सकाळचा नाश्ता पोषक हवा

* डॉय सिमरन सॅनी, फोर्टिस हॉस्पितल

अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे. कारण रात्रभराची झोप आणि १२ तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीराला पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ति सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. याव्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लूकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लूकोजचं प्रमाण बॅलेन्स करतो आणि तुमच्या पाचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो.

याव्यतिरिक्त, सकाळचा नाश्ता करण्याचे इतर फायदेदेखील आहेत. हा तुमची स्मरणशक्ती वाढवतो आणि तुमचं वजन समतोल ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

साकारतो. सकाळचा नाश्ता नियमित न करणाऱ्यांना दिवसभरात जेव्हा भूक लागते, तेव्हा ते अधिक खातात, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. सकाळचा नाश्ता करण्याची चांगली सवय ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह पिडित लोकांसाठी सहाय्य ठरते.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण

न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगतात की सकाळचा नाश्ता हा जागे झाल्यानंतर २ तासातच करायला हवा. परंतु तुम्ही काय खाता हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळचं हे पहिलं खाणं कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बीसारख्या आवश्यक पोषक मुल्यांनी परिपूर्ण असावं. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या देशात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अनारोग्यकारक असतात. त्यामध्ये वापरली जाणारी साखर, लोणी, तूप आणि तेल इत्यादी पदार्थांमुळे तो हानिकारक ठरतो.

तेलकट अन्नामध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील अधिक असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि

खराब कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये मेद आणि प्लाक हळूहळू जमा होत राहिल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शेवटी हृदयरोग म्हणजेच स्ट्रोक होतो. उच्च रक्तदाबामुळे पित्ताचा असमोतल वाढण्याची शक्यता असते.

नवी दिल्लीच्या फोर्टिस इस्पितळाच्या कन्सल्टंट डॉ. सिमरन सॅमी यांनी सांगितलं की नाश्त्यामध्ये तूप आणि लोणी यांचा सढळ वापर होणं आरोग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची रोटी आणि ब्रेड रोलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तेलकट, चरबीयुक्त व गोड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या आहारात तूप, लोणी आणि साखर यांचा नियमित वापर करण्याऐवजी आरोग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निरोगी जीवनशैलीची गरज आहे.

गोड कमी खा

उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिरिक्त मिठ आणि शर्करायुक्त पदार्थांऐवजी उच्च फायबर आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याची अधिक गरज आहे. गोड पदार्थांची आवड असणाऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून साखरेला मीठाचे उपलब्ध पर्याय वापरावेत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित पिडित लोकांनादेखील मदत मिळू शकेल. स्टेल्विया, एस्पारटेम आणि सुक्रेलोस साखर याचे पर्याय आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत आणि आपल्या देशातदेखील उपलब्ध आहेत. परंतु याचा वापर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये फायबर प्रोटिन आणि कार्बोहायडे्रट अधिक प्रमाणात असतील तसंच मीठाचं प्रमाणदेखील कमी असेल. आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दररोज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खा.

सकाळच्या आरोग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पोहे, फळांचं सॅलड, पोळी, मल्ट्रीग्रेन डोसा, उपमा, सांबर, डाळ, सोया, मोडाची धान्य, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, कॉटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री आणि डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लोणी वा तूप, मैद्याचा रोटी, भात, फ्रेंच टोस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका. लोणी आणि साखरेचे आरोग्यदायी पर्याय निवडा.

सकाळचा पोषक नाश्ता लहान मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी अधिक गरजेचा आहे. जे सकाळी पौष्टिक नाश्ता करतात, त्यांना शारीरिक व मानसिक कामे करण्यास अधिक उर्जा मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि दररोजच्या दिनचर्येशी संबंधित आजारपण दूर पळविण्यास मदत होते.

अशी मुलं शाळांमध्येदेखील अधिकाधिक सक्रीय असतात. चिडचिडेपणा, बेचैनी, थकवा या मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. यासाठीच प्रत्येकाने मग लहान असो वा मोठे सकाळचा नाश्ता अधिक गांभीर्याने घ्यायला हवा.

ब्रेन स्ट्रोक कारण आणि निवारण

* प्रतिनिधी

पक्षाघात म्हणजेच ब्रेन स्ट्रोक हा मेंदूच्या आघात किंवा मेंदूच्या कोणत्याही भागात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. मेंदूत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांदरम्यान रक्त जमते आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात व मेंदू स्वत:चे नियंत्रण गमावतो. याला स्ट्रोक किंवा पक्षाघात म्हणतात. यावर वेळेवर उपचार न केल्यास मेंदू कायमचा खराब होतो. त्या व्यक्तिचा मृत्यूही होऊ शकतो.

आज जगातील सुमारे ८० दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास आहे, ५० दशलक्षाहूनही अधिक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते, ब्रेन स्ट्रोकचे २५ टक्के रुग्ण ४० वर्षांचे आहेत. हे लक्षात घेऊन ‘वर्ल्ड स्ट्रोक डे’ दरवर्षी २९ ऑक्टोबरला साजरा केला जातो, ज्याचा उद्देश स्ट्रोक प्रतिबंध, उपचार आणि सहकार्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.

मुंबईतील अपॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. मोहिनीश भटजीवाले सांगतात की ब्रेन स्ट्रोक हे जगभरात मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण मानले जाते. एकटया भारतातच दर मिनिटाला ६ लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे, कारण ब्रेन स्ट्रोकसारख्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितित त्याची लक्षणे, कारणे, प्रतिबंध आणि त्वरित उपाययोजनांबाबत जनजागृतीचा मोठा अभाव आहे. प्रत्यक्षात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळाल्यास ते बरे होण्याची शक्यता ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढते.

प्रमुख कारण

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार आजच्या धकाधकीच्या युगात मानसिक तणाव, जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी ब्रेन स्ट्रोकसाठी कारणीभूत आहे. याशिवाय आरामदायक आणि सतत काम करण्याची पद्धतही मेंदू आणि हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देत आहे. याच कारणांमुळे तरुणांमध्ये हा आजार झपाटयाने पसरत आहे.

या सर्व कारणांशिवाय ८० टक्के लोकांना माहिती नसलेले कारण म्हणजे वातावरण आणि हवामानातील असामान्य बदल, जे आपली त्वचा आणि मेंदूवर विपरीत परिणाम करतात. याचे परिणाम आगामी काळात घातक ठरू शकतात. यास प्रामुख्याने वृक्षतोड जबाबदार आहे.’’

मीरा रोडच्या वोकार्ड हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ खारकर यांच्या मते, ‘‘सर्वसामान्यपणे ब्रेन स्ट्रोककडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ति जीवनात कधी ना कधी याच्या विळख्यात अडकते. हिवाळयात याचा धोका अधिक वाढतो. हार्ट अटॅक, कॅन्सर आणि डायबिटीससारख्या आजारांकडे जितके गांभीर्याने पाहिले जाते, तितक्या गांभीर्याने ब्रेन स्ट्रोककडे पाहिले जात नाही. टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांसाठी याचा धोका अधिक असतो. हाय ब्लडप्रेशर आणि हायपरटेंशनचे रुग्णही याच्या विळख्यात लवकर अडकतात. गर्भ निरोधक गोळयांचे सेवन आणि कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तरही ब्रेन स्ट्रोकला निमंत्रण देतो.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

मेंदूचे कार्य संपूर्ण शरीरात फार महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जर शरीराच्या इतर आजारांकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. तोंड, हात व पाय दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, बोलताना व चालताना समस्या, पाठदुखी इत्यादी ब्रेन स्ट्रोकची मुख्य लक्षणे आहेत. स्ट्रोक नॉन ब्लीडिंग आणि ब्लीडिंग अशा दोन्ही प्रकारचा असतो. ज्यात मेंदूत मज्जातंतू फुगतात किंवा रक्तवाहिन्या फुटतात.

स्ट्रोकच्या प्रकारानुसार उपचार

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार ब्रेन स्ट्रोकवर त्वरित उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. उपचार स्ट्रोक सुरू होण्याच्या ३-४ तासांच्या आत केला गेला तर मेंदूचे नुकसान आणि संभाव्य त्रास कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, ३ तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषध देणे आवश्यक असते. यानंतर, डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी जसे की, सिटीस्कॅन, एमआरआय इत्यादी केल्यानंतर स्ट्रोकसाठी उपचार सुरू केले जातात, ज्याचा हेतू मेंदूचे नुकसान टाळणे हा असतो.

जर स्ट्रोक मेंदूत रक्त पुरवठयात अडथळा निर्माण झाल्यामुळे आला असेल तर त्याचे उपचार खालीलप्रमाणे आहेत :

* नॉन ब्लीडिंग ब्रेन स्ट्रोक झाल्याच्या तीन तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषधाचे इंजेक्शन देणे फार महत्वाचे आहे. सोबतच रक्त गोठू नये म्हणून ते पातळ करण्याचे औषधही दिले जाते. याशिवाय शस्त्रक्रियादेखील केली जाते, ज्यामध्ये मानेच्या अरूंद रक्तवाहिन्या उघडल्या जातात.

* ब्लीडिंगमुळे ब्रेन स्ट्रोक असल्यास, असे औषध दिले जाते जे सामान्यपणे ब्लड कोटिंग कायम ठेवण्यास मदत करते. मेंदूमधून रक्त काढून टाकण्यासाठी किंवा दबाव कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. खराब झालेल्या रक्तवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. ब्लीडिंग रोखण्यासाठी कॉईल म्हणजेच तार वापरली जाते. मेंदूतील सूज रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी औषध दिले जाते. याव्यतिरिक्त, मेंदूच्या रिक्त भागात ट्यूब घालून दाब कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

अफेसिया होण्याचा धोका

स्ट्रोकनंतर रुग्णाला शारीरिक आणि मानसिक अपंगत्व येण्याची अधिक शक्यता असते, जी स्ट्रोकमुळे प्रभावित झालेल्या भागावर आणि आकारावर अवलंबून असते. नॅशनल अफेसिया असोसिएशनच्या अहवालानुसार, ब्रेन स्ट्रोकच्या २५ ते ४०टक्के रुग्णांना अफेसिया होण्याची शक्यता असते. ही अशी स्थिती आहे जी रूग्णांच्या बोलण्याची, लिहिण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता प्रभावित करते, ज्याला ‘भाषा डिसऑर्डर’ देखील म्हटले जाते. हा आजार ब्रेन ट्यूमर, ब्रेन इन्फेक्शन, अल्झायमर इत्यादीमुळे होतो. बऱ्याच बाबतीत अफेसियाला अपस्मार आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणं म्हणूनही पाहिले जाते.

पुनर्वसन ठरते उपयुक्त

ब्रेन स्ट्रोकमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन बऱ्याच प्रमाणात मदत करते. जरी काही रुग्ण पूर्णपणे ठीक होऊ शकत नसले तरी रिहॅबिलिटेशनमुळे बऱ्याच रुग्णांचे आरोग्य सुधारते. मृत त्वचेच्या पेशी, मज्जातंतूंच्या पेशी दुरुस्त किंवा बदलल्या जाऊ शकत नाहीत, परंतु मानवी मेंदू लवचिक असतो. यामुळे रुग्ण नुकसान न झालेल्या मेंदूच्या पेशींचा वापर करण्याचा नवा मार्ग शिकू शकतो. योग्य काळजी, सोबत आणि प्रोत्साहन देऊन अशा रुग्णांचे जीवन सार्थकी लावता येऊ शकते.

आरोग्यास अपायकारक टाइट जीन्स

– एनी अंकिता

अलीकडे मुलींना टाइट आणि स्किनी जीन्स घालणं आवडतं, मग त्यांना हे घालून कम्फर्टेबल वाटत असो वा नसो, पण त्या कॅरी करतात. खरं तर त्यांना वाटतं की हे घातल्याने त्यांची फिगर सेक्सी वाटेल आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित होईल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की टाइट जीन्स तुम्हाला आजारी पाडत आहे? यामुळे तुम्ही इस्पितळातही पोहोचू शकता?

ऑस्ट्रेलिया येथील ऐडिलेड शहरात एका मुलीसोबत काहीसं असंच घडलं आहे. स्टायलिश आणि सेक्सी दिसण्यासाठी मुलीने टाइट जीन्स घातली तर खरी, पण या टाइट जीन्सने तिला चक्क इस्पितळात पोहोचवलं. तिथे कळलं की तिच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह थांबला आहे. मुलीची अवस्था इतकी वाईट झाली होती की ती आपल्या पायांवर व्यवस्थित उभीदेखील राहू शकत नव्हती. तिला लोकांची मदत घ्यावी लागली.

फॅशनसोबत स्वत:ला अपडेट ठेवणं चांगली गोष्ट आहे, पण यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. टाइट जीन्स फिगरला सेक्सी लुक देत असली तरी अपायकारक असते. याच्यामुळे अनेक प्रकारचे हेल्द प्रॉब्लेम्स उद्भवतात, ज्याकडे मुली लक्ष देत नाहीत.

बेशुद्ध पडणं

कायम टाइट फिटिंगचे कपडे घातल्याने दम कोंडू लागतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

पाठदुखी

आजच्या काळात आपल्यापैकी अनेक मुलींना लो वेस्ट जीन्स घालणं आवडतं. टाइट आणि लो वेस्ट जीन्स पाठीच्या स्नायूंना कम्प्रेस आणि हिल बोनच्या मूव्हमेंटमध्ये अडथळा आणतात. त्यामुळे स्पाइन आणि पाठीवर ताण पडतो आणि वेदनेची समस्या उत्पन्न होते.

पोटदुखी

जेव्हा घट्ट कपडे घातले जातात तेव्हा कपडा पोटाला चिकटतो. त्यामुळे पोटावर ताण पडतो आणि पोटदुखी होऊ लागते. इतकंच नव्हे, तर टाइट जीन्समुळे पचनक्रियादेखील असंतुलित होते, ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास उत्पन होतो.

अंगदुखी

टाइट जीन्स थाइजच्या नर्व्सला कंप्रेस करते, ज्यामुळे झिणझिण्या आणि जळजळ जाणवते. यामुळे डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. इतकंच नव्हे तर, टाइट जीन्स घातल्याने बसायला उठायलाही समस्या होते आणि बॉडीचा पोस्चर बिघडू लागतो.

थकवा जाणवणं

जेव्हा टाइट जीन्स घातली जाते तेव्हा खूप लवकर थकवा येतो, ज्याचा आपल्या कामावरही प्रभाव पडतो. तेव्हा आपण विचार करतो की जर ऑफिसातही नाइट डे्रस घालायचं स्वातंत्र्य असतं तर? म्हणून तुम्हालाही जर असं वाटत असेल तर काही दिवस सैल कपडे घालून बघा. तुम्हाला स्वत:मध्ये फरक दिसून येईल.

यीस्ट इन्फेक्शन

ही समस्या त्या ठिकाणी जास्त दिसून येते, जिथे जास्त घाम येतो. टाइट जीन्स घातल्याने शरीराला हवा लागत नाही, ज्यामुळे शरीरात यीस्टचं प्रोडक्शन वाढतं. यामध्ये खाज, जळजळ आणि वेदना होते. याकडे दुर्लक्ष करणं भयंकर ठरू शकतं.

फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका

टाइट जीन्समुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतं आणि रॅशेज येतात.

जीन्सव्यतिरिक्तही अनेक आउटफिट आहेत

केवळ टाइट आणि स्किनी जीन्स आपल्याला आजारी करत नाहीत, तर इतरही असे अनेक कपडे आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्यापैकी एक आहे शेपवियर. शेपवियर शरीरावरील अधिक फॅट लपवून आपल्याला स्लिम दाखवत असलं तरी याचा आपल्या शरीराच्या अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. शेपवियरव्यतिरिक्त टाइट ब्रा, पॅण्टी, फिटिंग टीशर्ट, टाइट बेल्ट, आणि हाय हीलचाही वाईट प्रभाव पडतो.

टाइट जीन्स घालणं का आवडतं

* मुलींना वाटतं की त्या टाइट आणि फिटिंग कपड्यांमध्येच सेक्सी दिसू शकतात.

* मुलांचं लक्ष वेधण्यासाठी.

* बोल्ड आणि कॉन्फिडेंट दिसण्यासाठी.

* अपडेट आणि स्टायलिश दिसण्यासाठी.

* मुली आपल्या मैत्रिणींना जळवण्यासाठीदेखील टाइट जीन्स घालणं पसंत करतात.

* काही मुली फक्त दुसऱ्यांचं बघून टाइट जीन्स घालतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें