* पारुल भटनागर

कोरोना काळात आपण विशेषत: तरुणाईने त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की, आता आपण घरीच आहोत, कुठेही जात नाही, कोणाला भेटत नाही, तर मग त्वचेची काळजी घेतली नाही तरी काय फरक पडणार? पण त्यांची हीच विचारसरणी त्यांची त्वचा खराब करण्याचे काम करते, हे त्यांना माहीत नसते.

फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिल्टरची मदत घेऊन स्वत:ला सुंदर दाखवून इतरांकडून ते स्वत:चे कौतुक करून घेतात, पण वास्तव यापेक्षा खूपच वेगळे असते. म्हणूनच जर तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या तरुण आणि सुंदर त्वचा मिळवायची असेल, तर आधीच सावध व्हा, अन्यथा तारुण्यातच तुमची त्वचा वयाच्या ६० वर्षांसारखी दिसू लागेल. चला तर मग, स्वत:ला तरुण कसे ठेवायचे ते जाणून घेऊया :

सुरकुत्यांची समस्या कधी निर्माण होते?

वयाच्या २० व्या वर्षी, त्वचा तारुण्यात असते. त्वचेवर समस्या कमी आणि चेहऱ्यावर चमक, तेज तसेच आकर्षकपणा जास्त असतो. मात्र या वयात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यास बारीक रेषांसोबतच चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात.

जेव्हा आपल्या त्वचेच्या वरच्या थराला आधार देणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांचा थर कमी होऊ लागतो तेव्हा त्वचेवर सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचा आर्द्र्रता आणि सौंदर्य गमावते. म्हणूनच सुरकुत्यांपासून दूर राहण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच पौष्टिक खाण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

तणावाला ठेवा स्वत:पासून दूर

सध्या घर असो किंवा नोकरी, सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. काहींना या महामारीत आपल्या माणसांना गमावल्याचे दु:ख आहे. कोणाला भविष्याची चिंता आहे तर कोणाला नोकरी जाण्याची भीती आहे. खासकरून तरुणवर्ग जास्त काळजीत आहे आणि हीच काळजी त्यांचे आरोग्य बिघडवत आहे.

आपल्या शरीरात कार्टीसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन असते. आपण सतत चिंतेत राहिल्यास त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे चेहऱ्यावर पुळया, सुरकुत्या येतात. मेटाबॉलिज्म असंतुलित होऊ लागते. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच शक्य तेवढा सकारात्मक विचार करून तणावापासून दूर राहा, अन्यथा हा तणाव तुमच्या चेहऱ्यावरील चमक नाहीशी करेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...