घरापासून दूर असताना बदली करा

* प्रतिनिधी.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सुधीरची वडोदरा शहरात घरापासून दूर बदली झाली. त्याने या शहराबद्दल खूप ऐकलं होतं पण इथे येण्याची संधी त्याला कधीच मिळाली नव्हती. ओळखीचा कोणीही इथे राहत नाही त्यामुळे मन थोडं तृप्त झालं असतं. दिल्लीहून वडोदरा येथे पोहोचल्यानंतर ते त्यांच्या नवीन कार्यालयात रुजू झाले. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा त्यांचा दिनक्रमच बनला होता. साप्ताहिक सुट्टी घालवणे त्याला जड होऊ लागले. काय करायचं, असं किती दिवस चालणार, आपलं शहरही इतकं जवळ नाहीये की घरी धावून कुटुंबाला भेटता येईल. या सगळ्याचा विचार करून तो अस्वस्थ होऊ लागला. अशी परिस्थिती कोणासाठीही उद्भवू शकते. दिनचर्या व्यवस्थित व्हावी आणि तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकता.

कामाच्या ओझ्याने अडकू नका

नवीन शहर आहे, घरी गेल्यावर काय करणार. अशा विश्वासाने बाधित लोक डिस्चार्ज झाल्यानंतरही कार्यालयात वेळ घालवू लागतात. ते अधिकाधिक काम करू लागतात. तुमच्या या पद्धतीचा फायदा इतर सहकारी घेऊ शकतात. घरी जाताना ते त्यांचे काम तुमच्याकडे सोपवतील. ‘लो, समय अच्छा पास हो जायेगा’ अशी टोमणा मारून ते त्यांच्या घराकडे निघतील आणि तुम्ही कामाने थकून रात्री घरी पोहोचाल. त्यामुळे कामाचा अतिरेक टाळा. तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करा. चुकूनही ऑफिसचे काम घरी आणू नका.

शहर जाणून घ्या

समजा तुमच्या ओळखीच्या कोणीतरी त्या शहराचे चुकीचे चित्र तुमच्यासमोर मांडले. तेथे घडणारे गुन्हे, लोकांचे चारित्र्य, भितीदायक ठिकाणे इत्यादी सांगून त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, घाबरू नका. ते शहर स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मोकळा वेळ मिळेल तेव्हा सहकाऱ्यांकडून योग्य माहिती मिळवा. प्रमुख ठिकाणे, बाजार, खाद्यपदार्थ इत्यादींबद्दल त्यांच्याशी बोला. सर्वकाही समजून घ्या आणि त्याची यादी तयार करा. ज्या सहकार्‍यांशी तुमचे जवळचे संबंध आहेत त्यांचे पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदवा. गरज पडल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी शहराचा आढावा घेण्यासाठी घराबाहेर पडा. तिथे ट्रेनने आलात तर एकदा बस स्टँड पण बघा. मोठी दुकाने, रुग्णालये आणि प्रेक्षणीय स्थळे कुठे आहेत, संधी मिळताच त्यांचा आढावा घ्या.

घराबाहेर पडून दैनंदिन वापरातील वस्तू कुठे मिळतात याची माहिती मिळवा. त्या शहराला तुमच्या शहर किंवा महानगरापेक्षा कमी लेखू नका, अराजकता किंवा कमतरता शोधू नका. नवीन शहराची वैशिष्ट्ये पहा आणि स्वतःला समायोजित करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे, तुम्हाला हळूहळू नवीन शहर स्वतःचे वाटू लागेल.

तुमचा मोकळा वेळ असा घालवा

कामाच्या आणि करिअरच्या महत्त्वाकांक्षेच्या दबावात आपले अस्तित्व विसरू नका. वेळ मिळाला तर त्या शहरातील रोजची वर्तमानपत्रेही बघत रहा. तुमचे मनोरंजन कसे केले जाते याचा विचार करा. संगीत ऐका, आजूबाजूला संपर्क असेल तर तिथे जा. स्पोर्ट्स क्लबमध्ये सामील व्हा जेणेकरून तुम्ही साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी क्रीडा क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकता. कोणत्याही सामाजिक संस्थेत किंवा एनजीओमध्ये जाऊ शकतो. वेळ काढून तुम्ही आजारी लोकांची सेवा करू शकता, यामुळे तुमच्यात एक नवीन शक्ती निर्माण होईल. बदली झाल्यानंतर तुम्ही नवीन शहरात आला आहात, करिअरच्या उंचीला स्पर्श करण्याची जिद्द ठेवा. घरापासून दूर राहण्याचा किंवा घरगुती आजारपणाचा ताण तुमच्यावर येऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोला, ऑनलाइन चॅटिंग करा. नवीन वातावरणानुसार स्वतःला जुळवून घ्या. नवीन शहरात आल्यानंतर तुमच्या कामात खूप चुका आहेत का, त्या तपासा आणि समतोल साधा. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. असे केले तर नवीन ठिकाणीही प्रत्येक आघाडीवर समाधान मिळेल.

 

विणकामभरतकाम कौशल्याने करा व्यवसाय

* गरिमा पंकज

कोरोनामुळे आगामी काळात सोशल डिस्टंसिंग कायम राहणार आहे. याच कारणामुळे वर्क फ्रॉम होम आणि घरगुती व्यवसायात वेगाने वाढ होतेय. यामध्ये कसलाच संशय नाहीए की घरच्या घरी सामान बनवणं आणि ते विकून पैसे कमावणं एक खूपच चांगली बाब आहे. घरबसल्या तुम्ही तुमचा छंद, कला वा तुमच्या आवडीलादेखील व्यवसायात बदलू शकता. विणकामभरतकाम या अशा कला आहेत, ज्यामुळे घरबसल्या मिळकतीचा उत्तम मार्ग होऊ शकतो.

हातात कला असेल तर

याकाळात तसंही लोकांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशावेळी विणकाम, शिवणकाम आणि भरतकाम काही असे व्यवसाय आहेत, जे तुम्ही आतादेखील सुरु करू शकता. यासाठी अधिक पैशाचीदेखील गरज नाहीए. तुमच्याजवळ जर कला असेल तर तर तुम्ही थोडा पैसा लावूनदेखील सहजपणे हा व्यवसाय सुरु करून पुढे जाऊ शकता. तुम्ही छोटया गावात असा वा मोठया शहरात तुमच्या हातात कला असेल तर हा व्यवसाय वाढण्यास कोणीच रोखू शकत नाही.

तुम्ही घरबसल्या मुलं आणि मोठयांसाठी कपडे शिवू शकता. विविध डिझाईनचे सुंदर स्वेटर बनवू शकता. तसंही कोरोना काळात बाहेरून जेवढया कमी वस्तू खरेदी कराल तेवढं योग्यच आहे. तुम्ही घरी विणलेले स्वेटर मुलांनी घातले तर तुम्हाला त्यांनी योग्य पेहराव घातल्याचं समाधान तरी मिळेल. हाताने बनविलेले असल्यामुळे यामध्ये वेगळंच आकर्षण असेल.

मुलांच्या कपडयांना कायमच खूप मागणी असते. तुम्ही सहजपणे घरच्या घरी मुलांचे सुंदर पेहराव बनवू शकता. अलीकडे अशा प्रकारची कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पुढे वाढू शकतात. पोस्ट कोरोना काळात अशाप्रकारे घरातूनच तुम्ही तुमचा छान बिझनेस चालवू शकता.

व्यायामदेखील आहे

अशा प्रकारे विविध कपडे जसं की टेबलक्लॉथ, बेडशीट, ड्रेसेस इत्यादीवर कशिदा काढून तुम्ही त्यांना छान लुक देऊ शकता. तुम्ही घरच्या घरी स्वत:चा भरतकामाचा व्यवसाय सुरु करू शकता. विणकामभरतकामाची कला तुम्हाला विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासूनदेखील वाचविते. विणकामभरतकाम केल्यामुळे बोटे व हात सक्रिय राहतात आणि सांध्याचे आजार होत नाहीत. विणकामभरतकाम केल्यामुळे मनदेखील सक्रिय राहतं, कारण यामुळे दोन्ही हातांबरोबरच डोकंदेखील एकत्रित काम करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते.

महत्वाचं म्हणजे कला कोणतीही असो ती तुम्हाला रिलॅक्स ठेवते. कोरोना काळ खूपच समस्यानीं भरलेला आहे आणि अशा वेळी विणकामभरतकामसारखी कामं अर्थाजनाबरोबरच तुमचा तणाव कमी करण्यातदेखील मदतनीस ठरू शकतो.

कोरोना काळातील अनुभव आणि बदल

– मधु शर्मा कटिहा

कोरोना काळ असा काळ आहे ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती. कोरोनाव्हायरसचा कहर अशाप्रकारे झाला आहे, की मनुष्य ज्याला सामाजिक प्राणी म्हटले जाते, त्यालाच समाजापासून अंतर बनवून राहणे भाग पडत आहे. हा असा काळ आहे जेव्हा अडचणीदेखील नव्या नव्या आहेत आणि त्यांचे निराकरणदेखील. कोरोना आता इतक्या लवकर जाणार नाहीए. त्यामुळे कोरोना काळात घेतले जाणारे काही निर्णयदेखील आता पुष्कळ काळापर्यंत सोबत राहतील. एक नजर टाकूया विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या त्यांच्या बदलांवर, जे येणाऱ्या भविष्यात जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहेत.

डिजिटल क्रांती

लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रांत इंटरनेटवर अवलंबित्व वाढले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन जीवनाची महत्त्वाची अंगे बनून समोर आली आहेत. एका रिपोर्टनुसार भारतात लॉकडाऊनदरम्यान इंटरनेटच्या वापरात १३ टक्के वाढ झालेली आहे.

नव्या मालिकांची शूटिंग न झाल्यामुळे टीव्हीवर जुने कार्यक्रम पुन्हा दाखवले जात आहेत. यामुळे मनोरंजनासाठी लोक इंटरनेटचा आधार घेत आहेत. जवळपास १.५ करोड लोकांचे नेटफ्लिक्स जोडले जाणे इंटरनेटवर लोकांचे अवलंबित्व दाखवते.

शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात झाली आहे. शिक्षण तज्ज्ञांचे मानणे आहे, की उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती आता दूरची गोष्ट नाही. भविष्यात या गोष्टीवर विचारविनिमय करून शिक्षणाचा काही भाग वर्गात, तर काही ऑनलाईन करवला जाऊ शकतो.

या दिवसांत विविध कार्यालयांमधील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये बैठका गुगल, हँग आउट आणि झुमसारख्या अॅप्सवर होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्र्यांच्या आपसातील मिटींग्स आणि विविध क्षेत्रांवर नजर ठेवण्याचे कार्यदेखील ऑनलाईन केले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे हे रूप एका मर्यादेपर्यंत भविष्यातदेखील आपलेसे केले जाईल. कार्यालयांत दररोजच्या मिटिंगमध्ये खाणे-पिणे आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेत पुष्कळ खर्च होत होता.

सरकारी अधिकारी दीपक खुराना यांचे म्हणणे आहे, की येणाऱ्या काळात मिटींग्स ऑनलाइनदेखील होऊ लागतील. यामुळे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होईल.

टेक्निक्सच्या नव्या वापरापासून फिल्मी जगतदेखील वेगळे राहिलेले नाही. विशेषज्ञांच्या अनुसार लॉकडाऊननंतर जेव्हा फिल्म आणि टीव्ही सिरियल्सचे शूटिंग होईल तेव्हा सोशल डिस्टंसिंग लक्षात घेत अंतरंग दृश्य प्रत्येक कलाकाराकडून वेगवेगळे करवून घेऊन शूट केले जातील आणि त्या तुकडयांना टेक्निकच्या सहाय्याने जोडले जाईल.

मास्कची सोबत

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क घालणे अशात अनिवार्य झाले आहे. मास्क आता दीर्घकाळापर्यंतचा साथीदार असणार आहे. याचा भविष्यात वापर फक्त व्हायरसपासून बचाव असणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधी देणारादेखील ठरेल.

वाईट काळाचा संधीसारखा वापर करीत बाजारात आतापासूनच विविध प्रकारचे मास्क येऊ लागले आहेत. भारतात मधुबनी आणि मंजुषा पेंटिंगवाले मास्क, डिझायनर्सनी तयार केलेले, प्रिंटेड आणि मेसेज लिहिलेले, तसेच सुती कापडांचे तीन थर असणारे आणि कप मास्क आलेले आहेत.

मूकबधिर ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्यांचे हावभावावरून बोलणे समजतात आणि समजावतात. मास्कमध्ये चेहरा लपला जाण्याने त्यांना समस्या होऊ नये यासाठी पारदर्शक मास्क बनवण्याचादेखील निर्णय घेतला गेलेला आहे.

मास्क लावण्याने व्यक्तिचा अर्धा चेहराच दिसतो. परिणामस्वरूपी कित्येक वेळा ओळखणे कठीण होते. ही गोष्ट लक्षात घेत केरळच्या कोट्टायम आणि कोचीमधील काही डिजिटल स्टुडिओमध्ये मास्कवर चेहऱ्याचा तो भाग प्रिंट करण्याचे कार्य सुरू केले आहे, जो मास्कच्या पाठीमागे लपला जात होता. हा मास्क लावल्यावरदेखील व्यक्ती ओळखण्यात अडचण येणार नाही. हे टेक्निक लवकरच भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये येणार आहे.

हे तर आता निश्चित आहे, की मास्क भविष्यात जीवनाचे महत्त्वाचे अंग बनेल. हे घालणे आता किती आवश्यक होणार आहे, हे दर्शवण्यासाठी बीच वेअर बनवणाऱ्या इटलीच्या एका डिझायनरने बिकिनीसोबत मॅचिंग मास्क बनवून एका मॉडेलला फोटोमध्ये घातलेले दाखवले आणि त्याला ट्रायकिनी नाव दिले.

स्वच्छतेशी संबंध

कोरोना काळात सगळे स्वच्छतेविषयी सावध झाले आहेत. वारंवार साबणाने हात धुणे, फळे, भाज्या मीठ किंवा कोमट पाण्याने धुणे आणि घराच्या आजूबाजूच्या भागाला सॅनिटाईझ करणे शिकले आहेत. स्वच्छतेची ही सवय येणाऱ्या काळात दररोजच्या सवयींमध्ये सामील होईल. लोकांच्या जागोजागी थुंकून घाण पसरवण्याच्या सवयीवरदेखील आता लगाम लागेल. कोरोनाव्हायरसचे भय लोकांच्या मनात राहील आणि ते स्वत: थुंकण्याची सवय सोडण्यासोबतच ते करणाऱ्या लोकांनादेखील अवश्य टोकतील.

बिना बँड बाजा आणि वरातीचे विवाह

लॉकडाऊनमध्ये बहुतेक लग्ने स्थगित होत आहेत, परंतु काही जोडयांनी कोर्टात विवाह केला आहे आणि काहींनी फक्त कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करवून घेतला आहे. मागच्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात सोनू आणि ज्योतीचा विवाह १० लोकांच्या उपस्थितीत झाला. जिथे सोनू फक्त ३ लोकांच्या वऱ्हाडासोबत सासरी पोहोचला, तिथे ज्योतीच्या घरून पाच सदस्य या विवाहात सामील झाले.

लॉकडाऊन ३.० मध्ये गृह मंत्रालयाद्वारे प्रस्तुत केलेल्या सूचनांच्या अनुसार विवाह समारंभात ५० लोकच सामील होऊ शकतात, तरी काही राज्यांनी ही संख्या आणखी कमी ठेवलेली आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी हे योग्यदेखील आहे. कोरोना काळानंतरदेखील दीर्घकाळापर्यंत समारंभांमध्ये गर्दी न जमवून मर्यादित संख्येत लोकांची उपस्थिती राहील अशी आशा आहे. याचे एक कारण कोरोनाच्या भयामुळे आपसात अंतर ठेवणे आहे, तर दुसरे कारण व्यर्थ खर्च रोखणे असेल.

कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे खर्च चहूकडून कमी करण्याची सवय आता लावावी लागेलच. अर्थ तज्ञांचे मानणे आहे की शंभर वर्षात असे आर्थिक संकट आलेले आहे.

तुम्ही आहात तर आम्ही आहोत

कोरोना विरुद्ध लढल्या जाणार या युद्धात डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. समाज त्यांचे महत्त्व जाणत आहे आणि त्यांना सन्मानितदेखील केले जात आहे. आत्तापर्यंत समाज, जो सफाई कर्मचाऱ्यांपासून अंतर ठेवून राहायचा, शक्यता आहे की आता समजेल की यांची एका दिवसाची अनुपस्थितीदेखील किती जाणवते. आता यांना यथोचित सन्मान दिला जाईल.

जीवनात कुटुंबाची भूमिकादेखील या लॉकडाऊनदरम्यान सगळे समजून चुकले आहेत. दिल्लीच्या पटेल नगरमध्ये राहणाऱ्या मनीषचे म्हणणे आहे की रोजच्या धावपळीच्या जीवनात त्यांना ना मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळायची आणि ना आपल्या सासू-सासऱ्यांसोबत. लॉकडाऊनदरम्यान सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची जी संधी मिळाली आहे त्यामुळे आपसातील बंध विकसित झालेला आहे. भविष्यातदेखील अशाच प्रकारे वडीलधारे नव्या पिढीच्या समस्यांना समजून घेतील तसेच नवीन पिढी त्यांच्या अनुभवांनी स्वत:ला उजळवत राहील. कौटुंबिक सदस्यांचे बॉण्डिंग आता दिवसेंदिवस मजबूत व्हावे हीच वेळेची मागणी आहे.

प्रत्येक स्थितीत आनंदी

लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत जीवन सुखकर बनवण्याचे कार्य कोणत्या न कोणत्या रूपात होत राहिले आहे. पहिला लॉकडाऊन होताच स्वत:ला चिंतामुक्त ठेवून मन रमण्याचे विविध उपाय शोधण्याची कसरत सुरू झाली. काही घरांमध्ये विविध रेसिपीज बनल्या, तर कुठे शिवणकाम, पेंटिंग, पुष्परचना इत्यादींच्या मदतीने स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न झाले. काही लोकांनी जुने छंद पुन्हा आजमावले, तर काहींनी नवी कला शिकण्यात रुची दर्शवली.

नोएडाचे रहिवासी सुमित किचनमध्ये पाय ठेवत नव्हते, परंतु लॉकडाऊनदरम्यान आपली पत्नी वंदिताकडून त्यांनी जेवण बनवायला शिकले.

गुरुग्रामच्या राहणाऱ्या दिव्याने लग्नाआधी ब्युटीशियनचा कोर्स केला होता. आपल्या या कलेला उपयोगात न आणू शकण्याने त्या नेहमी निराश होत असत, परंतु जेव्हा सलुन न उघडू शकल्यामुळे त्यांनी पतीचे केस कापले तेव्हा लक्षात आले की गुण कधीच वाया जात नाहीत.

तरुण वर्ग लॉकडाऊनदरम्यान जंक फुडपासून दूर राहून संगीत ऐकणे आणि वेब सिरीज आधी पाहण्यात मन रमवणयासोबतच सोशल डिस्टंसिंगचेदेखील पालन करीत आहे.

हे तर सगळेच समजून चुकले आहेत की कोव्हिड-१९ आपला पिच्छा लवकर सोडणार नाहीए. सिनेमा, पार्टी, रेस्टॉरंट आणि सुट्टीच्या दिवशी गर्दीच्या जागी फिरणे आता दूरचे स्वप्न आहे. त्यामुळे घरात राहून आता प्रत्येक स्थितीत आनंदी मनस्थिती बनवून कोरोनाव्हायरससोबत, दूर राहण्याच्या मार्गावर चालावे लागेल.

कोरोना काळाने सर्वांनाच जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग दिला आहे. रस्ता नवीन आहे तर याची आव्हानेदेखील वेगळी आहेत. व्यक्तिगत, सामाजिक आणि आर्थिक जीवनात समस्यांशी लढताना भविष्याच्या उत्तममतेसाठी प्रयत्न होत आहेत, तसेच तांत्रिक क्षेत्रात नव्या शक्यता शोधल्या जात आहेत. गरज आहे, की आता या काळातील अनुभवांमुळे विषम परिस्थितींचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करणे शिकायला हवे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें