लोक काय म्हणतील

* रिता गुप्ता

शिक्षण संपवून सिल्कीला नोकरी सुरू करण्यास केवळ ७-८ महिने झाले असतील की आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तिचे जगणे महाग करून टाकले. कुटुंबात किंवा शेजारीपाजारी राहणाऱ्यांमध्ये कुठे एखादे लग्न किंवा एखादा गेटटुगेदर असेल तर तिला पाहून प्रश्नांचा पूर ओढवला जात असे.

‘‘अगं सिल्की, शिक्षण पूर्ण झाले? कुठे काम करत आहेस? किती पॅकेज मिळते?’’

‘‘आणि मला सांग आजकाल काय चालले आहे’’ सिल्की या प्रश्नावर खूप घाबरायची, कारण तिला पुढचा प्रश्न माहित असायचा.

‘‘मग तू कधी लग्न करणार आहेस? कोणी शोधून ठेवला असेल तर सांग आम्हाला?’’

लाजून दांत दाखविणाऱ्या कोणत्याही काकू, आत्या किंवा मावशीची आपुलकी दर्शविणाऱ्या या प्रश्नामुळे सिल्कीला खूप त्रास होई, परिणामी, तिने हळूहळू या कौटुंबिक समारंभांपासून स्वत:ला अलग केले.

‘‘अहो, ज्याच्या लग्नाला / वाढदिवसाला / आला आहात त्याविषयी बोला, प्लेटभरून जेवण करा. माझी साडी का बनवू लागता?’’ सिल्की कुरकुरत असे.

तिच्या आईचीही अशीच परिस्थिती होती. जेव्हा-जेव्हा फ्लॅटच्या महिलांची मंडळी जमायची, तिला पाहताच प्रत्येकजणी जणू मॅरेज ब्युरो उघडत असे, ‘‘माझा मुलगा सिल्कीपेक्षा ३ वर्ष लहान आहे, म्हणजे सिल्कीचे वय, इतके झाले आहे.’’

एक म्हणत असे.

‘‘अहो, या वयात आमची २ मुलं होती,’’ दुसरी अभिमानाने म्हणायची.

‘‘बघ, तू आता मुलगा शोधणे सुरु करायला हवे,’’ तिसरी समजावण्याच्या स्वरात म्हणायची.

‘‘कोणाबरोबर काही चक्कर तर नाही, कोणत्या जाती/धर्माचा आहे? बाई, हल्ली मुली आधीच कुणाला तरी पसंद करून घेतात. चांगले आहे ना तुला हुंडा नाही द्यावा लागणार,’’ दोन मुलांची आई अनिता शांत स्वरात म्हणते जणू काही मुली त्यांच्या भोळयाभाबडया मुलांच्या शिकारीसाठीच शिकत आहेत.

‘‘आत्ताच, सिल्कीचा पुढे शिकण्याचा मानस आहे, एकाद वर्ष नोकरी करून ती आधी शिकेन…’’ सिल्कीची आई रडवेल्या आवाजात म्हणाली.

‘‘पहा, आधी लग्न करा, नंतर शिक्षण चालू राहील,’’ एकीने म्हटले.

‘‘वेळेवर लग्न करणे अधिक महत्वाचे आहे, अन्यथा आपण नंतर शोधत रहाल,’’ दुसरी घाबरवण्याची कोणतीही कसर सोडत नाही.

‘‘जर माझी मुलगी असती तर मी कधीच तिचे हात पिवळे करून समाधानी झाले असते. मी तर नक्कीच माझ्या मुलाचे २५ वर्षांपूर्वीच लग्न लावून देईल, नाहीतर आजकालच्या या मुली खूप चलाख असतात… कोण जाणे, त्याला आपल्या जाळयात अडकवेन,’’ दोन मुलांची आनंदी आई उपदेश देई.

सिल्कीच्या आईकडून अजून ऐकवले जात नसे. तेथून निघण्याशिवाय पर्याय नसतो. पण मनात संशयाचे बीज फुटू लागते की मुलीला अधिक शिकवणे खरोखरच चुकीचे ठरेल काय किंवा जास्त वयात लग्न करण्यात खरोखरच समस्या येईल काय?

पाय खेचण्यात पुढे

हेच ते ४ लोक असतात, ज्यांच्या भीतीने किंवा असे म्हणूया याच ४ लोकांना खूष करण्यासाठी किती निर्णय घेतले जातात. याच ४ लोकांच्या गोष्टी ऐकून एखाद्या मुलीचे वेळेपूर्वीच लग्न लावून दिले जाते किंवा नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. हे लोक मुलांपेक्षा जास्त इतरांच्या मुलींमध्ये स्वारस्य घेतात. याच ४ लोकांना आनंदी ठेवण्यासाठी कधीकधी रात्री उशिरा आल्याने ओरड होते तर कधीकधी एखादा ड्रेस घालण्यास मनाई केली जाते.

काही महिन्यांतच लग्न उरकवून तिची आई एक दिवस पुन्हा त्यांच्यासोबत बसली होती की मागून कुजबुज ऐकू आली.

‘‘सिल्कीच्या लग्नात किती दुरावस्था होती,’’ एक आवाज.

‘‘मला तर गोड डिश मिळालीच नाही. जर आपण व्यवस्था करू शकत नसलो तर इतक्या लोकांना का बोलावावं,’’ आणखी एक कुजबूज.

‘‘मुलाला पाहिले. मला तर जास्त वयाचा वाटत होता,’’ तिसरी चुगली.

सिल्कीची आई विचार करीत होती, तिने तिच्या मुलीचे लग्न त्यांच्या सल्लयानुसार लावले तिचे कौतुक करतील. पण इथे तर वेगळाच रेकार्डर कानात वाजत होता. आतून चिढत पण बाहेरून स्मितहास्य करत ती मागे फिरली. म्हणाली, ‘‘बहिण, तुमचा मुलगा कसा आहे? काल त्याला बाजारात पाहिले. कुणी मुलगी त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस बसली होती.’’

‘‘अरे…तो…हो…मुलगा सांगत होता की त्याच्या कार्यालयातीलच कुणी मुलगी आहे, जी बळजबरीने त्याच्या गळयात पडून राहते,’’ परंतु या उडत्या बातमीने मुलाच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडू लागला होता. आता तिचे नाक ४ लोकांसमोर जे कापले जात होते.

आता संभाषण सिल्कीच्या लग्नावरून दुसरीकडे सरकले.

फक्त खेद
जिथे ४ लोक भेटणार तेथे ४ गोष्टी होणारच. देश-परदेश, राज्यावरून चर्चेचा विषय होत- होत स्वत:भोवतीच टिकाव धरू लागतो. मुख्यत: त्यांवर जे उपस्थित नसतात. मग इतरांच्या बाबतीत मोडता घालणे हे नेहमीच एक आवडते मनोरंजन असते. केवळ या गोष्टींसाठी महिलांना जबाबदार धरू नये. पुरुषही गप्पा मारण्याची समान सामाजिक जबाबदारी तेवढयाच कठोरपणे निभवतात.

आपण सिल्कीबद्दल बोलत आहोत. सिल्कीच्या आईला असे वाटले की तिने मुलीचे लग्न केले आहे. तिला पुढे शिकू दिले नाही. आता तिच्याशी ४ लोक आनंदी असतील आणि ती ४ लोकांमध्ये एक उदाहरण बनेल. पण दुर्दैवाने, असे काहीही घडले नाही, उलट वर्ष-दीड वर्ष उलटताच तेच लोक तिला पुन्हा प्रश्नांच्या गोत्यात उभे करू लागले.

‘‘तिच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? ती केव्हा चांगली बातमी सांगणार आहे?’’ दुसरीच्या उत्सुकतेचा अंत नव्हता.

‘‘अहो, ती नुकतीच एका नवीन नोकरीत सामील झाली आहे. तिला प्रथम काही दिवस स्थिर-स्थावर होऊ देत,’’ सिल्कीच्या आईने समजावले.

‘‘योग्य वेळी मुले झाली पाहिजेत अन्यथा आजीवन पश्चात्ताप करावा लागेल. ठाऊक नाही, हे लोक कोण-कोणती औषधे खातात नंतर गर्भधारणा करण्यास अक्षम होतात,’’ ४ मुलांच्या आईने आपले मत विनामूल्य व्यक्त करण्यास सुरवात केली.

आता ती हुशार होत चालली होती, म्हणून ४ लोकांची कंपनी तिला आवडू लागली. ४ लोकांबरोबर बसून तीही इतरांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवू लागली. खरं म्हणजे आता ती जेव्हा न मागता कोणालाही विनामूल्य सल्ला द्यायची तेव्हा तिला अद्वितीय आनंद वाटायचा. ४ लोकांसह एखाद्या ५ व्याला लाजिरवाणे करणे, त्याला बेइज्जत करणे यासारख्या स्वर्गीय आनंदाचा रस घेऊ लागली.

वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप
आता सिल्कीची आईसुद्धा विचार करत नाही की एखाद्याला वारंवार छेडणे की तिच्या मुलाचे/मुलीचे लग्न का होत नाही अशाने एखाद्यावर काय परिणाम होईल. इतरांकडून सुवार्ता ऐकण्यास आतुर तिचे मन आता एक क्षणही विचार करत नाही की ठाऊक नाही कुठल्या कारणाने एखादी स्त्री आई का होऊ शकत नाही. आपल्या सभोवतालच्या छोटया-छोटया गोष्टीदेखील जाणून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ती एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करीत आहे याचा तिला अजिबात संकोच होत नाही. आपली मुले भले फेल होत असतील परंतु स्पर्धात्मक परीक्षेत इतरांच्या मुलांचा काय परिणाम आला, ही उत्सुकता ती ४ लोकांसह अवश्य व्यक्त करते.

सिल्कीच्या आईला हळूहळू हे कळलेच नाही की ती देखील त्या ४ लोकांमध्ये सामील झाली आहे, ज्यांना लोक टाळू इच्छितात, ज्यांचे शब्द गंभीरपणे घेतले जात नाहीत आणि ज्यांचे कामच आहे काही ना काहीतरी बोलत राहणे. ज्या रसिक व्यक्तींना कठीणाईने समजावले जाऊ शकते अशा प्रकारच्या त्यांच्या आचरणास लोक फक्त ऐकतात पण आपल्या मनाचेच करतात.

दानाच्या मोबदल्यात प्रेम मिळविण्याची धार्मिक पद्धत

* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

आकर्षण आहे की प्रेम

* पूनम अहमद

३० वर्षीय अमित एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहेत. युवावस्थेतील पहिल्या आकर्षणाबाबत बोलताना त्यांनी हसत सांगितले, ‘‘मी दहावीत होतो. ती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान होती. ती शाळेतल्या मुलींमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि मीसुद्धा तिचा चाहता होतो. आज मला आठवत नाही की मला तिच्याबद्दल इतके आकर्षण का होते, मी तिची एक झलक पाहण्यासाठी धावतपळत शाळेत जात असे. एका नृत्य स्पर्धेत मला तिच्यासोबत नृत्य करायचे होते. मी खूपच खूश होतो. ही माझ्या पहिल्या रोमान्सची सुरुवात होती. जसे की त्या वयातील नाते टिकत नाही, आमचेही नाते लवकरच संपले. मला असे वाटायचे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु मला आश्चर्य वाटले कारण महिन्याभरातच माझ्या मनातून तिचा विचार निघून गेला होता. मी समजून गेलो की हे इन्फॅच्युएशन म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण होते.’’

तज्ज्ञांच्या मते, इन्फॅच्युएशन हे अत्यंत तीव्र पण थोडया काळासाठीचे प्रशंसक भाव असतात. याला आकर्षण, आसक्ति किंवा क्रश असेही म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक अंशू जैन यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला त्या व्यक्तिसोबत राहण्याची तीव्र इच्छा होती. त्या व्यक्तिमुळे तुमचे विचार, झोप, दिनक्रम आणि खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो.’’

इन्फॅच्युएशन ब्रेन केमिस्ट्रीत जागा निर्माण करते. जिथे पुरुष सडपातळ, स्मार्ट महिलांकडे तर, महिला उच्चपदस्थ किंवा उच्चशिक्षित पुरुषांकडे आकर्षित होऊ शकतात. आधुनिक नात्यात बरेच बदल झाले आहेत. अंशूचे म्हणणे आहे की इन्फॅच्युएशनमध्ये अनेकदा आपल्याला वाटते की आपण प्रेमात पडलो आहोत, पण असे काहीच नसते. ते सहजपणे अगदी कधीही संपू शकते.

कसे ओळखावे

इन्फॅच्युएशन ओळखण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेतज्ज्ञ काय टीप्स देतात, हे जाणून घेऊया :

२७ वर्षीय देविका शर्मा सांगतात की, ‘‘कॉलेजमध्ये एका अतिशय हुशार आणि सर्जनशील व्यक्तीबाबत मला खूपच आकर्षण वाटू लागले. मला त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती. मग अचानक तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला. मला त्याच्याशी बोलण्याची जसजशी संधी मिळत गेली तसे माझ्या लक्षात आले की मला वाटत होते तसे त्यांच्यात  काहीच नव्हते. त्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला काहीच वाटेनासे झाले. आमच्यात काहीही साम्य नव्हते. माझ्या मनात त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या, त्या रातोरात नाहीशा ?ाल्या. खरंतर त्याने मला संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्याच्यातील मा?ा इंटरेस्ट संपला होता.’’

सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या मते, ‘‘आपल्या मेंदूत असलेल्या काही प्लेजर सेंटरमधून डोपामाइनचे जास्त प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे मनातील आकर्षणाप्रति असीम प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. त्याचवेळी सेरोटोनिनची पातळी, जी चांगल्या भावनांसाठी जबाबदार असते, ती कमी होऊ लागते. परिणामी, आपल्या भावनांमध्ये बरेच चढउतार दिसून येतात. प्रिय व्यक्ती जी काही प्रतिक्रिया देत असते, त्यानुसार मूड बदलू लागतो.’’

काय करावे

जेव्हा तुम्हाला एखाद्याबाबत आकर्षण वाटते तेव्हा तो खरोखरच कसा आहे, हे जाणून न घेताच तुम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील फक्त एखाद्याच भागाकडे पाहात असता. डॉक्टर रवी यांचं म्हणणं आहे, ‘‘आकर्षणाला प्रोत्साहन देऊ नका, आसक्तीमधून थोडेसे बाहेर पडा. यामुळे विरुद्ध लिंगी आकर्षणामागील योग्य तर्क तुमच्या लक्षात येईल.’’

प्रिय वाटणाऱ्या या व्यक्तींच्या नकारात्मक बाबीही तपासून पाहा. यांच्यातील उणीवांचा विचार करा. इव्हेंट मॅनेजर जयेश सांगतात, ‘‘शाळेत असताना मी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलीकडे आकर्षित झालो. मी तिच्या बाजूच्याच बाकावर काही दिवस बसत होतो. तिच्याशी बोलण्याची हिंमत जास्त करू    शकत नव्हतो. पण तिच्याकडे मी ओढला जात होतो.

‘‘एके दिवशी मी तिला मनातले सांगितले. तेव्हा मला समजले की तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळ येताच ती त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळी मला एक धडा मिळाला की आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून दूर जाण्यासाठी शक्य तितका वेळ मित्र आणि कुटुंबासह घालवायला हवा. यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील प्रिय व्यक्तिची ओढ सतावत नाही किंवा तिची आठवण काढायला जास्त वेळ मिळत नाही.’’

डॉक्टर अखिल श्रॉफ सांगतात, ‘‘तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची वाढलेली पातळी तुमच्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यासाठी भरपूर व्यायाम करा.’’

जेव्हा एखाद्या प्रति इन्फॅच्युएशन, जाणवते, तेव्हा त्या व्यक्तिला कृती आणि त्याच्या शब्दांकडे खूप लक्ष देतो. वारंवार त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलकडे पाहतो. मानसोपचारतज्ज्ञ पवन गोस्वामी सांगतात, ‘‘अशा वेळी त्या व्यक्तिपासून शारीरिक आणि वर्चुअली अंतर ठेवा. स्वत:ला त्या व्यकितपासून दूर ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.’’

४० वर्षीय स्वाती भटनागर आपला अनुभव शेअर करताना सांगतात, ‘‘जेव्हा मी २८ वर्षांची होते तेव्हा माझ्या हँडसम कलीगच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नसे. कामात लक्ष लागत नव्हते. मी लवकर ऑफिसला जायचे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधायचे. मग एके दिवशी मला समजले की ज्याच्याबद्दल मला ओढ वाटतेय, तो विवाहित आहे. माझे हृदय दुखावले गेले. तेव्हा लक्षात आले की केवळ मीच त्याच्याकडे आकर्षित झाले होते.’’

तज्ज्ञ सांगतात की, भलेही तुम्हाला ज्याच्याबद्दल आकर्षण आहे तोही तुमच्याच प्रमाणे त्याच्या भावना व्यक्त करेल, पण त्याच्याशी प्रामाणिकपणा दाखवणे गरजेचे आहे. दोघांनीही या नात्यातील एकमेकांच्या उणीवा आणि चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. पवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘स्वत:च्या आत्मसन्मानाची काळजी घ्या. स्वत:वर प्रेम करा, स्वत:बद्दल चांगले वाटण्याचा अनुभव घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.’’

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘जर तुम्ही दुसऱ्याबद्दल योग्य जास्तच विचार करत असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असाल तर स्वत:च्या विचारांवर गांभीर्याने लक्ष द्या. नोंदवही तयार करा. आपला उद्देश स्पष्टपणे लिहा. काहीसा असा दिनक्रम तयार करा की तुम्हाला या अनैच्छिक आकर्षणाबाबत विचार करायला वेळच मिळणार नाही.’’

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी काही गोष्टी मागे सोडून जाणेच चांगले असते. प्रेमाच्या मागे धावू नका, तर स्वत:ला असे बनवा जेणेकरून लोकांनाच तुमच्याजवळ यावेसे वाटेल.

तुम्हीही जर कोणासाठी असाच अनुभव घेत असाल तर निश्चितच आकर्षणाच्या जाळयात अडकले आहात.

* तुम्ही त्याचाच विचार करता आणि स्वतऱ्च्या कामावर लक्ष देणे तुमच्यासाठी कठीण होते.

* संपर्काचे कोणतेही साधन जसे की व्हॉट्सअॅप, इमेल असो किंवा फोन, त्या व्यक्तिशी संपर्क होताच तुम्ही उत्साहित आणि उत्तेजित होता.

* तुमची एनर्जी लेव्हल अतिशय वाढते. ना तुम्हाला झोप हवी असते ना जेवण.

* तुम्हाला तो परफेक्ट वाटतो. त्याच्यात काहीच कमतरता जाणवत नाही.

* त्याच्याजवळ राहणाऱ्यांबाबत तुम्हाला असूया वाटते.

* अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याच्याकडून न मिळाल्यास तुम्हाला असुरक्षित वाटते. टेंशन येते.

* तुम्ही अस्वस्थ होता आणि कोणतीही रिस्क घ्यायला तयार असता.

पेमेंट एप्स गृहिणींसाठी सोपा मार्ग

– शैलेंद्र सिंह

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट अॅपमध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

स्मार्ट वाइफ यशस्वी करेल लाइफ

– शैलेंद्र सिंह

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.

भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.

एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.

भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’

यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’

भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.

एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला  दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.

बचतीमुळे सुधारते जीवन

महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.

दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.

जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.

स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख

सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.

पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.

स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें