कॉल सेंटर विवाहित महिलांचे वाढते वर्चस्व

* सुमन बाजपेयी

कॉल सेंटरचे नाव घेताच अस्खलित इंग्रजी बोलणारे, ग्राहकांच्या प्रश्नांना विशिष्ट शैलीत उत्तरे देणारे, उत्पादनातील गुणवत्तेबद्दल त्यांना पटवून देण्यात पटाईत असलेले, हेडफोन घातलेले तरुण मुला-मुलींचे चेहरे डोळयांसमोर येतात. कॉल सेंटरबद्दल मनात नेहमीच एक समज असतो की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पैसे कमावण्यासाठी अर्धवेळ नोकरी करण्याची इच्छा त्यांना येथे आणते. कॉल सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा आणि पैसा या दोन्ही गोष्टी त्यांना आकर्षित करतात. त्यामुळेच कामाचे तास अनियमित असूनही तरुणांचा मोठा गट तेथे काम करताना दिसतो.

आता मात्र कॉल सेंटरचे स्वरूप बदलू लागले आहे. आता विवाहित महिलाही कॉल सेंटरमध्ये कानाला हेडफोन लावून कम्प्युटरसमोर ग्राहकांशी बोलताना सहज दिसतात. विवाहित महिलांचा कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा ट्रेंड मार्च २००४ मध्ये सुरू झाला.

पूर्वी विवाहित महिला नोकरी करत असल्या तरी त्यांची संख्या फारशी नव्हती. विप्रो कंपनीने अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच गृहिणींसोबत केला. या क्षेत्रात महिलांचा सहभाग सध्या केवळ ५ टक्के आहे, मात्र त्यात अनपेक्षित वाढ होण्याची शक्यता या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एक अनोखा प्रयोग

आतापर्यंत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांचे वय १८ ते २५ वर्षे निश्चित करण्यात आले होते. प्रगत वयाच्या या युगात काम शिकल्यानंतर कंपन्या बदलण्याची सरासरी गेल्या वर्षीपर्यंत ३३ टक्के होती. यंदा त्यात ४० टक्के वाढ झाली आहे. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत होणाऱ्या स्थलांतराच्या वाढत्या सरासरीला आळा घालण्यासाठी आता विवाहित महिलांना हेडफोन घालायला लावले जात आहेत. विशेषत: विप्रो, आयगेट, सॉफ्टवेअर, कॅपिटल आणि ई-फंड या ५ आयटी कंपन्यांनी यामध्ये आणखी एक नवीन प्रयोग केला आहे. ज्या महिलांची मुले शाळेत जात आहेत आणि संयुक्त कुटुंब आहेत त्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.

उत्पादनाशी संबंधित, कंपनी विवाहित महिलांना नोकरी देत आहे, ज्या दिवसा किंवा रात्री कधीही त्यांचा वेळ देऊ शकतात. यात बोलण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. या महिलांना १२ ते १५ हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन दिले जात आहे, जे नंतर कार्यक्षमतेनुसार वाढविले जाऊ शकते.

आश्चर्यकारक क्षमता

विवाहित महिलांचे वय २७ ते ४० वर्षे निश्चिंत करण्यात आले आहे, कारण या वयातील नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांमध्ये काम करण्याची आश्चर्यकारक क्षमता असते. त्या प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडण्यास सक्षम असतात, उलटपक्षी, तरुणांना जास्त अपेक्षा असतात, त्यामुळे ते टिकत नाहीत. त्यांच्याकडे अनुभवाचा अभाव असतो, शिवाय कामाबद्दलच्या जबाबदारीची जाणीवही नसते. अधिक पैसे मिळताच ते इतर कंपन्यांमध्ये जातात, त्यामुळे जास्त तोटा होतो आणि कंपन्यांना प्रशिक्षणासाठी रोज नवीन कर्मचारी शोधावे लागतात.

कामाप्रती अधिक समर्पित

नोएडास्थित कंपनीतील कॉल सेंटर गट प्रमुख म्हणून काम करणारी पुष्पांजली सांगते की, मी या कॉल सेंटरमध्ये ३ वर्षांपासून काम करत आहे. मी विवाहित असून येथे काम करणे मला कधीच अवघड वाटले नाही. पूर्वी मी रात्रीच्या यूएस शिफ्टमध्ये काम करायची, पण आता मी यूके शिफ्टमध्ये काम करते, जी दुपारी २:३० ते रात्री १२:३० पर्यंत असते. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचीही सहज काळजी घेऊ शकते.

मला वाटते की, प्रौढ महिला तरुणांपेक्षा कामाप्रती अधिक समर्पित असतात, कारण त्या एकाच ठिकाणी राहतात आणि प्रलोभनांना बळी पडत नाहीत. रविवार व्यतिरिक्त, आठवडयातून आणखी एक सुट्टी असते, त्यामुळे कुटुंबात समन्वय राखण्यास अडचण येत नाही.

माझे पती व्यावसायिक असून मला पूर्ण पाठिंबा देतात. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. वाईट बोलणारे तर प्रत्येक ठिकाणी असतातच.

त्यांच्या बोलण्यामुळे प्रत्येक महिला वाईट ठरत नाही. येथे चांगला पगार आहे. कामावर ने-आण करण्याची सोय आहे, जेवण उपलब्ध आहे, याशिवाय इतर प्रोत्साहनही मिळते. मला असे वाटते की, कॉल सेंटरमुळे विवाहित महिलांना करिअर करण्यासाठी संधींची नवीन दारे खुली झाली आहेत.

आज परदेशी कंपन्या भारतात कॉल सेंटर्स उघडत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आणि येथे कमी पगारात लोक उपलब्ध आहेत. विवाहित महिलांसाठी कॉल सेंटरनी ज्या मोकळेपणाने दारे खुली केली आहेत, ते कौतुकास्पद पाऊल तर आहेच, सोबतच कामातही वाढ होईल.

कॉल सेंटरसाठी अशा लोकांची आवश्यकता असते ज्यांचा आवाज चांगला असतो, सोबतच ग्राहकांशी संवाद साधण्यातही ते कुशल असतात, अस्खलित आणि स्पष्ट इंग्रजीत बोलणे, सुयोग्य दृष्टिकोन आणि शिकण्याची जबरदस्त क्षमताही आवश्यक असते. आजवर तरुणाईपुरते मर्यादित असलेले हे करिअर आता गृहिणींसाठीही खुले झाले आहे, कारण लवचिक वेळेमुळे विवाहित महिला आता कॉल सेंटरमध्ये काम करण्यास प्राधान्य देऊ लागल्या आहेत.

कॉल सेंटर्समध्ये अचानक गृहिणींची संख्या वाढू लागली आहे, कारण आता कुटुंबे अधिक प्रगत विचारांची झाली आहेत आणि रात्री काम करणे आता निषिद्ध राहिलेले नाही. चांगला पगार आणि कामावर ने -आण करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे काम करणे सोपे झाले आहे.

समस्या सोडविण्याची क्षमता

कॉल सेंटर कंपन्या आता अशा महिलांना प्राधान्य देत आहेत ज्या प्रगल्भ आणि निष्ठावान आहेत. विवाहित महिला प्रगल्भ विचारांच्या असतात आणि त्यांना सतत कौटुंबिक दबावातून जावे लागते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये जास्त तास काम करण्यासोबतच समस्या सोडवण्याची क्षमता अविवाहितांपेक्षा चांगली असते. कॉल सेंटरमधली नोकरी खूप नीरस आणि कंटाळवाणी असते आणि त्यात वाढीच्या संधी कमी असतात असा अनेकांचा समज आहे, पण हे आता चुकीचे सिद्ध झाले आहे, कारण हे खूप आव्हानात्मक काम आहे.

५-१० वर्षांपूर्वी कॉल सेंटरचा व्यवसाय बाल्यावस्थेत होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले त्याकडे आकर्षित झाले. काहीतरी शिकण्यासोबतच त्यांना करिअर करण्यातही रस होता, पण त्यांची ही नोकरीची सुरुवात असल्याने ते त्याबाबत तितकेसे गंभीर नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडल्यानंतर कंपन्यांना पुन्हा नवीन लोकांना प्रशिक्षण द्यावे लागायचे.

विश्वास आणि दूरदृष्टी

महिला विवाहित आहे की अविवाहित, यावर क्षमता अवलंबून नसली तरी विवाहित महिला एकाच ठिकाणी काम करण्यास प्राधान्य देतात हे खरे आहे. कार्यालयीन वातावरण हे महाविद्यालयीन वातावरणाप्रमाणे करण्याचा प्रयत्न बहुतांश तरुण करतात, परंतु विवाहित महिला निष्ठेने, विश्वासाने आणि दूरदृष्टीने काम करतात.

जे हात घरी पोळपाट लाटणे चालवायचे ते आता रात्रंदिवस संगणकावर वेगाने बोटे वेगाने फिरवतात. पती, सासु-सासरे, मुलांच्या तक्रारी आणि मागण्या ऐकणारे कान आता हेडफोन लावून ग्राहकांमध्ये उत्पादनाबद्दल विश्वासार्हता निर्माण करतात. परिणामी उत्पादनाची चांगली विक्री होते. गृहिणींनी परदेशी बाजारपेठेत आपली विपणन क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि विविध आयटी कंपन्यांनी त्यांच्यामधल्या क्षमता ओळखल्या आहेत.

वर्क फ्रॉम होम आणि नवीन मोबाईल तंत्रज्ञानामुळे आता असे कॉल सेंटर्सदेखील चांगले चालू शकतात, जिथे गृहिणी संगणक आणि मोबाईलच्या मदतीने घरबसल्या काम करत आहेत. कोविड-१९ चा एक फायदा असा झाला की, लोक आता कार्यालयात, समोरासमोर बसून काम करण्याची सवय गमावत आहेत आणि त्यांना घरून काम करायचे आहे. झुम मीटिंगप्रमाणे, डझनभर प्लॅटफॉर्मही या महिलांना प्रशिक्षण देऊ शकतात.

सोबतीने जेवण बनविण्याचे छान फायदे

* शोभा कटारे

दिर्घकाळ सोबत राहिल्यानंतर पती-पत्नी असो वा लिव इन पार्टनर, दोघे एकमेकांबाबत निष्काळजी होऊ लागतात. निष्काळजीपणा हळूहळू सवयीत बदलतो आणि नात्यांमध्ये दरार बनण्याचं कारण बनतं. अशावेळी समजूतदारपणे काम केलं नाही तर नात्यांची मूळं कमजोर होऊ लागतात. म्हणून नातं नवीन असो वा जूनं वेळोवेळी एकमेकांना स्पेशल फील करत राहणं गरजेचं आहे. यामुळे आपापसातील प्रेम आणि विश्वास वाढतो.

अलीकडच्या काळातील धावपळीच्या आयुष्यात अनेक घरांमध्ये जोडपी ऑफिसमध्ये जातात वा मग वर्क फ्रॉम होम करत आहेत. अनेकदा दोघांच्या ऑफिसच्या वेळा वेगवेगळया देखील असतात. ज्यामुळे त्यांच्या जवळ वेळेचा अभाव राहतो. ते एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशावेळी वेळेच्या अभावामुळे हळूहळू जोडप्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. जो पुढे जाऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो.

लक्षात घ्या की कोणतंही नातं यशस्वी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्यक्तीला योग्य वेळ द्यावीच लागते. जर तुम्ही खूप व्यस्त रहात असाल तर तुमच्या जोडीदारासोबत काही क्षण क्वालिटी टाईम नक्कीच घालवा. वर्क फ्रॉम होममध्ये देखील तुम्ही दोघे सुट्टी घेऊन एकमेकांसोबत एक आठवणीतला काळ घालवू शकता. असं केल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात चालणाऱ्या नकारात्मक तसंच त्यांचा एकटेपणा देखील दूर करू शकाल.

दांम्पत्यामधील गोडवा

दांपत्यामध्ये गोडवा कायम राखण्यासाठी काही स्पेशल करा. एकमेकांना स्पेशल फील करविण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याऐवजी घरच्या घरीच जोडीदारासोबत हेल्दी आणि टेस्टी डिश बनवा. अशा डिशची निवड करा जी तुम्ही दोघे मिळून बनवू शकाल. म्हणजे तुम्ही एकमेकांना मदत करू शकाल. तसंच एकमेकांसोबत अधिक काळ आणि आठवणीतला काळ घालवू शकाल. सोबत बसून खाण्याची मजा घेऊ शकता. भलेही तुमच्या घरी खाणं बनवण्यासाठी प्रोफेशनल कूक असला तरी देखील एखाद्या सुट्टीच्या दिवशी पती-पत्नी दोन्ही मिळून जेवण बनवा आणि एकत्र जेवण करा.

जोडीदारासोबत काही देखील बनविण्यापूर्वी एकमेकांशी डिस्कस नक्कीच करा आणि एकमेकांचे सल्ले मागण्यात संकोच करू नका. अशाप्रकारे तुम्ही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवू शकता आणि तुमच्या सुट्टीची खूप मजा घेऊ शकता. जर पत्नीने पतीची आवडती डिश बनवली असेल तर पतीने त्यांच्या पसंतीची एखादी आवडती गोष्ट बनवावी. यामुळे दोघांना स्पेशल फील वाटेल आणि एकमेकांसाठी प्रेम आणि विश्वास वाढेल.

तुमचं नातं मजबूत बनवण्यासाठी एकत्र मिळून जेवण बनविल्यानंतर वा या दरम्यान या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा :

आभार माना

किचनमध्ये त्यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रत्येक मदतीसाठी त्यांचे आभार मानायला विसरू नका. तुम्ही असं केल्यामुळे त्यांना खूप छान वाटेल आणि तुमचं बॉण्डिंगदेखील छान बनेल.

कॉम्प्लिमेंट नक्की द्या

जोडीदाराला दिलेलं तुमचं एक कॉम्प्लिमेंट खूप मोठी जादू करू शकतं. तुम्ही असं केल्यामुळे तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास वाढेल. ज्यामुळे तुमचं आपापसातील प्रेम अधिक वाढेल.

कौतुक करायला विसरू नका

कौतुकाचे दोन शब्द प्रत्येक नात्याला दृढता देतं. म्हणून जोडीदाराच्या चांगल्या सवयी, चांगलं काम, केअरिंग नेचर आणि सकारात्मक विचारसरणीचं नेहमी कौतुक करा. जेव्हादेखील जोडीदार काही नवीन आणि क्रिएटिव्ह करेल तेव्हा त्यांचं कौतुक करायला विसरू नका. तुम्ही केलेल्या कौतुकाचा प्रत्येक शब्द त्यांना वेगळा आनंद देईल. यामुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल आणि तुमच्या नात्याला दृढता मिळेल.

तुमच्या बोलण्याचा अंदाज बदला

जर तुमच्या जोडीदाराच्या कोणत्या कामाचा त्रास होत असेल वा त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्यांना वाईट वाटेल अशा शब्दात सांगू नका. जसं की, जोडीदाराचं कोणतं काम आवडत नसेल तर त्यांना हे सांगू नका की हे काम तुम्ही चांगलं केलं नाही वा तुम्हाला नाही येत. याउलट असं सांगा की तुम्ही मला खूप मदत केली आहे यासाठी खूप आभार. त्यांना शिकवा की पहा असं करतात म्हणजे पुढच्या वेळी ते नक्कीच तुमच्या आवडीनुसार काम करू शकतील.

तुम्ही हवं असल्यास एकमेकांच्या मदतीने व्हेज पुलाव आणि रायत डिशची निवड करू शकता. या डिशमध्ये तुम्ही भाजी कापणं आणि रायत बनवणं जसं की दही घोटणं, बुंदी तसंच मसाले टाकणं, मिक्स करण्यासाठी पतींची मदत घेऊ शकता. इतर डिशची तयारी तुम्ही करू शकता. जसं की, भात बनवणं, तळणं इत्यादी डिश तयार झाल्यानंतर ती टेबलवर सजविण्यासाठीदेखील सांगू शकता. तर चला आज स्वयंपाक घरात तुमच्या जोडीदारासोबत बनवा वेजिटेबल पुलाव आणि रायतं म्हणजेच एक हेल्दी आणि टेस्टी डिश.

प्रमुख साहित्य

१ कप तांदूळ, ५ छोटे चमचे रिफाइंड तेल, अर्धा कप मटरचे दाणे, अर्धा कप बटाटे, अर्धा कप फ्लावर, १०-१५ बीन्स, २-३ गाजर, २ कांदे मोठे, १ चमचा जिरा, ३ मोठे चमचे बिर्याणी मसाला वा हवं असल्यास खडे मसाले जसं की लवंग, काळी मिरी, वेलची, तमालपत्र, जायफळ इत्यादी देखील घेऊ शकता. यांना थोडंसं परतवून घ्या आणि नंतर बारीक वाटून घ्या. मीठ चवीनुसार.

साहित्य रायत्याचं

५०० ग्रॅम दही, २०० ग्रॅम बुंदी, १ हिरवी मिरची, पाव चमचा लाल तिखट, १ चमचा भाजलेलं तसंच वाटलेलं जिरं, पाव चमचा काळी मिरी, काळ मीठ, पांढरं मीठ चवीनुसार. तुम्ही हवं असल्यास रायत्याच्या मसाल्याचा देखील वापर करू शकता.

कृती

तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. ३ कप पाण्यात तांदूळ टाकून एका भांडयात शिजण्यासाठी ठेवा. जेव्हा तांदूळ ८० टक्के शिजतील तेव्हा पाणी काढून एका चाळणीमध्ये टाका आणि पसरवा.

एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे टाका व कांदा टाका. जेव्हा कांदा गुलाबी होईल तेव्हा कापलेल्या भाज्या टाका आणि मीठ टाकून शिजवा. जेव्हा भाज्या शिजतील तेव्हा बिर्याणी मसाला वा घरच्या घरी बनलेला मसाला टाका आणि थोडा वेळ परतवा.

आता कढईत शिजलेला भात टाका आणि भाज्यांसोबत व्यवस्थित एकत्रित करून थोडावेळ आणखीन शिजवा. व्हेजिटेबल पुलाव तयार आहे.

तयार व्हेजिटेबल पुलाव सर्व्हिंग बाऊलमध्ये टाका आणि कोथिंबीर, खोवलेला नारळ टाका आणि सजवा. तुम्ही हवं तर सजविण्यासाठी तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता.

रायताची कृती

तुम्ही हवं असल्यास रायतं बनविण्यासाठीदेखील तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता. एका बाऊलमध्ये फेटलेलं दही घेऊन त्यामध्ये बुंदी आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्या. कोथिंबीरने सजवा. रायतं तयार आहे. अशा प्रकारे तुमच्या जोडीदारासोबत व्हेजिटेबल पुलाव आणि रायत्याची मजा घेऊन नात्यांचा गोडवा अधिक गोड करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत बनवा खाण्याचे फोटो घ्यायला विसरू नका म्हणजे हे क्षण तुमच्यासाठी आठवणीतले बनतील.

दांपत्य जीवनात गोडवा कायम राखण्यासाठी वेळोवेळी एकमेकांना स्पेशल फील करणं गरजेचं असतं. छोटया छोटया गोष्टींनीदेखील एकमेकांबाबत प्रेम दाखवून आपापसातील नात्यांमध्ये गोडवा घोळवून नात्यांमधील कडवटपणा दूर केला जाऊ शकतो.

कधीच नका सांगू ९ बेडरूमची गुपित

* रितू वर्मा

रिमाचं नवीन लग्न झालं होतं. सेक्स जे तिच्यासाठी नवीन होतं. आता लग्नानंतर अचानक ती रोमांचित झाली होती. रीमाला तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलांबद्दल कोणासोबत तरी बोलायचं होतं. तिला जाणून घ्यायचं होतं की तिला जसं वाटतं ते तसंच सर्वांबाबत होतं का?

रीमाने आनंद आणि रोमांचित झाल्यामुळे स्वत:ची बेडरूम सिक्रेट्स म्हणजेच गुपितं आपल्या मैत्रिणींना सांगितली. जेव्हा रिमा आणि तिचा पती जय हे तिची मैत्रीण श्वेताकडे जेवायला गेले होते तेव्हा श्वेताने जयसमोरच अशा गोष्टी बोलायला सुरुवात केली होती ज्या अश्लीलतेच्या परिघात येत होत्या. जय समजून गेला की रिमाने त्यांच्या दोघांमधील वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक केल्या आहेत. या गोष्टीसाठी तो रीमाला अद्यापही माफ करू शकला नव्हता. इकडे श्वेतादेखील जेव्हा संधी मिळेल तेव्हा रीमाला तिच्या बेडरूमची गुपितं विचारायची आणि तिखटमीठ लावून पूर्ण ग्रुपला सांगत असे.

भूमिकाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिची विवाहित मैत्रीण एकता तिची जणू काही सेक्स गुरुच बनली. भूमिका निरागसपणे तिच्या प्रत्येक छोटया मोठया गोष्टी एकताला सांगत होती. एकता जी तिच्या पतीपासून समाधानी नव्हती. भूमिकाची बेडरूम सिक्रेट्स ऐकून तिच्या पतीकडे आकृष्ट झाली. संधी मिळतात एकताने भूमिकाच्या पतीला स्वत:कडे खेचलं होतं. आता भूमिका त्या दिवसाला दोष देत होती जेव्हा तिने एकतासोबत तिच्या बेडरूममधली सिक्रेट्स सांगायला सुरुवात केली होती.

आजदेखील अनेक नवविवाहित जोडपी लग्नापूर्वी सेक्सपासून दूर राहतात. म्हणून जेव्हा लग्नानंतर या नव्या जगतात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना समजत नाही की त्यांच्या गोष्टी कोणासोबत शेअर कराव्या. मनात हुरहूर, भीती असते, काही गोष्टी माहित नसतात, काही रहस्य असतात तेव्हा समजत नाही की कोणासोबत बोलावं. अशावेळी आपल्या मित्र मैत्रिणींशिवाय कोणीच दुसरं सुचत नाही. आपल्या मित्रांसोबत बेडरूम सिक्रेट शेअर करणं अनेकदा फायदेशीरदेखील होऊ शकतं.

जसं की मोहिनीने तिच्या परफॉर्मन्सबाबत खूपच स्ट्रेसमध्ये होती. मात्र जेव्हा एके दिवशी बोलता बोलता तिने तिची मैत्रीण वर्षाला याबद्दल सांगितलं तेव्हा मोहिनीला समजलं की ती विनाकारण याबद्दल स्ट्रेस घेत होती.

मुली लग्नानंतर सेक्सशी संबंधित गोष्टी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करण्याबाबत कम्फर्टेबल असतात. परंतु आपले बेडरूममधील गुपितं आपल्या मैत्रिणींशी कोणत्या सीमेपर्यंत शेअर कराव्यात हे मात्र ठरवायला हवं. आपल्या बेडरूम सिक्रेट शेअर करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जर तुमच्या पतीनेदेखील तुमच्या बेडरूम लाईफबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल?

त्यामुळे प्रयत्न करा की जेवढं शेअर करायचं आहे ज्यामुळे तुमच्या पार्टनरची छबी वाईट होता कामा नये आणि ना ही त्यांचं हसू व्हावं.

या गोष्टी चुकूनही शेअर करू नका

सेक्शुअल फॅन्टसी : तुमच्या जोडीदाराची एखादी वाइल्ड सेक्शुअल फॅन्टीसी असू शकते. तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवूनच ही फॅन्टीसी तुमच्यासोबत शेअर करतो. परंतु जर तुम्ही या गोष्टी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर केल्या आणि जर ते पार्टनरला समजलं तर ते आयुष्यभर तुमच्यासमोर कधीच मोकळे होणार नाहीत. त्यांना नेहमी ही भीती लागून राहील की न जाणो तुम्ही कधी कोणासमोर या गोष्टी सांगून मोकळे व्हाल.

साईज डिस्कशन : तुमच्या जोडीदाराच्या पेनिसचा आकार डिस्कस करणं एक खूप वाईट गोष्ट आहे. थोडा विचार करून बघा जर तुमच्या जोडीदाराने तुमचे स्तन व एखाद्या दुसरा अंगाच्या आकाराचा उल्लेख त्यांच्या मित्रांसमोर केला तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या जोडीदाराचं असं डिस्कशन त्यांना तुमच्या मैत्रिणींमध्ये डिजायरेबलदेखील बनवू शकता. नंतर एखादी गोष्ट घडली तर तेव्हा ती पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे.

इरॅक्शन प्रॉब्लेम : जोडीदाराचे इरॅक्शन प्रॉब्लेम म्हणजेच नपूसंकता उघड करणे, खूपच संवेदनशील विषय आहे. जर तुम्हाला मदत हवी असेल तर मैत्रिणीऐवजी डॉक्टरांची मदत घ्या. अशा गोष्टी प्रत्येक मैत्रिणीसोबत डिस्कस करणे योग्य नाहीये. तुमचे फ्रेंड्स तुमच्या बेडरूम लाईफला पब्लिकदेखील करू शकतात आणि अशा गोष्टींचा फायदा काही चुकीची लोकं देखील घेऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकतं.

सेक्शुअली व्होकॅबुलरी आहे खूप वैयक्तिक : जोडीदाराचं सेक्शुअल व्होकॅबुलरी मैत्रिणीसमोर उघड करणं एक वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा, तुमचं बेडरूम लाईफ तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे खूप वैयक्तिक क्षण आहेत. त्यांना तुमच्या सर्व फ्रेंड्सना सांगत बसू नका. कदाचित तुम्ही तुमचं बेडरूम लाईफ डिस्कस करतेवेळी तुमच्या मैत्रिणीसमोर असं पिक्चर पेंट करता ज्या पेंटिंगचा त्या अनाहूतपणे एक भाग बनतात.

परंतु बेडरूम सिक्रेट्स शेअर केल्यामुळे नेहमीच नुकसान होतं असं काही नाहीये. जर तुम्ही विचारपूर्वक विश्वासाने मैत्रिणींसोबत तुमचे सिक्रेट्स शेअर केले तर या गोष्टींचे फायदेदेखील होऊ शकतात :

बेडरूम लाइफला स्पायसी बनविण्यात मदतनीस : अनेकदा मैत्रिणींसोबत बोलता बोलता तुम्हाला काही गोष्टींबद्दल समजतं जे तुमच्या बेडरूम लाईफला स्पायसी बनवू शकतं. कशा प्रकारची लॉन्जरी पार्टनरला आकर्षित करते वा कशा प्रकारचे परफ्युम बेडरूम लाईफला अधिक रोमांचक बनवितात. या सर्व गोष्टी आरामात तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत डिस्कस करू शकता.

फोरप्लेच्या नवीन पद्धती : फोरप्ले सेक्स ड्राईव्हला सर्वोत्तम बनवतं. याची कोणतीही सेट मेथड नसते. प्रत्येकाची फोरप्लेची पद्धत वेगवेगळी असते. ही माहिती तुम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकता. परंतु लक्षात ठेवा माहिती खूपच जनरल पद्धतीने शेयर करावी. याला स्पेसिफिक करू नका.

ऑरगॅझमशी ओळख : ऑरगॅझमवर फक्त पुरुषांचा हक्क नाही तर स्त्रियांचादेखील मौलिक अधिकार आहे. नवीन लग्नामध्ये अनेकदा स्त्रियांना याची अपुरी माहिती असते. जर तुमच्या मैत्रीणीने तुम्हाला एखाद्या खास पोझिनबद्दल सांगितलं ज्यामुळे ऑरगॅझम मिळतं, तर तुम्ही पुढच्यावेळी तशी पोजिशन घेऊन ऑरगॅझम मिळवू शकता.

कन्फ्युजनपासून मिळू शकते सुटका : अशी अनेक रहस्ये आहेत वा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच नॉर्मल असतात, परंतु नवीन लग्नामध्ये या खूप विचित्र वाटतात. पर्सनल हायजिनपासून सेक्स टॉइजपर्यंत सर्व कन्फ्युजन असतं. जे आपापसात बोलून सॉल्व करू शकता.

सेक्स लाईफची चांगली समज : सेक्स लाईफच्या चांगल्या समजूतीसाठी अनेकदा मैत्रिणींसोबत मोकळेपणाने बोलू शकता. परंतु दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. पहिली म्हणजे कोणत्याही मैफिलीत बसून तुमच्या सेक्स कथा सांगायला आरंभ करू नका. अन्यथा तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेक्सशी संबंधित गोष्टी शेअर करताना तुमच्या जोडीदाराचा उल्लेख करू नका.

पालक लव्ह मॅरेजसाठी तयार नाहीत का?

* गरिमा पंकज

लग्न एक सुंदर नातं आहे, जे प्रेम आणि विश्वासावरती टिकून असतं. जेव्हा दोन प्रेम करणारे जीव एकमेकांशी लग्न करतात तेव्हा आयुष्यातील सर्व रंग मिसळतात. आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याची अनुभूती वेगळीच असते. परंतु अनेकदा समाज, कुटुंब खासकरून नातेवाईक प्रेमाच्या बाबतीत थोडे कंजर्वेटिव्ह होतात. जिथे तरुणांना आपला जोडीदार निवडणं आणि प्रेमाच्या आकाशात उड्डाण करण्याची मुक्तता हवी असते, तिथे त्यांचे आई-वडील अनेकदा स्वत:ला समाज, परंपरा, जाती, धर्मासारख्या मापदंडामध्ये अडकलेले दिसतात आणि अगदी तिथेच खरी टक्कर सुरू होते. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की पालकांना या लग्नासाठी कसं तयार करायचं?

जर तुमचं मनापासून कोणावर प्रेम असेल आणि त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं असेल आणि तो देखील तुमच्यावर खूप प्रेम करत असेल परंतु तुमचे पालक या प्रेमाच्या विरुद्ध असतील आणि त्यांना वाटत नसेल की तुम्ही त्या मुलाशी लग्न करावं. पालकांना स्वत:च्या मर्जीने तुमचं लग्न करायचं आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? शांतपणे आपल्या स्वप्नांचा गळा घोटून पालकांचं म्हणणं ऐकणार की मग पालकांना सोडून त्या मुलासोबत स्वत:चा संसार थाटणार?

जसं की आम्हाला माहित आहे की आजच्या काळामध्ये मुली स्वत:ची स्वप्नं आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगू इच्छितात. अशा अनेक मुली आहेत ज्या स्वत:च्या आयुष्याचे मोठे निर्णय स्वत:च घेतात. जर त्यांना पालकांचं म्हणणं नाही पटलं तर त्याविरुद्ध आवाज उठवतात. अनेकदा अशा परिस्थितीत मुलींना आपल्या पालकांचे घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु काही झालं तरी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वत: होऊन पालकांना या लग्नाला तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा.

कोणत्या कारणांमुळे पालक तयार होत नाहीत

कुटुंब : लव मॅरेजसाठी नकार हा कुटुंबामुळे देखील होतो. मुलगी वा मुलाच्या कुटुंबांचा एखादा गुन्हेगारी रेकॉर्ड असेल किंवा मग त्यांना गुंडगिरीसाठी ओळखलं जात असेल तर प्रेमविवाहात अडचणी येऊ शकतात.

वेगळी जात आणि धर्म : भारतामध्ये लग्नपूर्वी जात आणि धर्म प्रथम पाहिला जातो. धर्माचे ठेकेदार आणि धर्म ग्रंथांनी लोकांच्या मनामध्ये वेगळा धर्म वा जातींविरुद्ध लोकांमध्ये कडवटपणा आणि वैमनस्यांची पाळंमुळं एवढी खोल रुजवली आहेत की अनेक लोकं एकमेकांचा राग करू लागलीत आणि शिवाशिवीच्या भिंती मजबुतीने एवढ्या उभ्या करण्यात आल्या आहेत की त्याची नुकसान भरपाई तरुण प्रेमींना भोगावी लागतेय.

समाजाची भीती : अनेक कुटुंबीयांसाठी स्वत:च्या मुलांचा आनंद सर्वाधिक असतो, म्हणून ते जात, धर्म आणि कुटुंबीयांच्या इतिहासाबद्दल जास्त विचार करत नाहीत. परंतु समाजाची भीती त्यांच्या मनामध्ये असते. सामाजिक बहिष्कार आणि बदनामीच्या भीतीने ते आपल्या मुलांच्या प्रेमविवाहाच्या आड येतात.

आर्थिक स्थिती : श्रीमंत कुटुंबातील मुलगा वा मुलगी स्वत:हून कमी पैशेवाल्या कुटुंबातील मुलगा वा मुलीशी प्रेम करतात तेव्हा देखील पालक त्यांच्या लव मॅरेजसाठी तयार होत नाहीत.

वयाचं अंतर : प्रेम विवाहात एक समस्या वयातील अंतरसुद्धा आहे. जर तुमच्या वयाचं अंतर प्रेम विवाह करणाऱ्यापेक्षा जास्त वा कमी असेल तरी देखील आई-वडील प्रेम विवाह करण्यास राजी होणं कठीण असतं.

पालकांना कसं कराल राजी

काही काळापूर्वी ‘टू स्टेट्स’ हा सिनेमा आला होता, जो चेतन भगतने लिहिलेल्या ‘टू स्टेट्स’ या कादंबरीवर आधारित होता. या सिनेमात हीच समस्या होती. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर दोन वेगळी राज्य, वेगळी संस्कृती आणि भाषा असणाऱ्या घरातील असतात. आलिया भट्ट साउथ इंडियन तर अर्जुन पंजाबी. दोघांना आपल्या पालकांना राजी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. परंतु शेवटी दोन्ही कुटुंबीय या नात्यांना होकार देतात. तुम्ही देखील प्रयत्न करा, कदाचित तुमचे पालकदेखील लग्नासाठी तयार होतील. परंतु यासाठी तुम्हाला प्रयत्न खूप करावे लागतील. तुमच्या आई-बाबांना प्रेम विवाहासाठी तयार करण्यास काही टिप्स आणि ट्रिक्स अशाप्रकारे आहेत :

तुमच्या नात्याबाबत आश्वस्थ व्हा

प्रेम विवाहसारख्या मोठ्या निर्णयाबाबत तुमच्या आई-वडिलांशी बोलण्यापूर्वी तुमच्या नात्यांबद्दल सुनिश्चित होणं खूपच गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराशी याबाबत चर्चा करा आणि विचारा की तुमच्या दोघांचं स्वत:चं नातं आणि लग्नबद्दल एकमत आहे का? जर तुमच्यापैकी कोणी कमिटमेंटला घाबरत असेल तर तुमच्या आई-वडिलांना तयार करण्याचे सर्वच प्रयत्न बेकार होऊ शकतात.

योग्य वेळ पाहून आई-वडिलांना सांगा

तुमच्या साथीदाराला तुमच्या घरी बोलावून आणि त्याला तुमचा खास मित्र म्हणून ओळख करून द्या. तुमच्या आई-वडिलांना प्रेमविवाहच्या तुमच्या विचारासाठी तयार करा. सणवार आणि खास प्रसंगी अनेकदा भेटल्यास मदत होते. छोट्या छोट्या भेटी तुमचे आई-बाबा आणि जोडीदाराला एकमेकांशी एकत्रित येण्यास वेळ देईल. ज्यामुळे असहजता दूर होईल. एकदा जर का ते एकमेकांसोबत मिसळले तर त्यांच्यामधील अडचण दूर करणं सहजसोपं होईल.

यशस्वी प्रेम विवाहतील उदाहरणं

जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तयार करू इच्छित असाल तर त्यांना यशस्वी प्रेमविवाहाची ताजी उदाहरणं दाखवा. तुमच्या ज्या मित्राने असं केलंय त्याच्याबद्दल सांगा. त्यांना समजवा की जेव्हा तुम्ही लग्नाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्यासाठी सर्वात जास्त काय महत्त्वाचं आहे जसं की त्याचा स्वभाव, उदारता, शिक्षण, योग्यता, अनुकूलता इत्यादी.

तुमची परिपक्कता सिद्ध करा

तुमच्या आई-वडिलांसाठी तुम्ही नेहमीच लहान मूल असणार, मग तुम्ही कितीही मोठे व्हा. त्यांना हे सिद्ध करून दाखवा की तुम्ही लहान नाही आहात आणि कुटुंबासाठी योग्य निर्णय आणि जबाबदारी घेऊ शकता. कौटुंबिक समस्यांमध्ये सहभागी व्हा. त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करा. जबाबदारी आणि समजूतदारपणे काम करा. असे निर्णय घ्या ज्यामुळे तुमची परीपक्कता सिद्ध होईल. यामुळे तुमचाच फायदा होईल आणि तुमच्या आई-बाबांना वाटेल की तुम्ही खूप परिपक्व आहात आणि तुमच्या आयुष्यासाठी चांगले निर्णय घेऊ शकता.

आईबाबांचं म्हणणं ऐका

जर तुम्हाला वाटत असेल की आई-बाबांनी तुमचं ऐकावं तर त्यांना देखील त्यांचे विचार मांडण्याची संधी द्या. त्यांचे विचार आणि चिंता ऐका. याबाबत घाई करू नका. त्यांना पूर्ण परिस्थिती समजण्यासाठी थोडा वेळ द्या आणि त्यांनी घातलेल्या अटींशी सहमत होण्याचा प्रयत्न करा.

जोडीदाराचे चांगले गुण सांगा

आई-वडिलांना तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी चांगलं होण्यामागची कारणं सांगा. नात्यांबाबत त्याची प्रामाणिकपणा आणि कमिटमेंटचा उल्लेख करा. जोडीदाराच्या चांगल्या गुणांबद्दल सांगत समजवा की तुम्ही आणि तुमचा जोडीदार हरप्रकारे एकमेकांसाठी अनुकूल का आहे, मग भलेही तुमची जात वा धर्म वेगळा असेल.

मित्र आणि नातेवाईकांची मदत घ्या

तुमच्या आईबाबांना प्रेमविवाहासाठी राजी करण्यास तुम्हाला एका अशा व्यक्तीच्या मदतीची गरज आहे जे त्यांना आवडतात आणि ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. हे तुमचे कुटुंबीय वा नातेवाईकांपैकी कोणीही एक असेल. तुमचा कोणी मित्रही असू शकतो, जो त्यांचा आवडता असेल वा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती ज्याचा ते खूप मान राखतात.

पालकांना समजवण्याचा प्रयत्न करा

ही लक्ष देण्याची आणि पाहण्याची वेळ आहे की तुमच्या आई-वडीलांपैकी कोण तुमच्याशी जास्त ओपन आणि फ्रेंडली आहे म्हणजे ते आई बाबा तुमच्यासाठी निवडलेल्या जोडीदारासोबत तुमच्या लग्नामध्ये मध्यस्थ होण्याची भूमिका साकारतील. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आई-बाबांपैकी एकाला तुमच्या प्रेमविवाहासाठी राजी करणं सोप आहे, तर त्या पालकावरती जास्त लक्ष द्या आणि त्यांना पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न करा.

दोन्ही कुटुंबांची भेट घडवा

तुम्ही दोन्ही कुटुंबांमध्ये भेट ठरवा आणि तुमच्या सासरच्यांना भेटणं, त्यांच्या परंपरा संस्कृती आणि मूल्यांबद्दल जाणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील परंपरा, कौटुंबिक पृष्ठभूमी आणि संस्कृतीसोबतच तुमच्या आई-बाबांबद्दल त्यांना समजवा.

पालकांवर दबाव टाका

पालकांवर दबाव टाकण्यासाठी तुम्ही तीन दिवस भुकेले राहू शकता. आपल्या मुलांनी भुकेलेलं पाहणं कोणत्याही पालकांसाठी सोपं नाहीये. अशा प्रकारे तुम्ही पेरेंट्सना बोलू शकता की या मुलाशी जर माझं लग्न झालं नाही तर मी कोणाशीच करणार नाही. तुम्ही पालकांशी बोलणं बंद करू शकता. तुम्ही घरातून बाहेर पडणं बंद करू शकता.

स्मार्ट किचन अप्लायन्सेस

– शोभा कटारे

नोकरदार महिलेला एकाचवेळी घर आणि कार्यालय दोन्ही सांभाळणं थोडं कठीण असतं. सर्व महिलांना त्यांचे स्वयंपाकघरातील काम लवकरात लवकर उरकून कामावर जायचं असतं आणि संध्याकाळी लवकरात लवकर जेवण बनवून थोडा आराम करायचा असतो.

जरी आजकाल प्रत्येकाच्या घरात फ्रीज, मिक्सर ग्राइंडर आणि मायक्रोवेव्ह यांसारख्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांचा वापरही केला जातो तरी आजकाल बाजारात अनेक स्मार्ट किचन अप्लायन्सेस म्हणजेच उपकरणेही उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून महिला त्यांचा वेळ वाचवू शकतात आणि ही उपकरणं वापरण्यासही खूप सोपी आहेत.

एग बॉयलर

आपण अनेकदा अंडी उकडण्यासाठी एखादे भांडे वापरतो. यामुळे एकतर अंडी उकडण्यास जास्त वेळ लागतो आणि दुसरे म्हणजे गॅस बराच काळ सुरू राहातो. पण, आता एग बॉयलरच्या मदतीने तुमचं काम सोपं झालं आहे. हे वापरण्यास देखील सोपं आहे. यामध्ये अंडी उकडली की नाही, हे सतत पाहाण्याची गरज नाही. अंडी उकडल्यावर हे उपकरण आपोआप बंद होते.

फायदे

* ऑटोशट ऑफ (आपोआप बंद होणे) हा याचे वैशिष्ट्य आहे.

* हलके असते.

* टाइमर असतो.

* तुम्ही डिशवॉशरमध्ये इलेक्ट्रिक नसलेले भाग ठेवू शकता.

व्हेजिटेबल चॉपर

भाजी चिरण्यात बराच वेळ वाया जातो आणि स्वयंपाकघरदेखील अस्वच्छ होते. अशावेळी, जर तुम्ही ‘फाईव्ह इन वन’ व्हेजिटेबल चॉपरचा वापर केला तर तुमचं काम खूप सोपं होईल. यात भाज्या सहज कापल्या जातात. त्यासाठी तुम्हाला हव्या त्या आकाराचे ब्लेड तुम्ही वापरू शकता. तुम्ही व्हेजिटेबल चॉपरचे ब्लेड काही सेकंदात बदलू शकता. हे उपकरण स्वयंपाकघराला खूप अस्वच्छ होण्यापासूनही वाचवते.

इलेक्ट्रिक स्किलेट

जेव्हा अन्न शिजवल्यानंतर ते थंड होते तेव्हा ते पुन्हा गरम करणे खूप कठीण होते. अशावेळी इलेक्ट्रिक स्किलेट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. याच्या मदतीने अन्न लगेच गरम होईल. स्वयंपाक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते बेक आणि तळण्यासाठीदेखील वापरू शकता, याशिवाय ते गरम भांडे म्हणून देखील वापरले जाऊ शकते. हे नॉनस्टिक आहे आणि ऑटोमॅटिक हिट कंट्रोल म्हणजेच स्वयंचलितपणे उष्णता नियंत्रित करू शकते.

फायदे

* नॉनस्टिक आहे.

* स्वयंचलित उष्णता नियंत्रण.

* ऊर्जा बचतकर्ता.

* डिशवॉशर प्रूफ.

* इलेक्ट्रिक किटली

जर तुम्हाला सकाळी कामावर जायला उशीर झाला तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिक किटली खूप उपयोगी ठरू शकते, ती तुमचा सकाळचा चहा किंवा कॉफी काही सेकंदात बनवू शकते, ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल. हा वेळ तुम्ही इतर घरगुती कामांसाठी वापरू शकता. मायक्रोवेव्ह किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हपेक्षा इलेक्ट्रिक किटली हा वेळ वाचवणारा एक चांगला पर्याय आहे.

व्हॅक्यूम सीलर

व्हॅक्यूम सीलिंग वापरून तुम्ही अन्न दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता. यामुळे अन्न खराब होत नाही. व्हॅक्यूम सीलरच्या सेटिंग्जबद्दल बोलायचे झाल्यास, यात २ सीलिंग मोड आहेत. पहिले कोरड्या अन्नासाठी आणि दुसरे ओलसर अन्नासाठी. ते आकाराने लहान आहे आणि कोणत्याही स्वयंपाकघरात सहज बसते, शिवाय ते वजनाने अतिशय हलके आणि कॉम्पॅक्ट आहे.

फायदे

* हे हलके आणि कॉम्पॅक्ट आहे.

* यात एलईडी सूचक चिन्ह असते.

* पुन्हा वापरता येण्यायोग्य आणि जलरोधक पिशव्या असतात.

* ऊर्जा बचतकर्ता.

* वन बटण स्वयंचलित फूड सीलर आहे.

राईस कुकर

इलेक्ट्रिक राईस कुकर हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तो नोकरदार महिलांसाठी वेळेची बचत म्हणून काम करतो. याद्वारे दररोज स्वादिष्ट अन्न तयार करता येते. फक्त आधी पूर्वतयारी करा. त्यांनतर कुकरमध्ये पुरेसे पाणी आणि तांदूळ घाला. तुमच्या रेसिपीनुसार टाइमर सेट करा. तुम्ही इतर घरगुती कामं करत असतानाच राईस कुकरला त्याचे काम करू द्या. राईस कुकर भात उत्तम प्रकारे शिजवतो, सोबतच भात गरमही ठेवतो. भात शिजवण्याव्यतिरिक्त, तो सूप, भाज्या इत्यादींसाठीही वापरता येतो.

कोल्ड प्रेस ज्यूसर

तुमच्या कुटुंबाला ताजा ज्यूस देण्यासाठी तुम्ही कोल्ड प्रेस ज्युसर वापरू शकता. यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच, सोबतच तुम्ही तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला पोषक पेय देऊ शकाल. कोल्ड प्रेस ज्यूसर फळाची नैसर्गिक चव आणि त्यातील आवश्यक पोषक घटक टिकवून ठेवतो.

काय आहे आनंदी राहाण्याचे सूत्र

* कुसुम अग्रवाल

काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मी चविष्ट पदार्थ बनवले, त्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पार्कमध्ये फिरायला गेलो, काही वेळ फिरलो, घरी परतल्यानंतर फोनवर गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो तेव्हा अचानक माझ्या पतीने सांगितले की, आजकाल तो जराही आनंदी नाही. त्याचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मला वाटले की किमान आज तरी त्याने असे म्हणायला नको होते, कारण आजचा दिवस खूप खास होता.

मी विचार करू लागले की, तो असं का म्हणाला? यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. मी त्याला विचारत राहिले, पण प्रत्येकवेळी मला एकच उत्तर मिळालं की त्याला कोणत्याही प्रकारची समस्या नाही पण तरीही तो आनंदी नाही. मग मी स्वत:ला विचारले, मी आनंदी आहे का? माझ्या मनाने उत्तर दिले की नाही, कदाचित तूही आनंदी नसशील. तेव्हा मला प्रश्न पडला की, असे का आहे? आम्ही दोघेही सर्व सुखसोयींसह आरामदायी जीवन जगत आहोत, तरी अजूनही आम्ही आनंदी का नाही?

ही गोष्ट मला अस्वस्थ करू लागली. मी जीवनाबद्दलच्या चिंतनाशी संबंधित सर्व पुस्तके चाळली. दु:खाचे कारण आणि आनंद मिळवण्याचा एखादा मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटवरील सर्व साइट्स शोधल्या. अनेक तथाकथित संत-महात्म्यांचा सल्लाही घेतला, पण कुठूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. निराश होऊन मी माझ्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना माझ्या समस्या सांगून विचारले की, हा एखादा मानसिक आजार आहे का? जर तसे असेल तर कृपया मला लवकरात लवकर त्यावरील उपचार सांगा.

कोणताही रोग नाही

डॉक्टर हसले आणि म्हणाले की, हा आजार असू किंवा नसूही शकतो, पण त्याचा उपचार तुमच्याच हातात आहे, कारण एखादी व्यक्ती आनंदी आहे की नाही हे आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ४ हार्मोन्सवर अवलंबून असते. जर तुमचे शरीर योग्य प्रमाणात हे चार हार्मोन्स तयार करत असेल तर तुम्ही नेहमीच आनंदी राहू शकता.

पहिले हार्मोन एंडोर्फिन आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा एंडोर्फिन नावाचे हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे आपण व्यायामामुळे होणारा त्रास आणि ताण सहन करू शकतो. याच हार्मोनमुळे व्यायामामुळे होणाऱ्या वेदना किंवा त्रासाऐवजी आनंदाची, प्रसन्नतेची अनुभूती घेता येते.

दुसरे संप्रेरक म्हणजे डोपामाइन, हे संप्रेरक एखादे कार्य पूर्ण केल्याच्या समाधानातून बाहेर पडते. आपल्या आयुष्याच्या दीर्घ प्रवासात, आपण अनेक गोष्टी करतो आणि त्यापैकी अनेक गोष्टी आपल्याला अपार आनंद देतात, विशेषत: जेव्हा त्या कामांचे कौतुक केले जाते. अशा परिस्थितीत डोपामाइन नावाचे हार्मोन वेगाने बाहेर पडते आणि आपण खूप आनंदी राहातो.

खरेदीला जा आनंदी राहा

गृहिणींना त्यांच्या घरकामाबद्दल असंतोष असण्याचे एक कारण म्हणजे त्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी कोणतेही प्रोत्साहन किंवा कौतुक मिळत नाही, फक्त त्यांच्या कामावर टीका केली जाते. त्यामुळे त्या कामाबद्दल उदासीन होतात. त्यासाठीच, आपण त्यांच्या छोट्या छोट्या कामांचेही कौतुक करत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण कोणतेही नवीन काम सुरू करतो किंवा नवीन गाडी, नवीन घर, नवीन कपडे, नवीन उपकरणे इत्यादी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन हार्मोनदेखील तयार होते, परिणामी आपल्याला आनंद मिळतो. म्हणूनच जे लोक जास्त खरेदी करतात ते जास्त आनंदी असतात.

तिसरे संप्रेरक म्हणजे सेरोटोनिन. कोणतेही चांगले काम केल्याने, एखाद्याला मदत केल्याने, एखाद्याचे भले केल्याने किंवा एखाद्यावर उपकार केल्याने हे संप्रेरक बाहेर टाकले जाते.

जर आपण निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न केला, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जसे की, झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे किंवा समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी केले तरी देखील हे संप्रेरक बाहेर पडते. एवढेच नाही तर चांगले लेखन करणे, इंटरनेटवर ब्लॉग लिहिणे, एखाद्याला काही खास बातम्या देणे, एखाद्याला वाचन आणि लेखनात मदत करणे यातूनही हे हार्मोन बाहेर पडते.

आनंदाची कारणं

शब्दकोडी सोडवणे, फेसबुक ग्रुपमध्ये गप्पा मारणे आणि आपले ज्ञान इतरांसोबत वाटून घेणे, यामुळेदेखील हे हार्मोन बाहेर पडते, कारण हे सर्व केल्यानंतर आपल्याला असे वाटते की, आपण आपला मौल्यवान वेळ इतरांच्या भल्यासाठी वापरला आहे. त्यामुळे आपल्याला आत्यंतिक आनंद मिळतो, म्हणजे इतरांचे भले करा आपलेही भले होईल.

चौथा आणि शेवटचे संप्रेरक म्हणजे ऑक्सिटोसिन, हे संप्रेरक एखाद्याच्या जवळ राहिल्याने, एखाद्याच्या सहवासात राहिल्याने, मैत्री केल्याने किंवा एखाद्यावर प्रेम केल्याने निर्माण होते. जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो किंवा आलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन बाहेर पडते. कदाचित आनंद एखाद्याला मिठी मारण्याने, हस्तांदोलन केल्याने किंवा चुंबन घेण्याने मिळतो. दुसऱ्याच्या हातावर हात ठेवल्यानेही ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडते.

छोटे छोटे उपाय करा

एंडोर्फिन हार्मोन मिळविण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करावा लागतो. डोपामाइन हार्मोन मिळविण्यासाठी जीवनात छोटी ध्येये ठेवावी लागतात आणि ती पूर्ण करावी लागतात. सेरोटोनिन हे हार्मोन मिळविण्यासाठी इतरांशी चांगले वागावे लागते आणि ऑक्सिटोसिन हार्मोनसाठी वारंवार जादूची मिठी किंवा आलिंगन द्यावे लागते. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आलिंगन द्यायला आणि हस्तांदोलन करायला विसरू नका.

हे छोटे छोटे उपाय इतका आनंद देतील की, त्यामुळे आपण कधीही आनंदी नसल्याची तक्रार करणार नाही. त्यांच्यामुळेच आपण जीवनातील सर्वात मोठी आव्हाने स्वीकारू शकू आणि आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा सहजपणे सामना करू शकू. लक्षात ठेवा, जर लहान मुले उदास असतील तर त्यांना प्रेमाने आलिंगन द्या, तुमच्या जवळ बसवा. ती लगेच आनंदी होतील.

आपण आपल्या मुलांना आनंदी राहाण्याची कला देखील शिकवली पाहिजे. त्यासाठी, त्यांना त्यांच्या मित्रांसोबत खेळण्यास प्रोत्साहित करा. त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कामांसाठी त्यांचे कौतुक करा आणि त्यांना काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करत राहा. म्हणजे, जर त्यांनी त्यांच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले असतील तर त्यांना एखादे बक्षीस द्या किंवा त्यांची प्रशंसा करा.

वाटून घेण्याची सवय लावा

तुमच्या मुलांना गोष्टी इतरांसोबत वाटून घेण्याची सवय लावा. मग ते त्यांच्या अभ्यासाशी संबंधित गोष्टी असोत किंवा खाण्याच्या वस्तू असोत किंवा खेळाच्या वस्तू असोत, यामुळे त्यांना अपार आनंद मिळेल.

मुलांना त्यांच्या मित्रांना आलिंगन द्यायला, हस्तांदोलन करायला शिकवा तुम्ही मुलांना प्रेमाने उचलून घेऊन, त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे कौतुक करायला वगैरे काही हरकत नाही.

हो, आणखी एक गोष्ट, हे हार्मोन्स मिळवण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. जसे की, अमली पदार्थांचे सेवन करणे, मोबाईल गेम खेळणे, फेसबुकवर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करणे, इतरांबद्दल वाईट बोलणे, भांडण, एखाद्याशी वाद घालणे, विचित्र व्हिडीओ पाहाणे इत्यादी. परंतु आपण आनंदी राहाण्याच्या या चुकीच्या मार्गांपासून दूर राहिले पाहिजे आणि निरोगी मार्गांनी आनंदी राहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

गुन्हा आहे लैंगिक छळ

* मिनी सिंह

दिल्लीची रहिवासी स्मिता (नाव बदलले आहे) सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तिने १५ वर्षे काम केले. ती ज्या शेवटच्या कंपनीत काम करत होती, तिथे तिचा साहेब अनेकदा तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. कधी तो तिच्या केसांचे, कधी तिच्या कमनीय बांध्याचे तर कधी तिच्या स्मितहास्याचे कौतुक करायचा. तिला या सगळ्याचा कंटाळा आला होता. तिच्या साहेबाच्या वाईट स्पर्शाने तिला खूप त्रास व्हायचा, पण ती काहीही बोलू शकत नव्हती. एके दिवशी, कार्यालयीन वेळेत, स्मिताच्या साहेबाने तिला मीटिंगच्या बहाण्याने मीटिंग रूममध्ये बोलावले. स्मिताला वाटले की, तिथे इतरही लोक असतील, पण त्या दोघांशिवाय तिथे कोणीही नव्हते. जेव्हा स्मिता तिथून बाहेर जाऊ लागली तेव्हा तिच्या साहेबाने तिला थांबवले आणि तिच्याशी गैरवर्तन केले, ज्यामुळे ती खूप घाबरली. अखेर तिने ती नोकरी सोडली आणि आपली कारकिर्द कायमची संपवली.

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ‘ओटीटी’ फेम उर्फी जावेदने एका कास्टिंग डायरेक्टरवर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला. उर्फी सांगते की, म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याच्या बदल्यात तिला वाईट काम करण्यास सांगितले गेले होते, याबद्दल उर्फीने तिच्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट देखील टाकले आहेत.

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ओबेद आफ्रिदी नावाच्या कास्टिंग डायरेक्टरने तिला आणि इतर मुलींना मोठी स्वप्ने दाखवली आणि त्यांना त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. उर्फी सांगते की, मुलींवर लैंगिक अत्याचार करणे हा गुन्हा आहे.

वाईट नजरांचा सामना

सुमन एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिने तिच्या कठोर परिश्रमाने ही नोकरी मिळवली, पण आता तिला वाटते की, हे काम तिच्यासाठी योग्य नाही, कारण तिचा साहेब तिच्याकडे विचित्र नजरेने पाहातो. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तो काहीतरी निमित्त करून सतत तिला केबिनमध्ये बोलावतो आणि तासनतास तिथे बसवून ठेवतो.

तो तिच्या कमनीय बांध्यावर अश्लील टिपणी करतो आणि तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी मागतो. तो सांगतो की, जर तिने त्याच्या मागण्या मान्य केल्या तर ती चांगल्या पदावर जाईल, म्हणजेच तिला लवकरच पदोन्नती मिळेल. पण, साहेबाला वाटते तशी मुलगी सुमन नाही. तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिच्या आई-वडिलांची स्वप्नेही तिच्या स्वप्नांशी जोडलेली आहेत. सुमन मनातल्या मनात विचार करून रडू लागते की, ती ही नोकरी सोडू शकत नाही आणि करूही शकत नाही, मग तिने काय करावे? साहेबाच्या घाणेरड्या नजरेमुळे, सुमनने सैल कपडे घालायला सुरुवात केली. तिच्या साहेबाची नजर तिच्या स्तनांवर पडू नये म्हणून तिने ओढणी घ्यायला सुरुवात केली, पण जर एखाद्या व्यक्तीची नजरच घाणेरडी असेल तर सैल कपडे घालून तरी काय उपयोग? ती तिच्या साहेबाविरुद्ध पोलीस तक्रारही करू शकत नाही, कारण तिला बदनामीची भीती आहे. सुमन सध्या मानसिक तणावातून जात आहे.

मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता सांगतात की, लैंगिक शोषण मुलीचे असो किंवा मुलाचे, त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर निश्चितच होतो. लैंगिक छळाचा बळी ठरणारी व्यक्ती एकाकीपणा, चिंता आणि नैराश्यग्रस्त होऊ लागते. तिला कार्यालयात जायची भीती वाटू लागते. काम करण्याची इच्छा होत नाही. कारकीर्द घडवण्याची इच्छा संपते. तिला काहीही आवडेनासे होते.

विशेषत: नोकरी करणाऱ्या महिलांना घरातून कार्यालयात जाताना प्रत्येक पावलावर समस्यांना तोंड देत जावे लागते, त्यानंतर जेव्हा तिला कार्यालयातील तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि साहेबाविरुद्ध देखील त्याच समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा ती गळून पडते.

सुमन आणि स्मितासारख्या मुलींना कमीत कमी हे माहीत असते की, त्यांचा लैंगिक छळ होत आहे, पण बऱ्याच मुली आणि महिलांना लैंगिक छळ म्हणजे काय, हे देखील माहीत नसते. फक्त स्पर्श केला किंवा अश्लील शब्द अथवा हावभाव केले तर तो देखील लैंगिक छळ होतो का?

कार्यालयात लैंगिक छळ

* कामाच्या ठिकाणी लैंगिक गप्पा मारणे.

* महिलेच्या कमरेवर भाष्य करणे.

* महिलेच्या कमनीय बांध्यावर भाष्य करणे.

* तिच्या केसांना किंवा कपड्यांना स्पर्श करणे.

* बाबू, राणी, सोना अशा शब्दांनी तिला संबोधित करणे.

कार्यालयात काम करणाऱ्या ५० टक्के महिला लैंगिक छळाच्या बळी ठरतात, लैंगिक छळाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला गेला आहे. कुटुंबात, परिसरात, सार्वजनिक वाहतुकीत किंवा कार्यालयात टक लावून पाहाणे, अश्लील टिप्पण्या, अश्लील बोलणे आणि अनुचित स्पर्श, यांचा महिलांना सामना करावा लागतो.

मोठी किंमत मोजावी लागते

आज शिक्षणाने महिलांसाठी विकास आणि समानतेचा मार्ग मोकळा केला आहे, परंतु अनेक वेळा त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते आणि हे कोणापासूनही लपलेले नाही. अशा अनेक महिला आहेत, ज्या इच्छा असूनही त्यांचे लैंगिक शोषण थांबवू शकत नाहीत.

एका अहवालानुसार, देशातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये ३१ टक्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजही ५० टक्के महिला सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे लैंगिक शोषणाबद्दल तक्रार करण्याचे धाडस करू शकत नाहीत.

एका तथ्यानुसार, जगातील १४१ देशांमध्ये लैंगिक छळाविरुद्ध कायदे असूनही, जागतिक स्तरावर अशा छळाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या ३८ टक्के आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते?

इतकेच नाही तर शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मुली आणि तरुणी सुरक्षित नाहीत. तिथेही आपण दररोज त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या शोषणाच्या बातम्या ऐकतो आणि वाचतो. आज शरीर विकासाची शिडी बनत चालले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मुली आणि महिलांचे व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.

अपमानास्पद वागणूक

आज जेव्हा लोकांना न्याय देणाऱ्या महिला न्यायाधीशच स्वत:साठी सर्वोच्च न्यायालयात इच्छामरणाची मागणी करत आहेत, तर मग अशावेळी सर्वसामान्य महिलांना न्याय कोण देऊ शकेल? एका महिला न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून इच्छामरणाची विनंती केली आहे. या महिला न्यायाधीशांचे म्हणणे आहे की, त्यांना खूप अपमानास्पद वागणूक मिळाली आहे आणि त्यामुळे त्या खूप दुखावल्या असून त्यांना मरायचे आहे. त्यांना तसे करण्याची परवानगी मिळावी.

महिला न्यायाधीशांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, मी भारतात राहाणाऱ्या महिलांना सांगू इच्छिते की, त्यांनी लैंगिक छळासह जगायला शिका. हेच आपल्या जीवनाचे सत्य आहे. लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा (पॉस कायदा) हे आपल्याशी बोलले गेलेले एक मोठे खोटे आहे. कोणीही आपले ऐकत नाही. कोणालाच आपली पर्वा नाही. जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला आणखी त्रास दिला जातो.

जर एखाद्या महिलेला वाटत असेल की ती व्यवस्थेविरुद्ध लढेल तर मी तुम्हाला सांगते की, तुम्ही असे करू शकत नाही. त्यांनी पुढे लिहिले-मी एक न्यायाधीश आहे, मी स्वत:साठी निष्पक्ष चौकशी करू शकले नाही. जर मला न्यायासाठी फक्त ८ सेकंद मिळाली तर मग व्यवस्थेशी लढण्याचा विचार करणारी सर्वसामान्य महिला कशी लढू शकणार? न्यायाधीश म्हणून मला हेच वाटते. महिला न्यायाधीशांनी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान सांगितले की, हे प्रकरण सप्टेंबर २०२२ चे आहे. छळ झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयापासून सर्व विभागांना पत्र लिहिले, एक हजाराहून अधिक ईमेल पाठवले, त्यानंतर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तपास ३ महिन्यांत पूर्ण व्हायला हवा होता, पण आतापर्यंत काहीही झालेले नाही. सुनावणी झालेली नाही आणि कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही.

हे दुर्दैवी आहे

गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ न्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप होत आहेत. समाजात त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते, पण जर त्यांच्यावरच असे आरोप होत असतील तर मग आता न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?

याच प्रकरणी मध्य प्रदेशातील एका न्यायाधीशाकडे बोट दाखवण्यात आले. राज्यसभेच्या अध्यक्षांनी चौकशी समिती स्थापन केली. न्यायाधीश निर्दोष आढळले, भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांकडेही बोट दाखवण्यात आले, एक समिती स्थापन करण्यात आली, ते देखील निर्दोष आढळले, एका अमेरिकन महिला संसद सदस्याने सभागृहात दोन खासदारांवर बलात्काराचा आरोप केला, पोलीस प्रशासनावरही निष्क्रियतेचा आरोप झाला. एका युरोपियन खासदारासोबतही असेच घडले.

सुसंस्कृत समाजात महिलांसोबत असे लैंगिक गैरवर्तन दुर्दैवी आहे. यावर सरकारे गप्प आहेत. महिलांचे अस्तित्व नाही का? त्या या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांना समानतेने आणि आदराने जगण्याचा अधिकार नाही का? आज देशाची अर्धी लोकसंख्या अनाथ झाली आहे, कारण सरकार गप्प आहे. जेव्हा पालक स्वत:च त्यांच्या मुलांसाठी गप्प बसतात, तेव्हा मुले नक्कीच अनाथ होतील, बरोबर ना? जेव्हा देशातील एका महिला न्यायाधीशाचे दुसऱ्या न्यायाधीशाकडून शोषण होते, ती न्याय मागते आणि तरीही तिला न्याय मिळत नाही, अखेर ती इच्छामरणाची मागणी करते. अशा सरकारचा, प्रशासनाचा आणि अशा न्यायाधीशांचा धिक्कार असो.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचा आरोप केला. बराच काळ त्यांनी रस्त्यावर निदर्शनेही केली, पण काय साध्य झाले? याआधीही लैंगिक छळाविरुद्धची मीटू मोहीम पूर्ण ताकदीने राबवण्यात आली, पण तिथेही हे प्रकरण थंडावले.

समस्या जशीच्या तशी आहे

लैंगिक शोषण नेहमीच दुर्बलांना लक्ष्य करते. यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि नेते सहभागी असतात. जेव्हा प्रकरण उघडकीस येते तेव्हा तपास समित्यादेखील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून उच्चपदस्थ लोकांची प्रतिष्ठा वाचवता येईल. अशा तपास समित्या न्याय देत नाहीत तर अन्याय करतात. जर उच्च न्यायालयाने न्याय दिला असता तर महिला न्यायाधीशांना इच्छामरणासाठी अपील करावे लागले नसते. समस्या तशीच आहे. आपण लोकशाही स्वीकारली असली तरी महिला अजून तरी सुरक्षित आहेत का? लोकशाहीचे तिन्ही स्तंभ लैंगिक शोषणाचे बळी ठरले आहेत; पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटना आता मोजण्यापलीकडे गेल्या आहेत.

पुरूष कितीही शिक्षित असले किंवा कितीही उच्च पदावर असले तरी, त्यांच्या आनंदाची व्याख्या महिलांच्या शरीरावर अवलंबून असते. काहीही करून त्यांना ती हवी असते. ती तयार नसली तरी तिला मिळवण्याचा हट्ट असतो. तिला खायला-प्यायला द्यायला, जाळून किंवा कापून मारून टाकायलाही ते तयार असतात, कारण कोणत्याही किमतीत त्यांना तिचे शरीर हवे असते. आज महिला स्वत:च्या घरातही सुरक्षित नाहीत.

कायदा नाही, प्रयत्न देखील नाही

लैंगिक गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी अनेक कायदे आणि संस्था स्थापन करण्यात आल्या. मुलांवरील गुन्हे आणि महिलांवरील गुन्ह्यांसाठी अनेक विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली. पोर्नोग्राफी कायद्याने प्रतिबंधित आहे. सिनेमात ती दाखवता येत नाही तरीही, ब्लू फिल्म्स यू ट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर २४ तास कोणत्याही अडथळ्याशिवाय हे सर्व मोफत उपलब्ध आहे. शाळा, महाविद्यालये आणि कामाच्या ठिकाणी, व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे साधन बनले आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, जिथे कोणाचाही व्हिडीओ कधीही बनवला जाऊ शकतो आणि व्हायरल केला जाऊ शकतो. हे थांबवण्यासाठी कोणताही कायदा किंवा कोणतेही प्रयत्न नाहीत.

जरा विचार करा, जर महिला न्यायाधीशाची सुनावणी होऊ शकत नाही तर इतर कामकाजी महिलांचे कोण ऐकणार? अखेर, किती महिला इच्छामरणासाठी सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार?

नोकरी गमावण्याची भीती

एचआर कन्सल्टंट नेहा अरोरा यांच्या मते, प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. कंपनीला प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला पीओएसएच धोरणाची माहिती देणे गरजेचे असते. याशिवाय, मानव संसाधन विभाग हा कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला याबद्दल ईमेल करतो आणि लैंगिक छळाच्या कक्षेत काय येते, त्याबद्दल तक्रार कशी करावी, यावर ऑनलाइन अभ्यासक्रम आयोजित करतो, जेणेकरून पुरुषांसोबतच महिलांनाही याबद्दल माहिती मिळेल. दरवर्षी या उद्देशाने कार्यशाळा, चर्चासत्रे आणि अभ्यासक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा सहभाग अनिवार्य असतो. याशिवाय, ही माहिती कंपनीच्या सूचना फलकावर दिली जाते. नेहा सांगतात, त्या गेल्या १० वर्षांपासून या क्षेत्रात आहेत, पण कोणत्याही महिलेने त्यांच्याकडे याबद्दल कधीही तक्रार केली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एखाद्या महिला कर्मचाऱ्याने तक्रार केली तरी बळी तिचाच जातो.

जर एखाद्या महिलेशी कार्यालयात गैरवर्तन केले गेले आणि तिने तक्रार केली तर तिचे कुटुंबीय तिला ती नोकरी पुढे करू देत नाहीत. जर ही बाब कार्यालयात उघड झाली तर सर्वांना तिच्या चारित्र्यावर शंका येते, म्हणजेच महिलांना कोणत्याही परिस्थितीत नोकरी सोडावी लागते. असे निदर्शनास आले आहे की, अशा प्रकरणांमध्ये पुरुष कधीही नोकरी सोडत नाहीत.

बँकिंग क्षेत्रातही महिला असुरक्षित

२०२२ या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली. कंप्लीकरोडॉटकॉमच्या सर्वेक्षणानुसार, एचडीएफसी बँकेतून २०२२ मध्ये लैंगिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी (५१) आल्या तर यापूर्वी ४६ प्रकरणे नोंदवली गेली होती. विप्रोमध्ये ४३ आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ४५ प्रकरणे नोंदवली गेली.

ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशनने दक्षिण भारतातील १०० हून अधिक कार्यालयांमधील अंतर्गत तक्रार समित्यांची माहिती गोळा केली. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ५१ टक्के कार्यालयांमध्ये समिती स्थापन झाली नव्हती. ३० कार्यालयांच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, अशी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे हे त्यांना माहीत नव्हते. या सर्वेक्षणात, खासगी रुग्णालये, दागिन्यांची दुकाने, शाळा, महाविद्यालये, शोरूम, बँका, पोस्ट कार्यालये, सार्वजनिक ग्रंथालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये विशाखा मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणतीही समिती आढळली नाही. केवळ २७ टक्के कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली होती.

भारतीय समाजात मुलींना नेहमीच मुलांपेक्षा कमकुवत मानले जाते. त्या गरीब, कमकुवत आहेत आणि पुरुषांसाठी फक्त एक उपभोगाची वस्तू आहेत, ही महिलांबद्दलची विचारसरणी कार्यालयांमध्येही प्रचलित आहे आणि म्हणूनच त्या लैंगिक छळाच्या बळी ठरत आहेत.

घर बदलण्याचे मार्गदर्शन: नवीन घरात स्थलांतरण सुरळीत कसे करावे?

* नसीम अन्सारी कोचर

घर बदलण्याचे मार्गदर्शन : घर बदलणे हे नेहमीच थोडे थकवणारे असते, परंतु योग्य तयारीने ते खूप सोपे आणि तणावमुक्त काम होऊ शकते. चला आम्ही समजावून सांगतो.

जेव्हापासून रागिणीचा नवरा, सिद्धार्थने, तिला फोन करून सांगितले की त्यांना नैनितालमध्ये एक नवीन घर सापडले आहे आणि त्यांनी स्थलांतरणाची तयारी सुरू करावी, तेव्हापासून रागिणी खूप आनंदी आहे, पण थोडी चिंतीतही आहे. ती नोएडातील तिच्या सासरच्या घरी २२ वर्षांहून अधिक काळ राहत आहे. या २२ वर्षांत, तिने घरासाठी अनेक वस्तू खरेदी केल्या आहेत. तिच्या सासूने घर आधीच भरले होते आणि रागिणीने स्वतः हुंडा म्हणून खूप सामान आणले होते. तिने माहेरून आणलेल्या बऱ्याचशा वस्तू तशाच पडून आहेत. पलंगाच्या खोक्यांमध्ये तेच सामान भरलेले आहे. पण बाजारात काही नवीन आले की लगेच ते विकत घेतले जाते. सिद्धार्थलाही खरेदी करायला खूप आवडते आणि त्याच्या दोन्ही मुलांना सतत नवीन वस्तू हव्या असतात.

सासू-सासऱ्यांच्या मृत्यूनंतर रागिणीचे दोन्ही मुलगे बोर्डिंग स्कूलमध्ये गेले आहेत, पण त्यांच्या खोल्या त्यांच्या सामानाने भरलेल्या आहेत. रागिणीने त्यांची लहानपणीची खेळणीसुद्धा जपून ठेवली आहेत. आता नैनितालमधील तिच्या नवीन घरात, काय घेऊन जावे आणि काय मागे सोडावे, हे रागिणीला सुचत नाहीये. मागे सोडण्याचा विचार करताच तिला जुन्या आठवणी येतात, भावना उचंबळून येतात आणि मग तिचा मूड बदलतो.

सिद्धार्थने तिला सर्व अनावश्यक वस्तू काढून भंगारवाल्याला विकण्याचा सल्ला दिला आहे, पण रागिणीला कोणतीही गोष्ट अनावश्यक वाटत नाही. मग तिने काय बाहेर काढावे? तिने कधीच न घातलेल्या साड्या काढून कपाट थोडे हलके करावे असे तिला वाटले. पण जेव्हा साड्यांचा ढीग समोर आला, तेव्हा तिला वाटले, “मी या साड्या कधीच घातल्या नसल्या किंवा क्वचितच घातल्या असल्या तरी, एवढ्या महागड्या साड्या मी मोलकरणीला कशा देऊ? नैनितालला गेल्यावर त्यांचे सूट शिवून घेणेच बरे. त्या खूप जड आणि सुंदर आहेत. अम्माच्या साड्या खूप सुंदर असतात. भरतकाम करून त्यांचे जड सूट बनवता येतील. तिच्या मुलांच्या आणि नातेवाईकांच्या मुलामुलींच्या लग्नात हे जड सूट उपयोगी पडतील.” असा विचार करून रागिणीने सगळ्या साड्या परत कपाटात ठेवल्या. भंगारवाल्याला विकण्यासाठी ती स्वयंपाकघरातून फक्त काही खिळखिळी ॲल्युमिनियम आणि तांब्याची भांडी, प्लास्टिकच्या बाटल्या आणि बरण्याच काढू शकली.

दोन आठवड्यांनंतर, जेव्हा सिद्धार्थ घराच्या नोंदणीनंतर नैनितालहून परत आला, तेव्हा रागिणीचे शब्द ऐकून त्याला धक्काच बसला. रागिणी सगळं सामान नैनितालला घेऊन जाण्याचा आग्रह करत होती. फेकून देण्यासारखं काहीच नव्हतं.

“ते घर ह्या घरापेक्षा लहान आहे. हे चार ट्रक भरून सामान तिथे बसणार नाही. तिथे राहायला जाण्यापूर्वी आपल्याला अर्ध्याहून अधिक सामान काढावं लागेल,” सिद्धार्थ रागाने म्हणाला.

“काय फेकून द्यावं हेच मला कळत नाहीये. सगळंच मौल्यवान आहे. तुला जे योग्य वाटेल ते फेकून दे.” असं म्हणून रागिणी रागाने उठून स्वयंपाकघरात गेली.

अखेरीस, सिद्धार्थने यादी बनवायला सुरुवात केली. त्याने नवीन आणि मजबूत वस्तू वेगळ्या केल्या. त्याने जुने पलंग, कपाटं, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कार्पेट्स इत्यादी अनेक वस्तू OLX वर विकायला ठेवल्या. त्याने काही वस्तूंचे फोटो मित्रांना पाठवून त्यांना काही हवं आहे का असं विचारलं. त्याने बरीच भांडी आणि कपडे मोलकरीण आणि पहारेकऱ्याला दिले. त्याने तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स इस्त्रीच्या भावाने विकले. समोरच्या बागेतील माळ्याने छतावरून तीन डझन कुंड्या आणि रोपे विनामूल्य नेली. त्याने मुलांचे जुने कपडे आणि खेळणी एका अनाथाश्रमात पाठवली. जवळपास महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर, दोन ट्रक भरून सामान अखेर नवीन घरात हलवण्यात आले.

रागिणी आणि सिद्धार्थ यांच्यासारख्या समस्येचा सामना अनेक लोक करतात. विशेषतः सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या बदलीच्या नोकऱ्यांमुळे दर चार-पाच वर्षांनी या समस्येचा सामना करावा लागतो. घर बदलताना सामान हलवणे हे वाटते तितके सोपे नसते. या प्रक्रियेत अनेक व्यावहारिक आणि मानसिक आव्हाने येतात. सर्वप्रथम, काय घेऊन जायचे आणि काय मागे ठेवायचे हा संभ्रम असतो. मानसिक ताण आणि गोंधळ शिगेला पोहोचतात. संपूर्ण घरातील दिनचर्या विस्कळीत होते, ज्यामुळे घर अनेक दिवस अस्ताव्यस्त राहते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या कामासाठी वेळ काढणे कठीण होते. घर बदलणे नेहमीच थोडे थकवणारे असते, परंतु योग्य तयारीने ते तणावमुक्त आणि खूप सोपे काम होऊ शकते. तणावमुक्त स्थलांतरासाठी आम्ही तुम्हाला काही उत्तम आणि व्यावहारिक टिप्स देत आहोत:

२-३ आठवडे आधीच नियोजन करा

काय पॅक करायचे आहे, स्थलांतराचा दिवस कोणता आहे आणि कोणाला फोन करायचा आहे याची यादी तयार करा यासाठी दररोज २०-३० मिनिटे काढा, जेणेकरून शेवटच्या दिवशी होणारी धावपळ कमी होईल.

आधी अनावश्यक वस्तू वेगळ्या करा

घर बदलताना आढळणाऱ्या वस्तूंपैकी २०-३०% वस्तू अशा असतात ज्यांची भविष्यात गरज भासणार नाही. त्यामुळे, भावनिक न होता या वस्तू काढून टाका.

खोलीनुसार पॅकिंग

स्टोअर रूम आणि गेस्ट रूम यांसारख्या कमी वापरल्या जाणाऱ्या खोल्यांपासून पॅकिंगला सुरुवात करा. त्यानंतर, ड्रॉइंग रूम आणि डायनिंग रूम पॅक करा. पॅकिंग करताना, प्रत्येक बॉक्सवर लहान अक्षरात लिहा की तो कोणत्या खोलीचा आहे आणि त्यात काय आहे.

आवश्यक वस्तूंचा एक “आवश्यक वस्तूंचा बॉक्स” तयार करा. ज्या वस्तू पहिल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपयोगी पडतील त्या वेगळ्या ठेवा. कपड्यांचा एक सेट, मोबाईल चार्जर, ब्रश/पेस्ट, साबण, औषधे, पाण्याची बाटली, टॉवेल आणि महत्त्वाची कागदपत्रे एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा. यामुळे नवीन कपडे फेकून देण्याची वेळ टळेल.

नाजूक वस्तू व्यवस्थित पॅक करा. ग्लास, भांडी आणि शोभेच्या वस्तू बबल रॅपच्या २-३ थरांमध्ये पॅक करा. जड वस्तू तळाशी आणि हलक्या वस्तू वरच्या बाजूला ठेवा. बॉक्सवर मोठ्या अक्षरात “नाजूक – काळजीपूर्वक हाताळा” असे लिहा.

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचरचे फोटो आधीच काढून ठेवा. टीव्ही, वॉशिंग मशीन आणि वायरिंग कनेक्शनचे फोटो पुन्हा जोडणीसाठी उपयुक्त ठरतील. फर्निचरचे भाग वेगळे करण्यापूर्वी त्याचे फोटो काढल्यास पुन्हा जोडणी करणे सोपे जाते.

पॅकिंगचे साहित्य आगाऊ मिळवा

कार्डबोर्ड बॉक्स, बबल रॅप, पॅकिंग टेप, मार्कर, प्लास्टिक शीट, स्ट्रेच फिल्म इत्यादी साहित्य आगाऊ खरेदी करा. यामुळे पॅकिंग जलद आणि सुरक्षित होते.

एक चांगली मूव्हिंग कंपनी निवडा

एखादी स्वस्त कंपनी निवडण्याऐवजी, चांगली प्रतिष्ठा असलेली एक नामांकित कंपनी निवडा. अशा कंपन्या वस्तू सुरक्षितपणे आणि वेळेवर पोहोचवतात आणि बाजारात आपली प्रतिष्ठा खराब होण्यापासून वाचवतात. आगाऊ बुकिंग केल्याने दर कमी होऊ शकतात.

सामान हलवण्याच्या दिवशी, स्वतः जास्त काम करू नका; त्याऐवजी, फक्त आवश्यक सूचना द्या. बाकीचे काम मूव्हिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर सोडा. ते त्यांच्या पद्धतीने ट्रकवर सामान चढवतील. तुम्ही फक्त शांत बसून त्यांच्यावर देखरेख ठेवा. स्वतः जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर, तुमच्या नवीन घरी तुम्हाला पाठदुखीचा त्रास होईल.

असे व्हा यशस्वी

* प्रतिनिधी

जगभरात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं आयुष्य खूपच संघर्षमय असतं, ज्या घरापासून दूर राहून काम करतात, त्यांच्यासाठी ते आव्हानात्मक अधिक असतं, ज्या कधीच हार मानत नाहीत, साधारणपणे स्वभाव हसत मुख असतो, त्यांना पार्टी करणं, पार्टीत जाणं आणि फिरायला खूप आवडतं. त्यांना सर्वांच्या मनावर राज्य करण्याची कला शिकायची असते.

अनेक स्त्रियांना आव्हानात्मक काम मिळतं आणि सोबतच आई-वडिलांच्या देखभालीची जबाबदारी देखील. मात्र नोकरी अशी असते ज्यामध्ये एकटयाने प्रवास करणं देखील गरजेचे असेल तर काही आणखीन आव्हानं येतात.

अनिताला तिच्या नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईला येजा कराव लागत होतं, कारण ती मार्केटिंग आणि मॅनेजमेंट असं दुहेरी काम सांभाळत होती. ती मूळची हिमाचलची होती आणि ती जेव्हा दिल्लीत आली तेव्हा आई-बाबांना देखील भेटायला जात असे. तिला महाविद्यालयापासूनच नृत्य करण्याची आवड होती आणि कोणत्याही प्रसंगी ती नृत्य करत असे. आतादेखील कोणत्याही पार्टीत ती तासभर नाचू शकते. पूर्वी ती दिल्लीत काम करत असे परंतु नंतर तिला मुंबईमध्ये एका कंपनीने बोलावलं.

पूर्वी ती तिथे एक आठवडाभर काम करायची आणि पुन्हा परत दिल्लीत येत असे, परंतु ती मुंबईत आली आणि इथेच राहू लागली. यादरम्यान तिचं काम एवढं वाढलं की तिला वारंवार येणं जाणं अशक्य होऊ लागलं.

आयुष्य एक संघर्ष आहे

अशा प्रकारची आव्हानं प्रत्येक यशस्वी स्त्रीला अनेकदा झेलावी लागतात. लग्न तर होतं परंतु जर कामाच्यामध्ये जोडीदारामुळे तर चॅलेंजेस अधिक वाढतात. खासकरून तर जेव्हा मुलं होतात, घटस्फोटाचा काळ खूपच संघर्षपूर्ण असतो कारण लोकं या गोष्टींना समजू शकत नाहीत. यामध्ये सर्वात मोठी मदत अनेकदा तिची आई करते, कारण तिला देखील माहित असतं की जगरहाटी काय असते .

साधारणपणे यशस्वी घटस्फोटीत स्त्रिया आपल्या पतीबद्दल अधिक सांगत नाहीत आणि हे खरं देखील आहे, कारण तो एक गेलेला काळ असतो, ज्याची आठवण काढणं त्यांना आवडत नाही. परंतु एवढं नक्की आहे की जी लोकं अशा प्रकारच्या परिस्थितीतून गेली नाही आहेत, त्यांना ती गोष्ट समजत नाही आणि या गोष्टीं देखील आव्हानांच्या यादीशी जोडल्या जातात. लग्न तुटणं हे कायमच सकारात्मकरित्या घ्या. कारण भांडणांच्या लग्नापेक्षा आव्हानांचं एकाकीपण अधिक चांगलं असतं.

सहज सोपं बनवा काम

आजदेखील कोणत्याही एकटया स्त्रीचं काम करणं कठीण आहे. आज प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण सिस्टम बदलत असते. प्रॅक्टिसच्या नादात कंपनीमध्ये रोज नवीन प्रयोग होतात. कामात चुका काढल्या जातात. म्हणून काम सुरू कुठून तरी होतं आणि पुढे काही वेगळंच होत राहतं. त्यामुळे हे सगळं समजणं आणि समजावून घेणं एक चॅलेंजिंग असतं. तुम्हाला जी नोकरी करण्यासाठी ठेवलं जातं, त्याचं प्रोफाइल बदलतं. मॅनेजरच वैयक्तिक आयुष्य राहत नाही. मुलांचे पीटीए अटेंड करणं, नंतर त्यांच्यासोबत फिरणं, त्यांची काळजी घेणं, आई वडिलांची काळजी घेणं सर्व योग्य पद्धतीने करायचं असतं. काम ९ ते ६ वाजेपर्यंत असो वा ९ ते रात्रीचे १२ वाजेपर्यंत सहन करावं लागतं. कामाची गुणवत्ता चांगली व्हावी म्हणून सतत चॅलेंजेस होत असतात.

तू चाल पुढं

प्रत्येक यशस्वी स्त्रीने आपल्या पेहरावावर पूर्ण लक्ष ठेवायला हवं. सगळया प्रकारचे कपडे चांगले नसतात. तिने तेच घालावं जे कम्फर्टेबल असावेत. पार्ट्यांमध्ये जावं, निसर्गाशी एकरूप व्हावं. कामात एक्सप्लायटेशन होत असेल तर गदारोळ माजवू नये.
कामाचं चॅलेंज एक असं क्षेत्र आहे जिथे मरावंदेखील लागतं. जर तुमचा कोणी गॉडफादर असेल तर तुम्ही यशस्वी. तुमचं यश तुमच्या अनेक चुका लपवून ठेवतं. आपल्या मागची कुजबुज दुर्लक्षित करणेदेखील एक चॅलेंज आहे.

असे सांभाळून ठेवा डिजिटल फोटो

* शोभा कटारे

स्मार्ट फोन आल्यापासून, आपण खूप फोटो, सेल्फी आणि व्हिडीओ काढू लागलो आहोत, कारण मोबाईल सतत आपल्या हातात असतो. आपण जेव्हा कधी आणि जेव्हा कुठे फोटो काढतो, त्या फोटोत खूप आठवणी असतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर मोबाईल हरवला किंवा खराब झाला तर तुम्ही त्यात क्लिक केलेल्या आनंदाच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओंचे काय होईल? तुम्ही ते कायमचे गमावून बसाल का?

हो, जर तुम्ही ते सेव्ह म्हणजे जतन केले नसतील तर अशीच वेळ येईल. त्यामुळेच जर सुंदर आठवणी कायमच्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर सर्वप्रथम आपल्याला त्यांचा बॅकअप घ्यावा लागेल, म्हणजेच त्या सुरक्षित ठेवाव्या लागतील, जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला त्या आठवतील तेव्हा आपण त्या पुन्हा पाहू शकू.

पण, समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपल्याला अनेक फोटोंमधले फक्त काही फोटो किंवा व्हिडीओ पाहायचे असतात. त्यावेळी ते खूप कठीण होते, कारण आपण बहुतेक फोटो कसेही सेव्ह करतो. त्यामुळेच जर आपण आपले फोटो व्यवस्थित ठेवले तर ते शोधण्यासाठी खूप कमी वेळ लागेल आणि आपण आपल्या आवडीचे फोटो लगेच पाहू शकू, आपल्या आठवणी ताज्या करू शकू आणि आपल्या आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकू.

जेव्हा मोबाईलची मेमरी भरून जाते

मोबाईल किंवा कॅमऱ्याने फोटो काढताना आपण हे विसरतो की, मोबाईल किंवा कॅमेऱ्यात मेमरी असते, म्हणजेच एका विशिष्ट क्षमतेनंतर आपण त्यात जास्त फोटो आणि व्हिडीओ साठवू शकत नाही. म्हणूनच, त्यात साठवलेल्या फोटो आणि व्हिडीओंचा बॅकअप घेणे आवश्यक होते, जेणेकरून आपण त्यात नवीन फोटो आणि व्हिडीओ साठवू शकू. आपल्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यातील फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपण संगणक किंवा लॅपटॉपचा गुगल अकाउंट, ड्राइव्ह, हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह वापरू शकतो किंवा डीव्हीडी देखील तयार करू शकतो.

अशा प्रकारे ट्रान्सफर करा मोबाईलमधील फोटो

मोबाइलमधील फोटो संगणक किंवा लॅपटॉपवर ट्रान्सफर करण्यासाठी, आपल्याला बाजारात सहज उपलब्ध असलेल्या डेटा केबलची आवश्यकता असते. या केबलची पातळ पिन मोबाईलवर आणि मोठी पिन तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टवर लावताच, तुमचा मोबाईल कम्प्युटर किंवा लॅपटॉपशी कनेक्ट होईल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलचा डेटा कम्प्युटरवर पाहू शकाल. तुम्ही कनेक्ट होताच, तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर एक विंडो उघडेल. येथून, फाइल एक्सप्लोरर वापरून ‘माय कम्प्युटर’ उघडा. येथे तुम्हाला फोटो, व्हिडीओ, म्युझिक, डॉक्युमेंट्स इत्यादी फोल्डर दिसतील. येथे, कॉपी पेस्ट कमांडच्या मदतीने, तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर (जर तुमच्या संगणकावर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल तर) मोबाईलमधील फोटो कॉपी करू शकता किंवा वाढदिवस, लग्न, वर्धापन दिन, वर्ष (२०२१, २०२०) इत्यादी तुमच्या वर्षातील कार्यक्रमांच्या फोटोंनुसार फोल्डरदेखील तयार करू शकता. फोटो सेव्ह करण्याच्या पद्धतीत पारंगत व्हा

आजकाल स्मार्ट फोन आणि अॅप्सचे युग आहे, म्हणूनच जर तुमची फोटो सेव्ह करण्याची पद्धतही स्मार्ट असेल तर ते दुधात साखर पडल्यासारखे आहे, म्हणूनच आता तुमचे फोटो सेव्ह करण्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह इत्यादी विसरून जा, तुमच्या जुन्या पद्धती बदला आणि नवीन पद्धती स्वीकारा ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो अगदी सहजपणे सेव्ह करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते आनंदाचे क्षण आठवतील तेव्हा तुम्ही ते कोणत्याही त्रासाशिवाय शोधू शकता.

स्वत:ची डिजिटल फोटो लायब्ररी तयार करा

कधीकधी खूप जास्त फोटो मोबाईलच्या मेमरीवर परिणाम करतात आणि मोबाईल ठीक करणे कठीण होते, म्हणून फोटो तुमच्यासाठी समस्या बनण्यापूर्वी, ते योग्यरित्या सेव्ह करा. तुम्ही गुगल किंवा अॅपल फोटोज अॅप्सच्या मदतीने हे काम सहजपणे करू शकता. गुगल आणि अॅपल फोटोज दोघेही आपोआप अल्बम तयार करतात. या दोन्ही अॅप्समध्ये अशी टूल्सदेखील आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची फोटो लायब्ररी चांगल्या प्रकारे तयार करू शकता. याचा फायदा असा आहे की, तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी कोणत्याही त्रासाशिवाय आणि तुम्हाला हवे तेव्हा, हव्या तिथे सहजपणे पाहू शकता आणि त्यांचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर तुम्ही त्या शेअर देखील करू शकता.

गुगल अकाउंट वापरा

जर तुमचे गुगल अकाउंट असेल तर तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओंचा बॅकअप घेण्यासाठी गुगल फोटो वापरू शकता :

* येथे तुम्ही १५ जीबी पर्यंतची जागा मोफत वापरू शकता.

* गुगल फोटोजमध्ये, तुम्ही तुमचे फोटो वेगवेगळ्या फोल्डरमध्ये ठेवू शकता.

* तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोजमध्ये सुरक्षितपणे ठेवू शकता आणि तुमचे संस्मरणीय फोटो कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकता.

* गुगल फोटोज तुम्हाला आवश्यक असलेले फोटो जलदगतीने शोधण्यास मदत करते.

* गुगल फोटोजवर तुमचे फोटो आपोआप व्यवस्थित केले जातात आणि शोधण्यायोग्य बनवले जातात, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत आवश्यक फोटो सहज सापडतील.

* एडिटिंग टूल्स आणि स्मार्ट फिल्टर्सच्या मदतीने, तुम्ही तुमचे आवडते फोटो संपादित करून संस्मरणीय क्षण अधिक सुंदर आणि मौल्यवान बनवू शकता आणि ते तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअरदेखील करू शकता.

या अॅप्सच्या मदतीने तुम्ही तारीख, अल्बम आणि इतर वैशिष्ट्यांनुसार फोटोंची क्रमवारी लावू शकता आणि त्यांचे वर्गीकरण करू शकता किंवा तुम्ही अल्बमला नावदेखील देऊ शकता. जर तुम्हाला या अल्बममध्ये फक्त मुलांचे फोटो ठेवायचे असतील तर तुम्ही त्याला ‘किड्स फोटोज’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्याकडे मित्रांचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘फ्रेंड्स पिक्स’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्या कुटुंबाचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘फॅमिली’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्या किटी पार्टीचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘किटी पार्टी’ असे नाव देऊ शकता.

असे करा डिजिटल फोटो लायब्ररीचे व्यवस्थापन

अल्बम तयार करा : अल्बममध्ये, तुम्ही पुस्तक लायब्ररीप्रमाणे फोटो वर्णक्रमानुसार ठेवू शकता. असे करण्याचा एक फायदा म्हणजे ते शोधणं खूप सोपं होतं. जेव्हा कधी तुम्हाला अल्बमचे फोटो पाहायचे असतील तेव्हा तुम्ही वेळ न घालवता ते त्वरित शोधू शकता.

स्मार्टपणे फोटो शोधा : जेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर फोटो सेव्ह करता तेव्हा काही दिवसांनी किंवा वर्षांनी तुम्ही सेव्ह केलेले फोटो शोधून काढणे कठीण होते. अशावेळी, गुगल आणि अॅपल फोटोज अॅप्स आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आजकाल, स्मार्ट फोनमधील फोटोज डेटामध्ये लोकेशन डेटा एम्बेड केला जातो. याच्या मदतीने आपण वेळ वाया न घालवता आपले जुने फोटो शोधू शकतो. यासाठी, तुम्ही जिथे भेट दिली होती आणि फोटो क्लिक केले होते त्या ठिकाणाचे नाव सर्च बॉक्समध्ये एंटर करा. सर्च केल्यावर तुम्हाला ते सर्व फोटो सापडतील, कारण गुगल आणि अॅपल फोटो आपल्यासाठी फोटो आपोआप वर्गीकृत करतात.

अल्बममध्ये फोटो शोधण्यासाठी, अॅपची समोरची स्क्रीन उघडा. जर तुम्हाला तारखेनुसार शोधायचे असेल, तर तुम्ही सर्च बारमध्ये ‘जून २०२१’ असे टाकून देखील फोटो शोधू शकता. जर तुम्हाला नावाने शोधायचे असेल तर सर्च बारमध्ये नाव किंवा वाढदिवस टाका. त्यानंतर तुमचे सर्व फोटो दिसतील. अशाप्रकारे, नवीन स्मार्ट पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ योग्य आणि सुरक्षितपणे संग्रहित करू शकता आणि तुमचा आनंद कायमचा ‘कॅप्चर’ करू शकता, शिवाय पाहिजे तेव्हा आपल्या प्रियजनांसोबत तो शेअर करू शकता. मोबाईल खराब झाल्यास किंवा हरवल्यास ही पद्धत अधिकच उपयुक्त ठरते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें