थोडे प्रेम थोडे फ्लर्टिंग

* मोनिका अग्रवाल

नेहाने समरला फ्रीजमधून दूध आणायला लावले तेव्हा तो चिडला, “काय आहे? दिसत नाही, मी कपडे घातले आहेत?” पण नेहाने हे प्रेमापोटी केले होते. आणि त्या बदल्यात तिलाही असाच स्पर्श आणि प्रेमळपणा हवा होता. पण समरला हा प्रकार आवडला नाही. नेहाचा मूड अचानक बिघडला. ती तिच्या डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, “मी तुला आकर्षित करण्यासाठी धक्का दिला. याच्या बदल्यात मला तुझ्याकडून असाच प्रतिसाद हवा होता, पण तू रागावलास.” हे ऐकून समर क्षणभर स्तब्ध झाला, फ्रीजमधून दूध काढले आणि म्हणाला, “सॉरी, मी तुला समजू शकलो नाही. मला तुमच्या भावना समजल्या नाहीत. मला लाज वाटते कदाचित मी अजूनही या बाबतीत अनाड़ी आहे.

शब्द फारसे खास नव्हते पण हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर आले होते. बोलता बोलता समरच्या चेहऱ्यावरही लाजिरवाणेपणा दिसत होता. नेहाला राग आला. ती समरजवळ आली आणि त्याच्या कॉलरला स्पर्श करत म्हणाली, “तुला माझी नाराजी जाणवली आहे, माझ्यासाठी ते पुरेसे आहे. तू तुझी चूक मान्य केलीस, हा देखील फक्त एक स्पर्श आहे. तुझ्या बोलण्याने माझे हृदय उबदार झाले आहे… माझे शरीर रोमांचित झाले आहे,” आणि मग तिने त्याला मिठी मारली. अचानक समरचा हात नेहाच्या पाठीवर गेला आणि मग नेहाच्या कंबरेला स्पर्श करत म्हणाला, “तुझी कंबर किती पातळ आहे. ” समरला म्हणायचे होते की नेहाने समरच्या पोटात हळूच तिचे बोट टोचले. रागाच्या भरात तो बेडवर पडला तेव्हा नेहाही हसत त्याच्या अंगावर पडली. मग काही क्षण ते असेच हसत राहिले.

असेच प्रेम वाढेल

अशा प्रकारे जीवनात प्रणय वाढत जातो. कडू आणि गोड दोन्ही भावना जीवनात चव आणतात आणि नातेसंबंध सोपे आणि जगण्यासारखे बनवतात. आजकाल अनेक प्रकारचे ताणतणाव आणि जबाबदाऱ्या मनात फिरत असतात. पती-पत्नी जवळून गेल्यावरही हसता येत नाही. ते दुरूनच एकमेकांकडे बघत राहतात. अशा कंटाळवाण्या क्षणांमध्ये जोडीदाराची छेड काढणे हे कोणत्याही औषधापेक्षा कमी मौल्यवान असू शकत नाही. तणावाच्या काळात बहुतेक पती-पत्नी एकमेकांशी इच्छा असूनही बोलू शकत नाहीत. अशा क्षणी पुढाकार घेण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कपाळावर चुंबन घेण्याचे धाडस करता. सुरुवातीला, तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, परंतु बर्याच काळासाठी असे करू शकणार नाही, कारण मेंदूला छेडछाडीला सकारात्मक प्रतिसाद मिळतो. आपण पत्नी आहात असे समजून घाबरू नका. तुमचा नवरा कोणत्या रुपात तुमचा पुढाकार घेईल हे तुम्हाला माहीत नाही असा विचार करून तुमची घृणास्पदता पसरू देऊ नका. अशा भीतीने जगणाऱ्यांच्या आयुष्यात प्रणय कधीच येत नाही आणि वय नुसतेच निघून जाते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कपाळाचे चुंबन घेण्याचे किंवा मिठी मारण्याचे किंवा तुमच्या कंबरेला स्पर्श करण्याचे धाडस करा, सुरुवातीला जोडीदार तुमच्या फ्लर्टिंगकडे दुर्लक्ष करू लागेल, परंतु बराच काळ तो तुमच्या फ्लर्टिंगकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, कारण स्पर्श किंवा फ्लर्टिंग केल्याने मेंदूला सकारात्मक संदेश मिळतो आणि हा संदेश पोहोचताच मनातील तणावाची गडद छाया हळूहळू दूर होत जाते. तुम्ही त्याला आवडायला लागाल. त्याला बरे वाटू लागते. ही भावना तुमच्यातील प्रणय क्षण विकसित करण्यास मदत करते.

उजळ बाजू

नेहाने अचानक शांतपणे उभ्या असलेल्या समरला धक्का मारला आणि फ्रीजमधून दूध काढण्यास सांगितले, त्यावर तो चिडला. पण नेहा घाबरली नाही, उलट तिने तिच्या भावना आणि आंतरिक प्रेम आणि भावना सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. समरचा राग शांत झाला आणि त्यालाही लाज वाटली. त्यानंतर तो नेहाबद्दल आपल्या भावना व्यक्त करू लागला. दोघेही पुढच्याच क्षणी रोमान्सच्या रंगात रंगले होते. त्याचा मूड रोमँटिक झाला. एकमेकांना आवडू लागले. वैवाहिक जीवनात रोमान्स आणि साहस आणण्याचे हे तंत्र आहे, जे आपल्यापैकी बहुतेक जोडप्यांना माहिती नसते. फक्त एकत्र राहा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा वाद घालू शकता. खूप तणावाखाली असताना ते एकमेकांसमोर रडतात. पण ही वैवाहिक जीवनाची नकारात्मक बाजू आहे, या कारणामुळे पती-पत्नी कधीही रोमँटिक जोडपे बनू शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यात जे काही घडते ते नैसर्गिक किंवा नैसर्गिक नसून जबरदस्तीने, सेक्स असो वा प्रेम किंवा हास्य, ज्याला या गोष्टींची गरज असते, तो स्वतः लग्नाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आता हे सर्व समोरच्या जोडीदाराच्या मूडवर अवलंबून आहे. त्याला जोडीदाराची इच्छा पूर्ण करायची आहे की नाही. हा वैवाहिक जीवनाचा आनंददायी पैलू आहे, रोमँटिक पैलू आहे. एक जोडीदार दुसऱ्यावर किती काळ जबरदस्ती करणार? एक दिवस तो थकल्यानंतर प्रयत्न करणे थांबवेल.

रोमँटिक कसे असावे

आजच्या वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे एकमेकांना पाहून मनात प्रेम, आपुलकी जन्माला येत नाही. हे फक्त मनातूनच उद्भवू शकतात आणि यासाठी तुमच्यापैकी एकालाच पुढे यावे लागेल. आता कोण पुढे आले? या द्विधा मनस्थितीतच हे जोडपे प्रणयाचे क्षण सोडून देतात, माझ्या मते जीवनाला बायकोपेक्षा चांगले समजणारा कोणीच असू शकत नाही. एक स्त्री असल्याने ती प्रेमळ हृदयाची आहे, ती दयाळू आहे. तिला प्रेमाचा अर्थ कळतो. मग प्रेम जाणणाराच माणसाला रोमँटिक बनवू शकतो. नेहाने प्रयत्न केल्यावर तिला बदल्यात रोमान्सचे क्षण मिळाले. तुम्हीही या बाबतीत हट्टी होऊ नका. मनात अहंकार ठेवू नकोस की जेव्हा माझ्या पतीला माझी गरज नाही, तो माझ्याशी बोलायला तयार नाही, मग मी जबरदस्ती कशाला जाऊन त्याच्याशी विनाकारण बोलू?

असे विचार मनात आणू नयेत. त्यामुळे वैवाहिक जीवन वांझ होते. तू एक स्त्री आहेस, प्रेम, प्रणय, सेक्स या भावना घेऊन जन्माला आली आहेस. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या पतीला रोमँटिक करू शकता. प्रणय तुमच्यापासून उद्भवतो आणि नेहमीच तुमच्यामध्ये असतो. तुम्हाला फक्त ते जिवंत करण्याची गरज आहे. मग बघा, प्रणय कशाप्रकारे ताणतणाव आणि जबाबदाऱ्यांच्या छायेत पडू लागतो.

फ्लर्टमुळे येते जीवनात मजा

* सुधा कसे

‘‘कशी आहेस निधी? तुझी तब्येत कशी आहे? लवकर बरी हो… मी तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. तुला पडवळ आवडते ना?’’ निधीची शेजारी चित्रा घरात येत म्हणाली.

‘‘अगं, किती दिवस तू माझ्या आवडीचे पदार्थ बनवून आणत राहशील. आता मी बरी आहे, मी स्वयंपाक करेन. आता माझी काळजी करू नकोस,’’ निधी पलंगावरून उठत हसत म्हणाली.

‘‘चित्रा, मी तुझ्या मैत्रिणीच्या हातचे बेचव खाऊन कंटाळलो आहे. काहीही कर, पण निधीला अजून २ दिवस आराम करू दे, म्हणजे मी तुझ्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ शकेन,’’ निधीचा नवरा निर्मल चित्राला बसण्याचा इशारा करत म्हणाला.

‘‘भावोजी, हे काय बोलताय? सकाळपासून कोणी भेटले नाही का? मी निधीच्या हातचे कधी खाल्ले नाही का…? तिच्या हातचे खाल्ल्यानंतर किटी पार्टीत सर्वजणी बोटे चाटत राहतात.’’

हे ऐकून निर्मल मोठयाने हसला, पण निधीच्या चेहऱ्यावरचा राग चित्राने पहिला. निर्मल जेव्हा कधी चित्रासोबत अशी थट्टा-मस्करी करायचा तेव्हा निधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असेच व्हायचे, निर्मलच्या अशा वागण्यामुळे तिला असुरक्षित वाटायचे, हे चित्राला गेल्या १० दिवसांत जाणवले होते.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, त्यानंतर चित्रा तिच्या घरी गेली. निधीच्या चेहऱ्यावरचे तणावपूर्ण भाव पाहून तिला वाईट वाटले. निधी आता बरी झाली आहे आणि स्वत: जेवण बनवू शकते. निधीलाही तेच हवे आहे, त्यामुळे तिला जेवण न देणेच बरे, असे चित्राने ठरवले.

ती निघून जाताच निधी पतीवर रागावत म्हणाली, ‘‘माझ्या आजाराचा फायदा घेऊन तू चित्रासोबत फ्लर्ट का करतोस? प्रत्येकाला दुसऱ्याची पत्नी आवडते, पण वेळेला माझेच बेचव जेवण उपयोगी पडेल, तिचे चविष्ट जेवण नाही,’’ तिने एका दमात तिचा सगळा राग काढला.

‘‘अगं, तू उगाच मनाला लावून घेतेस. मी फक्त यासाठी बोललो, जेणेकरून ती जेवण देत राहील आणि तुला आणखी २ दिवस विश्रांती मिळेल, तू किती संकुचित विचार करतेस? तुमच्या बायकांच्या ईर्षेला काय म्हणायचे…?’’ निर्मलने निधीला प्रत्युत्तर देत तिलाच दोषी ठरवले. नेहमीप्रमाणे निधीच्या अशा संशयी वागण्याचा त्याला राग आला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रा निधीच्या घरी जेवण घेऊन आली नाही तेव्हा निधीला हायसे वाटले, पण निधीच्या वागण्याने चित्राला नक्कीच वाईट वाटले असावे, असे निर्मलला वाटले. तो निधीला काहीच बोलला नाही, कारण तिच्याबद्दल काही विचारल्यास निधी खोचकपणे बोलून त्याचे मन दुखावणार, हे त्याला माहीत होते.

सकारात्मक विचार करणे गरजेचे?

निधी आणि चित्रा दोघींच्या लग्नाला अवघी २ वर्षे झाली होती. लग्न होताच दोन्ही कुटुंबे बंगळुरूला स्थायिक झाली होती. शेजारी राहात असल्याने आणि तत्सम परिस्थितीमुळे दोघीही खूप लवकर मैत्रिणी झाल्या, पण त्यांचे पती एकमेकांना खूप कमी भेटायचे, कारण निधीचा पती खूप बोलका होता, तर चित्राचा पती अंतर्मुख होता.

पती कामाला गेल्यावरच त्या भेटायच्या. अनेकदा त्या बाजारात किंवा इतर ठिकाणी एकत्र जात. अलीकडे निधीच्या आजारपणामुळे चित्रा निधीच्या घरी कधीही येऊ लागली होती. निधीला डेंग्यूचा ताप होता, त्यामुळे तिला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी ती सकाळ-संध्याकाळ येऊन जेवण देत होती. कामावर सुट्टी घेऊन निर्मल घरीच राहिल्याने आणि त्यांचा स्वभाव सारखाच असल्याने चित्रा आणि तो एकमेकांशी चांगले बोलू लागले होते. यावरून निधी आणि निर्मलमध्ये अनेकदा वाद व्हायचे.

निधीच्या अगदी उलट असलेला चित्राचा मनमोकळा स्वभाव निर्मलला आवडायचा. छोटया-छोटया गोष्टींवर मनमोकळेपणाने हसणे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ती येताच वातावरण प्रसन्न होऊन जायचे. निधीला डेंग्यूचा त्रास झाल्यानंतर घरात भकास शांतता पसरली होती. त्यावेळी चित्राने त्यांना खूप मदत केली. ती रोज येऊ लागली होती, तिच्याशी गप्पा मारल्याने थोडा वेळ का होईना, पण आजाराचा, तनावाचा विसर पडायचा.

असुरक्षिततेची भावना कशासाठी?

हे सर्व निधीला आवडत नव्हते. निर्मलच्या फ्लर्ट करण्याच्या सवयीची तिला नेहमीच भीती वाटायची. त्याचा स्वभावच तसा मदमस्त होता. कोणी त्याचे कौतुक केले की, निधीला असुरक्षित वाटायचे, याउलट तो निधीवर खूप प्रेम करायचा. एका चांगल्या पतीप्रमाणे तिची काळजी घ्यायचा.

निधीचा संशयी स्वभाव त्याला अनेकदा खटकत असे. तिने या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडावे, असे त्याने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण निधीवर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही. निर्मललाही विनाकारण आपला स्वभाव बदलावा, असे वाटत नव्हते. त्यामुळेच त्यांच्यात खटके उडायचे.

उदासीन वागणूक

१५ दिवस झाले. चित्रा त्यांच्या घरी आली नव्हती. निर्मलही त्याच्या कामात व्यस्त होता. निधीची तब्येत बरी झाली होती, पण तिला अशक्तपणा जाणवत होता. घरी एकटीच असल्याने दिवसभर पलंगावर पडून तिला कंटाळा येऊ लागला होता, त्यामुळे तिला चित्राची खूप आठवण येऊ लागली होती.

ती येत नसल्याने निधीला याची जाणीव झाली की, तिच्यासोबत वेळ कधी निघून जायचा हे समजत नव्हते. तिच्या उदासीन वागण्यामुळेच चित्राने तिच्या घरी येणे बंद केले, हेही निधीच्या लक्षात आले. तिच्या संकुचित वृत्तीमुळे ती एकटी पडेल, हे निर्मलचे बोलणे बरोबर होते, याचा विचार ती करू लागली.

आपल्या संशयी स्वभावामुळे एक चांगली मैत्रीण गमावल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला. एके दिवशी निर्मल कामाला जाताच तिने चित्राच्या घरी जायचे ठरवले. निधीला अचानक घराबाहेर पाहून चित्राला आश्चर्य वाटले.

चित्रा तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, ‘‘तुझ्यासारख्या मैत्रिणीवर मी कशी रागवेन? तुला माझ्यापासून दूर राहून जेवढे वाईट वाटले, तेवढेच मलाही वाटले. फक्त तूच आहेस, जिच्यामुळेच मी या अनोळखी शहरात आनंदाने राहू शकले. चिंतन नेहमी त्याच्या कामात व्यस्त असतो. तो वरचेवर बाहेरगावी जातो. घरी असला तरी लॅपटॉपला चिकटून राहतो, पण हे नक्की की, मी तुमच्या घरी मुद्दामहून येत नव्हते. माझ्यामुळे तुम्हा पतीपत्नीत वाद व्हावा किंवा तुझ्या घरी येणे बंद करून तुला माझे महत्त्व पटवून द्यावे, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मला तुमच्या आयुष्यात एवढी घुसखोरी करण्याचा अधिकार नाही की, मी तुला समजावून सांगू शकेन की, कोणतेही नाते विशेषत: पतीपत्नीमधील नाते हे विश्वासाच्या पायावर उभे असते.

‘‘पतीवर संशय घेऊन स्वत:च्याच वैवाहिक जीवनात विष कालवण्याचे काम तू करत आहेस. पतीने पत्नीच्या बहिणीची किंवा वहिनीची थट्टा-मस्करी केली तर ते समाजमान्य आहे. या नात्याच्या नावाखाली कितीतरी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले तरी ज्या महिलेशी त्याचे कोणतेही नाते नाही तिच्याशी त्याने थट्टा-मस्करी केली तर त्याला संशयाच्या नजरेने का पाहिले जाते? उलट तुझा पती अशा मनमोकळया विचारांचा आहे, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर एक चिंतन आहे, जो कोणाशी बोलत नाही आणि घरात भकास शांतता असते.

‘‘आणखी एक गोष्ट, ज्या पतींचा हेतू वाईट असतो, ते आपल्या पत्नीसमोर खूप सभ्य असतात आणि त्यांच्या पाठीमागे फ्लर्ट करतात. थोडेसे फ्लर्ट केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो, अन्यथा पतीपत्नी सतत एकमेकांसोबत राहून कंटाळतात आणि आयुष्य नीरस होऊन जाते.’’

चित्रा असे म्हणताच निधी म्हणाली, ‘‘चित्रा तू खरं बोलतेस. घरातले वातावरण किती छान असायचे, जेव्हा निर्मल तुझी थट्टा-मस्करी करायचा. आता घर खायला उठते. तू माझे डोळे उघडलेस.’’

‘‘बघ, विचार कर, असे होऊ देऊ नकोस की, मी तुझ्या पतीला पटवेन आणि तू नुसतीच बघतच राहाशील,’’ चित्रा डोळे विस्फारून असे बोलताच दोघीही जोरात हसल्या आणि वातावरण प्रसन्न झाले.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें