गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

माझी ननंद एका मुलासोबत आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ती सांगते की त्यांनी कधीच मर्यादा ओलांडल्या नाहीत. तरी देखील मला भीती वाटते की तिने एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये. तिने ही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे.

मला देखील याची माहिती अनाहूतपणे झाली. आता मला वाटतं की ही गोष्ट मला माझे पती व सासूबाईंना सांगायला हवी. परंतु नणंद माझ्यापासून कायमची दुखावली जाऊ नये असं वाटतं, हे योग्य आहे का?

तुम्ही तुमच्या ननंदेच्या रागाची काळजी न करता ही गोष्ट घरातल्यांना सांगा, कारण तिच्या आयुष्यात उद्या काही चुकीचं झालं तर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला याचं दु:ख राहील.

माझं लग्न साधारणपणे चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालं होतं. पती व्यावसायिक आहेत. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. सुरुवातीला पतीसोबत थोड पटत नव्हतं, परंतु नंतर आम्ही हळूहळू एकमेकांना समजू लागलो आणि सर्व काही ठीक चालू लागलं. परंतु या दरम्यान माझी जाऊ, जी कुटुंबात सर्वात वरच्या मजल्यावर राहते,  अचानक स्वर्गवासी झाली. त्यांना दोन मुलं आहेत जे एवढे मोठे झाले आहेत की स्वत: स्वत:ची काळजी घेऊ शकतात.

माझ्या दिरांच जवळच कपडयांचं दुकान आहे. ते अनेकदा माझ्या पतींच्या मागे देखील आमच्या घरी येत असतात. जाऊ बाईच्या मृत्यूनंतर माझ्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूतीची भावना असते, परंतु त्यांचं वागणं काही वेगळंच आहे ते अनेकदा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात. एके दिवशी ते बिनधास्त माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागले.

मी त्यावेळी त्यांना नकार दिला आणि जायला सांगितलं. परंतु आता मला भीती वाटू लागली आहे की पुन्हा जर ते या इराद्याने आले तर माझ्या पतींनादेखील या संदर्भात सांगायला भीती वाटते. कारण ते त्यांच्या मोठया भावाचा खूप आदर करतात. मला भीती आहे की ते मला दोषी मानतील. यासाठी काय करू?

सर्वप्रथम तुम्ही न घाबरता तसंच न संकोचता तुमच्या पतींना सर्व काही सांगा. त्यांना विश्वासात घेऊन तुमची भीती प्रकट करा. जर ते अजिबात मानले नाही तर एखाद्या दिवशी संधी मिळतात सर्व पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करा.

दिर जेव्हादेखील दरवाजा ठोठावतील, तेव्हा मोबाईल व्हॉइस रेकॉर्डर चालू करून तुमच्याजवळ ठेवा व दरवाजा उघडा. अशावेळी दिर जर चुकीचं बोलत असेल व अशा कोणत्या गोष्टी करत असेल तर सर्व रेकॉर्ड होईल आणि तुम्ही तुमच्या पतीला हे पुरावे म्हणून ते रेकॉर्डिंग ऐकवू शकता.

तुमच्या पतींना दुसरीकडे घर घेण्याचा आग्रह करा व दिरांचं पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न करा. त्यांना पत्नीची उणीव भासत आहे म्हणून ते तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. नवी पत्नी आल्यानंतर कदाचित ते तुमच्याशी सामान्य व्यवहार करू लागतील.

मी कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम करत होती, परंतु ते प्रेम व्यक्त करू शकली नाही. नंतर माझं अरेंज मॅरेज झालं. पती खूपच समजूतदार आणि केअरिंग स्वभावाचे आहेत. माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे. परंतु एके दिवशी अचानक आयुष्यात वादळ आलं, खरं म्हणजे फेसबुकवरती त्या मुलाचा मेसेज आला की त्यांना तू माझ्याशी बोलायचं आहे. माझ्या मनात दबलेली प्रेमाची भावना पून्हा जागी झाली. मी त्वरित त्याच्या मेसेजचं उत्तर दिलं.

फेसबुकवरती आमची खूपच चांगली मैत्री झाली. माझ्या रिकाम्या वेळात त्याच्याशी गप्पा मारू लागली.

हळूहळू लाज आणि संकोच गळून पडला. नंतर त्याने एके दिवशी मला एकटीला भेटण्यासाठी बोलावलं. मला त्याचा हेतू माहीत आहे, म्हणून हिम्मत होत नाहीए की एवढ मोठं पाऊल उचलू की नको. इकडे मनात दबलेल्या भावना मला हे पाऊल उचलण्यासाठी हट्ट करताहेत. सांगा मी काय करू?

हे खरं आहे की पहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही, परंतु जेव्हा आयुष्यात तुम्ही पुढे गेला असाल तर पुन्हा मागे वळून जाणं मूर्खापणा होईल. तसंही तुमच्या पतीबाबत तुमची कोणतीही तक्रार नाही आहे. अशा वेळी प्रियकरासोबत नातं जोडून उगाच अडचणी ओढून घेऊ नका.

त्या मुलाला स्पष्टपणे ताकीद द्या की तुम्ही केवळ त्याच्याशी हेल्दी फ्रेंडशिपच ठेवली आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक मरगळ दूर शांतता आणि प्रेरणा मिळते. परंतु शारिकरित्या तुम्ही या नात्यांमध्ये राहून तुमच्या वैवाहिक नात्यावरतीदेखील अन्याय कराल. म्हणून उशीर न करता मनात कोणतीही द्विधा न आणता तुमच्या प्रियकरांशी याबाबत बोलून तुमचा निर्णय सांगा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी ३४ वर्षीय महिला आहे. पती नेहमीच कामासाठी बाहेरगावी असतात आणि कधी-कधी तर अनेक आठवडे घरी येत नाहीत. या दरम्यान २५ वर्षांच्या एका तरुणाशी माझी मैत्री झाली. ही मैत्री एवढी दाट झाली की आमच्यात शारीरिक संबंधही आले. तो खूप हसरा आणि हजरजबाबी आहे. खूप उत्साही आणि सेक्सच्या कलेत पटाईतही आहे. सेक्सच्या वेळी तो खूप वेळपर्यंत फोरप्ले करतो आणि त्यावेळी मीही त्याला खूप साथ देते.

आमच्यामध्ये कमिटमेंट आहे की आमच्यात मैत्री कायम राहिल आणि जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा सेक्स संबंध बनवण्यात मागे-पुढे हटणार नाही. इकडे काही दिवसांपासून सेक्स संबंध बनवताना त्याची इच्छा आहे की ओरल सेक्सच्या वेळी मी त्याचे वीर्य (सीमन) पिऊन टाकावं. मी नकार देताच तो नाराज होतो. तो नाराज झाला, तर माझं कुठल्याही कामात मन लागत नाही. पण मी घाबरते की असं केल्याने मी कोणत्याही रोगाला बळी पडू नये. कृपया सांगा, मी काय करू?

आपण विवाहित आहात, पण आपल्याला मूल आहे की नाही, हे तुम्ही सांगितलं नाही. सध्यातरी काहीही असो, तुम्ही आगीशी खेळताय आणि कधीही हे आपल्या वैवाहिक जीवनाला उद्ध्वस्त करू शकते.

विवाहबाह्य संबंध नंतर असे चिघळतात, त्याची जखम लवकर भरत नाहीत.

आपण सांगितलं आहे की आपण आपल्यात आणि कथित मित्रामध्ये एक कमिटमेंट आहे, जी केवळ मैत्रीपुरती आहे. पण ती केवळ आपण मैत्रीपर्यंतच मर्यादित ठेवली असती, तर बरं झालं असतं. जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर या नात्याला संपवून वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पतिसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. पतिला विनंती करा की ते जेव्हा टूरवर जातील, तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जावं. या काळात पतिची काळजी घ्या आणि त्यांचा आवडता ड्रेस घाला. सोबत सिनेमा पाहायला जा. मोकळ्या वेळात फिरायला जा. मग पाहा, आपल्याला जेवढं प्रेम मिळेल आपल्या पतिकडून मिळेल तेवढं दुसऱ्या कोणाकडून नाही.

राहिला प्रश्न ओरल सेक्सच्या वेळी वीर्यपान करण्याचा, तर जर सेक्स पार्टनर निरोगी असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे नसेल, तर हे नुकसानदायक नाही. यासाठी विवेकाने वागणं उत्तम ठरेल.

  • मी ३० वर्षांचा आहे आणि नुकतंच माझं लग्न झालं आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. जिथे दोन कुटुंबे सोबत राहतात. पत्नी शिकलेली आहे, पण विचाराने स्वतंत्र नाहीए. तिची पूजा-अर्चना, बुरसटलेल्या रीतिरिवाजांना मानणं मला ओझं वाटतं. ती नेहमीच टीव्ही मालिकाही पाहत असते.

खासगी क्षणांमध्येही ती माझ्यासोबत सहकार्य करत नाही, फोरप्लेमध्येही साथ देत नाही. उलट मला वाटतं की खासगी क्षणांत तिने आधुनिक ड्रेस घालावेत आणि आम्ही भरपूर सेक्स एन्जॉय करावं. याखेरीज ती माझी संपूर्ण काळजी घेते. कृपया योग्य सल्ला द्या.

जसं की, आपण सांगितलं आहे की आपलं नवीन लग्न झालं आहे, मग सरळ आहे की आपली पत्नी आपल्याशी मोकळी होण्यास थोडा वेळ लागेल.

पत्नी शिकलेली आहे, पण विचारांनी मुक्त नाहीए, म्हणजे सरळ आहे की ती ज्या वातावरणातून आली आहे, ते मुक्त नसेल. पत्नीचं पुढचं शिक्षण निश्चित करा आणि तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित करा.

यात काही शंका नाही की बहुतेक टीव्ही चॅनेल्सवर अंधश्रध्देने प्रेरित मालिकांचं प्रसारण होतं. निरर्थक आणि अनेक काळापूर्वीचे रीतिरिवाज मीठमसाला लावून सादर केले जातात. त्यांचा आजच्या वैज्ञानिक युगाशी काही देणं-घेणं नाही.

पत्नीला उत्तम साहित्य वाचायला द्या. मासिके आणून द्या. विचार लादू नका. स्वातंत्र्य द्या. पत्नी घरातून बाहेर पडेल, आपल्या पायावर उभी राहिल, तर विचारांत बदल होईल. स्वत:हून पुढाकार घेईल.

सध्यातरी पत्नीसोबत बाहेर फिरायला जा. हॉटेलमध्ये राहा. तिला मोकळेपणाची जाणीव करून द्या. तिथे ती आधुनिक ड्रेस घालेल, तर हळूहळू तिला हे चांगले वाटू लागेल.

पत्नीचा स्वभाव थोडा मोकळा होईल, तेव्हा ती स्वत:ही सेक्सक्रीडेमध्ये आनंद अनुभवेल आणि फोरप्ले तिला सुखद वाटेल.

  • मी ४९ वर्षीय महिला आहे. १८ वर्षांच्या वयातच लग्न झालं होतं. मला २ मुले आहेत. दोघंही मोठी आणि सेटल आहेत. पतिचं अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांची इच्छा आहे की मी रोज सेक्स संबंध बनवावेत. पाळीच्या दिवसांतही पती सेक्स करण्याची इच्छा बाळगतात. मी काय करू?

आपले पती आपल्यावर एवढं प्रेम करतात, ही तर चांगली गोष्ट आहे. पतिपत्नीमध्ये नियमित सहवास केवळ आपसातील संबंधच मजबूत बनवत नाहीत, तर दाम्पत्य जीवन नेहमी आनंदी राखतं.

दुसरं म्हणजे, सेक्स निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आहे आणि शरीरासाठी छान टॉनिकही.

पतिसोबत सेक्ससंबंधांचा खूप आनंद घ्या. राहिला प्रश्न पाळीच्या काळात सेक्स करण्याचा, तर या काळातही आपण सेक्सचा आनंद घेऊ शकता.

‘गृहशोभिका’ मासिकात आम्ही वेळोवेळी यासंबंधी लेख प्रकाशित करत असतो.

आरोग्य परामर्श

* रिता बक्षी, स्त्रीरोग तज्ज्ञ, इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर

प्रश्न : मी ५३ वर्षीय महिला आहे. माझा मेनोपॉज अजून आला नाही आहे. मला माहीत करून घ्यायचे आहे की शरीर या बदलाकडे वाटचाल करत आहे का?

उत्तर : मेनापॉजचे सरासरी वय ४५ ते ५५ वर्ष असते, म्हणून शक्यता आहे की तुमचीसुद्धा या बदलाकडे वाटचाल होत असावी. असे आवश्यक नाही की सगळयाच महिलांचा मेनापॉज या वयात यायला हवा. अनेक अशी कारणं आहेत जी याला प्रभावित करतात. जसे ताण, दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार इत्यादी. जर तुम्हाला काही लक्षणं जसे योनीमार्गाचा शुष्कपणा, त्वचा कोमेजणे, पोटावर सूज, थकवा आणि मूड स्विंग अनेकदा जाणवत असेल तर, शक्यता आहे की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहे. असे होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि एखाद्या स्त्री रोगतज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मी ४८ वर्षांची महिला आहे. मी कामेच्छा प्रबळ होण्यासाठी सप्लीमेंट घेऊ शकते का? ४-५ वर्षांपूर्वी आंशिक हिस्टे्रक्टॉमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्यात मेनोपॉजची लक्षणं जाणवत आहेत. मला असे वाटते की सर्वात स्पष्ट लक्षण सेक्स ड्राइव्ह कमी होणे हे आहे. सांगा मी काय करू?

उत्तर : लिबीडो म्हणजे कामेच्छा कमी होणे, मेनोपॉजदरम्यान अत्यंत सामान्य असते आणि यात अनेक गोष्टी आपले योगदान देत असतात. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होणे हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. हार्मोनल चेंज शरीरावर मोठा ताण आणतो, म्हणून ऊर्जेचा स्तर कमी होतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे आपल्या मन:स्थितीला प्रभावित करु शकते. यासाठी जडीबुटी, मॅका आणि ब्लॅक रास्पबेरीचे सेवन लाभकारक होऊ शकते.

प्रश्न : मी ४० वर्षीय महिला आहे आणि माझा मेनोपॉज काळ सुरु झाला आहे. लवकर मेनोपॉज आल्याने माझ्या पोटावर खूप ब्लॉटिंग होत आहे. मी काय करू?

उत्तर : मेनोपॉजमध्ये सूज, ब्लॉटिंग अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा त्रास इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एस्ट्रोजन हार्मोनचा खालावता स्तर, पचनाला प्रभावित करू शकतो, ज्यामुळे सर्व काही मंदगतीत चालते. यामुळे सूज येते. खालावता एस्ट्रोजनचा स्तर कार्बोहायड्रेटच्या पचनावरसुद्धा परिणाम करू शकतो, ज्यामुळे स्टार्च आणि शुगरचे पचन होणे आणखी कठीण जाते व यामुळे अनेकदा थकवासुद्धा जाणवू शकतो.

रोज नियमित चालणे तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल. यामुळे तुमची पचनशक्ती बळकट होईल. याशिवाय खोल श्वास घ्या आणि शरीराला टोन करा. पास्ता, केक, बिस्कीट आणि पांढरे तांदूळ खाणे टाळा. जर दीर्घ काळ हे दुखणे बरे झाले नाही तर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा.

प्रश्न : माझा मेनोपॉज सुरु झाला आहे. मी फॅमिली प्लॅनिंगबाबत सतर्क असायला हवे का?

उत्तर : तुमचा मेनापॉज आताच सुरु झाला आहे. त्यामुळे शक्यता आहे की १ वर्षांपासून तुमची मासिक पाळी आली नसेल. अशावेळी जेव्हा महिलेची वर्षभर मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्यांनी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कंडोम वगैरेचा वापर करायला हवा. मेनोपॉजनंतरसुद्धा स्त्रियांमध्ये लैंगिक संक्रमणाची जोखीम कमी करण्यासाठी कंडोम इत्यादीचा वापर करत रहायला हवे.

प्रश्न : तीन महिन्यांपासून माझी मासिक पाळी आली नाही आहे. आता एकदम एक आठवडयापासून ब्लीडींग होते आहे. हे बरोबर आहे की चूक आणि अशा परिस्थिती मी काय करायला हवे?

उत्तर : अनेक महिलांमध्ये कितीतरी महीने एवढेच नाहीतर वर्षभरसुद्धा मासिक पाळी येत नाही आणि नंतर परत सुरु होते. हा बदल तेव्हाच होतो जेव्हा हार्मोन, ताण, अती व्यायाम, आहारात बदल होतो. अशा परिस्थितिचा सामना करण्यासाठी तुम्ही थोडया दिवसांसाठी आयर्न टॉनिकचा आधार घ्या. जर तरीही या समस्येतून सुटका झाली नाही तर लवकरात लवकर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मेनोपॉजच्या काळात मी कसा आहार घ्यायला हवा? मी खूप ठिकाणी याबाबत वाचले आहे, पण अजूनपर्यंत एखाद्या योग्य आहारापर्यंत पोहोचले नाही. कृपया सांगा की या परिवर्तनादरम्यान कसा आहार घ्यायला हवा?

उत्तर : मेनोपॉज संपूर्ण शरीरावर फार मोठा परिणाम करत असतो. म्हणून जितकी जास्त तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्याल तेवढे उत्तम. ताजी फळं, ब्राऊन राईस, मोड आलेली कडधान्य असलेला आहार आपल्या जेवणात जास्त समाविष्ट करा. गव्हाच्या पिठाचे सेवन कमी करा, कारण काही महिलांमध्ये गव्हाचे पचन करण्याची प्रक्रिया मंदावते आणि वजन वाढू लागते. आपल्या आहारात जास्त प्रथिने आणि जर तुम्ही शाकाहारी नसाल तर मांस आणि मासेसुद्धा खाऊ शकता. जर शाकाहारी असाल तर दररोज प्रोटीन शेक पिऊ शकता. पण हे निश्चित करा की यात साखर कमी वा नसल्यातच जमा असावी.

प्रश्न : मी ५७ वर्षाची आहे. मेनोपॉजमुळे माझ्या चेहऱ्यावर खूप केस उगवत आहेत. मला सांगा की मी काय करायला हवे?

उत्तर : मेनोपॉजचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. नकोसे केस उगवणे यापैकी एक आहे. बॉटनिकल सप्लिमेंट्स मेनोपॉजच्या भक्ष्य असलेल्या महिलांमध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण नियंत्रित करते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें