नेहमी कामी येते डिस्टंट कजिन्सशी मैत्री

* रेणू गुप्ता

‘‘अरे यार सायमी, आज शुक्रवार आहे. संध्याकाळी मूवी पाहायला जाऊया का? आज प्रिन्सिपल मॅडमनी ओरडल्यामुळे माझा मूड खूपच खराब झाला आहे. थोडसं चील करावसं वाटतंय. तिकीट बुक करू का?’’ कियाराने तिची फ्रेंड सायमीला विचारलं.

‘‘नाही यार. आज संध्याकाळी मला मूवीला अजिबात येता येणार नाही. संध्याकाळी माझ्या कजिंससोबत सिनेमा पहायला त्यांच्यासोबत जाणार आहे.’’

‘‘तुझे कजिंस तुझ्याशी एवढे क्लोज आहेत की तू एक पूर्ण संध्याकाळ त्यांच्यासोबत घालवणार? तू जरा विचित्रच आहेस. मौजमजेसाठी आउटिंगला फ्रेंड्ससोबत जायचं असतं; कुटुंबासोबत नाही.’’

‘‘अगं, माझे हे डिस्टंट कजिंस माझे फ्रेंड्सच आहेत. माझे कजिन माझ्या आयुष्यातील सर्वात फ्रेंडली आणि स्ट्राँग सपोर्ट सिस्टम आहे. त्यांच्यामुळेच मी आज या अनोळखी शहरात एकटं राहत आयुष्याच्या प्रत्येक चढ उताराला सहजपणे फेस करत आहे. तू इमॅजिन करू शकत नाहीस की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते मला किती सोबत देतात. तू तर आताच या शाळेत नवीन आली आहेस. कोणी असं नाही आहे की ज्याच्याशी मनातील गोष्टी शेअर करून मन मोकळं करेन. आम्ही तीन डिस्टन्ट कजिंस आहोत. लहानपणापासून एकत्र वाढलोत तिघे याच शहरांमध्ये आहेत. मला नव्या शहरात एकटं येण्याची परमिशन मिळाली तीदेखील या माझ्या कजिन्समुळेच.’’

निर्भरता खटकू लागली

‘‘माझं कुटुंब खूपच रुढीवादी आणि परंपरावादी आहे. आम्ही जयपूरच्या खैरथल नावाच्या एका भागामध्ये एकत्रित कुटुंबात राहतो. आमच्या घरातील सर्वात मोठे माझे काका आहेत. बाबांचा बिझनेस काही खास चालत नाही. त्यातून फक्त आम्हा पाच सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठया मुश्किलीने चालतो. मोठ्या खर्चासाठी आम्हाला मोठ्या काकांचं तोंड पाहावं लागतं.

‘‘जेव्हापासून आम्ही भाऊ-बहीण मोठे झालो, प्रत्येक गोष्टीवरती काकांवर अवलंबून राहणं आम्हाला खटकू लागलं. माझे काही डिस्टन्स कजिन्स आमच्या इथून निघून इथेच जयपूरमध्ये जॉब करत आहेत. तिथे नव्या शहरात येण्याची परमिशन मला त्यांच्यामुळेच मिळाली. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर माझ्यासाठी नव्या आणि या अनोळखी जयपूरमध्ये नोकरी करण्याची इच्छा या तिघांमुळेच पूर्ण झाली.’’

‘‘अच्छा. अस आहे तर.’’

‘‘होय. चल आज मी तुला माझ्या डिस्टन्स कजिंससोबतच्या मैत्रीचे फायदे सांगते.’’

तर चला वाचकांनो, सायमीने तिची मैत्रीण कियाराला डिस्टन्स कजिंससोबत मैत्रीच्या जे जे फायदे सांगितले ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

तणाव होत नाही

प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव येतोच. कधी मोठ्या प्रकरणात, तर कधी दैनंदिन जीवनात साधारणशा गोष्टी वरती, परंतु हे केव्हा गंभीर रूप धारण करेल सांगितलं जाऊ शकत नाही.

तणावामुळे तुम्ही ऐग्जायटी, डिप्रेशन अथवा चिडचिड होऊ शकते. सतत तणावात राहण्यामुळे तुम्हाला अनेक हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते, तुम्हाला अनिद्रा, वाचन संबंधित तक्रारी, हृदयरोग, डायबिटिज व हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात, परंतु जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या रूपात तुमच्या कजिन्सशी चांगली सपोर्ट सिस्टम असेल तर तुमची ते केअर करतात आणि तुम्हाला मदत करू इच्छितात, तेव्हा अशा परिस्थितीत तणाव तुमचं काहीच बिघडू शकत नाही.

योग्य सल्ला

तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजिन्सशी एका मित्राच्या रूपात बाहेरच्या लोकांपेक्षा अधिक सहजतेने खुलू शकता. कारण की तुम्ही लहानपणापासून त्यांना बघत आला आहात. त्यांच्यासोबत इंटरेक्शन करत आला आहात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत न संकोचता तुमच्या प्रत्येक प्रकारच्या अडचणीं सांगू शकता आणि ते तेवढ्याच सहजतेने तुम्हाला सल्ला देऊ शकतात.

भावनात्मक सपोर्ट

कोणत्याही प्रकारच्या आपलेपणाने भरलेले संबंध आपल्याला भावनात्मक शक्ती देतात. समस्या असेल तर कोणतीही समस्या ते ऐकतात. आपल्या फिलिंग्सना वॅलीडेट करतात. आपल्यासोबत चांगलं वागतात व आपल्याला मदत करतात, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. कारण ती मदत आपलं लक्ष, आपलं दु:ख, उदासीपणा वा खराब मूड वाटून घेतात.

व्यक्तिगत विकास

जर तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजीन्सचं व्यक्तिमत्व पॉझिटिव्ह असेल तर ते तुम्हाला त्यांच्यासारखं बनवण्यात मदत करतात. तुमच्यासमोर त्यांच्या पॉझिटिव्ह वागण्याचं उदाहरण ठेवत तुम्हाला चांगल्या सवयी जसं की नियमितरीत्या व्यायाम करणं, जिमला जाणं, स्मोकिंग व ड्रिंकिंग सोडणं, चांगली लाइफस्टाईल अथवा एखाद्या हॉबीसाठी प्रेरित करू शकतात.

चांगल्या फ्रेंड्ससारखं तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी कायम प्रेरित करू शकतात. त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करण्यात यशस्वी होतात. विश्वासनीय मित्रांसारखं तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा संकल्प मेंटेन करण्यात तुम्हाला मदत करू शकतात.

आपलेपणाचा भाव

कोणाशीही जवळची मैत्री तुमच्यामध्ये आपलेपणाची भावना प्रेरित करण्यास मदतनीस होते. याची गरज माणसाचं अन्न, आवास आणि सुरक्षेच्या मूलभूत आवश्यकानंतर येतं. डिस्टन्स कजिन्सच्या रूपात एक सपोर्ट नेटवर्क तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुरक्षेची जाणीव देतं.

आव्हानांचा सामना करण्यास मदतनीस

आयुष्यात पावलोपावली कठीण प्रसंग येतात. वाढत्या जीवनात ब्रेकअप अथवा डिवोर्स एखाद्या प्रियजनाचा मृत्यू, एखादा आजार, बेरोजगारी, कौटुंबिक समस्या इत्यादींचं आव्हान आहे. ज्याचा सामना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी करावा लागतो. या स्थितीमध्ये डिस्टन्स कजिन्स तुम्हाला या गोष्टींचा सामना करण्यास मदत करतात. यामुळे तुम्ही आनंदाने काम करता.

चांगली कंपनी

तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजिन्सना सामाजिक, कौटुंबिक उत्सव, आयोजन आणि सणावारी लहानपणापासून भेटत असता, ज्यामुळे बाहेरचे मित्र, परिचितांपेक्षा तुमचं त्यांच्याशी इंटरॅक्शन अधिक होतं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही त्यांची कंपनी एन्जॉय करू शकता. डिस्टन्स कजिन्सशी जवळच्या मैत्रीमुळे तुम्ही शॉपिंग, मूवी, पिकनिकसारख्या आउटिंगसाठी खास मित्र मिळतात, ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता आणि आनंद मिळवू शकता.

एकटेपणा दूर करण्यास मदतनीस

आजची आधुनिक जीवनशैली आणि आभासी मित्रांच्या प्रभावामुळे लोकं एकटेपणा आणि सामाजिक आयसोलेशनमध्ये वाढ होत आहे. डिस्टन्स कजिन्समुळे यापासून तुमचा बचाव होतो.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुम्ही आणि तुमच्या कजिन्सच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद, मतभेद वा वैमानस्य असेल तर त्यांच्याशी मैत्रीचा हात न वाढवणंच योग्य आहे.

डिस्टन्स कजिन्स तुमच्या खास मित्राच्या रूपात आयुष्यातील आव्हानांच्यावेळी तुमच्यासाठी धावत येवू शकतात, तुमच्यासाठी फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईडची भूमिका साकारू शकतात. इथे हे उल्लेखनिय आहे की वैज्ञानिकांनी डीएनए टेस्टद्वारा अनुमान लावले आहे की जेव्हा आपण नवीन मित्र निवडतो, तेव्हा कदाचित अनाहूतपणे डिस्टन्स नातेवाईकांच्या कंपनीचीच निवड करतो. ‘सेनडिएगो इनव्हर्सिटी ऑफ कॉलिफॉर्निया’चे मेडिकल जेनेटिक्सचे प्रोफेसर जेम्स फालोअर सांगतात की एक अनएक्सप्लेन्ड मेकॅनिझिम तुमच्या मित्रांची निवड करतेवेळी त्यांचे आणि आपले डीएनएच्या समानतेच्या आधारावर त्यांना निवडण्यास आपल्याला मदत करतात.

यावरून हा निष्कर्ष निघतो की आपले आणि आपल्या मित्रांचे डीएनए खूप साम्य दाखवतात.

या निष्कर्षाच्या आधारावर म्हटलं जाऊ शकतं की डिस्टन्ट कजिन्ससोबत मैत्रीचं नातं सहजपणे बनवलं जातं आणि साकारलंदेखील जातं तसंच त्यांच्यासोबत मैत्री नक्कीच मोठ्या कामाची सिद्ध होऊ शकते.

मुलांची भांडणे हाताळणे : मुलांमधील संघर्षात पालकांनी काय करावे?

* शिखा जैन

मुलांची भांडणे हाताळणे : “बघ, त्याने मला मारले,” “बघ, त्याने माझे खेळणे तोडले…” यांसारख्या लहान गोष्टी कधीकधी शारीरिक हिंसाचारात बदलतात आणि भावंडांच्या भांडणात मुलांना दुखापतही होऊ शकते. पण मुलांची भांडणे पालकांसाठी एक समस्या बनू शकतात. जर पालकांनी एका मुलाच्या वागण्याला बरोबर आणि दुसऱ्याच्या वागण्याला चूक ठरवले, तर ते त्यांच्यासाठी कठीण होऊ शकते, कारण त्यामुळे एका मुलाचे मन दुखावू शकते.

मुले शांततेत राहावीत आणि त्यांचे कुटुंब संघर्षमुक्त असावे, हे सुनिश्चित करण्यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे:

पालक स्वतः त्यांच्या भावंडांशी भांडत आहेत का?

एका निरागस ९-१० वर्षांच्या मुलाला माहित असते की त्याची आई त्याच्या भावाशी भांडत आहे. त्याची आत्या त्याच्या वडिलांशी भांडत आहे. तो त्याच्या आत्याच्या घरी खूप जायचा आणि खूप खेळायचा, पण आता त्याच्या वडिलांनी ते बंद केले आहे. तो त्याच्या आई-वडिलांना विचारतो, “माझे काका आणि काकू आता घरी का येत नाहीत?” सुरुवातीला त्याचे काका आणि काकू खूप प्रेमळ होते, पण नंतर अचानक गायब झाले. मुलांना या गोष्टी समजतात. त्यांना माहित असते की त्यांचे आई-वडील त्यांच्या भावंडांशी भांडतात आणि मग बोलत नाहीत. हळूहळू, या गोष्टी त्यांच्या वागणुकीचा भाग बनू लागतात. ते सुद्धा त्यांच्या भावंडांशी भांडू लागतात आणि यासाठी पालक जबाबदार असतात.

पालकांनी त्यांचे वाद आणि सवयी बदलल्या पाहिजेत

जर पालकांना वाटत असेल की त्यांच्या मुलांनी भांडणे टाळावीत, तर त्यांनी त्यांच्या भावंडांच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासमोर त्यांच्याशी भांडू नका किंवा त्यांना तुमच्या वादात सामील करू नका. मुलांना तुमच्या वादांपासून दूर ठेवण्यासारखे नियम ठरवा. त्यांना त्यांच्या मामा आणि आत्यांना भेटण्यापासून रोखू नका.

मुलांमधील हे वाद निव्वळ पालकांच्या चुकीमुळे होतात

“तू माझी लाडकी आहेस…” हे ऐकायला छान वाटतं, पण दुसऱ्या मुलासाठी तो एक नकार असतो. हे शब्द भावंडांमधील पवित्र नात्याला शत्रुत्वात बदलतात. जेव्हा एका मुलाला प्रेम मिळाल्याची भावना दिली जाते आणि दुसऱ्याला कमीपणाची भावना दिली जाते, तेव्हा त्यांच्यातील संघर्ष केवळ क्षणिक नसतो. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढू लागतात. त्यांना वाटते की केवळ दुसऱ्याला कमी लेखूनच ते आपल्या आई-वडिलांचे लक्ष वेधून घेऊ शकतात.

“तू माझी लाडकी आहेस, आणि ती माझी लाडकी नाही…” यांसारखे शब्द तर पालकांच्या शब्दकोशात असायलाच नकोत. हेच ते शब्द आहेत जे दोन भावंडांमध्ये एक रेषा ओढतात.

जेव्हा आपण विचारतो, “आई, ती तुला जास्त प्रिय आहे की बाबांना?”, तेव्हा आपण मुलाला प्रेमाचे मोजमाप करायला शिकवत असतो. प्रेम ही अशी गोष्ट नाही जी विभागली किंवा तुलना केली जाऊ शकते.

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” यांसारखे शब्द आपण वापरावेत की नाही?

युरोपियन संस्कृतीप्रमाणे, प्रत्येकाला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असे म्हणणे देखील चुकीचे मानले जाते. जर तुमचं एखादं मूल बाहेर जात असेल आणि तुम्ही त्याला म्हणालात, “माझं तुझ्यावर प्रेम आहे,” तर दुसरं मूल विचारेल, “का, तुझं माझ्यावर प्रेम नाही का?” मग तुम्ही तिला असं का म्हणालात?

“आई, तुझं माझ्यावर प्रेम नाही,” हे बोलण्यासारखं नाही, तर कृतीत आणण्यासारखं आहे. “माझं तुझ्यावर प्रेम आहे,” “मी तुझी काळजी घेतो,” हे बोलण्यासारखं नाही, तर फक्त काळजी घेण्यासारखं आहे. तुमचे आई-वडील तुमच्यावर प्रेम करतात की नाही, हे मुलाला तुमची काळजी घेतल्यानेच कळेल.

काळजी हीच खरी भाषा आहे

आईने आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवणे, वडिलांनी शांतपणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे, किंवा भांडणाच्या वेळी तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे सत्य समजावून सांगणे, या गोष्टींमुळे मुलाला सुरक्षित वाटते. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता की नाही, हे त्यांना विचारण्याची गरजही भासत नाही, कारण त्यांना तुमच्या उपस्थितीत आणि काळजीमध्ये उत्तर सापडते.

कोणाचीही बाजू घेऊ नका

भांडण फार गंभीर नसतानाही, कोणाचीही बाजू घेऊ नका आणि दुसऱ्या मुलाला एकटे पाडू नका. यामुळे त्यांच्या भावंडांबद्दल आणि तुमच्याबद्दलही नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. एका मुलाला त्याची चूक आहे असे सांगण्याऐवजी, म्हणा, “आपण हे एकत्र मिळून सोडवूया.”

तुलना करू नका

पालक अनेकदा एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करतात, ज्यामुळे मत्सर आणि द्वेष निर्माण होऊ शकतो. मुलांची एकमेकांशी तुलना करणे टाळा, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होईल आणि संघर्षाची शक्यता कमी होईल. अगदी नकळतपणे, “बघ तुझा भाऊ/बहीण किती हुशार आहे,” असे म्हटल्यानेही मत्सराची आग भडकते.

प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक सामर्थ्याची प्रशंसा करा. त्यांना जाणवू द्या की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि ते एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत.

शिस्त महत्त्वाची आहे

वाईट वागणुकीला कधीही पाठिंबा देऊ नका. तुमची स्वतःची ऊर्जा वाचवण्यासाठी आणि मुलांना योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी शिस्तीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरा. उदाहरणार्थ, जेव्हा ते भांडत असतील, तेव्हा त्यांना दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाण्यास सांगा आणि त्यांना शांत होण्याची संधी द्या. त्यांच्या चुका आणि वागणुकीबद्दल त्यांच्याशी एकांतात चर्चा करा, त्यांना योग्य-अयोग्य समजावून सांगा. पुढच्या वेळी अशीच परिस्थिती उद्भवल्यास ते ती कशी हाताळू शकतात याची उदाहरणे द्या.

तडजोड करायला शिकवा

त्यांना स्वतःहून संघर्ष कसा हाताळायचा हे शिकवा. त्यांना समजावून सांगा की एकाची पाळी दुसऱ्याच्या नंतर येईल. जेव्हा त्यांना खूप राग येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला शिकवा, त्यांना १० ते १ पर्यंत उलट मोजायला सांगा आणि भांडण्याऐवजी आपल्या भावना शब्दांत व्यक्त करायला शिकवा.

पालक आपल्या मुलांना ज्येष्ठता समजावून सांगण्यात कमी पडतात

दोन मुलांपैकी एक मोठा असतो आणि दुसरा लहान. लहान मुलाने हे समजून घेतले पाहिजे की तो लहान आहे. त्याने आपल्या मोठ्या भावंडाचा आदर केला पाहिजे हे त्याने समजून घेतले पाहिजे. घरात एक नियम असायला हवा. जर मोठे मूल चांगला सल्ला देत असेल, तर पालकांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून लहान मुलाला समजेल की ज्येष्ठतेला महत्त्व आहे. जेव्हा पालक स्वतःच सर्वांसमोर मोठ्या मुलाला रागावतात किंवा कमी लेखतात, तेव्हा लहान मूलही तेच शिकते.

ज्येष्ठता केवळ वयामुळेच नाही, तर जबाबदारीमुळेही येते. पालक अनेकदा ही चूक करतात की ते मोठ्या मुलावर सर्व जबाबदारी टाकतात (जसे की लहान मुलाची काळजी घेणे), पण त्या जबाबदारीसोबत येणारा अधिकार किंवा आदर त्याला देत नाहीत.

अनेकदा, लहान मुलाकडून चूक होते आणि पालक मोठ्या मुलाला सांगतात, “तू मोठा आहेस, समजून घे आणि त्याला जाऊ दे.”

असे बोलून, तुम्ही लहान मुलाला अभय देता, कारण त्याला वाटते की तो काहीही चुकीचे करून सहज सुटू शकतो. जेव्हा लहान मुलाला हे शिकवले जात नाही की त्यांचा मोठा भाऊ किंवा बहीण त्यांच्या आधी या जगात आले आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे, तेव्हा ते गैरवर्तनाला आपला हक्क मानू लागतात.

मोठ्या व्यक्तीला जास्त अनुभव असतो

लहान मुलाला अनेकदा त्याचा मोठा भाऊ किंवा बहीण एक स्पर्धक वाटतो, ज्याला पालकांचे जास्त लक्ष किंवा स्वातंत्र्य मिळते. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, आपण घरात शिकण्याची संस्कृती विकसित केली पाहिजे.

जेव्हा लहान मुलाला हे दिसते की मोठ्या व्यक्तीचा अनुभव हा त्याला कमी लेखण्यासाठी नसून त्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आहे, तेव्हा मत्सराची जागा आदराने घेतली जाते.

मोठी व्यक्ती, मग तो मुलगा असो वा मुलगी, संरक्षक असते. आपल्या लहान भावंडांचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

धर्म आपल्याला भावंडांमधील स्पर्धेबद्दल शिकवत आहे

इतिहास आणि पौराणिक कथा पाहिल्यास, आपल्याला असे आढळते की भावंडांमधील स्पर्धा, किंवा त्यांच्यातील चढाओढ, ही जवळजवळ प्रत्येक महान गाथेचा एक भाग राहिली आहे.

रामायणातील बळी आणि सुग्रीव यांच्यातील संघर्ष असो, महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यातील भीषण युद्ध असो, किंवा बायबलमधील केन आणि एबेल यांच्या कथा असोत, या सर्वांमध्ये भावंडांमधील संघर्ष हाच मुख्य विषय राहिला आहे.

राम आणि भरत यांची संपूर्ण कथा भावंडांबद्दलच आहे. जर रामासाठी मंदिरे बांधली गेली, तर भरतासाठी का नाही? धर्माने आपल्याला हेच शिकवले नाही का आणि भरत निरुपयोगी आहे असे सांगितले नाही का? असे म्हटले जाते की राम आणि भरत ही एक जोडी आहे. पण आपल्या सरकारने रामासाठी अनेक मंदिरे बांधली आहेत, मात्र भरतासाठी एकही नाही. लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचीही मंदिरे नाहीत.

दुर्योधन आणि युधिष्ठिर का लढत होते? ते सुद्धा भावंडांमधील वैरच होते

ज्या घरांमध्ये धार्मिक चर्चा क्वचितच होतात, तिथे भावंडे दीर्घकाळ एकत्र राहू शकतात. भावंडांमधील संघर्ष प्रत्येक धर्मात असतो, त्यामुळे ज्या घरांमध्ये धार्मिक चर्चा वारंवार होतात, तिथे मुलांमध्ये ही घटना अधिक प्रमाणात दिसून येते. ही घटना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातही प्रचलित आहे. ती हिंदू धर्मातही अस्तित्वात आहे. ती आपल्या मनाच्या खोलवरच्या कोपऱ्यात वसलेली असते.

जर दशरथाने म्हटले असते की राम राजा होत आहे, तर त्याने चपला का घातल्या आहेत हे विचारून विषय तिथेच संपायला हवा होता. जर तुम्ही अशा निरर्थक गोष्टी सांगितल्या, तर त्या लवकरच तुमच्याच घरात पुन्हा सांगितल्या जातील. एक दिवस तुमचे मूलही म्हणेल की भरतही लढला होता. म्हणून, जर तुम्ही धर्माबद्दल बोललात, तर मुले हमखास भांडतील.

आजच्या काळात तर्क आणि तथ्यांच्या आधारावर जगा

तुमच्या मुलाला लहानपणापासून शिकवा की, जर मी कमजोर असेन, तर मी इतरांचे रक्षण केले पाहिजे. मी समानतेचा शोध घेऊ नये. आजच्या काळात, भावनांऐवजी तथ्यांवर लक्ष केंद्रित केल्याने चांगले निर्णय घेण्यास मदत होते.

समानतेपेक्षा सुरक्षितता आणि सहकार्याला प्राधान्य देणे हा एक खूप खोलवर रुजलेला विचार आहे. अनेकदा, पालक मुलांना जो धडा शिकवतात की सर्वजण समान आहेत, तो त्यांना वास्तविक जगात कमजोर बनवतो. त्याऐवजी, जर मुलांना त्यांची बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखायला शिकवले, तर ते एकमेकांना पूरक ठरू शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें