याने एकदाही बिल भरण्याचा उल्लेख केला नाही, तर समजा तो फक्त फुकट खाण्यापिण्याच्या तत्त्वाचे पालन करणार आहे.
  10. तुम्ही खूप हुशार असलात तरीही, पण याचा अर्थ असा नाही की मुलाचे गुण बघण्याऐवजी त्याच्या स्मार्टनेसच्या आधारे त्याला गुण दिले पाहिजेत. आपण एक गोष्ट गृहीत धरू की स्मार्टनेस काही दिवसांसाठीच चांगला दिसतो, त्यानंतर आयुष्य माणसाच्या गुणांच्या जोरावरच चालते. त्यामुळे बाह्याबरोबरच आतील व्यक्तिमत्त्वही लक्षात ठेवा.
  11. हे आमच्या घरात घडते, आम्ही असे राहतो, आम्ही ते खात नाही, आम्ही तीळ सोडून इतर कोठूनही खरेदी करत नाही. तुमचं राहणीमान खूप उंच असलं तरीही तुम्ही एखाद्या माणसाशी अशा गोष्टी केल्या तर तुम्ही कितीही देखणा असलात तरी तो तुमच्याशी लग्न करणार नाही.
  12. समजा मुलींना शॉपिंगची आवड आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 20 मिनिटांत 15 मिनिटे खरेदी केल्यानंतरच तरुणाशी बोला. जसे की मी आठवड्यातून एकदा खरेदीला जाईपर्यंत मला आराम वाटत नाही, तुम्हाला खरेदी करायला आवडते का? आमचं लग्न झालं, तर दर वीकेंडला तू माझ्यासोबत शॉपिंगला जाशील का? अशा गोष्टींमुळे तुम्हाला लग्नापेक्षा शॉपिंगमध्ये जास्त रस असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे तुमचे नकारात्मक व्यक्तिमत्व दिसून येईल.
  13. आज सोशल मीडियाचे युग आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचे सर्वत्र वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मुलाशी बोलत असता तेव्हा तुम्ही सोशल साइट्सवर सक्रिय आहात की नाही हे विचारू नका. जर होय तर तुमचा आयडी द्या म्हणजे मी तुम्हाला माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये समाविष्ट करू शकेन. यातून हाच मेसेज पोरांना जाईल की तू सोशल मीडियाचा किती वेडा आहेस, तेव्हाच तू सोशल मीडियाला अशा गंभीर चर्चेत आणले आहे.
  14. जेव्हा तुम्ही त्या मुलाला भेटायला जाल तेव्हा त्याचा बायोडाटा नीट वाचा की तो कुठे काम करतो, कोणत्या कंपनीत काम करतो, त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि कोण काय करते. त्याच्या कंपनीची आणि पदाचीही माहिती ठेवा. यासह, जेव्हा तो त्याच्या कंपनीबद्दल सांगत असेल, तेव्हा त्याला तुमच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
  15. पहिल्या भेटीतच तुमचा नंबर त्याच्याशी शेअर करू नका, कारण तुम्हाला काय माहिती आहे की मॅटर होईल की नाही. तेव्हा ही गोष्ट तुमच्या पालकांवर सोडा, कारण तुमचे नाते असेल तर पालक स्वतःच तुमचा नंबर घेतील जेणेकरून तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळेल.
  16. जर वडिलधाऱ्यांनी कोणत्याही विषयावर बोलत असेल की आपण आपल्या गावीच लग्न करणार आहोत, अशा स्थितीत, मध्येच पाय लावू नका, काकू, असे होणार नाही. तुमच्या या वागण्याने तुमचा उद्धटपणाच दिसून येईल, त्यामुळे गरज असल्याशिवाय मध्येच बोलू नका.
  17. जर तुम्हाला त्या मुलाची एखादी गोष्ट आवडत नसेल तर लगेच रागावू नका पण शांतपणे तुमचा मुद्दा ठेवा, यामुळे त्याच्यावर चांगला प्रभाव पडेल आणि त्याला असे वाटेल की तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे समायोजित करायच्या आहेत.

अशा रीतीने तुमचा जीवनसाथी निवडण्यात तुम्हाला सोपे जाईल.

एकमेकांना समान आदर द्या

* प्रतिनिधी

जेव्हा सामान्य लोकांमध्ये लग्ने तुटतात तेव्हा प्रकरण लोकलपर्यंत राहते, पण जेव्हा सिमरचे नाते तुटते तेव्हा कळते की पती-पत्नीचे नाते कसे नाजूक आणि वालुकामय जमिनीवर आहे की थोडासा गैरसमज त्यांना वेगळे करू शकतो.

धरम चोप्रा आणि राजीव सेन यांच्या लग्नानंतर. मुलीच्या जन्मानंतर होणारी फाटाफूट ही दोषी ठरत आहे की, लग्नानंतर आयुष्य रुळावर ठेवायचे असेल तर रेल्वेप्रमाणेच इंजिनाचीही काळजी घ्यावी लागते. ट्रॅक वेगळा झाला, सुंदर डिझायनर कपड्यांमध्ये 200-300 लोक एकमेकांभोवती फिरणे पुरेसे नाही.

‘क्यों दिल छोड़ आये’ या मालिकेतील नायिका म्हणते की तिला राजीवच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल शंका आहे आणि ती ‘एक मौका दो, दो एक धोस दो और मग कुठेतरी चेहरा मारते’ म्हणत राहते. राजीव सांगतात की चारूचे आधी बिकानेरमध्ये लग्न झाले होते पण त्याने ती गोष्ट राजीवला सांगितली नाही. पहिल्या लग्नाची गोष्ट नवऱ्यापासून लपवणे पतीला मान्य नाही. लग्नानंतर पती-पत्नीचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो आणि हे प्रेमच दोन यशस्वी लोकांना एकाच छताखाली राहण्यास तयार ठेवते.

जेव्हापासून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, तेव्हापासून वकील आणले गेले आहेत, दोघांनीही एकमेकांविरुद्ध खोटे बोलणे पूर्णपणे बंद करावे लागेल, समेटाचे सर्व मार्ग बंद करावे लागतील. अशा परिस्थितीत घटस्फोट होतो, मुलीला आई किंवा वडील दोन्ही गमावावे लागतात. आता राजीव सेन यांना मुलगी पाहण्यासाठी भीक मागावी लागली आहे.

एखाद्या यशस्वी अभिनेत्रीला काम करण्यापासून रोखणे किंवा तिच्या मुलीला सोशल मीडियावर मित्र आणि चाहत्यांसह फोटो शेअर करण्यापासून रोखणे यासारख्या छोट्या गोष्टी कधी कधी अॅसिडमध्ये बदलतात ज्यामुळे लग्नाआधीच्या प्रेमाचा गोंद धुऊन जातो.

प्रत्येक वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांना समान आदर द्यावा, जागा द्यावी, त्यांना ठरवू द्या, काय करणे आवश्यक आहे. कामाची विभागणी तराजूने न करता प्रेमाने करावी. पती-पत्नी एकमेकांना दिलासा देण्याचा खूप प्रयत्न करतात. किचनपासून ते टॅक्सपर्यंत दोघांनीही एकमेकांसोबत राहावे आणि एकमेकांच्या चुकीच्या निर्णयाचा आदरही करू नये, हा निर्णय आपलाच आहे असे समजून सहन करण्याची सवय लावावी.

दुसऱ्यासोबत झोपणे ही शो व्यवसायातील आपत्ती असू नये. तो उद्योग संस्कृतीचा भाग आहे. ज्याप्रमाणे पंजाबचा शासक रणजित सिंगला 5 बायका होत्या आणि रणजित सिंग तेव्हाही यशस्वी ठरला, त्याचप्रमाणे विवाहित जोडीदाराचे दुसरे नाते आरामात घेणे शो बिझनेस योग्य आहे. यावर आक्षेप घेणाऱ्यांनी एकत्र राहू नये.

चारू असोपा आणि रोहित सेन यांचे लग्न तुटले किंवा तुटले नाही, पण अशा घटनांमधून सर्वसामान्यांना अनेक धडे मिळतात.

असमान शेजाऱ्यांशी कसे निभावून न्याल

* इंजी. आशा शर्मा

विनय डॉक्टर आहे आणि त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे सुरू आहे. पण सध्या तो एका वेगळयाच समस्येने त्रासाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने घर बांधण्यासाठी एका सरकारी वसाहतीतील भूखंड खरेदी केला होता. त्यावेळी तेथे फारशी वस्ती नव्हती. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह वडिलोपार्जित घरातच राहत होता. मात्र आता तेथे वस्ती होऊ लागल्याने त्यानेही तेथे घर बांधण्याचा निर्णय घेतला.

नकाशा बनविण्यासाठी विनय सिव्हिल इंजिनीअर म्हणजे स्थापत्य अभियंत्यासह तेथे गेला तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली घरे पाहून त्याची चीडचिड झाली. ती घरे अतिशय अल्प उत्पन्न गटातील लोकांची होती. विनय मनातल्या मनात स्वत:च्या आणि त्यांच्या राहणीमानाची तुलना करू लागला. अशी तुलना करणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते, पण मन काही केल्या मान्य करायला तयार नव्हते.

‘‘आजकाल शेजारीपाजारी जाऊन बसण्याइतका वेळ कोणाकडे आहे? ते त्यांचे कमावून खातील आणि आपण आपले. तुम्ही उगाचच त्रास करून घेत आहात,’’ पत्नीने समजावले.

‘‘ही जागा विकून दुसरी घेणे सोपे काम नाही. शिवाय तुझ्याकडे इतका वेळ कुठे आहे? उगाचच दलालांकडे फेऱ्या माराव्या लागतील. सुनेचे म्हणणे योग्य आहे. याच जागेवर घर बांध,’’ वडिलांनी असा सल्ला दिल्यानंतर विनय काहीशा नाराजीनेच घर बांधण्यासाठी तयार झाला.

घराचे बांधकाम सुरू करून काही दिवसच झाले होते. एके दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या घरांपैकी एका घरातील माणूस तेथे आला आणि म्हणाला, ‘‘बरे झाले, शेजारी एखादा डॉक्टर असेल तर रात्रीअपरात्री उपयोगी पडेल.’’

हे ऐकताच विनय पुन्हा नाराज झाला.

जसजसे घराचे काम पूर्ण होऊ लागले होते तसा विनयचा उत्साह कमी होऊ लागला होता. जेव्हा कधी तो त्याची चारचाकी गाडी तेथील एका झाडाखाली उभी करायचा तेव्हा कितीतरी मुले गाडीच्या अवतीभवती फिरत. काही गाडीला हात लावून बघत. एखादा खोडकर मुलगा आपल्या महागडया गाडीचे नुकसान तर करणार नाही ना, अशी भीती विनयला सतावत असे.

विनयचे मित्र, नातेवाईक जेव्हा त्याचे बांधकाम सुरू असलेले घर पाहाण्यासाठी येत तेव्हा त्याचा शेजार पाहून कुत्सितपणे हसत. काही जण तर ‘चिखलात उमलले कमळ’ अशी तुलना करून टोमणे मारत.

‘‘आपल्या मुलांनाही यांच्यासारख्या सवयी लागू नयेत, एवढीच अपेक्षा आहे,’’

असे एके दिवशी शेजारच्या मुलांना आपापसांत भांडण करताना पाहून पत्नीने काळजीच्या स्वरात म्हटले. हे ऐकून विनयचा उरलासुरला उत्साहही मावळला. त्याने त्याच दिवशी एका दलालाची भेट घेऊन त्याला घर विकायला सांगितले.

जेव्हा खासगी आयुष्यावर होते अतिक्रमण

सानियाची समस्याही काही छोटी नाही. जेव्हा ती पाश्चिमात्य पेहराव करून स्वत:ची चारचाकी गाडी घेऊन सोसायटीतून बाहेर पडते तेव्हा कितीतरी नजरा तिच्यावर खिळल्या जातात. तिच्यासोबत येणाऱ्या मित्रांची माहिती करून घेण्यासाठीही अनेक जण बरेच उत्सुक असतात. अनेकदा तर पार्टी सुरू असताना एखाद्या शेजाऱ्याचा मुलगा काहीतरी कारण सांगून तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे हे घर विकून दुसरे खरेदी करण्याचे प्रयत्न यशस्वी होत नसल्यामुळे आणि दुसरीकडे खासगी आयुष्यावर अशा प्रकारे शेजाऱ्यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट होत आहे.

काय असतात समस्या?

* शेजारी तुमच्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील माणसे राहत असतील तर त्यांना पाहून तुम्हाला भेटायला आलेले मित्र, नातेवाईक नाक मुरडतात. अनेकदा बोलण्याच्या ओघात टोमणेही मारतात.

* शेजारी अशीच मुले राहत असल्यामुळे तुमच्या मुलांनी त्यांच्यासोबत खेळणे आणि खेळताना भांडण होणे स्वाभाविक आहे. अशावेळी एकमेकांचे संस्कार, सवयी आदींचे मुलांकडून अगदी सहजपणे अनुकरण केले जाते.

* असमान राहणीमान असल्यामुळे उच्च उत्पन्न गटातील शेजाऱ्यांच्या घरी होणारी पार्टी, कार्यक्रम इत्यादी अल्प उत्पन्न गटातील शेजाऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरते. कुतूहलातून ते अशा कार्यक्रमांवेळी त्यांच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करतात. असे वागणे त्यांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करण्यासारखे ठरते.

* अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जेव्हा मुले आपल्या अन्य मित्रांसह शेजारी राहणाऱ्या मित्रांनाही आमंत्रण देतात तेव्हा विचित्र परिस्थिती निर्माण होते. दोन्हीही उत्पन्न गटांतील मुलांना एकमेकांसोबत मौजमजा करताना संकोचल्यासारखे होते..

कसे निभावून न्याल?

* येथे कोणालाही लहान किंवा मोठे दाखविण्याचा उद्देश अजिबात नाही, पण हे सत्य आहे की प्रत्येक उत्पन्न गटाचे स्वत:चे असे एक राहणीमान असते. त्यामुळे शेजाऱ्याला त्याची सीमारेषा माहीत असणे योग्य ठरते.

* शेजाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू किंवा पैशांचे पाकीट त्यांच्या समोरच उघडून पाहू नका. यामुळे त्यांना संकोचल्यासारखे वाटेल. शिवाय असे चुकीचे न वागण्यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसून येईल.

* मुले शेजारच्या मुलांसोबत खेळत असतील तर त्यांना रोखू नका. वेळेनुसार  मुले त्यांच्याप्रमाणेच मित्रांची योग्य निवड करतात.

उत्पन्न गटानुसार राहणीमानातील असमानता केवळ शेजारीपाजरीच नव्हे तर कुटुंबातही पाहायला मिळते. हे शाश्वत सत्य आहे की, अशा प्रकारची असमानता समाजाचा एक भाग आहे आणि त्याचा स्वीकार करण्यातच शहाणपण आहे. ज्या प्रकारे कौटुंबिक नाती निभावताना गरजेनुसार कधीतरी झुकावेही लागते त्याच प्रकारचा समजूतदारपणा शेजारीपाजारी वावरतानाही दाखवायला हवा.

Raksha Bandhan Special : भावा-बहिणीचं नातं किती छान असतं

* गरिमा पंकज

रक्षाबंधनाचा सण जवळ आला होता. घरातील सर्वजण खूप खुश होते, पण नेहाच्या मनात एक समस्या होती. वास्तविक, त्याच्याच भावाचे त्याच्याशी गेल्या ७ वर्षांपासून कोणतेही संबंध नव्हते. त्यांच्या प्रत्येक रक्षाबंधनाला आणि भैदूजला वीराना जायचे आणि हे गेल्या 7 वर्षांपासून सुरू आहे.

नेहाला आठवते 7 वर्षांपूर्वी जेव्हा ती रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या घरी गेली होती, तेव्हा भेटवस्तूवरून दोन भावंडांमध्ये भांडण झाले होते जे वाढतच गेले. आई वडिलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण हे भांडण थांबले नाही आणि त्या दिवसापासून दोघांचे बोलणे बंद झाले. प्रत्येक रक्षाबंधनाला नेहाला तिच्या भावाची आठवण येते पण त्याच्या घरी कधी जात नाही. अशा प्रकारे, तिचे रक्षाबंधन अपूर्ण राहते आणि या दिवशी पूर्वी अनुभवत असलेल्या आनंदापासून ती वंचित राहते. पाहिलं तर आजच्या काळात आपल्याला फारशी भावंडं नाहीत.

सहसा एक किंवा दोनच भावंडे असतात. ते आपापसात भांडले किंवा बोलणे बंद केले तर सणाची मजा कायम राहते. विशेषतः रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण. होळीदिवाळी हादेखील असा सण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रियजनांची साथ मिळाल्यावर फुलते. एकमेकांच्या घरी जातात. माहेरच्या घरी खूप प्रेम गोळा करून ती स्त्री घरी परतते. पण जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटण्याचा किंवा भेटण्याचा मार्ग बंद केला असेल तर तुमच्यासाठी सणाचा आनंद निरर्थक ठरतो.

म्हणूनच तुमच्या एकुलत्या एक भावाची किंवा बहिणीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे प्रेम हा असा खजिना आहे की त्यापासून वंचित राहिल्याशिवाय तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा तुमच्या भाऊ किंवा बहिणीपेक्षा तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही. तुम्ही तुमचे बालपण त्यांच्यासोबत घालवले आहे. एकत्र मोठे झाले आहेत. आई-वडिलांचे प्रेम वाटून घेतले. 20 – 22 वर्षांचा हा सुंदर सहवास कधीच विसरता येणार नाही. त्यांच्यासोबत असण्याचा आनंद, जुने बालपणीचे दिवस आठवण्याचा आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही.

रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर रक्षाबंधन बांधतात आणि त्यांना दीर्घायुष्य आणि यशाची शुभेच्छा देतात. भाऊही आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात.

हा सण भारतातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. उत्तरांचलमध्ये रक्षाबंधन श्रावणी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नारळी पौर्णिमेला राजस्थानमध्ये राम राखी म्हणतात. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये याला अवनी अवित्तम म्हणतात. रक्षाबंधनाला सामाजिक आणि कौटुंबिकही महत्त्व आहे.

बरं, आधुनिकतेच्या वाऱ्यात बरेच काही बदलले आहे. आजच्या जागतिक वातावरणात रक्षाबंधनही हायटेक झाले आहे. काळाच्या ओघात भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा पवित्र सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये विविधता आली आहे. या व्यस्ततेच्या युगात बऱ्याच अंशी सण-उत्सव केवळ कर्मकांडातच कमी झाले आहेत.

आता अनेक स्त्रिया बाबेल किंवा प्रिय भावाच्या घरी जाण्याची तसदी घेत नाहीत. काही मजबुरीमुळे तिला तसे करता येत नाही. रक्षाबंधनापूर्वीच्या तयारीत आणि आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी आपल्या माहेरच्या घरी जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भूतकाळातील गोड अनुभूती बहुतेक महिलांना घेता येत नाही. कधी भाऊ दूरच्या देशात जातो, कधी मनापासून दूर जातो तर कधी व्यस्त असतो. पण हे विसरू नका की ऑनलाइन राखी विधीत भावांचे ते दृश्य उमलत नाही ज्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते घट्ट होते.

तुम्ही कितीही व्यस्त असलात किंवा भावावर कितीही रागावलात तरीही या दिवशी तुमच्या भावाला नक्की भेटा. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची आणि गोड नॉस्टॅल्जियासह नात्यात गोडवा घालण्याची संधी सोडू नका.

विज्ञान काय म्हणते

भावंडांवर जगभरातील निवडक विद्यापीठांमध्ये केलेल्या संशोधनातून हे सिद्ध होते की त्यांचे नाते एकमेकांना खूप काही शिकवून जाते आणि ते दोन्ही कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहे.

अमेरिकन संशोधकांच्या मते, भावंड एकमेकांच्या सहवासातून जीवनातील चढ-उतार शिकतात आणि समाजात पुढे कसे जायचे याची समज वाढते कारण ते सर्वात जास्त काळ एकमेकांसोबत राहतात.

भावंड एकमेकांच्या एकाकीपणावर किती मात करू शकतात हे जाणून घेण्यासाठी तुर्कीमध्ये एक संशोधन करण्यात आले. संशोधनानुसार, बहिणी आपल्या भावांची जास्त काळजी घेतात. ती या नात्याला अधिक गांभीर्याने घेते. दुसरीकडे पाहता, भाऊ कधीकधी राग दाखवतात किंवा बहिणींवर रागावतात. बहिणींच्या बाबतीत हे फार क्वचितच घडते.

भावंड प्रभाव

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर आणि मानसशास्त्रज्ञ लॉरी क्रॅमर यांच्या मते, भावंडांच्या नातेसंबंधातून निर्माण होणाऱ्या समजाला भावंडाचा प्रभाव म्हणतात. या भावंडाचा परिणाम दोघांवरही अनेक प्रकारे होतो. भावंडं एकमेकांची मेंदू शक्ती वाढवतात. त्यात वाढत्या गांभीर्याने ते एकमेकांना समाजात आपले स्थान निर्माण करायला शिकवतात.

यूएस मधील पार्क युनिव्हर्सिटीने भावंडाचे नाते समजून घेण्यासाठी एक भावंड कार्यक्रम सुरू केला आणि पेनसिल्व्हेनिया राज्यातील 12 शाळांचा समावेश करण्यात आला. भावंडांची जोडी मिळून निर्णय कसे घेतात आणि जबाबदारी कशी पार पाडायची हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. लहानपणापासूनच एकमेकांच्या सहवासामुळे त्यांच्यात समज लवकर विकसित होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे त्यांच्यात उदासीनता, लाज आणि अधिक घाई यांसारखी प्रवृत्ती विकसित होत नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती भावंडाच्या नात्यात मोठी होते, तेव्हा त्यांच्यात सहानुभूती, सामायिकरण आणि करुणेची भावस्वीडनमधील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की भावंडाचे नाते तुम्हाला अधिक आनंदी व्यक्ती बनवते. हा प्रभाव आयुष्याच्या उत्तरार्धातही कायम राहतो. बहिणीशी आधारभूत नाते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. मोठी बहीण तुम्हाला एकटेपणा, अपराधीपणा इत्यादीपासून वाचवते.

भाऊ-बहिण असल्यामुळे मुलांमधील सामाजिक आणि परस्पर कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. भावंडांच्या नात्यात वाढणारी मुले त्यांच्या समवयस्कांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. एक भावंड असल्याने, तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करता.

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी एकापेक्षा जास्त मुले असलेल्या 395 कुटुंबांचा आणि 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या किमान एक मुलाचा अभ्यास केला. डेटा संकलित करताना, प्राध्यापकांनी नमूद केले की लहान किंवा मोठी बहीण भावंडांना वाईट सवयी किंवा संकोच किंवा भीती यासारख्या वागण्यापासून दूर ठेवते.

आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा भाऊ किंवा बहिणी भांडतात तेव्हा दोघांनाही वाद घालण्याची आणि त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य शिकण्याची संधी मिळते. जर कोणाला बहीण असेल तर ते नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतात. यामध्ये एकटेपणा, भीती आणि लाजाळूपणा कमी दिसतो. या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीच्या वृत्तीमध्ये नकारात्मकता येऊ शकते आणि त्याला नैराश्य येऊ शकते किंवा कोणत्याही अन्नाचा किंवा कशाचाही तिरस्कार होऊ शकतो. जरी काही प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती स्वतःला हानी पोहोचवू शकते.

बहीण असल्यामुळे या सर्व गोष्टी सकारात्मक पद्धतीने हाताळण्यास मदत होते. ज्या लोकांना बहीण आहे ते त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करू शकतात आणि त्यांचे मतभेद सोडवू शकतात. भावंडांमध्ये प्रेम असेल, तर दोघांच्याही वागण्यात सकारात्मकता येते, जी केवळ आई-वडिलांच्या प्रेमाने पूर्ण होऊ शकत नाही. ना देखील विकसित होते. एका अभ्यासानुसार, यामुळे मुले विशेषतः मुले इतरांप्रती अधिक दयाळू आणि निःस्वार्थ बनू शकतात.

 

Raksha Bandhan Special : भाऊ-बहिणीचे नाते अमूल्य आहे

* पुनिता सिंग

नाती अनमोल असतात. आपल्या जीवनात नात्याचे महत्त्व फुलाच्या सुगंधासारखे आहे. जर नातेसंबंध एखाद्या व्यक्तीच्या जीवनापासून वेगळे केले गेले तर जीवन निर्जीव आणि नीरस राहते. काही संबंध जन्मजात असतात आणि काही आपल्या परस्पर संमतीने आणि प्रेमाने विकसित होतात. समाज असेल, जग असेल तर नातीही असली पाहिजेत. आजकाल असेच एक नाते आपल्या युवा ब्रिगेडमध्ये जोरात आहे, ते म्हणजे भावा-बहिणीचे नाते.

किशोरवयीन मुले शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, अभ्यासक्रम किंवा नोकरी दरम्यान एकमेकांच्या इतकी जवळ येतात की प्रथम ते मित्र बनतात आणि नंतर जेव्हा कल्पना येतात तेव्हा ते भाऊ-बहिणीच्या नात्यात बांधले जातात. पण नात्यात येणं सोपं असतं आणि ते टिकवणं खूप अवघड असतं. नवीन नातेसंबंध सुरू करण्यापूर्वी, स्वतःशी काही वचनबद्धता करा. या काळात काही गोष्टींची काळजी घेतली तर नात्यात नेहमीच ताजेपणा राहील.

संरक्षक कवच म्हणजे भाऊ-बहिणीचे नाते

जन्मजात नातेसंबंधांमध्ये, वय आणि कुटुंबाला काही बंधने, मर्यादा आणि ती कोणत्याही किंमतीत पूर्ण करण्यासाठी दबाव असतो, तर जवळच्या भावंडाचे नाते तेव्हाच बहरते जेव्हा किशोरवयीन मुलींमध्ये वैचारिक समानता असते आणि तेदेखील समान वयाचे असतात. एकत्र राहताना, अभ्यास करताना वाढल्यामुळे नातीही घट्ट होतात, तसेच एकमेकांच्या स्वभावाबद्दलही खूप काही जाणून घेतात. विश्वास मजबूत असेल तर अशी नातीही वेळेवर कामी येतात. आजच्या परिस्थितीत जेव्हा किशोरवयीन मुलीला तिच्या सुरक्षिततेबाबत प्रत्येक पाऊलावर आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत मोहोबला भाई एक संरक्षक कवच म्हणून सिद्ध होऊ शकतो.

रिलेशनशिप एव्हरग्रीन ठेवण्याचा प्रयत्न करा

भाऊ-बहिणीचे नाते सदाबहार ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांना सदैव तत्पर राहावे लागते. जर नात्याच्या 2 मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते नेहमी हिरव्या फुलासारखे वास घेतील, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना वेळेवर आधार देणे. समोरच्याला तुमची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तुमच्यासोबत बसून तोंड लपवणे हे चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य नाही. वेळेवर येणारे काम हे आपलेच आहे असे म्हटले तर वर्षभर एकत्र राहणाऱ्या लोकांना परदेशी समजले तर अन्याय होणार नाही. याचे दुसरे तत्व म्हणजे आपल्या अपेक्षा कमी ठेवणे. नेहमी इतरांकडून काहीतरी मागणे आणि स्वतः काहीही न करणे हे नातेसंबंधांसाठी घातक आहे. म्हणून ते स्वतः करण्यासाठी अधिक प्रयत्न करा आणि इतरांकडून कमी अपेक्षा करा. परस्पर संभाषणातून गैरसमज मिटवत राहणे आवश्यक आहे जेणेकरून नाते तुटू नये.

समाजात अशा संबंधांना चांगल्या प्रकारे पाहिले जात नाही

आपला समाज परंपरावादी आहे. विशेषत: मध्यमवर्गीय, किशोरवयीन आणि किशोरवयीन मुलाच्या नातेसंबंधाच्या रूढीवादी विचारसरणीतून आपला समाज मुक्त झालेला नाही. कुटुंबातच किशोरवयीन मुलांना या नात्यांबाबत विरोधाला सामोरे जावे लागते आणि जेव्हा कुटुंबाला या नात्याबद्दल शंका येते, तेव्हा समाजात गदारोळ व्हायला वेळ लागत नाही. समाजातील या नात्यांचे तुकडे होण्याचे कारण म्हणजे आपण आणि आपण ज्या घटना अनेकदा समोर येतात, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या या नात्याला दुरावा आणणाऱ्या घटनांनी भरलेल्या असतात.

या घटनांमुळे आपल्याला प्रत्येक नात्याकडे संशयाने पाहावे लागते, ज्याप्रमाणे प्रत्येक नात्यात निष्पक्षता आणि निष्पक्षता जपण्याची गरज असते, त्याचप्रमाणे भाऊ-बहिणीच्या नात्यात एकमेकांच्या भावना समजून घेणे, सलोखा असणे आवश्यक आहे. आपण एकत्र गेल्यास या नात्यात हानी होईल. समाजच या संबंधांवर भाष्य करणं बंद करेल.

या मार्गात मोठी फसवणूक होत आहे

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्यांच्यापासून नाती कशी अस्पर्श राहू शकतात. नातीसुद्धा मन आणि मनाच्या समतोलाने बनवली जातात आणि जपली जातात, मग कधीच उच्च-नीच होण्याचा धोका नसतो. पण जेव्हा खुशामत, एकटेपणा किंवा शारीरिक आकर्षण या हेतूने नाती बांधली जातात, तेव्हा त्यांचा अंत दुःखद होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आज अनेकदा लोक एका चेहऱ्याच्या आत दुसरा चेहरा लपवताना दिसतात. त्यांचे वास्तव समोर येईपर्यंत बरेच नुकसान झालेले असते, कधी कधी त्या नुकसानाची भरपाई मृत्यूनेही करावी लागते. या गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

विशेषत: तरुणांमध्ये उत्साह जास्त आणि संवेदना कमी, यात त्यांचा दोष नाही, हे वय असेच काहीसे आहे आणि हार्मोन्सचे बदल त्यांना एकमेकांकडे आकर्षित करतात. एखाद्याचा सल्ला आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे ते वैतागून जातात. ज्या लाजिरवाण्या घटना आपण रोज भोगतो आहोत त्या अननुभवी घटना आहेत.

किशोरवयीन मुलींनी अशा संबंधांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे

अशा नात्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, नात्यात फसवणूक झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका किशोरवयीन मुलींना बसतो. पुरुषप्रधान समाज असल्याने त्यांना सर्वाधिक नुकसान आणि मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. समाजाच्या दुर्लक्षामुळे ते कुटुंब आणि मित्रांपासूनही तुटले आहेत. बलात्कार, बलात्कार, विनयभंग आणि खोट्या अफवांचा परिणाम किशोरवयीन मुलींवरही अधिक दिसून आला आहे. आत्महत्या, अॅसिड हल्ले यामुळेही त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तर दोषींना शिक्षा मिळणे हाही आपल्या कायदेशीर प्रक्रियेत मोठा छळ आहे. न्यायालय, कायदा, न्यायालय आणि पोलिस यांच्या प्रश्नोत्तरांसमोर कणखर आणि धाडसी माणसेही हिंमत गमावतात, पण प्रत्येक समस्येवर उपायही असतो.

फक्त थोडी समजूतदारपणा आणि कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन केले तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील अनेक अडचणी टाळता येतात. त्यामुळे भाऊ-बहिणीचं नातं बनवायला हरकत नाही, पण हे नातं प्रामाणिकपणे आणि सचोटीनं जपावं, जेणेकरून कुणाला बोट उचलण्याची संधी मिळणार नाही.

Raksha Bandhan Special : भाऊ आणि बहीण ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे

* पारुल भटनागर

किशोरावस्था हा जीवनाचा एक टप्पा आहे, जिथे तुम्हाला स्वतःचे आणि स्वतःचे वाटू लागते. या वयात आपल्या डोळ्यांवर अशी पट्टी पडते की आपल्या भाऊ-बहिणींनाही आपले शत्रू वाटू लागतात. आम्हालाही आमच्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करायला आवडत नाहीत. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हासुद्धा आपण त्यांना सांगायला घाबरतो की आमच्या वडिलांना कळेल आणि त्यांना टोमणे मारतील, परिणामी आपण चुका करत राहतो आणि त्यांचा फटका आपल्याला एकट्यालाच सहन करावा लागतो आणि त्यामुळे आपल्यालाही अनेक वेळा सामोरे जावे लागते. यामुळे अनेक समस्या. म्हणूनच बंधू आणि बहिणी हे आपले शत्रू नसून आपली खरी संपत्ती आहेत हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. होय, कसे ते जाणून घेऊया.

  1. संकटात आपली सुटका करणे

नेहा जी खूप हुशार आणि पैसेवाली होती, त्यामुळे प्रत्येक मुलगा तिच्याशी मैत्री करायला उत्सुक होता. आणि त्यामुळे नेहानेही स्वत:समोर कोणाचाही विचार केला नाही. आणि तिच्या या मूर्खपणाचा फायदा तिच्या प्रियकर साहिलने घेतला. नेहाकडून पैसे उकळण्यासाठी त्याने तिला काही न्यूड फोटो क्लिक करण्यास सांगितले. प्रेमात सर्व काही न्याय्य असते असे म्हणतात. त्याने विचार न करता साहिलला फोटो पाठवले. आता या फोटोद्वारे तिला ब्लॅकमेल करून त्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. पण हे सर्व त्याच्या भावाकडून दिसले नाही आणि त्याने बहिणीला शपथ देऊन त्रासाचे कारण कळले. आणि मग भावाचं कर्तव्य पार पाडताना त्याने साहिलला आई-वडिलांना न सांगता असा धडा शिकवला की नेहासारख्या मुलींची फसवणूक करण्याचा विचारही करणार नाही. या घटनेनंतर नेहाला समजले की तिच्या भावापेक्षा प्रिय कोणी नाही. त्यामुळे हळूहळू दोघांचे नाते घट्ट होत गेले.

  1. गोष्टी शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका

भाऊ-बहिणीचं नातं असं नसतं. कितीही भांडण झाले, पण एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी दोघेही एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. त्याची सर्वात सुंदर गोष्टदेखील शेअर करायला मागेपुढे पाहत नाही. शोभा जी अभ्यासाबरोबरच पार्ट टाईम जॉब करायची, कारण एक तर तिला स्वतःला काहीतरी करायचे होते आणि दुसरे म्हणजे वडील आजारी पडल्यानंतर तिच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. कष्ट करून पैसे कमवले. आणि मग घरच्या गरजा पूर्ण करून मग स्वतःसाठी लॅपटॉप घेतला. जे ती खूप दिवसांपासून खरेदी करण्याचे स्वप्न पाहत होती. तिलाही ते मिळाल्याने खूप आनंद झाला. पण त्याच दरम्यान त्याच्या भावाचे ऑनलाइन क्लासेसही सुरू झाले आणि त्यालाही लॅपटॉपची गरज होती. त्यामुळे कोणताही विचार न करता शोभाने तिची सर्वात प्रिय वस्तू भावाला दिली. जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. जे पुढे सूचित करते की एखादी वस्तू कितीही मौल्यवान आणि महत्त्वाची असली तरी ती या नात्यापेक्षा मोठी आणि मौल्यवान असू शकत नाही.

  1. प्रवृत्त करूया

कधी कधी आयुष्यात असे टप्पे येतात की आपण धीर सोडू लागतो. आयुष्य जगण्याची इच्छाच मावळू लागते. आपण काही करू शकत नाही असे वाटू लागते, समोर फक्त पराभव दिसतो. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहिणी एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. असेच काहीसे राहुलच्या बाबतीत घडले. त्याला नववीत खूप कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे आपलं करिअर उद्ध्वस्त झालंय असं त्याच्या मनात पक्कं झालं, यामुळे त्याला ना प्रेम, ना आदर, ना शाळेत. सगळे त्याची चेष्टा करतील. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हसूही गायब होऊ लागले. अशा परिस्थितीत त्याच्या बहिणीने त्याला समजावून सांगितले की, जो आयुष्यात एकदाच हरतो किंवा अपयशी ठरतो, त्याला पुन्हा पुन्हा पराभवाला सामोरे जावेच लागेल असे नाही. अल्बर्ट आइनस्टाईनचे उदाहरण आपल्यासमोर आहे. ज्याला जगात जीनियस म्हणून ओळखले जाते. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत त्यांना बोलता येत नव्हते आणि वयाच्या सातव्या वर्षापर्यंत वाचता येत नव्हते. त्यामुळे त्याचे शिक्षक आणि पालक त्याच्याकडे कंटाळवाणा विद्यार्थी म्हणून बघायचे. त्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. एवढे सगळे करूनही ते भौतिकशास्त्रातील जगातील सर्वात मोठे नाव असल्याचे सिद्ध झाले. तुम्हीही यातून धडा घ्यावा आणि आजच्या परिस्थितीपुढे हार मानून बसून न राहता पुढे काहीतरी करून दाखवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आणि यात मी तुला माझ्याकडून जमेल तेवढी साथ देईन, पण मी तुला अशी हार मानू देणार नाही. हेच आहे भाऊ-बहिणीच्या नात्याचे खरे सत्य.

  1. भावनिकदृष्ट्या मजबूत व्हा

कधीकधी आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो त्यांच्यामुळे आपण वाहून जातो. जसे अचानक कुटुंबातील एखादा प्रिय व्यक्ती गरीब होणे, किंवा अभ्यासामुळे किंवा नोकरीमुळे प्रियजनांपासून दूर जाणे किंवा जिवलग मित्रापासून दूर जाणे, ज्यामुळे आपल्याला आतून त्रास होतो. अशा परिस्थितीत भाऊ आणि बहिणी हे एकमेव साधन आहे, जे आपल्याला या परिस्थितीशी लढायला आणि पुढे जायला शिकवतात. प्रेमाने समजावून सांगूया की आज जरी ही वेळ थांबली आहे, पण आपण स्वतःला आतून इतके कमकुवत बनवण्याची गरज नाही की आपणदेखील या वेळेसह थांबू शकू. त्यापेक्षा खंबीर होऊन पुढे जायला शिकले पाहिजे. कुटुंबासोबत खांद्याला खांदा लावून चालायचे आहे, एकमेकांना समजून घ्यायचे आहे. जर तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत केले तर ही वेळदेखील निघून जाईल. अशा वेळी भावंडं आपसूकच मोडली तरी तोंडावर दाखवत नाहीत आणि भावंडांना पूर्ण पाठिंबा देऊन या परिस्थितीशी लढून पुढे जाण्यास शिकवतात.

  1. लोकांशी आमच्यासाठी लढा

जगाची प्रथा आहे की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले केले तरी त्याने तुमची स्तुती केलीच पाहिजे असे नाही. कोणीतरी एखाद्या गोष्टीवर तुमची प्रशंसा करू शकते आणि कोणीतरी तुमच्यावर टीकादेखील करू शकते. पण आम्ही कोणाचे तोंड रोखू शकत नाही. तन्वीच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. एकदा त्याने आपल्या मित्रासोबत असाइनमेंट शेअर केले नाही की त्याच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणे बंद केले. आणि सर्वांनी एकजूट करून त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे तन्वीने कॉलेजला जाणे बंद केले. अशा परिस्थितीत त्याच्या भावाने त्याला लोकांशी स्पर्धा करायला शिकवले आणि त्यासाठी त्याच्या मित्रांशी भांडणही केले. तो अजिबात पाहू शकला नाही की दुसऱ्या कोणामुळे त्याच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले. हे असे नाते आहे ज्यात भाऊ-बहिण कितीही भांडत असले तरी दुसऱ्याने स्वतःला त्रास दिला तरी ते स्वीकारत नाहीत.

  1. जीवन संस्मरणीय बनवणे

कधी तुम्ही तुमच्या बहिणीचे कपडे लपवा, कधी तुमच्या भावाचा फोन लपवा, जेवताना असे काम करा की तुमच्या भावाला किंवा बहिणीला गुदगुल्या करून हसतील. लहानपणी तू कसा पेहराव केलास, कसा दिसत होतास, केसात तेल आणि दोन वेण्या घालून शाळेत जायचे, त्यामुळे तुझे मित्र तुला ‘चिपकुचिचिकू’ म्हणायचे. भाऊ तुम्हीही काही कमी नव्हते. मला श्रुतीची गोष्ट आठवते, ज्याच्या मागे तू तुझ्या आईवडिलांशी खोटं बोललीस. तू तिच्या मागे किती होतास आणि तुला पाळीव प्राणी म्हणत तिने तुला घासही दिला नाही. या सर्व गोष्टी भावा-बहिणीचे नाते संस्मरणीय बनवतात आणि आयुष्यभर हसण्याची संधी देतात.

  1. क्षणात दुःख दूर करा

तू माझ्यासाठी किती मौल्यवान आहेस हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. मी एवढंच सांगेन की तुला दु:खी पाहून मलाही वाईट वाटतं. अशा स्थितीत भाऊ-बहिणी कधी एकमेकांचे दुःख दूर करण्यासाठी आपल्या आवडीची डिश बनवतात, तर कधी फिरवण्याच्या बहाण्याने मनसोक्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या चेहऱ्यावरील दुःख दूर करण्यासाठी, त्याच्यासाठी गुंजन करा, कारण मनाला जो आनंद मिळतो तो संगीतातून. त्यांच्यासोबत खेळा, एकत्र वेळ घालवा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यांना कोणीही काही सांगत नाही आणि त्यासाठी ते अंगरक्षक म्हणून मागे-पुढे करत राहतात. असाच प्रयत्न करत राहा की भावाच्या किंवा बहिणीच्या चेहऱ्यावरचे दुःख दूर होऊन तो पुन्हा हसायला लागतो. अशाप्रकारे भाऊ-बहिणीचे नाते खूप मौल्यवान असते, ज्याचा नेहमी आदर केला पाहिजे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें